२९ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
🔆तिथि-द्वादशी – 10:34:11 पर्यंत
🔆नक्षत्र-उत्तरा फाल्गुनी – 18:34:11 पर्यंत
🔆करण-तैतुल – 10:34:11 पर्यंत, गर – 23:56:22 पर्यंत
🔆पक्ष-कृष्ण
🔆योग-इंद्रा – 07:46:33 पर्यंत
🔆वार-मंगळवार
🔆सूर्योदय-06:40
🔆सूर्यास्त-18:05
🔆चन्द्र राशि-कन्या
🔆चंद्रोदय-28:41:59
🔆चंद्रास्त-16:15:00
🔆ऋतु-हेमंत

दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
🔆१८५१: ब्रिटीश कालीन भारतात बंगाल प्रांतात ब्रिटीश इंडियन असोसिएशन ची स्थापना करण्यात आली.
🔆१८६४: युनान देशाने नवीन संविधान अंगिकारले.
🔆१८९४: महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभेची स्थापना
🔆१९२२: बेनिटो मुसोलिनी इटलीच्या पंतप्रधानपदी
🔆१९५८: महर्षि धोंडो केशव कर्वे यांना भारतरत्‍न पुरस्कार प्रदान
🔆१९६१: संयुक्त अरब प्रजासत्ताकमधून सीरिया देश बाहेर पडले.
🔆१९६४: टांगानिका व झांजिबार एकत्र येऊन टांझानिया हा देश बनला.
🔆१९९४: विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरीसाठी देण्यात येणारा ’होमी भाभा पुरस्कार’ डॉ. टी. ज्ञानशेखरन आणि आर. ई. के. मूर्ती यांना विभागून जाहीर
🔆१९९६: स्वदेशात बनविलेली ‘कामिनी‘ ही ३० मेगावॉट क्षमतेची अणूभट्टी कल्पक्‍कम येथे कार्यान्वित करण्यात आली. युरेनिअम-२३३ हे इंधन वापरणारी ही आशियातील पहिली अणूभट्टी आहे.
🔆१९९६: मध्यप्रदेश सरकारतर्फे दिल्या जाणार्‍या तानसेन पुरस्कारासाठी शास्त्रीय गायिका गिरीजादेवी यांची निवड
🔆१९९७: माणिक वर्मा प्रतिष्ठानचा पहिला ‘माणिकर‍त्‍न पुरस्कार‘ गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर यांना जाहीर
🔆१९९७: अभिनेते दिलीपकुमार यांना प्रतिष्ठेचा ‘एन. टी. रामाराव राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार‘ जाहीर
🔆१९९९: चक्रीवादळाच्या तडाख्याने ओरिसात अतोनात नुकसान
🔆२००५: दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात दिल्लीमध्ये ६० पेक्षा जास्त व्यक्ती ठार
🔆२००८: डेल्टा एअरलाईन्सचे नॉर्थवेस्ट एअरलाईन्समधे विलीनीकरण होऊन नॉर्थवेस्ट एअरलाईन्स ही जगातील सर्वात मोठी विमान वाहतुक कंपनी बनली.
🔆२०१५: चीन देशातील एक-मूल धोरण ३५ वर्षांनंतर बंद करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
🔆१७३९: ब्रिटीश कालीन भारतातील ओडिसा राज्यातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे प्रमुख कार्यकर्ता जय राजागुरू यांचा जन्मदिन.
🔆१८९७: जोसेफ गोबेल्स – जर्मनीचा चॅन्सेलर व नाझी नेता (मृत्यू: १ मे १९४५)
🔆१९३१: प्रभाकर तामणे – साहित्यिक व पटकथालेखक (मृत्यू: ७ मार्च २०००)
🔆१९३७: “कर्नाटक राज्य साहित्य अकादमी पुरस्कार“ प्राप्त भारतीय कन्नड व इंग्रजी भाषिक लेखक, पत्रकार, चरित्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरणवादी एस. आर. रामास्वामी यांचा जन्मदिन.
🔆१९३९: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित भारतीय बंगाली कवी, नाटककार, लघुकथा लेखक, निबंधकार आणि कादंबरीकार मलय रॉय चौधरी यांचा जन्मदिन.
🔆१९७१: मॅथ्यू हेडन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
🔆१९८५: इंग्लिश मोटरसायकल रेसर कॅल क्रचलो यांचा जन्म.
🔆१९८५: भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म.
🔆१९८७: भारतीय व्यावसायिक बॉक्सर (मुष्टियोद्धा) विजेंदर सिंह बेनिवाल यांचा जन्मदिन.
🔆१९८९: भारतीय विद्यमान क्रिकेटपटू व जलदगती गोलंदाज वरून आरोन यांचा जन्मदिन.
🔆१९९६: अर्जुन पुरस्कार सन्मानित भारतीय हेपॅथलिट स्वप्ना बर्मन यांचा जन्मदिन.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
🔆१९११: जोसेफ पुलित्झर – हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्‍यांना देण्यात येणार्‍या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक (जन्म: १० एप्रिल १८४७)
🔆१९३३: पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (जन्म: ५ डिसेंबर १८६३)
🔆१९७८: वसंत रामजी खानोलकर – भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे (जन्म: १३ एप्रिल १८९५)
🔆१९८१: दादा साळवी – अभिनेते (जन्म: ? ? ????)
🔆१९८८: कमलादेवी चट्टोपाध्याय – मॅगसेसे पुरस्कार विजेत्या (१९६६) स्वातंत्र्यसैनिक व सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ३ एप्रिल १९०३)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

