Maharashtra Budget 2024: अजित पवारांच्या अर्थसंकल्पातील ‘या’ आहेत महत्त्वाच्या घोषणा

Maharashtra Budget 2024:आज उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपयांची महसूली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी महसूली खर्च दाखवण्यात आला आहे. तसेच राज्याची महसुली तूट ९ हजार ७३४ रुपयांची तर राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजूरीसाठी ठेवण्यात आले आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास ९ हजार १९३ कोटी, रोजगार हमी योजनेसाठी २ हजार २०५ कोटी, मराठी विभागासाठी ७१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १८ हजार १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची वार्षिक योजना १ लाख ९२ हजार कोटी रुपयांची आहे. यासोबतच अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १५ हजार ८९३ कोटी रुपये, अदिवासी विकास उपयोजनेसाठी १५ हजार ३६९ कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे.
या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेने दिलेल्या दिशादर्शक अहवालानुसार आवश्यक धोरणांची अंमलबजावणीही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. पायाभूत सुविधांकरिता मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विकास योजनांच्या अंमलबजावणीचे ध्येय साध्य करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीने करण्यात आला आहे.
अर्थसंकल्पातील ठळक बाबी
 मौजे वडज, तालुका जुन्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित शिवनेरी संग्रहालय
 युवक, महिला, गरीब आणि अन्नदाता या चार प्रमुख घटकांसाठी कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी
 स्वातंत्र्यवीर सावरकर वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत, विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा विस्तार ठाणे शहरापर्यंत
 विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गाकरीता भूसंपादनासाठी २२ हजार २२५ कोटी
 पुणे चक्राकार वळण मार्गाकरीता भूसंपादनासाठी १० हजार ५१९ कोटी
 जालना-नांदेड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादनासाठी २ हजार ८८६ कोटी रुपये
 सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता नगरविकास विभागाला १० हजार ६२९ कोटी रुपये
 सार्वजनिक बांधकाम (रस्ते) विभागाला १९ हजार ९३६ कोटी रुपये नियतव्यय
 महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-२ अंतर्गत ७ हजार ५०० किलोमीटर रस्त्यांची कामे
 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या टप्पा २ मधील ७ हजार ६०० कोटी रुपये खर्चून ७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची दर्जोन्नती
 कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु
 फलटण-पंढरपूर, कांपा-चिमूर-वरोरा, जालना-जळगाव आणि नांदेड-बिदर या नवीन रेल्वे मार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग
 जालना-खामगाव, आदिलाबाद-माहूर-वाशिम, नांदेड-हिंगोली, मूर्तिजापूर-यवतमाळ शकुंतला रेल्वे आणि पुणे-लोणावळा मार्गिका ३ व ४ या रेल्वे मार्गांकरिता ५० टक्के आर्थिक सहभाग
 वाढवण बंदर विकास प्रकल्पात महाराष्ट्र सागरी मंडळाचा २६ टक्के सहभाग- एकूण किंमत ७६ हजार २२० कोटी रुपये
 सागरमाला योजनेअंतर्गत मुंबईत गेट वे ऑफ इंडियालगत रेडिओ क्लब सुसज्ज जेट्टीचे, २२९ कोटी २७ लाख रुपये किंमतीचे बांधकाम
