Author Archives: Kokanai Digital

Ganesh Chaturthi 2024: गणपती विशेष गाड्यांना पेण आणि झाराप येथे थांबा मंजूर

   Follow us on        

Changes in Ganpati special trains: गणपती उत्सवासाठी सोडण्यात आलेल्या काही विशेष गाड्यांना पेण आणि झाराप येथे अतिरिक्त थांबे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी विशेष गाड्यांना या स्थानकांवर थांबे न दिल्याने प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती व या स्थानकांवर थांबे देण्यात यावे अशी मागणी केली गेली होती. सुबक गणेशमूर्ती साठी प्रसिद्ध असलेल्या पेण स्थानकावर गणपती विशेष गाड्यांना थांबा न देणे हा मोठा विरोधाभास म्हणावे लागेल. दुसरीकडे फक्त एका नियमित गाडीला थांबा असलेल्या झाराप स्थानकावर किमान विशेष गाड्यांना तरी थांबे मिळावेत अशी मागणी झाली आहे. त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनाने खालील गाड्यांना येथे थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक क्र. ०११५१/०११५२ मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे

गाडी क्रमांक ०११५३/०११५४ मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी विशेष या गाडीला पेण येथे

गाडी क्रमांक ०११६७/०११६८ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे

गाडी क्रमांक ०११८५/०११८६ लोकमान्य टिळक (टी) – कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे

गाडी क्रमांक ०११६५/०११६६ लोकमान्य टिळक (टी)- कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण येथे

गाडी क्रमांक ०११७१/०११७२ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष या गाडीला पेण आणि झाराप येथे

गाडी क्रमांक ०९००९/ ०९०१० मुंबई सेंट्रल – सावंतवाडी रोड – मुंबई सेंट्रल स्पेशल या विशेष गाडीला झाराप येथे थांबे देण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे खालील दोन विशेष गाड्यांच्या सेवेच्या कालावधीत काही बदल करण्यात आले आहेत.

गाडी क्र. ०११५४ रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी आणि गाडी क्र. ०११६८ कुडाळ – लोकमान्य टिळक (टी) विशेष या दोन्ही गाड्यांचा कालावधी ०२/०९/२०२४ ते १९/०९/२०२४ असा सुधारित करण्यात आला आहे. याआधी तो ०१/०९/२०२४ ते १८/०९/२०२४ असा होता.

प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे आपल्या प्रवासाचे नियोजन करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Loading

गणेशोत्सवासाठी रेल्वेबरोबर एसटीही सज्ज; कोकणकरांसाठी ४३०० जादा बसेस धावणार

मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ७ सप्टेंबरला श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झालं आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
व्यक्तिगत आरक्षणासोबतच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरात सवलत दिली जात आहे. २ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. गतवर्षी ३५०० बसेस सोडण्यात आल्या होत्या. यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये ८०० बसेसची वाढ करण्यात आली आहे.
गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना, गणपती बाप्पा , कोकणचा चाकरमानी व एसटी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे ४३०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील. सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे,उपलब्ध होणार आहे.
गणेशोत्सवादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली कर्मचारी अहोरात्र कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधानगृह उभारण्यात येणार आहेत.

Loading

खुशखबर! मध्यरेल्वेतर्फे अजून पाच गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा

Additional Trains for Ganesha Festival: गणेशोत्सवासाठी गावी जाणार्‍या गणेशभक्तांसाठी मध्य रेल्वेने एक खुशखबर दिली आहे. मध्य रेल्वे तर्फे या आधी घोषणा केलेल्या गाड्या व्यतिरिक्त अजुन पाच गाड्यांची घोषणा केली आहे. पुणे /पनवेल /मुंबई एलटीटी ते रत्नागिरी दरम्यान या गाड्या धावणार असून त्याचा फायदा गणेशोत्सवा दरम्यान होणारी गर्दी कमी होण्यासाठी होणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने या गाड्यांना हिरवा कंदील दिल्यानंतर या गाडय़ाचे आरक्षण आणि ईतर माहिती जाहीर करण्यात येईल. मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार खालील गाड्या विशेष गाड्या म्हणुन चालविण्यात येणार आहेत.

