Author Archives: Kokanai Digital

दोडामार्ग आणि सावंतवाडीतील २५ गावांना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’चा दर्जा; खाणकाम आणि प्रदूषणकारी प्रकल्पांवर बंदी

   Follow us on        

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यातील २५ गावांसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने या गावांना ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ (ESZ) म्हणून जाहीर करणारी अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली असून, यामुळे या भागात प्रस्तावित असलेल्या खाणकामांना आणि पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या मोठ्या प्रकल्पांना आता अधिकृतपणे चाप बसणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही प्रक्रिया राबवण्यात आली असून, मंगळवारी केंद्र सरकारने यावर अंतिम शिक्कामोर्तब केले. विशेष म्हणजे, २०१० सालापासून ‘वनशक्ती’ या संस्थेच्या माध्यमातून स्टॅलिन दयानंद यांनी हा न्यायालयीन लढा यशस्वीपणे सुरू ठेवला होता.

या नव्या अधिसूचनेमुळे आता संबंधित गावांमध्ये खाणकाम, ‘लाल श्रेणी’तील प्रदूषणकारी उद्योग आणि वनसंपदेला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पांवर पूर्णपणे बंदी असेल. या निर्णयाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतील, तर उपवनसंरक्षक हे सचिव म्हणून काम पाहतील. ही समिती वर्षभराच्या आत स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या पर्यावरणपूरक निर्णयामध्ये केसरी, फणसवडे, उडेली, दाभील-नेवली, सरमळे, ओटवणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवल, कुंभरल, पणतूर्ली, उगाडे, भिकेकोनाळ, कळणे आणि पडवे माजगाव या २५ गावांचा समावेश आहे.

Holi Special Trains: कोकण रेल्वे मार्गावर १ मार्च रोजी धावणार सीएसएमटी – सावंतवाडी विशेष एक्सप्रेस

   Follow us on        

मुंबई: होळी आणि आगामी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने मुंबई ते सावंतवाडी दरम्यान विशेष वातानुकूलित (AC) गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी पूर्णतः आरक्षित असून १ मार्च २०२६ रोजी दोन्ही बाजूंनी धावणार आहे.

​गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे:

​गाडी क्र. ०१०७१ (मुंबई ते सावंतवाडी):

ही गाडी रविवार, १ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ००:२० वाजता (म्हणजेच २८ फेब्रुवारीच्या रात्री) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १२:३० वाजता सावंतवाडीला पोहोचेल.

​गाडी क्र. ०१०७२ (सावंतवाडी ते मुंबई):

परतीच्या प्रवासासाठी ही गाडी रविवार, १ मार्च २०२६ रोजी संध्याकाळी १७:२० वाजता सावंतवाडीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३:४५ वाजता मुंबईला पोहोचेल.

​सर्व थांब्यांची यादी (List of Halts):

​या विशेष गाडीला कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. स्थानकांची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे:

​१. दादर

२. ठाणे

३. पनवेल

४. पेण

५. रोहा

६. माणगाव

७. वीर

८. खेड

९. चिपळूण

१०. सावर्डा

११. आरवली रोड

१२. संगमेश्वर रोड

१३. रत्नागिरी १४. आडवली

१५. विलवडे

१६. राजापूर रोड

१७. वैभववाडी रोड

१८. नांदगाव रोड

१९. कणकवली

२०. सिंधुदुर्ग

२१. कुडाळ

​महत्त्वाची माहिती:

​डब्यांचे स्वरूप: या गाडीला ‘एसी थ्री टायर इकॉनॉमी’ (AC 3 Tier Economy) डबे जोडण्यात आले आहेत.

​आरक्षण: गाडी क्र. ०१०७१ चे बुकिंग सध्या सुरू झाले आहे. प्रवाशांनी अधिकृत संकेतस्थळ किंवा रेल्वेच्या ॲपवरून आपले आरक्षण निश्चित करावे.

​टीप: अधिकृत माहितीसाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES ॲपचा वापर करावा.

Konkan Railway Recruitment: कोकण रेल्वेत १९० जागांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा कराल?

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) द्वारे अभियांत्रिकी पदवीधर, डिप्लोमा धारक आणि सामान्य प्रवाहातील पदवीधरांसाठी शिकाऊ उमेदवारी (Apprentice) प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ‘शिकाऊ उमेदवारी कायदा १९६१/१९७३’ अंतर्गत एकूण १९० जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे.

महत्त्वाचे तपशील:

संस्था: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (भारत सरकारचा उपक्रम).