 भगवती बंदर, रत्नागिरी-३०० कोटी रुपये, सागरी दुर्ग जंजिरा, रायगड-१११ कोटी रुपये, एलिफंटा, मुंबई-८८ कोटी रुपये बंदर विकासाची कामे
 मिरकरवाडा, रत्नागिरी बंदराचे आधुनिकीकरण-२ हजार ७०० मच्छीमारांना फायदा
 छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी ५७८ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी
 सन २०२४ – २५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता ग्रामविकास विभागाला ९ हजार २८० कोटी रुपये
 गृह-परिवहन, बंदरे विभागाला ४ हजार ९४ कोटी रुपये
 उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी सुधारित औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश व संरक्षण उत्पादनाचे सुधारित धोरण तसेच नवीन सुक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम धोरण
 १८ लघु-वस्त्रोद्योग संकुले स्थापन करुन सुमारे ३६ हजार रोजगार निर्मिती
 “एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३-२८” जाहीर-अंत्योदय शिधापत्रिकेवर एका कुटुंबास एका साडीचे मोफत वाटप
 निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी पायाभूत सुविधा विकास कार्यक्रमात ४५० कोटी
 निर्यातक्षम घटकांना विशेष प्रोत्साहन देण्यासाठी ४०० कोटी रुपये
 निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रीयल पार्क
 सामूहिक प्रोत्साहन योजनेतून आगामी वर्षात सुमारे सात हजार कोटी रकमेचा प्रोत्साहन निधी
 मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून २५ हजार उद्योग घटक -३० टक्के महिला उद्योजक -सुमारे ५० हजार नवीन रोजगार
 थ्रस्ट सेक्टर तथा उच्च तंत्रज्ञानावर आधारित १० हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणूक व चार हजार रोजगार निर्मिती करणाऱ्या १० अतिविशाल उद्योग घटकांना प्रणेता उद्योगाचा दर्जा- १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व २० हजार रोजगार निर्मिती
 सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता उद्योग विभागाला १ हजार २१ कोटी रुपये
 सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाला १ हजार ९५२ कोटी रुपये
 अमृत २.० अभियानांतर्गत १४५ शहरांमधील २८ हजार ३१५ कोटीचे ३१२ प्रकल्प मंजूर
 महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान सन २०३० पर्यंत राबविण्यात येणार
 महाअभियानात सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांचा समावेश असून त्यांच्या वर्गीकरणानुसार शासनाकडून प्रकल्प किंमतीच्या ५० ते ९५ टक्के निधी उपलब्ध करुन देण्यास मान्यता
 सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाला ३ हजार ८७५ कोटी रुपये नियतव्यय
 दरवर्षी सुमारे २५ हजार किलोमीटर राज्यमार्ग व प्रमुख जिल्हा मार्गांच्या दोन्ही बाजूंना वृक्षलागवड
 अटल बांबू समृध्दी योजना- १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबूची लागवड
 जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत ५ हजार ७०० गावांमधील १ लाख ५९ हजार ८८६ कामांना मंजूरी
 सन २०२४-२५ या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरिता पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाला २४५ कोटी रुपये
 वन विभागास २ हजार ५०७ कोटी रुपये
 मृद व जलसंधारण विभागास ४ हजार २४७ कोटी रुपये
 शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० योजनेअंतर्गत ७ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट
 शेतकऱ्यांसाठी “मागेल त्याला सौर कृषि पंप” ही नवीन योजना- ८ लाख ५० हजार नवीन सौरकृषी पंप
Facebook Comments Box