जनरल आणि स्लीपर कोचेस डब्यांची कमतरता ठरत आहे धोकादायक

   Follow us on        

संपादकीय: वांद्रे टर्मिनस येथे काल पहाटे गाडीमध्ये चढताना चेंगराचेंगरी होऊन प्रवासी गंभीररीत्या जखमी होण्याचा प्रकार घडला होता. घटनास्थळी पडलेला रक्ताचा सडा घटनेचे गांभीर्य दाखवते.

वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस पूर्ण अनारक्षित स्वरुपाची होती. या गाडीच्या आसन क्षमतेपेक्षा तिकीटविक्री झाली होती. गाडी प्लॅटफॉर्म येत असताना जागा पकडण्यासाठी प्रवाशांची झुंबड उडाली. या वेळी चेंगराचेंगरी होऊन 9 प्रवासी जखमी झाले. त्यात 2 दोघे जण गंभीररीत्या जखमी झाले.

या घटनेनंतर या घटनेस जबाबदार कोण? कारणे काय? हे प्रश्न उठले. अन्य कारणे अनेक असतीलच मात्र मागणी – पुरवठा यातील तफावत हेच या घटने मागचे मुख्य कारण म्हणता येईल. देशातील प्रवाशांची मागणी कोणती आहे हेच ओळखणे प्रशासनाला जमले नाही; किंवा ते जाणूनबुजून त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. देशातील प्रवाशांचा मोठा गट सामान्य आणि गरीब या प्रकारात मोडतो. या प्रवाशांना एसी आणि प्रिमीयम श्रेणीतून प्रवास प्रवास करणे परवडत नाही. एकतर जनरल नाहीतर स्लीपर या श्रेणीची तिकिटे त्यांना परवडतात. त्यामुळे प्रीमियम वंदे भारत, तेजस, राजधानी या सारख्या पूर्णपणे प्रिमीयम त्यांच्यासाठी नाहीच आहेत. आता राहिल्या बाकीच्या रेग्युलर गाड्या. या गाड्यांना फक्त 2 ते 4 जनरल डबे जोडलेले असतात, तर साधारणपणे 8 ते 10 सेकंड स्लीपर डबे या प्रवाशांसाठी असतात. ही संरचना प्रत्येक गाडीपरत्वे कमी अधिक असल्याने आपण ती आपण साधारणपणे 50% पकडून चालू. देशातील मोठ्या प्रवासगटाला ही क्षमता नक्किच कमी आहे.

