Author Archives: Kokanai Digital
राजस्थान :निवडणूक आयोगाने राजस्थान विधानसभेसाठी मतदानाची तारीख बदलली आहे. 23 नोव्हेंबर ऐवजी आता 25 नोव्हेंबरला राजस्थानमध्ये मतदान होणार आहे. ही तारीख बदलण्याचे कारण ऐकून तुम्हीपण थोडे आश्चर्यचकित व्हाल.
23 नोव्हेंबर या दिवशी लग्नाचा चांगला मुहूर्त आहे. त्यामुळे त्याचा मतदानावर परिणामाची भीती सर्वच पक्षांनी व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाकडून हा बदल करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दिनांक 23 नोव्हेंबर हा दिवस विवाह आणि मंगलकार्यासाठी शुभ असल्याने या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे आणि इतर सामाजिक कार्ये असतिल त्यामुळे या दिवशी मतदान करणे मतदारांना गैरसोयीचे जाईल. तसेच त्याचा परिणाम होवूनकमी मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या तारखेत बदल करावा अशी निवेदने राजकीय पक्षांकडून आणि सामाजिक संस्थे कडून आली होती. त्याचप्रमाणे समाज माध्यमातून सुद्धा हा याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. या सर्वांचा विचार करून आपण या तारखेत बदल करत असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या कुडाळमधील वेताळबांबर्डे येथील अभ्यासक गौतम कदम आणि केरळमधील अभ्यासकांनी जम्पिंग स्पायडर’ च्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतला आहे.चीन, मलेशियामध्ये झालेल्या नोंदीनंतर भारतातील या कोळ्याच्या प्रजातीची ही पहिलीच नोंद सिंधुदुर्गात झाली आहे. ऋषिकेश त्रिपाठी, गौतम कदम या दोन संशोधकांनी गेली दोन वर्षापासून या कोळीवर संशोधन केलं आहे. ‘जम्पिंग स्पायडर’ च्या नवीन कोळीच्या प्रजातीचा शोध घेतला आहे.
‘स्पारबांबॅरस सिंधुदुर्ग’ या नावाने या ‘जम्पिंग स्पायडर’ कोळीचं नामकरण करण्यात आलं आहे. या नावाने आता जगभरात या कोळीची ओळख होणार आहे. स्पारबांबॅरस हे नाव हा कोळी बांबूच्या झाडावर याचा अधिवास असल्याने तस नामकरण करण्यात आले आहे. हा कोळी ज्या ठिकाणी जाळ बनवतो त्याचं ठिकाणी जाळ्यात अडकलेल्या कीटकांचा भक्ष करतात. भारतात जवळपास 2000 कोळ्याचे प्रजाती सापडतात. तर जगभरात 51,000 कोळ्यांचे प्रजाती सापडतात. जम्पिंग स्पायडरच्या 300 प्रजाती भारतात आढळतात.
मुंबई : वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईहून गुजरातमध्ये जाणाऱ्या क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने ‘मुंबई ते अहमदाबाद’ दोन विशेष वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन केले आहे. क्रिकेट सामन्यांसाठी विशेष एक्स्प्रेस चालवण्याची भारतीय रेल्वे इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.
यंदाच्या वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामना शनिवारी, १४ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू होणार आहे. स्टेडियमची आसनक्षमता एक लाख ३२ हजार असून सामन्यांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. यामुळे मुंबई ते अहमदाबाददरम्यान सामन्याच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा आणि सामन्याच्या दिवशी पहाटे अशा दोन वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन आहे.
तात्पुत्या वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबरला रात्री दहा वाजता मुंबईहून अहमदाबादसाठी वंदे भारत एक्स्प्रेस रवाना होईल आणि १४ ऑक्टोबरला पहाटे सहा वाजता अहमदाबादमध्ये पोहोचेल. दुसरी विशेष एक्स्प्रेस मुंबईहून सामन्याच्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला पहाटे पाच वाजता सुटेल आणि १२ वाजेपर्यंत अहमदाबादला पोहोचेल. तूर्त गाड्यांचे थांबे निश्चित करण्यात आले नसले, तरी महत्त्वाच्या स्थानकांवर गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई : शिवाजी पार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार याबाबत दोन्ही बाजूने तुफान राडा चालू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजी पार्कवर सभा घेणार नाही असे जाहीर करून या विषयाला पूर्णविराम लावला. आपण माघार का घेतली याबाबत त्यांनी समाज माध्यमातून स्पष्टीकरणही दिले.
या स्पष्टीकरणात ते म्हणाले
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांचा बुलंद आवाज ज्या शिवाजी पार्कवर शिवसैनिकांनी ऐकला, ज्या मैदानातून शिवसेनाप्रमुखांनी काँग्रेसला गाडण्याचा विचार मांडला, ज्या मैदानातून प्रखर हिंदुत्वाचा जागर त्यांनी केला, त्याच मैदानातून काँग्रेसला डोक्यावर घेतले जाणार असेल तर तो शिवसेनेचा दसरा मेळावा असूच शकत नाही.
