Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपाचा बदल

   Follow us on        
Konkan Railway Notification:कोकण रेल्वे मार्गावरील लांब पल्ल्याच्या दोन गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत तात्पुरत्या स्वरूपात काहीसा बदल करण्यात येणार आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक 12284 / 12283 हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. – हजरत निजामुद्दीन दुरांतो एक्सप्रेस (साप्ताहिक) आणि गाडी क्रमांक 12450 / 12449 चंदीगड – मडगाव जं. – चंदीगड गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक) या गाडीच्या एका जनरेटर कोचच्या जागी एक सेकंड स्लीपर चा डबा जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही गाड्यांची प्रवासी क्षमता वाढणार आहे.
गाडी क्रमांक 12284  हजरत निजामुद्दीन – एर्नाकुलम जं. या गाडीत दिनांक 29/06/2024 ते 28/09/2024  पर्यंत तर गाडी क्र. 12283  एर्नाकुलम जं. -हजरत निजामुद्दीन या गाडीत दिनांक 02/07/2024 ते 01/10/2024 पर्यंत हा बदल केला जाणार आहे.
गाडी क्र. 12450 चंदीगड – मडगाव जं.  गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस या गाडीत दिनांक17/06/2024 ते 16/09/2024 पर्यंत तर गाडी क्र. 12449  मडगाव जं. – चंदीगड गोवा संपर्क क्रांती एक्सप्रेस या गाडीत दिनांक 19/06/2024 ते 18/09/2024 पर्यंत हा बदल केला जाणार आहे.

Loading

Facebook Comments Box

यंदा आंबोलीत वर्षा पर्यटनास जाण्याचा बेत असेल तर ही बातमी वाचाच; ‘या’ गोष्टी केल्यास होईल कारवाई

   Follow us on        
आंबोली: पाऊस सुरू झाल्यावर वर्षा पर्यटनासाठी आंबोलीत पर्यटकांचा ओघ सुरू होतो. मात्र या वर्षी  धबधब्याच्या परिसराची स्वच्छता तसेच शिस्त राखण्यासाठी वन विभागाकडून काही निर्णय घेतले गेले आहेत. येथील शिस्त आणि स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कारवाई केली जाणार आहे.
अनेक पर्यटक येथील माकडांना खाऊ टाकतात. मात्र त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता निर्माण होते. माकड किंवा वानरांचे माणसांवर होणारे हल्ले पण वाढताना दिसतात. दुसरी गोष्ट म्हणजे या असे खाद्यपदार्थ घातल्याने या प्राण्यांच्या सवयींवर परिणामी पर्यावरणावर सुद्धा परीणाम होतो. त्यामुळे या परिसरात माकडांना खाद्यपदार्थ घालण्यास मनाई केली असून,जर कोणी तसे केलेले आढळल्यास किमान 1000 रुपये एवढा दंड वसूल केला जाणार आहे. त्याविषयी या परिसरात कचरा टाकणाऱ्या बेशिस्त वर्तन करणाऱ्या पर्यटकांस कारवाईला सामोरे जावे लागेल. दिनांक 15 जून पासून ही कारवाई सुरू करण्यात असल्याची महिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
स्वच्छता मोहीम
पावसाळा सुरू झाल्याने आंबोली घाटात लवकरच वर्षा पर्यटन सुरू होणार असल्याने वन विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या निसर्गरम्य आंबोली घाट व धबधबा परिसराची सावंतवाडी वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावतीने शुक्रवारी सामूहिक स्वछता मोहीम राबविण्यात आली. या स्वछता मोहिमे अंतर्गत घाट सुरु होण्याच्या ठिकाणापासून ते अंदाजे १० किमी अंतराच्या रस्ता दुतर्फा परिसराची स्वच्छता करण्यात आली.

