कोकण रेल्वेचे विस्कटलेले वेळापत्रक पूर्वपदावर

Konkan Railway News : कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आज सकाळी आठच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेस (Konkan Kanya Express) मुंबईहून गोव्याकडे जात असताना कोकिसरे रेल्वे फाटकापासून काही अंतरावर अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रेन बंद पडली होती. त्यानंतर राजापूर स्टेशनवरुन नवीन इंजिन उपलब्ध करण्यात आले असून इंजिन बदलण्यात आले होते.

आताच्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक पूर्वपदावर आली आहे. काही गाड्या वगळता सर्व गाड्या काही मिनिटांच्या फरकाने धावत आहेत.

Source – Where is my train. Time – 03.07 PM

 

Loading

Facebook Comments Box

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनाईचा आदेश… “ह्या” गोष्टी केल्यास होऊ शकते अटक

सिंधुदुर्ग:ह्या महिन्यात होणार्‍या ग्रामपंचायत निवडणूकीच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. दिनांक 6 डिसेंबर रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी 24.00 वाजेपर्यंत हा आदेश राहील.

सध्याची राजकीय परिस्थिती, राजकिय पक्षांच्या एकमेकांच्या विरोधात केलेल्या टीका- टिप्पणीमूळे जिल्ह्यात दाखल झालेले गुन्हे यामुळे जिल्हय़ात तणाव निर्माण झाला आहे. येणार्‍या निवडणुकीत पुन्हा वाद निर्माण होऊन आंदोलनात्मक घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक मागणीकरिता उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको वैगरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येत असते. त्यामुळे या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.

   Follow us on        

शासनाचा आदेश

कलम 37 (1)

  • शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
  • अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.
  •  दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे.
  •  व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)
  • सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.
  • सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

कलम 37(3)

  •  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे.
  • हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .

वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

Loading

Facebook Comments Box

खुशखबर! कोकण रेल्वेमार्गावरील “ह्या” विशेष गाडीचा मार्च-२०२३ पर्यंत विस्तार…..

KONKAN RAILWAY NEWS : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. ह्या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा मार्च-२०२३ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. हि गाडी ह्या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या  संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी ३०/१२/२०२२ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०३ मार्च २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी ०२/०१/२०२३  पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०४  एप्रिल २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
ह्या गाड्यांचे मडगावपर्यंत कोकणातील थांबे 
पनवेल,रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली,कुडाळ, थिवीम, मडगाव

Loading

Facebook Comments Box

सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर

PUBLIC HOLIDAYS 2023 :सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे . यासंदर्भातील महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून सुट्ट्यांची यादी महाराष्ट्र राज्य शासन राजपत्रांने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे . सदर सुट्ट्यांची यादी राज्यातील सरकारी / निमसरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचे ठरणार आहेत . या संदर्भातील सामान्य प्रशासन विभागाकडुन दि.02.12.2022 रोजी निर्गमित  प्राधिकृत प्रकाशन  केले आहे .

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक 39 /1/68 जेयुडीएल / तीन दिनांक 8 मे 1968 अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन महाराष्ट्र राज्यात शासन अधिसुचनेद्वारे सन 2023 सालासाठी सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात आले आहेत . सन 2023 या ख्रिस्ती कॅलेंडरप्रमाणे एकुण 24 दिवस साार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली असून बँकांसाठी एक दिवस अधिक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे .

सन 2023 मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे –

Loading

Facebook Comments Box

कोकणातील प्रत्येक गाव हा शासकीय कर्मचाऱ्यांचा गाव व्हावा – श्री. सत्यवान रेडकर

सिंधुदुर्ग :कोकणातील प्रत्येक गाव हा शासकीय कर्मचाऱ्यांचा गाव व्हावा आणि कोकणात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू व्हावं जेणेकरून कोकणातील विद्यार्थ्यांना यशाचे द्वार खुले व्हावे असं प्रतिपादन “तिमिरातुनी तेजाकडे” संस्थेचे संस्थापक, सिंधुदुर्ग चे सुपुत्र व प्रसिद्ध, उच्च शिक्षित स्पर्धा परीक्षा व्याख्याते, मा. श्री सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार ) यांनी केले. कळसुली शिक्षण संघ मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशालेच्या सभागृहामध्ये आयोजित केलेल्या निशुल्क स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व्याख्यान ३ डिसेंबर २०२२ रोजी ते बोलत होते.

हेही वाचा :कोकणवासियांचा राग दिसून येत नाही–मनसे अध्यक्ष राज ठाकरे

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत रा. दळवी, कार्याध्यक्ष, कळसुली शिक्षण संघ, मुंबई, श्री जय दळवी, खजिनदार, कळसुली शिक्षण संघ मुंबई, श्री. के. आर. दळवी चेअरमन स्कूल कमिटी, श्री. नामदेव घाडीगावकर, उपाध्यक्ष, स्कूल कमिटी, श्री. रजनीकांत सावंत, स्कूल कमिटी सदस्य, श्री दयानंद सावंत, पोलिस निरीक्षक, भोईवाडा पोलिस स्टेशन मुंबई, श्री संदीप सावंत – बाल शिवाजी विद्यालय कणकवली पदाधिकारी, याशिवाय शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष श्री. शिवाजी गुरव, माजी वरिष्ठ लिपिक श्री. चंद्रसेन गोसावी, रणजीत सुतार, हेमंतकुमार परब, नारायण दळवी, सौ. श्वेता दळवी, सौ. सुकन्या कदम, सौ नीता गुरव आदी ग्रामस्थ, पालक, आजी – माजी विद्यार्थी, बहुसंख्येने उपस्थित होते.