१) ०१४४५/०१४४६ पुणे – रत्नागिरी – पुणे विशेष (एकूण २ फेर्‍या)
गाडी क्रमांक ०१४४५ विशेष पुणे येथून मंगळवार दिनांक १० सप्टेंबर रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४६ विशेष रत्नागिरी येथून बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी १७:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:०० वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड,
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५ , जनरेटर व्हॅन – ०१, आणि एसएलआर- ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे

२) ०१४४१/०१४४२ पनवेल -रत्नागिरी – पनवेल विशेष
गाडी क्रमांक ०१४४१ विशेष पनवेल येथून बुधवार दिनांक ११ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४२ विशेष रत्नागिरी येथून मंगळवार दिनांक १० सप्टेंबर रोजी संध्याकाळी १७:५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०१:३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: पेण, रोहा,माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – १५ , जनरेटर व्हॅन – ०१, आणि एसएलआर- ०१ असे मिळून एकूण २० LHB डबे

३) ०१४४७/०१४४८ पुणे – रत्नागिरी – पुणे विशेष (एकूण ४ फेर्‍या)
गाडी क्रमांक ०१४४७ विशेष पुणे येथून शनिवार दिनांक ०७ आणि १४ सप्टेंबर आणि रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४८ विशेष रत्नागिरी येथून रविवार दिनांक ०८ आणि १६ सप्टेंबर रोजी १७:५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ५:०० वाजता पुणे येथे पोहोचेल.
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड,
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०४ , सेकंड स्लीपर – ११ जनरल – ०४, आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २२ डबे

४) ०१४४३/०१४४४ पनवेल -रत्नागिरी – पनवेल विशेष (एकूण ४ फेर्‍या) 
गाडी क्रमांक ०१४४३ विशेष पनवेल येथून रविवार दिनांक ८ आणि १५ सप्टेंबर रोजी पहाटे ०४:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ११:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१४४४ विशेष रत्नागिरी येथून शनिवार दिनांक ७ आणि १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी १७:५० वाजता सुटेल आणि दुसर्‍या दिवशी ०१:३० वाजता पनवेल येथे पोहोचेल.
थांबे: पेण, रोहा,माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०१, थ्री टायर एसी – ०४ , सेकंड स्लीपर – ११ जनरल – ०४, आणि एसएलआर- ०२ असे मिळून एकूण २२ डबे

५) ०१०३१/०१०३२ एलटीटी – रत्नागिरी – एलटीटी विशेष (एकूण ८ फेर्‍या)
गाडी क्रमांक ०१०३१ विशेष एलटीटी येथून दिनांक ६,७,१३,१४ सप्टेंबर रोजी रात्री २०:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ०४:५० वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०१०३२ विशेष रत्नागिरी येथून दिनांक ७,८,१४,१५ सप्टेंबर रोजी सकाळी ०८:४० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १७:१५ वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा,माणगाव, वीर, करंजाडी, खेड,चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड
डब्यांची रचना: टू टायर एसी – ०२, थ्री टायर एसी – ०६ , सेकंड स्लीपर – ०८ जनरल – ०३, आणि एसएलआर- ०१, जनरेटर व्हॅन – ०१ असे मिळून एकूण २१ LBH डबे

Loading

ऑनलाइन विडिओगेमचे एक टास्क पूर्ण करण्याच्या नादात १६ वर्षाच्या मुलाची आत्महत्या

   Follow us on        

पुणे: ऑनलाइन विडिओ गेम मुळे एका १६ वर्षाच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला आहे. पिंपरी चिंचवड येथील किवळे या भागात ही घटना घडली आहे. या गेममध्ये बाल्कनीतून उडी मारायचा एक टास्क होता. तो फॉलो करायच्या नादात या मुलाचा जीव गेला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