मंडणगड | होळीसाठी परळ ते डौली एस् .टी. बससेवा सुरू

मुंबई, दि. २६ फेब्रु.: कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून शिमगा सण साजरा केला जातो. चाकरमानी हा चाकरीसाठी महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत जाऊन आपला उदरनिर्वाह करीत असतो. पण शिमगोत्सवानिमित्त चाकरमानी हा आपोआपच गावातील ओढीमुळे गावाकडे जाण्यास तयार होतो पण जाण्यासाठी गाडीचे काय? हे ओळखून पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांनी परेल एस.टी. आगारात जाऊन परळ डौली सुरु करण्याचे पञ परळ येथील वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांची प्रत्यक्षात कार्यालयात भेट घेऊन दिले.

यावेळी वरिष्ठ आगारप्रमुख नितीन चव्हाण म्हणाले गाडी सुरू होईल परंतु प्रवासी कमी मिळतात, पुरेसा भारमान नाही त्याचे काय? त्यावर सुभाष गुजर म्हणाले गाडी सुरू करा पुढच आम्ही बघु प्रवाशांची संख्या आम्ही वाढवण्यास समर्थ आहोत आणि ही गाडी आमच्यासाठी फायदेशिर आहे. सकाळी सहा वाजता गावी जाण्यासाठी गाडीत बसलो तर मुबंईला येण्यासाठी तर सोमवारी कामावर जाण्यासाठीही फायद्याची आहे. हे ऐकुन वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांनी २२ मार्च पासुन सिमगा सुरू होण्यापुर्वी एस.टी. पुर्व नियोजित आरक्षणासहीत एस.टी. सुरू होणार आहे. याची खात्रीच दिली आहे. त्यामुळेच पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Facebook Comments Box

पहा कोकणात निर्माण केलेली, ओले काजू बी सोलायची जगातील पहिली मशीन…विडिओ पाहण्यासाठी ईथे क्लिक करा

सिंधुदुर्ग : बाजारात ओल्या काजूगरांची मागणी खूप आहे आणि चांगला दर सुद्धा आहे. सुरुवातीला तर चक्क 500 रुपये शेकडा एवढा दर ह्या ओल्या काजू गरांना मिळतो. मुंबई पुण्यात तर ओल्या काजूगरांची प्रचंड मागणी असते. पण काजूमधुन गर बाहेर काढण्याची प्रक्रिया खूप कंटाळवाणी आणि वेळखाऊ आहे. डिंक लागून शरीराला इजा पण होते. त्यामुळे चांगला दर मिळत असूनही कोकणातील काजू उत्पादक ओले काजूगर विकण्यास निरुत्साही दिसतो.

यावर उपाय म्हणुन युवा उद्योजक मिथिलेश देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लांजा येथे ओले काजू बी सोलायच्या मशिनची  निर्मिती केली आहे. त्यांचा विश्वास आहे की हे उपकरण काजू उत्पादकांच्या उत्पादन हमखास वाढ घडवून आणेल. हे मशीन ग्राहकांसाठी कोकणातील उद्योजकांसाठी सदैव आघाडीवर असलेल्या अभिनव उद्योग प्रबोधिनी ने कुडाळ येथे उपलब्ध  करून दिली आहे.

बुकिंग साठी किंवा अधिक माहितीसाठी 8767473919 या क्रमांकावर Cashew Machine असा व्हॉट्स ॲप मेसेज पाठवावा असे आवाहन अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे करण्यात आले आहे.

 

Facebook Comments Box

Konkan Railway | “….तर लवकरच मुंबई ते कोकण दुसरी वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसेल .”

मुंबई: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सध्याच्या मुंबई – मडगाव एक्सप्रेसला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ही एक्सपेस अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. दुसऱ्या बाजूला मडगाव ते मंगुळुरु या मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सपेस हल्लीच सुरु झाली असून कोकण रेल्वेच्या पूर्ण पट्ट्यात वंदे भारत एक्सप्रेस ची सेवा सुरु झाली आहे. मात्र दक्षिणेकडील एका खासदाराने रेल्वे मंगुळुरु ते मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात यावी अशी पत्राद्वारे मागणी केली आहे. ही मागणी पूर्ण झाल्यास लवकरच मुंबई ते कोकण रेल्वे मार्गावर दोन एक्सप्रेस धावताना दिसतील.
दक्षिण कन्नडचे खासदार नलीन कुमार कटील यांनी ही मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना केली आहे. कोकण रेल्वे सुरु झाल्यापासून मंगुळुरु ते मुंबई हे अंतर दिवसात (१२ तासात) गाठेल अशी एक्सप्रेस मिळावी असे आमचे स्वप्न होते. आता ते स्वप्न पूर्ण करेल अशी अतिजलद गाडी वंदे भारत आता मुंबई ते मडगाव तसेच दुसरी गाडी मडगाव ते मंगळुरु या मार्गावर चालविण्यात येत आहे. मात्र मुंबई ते मंगुळुरु अशा अखंड  गाडीची सर्वात जास्त गरज आहे. अशी गाडी चालू झाल्यास दक्षिणेकडील प्रवाशांना दिवसात मुंबई गाठणे सोपे होईल असे खासदार नलीन कुमार कटील यांनी या पत्रात म्हंटले आहे.
याशिवाय त्यांनी रेल्वेस याबाबत २ पर्याय असल्याचे निदर्शनास आणूनही दिले आहे. त्यातील पहिला पर्याय म्हणजे सध्या मुंबई ते मडगाव दरम्यान चालविण्यात येणारी वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक २२२२९/३० जी आठ डब्यांची चालविण्यात येत आहे ती १६ डब्यांची करून तिचा विस्तार मंगुळुरु पर्यंत करण्यात यावा. जर या गाडीचा मंगुळुरुपर्यंत विस्तार करण्यात काही अडचणी असतील दुसरा पर्याय म्हणजे सध्या मंगुळुरु ते मडगाव  दरम्यान चालविण्यात येणारी वंदे भारत एक्सप्रेस क्रमांक २०६४५/४६ या गाडीचा मुंबई पर्यंत विस्तार करण्यात यावा. डब्यांची संख्या तीच ठेवून आठवड्यातून ३ दिवस ही गाडी चालविण्यात यावी असे त्यांनी या आपल्या मागणीत म्हंटले आहे.
खासदार साहेबाची ही मागणी पूर्ण झाली तर लवकरच मुंबई ते कोकण २ वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतील हे मात्र नक्की
Facebook Comments Box