Loading

Facebook Comments Box

गणेशोत्सवासाठी बोरिवलीतुन कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाडी; केंदीय मंत्री पियुष गोयल यांची ग्वाही

   Follow us on        

मुंबई: बोरिवली दहिसर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात कोकणकरांची वस्ती आहे. मात्र त्यांना कोकणात गावी जाण्यासाठी दादर गाठावे लागत असल्याने मोठा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवासाठी बोरिवली येथून विशेष गाडी सोडण्यात येणार असल्याची ग्वाही नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. याबाबत आपण केंदीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा केली असल्याचेही ते बोलले. गुरुवारी कांदिवली येथील रघुलीला मॉलमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभात ते बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात पियुष गोयल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना केंदीय वाणिज्य खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. गुरुवारी कांदिवली येथील रघुलीला मॉलमध्ये त्यांचा महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबर संवाद कार्यक्रम झाला. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला होता. यावेळी माजी आमदार गोपाळ शेट्टी, विधान परिषदेचे गटनेते आमदार प्रविण दरेकर, आमदार अतुल भाटखळकर, विकास भाई गिरकर, आमदार योगेश सागर, आमदार मनीषा चौधरी, आमदार सुनील राणे, उत्तर मुंबईचे निरीक्षक रघुनाथ कुलकर्णी हे उपस्थित होते.

Loading

Facebook Comments Box

….म्हणून नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळले

सिंधुदुर्ग: भाजपचे विद्यमान खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून सुद्धा त्यांना पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले नसल्याने सर्वानाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गेल्या मंत्रिमंडळात स्थान आणि नारायण राणे यांचा राजकारणातील अनुभव आणि वजन पाहता त्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची सर्वाधिक शक्यता होती. एनडीएने बहुमत सिद्ध केल्यावर राज्यातील सर्व न्यूज माध्यमांनी नारायण राणे यांचे नाव मंत्रिमंडळात असणार अशा बातम्या प्रसिद्धही केल्या होत्या. मात्र घडले उलटेच. नारायण राणे यांना मंत्रीपद न मिळण्यामागे काय कारण असेल याच्याही चर्चा चालू झाल्यात.
या आधीच्या मंत्रीमंडळात नारायण राणे यांच्यावर सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र नारायण राणे यांच्या कारकिर्दीत सरकारच्या अपेक्षेप्रमाणे लघु उद्योगाची निर्मिती झाली नाही.  नारायण राणे यांना मंत्रिपद नाकारण्यात हे कारण असल्याचे भाजपच्या गोटातून बोलले जात आहे.
कणकवली विधानसभा मतदार संघाचे विद्यमान आमदार आणि नारायण राणे यांचे सुपुत्र नितेश राणे हे राज्याच्या राजकारणात आपली चमक दाखवत आहेत. राज्यात मंत्रिपदासाठी त्यांचे नाव चर्चेत असूनही विधानसभेच्या या टर्म मध्ये त्यांना मंत्रिपद मिळाले नाही . मात्र येणाऱ्या निवडणुकीनंतर भाजपची सत्ता आल्यास नितेश राणे यांना मंत्रिपद दिले जाणार आहे. भाजप एकाच घरात दोन मंत्रीपदे देत नसल्याने नारायण राणे यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला गेला नाही आहे अशी चर्चा राणे समर्थकांमध्ये होत आहे.

Loading

Facebook Comments Box

Cricket: कमी धावसंख्येमुळे चर्चेत असलेले न्यूयॉर्क येथील ते स्टेडियम कायमस्वरूपी हटविण्यास सुरवात; कारण काय?

   Follow us on        

न्यूयॉर्क : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत चालू असलेल्या यंदाच्या टी20 वर्ल्डकप मध्ये न्यूयॉर्कच्या नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमची ( New York Nassau County stadium ) खूप चर्चा झाली. या स्टेडियमवरील खेळपट्टी चर्चेत राहिली. या मैदानावर लो स्कोअरिंग मॅचेस झाल्या. गोलंदाजांना या मौदानावर फायदा मिळाला.हे मैदान अस्थायी स्वरुपात तयार करण्यात आलं होतं. भारत आणि अमेरिका यांच्यातील मॅचनंतर मैदानाच्या तोडकामाला सुरुवात झाली आहे.

न्यूयॉर्कचे नासाऊ काउंटी स्टेडियम अवघ्या पाच महिन्यांत बांधले गेले. हे स्टेडियम केवळ टी-२० विश्वचषकातील सामन्यांसाठी बांधण्यात आले होते. अमेरिकेत क्रिकेटला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी ICC ने टी-२० विश्वचषक सामने न्यूयॉर्कमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. याशिवाय डॅलस (टेक्सास) आणि फ्लोरिडा या ठिकाणांचीही स्पर्धेतील सामन्यांसाठी निवड करण्यात आली. नासाऊ काउंटी स्टेडियम तयार करण्याबाबत अंतिम निर्णय सप्टेंबर २०२३ मध्ये झाला.

