२१ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 19:03:51 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 11:48:59 पर्यंत
  • करण-विष्टि – 06:49:12 पर्यंत, भाव – 19:03:51 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सिद्ध – 24:11:26 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:19
  • सूर्यास्त- 18:56
  • चन्द्र-राशि-धनु – 18:05:04 पर्यंत
  • चंद्रोदय- 25:22:59
  • चंद्रास्त- 11:35:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • भारतीय नागरी सेवा दिन
  • जागतिक क्रिएटिव्हिटी आणि इनोव्हेशन दिन World Creativity And Innovation Day
महत्त्वाच्या घटना :
  • 753 : ईसा पूर्व: रोमची स्थापना रोम्युलसने केली.
  • 1944 : फ्रान्समध्ये स्त्रियांना मताधिकार मिळाला.
  • 1960: ब्राझीलची राजधानी रिओ दि जानेरोचे उद्घाटन झाले.
  • 1972: अपोलो 16 अमेरिकन अंतराळवीर जॉन यंग आणि चार्ल्स ड्यूक चंद्रावर उतरले.
  • 1997: भारताचे 12वे पंतप्रधान म्हणून डॉ. इंद्रकुमार गुजराल यांनी पदभार स्वीकारला
  • 2000: सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की आश्रित विधवांना देखील पालकांच्या मालमत्तेचा हक्क आहे.
  • 2019 : श्रीलंकेतील चर्च, हॉटेल आणि इतर ठिकाणी आठ बॉम्बस्फोट; 250 हून अधिक लोक मारले गेले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1864 : ‘मॅक्स वेबर’ – जर्मन अर्थशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 14 जून 1920)
  • 1922 : ‘अ‍ॅलिएस्टर मॅकलिन’ – स्कॉटिश साहसकथा लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 2 फेब्रुवारी 1987)
  • 1926 : ‘एलिझाबेथ (दुसरी)’ – इंग्लंडची राणी यांचा जन्म.
  • 1934 : ‘डॉ. गुंथर सोन्थायमर’ – महाराष्ट्र लोकधर्म मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक यांचा जन्म.
  • 1945 : ‘श्रीनिवासराघवन वेंकटराघवन’ – भारतीय क्रिकेटपटू आणि अंपायर यांचा जन्म.
  • 1950 : ‘शिवाजी साटम’ – हिंदी आणि मराठी चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1509 : ‘हेन्‍री (सातवा)’ – इंग्लंडचा राजा यांचे निधन. (जन्म: 28 जानेवारी 1457)
  • 1910 : ‘मार्क ट्वेन’ – अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 30 नोव्हेंबर 1835)
  • 1938 : ‘सर मुहम्मद इक्बाल’ – पाकिस्तानी कवी आणि तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म: 9 नोव्हेंबर 1877)
  • 1946 : ‘जॉन मायनार्ड केन्स’ – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 5 जून 1883)
  • 1952 : ‘सर स्टॅफोर्ड क्रिप्स’ – इंग्लिश राजकारणी यांचे निधन. (जन्म: 24 एप्रिल 1889)
  • 2013 : ‘शकुंतलादेवी’ – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1929)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर ‘मान्सून वेळापत्रक’ नकोच!