बाळासाहेबांच्या पवित्र विचारांनी भारावलेले #शिवतीर्थ गेल्याच वर्षी या मंडळींनी बाटवले आहे. आम्ही ठरवले असते तर या मैदानावर सभा घेतलीही असती. परंतु, राज्याचा प्रमुख म्हणून मला कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आणायची नव्हती.
बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व एवढे अस्सल आहे की ते कुठेही सांगितले तरी त्यांचे तेज कमी होत नाही. त्या विचारांना शिवाजी पार्कची गरज नाही. आम्ही जाऊ तिथे त्यांचे विचार नेऊ. आपल्याला वारसा मिळाला असे म्हणणाऱ्यांनी आधी आरसा पाहावा म्हणजे खरे काय ते कळेल.
कोण कुठे बोलतो, यापेक्षा काय बोलतो हे महत्त्वाचे आहे. तोंड उघडले की रडगाणेच गाणार असाल तर ते कोण ऐकणार? बाळासाहेबांचा विचार त्यांनी पायदळी तुडवलाय, हे जनतेने पाहिले आहे. आम्ही बाळासाहेबांनी पेरलेले, जपलेले विचार हृदयात घेऊन पुढे निघालोय. विचारांचा वारसा आमच्याकडेच आहे. छाती बडवून रडायला शिवाजी पार्क ही जागा नाही, जिथे बाळासाहेबांनी अंगार फुलवला होता तिथे आता हा वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार”
Konkan Railway News :मध्यरेल्वेच्या काही गाड्यांना प्रवाशांचा प्रतिसाद आणि गर्दी लक्षात घेऊन काही गाड्यांच्या डब्यांत वाढ करण्याचा निर्णय मध्य रेल्वेतर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार एकूण 10 एक्सप्रेस गाड्यांमध्ये एकुण 34 (सर्व 10 गाड्यांचे मिळून) डबे कायमस्वरुपी वाढविण्यात येणार आहेत.
या गाड्यांमध्ये कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणार्या नागपूर-मडगाव-नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीला एक थ्री टायर एसी आणि एक जनरल असे दोन अतिरिक्त डबे कायमस्वरूपासाठी जोडण्यात येणार आहेत.
Nagpur – Madgaon Jn Special (Bi-Weekly) 01139 या गाडीला दिनांक 14 ऑक्टोबर 2023 पासून तर
Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01140 या गाडीला दिनांक 15 ऑक्टोबर 2023 पासून हे अतिरिक्त डबे जोडण्यात येणार आहेत.
या गाडीच्या डब्यांची सुधारित संरचना
2 Tier AC – 01, 3 Tier AC – 05, Sleeper – 11, General – 05, SLR-02 =एकूण 24 आयसिएफ कोच.
मध्य रेल्वे खालील १० एक्सप्रेस मध्ये १२/१०/२३ पासुन पुढे एकुण ३४ डब्बे कायमस्वरुपी
वाढवत आहे…१) २२१३९ पुणे अजनी एक्सप्रेस-
आधीचे डब्बे – १५ LHB
सुधारित डब्बे – २० LHB
२) २२१४० अजनी पुणे एक्सप्रेस-
आधीचे डब्बे – १५ LHB
सुधारित डब्बे – २० LHB
३) २२१४१ पुणे नागपूर एक्सप्रेस-… pic.twitter.com/ggfWyv4BNB— Central Railway (@Central_Railway) October 10, 2023
सावंतवाडी: निपुण भारत अंतर्गत माडखोल केंद्रातील चार शाळांनी गुणवत्तेची प्रमुख तीन ध्येय पूर्ण केल्याने या शाळांना ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित करण्यात येत आहे. जिल्ह्यात प्रथमच या चार शाळा ‘निपुण शाळा’ म्हणून घोषित झाल्या असून आता माडखोल केंद्रातील सर्व प्राथमिक शाळा घोषित करण्यात येणार असल्याची माहिती माडखोल केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर यांनी दिली.
निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्ट यशप्राप्ती करणाऱ्या शाळांमध्ये कारिवडे डंगवाडी, कारिवडे आपट्याचे गाळू माडखोल धुरीवाडी, माडखोल बामणादेवी या शाळांचा समावेश आहे. या चारही निपुण शाळांना आयएसओ मानांकित शाळा माडखोल धवडकी शाळा नं. २ चे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उदय राऊत, शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. निपुण शाळा घोषणेची १०० टक्के उद्दिष्टे पूर्ण केल्यानंतर त्या शाळांनी त्याची घोषणा करायची आहे. या शाळेतील शिक्षक एकसमन्वय आणि समाधानाची जाणीव यातून शैक्षणिक कार्य करतात. त्यामुळे निपुण शाळेचे सर्व श्रेय या शाळेतील शिक्षकांचे असून त्यांना गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके यांचेही मार्गदर्शन मिळत असल्याचे वालावलकर यांनी सांगितले. यावेळी वारंग, शुभदा (डंगवाडी), सतीश राऊळ (आपट्याचे गाळू), प्रशांत कांदे (धुरीवाडी), अमिषा कुंभार (बामणादेवी) या निपुण शाळांचे मुख्याध्यापक उपस्थित होते. आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक अरविंद सरनोबत यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.