रेल्वे प्रशासनाने अलीकडेच स्लीपर श्रेणीच्या डब्यांतून प्रवास करणाऱ्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे. प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना आरक्षित डब्यातून प्रवास करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. कालची घटना याच निर्णयाचा एक परीणाम आहे. यापूर्वी प्रवाशांना वेटिंग तिकीटावरून स्लीपर डब्यांतून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध होता. तो आता नाहीसा झाल्याने जनरल डब्यातील गर्दी वाढली. प्रशासनाने यावर तोडगा न काढल्यास, हे चित्र असेच राहिल्यास भविष्यातही अशा घटना घडतच राहणार.

रेल्वे प्रशासन सध्या उत्पन्न वाढीवर भर देताना दिसत आहे. त्यामुळे वंदे भारतसारख्या प्रिमीयम गाड्या रूळांवर आणण्यास भर देत आहे. तर देशातील लोकप्रतिनिधींना आधुनिक आणि प्रगत भारत घडवायचा आहे. मात्र या आधुनिक भारतात वंदे भारत एक्सप्रेस रिकाम्या जात असतिल आणि सामान्य प्रवासी असे चिरडले जात असतिल तर अश्या आधुनिकतेचा काय उपयोग?

Loading

Facebook Comments Box

२८ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
  • तिथि- एकादशी – 07:53:22 पर्यंत
  • नक्षत्र- पूर्व फाल्गुनी – 15:24:19 पर्यंत
  • करण- बालव – 07:53:22 पर्यंत, कौलव – 21:12:44 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- ब्रह्म – 06:46:01 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 06:39
  • सूर्यास्त- 18:05
  • चंद्रोदय- 27:55:00
  • चंद्रास्त- 15:45:00

दिनविशेष
जागतिक दिवस:
  • आंतरराष्ट्रीय अ‍ॅनिमेशन दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १४२०: बीजिंगला अधिकृतपणे मिंग साम्राज्याची राजधानी म्हणून नियुक्त केले गेले.
  • १४९०: क्रिस्टोफर कोलंबस पहिल्या प्रवासानंतर क्युबा मध्ये पोहोचले.
  • १६३६: अमेरिकेतील हारवर्ड विद्यापीठाची (Harvard University) स्थापना
  • १८८६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी स्वातंत्र्यदेवतेचा पुतळा राष्ट्राला अर्पण केला.
  • १९०४: पनामा आणि उरुग्वे यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • १९२२: बेनिटो मुसोलिनीच्या नेतृत्त्वाखाली ईटलीतील फॅसिस्टांनी रोममधील सरकार उलथवले.
  • १९४०: दुसरे महायुद्ध – ईटलीने ग्रीसवर हल्ला केला.
  • १९६९: तारापूर अणूवीज निर्मिती केंद्र सुरू झाले
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८६७: मार्गारेट नोबल ऊर्फ ‘भगिनी निवेदिता’ – स्वामी विवेकानंदांच्या शिष्या, भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या, त्या मूळच्या आयरिश होत्या. २५ मार्च १८९८ रोजी स्वामी विवेकानंदांनी त्यांना विधिवत ब्रम्हचारिणी व्रताची दीक्षा दिली व त्यांचे नाव ‘निवेदिता‘ ठेवले. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९११)
  • १८९३: शंकर केशव कानेटकर ऊर्फ ’कवी गिरीश’ (मृत्यू: ४ डिसेंबर १९७३)
  • १९३०: लालजी पाण्डेय तथा ’अंजान’ – हिन्दी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गीतकार (मृत्यू: १३ सप्टेंबर १९९७)
  • १९५५: इन्द्रा नूयी – भारतीय वंशाच्या अमेरिकन कॉर्पोरेट अधिकारी
  • १९५५: बिल गेटस – मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक
  • १९५६: मोहम्मद अहमदिनेजाद – ईराणचे ६ वे राष्ट्राध्यक्ष
  • १९५८: अशोक चव्हाण – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, सांस्कृतिक कार्यमंत्री, उद्योगमंत्री आणि खाणकाममंत्री
  • १९६७: ज्यूलिया रॉबर्टस – अमेरिकन अभिनेत्री
  • १९७९: युट्यूब चे सहसंस्थापक जावेद करीम यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६२७: जहांगीर – ४ था मुघल सम्राट (जन्म: ३० ऑगस्ट १५६९)
  • १८११: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर (जन्म: ३ डिसेंबर १७७६)
  • १९००: मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (जन्म: ६ डिसेंबर १८२३)
  • १९४४: हेलन व्हाईट – डॉक्टरेट मिळवणारी पहिली अमेरिकन महिला (जन्म: २८ नोव्हेंबर १८५३)
  • २००२: एच अँड एम चे संस्थापक इर्लिंग पर्स्सन यांचे निधन. (जन्म: २१ जानेवारी १९१७)
  • २०१०: ग्रीनलँड देशाचे पहिले पंतप्रधान जोनाथन मोट्झफेल्ड यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९३८)
  • २०१३: भारतीय लेखक राजेंद्र यादव यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १९२९)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

