Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway | मध्य रेल्वेच्या १० मेमू सेवा कोकण रेल्वे विभागात विस्तारित करण्यात याव्यात

   Follow us on        

Konkan Railway: वीर रेल्वे स्टेशन हे रायगड जिल्हातील मध्यवर्ती ठिकाण असून स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या नजीकचे शहर आहे.तसेच कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी कमी करण्यासाठी अशा मेमू २ेल्वे चालवण आवश्यक आहे. दिवा ते पनवेल / पेन / रोहा मेमू रेल्वेच्या दिवसातून २० फेऱ्या होत असून त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे,रायगड जिल्हयातील वीर जवळील महाड हे शिवकालीन ऐतिहासीक वारसा लाभलेले शहर आहे,त्यामुळे वीर रेल्वे स्टेशनला पर्यटणदृष्ट्या खूप महत्व प्राप्त झालेले आहे.तसेच पनवेल ते वीर दरम्याने रेल्वेचा दुहेरी मार्गही आहे.व वीर येथे ४ फलाटही आहेत.मुंबई ते रोहा हा रेल्वे मार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारित येतो तर रोहा ते वीर पर्यंतचा रेल्वेमार्ग कोकण रेल्वेच्या अखत्यारित येतो.तरी कृपया मध्य रेल्वेवरील दिवा ते पनवेल / पेन / रोहा आणि पश्चिम रेल्वेवरील वसई ते पनवेल दरम्याने धावणाऱ्या सर्व मेमू रेल्वे कोकण रेल्वे मार्गावरील वीर स्थानकापर्यंत चालवाव्यात,अशी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई च्या वतीने मध्य रेल्वेकडे मागणी करण्यात आली आहे.

दिवा ते पनवेल किंवा डहाणू / वसई रोड ते पनवेल दरम्याने धावणाऱ्या मेमू रेल्वेला वीर स्टेशनपर्यंत चालवल्यास कोकणातील रायगड जिल्हामध्ये पर्यटणासाठी जाणाऱ्या १) रायगड किल्ला २) महाडचे चवदार तळे ३) चौल येथील गरम पाण्याची कुंडे ४) गांधरपाळे लेणी ५) तलोशीचे रांगूमाता देवस्थान ६) वालनकोंड ७) पाचाड येथील जिजाऊंची समाधी अशा ऐतिहासीक स्थळांना भेट देण्यासाठी वीर हे मध्यवर्ती व जवळचे स्टेशन आहे,तरी मध्य रेल्वे,पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वे यांनी प्रवाशांच्या मागणीचा सहानुभूतिपुर्वक विचार करावा असे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सांगितले.

दिवा येथील फेऱ्या वीर स्टेशनपर्यंत चालवाव्यात.

१) दिवा रोहा ( ६१०११ ) ८.४५ am,

२) दिवा पनवेल ( ६१०१७ ) ९.१० am,

३) दिवा पेन ( ६१०२३ ) ९.४० am,

४) दिवा पेन ( ६१०१९ ) ११.२० am,

५) दिवा रोहा ( ६१०१५ ) ६.४५ am,

६) दिवा पेन ( ६१०२५ ) ७.५० am,

७) दिवा रोहा ( ६१०१३ ) ८.०० am

वसई रोड पनवेल मेमू :

८) डहाणू पनवेल ( ६९१६४ ) ५.२५ am,

९) वसई पनवेल ( ६९१६८ ) १२.१० pm,

१०) वसई पनवेल ( ६९१६६ ) ४.४० pm

निवेदनावर अध्यक्ष श्री.शेखर बागवे व सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सह्या केल्या असून त्याच्या प्रति कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक श्री.संतोषकुमार झा,जनरल मॅनेजर : पश्चिम रेल्वे,खासदार श्री.सुनिल तटकरे,खासदार श्री.नारायण राणे व खासदार श्री.हेमंत सावरा यांना पाठवल्या आहेत.

