Author Archives: Kokanai Digital

…. शेवटी ‘तो’ चुकीच्या मराठीत लिहिलेला बॅनर बदलण्यात आला..

   Follow us on        

डोंबिवली: समाज माध्यमांचा प्रभावी वापर करून आपला आवाज योग्य ठिकाणी पोहोचवून प्रशासनाकडून झालेल्या चुका सुधारता येतात हे डोंबिवली मध्ये एका नागरिकाने सिद्ध केले आहे.

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर 5 वर पादचारी पूल आणि सरकत्या जिन्यासाठी काम चालू असल्याच्या सुचनेचा बॅनर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लावण्यात आला होता. मात्र या बॅनर वर लिहिण्यात आलेली मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने लिहिण्यात आली होती. त्यात बर्‍याच चुका होत्या.

ही गोष्ट अनुजा धाकरस नावाच्या महिलेने ‘एक्स’ माध्यमावर दिनांक १० फेब्रुवारी रोजीला पोस्ट करून मध्य रेल्वे आणि संबधित आस्थापनांना टॅग केले.

”हे कोणतं मराठी आहे??? रेल्वेमध्ये मराठी भाषिकांचा एवढा तुटवडा असावा का की २ ओळींची सूचना सुद्धा धड मराठीत लिहू शकत नाहीत?” अशा शब्दात ही पोस्ट करण्यात आली होती.

रेल्वे प्रशासनाने या प्रकारची दखल घेतली आणि दोन दिवसांतच या जागी चुका दुरुस्त केलेला बॅनर लावला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत महत्वाचे बदल.

   Follow us on        

Ladki bahin Yojna: महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या काही अटींमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. ही योजना फक्त गरजवंत महिलांना पोहोचावी यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. या बदलांचा तपशील खालीलप्रमाणे

● नव्याने पात्र झालेले तसेच नव्याने आधार जोडणी केलेल्या लाभार्थ्यांना आता आधीच्या महिन्यांचा म्हणजेच जुलैपासून लाभ न देता अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ दिला जाणार आहे.

● दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान ई- केवायसी आणि लाभार्थी हयात आहे किंवा नाही याची तपासणी करूनच पुढील लाभ दिला जाणार.

● या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असावे ही अट असली तरी त्याचे उल्लंघन करून अनेकांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाकडून आयकर दाता महिलांची माहिती प्राप्त करून घेण्यात येणार असून त्यातून अडीच लाखपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांना यादीतून वगळण्यात येणार आहे.

● अन्य मार्गांनीही एखाद्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त असल्याचे आढळून आल्यास संबंधितांना अपात्र करण्यात येणार आहे. या योजनेतील सुमारे 16.5 लाख महिलांच्या खात्यावर थेट पैसे पाठविण्यात आल्यानंतर त्यांनी अर्जात दिलेली नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यात तफावत आढळून आली आहे.

● अशा लाभार्थ्यांची जिल्हास्तरावरून फेरतपासणी करण्यात येणार असून त्यात अपात्र आढळलेल्या लाकड्या बहिणींना अपात्र ठरविण्यात येईल.

