Author Archives: Kokanai Digital

आता महायुतीतील नेत्यांचाच नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध

   Follow us on        
कोल्हापूर : विद्यमान सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेतील अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. आता तर चक्क सत्तेत रूढ असलेल्या महायुतीतील नेत्यांनी या महामार्गाला विरोध केला असल्याने या प्रकल्प रद्द होण्याच्याच शक्यता वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांनीच विरोध केला आहे. महायुतीचे पराभूत उमेदवार संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यापाठोपाठ आता भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे यांनीही सोमवारी महामार्गाला विरोध असल्याचे जाहीर केले.
जिल्ह्यातील कागलसह सहा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जात असल्याने त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसमवेत बामणी (ता. कागल) येथे घाटके यांनी सोमवारी बैठक घेतली. कागल तालुक्यातील सर्वाधिक ५०० एकर जमीन महामार्ग व अन्य सुविधांसाठी अधिग्रहित करण्यात येणार आहे. या जागेचीही घाटगे यांनी पाहणी केली.
‘शक्तिपीठ’मुळे पराभव? 
संजय मंडलिक यांनी आपल्या पराभवामागे शक्तिपीठ महामार्ग हे एक कारण असल्याचे म्हटले आहे. मुश्रीफ यांनीही याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याचे म्हटले आहे. हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काहीच महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून पुन्हा शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका सरकारला बसू शकतो, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी महायुतीतील नेत्यांकडून होत आहे.

Loading

गोव्यातील रूळ दुहेरीकरणाचा फटका कोकण रेल्वे प्रवाशांना; गाड्या ३ ते ४ तास उशिराने

   Follow us on        
पणजी: कोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दक्षिण गोव्यात सुरू असलेल्या दुहेरी मार्गाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या गाड्या उशिराने धावत असल्याची अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​(KRCL) उपमहाव्यवस्थापक बबन घाटगे यांनी सांगितले की, दक्षिण पश्चिम रेल्वेने दक्षिण गोव्यातील माजोर्डा Majorda आणि कासावली Cansualim स्थानकांदरम्यानच्या मार्गाचा दुहेरी ट्रॅकच्याकामामुळे रविवारपासून कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या किमान तीन ते चार तास उशिराने धावत असून मंगळवार दिनांक ११ जून पर्यंत ही वाहतूक सूरळीत होणार आहे.
दरम्यान उन्हाळी सुट्ट्या लवकरच संपत असल्याने चाकरमानी वर्ग मुंबईला परतीचा प्रवासाला लागला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाडयांना मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यात बहुतेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Loading

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर;जाणून घ्या कोणाला कोणते खाते भेटले

   Follow us on        

दिल्ली: नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आज खातेवाटपाला सुरुवात झाली आहे. एनडीएच्या सरकारमध्ये 72 जणांनी शपथ घेतली होती. त्यानुसार नितीन गडकरी, अमित शाह, एस जयशंकर आणि राजनाथ सिंह यांचे खाते कायम ठेवण्यात आले आहे. नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्रालय मिळालं आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय?

अमित शाह – गृहमंत्रालय
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर – परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जतीन राम – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव – पर्यावरण
राम मोहन नायडू – नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा – आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील – जलशक्ती
किरण रिजीजू – संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री

राज्यमंत्री

श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे – राज्यमंत्री – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री

महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांना कोणती खाती?

नितीन गडकरी – रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय
पियुष गोयल – वाणिज्य मंत्रालय
रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
प्रतापराव जाधव – आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री

महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. दोघांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे. गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पियुष गोयल यांना मिळाले होते. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद खेचून आणले आहे.