एकूण पदे: १९० जागा.

पात्रता: ज्या उमेदवारांनी २०२१, २०२२, २०२३, २०२४ आणि २०२५ या वर्षांत आपली पदवी किंवा डिप्लोमा पूर्ण केला आहे, ते यासाठी पात्र आहेत.

प्रशिक्षण कालावधी: १ वर्ष.

कामाचे ठिकाण: महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यातील कोकण रेल्वेची विविध स्थानके आणि कार्यक्षेत्रे.

पदनिहाय रिक्त जागांचा तपशील:

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ मार्च २०२६

अर्ज कसा कराल? (How to Apply)

१. अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वात आधी कोकण रेल्वेच्या https://konkanrailway.com या अधिकृत संकेतस्थळावर जा.

२. भरतीचा विभाग शोधा: होमपेजवर गेल्यावर ‘Quick Links’ हा विभाग शोधा. त्यामध्ये ‘Graduate Apprentice / Technician Apprentice for training in KRCL’ या पर्यायावर क्लिक करा.

३. अधिसूचना वाचा: अर्ज करण्यापूर्वी दिलेली अधिकृत जाहिरात (Notification No: CO/APPR/2026/01) काळजीपूर्वक वाचा, जेणेकरून पात्रता आणि कागदपत्रांची स्पष्टता येईल.

४. नोंदणी आणि अर्ज: दिलेल्या ‘Apply Online’ लिंकवर क्लिक करा.

तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता (Degree/Diploma) आणि इतर तपशील अचूक भरा.

जर तुम्ही अभियांत्रिकीचे विद्यार्थी असाल, तर तुम्हाला NATS (National Apprenticeship Training Scheme) पोर्टलवर नोंदणी केलेली असणे आवश्यक असू शकते.

५. कागदपत्रे अपलोड करा: तुमचे फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे स्कॅन करून अपलोड करा.

६. अर्ज सबमिट करा: सर्व माहिती तपासून झाल्यावर ‘Submit’ बटणावर क्लिक करा आणि अर्जाची एक प्रिंट आऊट भविष्यातील संदर्भासाठी काढून ठेवा.

कर्जत-पळसदरी घाटात उतारावर मालगाडीचे नियंत्रण सुटले; थोडक्यात अनर्थ टळला! थरारक व्हिडिओ समोर

   Follow us on        

ठाणे: मध्य रेल्वेच्या पळसदरी आणि कर्जत रेल्वे स्थानकांदरम्यान गुरुवारी एक थरारक घटना घडली. उतारावरून धावणाऱ्या एका मालगाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी प्रचंड वेगात धावू लागली. सुदैवाने, या वेळी अपघात झाला नाही आणि मोठा अनर्थ टळला आहे. मात्र, या गंभीर प्रकारामुळे रेल्वे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून मध्य रेल्वेने तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत.

​मिळालेल्या माहितीनुसार, तीन इंजिन असलेली ही मालगाडी मालवाहतूक करत असताना अचानक उतारावर तिचा वेग अनियंत्रित झाला. ही मालगाडी पळसदरी ते कर्जत दरम्यानच्या तीव्र उतारावरून धावत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आली. घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सतर्क करण्यात आले आणि पुढील धोके टाळण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. सुदैवाने गाडी रुळावरून घसरली नाही किंवा दुसऱ्या कोणत्याही गाडीला धडकली नाही, ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

​प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या मालगाडीच्या इंजिनमध्ये काही प्रशिक्षणार्थी लोको पायलट्स (Trainee Loco Pilots) कार्यरत होते. गाडी उतारावरून खाली येत असताना वेगावर योग्य नियंत्रण ठेवण्यास ते अपयशी ठरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या घटनेची पुष्टी केली असून, तांत्रिक बिघाड होता की मानवी चूक, याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडिओ येथे पहा 👇

मुंबईतील शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी!

   Follow us on        

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) ने २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी BEST बसने मोफत प्रवासाची सुविधा जाहीर केली आहे. हा निर्णय विशेषतः गणवेशधारी विद्यार्थ्यांसाठी असून, त्यांच्या घरापासून शाळेपर्यंतचा प्रवास आता पूर्णपणे मोफत होणार आहे.

