Author Archives: Kokanai Digital

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या विशेष गाडीला डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या जबलपूर – कोईमतूर ०२१९७/०२१९८ या गाडीचा यावर्षीच्या डिसेंबर अखेरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या  संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे. या बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणाऱ्या या गाडीची सेवा या जूनच्या पहिल्या आठवड्यात संपविण्यात येणार होती मात्र आता तिची सेवा २७/१२/२०२४ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दर शुक्रवारी जबलपूर येथून रात्री २३:५०  सुटून कोईम्बतूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:१० वाजता पोहोचेल. तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दर शुक्रवारी जबलपूर येथून रात्री २३:५०   सुटून कोईम्बतूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी १४:४०  वाजता पोहोचेल.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणाऱ्या या गाडीची सेवा या जूनच्या पहिल्या आठवड्यात संपविण्यात येणार होती पण आता तिची सेवा दिनांक २७/१२/२०२४ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दर सोमवारी कोईम्बतूर येथून रात्री १५:१० सुटून जबलपूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ०८:४५ वाजता पोहोचेल. तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार ही गाडी दर सोमवारी कोईम्बतूर येथून रात्री १७:०५  वाजता  सुटून जबलपूर येथे तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ०८:४५ वाजता पोहोचेल.
ही गाडी ट्रेन नरसिंगपूर, गादरवारा, पिपरिया, इटारसी जंक्शन, हरदा, खांडवा, भुसावळ जंक्शन येथे थांबेल. , नाशिक रोड, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, मडगाव जं., कारवार, कुमटा, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, मंगळुरु जं., कासारगोड, कन्नूर, वडकोडे, तिरूर, शोरानूर जं. आणि पालघाट या स्थानकांवर थांबेल.
डब्यांची रचना : एकूण 24 कोच = फर्स्ट एसी – 01 कोच, टू टायर एसी – 02 कोच, 3 टायर एसी – 06 कोच, स्लीपर – 11 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.

Loading

मोठी बातमी: नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला सरकारकडून स्थगिती

Nagpur Goa Shaktipeeth Highway Updates:नागपूर ते गोव्याला जोडणाऱ्या ८०२ किमीचा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचे काम तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्यात आले आहेत. या प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध होता. हा विरोध डावलून महाराष्ट्र सरकारकडून प्रकल्प राबवला जात होता. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. लोकसभेतील पराभवानंतर या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर नवीन सरकार आल्यावर या प्रकल्पाबाबतन निर्णय घेईल असे ठरविण्यात आले असल्याचे सूत्रांकडून समजले आहे.
“या प्रकल्पातील बाधित शेतकरी आणि इतर ग्रामस्थ या प्रकल्पाला प्रत्येक जिल्ह्यातून विरोध करत असल्याचा अहवाल आम्हाला प्राप्त झाला आहे. किमान पुढील ३-४ महिने जमीन संपादित करू नयेत असे प्रशासनाला कळविण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर (ऑक्टोबरमध्ये) नवीन सरकार या प्रकल्पाचे भवितव्य ठरवेल”, असे या प्रकल्पाशी संबंधित एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.
शक्तीपीठ महामार्गाच्या कामामुळे शेतकरी वर्गासह कष्टकऱ्यांचे अतोनात नुकसान होणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांतून याला विरोध आहे. नागरिकांचे हित लक्षात घेता हा प्रकल्प रोखणे आवश्यक असून या अनुषंगाने आम्ही प्रयत्नशील आहोत. राज्यातील १२ जिल्हे या प्रकल्पामुळे बाधित होणार असून या १२ जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि अन्य लोकप्रतिनिधी असे तब्बल २०० लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरले आहेत.