 

 

 

Loading

Konkan Railway: रेक अभावी मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या १२४ फेऱ्या रद्द

   Follow us on        
Konkan Railway News: उद्या सोमवारपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्ग धोकादायक होत असल्याने पावसाळ्यात या मार्गावर गाड्या धीम्या गतीने चालविण्यात येतात. त्यामुळे सर्व गाड्यांसाठी  पावसाळयात वेगळे वेळापत्रक लागू केले जाते. त्याचप्रमाणे या मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या काही गाड्यांच्या फेऱ्यात कपातही केली जाते.
रेक च्या मर्यादेमुळे कपात 
वेळापत्रक बदलल्या मुळे रेक अभावी काही गाड्यांच्या फेऱ्या कमी कराव्या लागतात. जसे की सकाळी सीएसएमटी वरून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा तोच रेक दुपारी मडगाव वरून सीएसएमटी साठी वापरला जातो. मात्र पावसाळी हंगामात गाड्यांचा वेग धीमा होत असल्याने तोच रेक समान दिवशी वापरता येत नाही. साहजिकच दुसऱ्या दिवशी मडगाव वरून सीएसएमटी साठी  तो रेक वापरला जातो. या कारणामुळे आठवड्यातून ६ दिवस धावणारी  ही गाडी पावसाळी हंगामात फक्त तीनच दिवस चालविण्यात येणार आहे. या कारणाने अजून काही  गाड्यांच्या फेऱ्यात कपात केली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे.
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
३) 22229 /22230  Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express
22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.
या सर्व गाड्यांचे वेळापत्रकही बदलून पावसाळी वेळापत्रकानुसार या गाड्या चावलेण्यात येणार आहेत.
टीप: सदर माहिती अंतिम स्वरूपाची नसून रेल्वे प्रशासनातर्फे काही बदल केला जाऊ शकतो. आपल्या प्रवासाची योजना आखताना कृपया रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा रेल्वे चौकशीच्या इतर पर्यायाचा वापर करावा ही विनंती 

Loading

मोठी बातमी: नारायण राणे यांना नवीन सरकारच्या मंत्रीमंडळात स्थान नाही

   Follow us on        
दिल्ली: कोकणातील दिग्गज नेते नारायण राणे आणि मराठवाड्यातील नेते भागवत कराड यांना मंत्रीमंडळ स्थान दिले जाणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. भाजप हायकमांडकडून राणे आणि कराड यांना फोन करून मंत्रिमंडळात सहभागी करून घेता येणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये कोकण आणि मराठवाड्याचे नेतृत्त्व आता कोण करणार? या भागातून अन्य कोणत्याच नेत्याला संधी मिळणार नाही का? असे प्रश्न विचारले जात आहेत.
दिल्लीतून कराड, नारायण राणे यांना फोन 
मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात नारायण राणे यांच्याकडे शूक्ष्म व लघु उद्योगमंत्री होते. तर भागवत कराड हे राज्य अर्थमंत्री होते. खरं म्हणजे नारायण राणे यांना यावेळीदेखील मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. कारण ते कोकणातील एक मोठा चेहरा आहेत. दुसरीडे भागवत कराड हेदखील मराठवाड्यातील मोठे नाव आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात होता. प्रत्यक्ष मात्र आता मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात त्यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी दिली जाणार नसल्याचं सांगितलं जातंय. तसा फोनदेखील भाजपच्या दिल्लीतील नेतृत्त्वाकडून कराड आणि नारायण राणे यांना गेल्याचे म्हटले जात आहे. त्यामुले आता कराड आणि राणे या दोघांचाही पत्ता कट झाल्याचे जवळजवळ निश्चित मानले जात आहे.
वेगळी महत्वाची जबाबदारी दिली जाणार? 
भाजपचे सरकार आल्यावर नारायण राणे यांना मंत्रिपद मिळणार अशी शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तविण्यात येत होती. मात्र भाजपने नारायण राणे यांना मंत्रीपद देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र नारायण राणे यांचे राज्यातील खासकरून कोकण भागातील राजकीय वजन पाहता त्यांना दुसरी महत्वाची जबाबदारी दिली जाऊ शकते असे बोलले जात आहे.