वांद्रे टर्मिनस येथे एक्सप्रेसमध्ये चढताना चेंगराचेंगरी; ९ प्रवासी जखमी, दोघे गंभीर

   Follow us on        
Bandra Terminus : मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकातील आज पहाटे गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीमध्ये ९ प्रवासी जखमी झाले आहेत. तसेच यातील दोण जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. जखमी झालेल्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
वांद्रे रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पहाटे 5 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. रेल्वेत चढण्यासाठी प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. रेल्वेत चढत असतानाच झालेल्या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि यामध्ये काही प्रवाशी प्लॅटफॉर्मवर पडले. त्यामुळे चेंगराचेंगरी होऊन ९ प्रवासी जखमी झाले आहेत. वांद्रे – गोरखपूर ही गाडी पूर्णपणे अनारक्षित डब्यांची चालविण्यात येते. सामान्यपणे ही गाडी दोन तास अगओड्र प्लॅटफॉर्म वर लागते मात्र आज या गाडीला थोडा उशीर झाला होता. त्यामुळे रेल्वे आल्यानंतर प्रवाशांनी रेल्वेत चढण्यासाठी मोठी गर्दी केली आणि या गर्दीमुळे चेंगराचेंगरीची घटना घडली.
वांद्रे ते गोरखपूर या रेल्वेने प्रवास करण्यासाठी गर्दी केलेले बहुतांश प्रवाशी हे छट पुजेसाठी उत्तर प्रदेशात आपल्या गावी जात होते, अशी प्राथमिक माहिती सांगितली जात आहे. यावर अद्याप रेल्वे प्रशासनाची अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. सध्या वांद्रे स्थानकातील प्लॅटफॉर्म परिस्थिती व्यवस्थित असून प्लॅटफॉर्मवर पोलीस उपस्थित असल्याची माहिती देण्यात येत आहे.

Loading

Facebook Comments Box

माणगाव रेल्वे स्थानकावर मराठी भाषेची ‘हत्या’

   Follow us on        
रायगड: अलीकडेच भारत सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केला आहे. मात्र याच भाषेचा चक्क महाराष्ट्रातच अपमान होण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. सार्वजनिक ठिकाणी मराठी भाषा चुकीच्या पद्धतीने वापरून तिची ‘हत्या’ करण्याचे प्रकार होताना दिसत आहेत. असाच एक प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कंत्राटदाराकडून माणगाव रेल्वे स्थानकावर घडल्याचा प्रकार समोर आला आहे.
महाराष्ट्र राज्य सार्वजनिक बांधकाम  कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाच्या स्थानकांचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव रेल्वे स्थानकावरही हे काम चालू आहे. मात्र या सुशोभीकरणादरम्यान या ठिकाणी वापरण्यात आलेल्या मराठी भाषेमध्ये कंत्राटदाराकडून काही अक्षम्य अशा चुका झाल्या आहेत.  “स्वर्ग कोकणाचा मातीवर”, “कोकणाचा निसर्गात वंदे भारत” अशी चुकीची वाक्ये इथे वापरण्यात आली आहेत. तर येथे लावण्यात एका फलकावर काही स्थानकांची नावे मराठीत लिहिण्यात चुका झाल्या आहेत. जसे कि कुडाळच्या जागी “कुंडल”, माणगाव च्या जागी  “मांणगाव”  इत्यादी
रेल्वे अभ्यासक अक्षय म्हापदी यांनी X च्या माध्यमातून या चुका प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या असून त्या  लवकरात लवकर सुधारण्यात याव्यात अशी मागणी  केली आहे.
 