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर गेल्या दोन दशकांपासून पावसाळ्यात म्हणजेच 10 जून ते 30 ऑक्टोबर दरम्यान मान्सून वेळापत्रक अंगिकारले जाते. मात्र या पावसाळी वेळापत्रकाची अंमलबजावणी सुरू ठेवण्यामागील तर्कावर कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड नेटवर्कमधील रेल्वे प्रवासी संघटनांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोकण रेल्वे मार्गावरील दुहेरी वेळापत्रकामुळे गाड्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण होतो आणि जनतेचे तसेच रेल्वेचे नुकसान होते असा दावा त्यांनी केला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर  २२ जून २००३ रोजी वैभववाडी येथे आणि १६ जून २००४ रोजी करंजडी येथे भूस्खलनामुळे झालेल्या दोन अपघातांनंतर, कोकण रेल्वे प्रशासनाने १० जून २००५ पासून मान्सून वेळापत्रक लागू करण्यास सुरुवात केली ज्यामध्ये गाड्या कमी वेगाने धावतात. दरवर्षी १० जून ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत मान्सून वेळापत्रक लागू केले जाते.
रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे CRS चे निर्देश
मुंबईस्थित वेस्टर्न इंडिया पॅसेंजर असोसिएशनचे सरचिटणीस थॉमस सायमन म्हणाले की, रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी (CRS) केआरसीएलला कायमस्वरूपी उपाययोजना लागू होईपर्यंत फक्त मुसळधार पावसात काही वेगाचे निर्बंध लादण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर महामंडळाने भूस्खलन रोखण्यासाठी व्यापक भू-तांत्रिक कामे करण्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च केले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना लिहिलेल्या मेलमध्ये, श्री. सायमन म्हणाले की, मुंबई येथील सेंट्रल सर्कलच्या CRS ने २०१८ मध्ये WIPA प्रतिनिधींना सांगितले होते की आयुक्तांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन KRCL किंवा इतर संस्थांना मान्सून वेळापत्रक कायम सुरू ठेवण्याचे निर्देश दिले नव्हते, तरीपण हे मान्सून वेळापत्रक कोकण रेल्वेमार्गावर अंगिकारले जात आहे. कोकण रेल्वे मार्गावर दुहेरी वेळापत्रक न अंगिकारता एकच वेळापत्रक कायम ठेवावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
श्री. सायमन यांच्या मते मान्सून वेळापत्रक केआर नेटवर्कवरील प्रत्येक ट्रेनसाठी दोन मार्ग आणि वेळेचे संच तयार करते ज्यामुळे गाड्यांची कृत्रिम कमतरता निर्माण होते, ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते आणि रेल्वेचे नुकसान होते. केआरसीएलवरील प्रत्येक ट्रेनला मान्सून आणि मान्सून नसलेल्या कालावधीसाठी दोन वेगवेगळे मार्ग दिले पाहिजेत ज्यामुळे एक स्लॉट कायमचा रिकामा राहील. कोकण रेल्वे २४ तासांच्या दिवसात सुमारे २४ गाड्या चालवते. प्रत्यक्षात जर मान्सून वेळापत्रक नसेल तर ते दर १० मिनिटांनी एक ट्रेन चालवू शकते.
मान्सून वेळापत्रक रद्द केल्यास, कोकण रेल्वे (केआर) नेटवर्कद्वारे अधिक गाड्या चालवता येतील; १२० किमी प्रतितास वेगाची परवानगी, मुंबई ते तिरुवनंतपुरम पर्यंत पूर्ण विद्युतीकरण आणि मुंबई एलटीटी ते वीर दरम्यान १७१ किमी दुहेरी ट्रॅकसह, तिप्पट जास्त गाड्या धावू शकतात, असा त्यांनी युक्तिवाद केला आहे. गेल्या काही वर्षांत केआर नेटवर्कवर कोणतेही मोठे भूस्खलन झालेले नाही याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर तिरुअनंतपुरम ते नवी दिल्ली या नेटवर्क दरम्यानच्या  गाड्या चालविण्यात येतात. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरी वेळापत्रकाचा परिणाम संपूर्ण भारतात  होतो असेही  ते म्हणालेत.
वेग निर्बंध
WIPA ने वारंवार असे सुचवले होते की गरज पडल्यास रत्नागिरी आणि आडवली दरम्यान गाड्या कायमस्वरूपी गतीने चालवता येतील. भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे जवळजवळ दरवर्षी भूस्खलन, पूर इत्यादी घटना घडतात मात्र तरीही तिथे पावसाळ्याचे वेगळे वेळापत्रक नाही आहे. कुंडापुरा रेल्वे प्रयत्न समितीचे गौतम शेट्टी म्हणाले की, उत्तर भारतात दरवर्षी दाट धुके पडत असले तरी तिथे हिवाळ्यातील वेळापत्रक नाही आहे.
पावसाळ्याचे वेळापत्रक अनावश्यकपणे संसाधने वाया जात आहेत. केवळ जेथे धोका जास्त आहे अशा  ठिकाणी मुसळधार पावसातच हे निर्बंध लादले जावेत असे मत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्राचे सचिव अक्षय सरोज मधुकर महापदी यांनी मांडले आहे.
Facebook Comments Box

Mansoon Updates: यंदाच्या मान्सूनबाबत महत्वाची बातमी…हवामान खात्याने वर्तविली ‘ही’ शक्यता

   Follow us on        

Mansoon Updates: यंदाचा उन्हाळा यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला आहे. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. वातावरणातील या बदलाचा परीणाम मान्सूनच्या आगमनावर करणारा ठरणार आहे. यंदा मान्सून नियोजित वेळेपेक्षा चार ते पाच दिवस आधीच केरळमध्ये येण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तविली आहे. गेल्या आठवडय़ात वातावरणात मोठे बदल झाले असून, मान्सूनच्या हालचाली अंदमानात दिसण्यास सुरुवात होत आहे.