Loading

न्याती इंजिनिअर्स ठरली रत्नागिरी विमानतळावरील टर्मिनल इमारत बांधण्यासाठी सर्वात कमी बोली लावणारा बोलीदार

   Follow us on        
रत्नागिरी: न्याती इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स प्रा. लिमिटेड (NECPL) ला बुधवारी कोकणातील रत्नागिरी विमानतळावर (RTC) नवीन टर्मिनल इमारत बांधण्यासाठी सर्वात कमी बोली लावणारा बोलीदार Bidder म्हणून घोषित करण्यात आले आहे. 
मिरजोळे गावातील रत्नागिरी विमानतळ हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) च्या मालकीचे आहे आणि सध्या नजर ठेवण्यासाठी आणि शोध तसेच बचाव कार्यासाठी भारतीय तटरक्षक दलाचे एक स्टेशन आहे.महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी (MADC) द्वारे आता 3200 चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेल्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारत, लिंक टॅक्सीवे आणि दोन ATR-72 प्रकारची विमाने हाताळण्यास तजवीज करण्यात येत आहे. त्यासाठी MADC ने मार्च 2024 मध्ये नवीन टर्मिनल इमारत  बांधकाम कामासाठी रु. 50.52 कोटी अंदाज आणि 540 दिवस (1.47 वर्ष) बांधकाम  मुदतीसाठी निविदा मागविल्या होत्या. यासाठी आलेल्या ७ बोलीदारापैकी, फुलारी रियल्टी, नेश आर्किटेक्ट्स आणि एससीसी इन्फ्रास्ट्रक्चर या 3 कंपन्यांनी सादर केलेल्या निविदा तांत्रिकदृष्ट्या  अटींचे पालन करत नसल्याने त्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत. 
इतर बोलीदारांनी लावलेल्या बोली खालीलप्रमाणे 
न्याती इंजिनिअर्स अँड कन्सल्टंट्स प्रा. लिमिटेड – ५७.६४ कोटी रुपये 
हायटेक इन्फ्रा – ६०.२१ कोटी रुपये  
जेनेरिक इंजिनीरिंग  – ६३ .१५ कोटी रुपये  
अजवानी इन्फ्रा – ६४.०० कोटी रुपये 
NECPL अंदाजरकमेच्या 14.09% जास्त असल्याने करारासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी बोलीदार आणि MADC मध्ये पुढील वाटाघाटी होणार आहेत. 

Loading

सावंतवाडी टर्मिनस बनविण्यासाठी महत्त्वाची असलेली पाणी पुरवठा योजना मंजूरीच्या प्रतिक्षेत..

   Follow us on        

सावंतवाडी : सावंतवाडी मळगाव रेल्वे स्थानकावर टर्मिनस गेले 9 वर्ष प्रतीक्षेत आहे. टर्मिनस झाल्यास त्याठिकाणी मुबलक पाणी असणे अत्यंत गरजचे आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन  येथे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध करण्यासाठी असलेल्या शक्यतांवर विचार करून राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी गेल्या डिसेंबर मध्ये एक योजना सुचवली होती. तसेच ही योजना मंजूर करून घेऊन योजनेस अर्थपुरवठा करण्यात येईल असे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र ही योजना गेल्या 6 महिन्यांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. 

तिलारी आंतरराज्य पाटबंधारे प्रकल्पावर आधारित मणेरी ते वेंगुर्ले या नळपाणी पुरवठा योजनेवर दांडेली ते मळगाव कोकण रेल्वेसह 3 गावांना पुरक नळपाणी योजना 8 कोटी 50 लाख रुपयांचा आराखडा तयार करून मंजूरीसाठी पाठवला गेला आहे.

रेल्वे मंत्रालय आणि पर्यटन विकास अंतर्गत निधी अपेक्षित धरण्यात आला आहे. मात्र शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांनी कोकण रेल्वे महामंडळाच्या अधिकार्‍यांनी योजनेसाठी आर्थिक तरतूद करण्याची तयारी दर्शवली नाही तर आपण सिंधुरत्न योजनेतून आर्थिक तरतूद करण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले होते. दरम्यान डिसेंबर महिन्यापासून या योजनेचा आराखडा मंजूरीच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी कोकण रेल्वे मार्गावरील मळगाव रेल्वे स्थानकावर पाणी पुरवठा होईल आणि सर्व गाड्या पाणी भरण्यासाठी या ठिकाणी लवकरात लवकर थांबतील यासाठी पुढाकार घेण्याची वेळ आली आहे असे प्रवासी संघटनेने म्हटले आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ३ गाडयांच्या अंतिम स्थानकात महिनाभरासाठी बदल