१३ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 20:25:06 पर्यंत
  • नक्षत्र-माघ – 21:08:33 पर्यंत
  • करण-बालव – 07:51:39 पर्यंत, कौलव – 20:25:06 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शोभन – 07:31:09 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:08:12
  • सूर्यास्त- 18:37:34
  • चन्द्र-राशि-सिंह
  • चंद्रोदय- 19:23:59
  • चंद्रास्त- 07:37:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • सरोजनी नायडू यांची जयंती.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा सातवा दिवस (कीस डे)
महत्त्वाच्या घटना:
  • १६३०: आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.
  • १६६८: स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
  • १७३९: कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.
  • १९३१: आजच्या दिवशी दिल्ली ला भारताची राजधानी घोषित करण्यात आली.
  • १९४८: आजच्या दिवशी गांधीजीनी आमरण उपोषणास सुरुवात केली.
  • १९८४: युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.
  • १९८८: कॅनडात कॅल्गारी येथे १५वे हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
  • २००१: पहिले मानव रहित अंतरिक्षयान एरोस नावाच्या लघुग्रहावर उतरले.
  • २००३: चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
  • २०१०: पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७६६: थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४)
  • १८३५: मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक (मृत्यू: २६ मे १९०८)
  • १८७९: सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू – चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (मृत्यू: २ मार्च १९४९)
  • १८९४: वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (मृत्यू: १६ जुलै १९८६)
  • १९१०: दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित (मृत्यू: १ मार्च १९९९)
  • १९११: फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४)
  • १९१६: भारतीय सेनेतील सेवानिवृत्त लेफ्टिनेंट जनरल जगजीत सिंह अरोड़ा यांचा जन्म.
  • १९४५: विनोद मेहरा – अभिनेता (मृत्यू: ३० आक्टोबर १९९०)
  • १९७६: भारतीय चित्रपट अभिनेता शरद कपूर यांचा जन्म.
  • १९७८: भारतीय चित्रपट अभिनेता अश्मित पटेल यांचा जन्म.
  • १९८७: तमिळनाडू चे माजी मुख्यमंत्री एम. भक्तवत्सलम यांचे निधन.
  • १९९५: धावपटू वरुणसिंग भाटी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८८३: रिचर्ड वॅग्‍नर – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक (जन्म: २२ मे १८१३)
  • १९०१: लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (जन्म: ९ मार्च १८६३)
  • १९६८: गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक (जन्म: ? ? ????)
  • १९७४: ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (जन्म: १५ ऑगस्ट १९१२)
  • २००८: राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते (जन्म: ? ? १९३१)
  • २०१२: अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (जन्म: १६ जून १९३६)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल हॉटेल्स आणि विविध कामांसाठी ३९ कोटींचा आराखडा तयार – आ. दिपक केसरकर

   Follow us on        

सावंतवाडी, दि. १२ फेब्रु. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर लागणार्‍या पाण्याची व्यवस्था, रेल हॉटेल व छोटे निवासी रूम तसेच नव्या प्लॅटफॉर्मसाठी जवळपास 39 कोटी रुपये खर्चाच्या कामाचा आरा  खडा तयार करण्यात आला आहे. या कामासाठी लागणारा निधी रत्नसिंधू योजनेतून देण्यात येणार असल्याची माहिती रत्नसिंधू योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

सावंतवाडी स्थानकावर लवकरच ठिकाणी रेल हॉटेल्स व रूम उभारण्यात येणार असून तिलारी धरणाचे पाणी सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला देण्याची निविदा प्रक्रिया ही राबवण्यात येणार आहे. सावंतवाडी- मळगाव रेल्वे टर्मिनस या ठिकाणी दर्जेदार असे रेल हॉटेल व तुतारी रेल्वे रुळाच्या बाजूला नवे प्लॅटफॉर्म आणि छोट्या निवासी रूमची व्यवस्था करण्यासाठी नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. या जागेची पाहणी आज श्री केसरकर यांनी केली. यावेळी त्यांनी जवळपास दोन तास सावंतवाडी मळगाव रेल्वे टर्मिनसच्या जागेची पाहणी केली. आणि तुतारी एक्सप्रेसमध्ये बसून नवीन आराखड्याची चर्चा केली यावेळी शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, स्टेशन मास्टर कृष्णकांत परब , रेल्वेचे जे पी प्रकाश, श्री ए बी फुले, सुरज परब, सुनील परब ,श्री गाड , योगेश तेली सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी वैभव सगरे आदी उपस्थित होते.