दिनांक 25 जुलै रोजी सुट्टी असल्या कारणाने सदर मुलगा बेडरूम मध्ये लॅपटॉपवर ऑनलाईन गेम खेळत होता. दुपारी एकच्या सुमारास सोसायटीच्या ग्रुपवर एक मुलगा रक्ताच्या थारोळ्यात खाली पडल्याचा मेसेज आला. मुलाच्या आईला शंका आली म्हणून ती मुलाच्या खोलीत गेली असता तो मुलगा तिथे आढळला नाही. त्यानंतर खाली पाहिले तर तो रक्ताच्या थारोळ्यात खाली पडलेला दिसला. मुलाला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता

घरात गेममध्ये असलेल्या कोडची काही कागदपत्रं सापडली आहेत. त्यात उडी मारणं असा टास्क होता. प्राथमिक तपासानुसार हा मुलगा मोठ्या प्रमाणात गेम्स खेळत होता असं निष्पन्न झालं आहे.आत्महत्येआधी मिळालेल्या चिठ्ठीनुसार XD नावाचा एक गेम आहे असं दिसतंय. यासंबंधी आमचे अधिकारी पुढील तपास करत आहे. असं पोलीस म्हणाले.तसेच त्याच्या खोलीतून काही स्केचेस सापडले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे त्याने इमारतीवरुन उडी मारण्यापूर्वी स्वत:च्या मृत्यूचा प्लान आखला होता. त्याने पेन्सिलिने याचे स्केच तयार केले होते.  तेही पोलिसांनी जप्त केले आहेत.

दरम्यान, मोबाइल वापरताना पॅरेंटल कंट्रोल आणि डिजिटल वेलबिंग नावाच्या अ‍ॅपचा वापर करून आपल्या मुलांचा स्क्रीनटाइमचा वापर मर्यादित करा, आणि आपली मुलं काय पाहतात यावर लक्ष ठेवायला हवं, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.

या मुलाच्या आईने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं, “गेल्या सहा महिन्यापासून त्याचं वागणं बदललं होतं. त्याच्या हातून लॅपटॉप घेतला की तो एकदम आक्रमक व्हायचा. तो अगदी लहानसहान गोष्टींना घाबरायचा. तो अचानक मला चाकू मागायला लागला. आगीला तो घाबरेनासा झाला. तो हे पाऊल उचलेल असं मला कधीही वाटलं नव्हतं. सरकारने याबद्दल काळजी घ्यायला हवी. कारण मुलांना काहीच कळत नाही त्यामुळे मुलांपर्यंत या गोष्टी पोहोचू नयेत याची काळजी सरकारने घेणं आवश्यक आहे. VPN वर सगळं दिसू शकतं. माझ्या मुलाबरोबर जे झालं ते इतरांबरोबर होऊ देऊ नका, सगळ्यांना सुरक्षित नेटवर्क पोहोचवा. माझी सरकारलाही कळकळीची विनंती आहे.”

मुलाच्या वडिलांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली.

ते म्हणाले, “मुलांना आजकाल सगळं समजतं. पॅरेंटल कंट्रोल असला तरी मुलं तो कोड सहज क्रॅक करतात. बरेचदा मुलं ऑनलाइन अभ्यास करण्याच्या नादात लॅपटॉपवर बसतात. त्यामुळे ते नक्की तिथे काय पाहतात हे समजत नाही कारण हिस्ट्रीसुद्धा डिलिट करतात. पालकांना मुलांवर 24 तास लक्ष ठेवणं शक्य नाही.

मुलगा कोणता गेम खेळत होता हे अद्याप आई वडिलांना आणि पोलिसांनाही नीटसं कळलेलं नाही.