यंदा फेब्रुवारीपासूनच कडक उन्हाळा राज्यात सुरू झाला. थंडी कमी अन् ऊन जास्त, असे वातावरण होते. त्यामुळे सुमारे शंभर वर्षातील सर्वांत उष्ण फेब्रुवारी ठरला. त्यापाठोपाठ मार्च आणि एप्रिलमध्येही तीच स्थिती आहे. मार्चमध्ये कमाल तापमानाचा पारा 40 अंशांवर गेला तसेच सरासरी पाऊस कमीच झाला. त्यामुळे मार्च महिना पूर्ण उष्ण ठरला.एप्रिलची सुरुवातही खूप कडक उष्ण झळांनी झाली. गत अनेक वर्षांतील यंदाचा एप्रिल उष्ण ठरत आहे. हे वातावरण मान्सूनच्या तयारीसाठी अत्यंत अनुकूल आणि पोषक असे आहे.

हवामानशास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा खूप कडक उन्हाळा आहे. त्यामुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त आहे. ढगांची निर्मिती वेगाने होते असून, सॅटेलाइट इमेज पाहिल्यावर असे लक्षात येते की, मान्सून आपल्या तयारीला लागला आहे. संपूर्ण देशाला ढगांनी वेढले आहे. बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार होत असून, ते आपल्या देशाकडे येत आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे.

शास्त्रज्ञांनी सांगितले की, मान्सूनच्या हालचाली या समुद्रातील पाण्याचे तापमान, वार्‍याची दिशा, हवेचे दाब यावर अवलंबून असतात. सध्या अरबी समुद्रातील तापमान 31, तर हिंदी महासागराचे तापमान 30 अंश सेल्सिअस इतके आहे. पाणी खूप तापल्याने वेगाने बाष्पीभवन होत आहे. हवेचे दाब सध्या समुद्रावर 1005 ते 1010 हेक्टा पास्कल इतके आहेत.

देशात हवेचे दाब 1005 ते 1008 दरम्यान आहेत. देशातील दाब कमी झाले की वारे समुद्राकडून देशाच्या दिशेने वाहू लागतात. अंदमानात मान्सून हा तयारीला यंदा लवकर लागला आहे. काही दिवसांतच त्याच्या हालचाली सॅटेलाइट इमेजवर दिसण्याची शक्यता आहे.

यंदा एप्रिलमध्ये पारा 43 ते 44 अंशांवर गेल्याने समुद्रातील पाणी वेगाने तापले. परिणामी, बाष्पीभवनाचा वेग प्रचंड वाढल्याने देशाभोवती सर्व बाजूंनी बाष्प मोठ्या प्रमाणावर तयार झाल्याचे सॅटेलाइट इमेजमध्ये दिसत आहे.

” यंदा मान्सून लवकर येण्याची शक्यता जास्त आहे. कारण, सर्व लक्षणे अनुकूल दिसत आहेत. कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढल्याने बाष्प वेगाने तयार होऊन मान्सूनपूर्व पावसाची तयारी सुरू झाली आहे. तसेच हवेचा दाब, वार्‍याची दिशा अन् समुद्राचे तापमान, ही मान्सूनसाठी पोषक असणारी लक्षणे यंदा अनुकूल दिसत आहेत. त्यामुळे मान्सून यंदा वेळेआधीच केरळमध्ये दाखल होऊ शकेल, अशी शक्यता आहे.” 

– डॉ. रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ, पुणे

Facebook Comments Box

ठाणे: फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग

   Follow us on        

डोंबिवली : कल्याण डोंबिवलीतील वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात संपुष्टात आणण्यासाठी कल्याण पश्चिमेतील सर्वात वर्दळीच्या सहजानंद चौकामध्ये केडीएमसी आणि वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांतर्फे फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा अनोखा प्रयोग राबविण्यात येत आहे.