१७ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 28:56:47 पर्यंत
  • नक्षत्र-चित्रा – पूर्ण रात्र पर्यंत
  • करण-कौलव – 15:37:02 पर्यंत, तैतुल – 28:56:47 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शूल – 08:54:05 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:08
  • सूर्यास्त- 18:38
  • चन्द्र-राशि-कन्या – 18:03:39 पर्यंत
  • चंद्रोदय- 22:37:59
  • चंद्रास्त- 09:45:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिन :
  • जागतिक पर्यटन लवचिकता दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1801: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत थॉमस जेफरसन आणि आरोन बर यांना समान मते मिळाली. प्रतिनिधी सभागृहाने जेफरसन यांना अध्यक्ष आणि बर यांना उपाध्यक्ष म्हणून निवडले.
  • 1859: द ग्रेट अटलांटिक अँड पॅसिफिक टी कंपनी (ए अँड पी) ची स्थापना झाली.
  • 1949: इस्रायलचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून चैम वेझमन यांचा कार्यकाळ सुरू झाला.
  • 1959: प्रोजेक्ट व्हॅनगार्ड: व्हॅनगार्ड 2: ढगांच्या आवरणाचे वितरण मोजण्यासाठी पहिला हवामान उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला.
  • 1965: प्रोजेक्ट रेंजर: अपोलो मोहिमेच्या तयारीसाठी चंद्राच्या मारे ट्रँक्विलिटाटिस प्रदेशाचे छायाचित्रण करण्यासाठी रेंजर 8 प्रोब त्याच्या मोहिमेवर निघाला.
  • 2008: कोसोव्होने सर्बियापासून स्वातंत्र्य घोषित केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1781: ‘रेने लेनेक’ – फ्रेंच डॉक्टर, स्टेथोस्कोपचे संशोधक  यांचा जन्म.  (मृत्यू : 13 ऑगस्ट 1826)
  • 1874: ‘थॉमस वॉटसन’ – अमेरिकन उद्योगपती, आय. बी. एम. चे अध्यक्ष  यांचा जन्म. (मृत्यू: 19 जून 1956)
  • 1880: ‘अल्वारो ओब्रेगन’ – मेक्सिको देशाचे 46वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 17 जुलै 1928)
  • 1886: ‘एरिक झेग्नर’ – सॅक्सनी देशाचे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 5 एप्रिल 1949)
  • 1888: ‘ओटो स्टर्न’ – नोबेल पुरस्कार, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.  (मृत्यू : 17 ऑगस्ट 1969)
  • 1951: ‘जगदीश मोहंती’ – भारतीय लेखक आणि अनुवादक यांचा जन्म. (मृत्यू : 29 डिसेंबर 2013)
  • 1957 : ‘प्रफुल्ल पटेल’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
  • 1963: ‘जेन-ह्सून’ – हुआंगएनव्हीडिया चे सहसंस्थाक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1881: ‘लहुजी राघोजी साळवे’ – क्रांतीवीर, समाजसेवक  यांचे निधन.
  • 1883: ‘वासुदेव बळवंत फडके’ – राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे  क्रांतिकारक  यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1845)
  • 1978: ‘पुरुषोत्तम शिवराम रेगे’ – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक  यांचे निधन. (जन्म: 2 ऑगस्ट 1910)
  • 1986: ‘जे. कृष्णमूर्ती’ – भारतीय तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 12 मे 1895)
  • 1988:  ‘कापुरी ठाकूर’ – बिहारचे 11 वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 24 जानेवारी 1924)
  • 2023: ‘अमृतपाल छोटू’ – भारतीय विनोदी अभिनेते यांचे निधन.
  • 2023: ‘विजय किचलू’ – पद्मश्री, भारतीय शास्त्रीय गायक यांचे निधन.  (जन्म: 16 सप्टेंबर 1930)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