न्यूयॉर्कमधील या मैदानाच्या उभारणीचा खर्च 30 मिलियन डॉलर होता. या मैदानाची निर्मिती 8 महिन्यात करण्यात आली होती. यासाठी ऑस्ट्रेलियाच्या अॅडिलेड ओवल स्टेडियमवरुन विशेष माती मागवण्यात आली होती. हे स्टेडियम पुढील 6 आठवड्यात पूर्णपणे हटवण्यात येईल.

बुधवारपासून स्टेडियम हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम न्यूयॉर्कमधील आयजनहावर पार्कमध्ये बांधण्यात आलं होतं. गेल्या काही दिवसांमध्ये या मैदानाची सुरक्षा वाढवण्यात आली होती.  या पार्कमधून नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल स्टेडिमय गायब होईल.

नासाऊ काऊंटी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर आठ मॅच खेळवण्यात आल्या. इथं पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या तीन संघानं विजय मिळवला. तर, दुसऱ्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघानं पाचवेळा विजय मिळवला. भारतानं  दोन वेळा धावांचा पाठलाग करताना विजय मिळवला. कॅनडानं पहिल्यांदा फलंदाजी करताना सर्वाधिक 137 धावा केल्या होत्या. कॅनडानं ती मॅच 12 धावांनी जिंकली होती.

 

 

 

 

 

 

 

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway: गणेशभक्तांचा प्रवास निर्विघ्न होण्यासाठी कोकण विकास समितीने रेल्वे बोर्डला सुचवल्या ‘या’ उपाययोजना

Konkan Railway: कोकणात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. या काळात रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवरचा ताण मोठया प्रमाणात वाढतो. योग्य आणि वेळेत नियोजन केल्यास प्रवाशांची गैरसोय कमी होऊन त्यांचा प्रवास सुखकर बनू शकतो. यंदाच्या गणेशोत्सवात गणेश भाविकांचा त्रास कमी करण्यासाठी कोकण विकास समितीने अभ्यास करून काही बदल आणि उपाययोजना रेल्वे प्रशासनास सुचवल्या आहेत. त्या आशयाचे निवेदन त्यांनी रेल्वे बोर्ड तसेच इतर संबंधित आस्थापानांना पाठवले आहे.
निवेदनात कोणत्या गोष्टी सुचवल्या आहेत?
गणेशोत्सवात दिवा रोहा मेमू चिपळूणपर्यंत वाढवल्याने 2022, 2023 आणि 2024 मध्ये रोहा येथे प्रवासी आंदोलन, रेल रोको आणि प्रवाशांमध्ये हाणामारी झाली होती. त्यामुळे दिवा रोहा मेमूचा विस्तार करण्याऐवजी किंवा  पनवेल ते चिपळूण दरम्यान वेगळी स्पेशल ट्रेन चालविण्या ऐवजी मुंबई सीएसएमटी ते चिपळूण दरम्यान अनारक्षित गाड्या चालवाव्यात. या गाडयांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी येथे थांबे देण्यात यावेत. तसेच या गाडयांना द्वितीय श्रेणी (2S) आणि AC चेअर कार (CC) कोच सोयीचे पडतील. पनवेल स्थानक बहुतेक प्रवाशांना सोयीचे नाही. मुंबई शहर आणि उपनगरातील प्रवाशांच्या सोयीसाठी या गाड्या किमान दादर आणि ठाणे स्थानकापर्यंत चालवणे गरजेचे आहे.
चिपळूण – रत्नागिरी दरम्यानच्या दिवसा धावणाऱ्या गाड्यांसाठी सेकंड स्लीपर SL किंवा थ्री टायर एसी 3A डब्यांचे रूपांतर सेकंड सीटिंग 2S आणि एसी चेअर कार CC कोच मध्ये केल्यास जास्त प्रवासी प्रवास करू शकतील. (See below table)
CLASS

LHB

IRS/ICF

Second Class Seating (2S)

120 (1.5 times of 80 berths in SL)

108 (1.5 times of 72 berths SL)

Sleeper used as 2S

100 (1.25 times of 80 berths in SL)

90 (1.25 times of 72 berths in SL)

AC Chair Car (CC)

78

74

3A used as CC

90 (1.25 times of 72 berths in 3A)