सहजानंद चौकात असलेले 5 रस्त्यांचा विचार करता याठिकाणी सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील महिनाभर ही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित ठेवून त्यातून येणाऱ्या निष्कर्षानंतर अभ्यास करून केडीएमसीतर्फे याठिकाणी कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली.

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सहजानंद चौकात कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा उभारण्यात येणार आहे. मात्र इथल्या वाहतुकीचा, वर्दळीचा आणि वाहनांच्या संख्येचा अभ्यास न करता सिग्नल यंत्रणा बसवली गेल्यास केडीएमसीचा पैसा वाया जाऊ शकतो. कल्याणकरांच्या कराचा हा पैसा विचारात घेऊन कायमस्वरूपी सिग्नल यंत्रणा बसविण्यापूर्वी त्याचा अभ्यास करण्याच्या उद्देशाने ही सोलर बेस पोर्टेबल स्टँड अलोन सिग्नल यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. पुढील 1 महिनाभर त्याद्वारे इथल्या वाहतुकीचा अभ्यास करण्यात येणार त्यासोबतच कोणते रस्ते वन वे करणे, कोणता डिव्हायडर मागे घेणे, कोणता हायमास्ट शिफ्ट करणे आदींचा विचारही केला जाणार आहे. आणि मग त्यानंतर या चौकाच्या आणि इथल्या वाहतुकीच्या अनुषंगाने कायमस्वरुपी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार असल्याची माहिती केडीएमसीचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी दिली. अशाच प्रकारची सिग्नल यंत्रणा नागपूर शहरात सुरू असून त्याचे चांगले रिझल्ट मिळत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Facebook Comments Box

२० एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-सप्तमी – 19:03:51 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 11:48:59 पर्यंत
  • करण-विष्टि – 06:49:12 पर्यंत, भाव – 19:03:51 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-सिद्ध – 24:11:26 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:20
  • सूर्यास्त- 18:55
  • चन्द्र-राशि-धनु – 18:05:04 पर्यंत
  • चंद्रोदय- 25:22:59
  • चंद्रास्त- 11:35:59
  • ऋतु- ग्रीष्म