आयपीएल 2025 चे वेळापत्रक जाहीर! संपूर्ण माहिती येथे पाहा

   Follow us on        
IPL 2025 Schedule :क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे खेळाडूंची आणि क्रिकेट चाहत्यांची अखेर अनेक दिवसांची प्रतिक्षा संपली आहे. आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलने या 18 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
कधी होणार पहिला सामना? 
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील सलामीचा सामना कोलकाता विरुद्ध बंगळुरु यांच्यात होणार आहे. गतविजेत्या कोलकाता टीमच्या होम ग्राउंडमध्ये अर्थात इडन गार्डनमध्ये हा सामना होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी 23 मार्चला या स्पर्धेतील पहिल्या डबल हेडरचं (एकाच दिवशी 2 सामने) आयोजन करण्यात आलं आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात हैदराबाद विरुद्ध राजस्थान आमनेसामने असतील, तर दुसरा सामना हा महामुकाबला असणार आहे. मुंबई विरुद्ध चेन्नई असा असणार आहे. हा सामना चेन्नईत खेळवण्यात येणार आहे.
यंदाच्या हंगामात एकूण 65 दिवसांत 74 सामने खेळवण्यात येणार आहे. मुंबई आणि चेन्नई हे या स्पर्धेतील 2 यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 5-5 वेळा ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. केकेआर हा 3 जेतेपदे जिंकणारा तिसरा सर्वात यशस्वी संघ आहे. यंदा एकूण 13 ठिकाणी हे सामने पार पडणार आहेत. त्यानुसार मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगलुरु, हैदराबाद, लखनऊ, अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, धर्मशाळा, न्यू चंडीगड, गुवाहाटी आणि विशाखापट्टणम येथे सामने खेळवण्यात येणार आहेत.
दरम्यान यंदाच्या हंगामात एकूण 12 डबल हेडरचं आयोजन करण्यात आलं आहे. राजस्थान, दिल्ली, लखनऊ आणि गुजरात हे 4 संघ दुपारी प्रत्येकी 3-3 सामने खेळणार आहे. तर उर्वरित 6 संघ दुपारी प्रत्येकी 2-2 सामने खेळणार आहेत.
ग्रुप A – कोलकाता, बंगळुरु, राजस्थान, चेन्नई आणि पंजाब
ग्रुप B – मुंबई, दिल्ली, गुजरात, लखनऊ आणि हैदराबाद
कधी होणार अंतिम सामना?
आयपीएलच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. क्वालिफायर-1 20 मे रोजी आणि एलिमिनेटर 21 मे रोजी खेळवला जाईल. क्वालिफायर-2 सामना 23 मे रोजी कोलकाता येथे खेळवला जाईल. अंतिम सामना 25 मे रोजी होणार आहे.

 

नागपूर – सिकंदराबाद वंदेभारत एक्सप्रेसचा २० डब्यांचा रेक मुंबई – मडगाव वंदेभारत एक्सप्रेससाठी वापरण्यात यावा

   Follow us on        
Konkan Railway: नागपूर -सिकंदराबाद  दरम्यान चालविण्यात येणाऱ्या गाडी क्रमांक २०१०१ /२०१०२ नागपूर – सिकंदराबाद वंदेभारत एक्सप्रेसच्या डब्यांची संख्या कमी करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. सध्या ही गाडी  वंदे भारत एक्सप्रेसच्या २० डब्यांचा रेकसहित चालविण्यात येत आहे. मात्र त्याप्रमाणात प्रवासी संख्या नसल्याने ही गाडी ८ डब्यांच्या रेकसह चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या गाडीचा २० डब्यांचा रेक मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेससाठी वापरण्यात यावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनांतर्फे  करण्यात आली आहे.
कोकण रेल्वे विकास समितीच्या वतीने जयवंत शंकर दरेकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे ई-मेल द्वारे ही मागणी केली आहे. तर अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने ‘एक्स’ माध्यमातून ही मागणी नोंदवली आहे.
मुंबई मडगाव दम्यान सुरु करण्यात आलेली वंदे भारत एक्सप्रेस सध्या आपल्या पूर्ण क्षमतेने धावत आहे. देशातील आतापर्यंत यशस्वी ठरलेल्या वंदे भारत एक्सप्रेस च्या यादीत या गाडीची गणना होत आहे. या गाडीची आरक्षण स्थिती नेहमीच फुल्ल आणि प्रतीक्षा यादीत असते कारण ही  गाडी ८ रेकसह चालविण्यात येते. या मात्र गाडीची या मार्गावरील लोकप्रियता आणि गरज पाहता ही गाडी जास्त डब्यांसह चालविणे अपेक्षित आहे. त्यामुळे ही एक्सप्रेस  १६ किंवा २० रेकसह चालविण्यात यावी अशी  मागणी होत आहे.