Loading

Facebook Comments Box

२७ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
  • तिथि- एकादशी – पूर्ण रात्र पर्यंत
  • नक्षत्र- माघ – 12:24:42 पर्यंत
  • करण- भाव – 18:37:32 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग- ब्रह्म – पूर्ण रात्र पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:36:58
  • सूर्यास्त- 18:07:27
  • चन्द्र राशि- सिंह
  • चंद्रोदय- 27:07:59
  • चंद्रास्त- 15:13:59

दिनविशेष
जागतिक दिवस:
  • World Day for Audiovisual Heritage (International)
महत्त्वाच्या घटना:
  • ३१२ ई.पूर्व: कॉन्स्टन्टाइन द ग्रेट यांना विजन ऑफ द क्रॉस प्राप्त झाले असे म्हटले जाते.
  • १९०४: न्यूयॉर्क शहरात मेट्रो रेल्वेची सुरुवात झाली होती.
  • १९४७: जम्मू-काश्मीर भारतात विलीन झाले.
  • १९५८: पाकिस्तानमध्ये जनरल अयुब खानने लश्करी उठाव करून राष्ट्राध्यक्ष इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत केले.
  • १९६१: मॉरिटानिया आणि मंगोलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
  • १९७१: डेमॉक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशाचे नाव बदलुन झैरे असे करण्यात आले.
  • १९८२: चीन देशाने आपल्या देशातील जनसंख्या एक अरब पेक्षा जास्त असल्याची घोषणा केली.
  • १९८६: युनायटेड किंगडमने आर्थिक बाजारपेठांवरील सर्व निर्बंध काढुन टाकले.
  • १९९१: तुर्कमेनिस्तानला (रशियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८११: शिवन कामाच्या मशीनचे पेटेंट घेणारे महान अमेरिकन शोधक, अभिनेता आणि व्यावसायिक आयझॅक मेरिट सिंगर यांचा जन्मदिन.
  • १८५८: थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ६ जानेवारी १९१९)
  • १८७३: महाराष्ट्रीयन मराठी कवी भास्कर रामचंद्र तांबे यांचा जन्मदिन.
  • १८७४: भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (मृत्यू: ७ डिसेंबर १९४१)
  • १९०४: जतिंद्रनाथ तथा ’जतिन’ दास – स्वातंत्र्यसेनानी व क्रांतिकारक (मृत्यू: १३ सप्टेंबर १९२९)
  • १९२०: के. आर. नारायणन – भारताचे १० वे राष्ट्रपती (मृत्यू: ९ नोव्हेंबर २००५)
  • १९२३: अरविंद मफतलाल – उद्योगपती (मृत्यू: ३० आक्टोबर २०११)
  • १९४७: महान महराष्ट्रीयन समाजसेवक तसचं,  महाराष्ट्रातील थोर कुष्ठरोगी समाजसेवक बाबा आमटे यांचे चिरंजीव डॉ. विकास आमटे यांचा जन्मदिन.
  • १९४७: डॉ. विकास आमटे – समाजसेवक
  • १९५४: अनुराधा पौडवाल – पार्श्वगायिका
  • १९६४: मार्क टेलर – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
  • १९६६: अर्जुन पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय माजी बुद्धीबळपटू दिबेंदू बारू यांचा जन्मदिन.
  • १९७६: भारतीय-अमेरिकन शेफ आणि लेखक मनीत चौहान यांचा जन्म.
  • १९७७: कुमार संगकारा – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
  • १९८४: इरफान पठाण – भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १६०५: अकबर – तिसरा मुघल सम्राट (जन्म: १४ आक्टोबर १५४२)
  • १७९५: सवाई माधवराव पेशवा (जन्म: १८ एप्रिल १७७४)
  • १९०७: भारतीय स्वतंत्रता सेनानी,  ब्रह्मज्ञानी, व पत्रकार तसचं, स्वामी विवेकानंद यांचे वर्गमित्र आणि रवींद्रनाथ टागोर यांचे सहकारी ब्रह्मबांधव उपाध्याय यांचे निधन.
  • १९३७: ’संगीतरत्‍न’ उस्ताद अब्दुल करीम खाँ – किराणा घराण्याचे संस्थापक व सवाई गंधर्वांचे गुरु (जन्म: ११ नोव्हेंबर १८७२)
  • १९६४: वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (जन्म: २६ आक्टोबर १८९१)
  • १९७४: चक्रवर्ती रामानुजम – गणिती (जन्म: ९ जानेवारी १९३८)
  • १९८७: विजय मर्चंट – क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती व समाजसेवक (जन्म: १२ आक्टोबर १९११)
  • १९९९: हिंदी भाषेचे प्रमुख आलोचक व साहित्यकार डॉ. नगेंद्र यांचे निधन.
  • २००१: भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत – बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, ’फास्टर फेणे’ आणि ’बिपीन बुकलवार’ या पात्रांचे जनक (जन्म: ३१ मे १९१०)
  • २००१: प्रदीप कुमार – हिन्दी व बंगाली चित्रपटसृष्टीतील अभिनेता (जन्म: ४ जानेवारी १९२५)
  • २००७: सत्येन कप्पू – हिन्दी चित्रपटांतील चरित्र अभिनेता (जन्म: ? ? १९३१ – पतियाळा, पंजाब)
  • २०१५: भारतीय औषधीशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक रानजीत रॉय चौधरी यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १९३०)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