जागतिक दिन :
  • पिझ्झा डिलिव्हरी ड्रायव्हर प्रशंसा दिवस Pizza Delivery Driver Appreciation Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1770 : कॅप्टन जेम्स कुक, प्रसिद्ध महासागर संशोधक, यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.
  • 1939 : ॲडॉल्फ हिटलरचा 50 वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुट्टीसह साजरा करण्यात आला.
  • 1945 : दुसरे महायुद्ध – अमेरिकन सैन्याने लीपझिग शहर ताब्यात घेतले.
  • 1946 : संयुक्त राष्ट्र संघाची संघटना विसर्जित करण्यात आली आणि नंतर तिचे संयुक्त राष्ट्रात रूपांतर झाले.
  • 1972 : अपोलो प्रोग्राम: अपोलो 16 लुनार मॉड्यूल, जॉन यंगच्या आदेशाने आणि चार्ल्स ड्यूकने पायलट असलेले, चंद्रावर उतरले.
  • 1992 : जी.एम.आर.टी.ची पहिली ॲंटेना पुणे जिल्ह्यातल्या खोडदमध्ये उभारली गेली. ही आशियातली सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बिण आहे.
  • 2008 : इंडी कार शर्यत जिंकणारी डॅनिका पॅट्रिक पहिली महिला चालक ठरली.
  • 2020 – रशिया-सौदी अरेबिया तेल किंमत युद्धाचा परिणाम – इतिहासात प्रथमच, तेलाच्या किमती शून्याच्या खाली आल्या.
  • 2023 : SpaceX चे स्टारशिप रॉकेट, आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि सर्वात शक्तिशाली रॉकेट, प्रथमच प्रक्षेपित झाले. उड्डाणाच्या 4 मिनिटांत त्याचा स्फोट होतो
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 788 ई .पुर्व : आदि शंकराचार्य यांचा जन्म.
  • 1749 : ‘नानासाहेब पेशवे’ – मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्‍या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची यांनी पर्वतीवर स्थापना केली.
  • 1808 : अध्यक्ष नेपोलियन (तिसरे) – फ्रान्सचे पहिले यांचा जन्म. (मृत्यू: 9 जानेवारी 1873)
  • 1889 : ‘अ‍ॅडॉल्फ हिटलर’ – नाझी हुकूमशहा तसेच दुसऱ्या महायुद्धाचा प्रारंभ करणारे यांचा जन्म. (मृत्यू: 30 एप्रिल 1945)
  • 1896 : सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा. ह. भ. प. शंकर वामन उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दांडेकर यांचा माहीम, ठाणे येथे जन्म. (मृत्यू: 9 जुलै 1968)
  • 1914 : ज्ञानपीठ विजेते ओरिया साहित्यिक गोपीनाथ मोहंती यांचा जन्म. (मृत्यू: 20 ऑगस्ट 1991)
  • 1939 : ‘सईदुद्दीन डागर’ – ध्रुपद गायक यांचा जन्म.
  • 1950 : मुख्यमंत्री ‘चंद्राबाबू नायडू’ आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचा जन्म.
  • 1966 : ‘डेव्हिड फिलो’ – याहू चे सहसंस्थापक यांचा जन्म.
  • 1972 : ‘ममता कुलकर्णी’ – अभिनेत्री
  • 1980 : ‘अरीन पॉल’ – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1918 : ‘कार्ल ब्राऊन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 6 जून 1850)
  • 1938 : ‘चिंतामणराव वैद्य’ – न्यायाधीश व कायदेपंडित यांचे निधन. (जन्म: 18 ऑक्टोबर 1861)
  • 1960 : ‘पन्नालाल घोष’ – बासरीवादक संगीतकार यांचे निधन. (जन्म: 24 जुलै 1911)
  • 1970 : गीतकार आणि शायर शकील बदायूँनी याचे निधन. (जन्म: 3 ऑगस्ट 1916)
  • 1999 : ‘कमलाबाई कृष्णाजी ओगले’ – रुचिरा पुस्तकाच्या लेखिका याचे निधन. (जन्म: 16 सप्टेंबर 1913)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

१९ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 18:24:57 पर्यंत
  • नक्षत्र-मूळ – 10:21:31 पर्यंत