कोकण रेल्वेच्या रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेला २५ वर्षे पूर्ण; आता थेट सेवा मिळणार

RORO Service on Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) तर्फे देण्यात येत असलेल्या रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. सन १९९९ रोजी ही सेवा सुरु करण्यात आली  होती. कोलाड -वेर्णा-  सुरतकल दरम्यान ही सेवा देण्यात येत आहे. या सेवेच्या विपणन आणि संचालनासाठी मेसर्स अंजना ट्रेड आणि एजन्सीला दिलेला आऊटसोर्सिंग करार १४/०२/२०२५ रोजी संपुष्टात आला असल्याने आता ट्रक वाहतूक व्यायसायिकांनी  थेट कोकण रेल्वे च्या कोलाड आणि सुरथकल स्थानकांवरील बुकिंग कार्यालयांशी संपर्क साधावा असे आव्हान कोकण रेल्वे प्रशासनाने केले आहे.
 रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सुविधा म्हणजे दूसरे तिसरे कांही नसून रेल्वेच्या ओपन फ्लॕट वॕगन्सवर (ज्याला रेल्वेत BNR वॕगन्स म्हणतात) मालाने भरलेल्या ट्रक्सची रोड ऐवजी मालगाडीवरून एका गावापासून दूस-या गावी केलेली वाहतूक होय. या सेवा मुंबई(कोलाड)-गोवा(वेर्णा) अशी ४१७ किमी तर मुंबई(कोलाड)-सूरतकल(कर्नाटक) 721 किमी या मार्गावर सुरू आहे. वरील अंतर रोडमार्गे अनुक्रमे २४ तास व ४० तास घेते. पण RORO मुळे ते अंतर अनुक्रमे १२ ते २२ तासात कापले जाते.

रोल ऑन-रोल ऑफ (RORO) सेवेचे फायदे 

या योजनेमुळे केन्द्र सरकारच्या ‘Operation Green’ ला चांगलाच फायदा होत आहे. डिझेलची मोठ्या प्रमाणावर बचत होते  व सरकारचे इम्पोर्ट बिलही कमी होते  त्यामुळे देशातून डाॕलर्सचा बाहेर जाणारा प्रवाह थांबतो. जलद वाहतूक झाल्याने वेळेचा अपव्यय टळतो. रस्त्यावर होणारे ट्रॅफिक कमी होण्यास मदत होते आणि प्रदूषणही कमी  होते. ट्रक चालकांना लांबच्या ड्रायविंगचा त्रास व होणारा टोल, आदिचा खर्चही वाचतो. ट्रकच्या टायर व इंजनचा वापर कमी झाल्याने त्याचा घसारा कमी होतो .अपघातांची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होते. या सेवेमुळे कोकण रेल्वेच्या उत्पन्नात सुद्धा मोठी भर पडली आहे.

या सेवेचे दर खालीलप्रमाणे

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी; १८ जणांचा मृत्यू 

   Follow us on        

Delhi Railway Station Stampede: शनिवारी रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे तर १० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये गेल्या महिन्याभरापासून महाकुंभमेळा सुरू असून, दिल्लीतूनही मोठ्या संख्येने लोक महाकुंभात शाही स्नान करण्यासाठी जात आहेत. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरून महाकुंभासाठी येथून दोन विशेष गाड्या चालवल्या जात आहेत. यामध्ये चढण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवासी आले होते. यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर काल रात्री चेंगराचेंगरी झाली. या घटनेत १८ जणांचा मृत्यू झाला तर १० पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव यांनी या प्रकरणी ट्विट करत माहिती दिली आहे.

ही चेंगराचेंगरी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर झाली. ही घटना, रात्री ९:५५ वाजता घडली. खरंतर, कुंभमेळ्याला जाण्यासाठी नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर मोठी गर्दी झाली होती. दरम्यान, प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वर प्रचंड गर्दी झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली.या घटनेबाबत बोलताना केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, “नवी दिल्ली रेल्वे स्थानकावरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. दिल्ली पोलीस आणि आरपीएफ घटनास्थळी पोहोचले आहेत. जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत.”