Sindhudurg: आंबोली चौकुळ भागात ब्लॅक पॅन्थरचा वावर; फोटो कॅमेरात कैद

आंबोली दि.२५ फेब्रु; पश्चिम घाटात अजूनही  जैविविधता टिकून आहे. तळकोकणात आंबोली – चौकुळ ही गावे  जैवविविधतेतेसाठी प्रसिद्ध आहेत. या भागातील जंगलात अजूनही वन्यप्राण्यांच्या जाती अस्तित्वात आहेत आणि हे प्राणी कित्येकवेळा येथील ग्रामस्थांच्या आणि  पर्यटकांच्या नजरेस पडताना दिसतात. असेच काही पर्यटक येथे पर्यटनास आले असता  त्यांना येथे काळा बिबट्याचे Black Panther दर्शन झाले. यातील काही पर्यटकांनी धाडस करून या बिबट्याचे फोटोही काढलेत. फोटोस दुरून काढल्याने ते काहीसे अस्पष्ट आले आले तरी या भागात या काळ्या बिबट्याचा वावर असल्याचे अधोरेखित झाले आहे.
येथील जैवविविधतेला धोका
येथील ग्रामस्थांनी जरी येथील जैवविविधतेचे आणि निसर्गाचे रक्षण केले असले तरी बाहेरील लोकांकडून त्याला धोका निर्माण झाला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. येथे येणारे काही पर्यटक शिकारीच्या हेतूने येत आहेत. गेल्याच आठवड्यात सावंतवाडी शहर आणि बांद्यातून काही युवकांनी येथे येऊन साळींदर ची शिकार केली होती. ग्रामस्थांनी जागरुकपणा दाखवून त्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. दुसरी गोष्ट म्हणजे येथे मोठ्या प्रमाणात जमिनी गैरमार्गाने विकत घेऊन तेथे बांधकामे केली जात आहेत. त्याचा परिमाण येथील निसर्गाला, जैवविविधतेला आणि ग्रामस्थांना भोगावा लागत आहे. याविरोधात येथील ग्रामस्थांनी आवाज उठवला असून आंदोलनाचा मार्ग अंगिकारला आहे.
Facebook Comments Box