80 (1.25 times of 64 berths in 3A)

3E used as CC

100 (1.25 times of 80 berths in 3E)

अतिरिक्त रेकचा वापर: दिवा पेण मेमूच्या अतिरिक्त रेकचा उपयोग शनिवार व रविवार रोजी मुंबई/ठाणे ते खेड दरम्यान विशेष ट्रेन चालवण्यासाठी केला जाऊ शकतो. तसेच, 10101/10102 रत्नागिरी मडगाव एक्स्प्रेस, 17613/17614 नांदेड पनवेल एक्स्प्रेसचा रेक मुंबई ते वीर/खेड/चिपळूण/रत्नागिरी दरम्यान विशेष गाड्या चालविण्यासाठी वापरला जाऊ शकतो.
पनवेल ऐवजी दिवा किंवा एलटीटी वरून विशेष गाड्या चालवणे: मुंबई विभागातील एकाच बोर्डिंग/डिबोर्डिंग स्टेशनमुळे पनवेल येथून सुटणाऱ्या गाडयांना प्रतिसाद कमी मिळतो  (low occupancy ). तसेच, पनवेल हे बहुतांश मुंबई विभागासाठी सोयीचे नाही. त्यामुळे मध्य रेल्वेने दिवा किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस येथून या विशेष गाड्या चालवण्याचा विचार करावा.
या स्थानकांवर थांबे द्या: पेण, करंजाडी, सापे वामणे, विन्हेरे, दिवाणखावटी, रावली, खारेपाटण रोड, आचिर्णे, सौंदळ, झाराप, मडुरे, पेरणेम, इ. या स्थानकांवर नियमित प्रवासी गाड्यांव्यतिरिक्त, दररोज किमान दोन विशेष गाड्या (एक मध्य रेल्वे आणि एक पश्चिम रेल्वे) साठी थांबे द्या.
मालवाहतूक आणि रोरो सेवांना स्थगिती: प्रवासी गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी सणासुदीच्या काळात माल आणि RORO (रोल-ऑन रोल-ऑफ) वाहतूक तात्पुरती स्थगित ठेवण्याचा विचार करावा.
पश्चिम रेल्वेचे योगदान: सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल टर्मिनस, वांद्रे टर्मिनस, वलसाड, वडोदरा, उधना, सुरत, विश्वामित्री, अहमदाबाद, पुणे, मनमाड, भुवावळ, नागपूर, अशा विविध टर्मिनल्सवरून गाड्या चालवणे आवश्यक आहे. ठाणे, कल्याण आणि वसई रोडसारख्या महत्त्वाच्या मध्यवर्ती स्थानकांवर दररोज पुरेशा गाड्या उपलब्ध करून देणे. वसई रोडवर लोको रिव्हर्सल टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे मुंबई प्रदेशातून कोकण रेल्वेपर्यंत अमृत भारत, मेमू किंवा वंदे भारत गाड्या चालविल्यास फायदा होईल.
FTR सेवेस वेळेचे बंधन देण्यात यावेत: FTR स्पेशल सेवेमुळे सामान्य तिकीट मिळणे कठीण होते. त्यामुळे UTS आणि PRS द्वारे बुकिंगसाठी खुल्या असलेल्या सामान्य विशेष गाड्यांसाठी प्राइम स्लॉट आरक्षित केले जावेत आणि FTR स्पेशल सेवा फक्त 11:00 ते 16:00 या वेळेत मुंबईपासून चालवल्या जाव्यात.
पूर्णत: अनारक्षित स्पेशल गाड्या फक्त जास्त मागणी असलेल्या दिवसांपुरती मर्यादित ठेवा: पूर्णत: अनारक्षित स्पेशल फक्त गर्दीच्या दिवसांमध्ये चालवल्या जाव्यात किंवा त्या गाड्यांमध्ये काही आरक्षित डबे दिले जावेत.
12 कोच मेमूऐवजी 22/24 कोच ट्रेन चालवा: 12 कोच MEMU चालवल्याने मार्ग ब्लॉक होतो परंतु कमी प्रवासीक्षमता प्रदान करते. त्यामुळे, मार्गाच्या जास्तीत जास्त वापरासाठी 22 LHB/24 IRS कोच असलेल्या गाड्या चालवणे आवश्यक आहे.
खालील टेबल मध्ये दर्शविलेल्या गाडयांना रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात  किमान ३ स्थानकांवर अतिरिक्त तात्पुरते थांबे प्रदान करा उदा. माणगाव, वीर, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, झाराप आणि मडुरे. 