१५ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्थी – 26:19:19 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 28:32:25 पर्यंत
  • करण-भाव – 13:05:07 पर्यंत, बालव – 26:19:19 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-धृति – 08:05:19 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:06:37
  • सूर्यास्त- 18:38:54
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 21:49:59
  • चंद्रास्त- 09:13:59
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिन :
  • नवकल्पना दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1659: जगातील पहिला धनादेश (चेक) ब्रिटिश बँकेतून काढण्यात आला
  • 1918: लिथुएनियाने रशिया व जर्मनीपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
  • 1930: रोमानियन फुटबॉल फेडरेशन फिफामध्ये सामील झाले.
  • 1934: ऑस्ट्रियन गृहयुद्ध सोशल डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकनिशर शुत्झबंड यांच्या पराभवाने संपले.
  • 1959: फिडेल कॅस्ट्रो क्युबाचे अध्यक्ष झाले.
  • 1960: अमेरिकन अणुऊर्जा पाणबुडी ट्रायटन पाण्याखाली जगाला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघाली.
  • 1978: पहिली संगणक बुलेटिन बोर्ड प्रणाली तयार करण्यात आली.
  • 2005: रशियाने मान्यता दिल्यानंतर क्योटो प्रोटोकॉल अंमलात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1745: ‘थोरले माधवराव पेशवे’ – मराठा साम्राज्यातील 4 था पेशवा यांचा जन्म (मृत्यू : 18 नोव्हेंबर 1772)
  • 1814: ‘तात्या टोपे’ – स्वातंत्रवीर सेनापती यांचा जन्म. (मृत्यू : 18 एप्रिल 1859)
  • 1843: ‘हेन्री एम. लेलंड’ – कॅडिलॅक आणि लिंकन कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 26 मार्च 1932)
  • 1866: ‘हर्बर्ट डाऊ’ – डाऊ केमिकल कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 15 ऑक्टोबर 1930)
  • 1876: ‘रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे’ – भारतातील पहिले सीनियर रँग्लर आणि फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य यांचा जन्म. (मृत्यू: 6 मे 1966)
  • 1909: ‘रिचर्ड मॅकडोनाल्ड’ – मॅकडोनाल्ड चे सहसंस्थास्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 14 जुलै 1998)
  • 1920: ‘ऍना मे हेस’ – अमेरिकेतील पहिल्या महिला यूएस आर्मी जनरल यांचा जन्म.(मृत्यू : 7 जानेवारी 2018)
  • 1964: ‘बेबेटो’ – ब्राझीलचा फुटबॉलपटू यांचा जन्म.
  • 1978: ‘वासिम जाफर’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1944: ‘धुंडिराज गोविंद फाळके’ – भारतीय चित्रपटाचे जनक यांचे निधन. (जन्म: 30 एप्रिल 1870)
  • 1956: ‘मेघनाथ साहा’ – खगोल भौतिकशास्त्रज्ञ आणि संसद सदस्य यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1893)
  • 1968: ‘नारायणराव सोपानराव बोरावके’ – कृषी शिरोमणी आणि पहिले मराठी साखर कारखानदार यांचे निधन. (जन्म: 17 ऑक्टोबर 1892)
  • 1970: ‘फ्रान्सिस पेटन राऊस’ – नोबेल पुरस्कार विजेते, अमेरिकन पॅथॉलॉजिस्ट आणि विषाणूशास्त्रज्ञ यांचे निधन (जन्म: 5 ऑक्टोबर 1879)
  • 1992: ‘जॅनियो क्वाड्रोस’ – ब्राझील देशाचे 22वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन (जन्म: 25 जानेवारी 1917)
  • 1994: ‘पं. निवृत्तीबुवा सरनाईक’ – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक यांचे निधन. (जन्म: 4 जुलै1912)
  • 1996: ‘आर. डी. आगा’ – उद्योगपती, थरमॅक्स उद्योगसमुहाचे संस्थापक यांचे निधन.
  • 2000: ‘बेल्लारी शामण्णा केशवान’ – सुप्रसिद्ध ग्रंथालय शास्रज्ञ यांचे निधन.
  • 2001: ‘रंजन साळवी’ – मराठी चित्रपटांचे नृत्यदिग्दर्शक यांचे निधन.
  • 2015: ‘राजिंदर पुरी’ – भारतीय व्यंगचित्रकार आणि पत्रकार यांचे निधन (जन्म: 20 सप्टेंबर 1934)
  • 2015: ‘आर. आर. पाटील’ – महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांचे निधन (जन्म: 16 ऑगस्ट 1957)
  • 2021: ‘गुस्तावो नोबोआ’ – इक्वेडोर देशाचे 51वे अध्यक्ष यांचे निधन (जन्म: 21 ऑगस्ट 1937)
  • 2023: ‘तुलसीदास बलराम’ – भारतीय फुटबॉलपटू यांचे निधन.(जन्म: 30 नोव्हेंबर 1936)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Raiwlay: रेल्वे प्रशासनाचा पुन्हा ‘दुजाभाव’