Bhumi Abhilekh: जमीन मोजणीच्या नियमांत १ नोव्हेंबरपासून बदल

   Follow us on        
Bhumi Abhilekh: भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून जमीन मोजणीची कामे गतिमान व्हावीत याकरिता जमीन मोजणी नियमांमध्ये बदल करण्यात आला असून यानुसार आता ग्रामीण भागात जमीन मोजणीच्या दरामध्ये सवलत देण्यात आली आहे व जमीन मोजणीचा कालावधी 130 दिवसांवरून 90 दिवसांवर आणला गेला आहे. तसेच जमीन मोजणीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरण्याची  सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यामुळे हा कालावधी कमी झाल्याने तातडीने जमीन मोजणीचे प्रकरणांचा निपटारा करता येणे शक्य होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे अगोदर भूमी अभिलेख विभागाकडून सिटीसर्वे आणि सर्वे नंबरच्या जमीन मोजणीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जायचे.
परंतु आता जमीन भाग आणि नगरपालिका हद्द असे दोन प्रकार करण्यात आले आहेत. तसेच अगोदर साधी मोजणी, तातडीची आणि अति तातडीची असे जमीन मोजणीचे तीन प्रकार होते. ते आता बंद करण्यात आले असून दोनच प्रकार त्यामध्ये आता निश्चित करण्यात आलेले आहेत.
या नियमाची अंमलबजावणी येत्या 1 नोव्हेंबरपासून करण्यात येणार असून जमीन मोजणीच्या कार्यप्रणालीमध्ये सुसूत्रता यावी व मोजणी सुलभ व्हावी याकरिता शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून हे नवे धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. याबाबत भूमी अभिलेख विभागाने परिपत्रक जारी केले आहे.
या नवीन धोरणानुसार जमीन मोजणीसाठी लागणारे शुल्क व कालावधी नव्याने निश्चित करण्यात आला असून यामध्ये ग्रामीण भागाला दिलासा मिळेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात आला आहे.
यामध्ये सर्वे नंबर तसेच गट नंबर, पोटहिस्सा आणि सिटीसर्वे इत्यादी मधील एका भूखंडासाठी दोन हेक्टरपर्यंत नियमित मोजणी करिता 2000 रुपये, द्रूतगती मोजणीसाठी 8000 रुपये मोजणी शुल्क निश्चित करण्यात आलेले आहे.
तसेच नगरपालिका हद्दीतील मोजणी हा दुसरा प्रकार निश्चित करण्यात आला असून या प्रकारामध्ये एका भूखंडासाठी एक हेक्टर पर्यंत नियमित मोजणीस 3000 रुपये इतके शुल्क ठरवण्यात आलेले आहे.
त्याचप्रमाणे जमीन मोजणीसाठी आता ऑनलाईन अर्ज भरण्याची  सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे या सुविधेचा लाभ घेऊन अर्जदार https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळास भेट देऊन अर्ज  करू शकतात.