Loading

Fact Check: भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटांमध्ये सवलत सुरु केल्याची ‘ती’ बातमी खोटी

   Follow us on        
Fact Check: सोशल मीडियावर सध्या एका बातमीचे कात्रण मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कात्रणामध्ये दावा करण्यात आला आहे की भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकिटांमध्ये सवलत पुन्हा सुरू केली आहे. या बातमीनुसार  60 वर्षांवरील पुरुषांसाठी 40 टक्के आणि 58 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांसाठी 50 टक्के रेल्वेच्या प्रवास भाड्यात सवलत देण्यात आली आहे.
मात्र खोलवर चौकशी केली असता असे आढळले की या बातमीत केलेला दावा खोटा असून असा कोणताही निर्णय भारतीय रेल्वे किंवा रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेला नाही.
देशातील एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राने रेल्वे मंत्रालयाचे एडीजी जनसंपर्क राजीव जैन यांच्याशी संपर्क साधला असता जैन यांनी या बातमीला “फेक न्यूज” म्हणत स्पष्टपणे नकार दिला. ते म्हणाले, “असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, 1 जुलैपासून सवलतींमध्ये कोणताही बदल होणार नाही. फक्त सध्याच्या सवलती सुरू राहतील.”
या वर्षी 19 मे रोजी आयआयटी मद्रास येथे पत्रकारांशी बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते कि ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पुन्हा सुरू करता येणार नाही कारण रेल्वे आधीच सवलतीच्या दराने कार्यरत आहे.
ही अफवा कोणी सुरू पसरवली ?
“रेल मेल” नावाच्या एका फेसबुक पेजने एका पोस्टमध्ये दावा केला आहे की भारतीय रेल्वे 1 जुलैपासून वृद्धांसाठी सवलत पुन्हा सुरू करणार आहे. तथापि, फेसबुक पेजने नंतर आपला दावा मागे घेतला आणि त्याच्या चुकीबद्दल माफी मागितली. मात्र ही बातमीचे कात्रण अजूनही  सोशल मीडियावर मोठ्या  प्रमाणात व्हायरल होत असल्याने अफवा पसरत आहेत.
20 मार्च 2020 पासून कोरोना काळात रेल्वेने दिव्यांगजनांच्या केवळ चार श्रेणी, रुग्णांच्या आणि विद्यार्थ्यांच्या 11 श्रेणींचा अपवाद वगळता इतर सवलती अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. या वर्षी मार्चमध्ये, रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सवलती बहाल करण्याची मंत्रालयाची कोणतीही योजना नाही.

Loading

Megablock on Southern Railway: कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांवर परिणाम

   Follow us on        
Megablock on Konkan Raiway: कोकण रेल्वेच्या पलक्कड विभागातील नेत्रावती – मंगळुरु जंक्शन दरम्यान लाईन ब्लॉक आणि पॉवर ब्लॉक घेण्याचा निर्णय दक्षिण रेल्वेने घेतला आहे.  या ब्लॉक मुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर परिणाम होणार आहे. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर खालील परिणाम होणार आहे.
गाडी क्र. 22633 तिरुवनंतपुरम सेंट्रल – हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेसचा प्रवास 19/06/2024 रोजी सुरू होणारा पलक्कड विभागात 280 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. 12224 एर्नाकुलम – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेसचा प्रवास 19/06/2024 रोजी सुरू होणारा पलक्कड विभागात 180 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. 16338 एर्नाकुलम – ओखा एक्स्प्रेसचा प्रवास 19/06/2024 रोजी सुरू होणारा पलक्कड विभागात 200 मिनिटांसाठीथांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. 20932 इंदूर जं. – 18/06/2024 रोजी सुरू होणारा कोचुवेली एक्स्प्रेसचा प्रवास कोकण रेल्वेवर 90 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. 16345 लोकमान्य टिळक (टी) – 19/06/2024 रोजी सुरू होणारा तिरुवनंतपुरम मध्य नेत्रावती एक्स्प्रेसचा प्रवास कोकण रेल्वेवर 20 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. 16312 कोचुवेली – श्री गंगानगर एक्स्प्रेसचा प्रवास 22/06/2024 रोजी सुरू होणारा तिरुअनंतपुरम मध्य आणि पलक्कड विभागातून 180 मिनिटांसाठी थांबविण्यात येणार आहे.