माकडांचा उपद्रव टाळण्यासाठी बाजारात आला देशी जुगाड; किंमत २०० ते ३०० रुपये फक्त

रत्नागिरी |कोकणातील शेतकरी आणि बागायतदार माकडांच्या उपद्रवामुळे पुरता हैराण झाला आहे. माकडे इथल्या बागायतीत, शेतात नुसता हैदोस घालत आहेत. नारळांची झाडे असून नसण्यासारखी आहेत. कारण त्याला लागणारे नारळांची फळे परिपक्व होण्याअगोदरच त्याची नासाडी करतात. एवढेच नाही तर संधी मिळेल तशी माकडे घरात घुसून खायच्या वस्तू पळवू लागली आहेत. 
माकडामंध्ये दहशत निर्माण जाण्यासाठी कोकणच्या काही बाजारपेठेत कार्बाइड गन विकली जात आहे. या बंदुकीने फक्त मोठा आवाज होतो त्यामुळे माकडामंध्ये दहशत निर्माण होते आणि ती पळून जातात आणि पुन्हा यायला घाबरतात. ही बंदूक पीविसी पाइपांपासून तयार केलेली ही बंदूक २०० ते २५० रुपयांमध्ये विकली जात आहे. या बंदुकीमध्ये कार्बाइड चे एक दोन तुकडे आणि काही  थेंब पाणी घालून हलवली जाते. त्यानंतर मागे दिलेले स्पार्क बटण दाबले कि मोठा आवाज येतो. हे कार्बाइड चे तुकडे पुन्हा पुन्हा वापरले जातात त्यामुळे खर्च कमी येतो. 
 
माकडांपासून होणारे नुकसान वाचवण्यासाठी अशा प्रकारचा प्रयोग भारतात या पूर्वी केला गेला आहे. तसेच दिवाळी सणाला फटाक्यांना पर्याय म्हणून याचा वापर केला जातो. 
महत्वाची सूचना 
कार्बाइड मुळे निर्माण झालेला धूर डोळ्यांना हानिकारक असतो. त्यामुळे दिवाळीसाठी फटाक्यांचा पर्याय म्हणून या बंदुकीला बंदी घालावी अशी मागणी मध्येप्रदेशच्या इंदोर या शहरात जोर धरली होती.  तुम्ही ही बंदूक जर घेतली असेल किंवा घेणार असाल तर कार्बाइड चा धूर डोळ्यात जाणार नाही याबाबत काळजी घेतली पाहिजे.लहान मुलांना ही बंदूक अजिबात वापरण्यास दिली जाऊ नये.  
Facebook Comments Box

खळबळजनक! सिंधुदुर्ग जिल्ह्यातून १० बांग्लादेशी नागरिकांना अटक; जिल्हावासीयांना सतर्क राहण्याचे पोलिसांचे आवाहन