Fact Check:कोविड काळापूर्वी ज्येष्ठ नागरिकांना असलेली सवलत रेल्वे पुन्हा चालू करणार?

   Follow us on        

Senior Citizen Concession:भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना कोविड काळापूर्वी तिकीट दरांमध्ये देत असलेली सवलत पुन्हा चालू करणार असल्याची बातमी सर्वत्र प्रमाणात व्हायरल होत आहे. भारतीय रेल्वेने कोविड-19 उपायांचा एक भाग म्हणून मार्च 2020 मध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती बंद केल्या होत्या. आर्थिक अडचणींमुळे या सवलती पुनर्स्थापित करण्याची कोणतीही योजना नाही, असे सरकारने वारंवार स्पष्ट केले आहे. IRCTC पोर्टल हे देखील दर्शविते की ज्येष्ठ नागरिकांना सामान्य प्रवाशांप्रमाणेच भाडे आकारले जाते. याव्यतिरिक्त, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये या सवलती पुनर्संचयित करण्याचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे बातमी मध्ये केलेला दावा खोटा आहे.

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत वारंवार स्पष्ट केले आहे की ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलती पुन्हा सुरू करण्याची कोणतीही योजना नाही, सन २०२२ मध्ये या भूमिकेचा पुनरुच्चार केला गेला. त्यांनी यावर भर दिला की भारत सरकार आधीच रुग्णांना प्रवास खर्चाच्या अंदाजे ५०% अनुदान देते विद्यार्थी आणि अपंगांना तिकीट दरांत सवलत देते. साथीच्या रोगानंतर प्रवाशांच्या एकूण महसुलात झालेली घट लक्षात घेता या सवलती ज्येष्ठ नागरिकांना देणे व्यवहार्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

एप्रिल 2023 मध्ये, जेव्हा ज्येष्ठ नागरिक सवलती पुन्हा सुरू करण्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयासमोर आणला गेला, तेव्हा न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. शिवाय, डिसेंबर २०२४ मध्ये, जेव्हा लोकसभेत हाच मुद्दा उपस्थित केला गेला तेव्हा वैष्णव यांनी उत्तर दिले की भारत सरकारने प्रवाशांच्या सर्व श्रेणींसाठी (ज्येष्ठ नागरिकांसह) प्रदान केलेले एकूण अनुदान सध्या ₹ 56,993 कोटी आहे. याव्यतिरिक्त, केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे भाड्यात सवलत पुनर्स्थापित करण्याच्या कोणत्याही योजनेचा उल्लेख नाही.

सारांश, भारत सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वे भाड्यात सवलत दिल्याचा दावा खोटा आहे.

मार्च २०२० कोविडमुळे लॉकडाऊन लागला होता. त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद करण्यात आली. त्या अगोदर ज्येष्ठ नागरिक महिला प्रवाश्यांना 50 टक्के सवलत दिली जात होती तर पुरुष आणि तृतीयपंथीय प्रवाशांना ४० टक्के सवलत दिली जात होती.