Loading

आंबोली: नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई सुरु

16 व 17 जून या दोन दिवसात 13 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व 11,500 रुपयांचा दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला.
   Follow us on        
सावंतवाडी: आंबोली धबधबा व घाट परिसरातील  गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी  वन विभागाने आंबोली घाट व धबधबा परिसर या राखीव संवर्धन क्षेत्रात कचरा करणे, माकडांना खाऊ घालणे, धूम्रपान करणे, मद्यपान करणे आशा निसर्ग व पर्यटनास घातक ठरणाऱ्या कृत्यांना दंड करण्याचा  निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये कचरा करणे-1000 रु. दंड, वन्यप्राणी माकड यांना खाऊ घालणे/छेडछाड करणे-1000 रु. दंड, मद्यपान करणे/मद्य बाळगणे-1000 रु. दंड, धूम्रपान करणे-500 रु दंड, दुसऱ्यावेळ वरील मनाई कृत्यांची आवृत्ती करणे-वनगुन्हा नोंदविणे अशा तरतुदी आहेत.
या अंतर्गत दिनांक-16 व 17 जून या दोन दिवसात 13 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली व 11,500 रुपयांचा दंडात्मक शासकीय महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आला. यामध्ये कचरा टाकनारे- 2 व्यक्ती, धूम्रपान करणारे  3 व्यक्ती, मद्यपान करणारे 2 व्यक्ती तर माकडांना खाऊ घालणारे- 6 व्यक्ती शा प्रकारे मनाई कृत्ये करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरी सावंतवाडी वन विभागाचे उपवनसंरक्षक श्री. नवकिशोर रेड्डी (IFS) यांचेकडून सर्व सुजाण नागरिकांना व पर्यटकांना आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी आपल्या आंबोली घाटातील निसर्ग व जैवविविधतेल टिकविण्यासाठी वरील प्रकारे मनाई करण्यात आलेले कृत्य कुणी करत असेल तर त्याला प्रतिबंधित करुन तिथे उपस्थित असलेल्या वन अधिकारी/कर्मचारी यांच्या निदर्शनास सदरची बाबा आणून द्यावी व कोकणाचे वैभव असलेल्या आपल्या आंबोली घाटाचे संवर्धन व संरक्षण करणे कमी आपले बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे

Loading

PM Kisan Nidhi : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज येणार 2000 रुपये; लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे गरजेचे

   Follow us on        
PM Kisan Samman Nidhi Scheme: देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर आहे. शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Scheme) योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 17 व्या हफ्त्याची शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली आहे. आज म्हणजेच 18 जून रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा 17 वा हफ्ता जमा होणार आहे. देशातील साधारण 9.26 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
सध्या देशातील अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. खते, औषध फवारणी यासाठी शेतकरी पैशांची तजवीज करत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या बँख खात्यात आता दोन हजार रुपये येणार आहेत. त्यामुळे या पैशांची शेतकऱ्यांना फार मदत होणार आहे.
दरम्यान, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अगोदर आपली ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांना 2000 रुपये मिळणार नाहीत. फेस ऑथेंटिकेशनच्या (Face Authentication) मदतीने तुम्ही घरी बसूनच ई-केवायसी करू शकता. तसेच देशभरातील कॉमन सर्व्हिस सेंटरवरदेखील तुम्ही ई-केवायसी करू शकता. ज्या शेतकऱ्यांनी याआधीच ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, त्यांना आता पुन्हा एकदा केवायसी करण्याची गरज नाही.
अशा प्रकारे पूर्ण करा ई-केवायसी 
1. ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मोबाइलवर PM Kisan अॅप डाऊनलोड करावे लागेल.
2. अॅप Install झाल्यानंतर मोबाईल क्रमांकाच्या मदतीने लॉग इन करा.
3. मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल. तो अॅपमध्ये टाका
4. पुढे दिलेल्या सूचनांप्रमाणे प्रक्रिया पार पाडल्यावर तुमचे ई-केवायसी पूर्ण होईल.