सिंधुदुर्ग, दि. २५ फेब्रु. | सिंधुदुर्ग जिह्यातून एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.  जिल्ह्यात दोन ठिकाणी वास्तव्य करुन राहणाऱ्या 10 बांगलादेशी नागरीकांना ताब्यात घेत सिंधुदुर्ग पोलीसांनी मोठी कारवाई केली असल्याची ही माहिती आहे. सिमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात प्रवेश करुन हे बांगलादेशी नागरिक येथे तळ ठोकून होते.
अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या परकिय तसेच बांगलादेशी नागरीकांचा शोध घेऊन त्यांच्या विरुध्द कायदेशीर कारवाई करण्याकरीता केंद्र शासन, राज्य शासन तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाकडून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी, दहशतवाद विरोधी शाखा व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांना अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या परकिय, तसेच बांगलादेशी नागरीकांबाबत गोपनियरित्या माहिती घेवून, शोध घेणेसाठी विशेष मोहिम राबवून परकीय नागरीक मिळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिलेल्या होत्या.
यानुसार (दि.23) प्रभारी अधिकारी, बांदा व सावंतवाडी पोलीस ठाणे यांना त्यांच्या हद्दीमध्ये अवैधरित्या बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली. या माहितीच्या अनुषंगाने अधिक शोध-चौकशी करता बांदा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात बळवंतनगर, बांदा येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार प्रभारी अधिकारी, बांदा पोलीस ठाणे यांनी त्यांच्या स्टाफसह जावून तेथे वास्तव्यास असलेल्या 6 नागरीकांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता ते सर्व नागरीक बांगलादेशी असल्याचे, तसेच त्यांनी भारतात येण्यासाठी व वास्तव्यासाठीचे पारपत्र काढलेले नसून अनधिकृतपणे भारतात प्रवेश करुन बळवंतनगर, बांदा येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले. सदर 6 बांगलादेशी नागरीक अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्या विरुध्द बांदा पोलीस ठाण्यात विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 (अ), 14(ब) व 14(क), पारपत्र (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3(अ) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. तसेच प्रभारी अधिकारी, सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात आरोंदा, देऊळवाडी येथे सातेरी भद्रकाली मंदिराच्या पाठीमागे एका पत्र्याच्या शेडमध्ये बांगलादेशी नागरीक वास्तव्यास असल्याबाबत माहिती मिळाली, त्यानुसार प्रभारी अधिकारी, सावंतवाडी पोलीस ठाणे यांनी त्यांच्यां स्टाफसह जावून तेथे वास्तव्यास असलेल्या 4 नागरीकांना ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली असता ते सर्व नागरीक बांगलादेशी असल्याचे, तसेच ते भारत-बांगलादेश सिमेवरील मुलखी अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय घुसखोरीच्या मार्गाने भारतात अवैधरित्या प्रवेश करुन आरोंदा, देऊळवाडी येथे रहात असल्याचे निष्पन्न झाले. सदर 4 बांगलादेशी नागरीक अवैधरित्या भारतात वास्तव्य करीत असल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांचेविरुध्द सावंतवाडी पोलीस ठाण्यात ही विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 14 व पारपत्र भारतात प्रवेश नियम 1950 चा नियम 3(अ), 6 (अ), परकिय नागरीक आदेश 1948 परि. 3(1), (अ) प्रमाणे गुन्हा दाखल केलेला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
जिल्हावासियांनी सतर्कता बाळगावी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपल्या आजू-बाजूस कोणी बांगलादेशी नागरीक अवैधरित्या वास्तव्यास असलेबाबत माहिती मिळाल्यास, सदरबाबत स्थानिक पोलीस ठाणे, तसेच पोलीस नियंत्रण कक्ष, सिंधुदुर्ग यांना माहिती द्यावी असे आव्हान जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केले आहे.
Facebook Comments Box

अवघ्या सव्वा मिनिटांत दहा किलो काजू बोंडूपासून वेगळ्या; बाजारात आलेले हे नवीन यंत्र तुम्ही पहिले का?

Krishi News: बोंडू Cashew Fruit  पासून काजू वेगळे करणे तसे कंटाळवाणे काम. शेतकऱ्यांचा बराच वेळ या कामात वाया जातो. मात्र आता यावर सुद्धा उपाय आला आहे. बोंडूपासून काजू वेगळे करणारे एक यंत्र बाजारात आले आहे. या यंत्राने अवघ्या सव्वा मिनिटांत १० किलो काजू बोंडूपासून वेगळा होतो असा दावा करण्यात येत आहे. या दावा खराही आहे; कारण तसे प्रात्यक्षिक गोव्यातील वितरकाने एका व्हिडिओद्वारे दाखवले आहे.
चाके असल्याने हे यंत्र कोठेही नेता येते. हे यंत्र केरोसीन किंवा पेट्रोल या इंधने कार्यन्वित होते. नुसते काजू बोंडूपासून वेगळे होत नाही तर बोंडूपासून उप उत्पादन सुद्धा याद्वारे घेता येते.
फोंड्यातील राजेश देसाई या वितरकाने हा विडिओ बनवला आहे. आमच्या त्यांच्याशी प्रतिनिधीने संपर्क साधला असता या यंत्राची किंमत २ लाख रुपये असल्याचे समजले.  किंमत ऐकून निराश होऊ नका; कारण याच वर्षी शेतकऱ्यांना परवडणारे लहान यंत्र बाजारात येणार असलयाचे त्यांनी सांगितले.
Facebook Comments Box