   Follow us on        
Konkan Railway: प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यासाठी देशातील कानाकोपऱ्यातून भाविक जात आहेत. भाविकांना या प्रवित्र स्थळी पोहोचणे सोयीचे व्हावे यासाठी प्रशासनाने देशातील सर्व रेल्वे विभागातून विशेष रेल्वे सेवा चालविल्या आहेत. कोकण रेल्वे मार्गावरसुद्धा महाकुंभमेळा विशेष २ गाड्या चालविण्यात आल्या आहेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या गाड्या फक्त गोवा आणि दक्षिणेकडील भाविकांच्या सोयीसाठी  चालविण्यात आल्या असून कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र विभागातील भाविकांकडे दुर्लक्ष केले गेले आहे.
गोवा राज्याचे मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांनी प्रयत्न करून गोवा राज्यातील भाविकांना महाकुंभमेळ्यात सहभागी व्हावे याकरिता एक विशेष गाडी चालवली आहे. ही गाडी पूर्णपणे गोवा राज्यातील भाविकांसाठी चालविण्यात आली असल्याने इतर भागातील प्रवाशांना या गाडीतून प्रवास करता येणार नाही. तर  उडुपी-चिकमंगळुरूचे खासदार श्री. कोटा श्रीनिवास पुजारी यांच्या मागणीनुसार उडुपी – टुंडला जं. – उडुपी महाकुंभ विशेष दुसऱ्या गाडीची  घोषणा झाली. मात्र या गाडीला कोकण रेल्वे मार्गाच्या महाराष्ट्र विभागात थांबे देताना कंजुषी केली आहे. या गाडीला फक्त रत्नागिरी, चिपळूण आणि रोहा येथे थांबा देण्यात आला आहे.आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही थांबा देण्यात आलेला नाही. देण्यात आलेले थांबे हे पाणी  भरण्यासाठी आणि तांत्रिक थांबे असल्याने ही गाडी सुद्धा कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र विभागासाठी नसल्याचे सिद्ध झाले आहे.

मागणी करूनही गाडी नाही. 

महाकुंभ मेळ्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी चालविण्यात यावी आणि तिला कोकण रेल्वे मार्गावरील सर्व महत्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे रेल्वे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आले होते. मात्र त्याची दखल गेली नसल्याने समितीने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

लोकप्रतिनिधींच्या मागणीलाही केराची टोपली

गोवा सरकारने महाकुंभमेळ्यासाठी सोडलेल्या विशेष गाडीला कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र विभागात थांबे देण्यात यावेत अशी मागणी करणारे पत्र रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांनी  केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांना पाठविले होते. मात्र या मागणीची दखल अजूनपर्यंत रेल्वे मंत्र्यांनी घेतली नसल्याचे दिसते. एकीकडे इतर राज्यातील लोकप्रतिनिधींची विशेष गाड्यांची मागणी सहज मान्य होताना या विशेष गाडयांना महाराष्ट्रात  साधे थांबे देण्याच्या साध्या मागणीकडे दुर्लक्ष का होत आहे असा प्रश्न पडताना दिसत आहे.
या सर्व प्रकारामुळे कोकण रेल्वे नक्की कोणासाठी, कोकण रेल्वेवर कोणाचे वर्चस्व हे प्रश्न पडत आहेत.