Loading

T20 WorldCup: उद्यापासून सुपर-8 सामन्यांचा थरार; असे रंगणार सामने

   Follow us on        

T20 WorldCup: भारत, अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, अमेरिका, इंग्लंड आणि बांगलादेश हे संघ सुपर-8 मध्ये पात्र ठरले आहेत. टी-20 विश्वचषक 2024 च्या स्पर्धेत 19 जूनपासून सुपर-8 सामने खेळवले जाणार आहेत.

प्रत्येक संघ सुपर-8 फेरीत प्रत्येकी 3-3 सामने खेळेल. आठ संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. सर्व संघांनी 3-3 सामने खेळल्यानंतर, दोन्ही गटात जे संघ टॉप-2 मध्ये असतील ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. यानंतर 29 जून रोजी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता अंतिम विजेतेपदाचा सामना खेळवला जाईल.

ग्रुप-1 : अफगाणिस्तान,भारत, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश

सुपर-8 मधील भारताचे सामने
20 जून- भारत विरुद्ध अफगाणिस्तान
22 जून- भारत विरुद्ध बांगलादेश
24 जून- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

सुपर-8 मधील ऑस्ट्रेलियाचे सामने
20 जून- ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश
22 जून- ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान
24 जून- ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत

सुपर-8 मधील बांग्लादेशचे सामने
20 जून- बांगलादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया
22 जून- बांगलादेश विरुद्ध भारत
24 जून- बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान

सुपर-8 मधील अफगाणिस्तानचे सामने
20 जून- अफगाणिस्तान विरुद्ध भारत
22 जून- अफगाणिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया
24 जून- अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश

ग्रुप-2 : युएसए(अमेरिका),इंग्लंड,दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज

सुपर-8 मध्ये यूएसएचे सामने-
19 जून – यूएसए विरुद्ध दक्षिण आफ्रिका
21 जून- यूएसए विरुद्ध वेस्ट इंडिज
23 जून- यूएसए विरुद्ध इंग्लंड

सुपर-8 मध्ये वेस्ट इंडिजचे सामने
19 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड
21 जून – वेस्ट इंडिज विरुद्ध यूएसए
23 जून- वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका

सुपर-8 मधील दक्षिण आफ्रिकेचे सामने
19 जून – दक्षिण आफ्रिका विरुद्ध यूएसए
21 जून- दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड
23 जून- दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडिज

सुपर-8 मधील इंग्लंडचे सामने
19 जून- इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज
21 जून- इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका
23 जून- इंग्लंड विरुद्ध यूएसए

Loading

कांचनजंगा एक्सप्रेसला अपघात, एक्स्प्रेसची मालगाडीला धडक

   Follow us on        

Kanchenjunga Express accident: पश्चिम बंगालमध्ये एका मालवाहतूक ट्रेनने कांचनजंगा एक्सप्रेसला धडक दिल्याने सोमवारी रेल्वे अपघात झाला. एनजेपी ते सियालदह या मार्गावर सिलीगुडीहून पुढे गेल्यानंतर रंगपानी स्टेशनजवळ हा अपघात झाला. या अपघातामुळे मागील तीन डब्यांचे गंभीर नुकसान झाले.

पश्चिम बंगालमध्ये सोमवारी सकाळी नऊ वाजता रेल्वेचा अपघात झाला आहे. कांचनगंगा एक्स्प्रेसला एका मालगाडीने मागून धडक दिली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. तसेच या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या भीषण अपघातावर शोक व्यक्त केला. त्यांनी सांगितले की, कांचनजंगा एक्स्प्रेसला मालवाहतूक करणाऱ्या ट्रेनने धडक दिल्यामुळे अपघात झाला. आता घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरु केले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डॉक्टर, रुग्णवाहिका आणि आपत्ती व्यवस्थापन पथक अपघाताच्या ठिकाणी पोहचले आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. रंगपाणी आणि निजबारी स्थानकांदरम्यान ही घटना घडली आहे.