Loading

Facebook Comments Box

अलिबाग: बनावट ‘गोल्ड फ्लेक’ सिगारेट बनवणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश

1   Follow us on        

अलिबाग : गोल्ड फ्लेक कंपनीच्या नावाने बनावट सिगरेट बनवून वेगवेगळ्या राज्यात वितरण करणाऱ्या कंपनीवर रायगड पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कंपनी चालवणाऱ्या १५ आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून जिल्हय़ात शोध पथके कार्यन्वित करण्यात आली होती. या शोध पथकांना कर्जत येथील सागंवी गावात एका निर्जन ठिकाणी असलेल्या आलिशान फार्महाऊस परिसरात सुरु असलेल्या संशयास्पद हालचालीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला लागली. त्यामुळे त्यांनी पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्या परवानगीने या फार्म हाऊसवर धाड टाकली. तेव्हा या बनावट सिगरेट कंपनीचा उलगडा झाला. मध्ये ही कंपनी बेकायदेशीरपणे थाटण्यात आली होती. पंधरा कर्मचारी तिथे काम करत होते. सिगरेट बनवण्यासाठी लागणारे साहीत्य आणि तीन मशिन्स या ठिकाणी बसवण्यात आल्या होत्या. गोल्ड फ्लेक कंपनीच्या नावाने दररोज १५ लाख रुपयांची सिगरेट्स या ठिकाणी बनवल्या जात होत्या. बॉक्स पॅकींगसाठी लागणारे साहित्य या ठिकाणी आढळून आले होते. कंपनीत काम करणाऱ्या १५ कामगारांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. हे कामगार आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील आहेत. कंपनीचा सुरु करणार मुळ सुत्रधार दक्षिण भारतातील असल्याचे समोर आले असून त्याचा शोध सुरु आहे. ज्या फार्म हाऊस मध्ये ही कंपनी सुरु होती. त्या मुंबईतील फार्म हाऊस मालकाची शोध पोलीसांनी सुरू केला आहे.

Loading

Facebook Comments Box

२६ ऑक्टोबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग
  • तिथि-दशमी – 29:26:43 पर्यंत
  • नक्षत्र-आश्लेषा – 09:46:38 पर्यंत
  • करण-वणिज – 16:22:21 पर्यंत, विष्टि – 29:26:43 पर्यंत
  • पक्ष-कृष्ण
  • योग-शुक्ल – 29:56:16 पर्यंत
  • वार-शनिवार
  • सूर्योदय-06:36:21
  • सूर्यास्त-18:07:36