या योजनेअंतर्गत ‘चलो कार्ड’ (Chalo Card) चा वापर करून विद्यार्थी मोफत प्रवास करू शकतात. गेल्या वर्षी (२०२५-२६) या योजनेचा लाभ ९,६२७ विद्यार्थ्यांना मिळाला होता, ज्यात प्राथमिक शाळेतील ६,०१८ आणि माध्यमिक शाळेतील ३,६०९ विद्यार्थी समाविष्ट होते.शिक्षण विभागासाठी एकूण ४,२४८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे, जो मागील वर्षीच्या तुलनेत १५% ने जास्त आहे.

या योजनेसाठी सुमारे ८.७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ज्या भागांमध्ये नियमित BEST बस सेवा उपलब्ध नाही, तिथे विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे.पालकांवरील आर्थिक भार कमी होण्याबरोबरच विद्यार्थ्यांचा शाळेकडे जाण्याचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ होईल, ज्यामुळे उपस्थिती वाढण्यास आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यास मदत होईल.हे पाऊल मुंबईतील सार्वजनिक वाहतूक वाढवण्याबरोबरच शिक्षणाला प्रोत्साहन देणारे ठरेल!

 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण मराठीतून सुरू व्हावे

मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष श्री. श्रीकांत सावंत यांनी मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर आग्रहाचे आवाहन.

   Follow us on        

मुंबई : मानवता विकास परिषद संस्थापक अध्यक्ष तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी एका प्रसिद्धी संदेशाद्वारे ‘मराठी भाषा गौरव दिन २०२६’ चे औचित्य साधून सरकारकडे मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षणासाठी आग्रहपूर्वक आवाहन करत मागणी केली आहे. श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी संदेशात नमूद केले आहे की ही मागणी, गेली अनेक वर्षे शासन तथा विविध लोकप्रतिनिधी, प्रशासन यांची थेट भेट घेत तसेच सामाजिक स्तरावरून देखिल पाठपुरावा करत सातत्याने लावून धरलेली आहे.

यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील शिक्षण मराठीतून सुरू व्हावे, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.

श्रीकांत सावंत प्रसिद्धी संदेशात म्हणतात की महाराष्ट्रात एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा व नर्सिंग यांसारखे वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध होणे आवश्यक आहे.

कोकण व सिंधुदुर्गातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा बुद्धयांक तसेच कौशल्य हे अव्वल असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे परंतु वैद्यकीय शिक्षणादरम्यान इंग्रजी भाषेतील न्यूनगंड दूर करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घ्यावा असे नमूद करताना हे शिक्षण ‘ऐच्छिक करा पण करा…’ असेही विशेष आग्रहपूर्वक आवाहन केले आहे.

महाराष्ट्र, कोकणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या तळागाळातील विद्यार्थी विद्यार्थीनीना मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षणाचा लाभ झाला तर स्थानिक स्तरावरील विविध वैद्यकीय रिक्त पदांचा आपसुक, तत्काळ तसेच स्पर्धात्मक गुणवत्ता वाढ होत भरणा होईल. ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधा सुधारल्या की नगरे, महानगरे व शहरांतील वैद्यकीय यंत्रणांवरचा ताण देखिल नियंत्रणात येत संपूर्ण राष्ट्राची आरोग्य व्यवस्था सुधारेल अशी विशेष सूचना देखिल श्रीकांत सावंत यांनी प्रसिद्धी संदेशात केली आहे.

बदलत्या काळात ‘एआय’ ची अत्यावश्यकता आहे सोबतच मातृभाषेतून वैद्यकीय शिक्षण मिळाले तर जिल्ह्यातील असंख्य वैद्यकीय शिक्षण इच्छुकांना त्यांच्या बुद्धी व कौशल्थाला न्याय देण्याचे महत्वाचे कार्य घडेल असाही आशावाद ‘मराठी भाषा दिन २०२६’ च्या पार्श्वभूमीवर मानवता विकास परिषद व रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परीषद संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी व्यक्त केला आहे.

Konkan Railway: होळीसाठी कोकणात जाण्यासाठी पनवेलहून विशेष गाड्या

   Follow us on        

मडगाव: होळीच्या सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची होणारी गर्दी पाहता रेल्वे प्रशासनाने जादा विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये मडगाव-पनवेल साप्ताहिक स्पेशल आणि रत्नागिरी-पनवेल दरम्यान मेमू (MEMU) स्पेशल ट्रेनचा समावेश आहे.

​१. मडगाव जं. – पनवेल – मडगाव जं. साप्ताहिक स्पेशल (01106 / 01105)

​गाडी क्र. 01106: मडगाव येथून शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ०७:३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १८:५० वाजता पनवेलला पोहोचेल.