 

 

 

 

 

Loading

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कार्यकारिणीची बैठक रविवारी मुंबईमध्ये संपन्न

बैठकीत समितीच्या कार्यकारिणीच्या पदांसाठी नेमणुका/फेरनेमणुका

   Follow us on        

मुंबई :काल रविवार दिनांक १६ जून रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कार्यकारिणीची बैठक श्री. शांताराम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली दादर येथे सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडली. या बैठकीत समितीच्या कार्यकारिणीच्या पदांसाठी नेमणुका/फेरनेमणुका करण्यात आल्या. त्याचप्रमाणे समितीच्या पुढील कार्यक्रमाचा आराखडा ठरविण्यात आला. येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत प्रयत्न करण्याबाबत चर्चाही यावेळी करण्यात आली. याव्यतिरिक्त पुढील ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

१. श्री. यशवंत जड्यार यांच्याऐवजी श्री. अक्षय महापदी यांची सचिव पदावर निवड करण्यात आली.

२. ॲड. योगिता सावंत यांची उपाध्यक्ष पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली.

३. श्री. अभिजित धुरत यांची विशेष मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली.

४. नवनियुक्त सचिव अक्षय महापदी यांना संघटनेचा पत्रव्यवहार व कार्यालयीन कामकाज करण्यास अधिकार देण्यात आले.

५. तसेच या सभेस उपस्थित नवीन संघटनांना या समितीमध्ये प्रवेश देण्याबाबत संमती देण्यात आली.

६. श्री. प्रमोद वासुदेव सावंत यांची सल्लागार पदी सर्वसंमतीने निवड करण्यात आली.

७. तसेच खजिनदार कु. मिहीर मठकर यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला व त्याच पदावर त्यांना कामकाज करण्यास अधिकार देण्यात आले.

८. १४ जानेवारी, २०२४ जन्मशताब्दी कार्यक्रमाचा जमाखर्च ताळेबंद मंजूर करण्यात आले व उर्वरित रक्कम श्री. राजाराम कुंडेकर यांच्याकडे ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

९. तसेच येत्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाबाबत त्वरित पत्रव्यवहार करण्यात यावा.

१०. तसेच परब मराठा समाज यांनी आपले कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार मानत ही सभा संपन्न झाली.

या सभेला ॲड. योगिता सावंत, श्री. श्रीकांत विठ्ठल सावंत, श्री. शांताराम शंकर नाईक, श्री.सुनिल सीताराम उतेकर, श्री. दीपक चव्हाण,श्री. विशाल तळावडेकर, श्री. अक्षय मधुकर महापदी, श्री. राजू सुदाम कांबळे, श्री. तानाजी बा. परब, श्री. रमेश सावंत, श्री. राजाराम बा. कुंडेकर, श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर, श्री. अभिषेक अनंत शिंदे, श्री. प्रमोद वासुदेव सावंत, श्री. आशिष अशोक सावंत, श्री. मनोज परशुराम सावंत, श्री. सुधीर लवू वेंगुर्लेकर, श्री. सागर कृष्णा तळवडेकर, श्री. संजय धर्माजी सावंत, श्री. अभिजित धुरत हे प्रतिनिधी उपस्थित होते.