22653/22654 NZM TVC Express

22655/22656 NZM ERS Express

22660/22659 KCVL YNRK Express

12217/12218 Kerala Sampark Kranti Express

22910/22909 PBR KCVL Express

19577/19578 JAM TEN Express

12284/12283 Duronto Express

20924/20923 Humsafar Express

12201/12202 Garib Rath Express

12223/12224 Duronto Express

Loading

Facebook Comments Box

आता महायुतीतील नेत्यांचाच नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला विरोध

   Follow us on        
कोल्हापूर : विद्यमान सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जाणारा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या वाटेतील अडचणी दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. आता तर चक्क सत्तेत रूढ असलेल्या महायुतीतील नेत्यांनी या महामार्गाला विरोध केला असल्याने या प्रकल्प रद्द होण्याच्याच शक्यता वाढल्या असल्याचे बोलले जात आहे.
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर आणि गोव्याला जोडणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांनीच विरोध केला आहे. महायुतीचे पराभूत उमेदवार संजय मंडलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ, भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्यापाठोपाठ आता भाजपचे नेते समरजीतसिंह घाटगे यांनीही सोमवारी महामार्गाला विरोध असल्याचे जाहीर केले.
जिल्ह्यातील कागलसह सहा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात जात असल्याने त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. शक्तिपीठ महामार्गामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांसमवेत बामणी (ता. कागल) येथे घाटके यांनी सोमवारी बैठक घेतली. कागल तालुक्यातील सर्वाधिक ५०० एकर जमीन महामार्ग व अन्य सुविधांसाठी अधिग्रहित करण्यात येणार आहे. या जागेचीही घाटगे यांनी पाहणी केली.
‘शक्तिपीठ’मुळे पराभव? 
संजय मंडलिक यांनी आपल्या पराभवामागे शक्तिपीठ महामार्ग हे एक कारण असल्याचे म्हटले आहे. मुश्रीफ यांनीही याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्याचे म्हटले आहे. हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
काहीच महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असून पुन्हा शेतकऱ्यांचा नाराजीचा फटका सरकारला बसू शकतो, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेऊन हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी महायुतीतील नेत्यांकडून होत आहे.

Loading

Facebook Comments Box

गोव्यातील रूळ दुहेरीकरणाचा फटका कोकण रेल्वे प्रवाशांना; गाड्या ३ ते ४ तास उशिराने

   Follow us on        
पणजी: कोकण रेल्वे मार्गावरील बहुतेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दक्षिण गोव्यात सुरू असलेल्या दुहेरी मार्गाच्या कामामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या गाड्या उशिराने धावत असल्याची अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे ​​(KRCL) उपमहाव्यवस्थापक बबन घाटगे यांनी सांगितले की, दक्षिण पश्चिम रेल्वेने दक्षिण गोव्यातील माजोर्डा Majorda आणि कासावली Cansualim स्थानकांदरम्यानच्या मार्गाचा दुहेरी ट्रॅकच्याकामामुळे रविवारपासून कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या किमान तीन ते चार तास उशिराने धावत असून मंगळवार दिनांक ११ जून पर्यंत ही वाहतूक सूरळीत होणार आहे.
दरम्यान उन्हाळी सुट्ट्या लवकरच संपत असल्याने चाकरमानी वर्ग मुंबईला परतीचा प्रवासाला लागला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील गाडयांना मोठी गर्दी होताना दिसत आहे. त्यात बहुतेक गाड्या उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Loading

Facebook Comments Box

केंद्रीय मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर;जाणून घ्या कोणाला कोणते खाते भेटले

   Follow us on        

दिल्ली: नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आज खातेवाटपाला सुरुवात झाली आहे. एनडीएच्या सरकारमध्ये 72 जणांनी शपथ घेतली होती. त्यानुसार नितीन गडकरी, अमित शाह, एस जयशंकर आणि राजनाथ सिंह यांचे खाते कायम ठेवण्यात आले आहे. नितीन गडकरी यांना पुन्हा त्यांचं रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय, अमित शाह यांना गृह, एस जयशंकर यांना परराष्ट्र, राजनाथ सिंह यांना संरक्षण आणि अश्विनी वैष्णव यांना रेल्वेमंत्रालय मिळालं आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात कुणाला कोणतं मंत्रालय?