  • करण-वणिज – 18:24:57 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शिव – 24:50:59 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:21
  • सूर्यास्त- 18:55
  • चन्द्र-राशि-धनु
  • चंद्रोदय- 24:33:59
  • चंद्रास्त- 10:37:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • World Liver Day जागतिक यकृत दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1526 : मुघल साम्राज्याचा संस्थापक बाबर याने मुघल साम्राज्याचा पाया घातला.
  • 1945 : सोविएत रशिया आणि ग्वाटेमालामधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • 1948 : ब्रह्मदेशाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.
  • 1956 : गीतरामायणातील शेवटचे गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले.
  • 1971 : सिएरा लिओन प्रजासत्ताक बनले.
  • 1975 : भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट रशियन अंतराळ स्थानकावरून प्रक्षेपित करण्यात आला.
  • 2021 : इनजीनुटी हेलिकॉप्टर दुसऱ्या ग्रहावर उड्डाण करणारे पहिले विमान ठरले
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1868 : ‘पॉल हॅरिस’ – रोटरी क्लबचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 1947)
  • 1892 : ‘ताराबाई मोडक’ – शिक्षणतज्ज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑगस्ट 1973)
  • 1912 : ‘ग्लेन सीबोर्ग’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 25 फेब्रुवारी 1999)
  • 1933 : ‘डिकी बर्ड’ – ख्यातनाम क्रिकेट पंच यांचा जन्म.
  • 1957 : ‘मुकेश अंबानी’ – भारतीय उद्योगपती यांचा जन्म.
  • 1977 : ‘अंजू बॉबी जॉर्ज’ – भारतीय लाँग जम्पर यांचा जन्म.
  • 1987 : ‘मारिया शारापोव्हा’ – रशियन लॉनटेनिस खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1881 : ‘बेंजामिन डिझरेली’ – इंग्लंडचे पंतप्रधान यांचे निधन. (जन्म: 21 डिसेंबर 1804)
  • 1882 : ‘चार्ल्स डार्विन’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 12 फेब्रुवारी 1809)
  • 1906 : ‘पिअर क्यूरी’ – नोबेल पारितोषिक विजेते फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 मे 1859)
  • 1910 : ‘अनंत कान्हेरे’ – क्रांतिकारक यांचे निधन.
  • 1955 : ‘जिम कॉर्बेट’ – ब्रिटिश-भारतीय वन्यजीव तज्ज्ञ आणि लेखक यांचे निधन. (जन्म: 25 जुलै 1875)
  • 1974 : ‘आयुब खान’ – फील्ड मार्शल आणि पाकिस्तानचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 14 मे 1907)
  • 1993 : ‘डॉ. उत्तमराव पाटील’ – स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन.
  • 1994 : मेजर जनरल राजिंदरसिंग उर्फ स्पॅरो – पंजाबचे माजी मंत्री यांचे निधन.
  • 1998 : ‘सौ. विमलाबाई गरवारे’ – उद्योजीका यांचे निधन. (जन्म: 18 डिसेंबर 1928)
  • 2003 : ‘मिर्जा ताहिर अहमद’ – भारतीय-इंग्रजी खलीफा यांचे निधन. (जन्म: 12 ऑगस्ट 1925)
  • 2004 : ‘नॉरिस मॅक्विहिर’ – गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड चे सहसंस्थापक यांचे निधन.
  • 2008 : ‘सरोजिनी बाबर’ – लेखिका, संतसाहित्याच्या अभ्यासिका व राजकारणी यांचे निधन. (जन्म: 7 जानेवारी 1920)
  • 2009 : ‘अहिल्या रांगणेकर’ – मार्क्सवादी कम्युनिस्ट नेत्या यांचे निधन. (जन्म: 8 जुलै 1922)
  • 2010 : ‘मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष’ – लेखक आणि टीकाकार यांचे निधन. (जन्म: 7 जून 1913)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