१५ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-तृतीया – 23:55:46 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा फाल्गुनी – 25:40:37 पर्यंत
  • करण-वणिज – 10:52:22 पर्यंत, विष्टि – 23:55:46 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सुकर्मा – 07:32:13 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07:09
  • सूर्यास्त- 18:37
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 21:03:00
  • चंद्रास्त- 08:43:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • उत्पादकता आठवड्याचा चौथा दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • ३९९: सॉक्रेटिसला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.
  • १८७९: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात स्त्री वकिलांना खटले लढवण्यास परवानगी मिळाली.
  • १९३९: काँग्रेसच्या अध्यक्षपदी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची निवड झाल्यावर मोठा पेचप्रसंग होऊन मतभेद झाले. त्यातून पंडित नेहरुंसह कार्यकारिणीच्या बारा सभासदांनी राजीनामे दिले.
  • १९४२: दुसरे महायुद्ध – सिंगापुरमध्ये ब्रिटिश सैन्याची शरणागती. ८०,००० भारतीय, ब्रिटिश व ऑस्ट्रेलियन सैनिक युद्धबंदी.
  • १९६५: कॅनडाने नवीन ध्वज अंगिकारला.
  • १९६७: आजच्या दिवशी भारतामध्ये चौथ्या लोकसभेसाठी निवडणुका घेण्यात आल्या.
  • १९७६: मध्य प्रदेश येथे केंद्रीय कृषि अनुसंधान संस्थान ची स्थापना करण्यात आली.
  • २०००: भारतीय चित्रपट दिग्दर्शक बी.आर चोपड़ा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात आला.
  • २०१०: आजच्या दिवशी प्रसिद्ध नृत्यांगना प्रेरणा श्रीमाली यांना २००९ चा संगीत नाटक अकादमी पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५६४: गॅलेलिओ गॅलिली – इटालियन खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ८ जानेवारी १६४२)
  • १७१०: लुई (पंधरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १० मे १७७४)
  • १८२४: राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५), भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार (मृत्यू: २६ जुलै १८९१)
  • १९२१: ला प्रसिद्ध इतिहासकार तसेच लेखक राधाकृष्ण चौधरी यांचा जन्म.
  • १९२४: आजच्या दिवशी प्रसिद्ध चित्रकार के.जी. सुब्रह्मण्यम यांचा जन्म.
  • १९३४: स्विस संगणक शास्त्रज्ञ व पास्कल प्रोग्रामिंग लॅग्वेज निर्माते निकालूस विर्थ याचा जन्म.
  • १९४७: भारतीय चित्रपट अभिनेता रणधीर कपूर यांचा जन्म.
  • १९४९: नामदेव लक्ष्मण ढसाळ – दलित साहित्यिक (मृत्यू: १५ जानेवारी २०१४)
  • १९४९: प्रसिद्ध संस्कृत भाषेचे साहित्यकार राधावल्लभ त्रिपाठी यांचा जन्म.
  • १९५२: केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा जन्म.
  • १९५६: डेसमंड हेन्स – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू
  • १९५४: प्रसिद्ध हिंदी साहित्यकार अरुण कमल यांचे जन्म.
  • १९६४: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवरिकर यांचा जन्म.
  • १९७९: हामिश मार्शल – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
  • १९८१: भारतीय अभिनेत्री कविता कौशिक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १५५३: शास्त्रीय संगीतकार सुरेशबाबू माने यांचे निधन.
  • १८६९: मिर्झा ग़ालिब – ऊर्दू शायर (जन्म: २७ डिसेंबर १७९७)
  • १९४८: सुभद्राकुमारी चौहान – हिन्दी कवयित्री (जन्म: १६ ऑगस्ट १९०४)
  • १९५३: सुरेशबाबू माने – किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक (जन्म: ? ? १९०२)
  • १९८०: मनोहर दिवाण – कुष्ठरोग्यांची सेवा करणारे पहिले भारतीय (जन्म: ? ? ????) १९८०: कॉंम्रेड एस. एस. मिरजकर – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक सदस्य व ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस (आयटक) चे अध्यक्ष (जन्म: ? ? ????)
  • १९८८: रिचर्ड फाइनमन – क्‍वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स मधील मूलभूत संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक (१९६५) मिळवणारे अमेरिकन पदार्थवैज्ञानिक (जन्म: ११ मे १९१८)
  • २००८: भारतीय चित्रपट अभिनेत्री मनोरमा यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search