 

 

 

Loading

गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार्‍या जादा गाड्या परतीच्या प्रवासात मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवाव्यात – अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती

अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईच्या वतीने कोकण रेल्वे मार्गावरती जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडण्याची केली मागणी : श्री.यशवंत जडयार

परतीच्या प्रवासात चतुर्थी पुर्वी ३ दिवस सर्व जादा रेल्वे मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवून सर्व सुपरफास्ट एक्सप्रेसना कोकणात जादा थांबे मिळावेत

   Follow us on        

मुंबई: दरवर्षी गणेश उत्सवाला मुंबईतून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात चार महिन्यापूर्वी कोकणात जाणार्‍या नेहमीच्या सर्व ट्रेनचे पहिल्या दोन मिनिटांमध्येच बुकिंग फुल झाल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे अनेक चाकरमनी नवीन रेल्वेबुकिंग च्या प्रतीक्षेत आहेत, म्हणूनच कोकणाला गणपतीसाठी साधारणता जादा ८०० फेऱ्यांची आवश्यकता आहे,गणेश चतुर्थी शनिवार दि.७ सप्टेंबर २०२४ रोजी असल्याने ३० ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर दरम्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रत्येक दिवसाला किमान १५ अप आणि १५ डाऊन अशा नवीन जादा गणपती स्पेशल रेल्वे सोडाव्यात तर दरम्यानच्या काळात कोकण रेल्वे वरील कंटेनर वाहतूक ( मालगाडया ) पूर्णतः बंद करावी.

यामध्ये मध्य रेल्वेच्या सीएसएमटी,दादर,कुर्ला,ठाणे,दिवा, कल्याण व पनवेल येथून तर पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल,वांद्रे,वसई,वलसाड,उधना,अहमदाबाद,सुरत येथून कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी,कुडाळ,सावंतवाडी,पेडणे, थिमिव,करमळी,मडगाव दरम्यान आरक्षित जादा गणपती स्पेशल रेल्वे चालवाव्यात.तर गर्दी कमी करण्यासाठी डहाणू ते पनवेल, पनवेल ते खेड,वसई ते चिपळूण,दिवा ते चिपळूण,दादर ते रत्नागिरी व पनवेल ते रत्नागिरी दरम्याने अनारक्षित मेमू रेल्वे चालवाव्यात.11003/04 तुतारी एक्सप्रेस २४ कोचची चालवावी किंवा दादर ते रत्नागिरी दरम्याने अनारक्षित डब्बलडेकर चालवाव्यात.

शनिवार दि.७ सप्टेबर ला चतुर्थी असल्याने ४ / ५ आणि ६ सप्टे.ला मुंबईतून कोकणाच्या दिशेने जास्त जादा रेल्वे सोडाव्यात,तर सिंगल ट्रकवर क्रासिंगला वेळ लागत असल्याने मुंबई ते मडूरा दरम्याने चाकरमन्यांचा प्रवास साधारण १८ ते २० तासाचा होतो म्हणून याच ३ दिवसामध्ये परतीच्या प्रवासातील सर्व जादा रेल्वे मडगाव मिरजमार्गे पनवेलला वळवाव्यात.तसेच नियमित सर्व सुपारफास्ट एक्सप्रेसना गणपतीच्या कालावधीमध्ये रायगड,रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये जादाचे थांबे दयावेत.तर गुरूवार दि.१२ सप्टे.ला गौरी गणपती विसर्जन असल्याने १३/१४ आणि १५ सप्टे.ला प्रत्येक दिवसाला कोकणातून मुंबईच्या दिशेने जास्त जादा रेल्वे सोडव्यात.

या निवेदनाच्या प्रती रेल्वेमंत्री मा.श्री.अश्विनी वैष्णव साहेब,जनरल मॅनेजर पश्चिम रेल्वे,जनरल मॅनेजर मध्य रेल्वे,रत्नागिरी व सिंधुदुर्गचे खासदार मा.श्री.नारायण राणे साहेब,माझी रेल्वेमंत्री मा.श्री.सुरेश प्रभू साहेब,पालघर चे खासदार मा.डॉ.हेमंत सावरा साहेब,रायगडचे खासदार मा.श्री. सुनील तटकरे साहेब व बोरिवली चे खासदार मा.श्री.पियुष गोयल साहेब यांना दिल्या असून या निवेदन प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री.शांताराम नाईक व प्रवासी संघटनेचे सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी पाठवलेले आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search