चिपळूण: टेरवचे सुधाकर कदम क्षत्रिय मराठा कदम परिवाराच्या राज्यस्तरीय संमेलनात सन्मानित

   Follow us on        

चिपळूण: क्षत्रिय मराठा कदम परिवाराचे ७ वे राज्यस्तरीय कुलसंमेलन नुकतेच जामगे, खेड येथे संपन्न झाले. सदर प्रसंगी मा. ना. योगेशदादा कदम, गृह (शहरी), महसूल, ग्रामीण विकास व पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषधी प्रशासन विभाग राज्यमंत्री यांच्या शुभहस्ते व मा. बाबुराव कदम कोहळीकर आमदार हदगाव नांदेड, मा. आमदार अनिल कदम, निफाड, मा. महाराष्ट्र केसरी अप्पासाहेब कदम, उद्योजग गजानन कदम प्रा. डॉ. सतीश कदम अध्यक्ष अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, मा. सुनील कदम शस्त्र संग्राहक, मा. रामजी कदम सचिव, व मा. अमरराजे कदम अध्यक्ष क्षत्रिय मराठा कदम परिवार (महाराष्ट्र राज्य) व अध्यक्ष श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळ, तुळजापूर या व इतर मान्यवरांच्या उपस्थित दसपटी विभागातील चिपळूण तालुक्यातील टेरव गावचे सुपुत्र व सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबईचे संचालक सुधाकर कदम यांच्या शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक कार्याची दखल घेऊन त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, पोपाट कदम लिखीत कदम कुळाचा इतिहास हे पुस्तक तसेच श्री क्षेत्र तुळजाभवानी मातेचे कुंकू, प्रसाद व कवड्याची माळ देऊन सन्मानित करण्यात आले.

 

तसेच मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई मंदिर श्री क्षेत्र टेरव, चिपळूण देवस्थानची दिनदर्शिका व टेबल दिनदर्शिका देवून मंदिरास भेट देण्यासाठी निमंत्रित करण्यात आले. सदर संमेलनास संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच गुजरात व गोवा येथून हजारो क्षत्रिय मराठा कदम बांधव उपस्थित होते.

१२ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पौर्णिमा – 19:26:10 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 19:36:48 पर्यंत
  • करण-भाव – 19:26:10 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सौभाग्य – 08:06:40 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:10
  • सूर्यास्त- 18:35
  • चन्द्र-राशि-कर्क – 19:36:48 पर्यंत
  • चंद्रोदय- 18:32:00
  • चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच सहावा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा सहावा दिवस (हग डे)
महत्त्वाच्या घटना:
  • १५०२: लिस्बन, पोर्तुगाल येथून वास्को-द-गामा भारताच्या दुसर्‍या सफरीवर निघाला.
  • १६८९: आजच्या दिवशी विल्यम आणि मेरी हे इंग्लंड चे राजा राणी बनले.
  • १९२२: महात्मा गांधीनी असहयोग आंदोलन वापस घ्यायची घोषणा केली.