​गाडी क्र. 01105: पनवेल येथून शुक्रवार, २७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १९:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:०० वाजता मडगावला पोहोचेल.

​या स्थानकांवर असेल थांबा:

करमळी, थिवि, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा आणि पेण.

​डब्यांची रचना: एकूण २० डबे (१८ शयनयान/Sleeper, २ एसएलआर).

​२. रत्नागिरी – पनवेल – रत्नागिरी अनारक्षित मेमू स्पेशल (01158 / 01157)

​गाडी क्र. 01158: रत्नागिरी येथून २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी आणि ०१ मार्च २०२६ रोजी सकाळी ०९:०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १६:१० वाजता पनवेलला पोहोचेल.

​गाडी क्र. 01157: पनवेल येथून २७ फेब्रुवारी, २८ फेब्रुवारी आणि ०१ मार्च २०२६ रोजी दुपारी १६:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री २३:५५ वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

​या स्थानकांवर असेल थांबा:

भोके, उक्षी, संगमेश्वर रोड, कडवई, आरवली रोड, सावर्डे, कामथे, चिपळूण, अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखवटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, नागोठणे, कासू, पेण, जिते, आपटा आणि सोमाटणे.

​डब्यांची रचना: एकूण ०८ मेमू डबे.

​प्रवाशांना आवाहन: होळीच्या काळात होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रवाशांनी या विशेष गाड्यांच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विशेष गाडीचा सावंतवाडी स्थानकावरील थांबा हटवला; प्रवाशांमध्ये नाराजी

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे आणि पश्चिम रेल्वेच्या वतीने आगामी काळात चालवण्यात येणाऱ्या अहमदाबाद-मंगळुरू विशेष गाडीच्या (०९४२४/०९४२३) थांब्यांच्या यादीतून सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकाचा थांबा वगळण्यात आल्याने स्थानिक प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. यापूर्वी या गाडीला सावंतवाडी येथे थांबा दिला जात होता, मात्र २७ फेब्रुवारी ते २१ मार्च २०२६ या कालावधीत धावणाऱ्या विशेष फेऱ्यांसाठी प्रशासनाने जाणीवपूर्वक हा थांबा काढून घेतल्याचा आरोप केला जात आहे.

कुठल्याच लॉजिक मध्ये बसत नाही 

या गाडीला यापुर्वी असलेले जवळ जवळ सर्वच थांबे तसेच ठेवून सावंतवाडीचा थांबा काढण्यात आला आहे. कमी प्रवासी संख्या असलेल्या थांब्याना हात न लावता चांगली प्रवासीसंख्या footfall असलेल्या स्थानकाचा थांबा काढला हे कोणत्याही लॉजिक मध्ये बसत नाही.

जाणीवपूर्वक हा थांबा काढून घेतल्याचा आरोप

कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र हद्दीतील स्थानकांमध्ये उत्पन्नाच्या बाबतीत ५ व्या स्थानावर असलेल्या सावंतवाडी स्थानकाचे या वर्षीचे उत्पन्न सुमारे १८ कोटी रुपये आहे. पुढील वर्षात हा आकडा २० कोटींच्या पार जाण्याची शक्यता असून, तसे झाल्यास स्थानकाला NSG-3 ही उच्च श्रेणी प्राप्त होईल. मात्र, ही श्रेणी मिळू नये आणि स्थानकाचा विकास होऊ नये, यासाठीच राजधानी, गरीब रथ आणि मंगळुरू स्पेशल सारख्या महत्त्वाच्या  गाड्यांचे थांबे जाणून बुजून नाकारले जात असल्याचे बोलले जात आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी)ने याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. ​रेल्वे प्रशासनाच्या या भूमिकेमुळे सावंतवाडीच्या महत्त्वावर घाला घातला जात आहे. कोकण रेल्वे (KR) प्रशासनाकडून होणारा हा अन्याय थांबवून तात्काळ सावंतवाडी येथे थांबा बहाल करावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

उत्पन्न असूनही सुविधांपासून वंचित ठेवण्याच्या या धोरणामुळे पर्यटनावर आधारित असलेल्या या भागातील अर्थव्यवस्थेलाही फटका बसू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

ताजा कलम:

आज दुपारपर्यंत या गाडीला सावंतवाडी थांबा देण्यात आला नव्हता. ही बाब निदर्शनास येताच ‘अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र’चे सचिव श्री. अक्षय महापदी, श्री. मंदार सहस्त्रबुद्धे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रेल्वे प्रशासनाकडे तातडीने पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे संगमेश्वरचे श्री. संदेश जिमन यांनी कोकण रेल्वेचे CPRO श्री. नारकर यांच्याशी संपर्क साधून या त्रुटीकडे लक्ष वेधले. कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ने आपले पर्यन्त चालू ठेवले. या प्रयत्नांना परखड कोकणाई डिजिटल चॅनलच्या लेखणीची जोड मिळाली. प्रवासी संघटना आणि जागरूक नागरिकांच्या या संघटित प्रयत्नांना यश आले. दुपारी कोकण रेल्वे प्रशासनाची तातडीची बैठक पार पडली आणि अखेर सावंतवाडीला हा अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला.

 

Konkan Railway: होळीसाठी पाश्चिम रेल्वेकडुन अहमदाबाद – मंगळुरू विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

अहमदाबाद: आगामी सण आणि प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने अहमदाबाद आणि मंगलुरू दरम्यान विशेष भाड्याने साप्ताहिक ‘स्पेशल ट्रेन’ चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ही गाडी फेब्रुवारी आणि मार्च २०२६ या कालावधीत धावणार असून, यामुळे गुजरात, महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील प्रवाशांना प्रवास करणे सुलभ होणार आहे.

गाडीचे वेळापत्रक

​गाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबाद – मंगलुरू स्पेशल २७ फेब्रुवारी, ६ मार्च, १३ मार्च आणि २० मार्च शुक्रवारी अहमदाबादवरून दुपारी १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी रात्री २०:०० वाजता मंगलुरूला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी, गाडी क्रमांक ०९४२३ मंगलुरू – अहमदाबाद स्पेशल २८ फेब्रुवारी, ७ मार्च, १४ मार्च आणि २१ मार्च या चार शनिवारी रात्री २२:३० वाजता सुटेल आणि सोमवारी पहाटे ०२:१५ वाजता अहमदाबादला पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा (Halts):

​या विशेष गाडीला प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत:

​गुजरात/महाराष्ट्र: नडियाद, आणंद, वडोदरा, भरूच, सुरत, वापी, वसई रोड, भिवंडी रोड, पनवेल, पेण, रोहा.

​कोकण रेल्वे मार्ग: माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, थिवी, करमळी, मडगाव, काणकोण.

​कर्नाटक: कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकंबिका रोड बिंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल.

​प्रवाशांच्या आरामाचा विचार करून या गाडीमध्ये विविध श्रेणींचे डबे जोडण्यात आले आहेत. यामध्ये एसी २-टायर (AC 2 Tier), एसी ३-टायर (AC 3 Tier) यांसारखे वातानुकूलित डबे उपलब्ध आहेत. तसेच मध्यमवर्गीय प्रवाशांसाठी स्लीपर क्लास (Sleeper Class) आणि कमी खर्चात प्रवास करणाऱ्यांसाठी जनरल सेकंड क्लास (General Second Class) डबेही या गाडीला जोडले जाणार आहेत.

​ही रेल्वे विशेष भाड्यावर (Special Fare) चालवण्यात येणार असून, प्रवाशांनी वाढीव गर्दी टाळण्यासाठी आगाऊ आरक्षण करावे असे आवाहन करण्यात आले आहे. गाडी क्रमांक ०९४२४ चे बुकिंग सध्या सर्व पीआरएस (PRS) काउंटर्स आणि आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत वेबसाईटवर सुरू झाले आहे.

सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्यांवर आता सीसीटीव्हीची नजर!

   Follow us on        

मुंबई, २५ फेब्रुवारी २०२६: महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात एक महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्वाच्या समुद्रकिनारी ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या प्रस्तावाला गती देण्यावर भर देण्यात आला.

महाराष्ट्र सागरी मंडळाच्या ८५व्या संचालक मंडळ बैठकीत या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. मात्र, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत सर्व अडथळे दूर करून काम लवकरात लवकर सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

सिंधुदुर्ग हा पर्यटनाचा जिल्हा असून, तारकरली, मालवण, देवगड, विजयदुर्ग, आचरा आदी ठिकाणी दरवर्षी लाखो पर्यटक येतात. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच किनारपट्टीवरील अवैध कृत्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सीसीटीव्ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरेल, असे मत यावेळी व्यक्त झाले.बैठकीला आयटी विभागाचे वीरेंद्र सिंग, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे), जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अधिक मजबूत होईल आणि पर्यटन क्षेत्राला नवीन चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search