खेड: विक्रीसाठी आणलेले ताडगोळे चक्क गटाराच्या पाण्याने धुण्याचा विक्रेत्याचा किळसवाणा प्रकार

   Follow us on        

खेड: खेड बसस्थानक ते तीनबत्ती नाका दरम्यान तहसीलदार कार्यालयासमोर एका विक्रेत्याने हातगाडीवरील विक्रीसाठी आणलेले ताडगोळे गटाराच्या सांडपाण्यात धुतल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. १६) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.

ताडगोळे गटारात धूत असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. याबाबत पोलीस शिपाई तुषार रमेश झेंड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी आलाउद्दीन कुवुस शेख (वय ६४, रा. बालुग्राम पश्चिमी, ता. उधवा दियारा, जि. साहेबगंज, झारखंड) याने विक्रीसाठी आणलेले ताडगोळे रस्त्यालगत असलेल्या गटाराच्या सांडपाण्यात धुतले. या कृत्यामुळे सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता असून, रोगांचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला

Facebook Comments Box

१८ एप्रिल पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 17:10:23 पर्यंत
  • नक्षत्र-ज्येष्ठा – 08:21:32 पर्यंत
  • करण-तैतुल – 17:10:23 पर्यंत, गर – 29:51:45 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-परिघ – 25:01:53 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 06:21
  • सूर्यास्त- 18:55
  • चन्द्र-राशि-वृश्चिक – 08:21:32 पर्यंत
  • चंद्रोदय- 23:41:59
  • चंद्रास्त- 09:43:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिवस :
  • राष्ट्रीय व्यायाम दिवस National Exercise Day
  • जागतिक सांस्कृतिक वारसा दिवस World Heritage Day
महत्त्वाच्या घटना :
  • 1336 : हरिहर आणि बुक्का यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली.
  • 1703 : औरंगजेबाने सिंहगड काबीज केला.
  • 1720 : शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली.
  • 1831 : अलाबामा विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1853 : मुंबई ते ठाणे नियमित रेल्वे सेवा सुरू झाली.
  • 1898 : जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी.
  • 1912 : टायटॅनिकमधील 705 वाचलेल्यांना घेऊन कार्पाथिया जहाज न्यूयॉर्कला पोहोचले.
  • 1923 : शिवजयंतीला पुण्यातील शिवाजी मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यातील पहिला संगमरवरी अर्धाकृती पुतळा बसवण्यात आला.
  • 1924 : सायमन आणि शुस्टर यांनी पहिले क्रॉसवर्ड पझल पुस्तक प्रकाशित केले.
  • 1930 : क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटला.
  • 1930 : आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.
  • 1936 : पेशव्यांची राजधानी पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाच्या ताब्यात देण्यात आला.
  • 1950 : आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली गावात भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.
  • 1954: गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.
  • 1971 : एअर इंडियाचे पहिले बोईंग 747 जंबो जेट विमान सम्राट अशोक हे सांताक्रूझ विमानतळावर दाखल झाले.
  • 2001 : ग्राउंड सॅटेलाइट प्रक्षेपण वाहन GSLV-D1 चे श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1774 : सवाई माधवराव पेशवा – यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म. (मृत्यू: 27 ऑक्टोबर 1795)
  • 1858 : ‘महर्षी धोंडो केशव कर्वे’ – स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 9 नोव्हेंबर 1962 – मुरुड)
  • 1916 : ‘ललिता पवार’ – हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 24 फेब्रुवारी 1998)
  • 1958 : ‘माल्कम मार्शल’ – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 1999)
  • 1962 : ‘पूनम धिल्लन’ – हिंदी चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1991 : ‘डॉ. वृषाली करी’ – यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1859 : स्वातंत्रवीर सेनापती रामचंद्र पांडुरंग तथा तात्या टोपे यांचे निधन.
  • 1898 :  महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी ‘दामोदर हरी चापेकर’यांना फाशीची शिक्षा. (जन्म: 24 जून 1869)
  • 1945 : ‘जॉन एम्ब्रोस फ्लेमिंग’ – व्हॅक्यूम ट्यूब चे शोधक यांचे निधन. (जन्म: 29 नोव्हेंबर 1849)
  • 1955 : ‘अल्बर्ट आइनस्टाइन’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1966 : ‘जगन्नाथ गणेश गुणे’ तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1883)
  • 1972 : ‘डॉ. पांडुरंग वामन काणे’ – विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक, महामहोपाध्याय, भारतरत्‍न यांचे निधन. (जन्म: 7 मे 1880)
  • 1995 : धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते – पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक पंडित यांचे निधन.
  • 1999 : ‘रघुवीर सिंह’ – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार यांचे निधन. (जन्म: 22 ऑक्टोबर 1942)
  • 2002 : ‘शरद दिघे’ – महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष यांचे निधन.
  • 2002 : नॉर्वेजियन दर्यावर्दी संशोधक थोर हेअरडल यांचे निधन. (जन्म: 6 ऑक्टोबर 1914)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Facebook Comments Box

चित्रपट अभिनेते आणि निर्माते महेश मांजरेकर यांना जिवन गौरव पुरस्कार जाहीर

 

   Follow us on        

मुंबई, ता. १७ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या मानाच्या चित्रपट पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केली. यामध्ये चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार, चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार, स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार तसेच गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अशा पाच महत्त्वाच्या पुरस्कारांची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.

मराठी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. तसेच या क्षेत्रात विशेष उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरास चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षीचा चित्रपती व्ही.शांताराम जीवन गौरव पुरस्कार नामवंत अभिनेता, दिग्दर्शक व निर्माते महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. या पुरस्कारांर्गत रु.१० लाख रोख रक्कम, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक दिले जाईल. चित्रपती व्ही.शांताराम विशेष योगदान पुरस्कार यंदा प्रसिद्ध अभिनेत्री मुक्ता बर्वे यांना प्रदान करण्यात येणार असून, या पुरस्काराचे स्वरूप रु. ६ लाख, स्मृतीचिन्ह, मानपत्र व चांदीचे पदक असे आहे.

हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षाकरिता ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केले आहे तसेच चित्रपटसृष्टीत अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे, अशा मान्यवरास स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. हिंदी चित्रपट सृष्टीतील मानाचा स्व.राज कपूर जीवन गौरव पुरस्कार प्रख्यात अभिनेते अनुपम खेर यांना देण्यात येणार आहे. तर स्व.राज कपूर विशेष योगदान पुरस्कार यंदा अष्टपैलू अभिनेत्री काजोल देवगण यांना घोषित झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे अनुक्रमे रु. १० लाख व रु. ६ लाख, स्मृतिचिन्ह व मानपत्र, चांदीचे पदक असे स्वरूप आहे.