  • १९२८: गुजरात च्या बारदोली येथे महात्मा गांधी यांनी सत्याग्रह करण्याची घोषणा केली.
  • १९७६: पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते हडेक्की (केरळ) प्रकल्प देशास अर्पण.
  • १९९३: एम. एन. वेंकटचलैय्या यांनी भारताचे २५ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९४: दोन व्यक्तींनी नॅशनल गॅलरी फोडून त्यातून एडवर्ड मुंक यांची प्रसिद्ध पेंटिंग “द स्क्रीन” आजच्या दिवशी चोरी झाली.
  • १९९९: बिहार येथे २५ दिवसांसाठी राष्ट्रपती शासन लागू झाले होते.
  • २००३: आवाजापेक्षा दुप्पट वेगवान ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७४२: बाळाजी जनार्दन भानू उर्फ ‘नाना फडणवीस’ – पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी,
  • १८०४: हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज (मृत्यू: १० फेब्रुवारी १८६५)
  • १८०९: अब्राहम लिंकन – अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १५ एप्रिल १८६५)
  • १८०९: चार्ल्स डार्विन – उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ (मृत्यू: १९ एप्रिल १८८२)
  • १८२४: मूळशंकर करसनदास तिवारी तथा स्वामी दयानंद सरस्वती – संस्कृत विद्वान आणि आर्य समाजाचे संस्थापक (मृत्यू: ३१ आक्टोबर १८८३ – अजमेर, राजस्थान)
  • १८७१: चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (मृत्यू: ५ एप्रिल १९४०)
  • १८७६: थुब्तेन ग्यात्सो – १३ वे दलाई लामा (मृत्यू: १७ डिसेंबर १९३३)
  • १८७७: फ्रेंच व्यापारी रेनॉल्ट कंपनीचे संस्थापक लुई रेनॉल्ट यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑक्टोबर १९४४)
  • १८८१: अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (मृत्यू: २३ जानेवारी १९३१)
  • १९२०: प्राण कृष्ण सिकंद ऊर्फ ’प्राण’ – चित्रपट अभिनेता (मृत्यू: १२ जुलै २०१३)
  • १९४९: गुन्डाप्पा विश्वनाथ – शैलीदार फलंदाज
  • १९५४: लोकसभेचे माजी सदस्य कीर्ती सोम्या यांचा जन्म.
  • १९६७: प्रसिद्ध गायक चित्रवीणा एन रविकिरण यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७९४: पेशवाईतील मुत्सद्दी महादजी शिंदे यांचे वानवडी येथे निधन (जन्म: ? ? १७३०)
  • १८०४: एमॅन्युएल कांट – जर्मन तत्त्ववेत्ता (जन्म: २२ एप्रिल १७२४)
  • १९१९: दक्षिण भारतातील नवाब सैयद मोहम्मद बहादुर यांचे निधन.
  • १९८१: भारतीय चित्रपट दिग्दर्शक शांताराम आठवले यांचे निधन.
  • १९९८: पद्मा गोळे – कवयित्री (जन्म: १० जुलै १९१३)
  • २०००: विष्णुअण्णा पाटील – सहकार क्षेत्रातील नामवंत नेते (जन्म: ? ? ????)
  • २००१: भक्ती बर्वे – अभिनेत्री (जन्म: १० सप्टेंबर १९४८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

११ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 18:58:35 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – 18:35:16 पर्यंत
  • करण-वणिज – 18:58:35 पर्यंत, विष्टि – 31:08:33 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-आयुष्मान – 09:05:41 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:11
  • सूर्यास्त- 18:35
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 17:36:00
  • चंद्रास्त- 30:59:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच पाचवा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा पाचवा दिवस (प्रॉमीस डे)
महत्त्वाच्या घटना:
  • ६६०: सम्राट जिम्मु यांनी जपानचे राष्ट्र निर्माण केले.
  • १६६०: औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.
  • १७५२: पेनसिल्व्हानिया हॉस्पिटल या अमेरिकेतील पहिल्या हॉस्पिटलचे बेंजामिन फ्रँकलिनच्या हस्ते उद्‌घाटन झाले.
  • १८२६: लंडन विद्यापीठाची स्थापना.
  • १८१८: इंग्रजांनी अजिंक्यतारा किल्ला ताब्यात घेतला.
  • १८३०: मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना झाली.
  • १९११: हेन्र्‍री पिके याने हंटर जातीच्या विमानातून भारतातील पहिली ’एअर मेल’ अलाहाबादवरुन नैनी या १० किलोमीटर अंतरावरील गावाला वाहून नेली.
  • १९२९: पोप पायस (११ वा) आणि बेनिटो मुसोलिनी यांच्यात झलेल्या ’लॅटेरान ट्रिटी’ या विशेष करारानुसार ’व्हॅटिकन सिटी’ हे शहर राष्ट्र इटालीतुन वेगळे करण्यात आले. कॅथॉलिक ख्रिश्चनांचे हे प्रमुख धर्मपीठ आहे.
  • १९३३: आजच्या दिवशी महात्मा गांधी यांनी हरिजन या साप्ताहिकाची सुरुवात केली.
  • १९७९: पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
  • १९९०: २७ वर्षांच्या तुरुंगवासानंतर नेल्सन मंडेला यांची तुरूंगातुन सुटका
  • १९९७: खगोलशास्त्री “जयंत वी नार्लीकर” यांना १९९६ चा युनेस्को कलिंग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • १९९९: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना जाहीर.
  • २०११: १८ दिवसांच्या जनआंदोलनानंतर होस्‍नी मुबारक यांना इजिप्तची सत्ता सोडणे भाग पडले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७५०: आजच्या दिवशी आदिवासी लीडर तिलका मांझी यांचा जन्म.
  • १८००: हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (मृत्यू: १७ सप्टेंबर १८७७)
  • १८३९: अल्मोन स्ट्राउजर – अमेरिकन संशोधक [टेलिफोन एक्सचेंज] (मृत्यू: २६ मे १९०२)
  • १८४७: थॉमस अल्वा एडिसन – अमेरिकन संशोधक आणि उद्योजक (मृत्यू: १८ आक्टोबर १९३१)
  • १९३७: बिल लॉरी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटर
  • १९४२: गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री (मृत्यू: १ मार्च २००३)
  • १९५६: भारतीय माजी क्रिकेटर सोभा पंडित यांचा जन्म.
  • १९५७: प्रसिद्ध अभिनेत्री टीना अंबानी यांचा जन्म.
  • १९६१: भारतीय चित्रपट अभिनेता रजत कपूर यांचा जन्म.
  • १९६७: पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रसिद्ध भारतीय गायिका मालिनी अवस्थी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६५०: रेने देकार्त – फ्रेन्च तत्त्वज्ञ व गणितज्ञ (जन्म: ३१ मार्च १५९६)
  • १९४२: जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते (जन्म: ४ नोव्हेंबर १८८४)
  • १९६८: पण्डित दीनदयाळ उपाध्याय – तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते आणि जनसंघाचे एक संस्थापक यांची अज्ञात मारेकर्‍याकडुन हत्या (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)
  • १९७७: फक्रुद्दीन अली अहमद – भारताचे ५ वे राष्ट्रपती. १९७४ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेसतर्फे ते निवडून आले. २५ जून १९७५ रोजी आणीबाणीची घोषणा त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली. (जन्म: १३ मे १९०५)
  • १९८६: तत्त्वज्ञ, अर्थतज्ञ, समाजशास्त्री, इतिहासकार, पत्रकार, राजकीय नेते पण्डित दीनदयाळ उपाध्याय यांची अज्ञात मारेकर्‍याकडुन हत्या. (जन्म: २५ सप्टेंबर १९१६)
  • १९८९: ला प्रसिद्ध लेखक पंडित नरेंद्र शर्मा यांचे निधन.
  • १९९३: सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’ – चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी (जन्म: १७ जानेवारी १९१८)
  • २००७: भारतीय चित्रपट अभिनेता युनुस परवेझ यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

१० फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 19:00:14 पर्यंत
  • नक्षत्र-पुनर्वसु – 18:01:59 पर्यंत
  • करण-कौलव – 07:11:05 पर्यंत, तैेतिल – 19:00:14 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-प्रीति – 10:26:28 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:11
  • सूर्यास्त- 18:35
  • चन्द्र-राशि-मिथुन – 11:57:44 पर्यंत
  • चंद्रोदय- 16:37:00
  • चंद्रास्त- 30:17:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच चौथा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा चौथा दिवस (टेडी दिवस)
महत्त्वाच्या घटना:
  • १९२१: ड्यूक ऑफ़ कनॉट ने भारतातील इंडिया गेट चा पाया आजच्या दिवशी रचला.
  • १९२१: महात्मा गांधी यांनी काशी विद्यापीठाची स्थापना केली.
  • १९२३: टेक्सास टेकनॉलोजिकल कॉलेज सध्याचे टेक्सास टेक विद्यापीठाची स्थापना केली.
  • १९२९: जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.
  • १९३१: भारताची राजधानी कोलकात्याहुन नवी दिल्ली येथे हलवली.
  • १९३३: न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.
  • १९४८: पुणे विद्यापीठाची स्थापना
  • १९४९: गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.
  • १९७९: इटानगर हे शहर अरुणाचल प्रदेश ची राजधानी बनले.
  • १९९६: आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या “डीप ब्लू” या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.
  • २००५: उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.
  • २००९: आजच्या दिवशी पंडित भीमसेन जोशी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८४७: प्रसिद्ध लेखक नवीनचंद्र सेन यांचा जन्म.
  • १८०३: जगन्नाथ ऊर्फ ’नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ (मृत्यू: ३१ जुलै १८६५)
  • १८९४: हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (मृत्यू: २९ डिसेंबर १९८६)
  • १९१०: दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ मे २००२)
  • १९४२: भारतीय अभिनेत्री माधबी मुखर्जी यांचा जन्म.
  • १९४५: राजेश पायलट – केंद्रीय मंत्री (मृत्यू: ११ जून २०००)
  • १९७०: प्रसिद्ध भारतीय कवी कुमार विश्वास यांचा जन्म.
  • १९८५: प्रसिद्ध गायिका महाथी यांचा जन्म
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८६५: हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ फेब्रुवारी १८०४))
  • १९१२: सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (जन्म: ५ एप्रिल १८२७)
  • १९२३: विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २७ मार्च १८४५)
  • १९२२: निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद सर जोसेफ लिस्टर यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १८२७)
  • १९८२: नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक (जन्म: १५ जुलै १९३२)
  • १९९५: प्रसिद्ध हिंदी साहित्यकार गुलशेर ख़ाँ शानी यांचे निधन.
  • २००१: गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर – अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (जन्म: १५ जुलै १९०४)
  • २०१२: एच. आर. एल. मॉरिसन चे संस्थापक लॉईड मॉरिसन यांचे निधन. (जन्म: १८ सप्टेंबर १९५७)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