त्याबद्दल अधिक तपास करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Loading

IMD Rain Alert: विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा परतणार;राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना दक्षतेचा इशारा 

   Follow us on        
Rain Alert from IMD: सध्या केरळमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला आहे. वायनाड येथे भुरस्सलन झाल्याने मोठी जीवितहानी झाली आहे. राज्यातील इतर भागातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. यातच आता भारतीय हवामान खात्याने गुरुवारपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पावसाचा दक्षतेचा ईशारा दिला आहे.
भारतीय हवामान खात्याने IMD पावसाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज वर्तविला आहे. त्यामध्ये आज मंगळवार आणि बुधवार या दिवशी काही जिल्ह्यांना सावधानतेचा येलो ईशारा देण्यात आला आहे. गुरुवारपासून मात्र काही जिल्ह्यांसाठी खस्कसून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गुरुवार दिनांक ०१ ऑगस्ट रोजी रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना दक्षतेचाऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर शुक्रवार दिनांक ०२ ऑगस्ट रोजी  सिंधुदुर्ग,रत्नागिरी, रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर तसेच गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर पाचव्या दिवशी म्हणजे दिनांक ०३ ऑगस्ट रोजी मुंबई वगळता संपूर्ण कोकण भाग, नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांना दक्षतेचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

 

 

Loading

केरळमध्ये भूस्खलन, २३ जणांचा मृत्यू; शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

   Follow us on        

Wayanad Landslide: केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून मुसळधार पावसामुळे केरळच्या वायनाडमध्ये मंगळवारी पहाटे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत २३ जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासनाकडून बचावकार्याला सुरुवात करण्यात आली आहे.

वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी भागात भूस्खलानाची ही घटना घडली आहे. तसेच शेकडो लोक या ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या केरळमध्ये पावसाने थैमान घातले असून भूस्खलनात घडलेल्या ठिकाणी सुरु असलेल्या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत आहेत.

 

 

Loading

Breaking: हावडा-मुंबई एक्स्प्रेसला अपघात

   Follow us on        

Railway Accident Chakradharpur: आज पहाटे हावडा-मुंबई मेल एक्स्प्रेस ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) रुळावरून घसरून एक मालगाडीला धडकले. या अपघातात तीन जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहचले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.

हा अपघात राजखरसवां वेस्ट आऊट आणि बाराबम्बो दरम्यान झाला. हावडा-मुंबई मेल एक्सप्रेस (१२८१०) हीचे १८ डब्बे रुळावरुन घसरले. भल्या पहाटे ३:४५ मिनिटांनी हा अपघात झाला. दक्षिण-पूर्व रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वे अनेक डब्बे रुळावरुन उतले आहेत. जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात येत आहेत. तर काहींना चक्रधरपूर येथे हलविण्यात आले आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात आतापर्यंत ३ जणांच्या मृत्यूची माहिती मिळत आहे. तर १५० हून अधिक प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे. चालकाच्या प्रसंगावधानाने अनेकांचे प्राण वाचल्याची माहिती रेल्वेने दिली आहे. या अपघाताची जाणीव होताच चालकाने रेल्वेचा वेग कमी केला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. नाहीतर आज मृतांचा आकडा मोठा असता. चक्रधरपूर रेल्वे मंडळात याविषयीचा अलर्ट मिळाल्याने एकच गोंधळ उडाला.

 

Loading

Konkan Railway | सावंतवाडी टर्मिनससंबधी दीपक केसरकर यांनी केल्यात महत्त्वाच्या घोषणा

सिंधुदुर्ग, दि. २९ जुलै: कोकणात समस्त कोकणकरांचे हक्काचे रेल्वे टर्मिनस असावे असे स्वप्न असणार्‍या कोकणकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी सावंतवाडी टर्मिनस संबधी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सावंतवाडी टर्मिनससाठी लागणाऱ्या पाण्यासाठी रत्नसिंधू योजनेतून ४ कोटी तर जल जीवन मिशन अंतर्गत १.५ कोटी मंजूर करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. याबरोबरच त्यांच्याकडून टर्मिनस बिल्डिंग आणि पर्यटन हॉटेल साठी निधीची तरतूद केली गेली आहे.
सावंतवाडी टर्मिनसच्या लढ्याला यश मिळण्यास सुरवात 
सावंतवाडी टर्मिनसचे काम पूर्ण व्हावे यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तसेच अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीने वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न केले होते. दीपक केसरकर यांच्या या घोषणेवर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अलीकडेच संघटनेतर्फे राबवलेल्या सावंतवाडीच्या ईमेल मोहिमेला आणि ईतर स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश मिळण्यास सुरवात झाली असल्याचे मत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केलेत.