अमित शाह – गृहमंत्रालय
राजनाथ सिंह – संरक्षण मंत्रालय
एस जयशंकर – परराष्ट्र
नितीन गडकरी- रस्ते आणि वाहतूक
निर्मला सीतारमन – अर्थमंत्रालय
शिवराज सिंह चौहान- कृषी मंत्रालय
जतीन राम – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
पियुष गोयल -वाणिज्य
अन्नपूर्णा देवी – महिला आणि बाल विकास मंत्रालय
भूपेंदर यादव – पर्यावरण
राम मोहन नायडू – नागरी उड्डाण मंत्रालय
जेपी नड्डा – आरोग्य मंत्रालय
सर्वानंद सोनोवाल – पोर्ट शिपिंग मंत्रालय
सी आर पाटील – जलशक्ती
किरण रिजीजू – संसदीय कार्यमंत्री
धर्मेंद्र प्रधान – शिक्षण मंत्री

राज्यमंत्री

श्रीपाद नाईक- गृहनिर्माण आणि ऊर्जा राज्यमंत्री
शोभा करंदाजे – राज्यमंत्री – सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय
शांतनु ठाकुर – पोर्ट शिपिंग मंत्रालय, राज्यमंत्री

महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांना कोणती खाती?

नितीन गडकरी – रस्ते आणि परिवहन वाहतूक मंत्रालय
पियुष गोयल – वाणिज्य मंत्रालय
रक्षा खडसे – क्रीडा आणि युवक कल्याण राज्यमंत्री
मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री
रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री
प्रतापराव जाधव – आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री

महाराष्ट्रातून नितीन गडकरी आणि पियुष गोयल यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. दोघांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नितीन गडकरी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची हॅटट्रिक केली आहे. गडकरी यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आले आहेत. तर पियुष गोयल उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. महाराष्ट्रात सर्वात जास्त मताधिक्य पियुष गोयल यांना मिळाले होते. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा एकदा कॅबिनेट मंत्रिपद खेचून आणले आहे.

 

 

 

Loading

Facebook Comments Box

Konkan Railway: रेक अभावी मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या १२४ फेऱ्या रद्द

   Follow us on        
Konkan Railway News: उद्या सोमवारपासून कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रक लागू होणार आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्ग धोकादायक होत असल्याने पावसाळ्यात या मार्गावर गाड्या धीम्या गतीने चालविण्यात येतात. त्यामुळे सर्व गाड्यांसाठी  पावसाळयात वेगळे वेळापत्रक लागू केले जाते. त्याचप्रमाणे या मार्गावरून चालविण्यात येणाऱ्या काही गाड्यांच्या फेऱ्यात कपातही केली जाते.
रेक च्या मर्यादेमुळे कपात 
वेळापत्रक बदलल्या मुळे रेक अभावी काही गाड्यांच्या फेऱ्या कमी कराव्या लागतात. जसे की सकाळी सीएसएमटी वरून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा तोच रेक दुपारी मडगाव वरून सीएसएमटी साठी वापरला जातो. मात्र पावसाळी हंगामात गाड्यांचा वेग धीमा होत असल्याने तोच रेक समान दिवशी वापरता येत नाही. साहजिकच दुसऱ्या दिवशी मडगाव वरून सीएसएमटी साठी  तो रेक वापरला जातो. या कारणामुळे आठवड्यातून ६ दिवस धावणारी  ही गाडी पावसाळी हंगामात फक्त तीनच दिवस चालविण्यात येणार आहे. या कारणाने अजून काही  गाड्यांच्या फेऱ्यात कपात केली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे.
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express 
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
३) 22229 /22230  Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express
22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.
या सर्व गाड्यांचे वेळापत्रकही बदलून पावसाळी वेळापत्रकानुसार या गाड्या चावलेण्यात येणार आहेत.
टीप: सदर माहिती अंतिम स्वरूपाची नसून रेल्वे प्रशासनातर्फे काही बदल केला जाऊ शकतो. आपल्या प्रवासाची योजना आखताना कृपया रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळास भेट द्यावी किंवा रेल्वे चौकशीच्या इतर पर्यायाचा वापर करावा ही विनंती 

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search