सिंधुदुर्ग: पंढरपूरला वारीला गेलेल्या वृद्ध महिलेचे आकस्मिक निधन

   Follow us on        
सिंधुदुर्ग: माघी वारीला पंढरपूरला गेलेल्या ज्येष्ठ महिलेचे काल शनिवारी हृदय विकाराच्या झटक्याने आकस्मिक निधन झाले.  सौ.  जयश्री सखाराम राऊळ  असे नाव त्या महिलेचे नाव असून त्या सावंतवाडी तालुक्यातील वेर्ले- गावठणवाडी येथील रहिवाशी होत्या. त्यांचे वय ६९ वर्षे होते.
रविवारी पहाटे तीन वाजता त्यांचे पार्थिव पंढरपूर येथून वेर्ले गावी आणण्यात आले. त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी वारकरी संप्रदायासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. रविवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी सैनिक सखाराम राऊळ यांच्या त्या पत्नी तर रिक्षाचालक विजय राऊळ, बँकिंग क्षेत्रातील सिसको कंपनीचे वाहन चालक पपू राऊळ यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, दिर, जाऊ, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.
 

९ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वादशी – 19:28:02 पर्यंत
  • नक्षत्र-आर्द्रा – 17:53:59 पर्यंत
  • करण-भाव – 07:50:42 पर्यंत, बालव – 19:28:02 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-विश्कुम्भ – 12:06:45 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:12
  • सूर्यास्त-18:34
  • चन्द्र-राशि-मिथुन
  • चंद्रोदय- 15:35:59
  • चंद्रास्त- 29:29:00
  • ऋतु- शिशिर
जागतिक दिवस:
  • वन अग्नि सुरक्षा साप्ताहाच तिसरा दिवस.
  • व्हॅलेंटाईन आठवड्याचा तिसरा दिवस (चॉकलेट डे)
महत्त्वाच्या घटना:
  • १९००: लॉन टेनिस या खेळातील ’डेव्हिस कप’ या करंडकाची सुरूवात झाली.
  • १९३३: साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना ’श्यामची आई’ या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
  • १९५१: स्वतंत्र भारताची पहिली जनगणना सुरू
  • १९६९: बोइंग-७४७ विमानाचे पहिले चाचणी उड्डाण झाले.
  • १९७१: “अपोलो १४ मिशन” चंद्रावरून पृथ्वीवर सुरक्षित परत आले.
  • १९७३: बिजू पटनायक ओरिसा विधानसभेचे विरोधी पक्षनेते बनले.
  • १९७५: रशिया चे सुयोज-१७ हे अवकाशयान २९ दिवसानंतर पुन्हा पृथ्वीवर सुरक्षित परत आले.
  • १९९९: भारतीय चित्रपट निर्माता शेखर कपूर यांचा एलिझाबेथ हा चित्रपट ऑस्कर साठी नॉमिनेट केल्या गेला.
  • २००३: संगीतकार रवींद्र जैन यांना मध्यप्रदेश सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
  • २०१०: बीटी-ब्रिंजल वाणाची शेती करण्यावर काही दिवसासाठी बंदी आली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १४०४: शेवटचा बायझेंटाईन सम्राट कॉन्स्टन्टाईन (अकरावा) यांचा जन्म.
  • १७७३: अमेरिकेचे ९वे अध्यक्ष विल्यम हेन्री हॅरिसन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १८४१)
  • १८७४: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद – लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले, त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही. कविता मात्र बालपणापासून करीत होते. स्वातंत्रवीर सावरकरांशी निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९२६ – नाशिक)
  • १९१७: होमी जे. एच. तल्यारखान – गांधीवादी नेते, सिक्‍कीमचे पहिले राज्यपाल, मंत्री व आमदार (मृत्यू: २७ जून १९९८)
  • १९२२: जिम लेकर – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २३ एप्रिल १९८६)
  • १९२९: महाराष्ट्रचे ८वे मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचा जन्म. (मृत्यू: २ डिसेंबर २०१४)
  • १९४०: प्रसिद्ध भारतीय लेखक विष्णू खरे यांचा जन्म.
  • १९४५: संसद चे माजी सदस्य श्याम चरण गुप्ता यांचा जन्म.
  • १९५८: भारतीय चित्रपट अभिनेत्री अमृता सिंह यांचा जन्म.
  • १९६८: भारतीय अभिनेता राहुल रॉय यांचा जन्म.
  • १९७०: ग्लेन मॅकग्रा – ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज
  • १९८४: ला भारतीय अभिनेत्री उदिता गोस्वामी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८७१: फ्योदोर दोस्तोवस्की – रशियन कादंबरीकार आणि तत्त्वज्ञ (जन्म: ११ नोव्हेंबर १८२१)
  • १८९९: भारतीय स्वातंत्र्य सैनिक बालकृष्ण चापेकर यांचे निधन.
  • १९१८: प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना टी. बालासरस्वती यांचे निधन.
  • १९६६: दामूअण्णा जोशी – बालमोहन नाटक मंडळीचे संस्थापक. या संस्थेने प्रल्हाद केशव अत्रे यांची अनेक नाटके केली. (जन्म: ? ? ????)
  • १९७९: राजा परांजपे – चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते (जन्म: २४ एप्रिल १९१०)
  • १९८१: एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री (जन्म: ३० सप्टेंबर १९००)
  • १९८४: तंजोर बालसरस्वती – भरतनाट्यम नर्तिका (जन्म: १३ मे १९१८)
  • २०००: शोभना समर्थ – चित्रपट अभिनेत्री व निर्माती (जन्म: ? ? १९१५)
  • २००१: माजी हवाई दल प्रमुख, एर चीफ मार्शल दिलबागसिंग यांचे निधन.
  • २००६: भारतीय अभिनेत्री नादिरा यांचे निधन.
  • २००८: डॉ. मुरलीधर देविदास ऊर्फ बाबा आमटे – कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्य वाहून घेणारे थोर समाजसेवक (जन्म: २६ डिसेंबर १९१४)
  • २०१२: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक ओ. पी. दत्ता यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search