Loading

कोकण रेल्वेचे विलिनीकरण आणि मत्स्यगंधा एक्सप्रेससाठी LHB रेकच्या मागणीसाठी उडपीच्या खासदाराचे रेल्वेमंत्र्यांना साकडे

   Follow us on        
Konkan Railway Merging: कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्यात यावे ही मागणी अलीकडे जोर धरू लागली आहे. दोन दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील खासदार सुनील तटकरे यांनी ही मागणी संसदेत केली होती. आता उडुपी चिक्कमगलुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या भेटीत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीचे निवदेन त्यांना दिले आहे.
उडुपी चिक्कमगलुरूचे खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी गुरुवारी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत झालेल्या भेटीत कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला आहे.
कोकण विभागातील रेल्वे रुळांची सुधारणा, रेक बदलणे आणि रेल्वे स्थानके सुधारण्यासाठी कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली.  मागे  मंगळुरूच्या दौऱ्यात पुजारी इतर दोन खासदार कॅप्टन ब्रिजेश चौटा आणि विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी रेल्वेमंत्री राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांना या संदर्भातील निवेदन दिले होते.
याबरोबरच त्यांनी या भेटीत मत्स्यगंधा एक्सप्रेससाठी ट्रेनसाठी नवीन एलएचबी कोचची गरज असल्याचे रेल्वेमंत्र्यांना सांगून लवकरात लवकर हा बदल करावा अशीही विनंती केली आहे. त्यांच्या इतर मागण्यांमध्ये कारवार ते बेंगळुरू दरम्यान पडिल मार्गे नवीन ट्रेन जी उडुपी, कुंदापुरा आणि कारवारला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रात्रभर ट्रेन सेवेची गरज भागवेल तसेच कुंदापुरा येथे एर्नाकुलम-निजामुद्दीन ट्रेनला थांबा देण्याच्या मागणीचाही समावेश आहे.
श्री. वैष्णव यांनी मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला असून आणि विलीनीकरणाबाबत कर्नाटक सरकारकडून अहवाल मागणार असल्याचे श्री. पुजारी यांनी सांगितले.

Loading

रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या पूर्ततेसाठी जनआक्रोश समितीच्यावतीने माणगाव येथे महायज्ञ पार

रायगड: काल दिनांक-२८ जुलै २०२४ रोजी मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीच्यावतीने मुंबई गोवा महामार्ग पूर्णतःवासाठी विधित महायज्ञ माणगाव येथे ११ महंत आणि समस्त कोकणकरांच्या उपस्थितीत पार पडला.

मागील १७ वर्ष रखडलेला महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी कोकणातील लोकप्रतिनिधीना,शासनाला आणि प्रशासनाला सुद्बुद्धी देवो असे यावेळी समस्त कोकणकरांच्या वतीने देवाला साकडे घालण्यात आले. तसेच महामार्गांवर गेलेल्या हजारो लोकांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली. या महायज्ञास कोकणातील अनेक संघटनांनी आपला पाठिंबा दर्शविला आहे.

काल येथे जमलेल्या कोकणकरांनी शांततेत गणरायाचे पूजन करून, साकडे घालून शासनाला विनंती करण्यात आली मात्र या १५ दिवसात कामाला गती न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या आमरण उपोषणात तीव्र संताप व्यक्त करण्यात येईल व वेळ आल्यास माणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करून पर्यंत स्वतः मुख्यमंत्री येत नाहीत तोपर्यंत माघार घेणार नाही अशी भूमिका घेण्यात असल्याची माहिती समितीचे सचिव श्री. रुपेश दर्गे यांनी दिली आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search