तसेच, संगीत क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या जेष्ठ कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार देण्यात येतो. १९९३ पासून देण्यात येणारा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार यावर्षी मराठीतील ज्येष्ठ गझलगायक भीमराव पांचाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. रु. १० लाख रोख रक्कम, मानचिन्ह, मानपत्र व शाल असे या पुरस्कराचे स्वरुप आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार्थीची निवड करण्याकरिता शासन स्तरावर समितीचे गठन करण्यात आले होते. या समितीचे अध्यक्ष सांस्कृतिक कार्य मंत्री असून यामध्ये पाच अशासकीय सदस्य आहेत. पं ब्रिजनारायण, अशोक पत्की. सत्यशील देशपांडे, पं उल्हास कशाळकर आणि अंबरीश मिश्र यांचा या समितीमध्ये समावेश होता. सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव या समितीचे सदस्य असून सांस्कृतिक कार्य संचालक या समितीचे सदस्य सचिव आहेत.

सर्व पुरस्कारांचे वितरण २५ एप्रिल, २०२५ रोजी एन.एस.सी.आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.

या सोहळ्याशिवाय, संविधान अमृत महोत्सव आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागातर्फे २० एप्रिल, २०२५ रोजी सायंकाळी ६:३० वाजता गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे एक खास सांगितिक मानवंदना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, आदर्श शिंदे, वैशाली सामंत, उर्मिला धनगर, नंदेश उमप आदी कलाकार सहभागी होणार असून, संचालन सुबोध भावे करणार आहेत. कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गीतं, नाट्यप्रवेश व नृत्य सादर केले जातील. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, सन्मानिका प्रवेशपत्रे शिवाजी नाट्य मंदिर व रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर वितरित केली जातील, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.शेलार यांनी या पत्रकार परिषदेत दिली.

Facebook Comments Box

Volvo Bus On Fire: पुणे-सातारा महामार्गावर वॉल्वो बस पेटली

   Follow us on        

Volvo Bus On Fire: पुण्यात बसला आग लागल्याची भीषण घटना घडली आहे. पुणे-सातारा हायवेवर वॉल्वो बसला भररस्त्यात आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. खेडशिवापूर जवळ ही घटना घडली आहे. मुंबई-बेंगळुरू महामार्गावर या खाजगी बसला आग लागली असून, आगीचे कारण हे शॉर्ट सर्किट असण्याची शक्यता आहे.

पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूरजवळ एका एसी व्हॉल्वो बसला आग लागली. बसला आग लागल्यामुळे प्रवाशांनी प्राण वाचवण्यासाठी बसमधून उड्या मारल्या. चालकाच्या चातुर्यामुळे बसमधील सर्व प्रवाशांना वाचवण्यात यश आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, आगीची ही घटना दुपारी 12 वाजता घडली. बस वेगाने जात असताना खेड शिवापूरजवळ येताच इंजिन क्षेत्रातून धूर निघू लागला. काही क्षणातच गाडीला आग लागली. प्रवाशांना वेळेत बसमधून बाहेर पडण्यात यश आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

एसी व्हॉल्वो बसमध्ये साधारणतः 20 ते 25 प्रवासी प्रवास करत होते. आगीच्या दुर्घटनेमध्ये प्रवाशांचे प्राण वाचले असले तरी काही जण किरकोळ जखमी आहेत. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तातडीने दाखल झाले. मात्र आगीची तीव्रता जास्त असल्यामुळे दल येण्यापूर्वीच बस जळून खाक झाली होती. गाडीचा भडका आणि धुराचे लोट सर्वत्र पसरले होते. तसेच यामुळे बघ्याची देखील मोठी गर्दी जमली होती.

गाडीतून धूर येऊ लागताच, चालकाने सावध राहून बस थांबवली आणि प्रवाशांना ताबडतोब खाली उतरवले. राजगड पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, “संपूर्ण बसने आग लावली, परंतु कोणीही जखमी झाले नाही. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि आग विझवली.” प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे मानले जात आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

 

 

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search