Mumbai Goa Highway | खुशखबर! कशेडी घाटातील बोगद्याचा एक मार्ग आजपासून सुरू

रत्नागिरी दि. २४: शिमग्यासाठी कोकणात येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने खुशखबर दिली आहे.कशेडी घाटातील बोगद्याचा एक मार्ग आज शनिवार २४ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, मुंबईहून कोकणात येणार्‍या वाहनांना या मार्गाचा वापर करता येणार आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. गणेशोत्सव काळात महामार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन एका मार्गिकेचा वापर सुरू करण्यात आला होता. गणेशोत्सवाआधीचे काही दिवस कोकणात येणाऱ्या गाड्या या बोगद्यातून आल्या. गणेश विसर्जनानंतर हा बोगदा मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र काही दिवसाच्या वापरानंतर तो बंद करण्यात आला. आतील फिनिशिंगची काही कामे झालेली नव्हती.

आता एका मार्गिकेचे (एका बोगद्याचे) सर्व काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या गाड्यांसाठी हा बोगदा खुला झाला आहे. शनिवारपासून त्याचा वापरही सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात कार तसेच छोट्या गाड्यांना येथून जाण्याची मुभा आहे. मात्र मोठ्या गाड्याही लवकरच या बोगद्यातून सोडल्या जाणार आहेत. कशेडी बोगदा हा २ किलोमीटर लांबीचा असून, या ठिकाणी ४० किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा वाहनांनी पाळणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचाच वापर करावा लागत असला तरी दुसऱ्या बोगद्यातील कामही अंतिम टप्प्यात आले असल्याने मार्चपर्यंत तो बोगदाही सुरू केला जाणार आहे.

 

Facebook Comments Box

कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे एकूण २२ मागण्यांचे निवेदन रेल्वेकडे सुपूर्त; कोणत्या आहेत या मागण्या? इथे वाचा…

मुंबई दि. २४ फेब्रु. : कोकण रेल्वे मार्गावरील मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या सर्व प्रवासी संघटना व संस्था एकत्र येत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची स्थापना करण्यात आली.सर्व सलग्न प्रवासी संघटनांच्या मागण्या एकत्र करून त्याच्या मागण्या कोकण रेल्वेकडे करण्यात आली. त्यात प्रामूख्याने

१) कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून दुहेरीकरण करण करावे.

२) सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे.

३) पश्चिम रेल्वेवरुन कोकण रेल्वेमार्गावर नेहमीसाठी वसई सावंतवाडी पॅसेंजर किंवा मधू दंडवते एक्सप्रेस व मध्य रेल्वेवरून कल्याण सावंतवाडी पॅसेंजर तसेच दादर-चिपळूण मेमू व मुंबई-रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस तर रोहा ते मडगाव दरम्यान दिवसाच्या वेळेत मेमू रेल्वे सुरू करावी.

४) १०१०५ / १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेस व ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी दिवा फास्ट पॅसेंजर दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुरू करून सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान पुर्वीची १०१०१ / १०१०२ रत्नागिरी मडगाव एक्सप्रेस सुरू करावी.

५) कोकण रेल्वेचे बेलापूर येथील भाडयाच्या जागेत असलेले मुख्यालय कोकण रेल्वेच्या हद्दीत स्वतःच्या जागेत स्थलांतरित करावे.

६) कोकणातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचा आरक्षण कोटा वाढवावा.

७) दिघी – रोहा – चिंचवड, गुहागर – चिपळूण – कराड व विजयदुर्ग – वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावेत.

८) भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देऊन स्टेशनवरील सर्व स्टॉल व कॅटरिंग त्यांनाच मिळावेत.

९) कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर पूर्ण उंचीचा फलाट, संपूर्ण शेड, पिण्याचे पाणी व चांगले शौचालय याची व्यवस्था करावी.

१०) रेल्वेने पुर्वीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सर्व सवलती व सेवासुविधा पूर्ववत कराव्यात. कोकण रेल्वेचे संकेतस्थळ मराठी, कोंकणी व कन्नड या स्थानिक भाषांतही उलपब्ध करून द्यावे.

११) मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या सर्व एक्सप्रेसना (Up & Down) दिवा जंक्शन येथे थांबे मिळावेत.

१२) ११००३ / ११००४ तुतारी एक्सप्रेस, १२१३३ / १२१३४ मुंबई मंगळुरु सुपरफास्ट एक्सप्रेस, १२६१९ / १२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस २४ आयसीएफ किंवा २२ एलएचबी डब्यांनी तर १२०५१ / १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस, २२११९ / २२१२० तेजस एक्सप्रेस, १०१०५ / १०१०६ सिंधुदुर्ग एक्सप्रेस, ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी फास्ट पॅसेंजर आवश्यकत त्या पायाभूत सुविधा उभारून २२ एलएचबी डब्यांनी चालवाव्यात. २२२२९ / २२२३० वंदे भारत एक्सप्रेस १६ डब्यांची करावी.

१३) १०१०५ / १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला पेण, नागोठणे व पुढे रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व ठिकाणी कोरोनापूर्वी असणारे थांबे पूर्ववत करावेत.अंजनी रेल्वे स्टेशन येथे ओव्हर ब्रीज किंवा भूयारी मार्ग बनवावा.

१४) वीर, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड आणि पेडणे येथे पूर्णवेळ PRS सुविधा मिळावी.

१५) कोरोना काळात ZBTT अंतर्गत काढलेले थांबे पूर्ववत करणे.

१६) कोकण रेल्वे मार्गावर अमृत भारत स्थानक योजना आणि One Station One Product योजना लागू करणे.

१७) सागरमाला अंतर्गत सावंतवाडी ते रेडी बंदर रेल्वे मार्ग मंजूर, तसेच २०१८ साली सावंतवाडी ते बेळगाव रेल्वे मार्गाचा फिसिबीलिटी रिपोर्ट तयार त्याला चालना देणे.

१८) Tourist / toy Train – कोकणातील पर्यटनासाठी टॉय ट्रेन १) सिंधुदुर्ग जिल्हा : कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड,मालवण व वेंगुर्ला. २) रत्नागिरी जिल्हा : राजापूर जैतापूर, पावस, जयगड, खेड,दापोली,गुहागर. ३) रायगड जिल्हा: पेण, अलिबाग, मुरुड, दिघी, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, महाड, रायगड.

१९) पुणे कर्जत करून पनवेलला जाणाऱ्या सर्व रेल्वे कल्याण पनवेल मार्गे कोकण रेल्वे मार्गावर चालवाव्यात.

२०) रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत माणगाव,विर,खेड,चिपळूण,संगमेश्वर रोड,विलवडे,राजापूर रोड,वैभववाडी रोड,कणकवली,कुडाळ व सावंतवाडी येथे वाढीव मिळावेत.

२१) सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन,गोवा संपर्कक्रांती,जामनगर तिरूनेवल्ली,गांधीधाम तिरुनेवल्ली, एटीटी कोचिवल्ली,केरळा संपर्कक्रांती,पोरबंदर कोचिवल्ली, एर्नाकुलम दुरांतो ह्या फक्त चिपळूण किंवा रत्नागिरी करून मडगावला जातात त्या मिरज मार्गे वळवाव्यात किंवा महाराष्ट्रात कोंकण रेल्वे मार्गावर जास्तीचे थांबे द्यावेत.

२२) रत्नागिरी येथील पिट लाईन जुनी झाल्यामुळे नव्याने बांधण्यासाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. परंतु अद्याप त्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही. लवकरात लवकर पिटलाईनचे काम पूर्ण करून रत्नागिरी येथून मुंबई व सावंतवाडी/मडगाव/कारवारच्या दिशेने वाढीव गाड्या सुरु कराव्यात.

अशा अनेक महत्वाच्या मागण्या समितीने रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागण्या केल्या असून त्याची अमंलबजावणी लवकरात लवकर करावी असेही सुचवण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search