दिनविशेष
महत्त्वाच्या घटना:
  • १७७४: फिलाडेल्फिया येथे अमेरिकेतील पहिली महाद्विपीय कॉंग्रेस स्थगित झाली होती.
  • १८५८: एच. इ. स्मिथ यांनी वाशिंग मशीन चा पेटेंट घेतलं.
  • १८६३: जगातील सर्वात जुने फुटबॉल असोसिएशन लंडनमध्ये सुरु झाले.
  • १९०५: नॉर्वे स्वीडनपासुन स्वतंत्र झाला.
  • १९३६: हूवर धरणांवरील पहिले इलेक्ट्रिक जनरेटर पूर्णपणे सुरु झाले.
  • १९४७: जम्मू आणि काश्मीरचे राज्य भारतात विलीन झाले.
  • १९५८: पॅन अमेरिकन एअरवेज ची पहिले व्यावसायिक विमानसेवा सुरु झाली.
  • १९६२: धी गोवा हिन्दू असोसिएशन निर्मित, वसंत कानेटकर लिखित व मास्टर दत्ताराम दिग्दर्शित ’रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबई येथील भारतीय विद्याभवन येथे झाला.
  • १९७६: त्रिनिदाद व टोबॅगो देशांना लंडन कडून स्वातंत्र्य मिळालं.
  • १९९४: जॉर्डन आणि इस्त्राएल यांनी शांतता करारावर सह्या केल्या.
  • १९९९: राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) संशोधक व्ही. व्ही. रानडे यांना केंद्र सरकारतर्फे ’स्वर्णजयंती फेलोशिप’ जाहीर
  • २००६: महिलांचे कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण प्रतिबंधक नियम अंमलात.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १२७०: संत नामदेव (मृत्यू: ३ जुलै १३५०)
  • १८८१: भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक, कायदेपंडित व राजकीय नेते बीरेंद्रनाथ ससमल यांचा जन्मदिन.
  • १८८६: ओडिसा राज्यातील उल्लेखनीय समाजवादी व कवी पंडित गोदाबरीश मिश्रा यांचा जन्मदिन.
  • १८८८: प्रसिद्ध बंगाली लेखक व साहित्यक समीक्षक मोहितलाल मजुमदार यांचा जन्मदिन.
  • १८९०: भारतीय पत्रकार आणि राजकारणी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९३१)
  • १८९१: वैकुंठ मेहता – सहकारी चळवळीचे प्रवर्तक (मृत्यू: २७ आक्टोबर १९६४)
  • १९००: इर्झा मीर – माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक (मृत्यू: ७ मार्च १९९३)
  • १९१६: फ्रान्सवाँ मित्राँ – फ्रान्सचे २१ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ८ जानेवारी १९९६)
  • १९१९: मोहम्मद रझा पेहलवी – शाह ऑफ इराण (मृत्यू: २७ जुलै १९८०)
  • १९२४: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय स्त्रीवादी सामाजिक कार्यकर्ता व गांधीवादी शोभना रानडे यांचा जन्मदिन.
  • १९३७: हृदयनाथ मंगेशकर – संगीतकार व गायक
  • १९४७: हिलरी क्लिंटन – अमेरिकेच्या ६७ व्या परराष्ट्रमंत्री
  • १९५४: नाट्य आणि चित्रपट अभिनेते लाक्शीकांत बेर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १६ डिसेंबर २००४)
  • १९७४: रवीना टंडन – अभिनेत्री
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९०९: इटो हिरोबुमी – जपानचे पहिले पंतप्रधान (जन्म: १६ आक्टोबर १८४१)
  • १९३०: डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (जन्म: १५ मार्च १८६०)
  • १९४७: ब्रिटीश कालीन भारतातील बंगाल प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड लिटन द्वितीय यांचे निधन.
  • १९५५: हिंदुस्थानी शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रेय विष्णू पलुस्कर यांचे निधन.
  • १९७९: चंदूलाल नगीनदास वकील – अर्थशास्त्रज्ञ, देशातील पहिल्या अर्थशास्त्र विभागाची त्यांनी मुंबई विद्यापीठात सुरुवात केली. (जन्म: ? ? ????)
  • १९८१: भारतीय पद्मश्री व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय कन्नड भाषिक कवी दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांचे निधन.
  • १९९१: अनंत काशिनाथ भालेराव – स्वातंत्र्यसैनिक, लेखक, दैनिक ’मराठवाडा’ चे संपादक, हैदराबाद मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग (जन्म: १४ नोव्हेंबर १९१९)
  • २०००: भारतीय स्वतंत्रता संग्रामातील प्रमुख क्रांतिकारक व सिद्धहस्त लेखक तसचं, हिंदी, इंग्रजी व बांग्ला बाषिक आत्मकथाकारसाहित्यिक मन्मथनाथ गुप्ता यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

चिपी-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून बंद होणार?

   Follow us on        

सिंधुदुर्ग : चिपी-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. चिपी-मुंबई विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. मात्र त्याची मुदत येत्या २६ ऑक्टोबर रोजी संपणार असल्याने हवाई प्रवासाची तिकीट विक्री २६ तारखेपासून बंद होणार आहे.

ही विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. मात्र, आता चिपी-मुंबई विमानसेवा बंद होत आहे. त्यामुळे ऐन दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.

दरम्यान, चिपी-मुंबई या विमानसेवेला प्रवासी वर्गाचा सकारात्मक प्रतिसाद होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या काळात ही विमानसेवा बंद होत आहे. सामान्य जनता या विमान सेवेच्या लाभापासून वंचित राहणार असल्यामुळे अनेक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search