मुंबई : कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या तीन सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या दि 7 जुलै 2024 पर्यंत त्यांच्या निर्धारित सीएसएमटी जंक्शन ऐवजी दादरपर्यंतच धावणार आहेत.मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील 4 फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने येथून सुटणार्‍या काही गाड्यांचा प्रवास दादर स्थानकापर्यंत मर्यादित करण्यात आला आहे.  यात कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांचा समावेश आहे. 
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस वरील 10, 11, 12, 13 या क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मच्या विस्तारीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे दिनांक 07 जुलै पर्यंत म्हणजे पुढील महिनाभरासाठी काही गाड्यांवर परिणाम होणार आहे. 
या कामामुळे मंगळुरू जंक्शन ते सीएसएमटी (12134), मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी (22120) तेजस एक्सप्रेस तसेच मडगाव जंक्शन ते मुंबई सीएसएमटी दरम्यान रोज धावणारी जनशताब्दी एक्सप्रेस(12052) या तिन्ही सुपरफास्ट एक्सप्रेस गाड्या दिनांक 07 जुलै 2024 पर्यंत त्यांचा मुंबई दिशेने होणारा प्रवास दादरलाच संपणार आहे

Loading

पुढील चार दिवसांत राज्यात मान्सून ‘कोसळणार’…. ‘या’ जिह्यांना हवामान खात्याचा दक्षतेचा इशारा

   Follow us on        
Mansoon Alert: महाराष्ट्रात रत्नागिरी आणि सोलापूर पर्यंन्त मान्सून दाखल झाला असल्याने उन्हाळ्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर नागरिकांसह विशेषतः शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मान्सून सक्रिय झाला आहे. कालपासूनच रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये कालपासून पावसाला सुरूवात झाली आहे. मान्सून सक्रिय होण्यासाठी अरबी समुद्रात पोषक वातावरण असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. याचसोबत तळ कोकणात उद्यापर्यंत मान्सून येण्याची शक्यता आहे. कोकणसह संपूर्ण राज्यात आज हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला असून अरबी समुद्र किनारपट्टी भागात काळ्या ढगांची गर्दी झाली आहे. 



हवामान खात्याचा अंदाज
उद्या शुक्रवारी आणि शनिवारी हवामान खात्याने राज्याला दक्षेतचा ‘येलो’ अलर्ट दिला आहे. काही जिल्हे वगळता रविवारी आणि सोमवारी सुद्धा राज्याला दक्षेतचा ‘येलो’ अलर्ट दिला आहे. मात्र सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांत या दिवशीं मुसळदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान खात्याने या दिवशीं या जिल्ह्यांना दक्षतेचा ‘ऑरेंज’ अलर्ट दिला आहे.    

Loading

आंबोली घाटात भला मोठा दगड रस्त्यावर आला; वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण

   Follow us on        
आंबोली,दि. ६ जून : आंबोली घाटात धबधब्याच्या परिसरात पहाटेच्या सुमारास भला मोठा दगड रस्त्यावर कोसळला. ही घटना  पूर्वीचा वस परिसरात घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झाली आहे.  दरम्यान हा प्रकार घडला तरी वाहतूक सुरळीत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र या घटनेमुळे येथून वाहतूक करणाऱ्या चालकांमध्ये भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबतची माहिती वनविभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली आहे, असे पोलीस हवालदार दत्ता देसाई यांनी सांगितले.दरम्यान ऐन वर्षा पर्यटनाच्या तोंडावर हा प्रकार घडल्यामुळे त्याचा फटका आंबोली पर्यटनावर बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे गंभीर दखल घेऊन अशा प्रकारे दगड कोसळू नये यासाठी योग्य ती उपाययोजना राबवावी, अशी मागणी राजगुरू यांनी केली आहे.



आंबोली घाट दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. सात ते आठ वर्षापूर्वी आंबोली घाट वारंवार कोसळण्याचा प्रकार सुरू होता. त्यामुळे पर्यायी रस्त्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेली अनेक वर्षे या विषयावर चर्चा सुरू आहे. मात्र अद्यापही कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर पर्याय काय? हा मात्र प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान घाट धोकादायक होत असल्यामुळे अशा प्रकारचे दगड कोसळल्याची घटना वारंवार घडत असते. 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search