   Follow us on        

या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष श्री सूर्यकांत दळवी सर यांनी श्री. सत्यवान रेडकर व श्री. दयानंद सावंत यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच इतर मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते, श्री सत्यवान रेडकर यांचं हे १३४ वे निशुल्क व्याख्यान होतं. ONE MAN SHOW पद्धतीने विविध ज्वलंत उदाहरणे देत विनोदी खुमासदार, वक्तृत्व शैलीने त्यांनी मुलांना दोन तास खिळवून ठेवले. स्पर्धा परीक्षेचे विविध पैलू, सहभागी विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान मिळवण्याच्या विविध पद्धती त्याचप्रमाणे या क्षेत्रात असलेल्या विविध नोकरी व्यवसायाच्या संधी याबाबत विस्तृत माहिती दिली. १५० पेक्षा जास्त विद्यार्थांनी त्यांना विद्यार्थ्यांची मन की बात या सदराखाली पत्र लिहिली. ते सोशल मीडियावर याबाबतीत सक्रिय आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे श्री के आर दळवी स्कूल कमिटी चेअरमन यांनीही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी कानमंत्र दिले.

हेही वाचा : आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली….

अध्यक्षीय भाषणात श्री. सूर्यकांत दळवी यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व त्यासाठी लागणारे परिश्रम आणि चिकाटीने केलेले प्रयत्न याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. व्ही. वगरे यांनी या कार्यक्रमास शुभेछा दिल्या.

कळसूली दशक्रोतील विविध गावामध्ये बॅनर, व प्रसिद्धीपत्रकाद्वारे या कार्यक्रमाची जाहिरात करण्यात आली. या कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक, आजी – माजी विद्यार्थी, यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबाबत सर्व स्तरातून संस्था पदाधिकार्‍यांचे विशेष कौतुक केले जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री सी.जी चव्हाण यांनी मानले.

Loading

Facebook Comments Box

ठाणे स्थानकावरून कोकणरेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खास सुचना ! ०१ डिसेंबर पासून झाला आहे “हा” बदल

 

Konkan Railway News :ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी ठाणे स्थानकावरून पुढे जाणार्‍या लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत काही बदल केले गेले आहेत. दिनांक 01 डिसेंबर 2022 पासून हे बदल अंमलात आणले गेले आहेत अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे यांच्या मार्फत देण्यात आली आहे.

कोकणात जाणार्‍या सर्व गाड्यांसाठी खालील बदल करण्यात आलेले आहेत.

हेही वाचा >आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली….

जनरल डब्यांच्या स्थानात बदल

कोकणात जाणार्‍या सर्व गाड्यांचे ठाण्याला उघडणारे जनरल डबे शेवटी म्हणजे (दादर दिशेने) केले आहेत. त्यामुळे ह्या डब्यांसाठी लागणारी रांग आता मागे लागत आहे.

गाड्यांच्या प्लॅटफॉर्म क्रमांकात बदल

हेही वाचा > कोकणरेल्वे मार्गावर धावणार हिवाळी विशेष गाड्या! उद्यापासून आरक्षण चालू..

मुंबई वरून कोकणात जाणार्‍या तुतारी व मांडवी एक्सप्रेस ठाणे स्टेशनला प्लॅटफॉर्म नं. 5 वर तर कोकण कन्या आणि मंगलोर एक़्सप्रेस या गाड्या प्लॅटफॉर्म नं 7 वर येत आहेत.

   Follow us on        

ठाणे स्थानकावरून कोकणरेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे मार्फत करण्यात आले आहे.

Loading

Facebook Comments Box

आंगणेवाडी जत्रेची तारीख ठरली….

   Follow us on        

सिंधुदुर्ग-मालवण: दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या आंगणेवाडीची जत्रा यंदा शनिवारी दिनांक 4 फेब्रुवारी 2023 या दिवशी संपन्न होणार आहे. नुकतीच या यात्रेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी कोकणवासियांना या यात्रेच्या तारखेबद्दल उत्सुकता असते. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला या वार्षिकोत्समध्ये दर्शनाला भाविक देशा-परदेशातून येतात.

 

आंगणेवाडीच्या यात्रेसाठी देवीला कौल लावून तारीख निश्चित करण्याची पद्धत आहे. आजही लावलेल्या कौलानुसार 4 फेब्रुवारी हा दिवस यात्रेसाठी ठरवण्यात आला आहे.

दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष रेल्वे फेर्‍या चालवल्या जातात. एसटी कडूनही भाविकांना खास बससेवा असते. आता सिंधुदुर्गामध्ये चिपी विमानतळ देखील प्रवासी सेवेसाठी खुले करण्यात आले आहे त्यामुळे भाविकांसाठी प्रवास वेगवान आणि सुलभ झाला आहे.

 

आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला या जत्रोत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी आवर्जुन हजेरी लावतात. लाखो भक्त दिवसभरात देवीचं दर्शन घेतात. यासाठी विशेष सोय केली जाते.

 

 

Loading

Facebook Comments Box

कोकणवासियांचा राग दिसून येत नाही–मनसे अध्यक्ष राज ठाकरे

   Follow us on        
रत्नागिरी : कोकणवासियांचा राग दिसून येत नाही, तो कमालीचा सहनशील आहे आणि त्याची सहनशीलता त्यांना घातक ठरत आहे असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेत म्हणाले. त्यांनी प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पांबाबत  रिफायनरी बाबत भूमिका स्पष्ट केली आहे. विनाशकारी प्रकल्प कोकणात नको मात्र राज्यात येणारे प्रकल्प बाहेर जाणे हे देखील योग्य नाही असे त्यांनी प्रकल्पाबत संमिश्र वक्तव्य केले आहे.   
राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. रिफायनरी विरोधक आणि समर्थकांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आज पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेला संबोधित केले. 
कोकणवासियांचा राग दिसून येत नाही. 
या राज ठाकरे यांनी म्हटले की, कोकणात ज्या अडीअडचणी आहेत त्याबद्दल कोकणवासियांनी राग व्यक्त केला पाहिजे. पण, हा राग दिसून येत नाही. गोवा महामार्ग कितीतरी दिवस रखडला असल्याचे त्यांनी म्हटले. कोकणवासीयांची सहनशक्ती त्यांना घातक ठरत आहे. मतदानातून कोकणी जनतेने राग व्यक्त करायला हवा. मात्र, तो होत नसल्याचे ही राज यांनी म्हटले.
कोकणातल्या जमिनी विकत घ्यायला भुरटे येतात. त्यावेळी खरबदारी घ्यायला हवी, एक गठ्ठा हजारो एकर जमीन जातेय,  बाहेरची मंडळी जमिनी विकत घेतात, तेव्हा संशय येत नाही का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जेव्हा मोठ्या प्रमाणात अशी बाहेरच्या भुरट्यांकडून खरेदी होते तेव्हा कोकणी माणूस जागृत राहिला पाहिजे असे ते म्हणाले. 

Loading

Facebook Comments Box

IQ टेस्ट – ह्या फोटोमधील ३ वस्तू शोधून काढा.

Image Source: Bright Side
वरील फोटोमध्ये ३ गोष्टी लपलेल्या आहेत. ह्या तीन गोष्टी तुम्ही जर ९ सेकंड मध्ये शोधून दाखल्यात तर तुमचा IQ खूप चांगला आहे असे मानले जाईल.
कोणत्या आहेत ह्या ३ गोष्टी ?
१) स्टार
२) पेन्सिल 
३) पाण्याचा ग्लास

Loading

Facebook Comments Box

जोपर्यंत महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल वसूल केल्यास… माजी खासदार निलेश राणे यांचा इशारा.

   Follow us on        
सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरील टोलवसुली बाबत माजी  खासदार निलेश राणे यांनी एक विधान केले आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपरीकरणाचे काम अद्याप अपूर्ण असताना प्रशासन जर जबरदस्तीने टोल सुरू करत असेल तर पुढे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. असा इशारा देतानाच, प्रशासनाने आधी जनतेचे प्रश्न, म्हणणे जाणून घ्यावे, ते सोडवावेत आणि मगच टोल सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी सूचना रत्नागिरी सिंधदुर्ग लोकसभेचे माजी खासदार नीलेश राणे यांनी केली आहे.
ट्विटर च्या माध्यमातून पण त्यांनी आपली नाराजी  व्यक्त केली आहे. मुंबई गोवा महामर्गावरील हातिवले टोल नाका येथे म्हणजेच अगदी टोलच्या आजूबाजूला देखील काम पूर्ण झालेले नाही, रायगड जिल्ह्यात देखील काम अपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चौपदरीकणाचे काम केवळ 60 टक्केच झाले आहे. त्यामुळे काम अपूर्ण असताना टोल सुरू करणे ही जनतेवर जबरदस्ती आहे. जनतेने एकदा याबाबत निवेदनही दिले आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या प्रशासनाने ऐकून घ्यायला हव्यात. टोल ला आमचा विरोध नाही मात्र काम अपूर्ण असताना, जनतेचे प्रश्न नसोडवता, त्यांचे म्हणणे ऐकून न घेता जर जबरदस्तीने अचानक टोल सुरू करू नये. भविष्यात जनता रस्त्यावर उतरली तर याला कोण जबाबदार? असा प्रश्न देखील निलेश राणे यांनी केला आहे. जनतेच्या मागण्या ऐकून घेऊन मग टोल बाबत निर्णय घ्यावा असेही त्यांनी सांगितले आहे.

 

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search