२३ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-नवमी – 17:40:34 पर्यंत
  • नक्षत्र-विशाखा – 29:09:03 पर्यंत
  • करण-गर – 17:40:34 पर्यंत, वणिज – 30:38:56 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-गण्ड – 29:05:47 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:25
  • चन्द्र-राशि-तुळ – 22:33:26 पर्यंत
  • चंद्रोदय- 26:30:00
  • चंद्रास्त- 12:58:00
  • ऋतु- शिशिर

जागतिक दिवस:
  • राष्ट्रीय कुष्ठारोग प्रतिबंध अभियान दिवस.
महत्त्वाच्या घटना:
  • १५६५: विजयनगर साम्राज्याची अखेर
  • १७०८: छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला. त्याच दिवशी सातारा ही राज्याची नवी राजधानी जाहीर केली गेली.
  • १७९३: आजच्या दिवशी ह्यूमन सोसाइटी ऑफ़ फिलाडेल्फिया ला संघटीत केल्या गेले.
  • १८४९: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल ही वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर बनली.
  • १९२७: मॅडलिन ऑलब्राई ह्या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्र मंत्री बनल्या.
  • १९३२: ’प्रभात’च्या ’अयोध्येचा राजा’ची हिन्दी आवृत्ती ’अयोध्याका राजा’ मुंबईत प्रदर्शित झाली.
  • १९४३: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने त्रिपोली (लिबीयाची राजधानी) शहर जिंकले.
  • १९६६: आजच्या दिवशी इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
  • १९६८: शीतयुद्ध – उत्तर कोरियाने अमेरिकेची यू. एस. एस. प्युएब्लो ही युद्धनौका ताब्यात घेतली.
  • १९७३: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी व्हिएतनाम बरोबर शांतता करार झाल्याचे जाहीर केले.
  • १९७७: जयप्रकाश नारायण यांनी जनता पार्टी ची स्थापना केली.
  • १९९७: मॅडलिन ऑलब्राईट या अमेरिकेच्या पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री बनल्या.
  • २००२: वॉल स्ट्रीट जर्नलचा पत्रकार डॅनिअल पर्ल याचे कराचीतुन अपहरण
  • २००२: ला भारतीय उपग्रह इनसेट-3सी ला प्रक्षेपित केल्या गेले.
  • २००९: ला टेलिव्हिजन कार्यक्रमांमध्ये धुम्रपानाच्या दृश्यांवरून बंदी हटवल्या गेली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८१४: सर अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतातील पुरातत्त्व संशोधनाची मुहूर्तमेढ करणारे ब्रिटिश अधिकारी (मृत्यू: २८ नोव्हेंबर १८९३)
  • १८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस (मृत्यू: १८ ऑगस्ट १९४५ – फोर्मोसा, तैवान)
  • १८९८: पं. शंकरराव व्यास – गायक व संगीतशिक्षक, पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे शिष्य (मृत्यू: १७ डिसेंबर १९५६)
  • १९१५: कमलनयन बजाज – उद्योगपती, जमनालाल बजाज यांचे चिरंजीव, बजाज आटो, बजाज इलेक्ट्रिकल्स, उदयपूर सिमेंट इ. कंपन्यांचे अध्यक्ष (मृत्यू: १ मे १९७२)
  • १९२०: श्रीपाद रघुनाथ जोशी – व्यासंगी लेखक (मृत्यू: ? ? २००२)
  • १९२६: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (मृत्यू: १७ नोव्हेंबर २०१२)
  • १९३०: साहित्यामध्ये नोबेल पुरस्कार विजेते असलेले डेरेक वॉलकोट यांचा जन्म.
  • १९३४: सर विल्यम हार्डी – ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ६ एप्रिल १८६४)
  • १९४७: मेगावती सुकार्नोपुत्री – इंडोनेशियाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष
  • १९८७: भारतीय चित्रपट कलाकार दुष्यंत वाघ चा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • १६६४: शहाजी राजे भोसले यांचे कर्नाटकातील होदेगिरीच्या जंगलात शिकार करताना घोडा अडखळून पडल्याने अपघाती निधन (जन्म: १८ मार्च १५९४)
  • १९१९: राम गणेश गडकरी – नाटककार, कवी व विनोदी लेखक. ते ’गोविन्दाग्रज’ या टोपणनावाने कथालेखन करीत तर ’बाळकराम’ या नावाने विनोदी लेखन करीत. ‘प्रेमसंन्यास‘, ‘पुण्यप्रभाव‘, ‘एकच प्याला‘, ‘भावबंधन‘, ‘राजसंन्यास‘ ही त्यांची नाटके अतिशय गाजली. ’वाङ्वैजयंती’ नावाने त्यांच्या कविता संग्रहित केलेल्या आहेत. (जन्म: २६ मे १८८५)
  • १९३१: अ‍ॅना पाव्हलोव्हा – ’द डाइंग स्वान’ म्हणून प्रसिद्ध असलेली रशियन बॅलेरिना (जन्म: १२ फेब्रुवारी १८८१)
  • १९५९: विठ्ठल नारायण चंदावरकर – शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित (जन्म: ? ? ????)
  • १९६३: ला भारतीय स्वातंत्र्य सैनिक नरेंद्र मोहन सेन यांचे निधन.
  • १९६४: छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील छत्रपती शहाजी महाराजांचे निधन.
  • १९८९: साल्वादोर दाली – स्पॅनिश चित्रकार. विसाव्या शतकात पिकासोच्या खालोखाल प्रसिद्धी व लोकप्रियता मिळवलेले चित्रकार म्हणून ते ओळखले जातात. (जन्म: ११ मे १९०४)
  • १९९२: ह. भ. प. धुंडामहाराज देगलूरकर – भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
  • २०१०: पं. दिनकर कैकिणी – शास्त्रीय गायक (जन्म: २ आक्टोबर १९२७)
  • २०१५: ला सौदी अरेबियाचे राजे अब्दुल्ला यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Jalgaon Railway Accident: आगीच्या अफवेने घेतला सात ते आठ जणांचा बळी

   Follow us on        

Jalgaon Railway Accident : नुसत्या एका आगीच्या अफवेने सात ते आठ प्रवाशांचा जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार आज जळगावला घडला. मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसला आग लागल्याच्या भीतीनं काही प्रवाशांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसनं त्यांना चिरडलं. या अपघातात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जळगावातील परांडा स्टेशनजवळ हा अपघात झाला.

मुंबईकडे निघालेल्या पुष्पक एक्स्प्रेसनं अचानक ब्रेक लावल्यानं त्या ठिकाणी आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यामुळे तिथे आग लागल्याचा काही प्रवाशांचा समज झाला. आग लागल्याच्या भीतीनं प्रवासी घाबरले. त्यांनी चालत्या ट्रेनमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरुन बंगळुरु एक्स्प्रेस येत होती. उड्या मारणारे प्रवासी बंगळरु एक्स्प्रेसच्या खाली चिरडले गेले. अपघातात सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. रेल्वे प्रशासनाकडून मदत घेतली जात असून जखमींवर उपचार केले जात आहेत. घटनास्थळी बचाव पथक पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली.

Facebook Comments Box

कोकण रेल्वे मार्गावर धावणार नवीन अमरावती – वीर – नवीन अमरावती अनारक्षित विशेष गाडी

   Follow us on        

पनवेल: कोकण रेल्वे मार्गावर नवीन अमरावती ते कोकण रेल्वेच्या वीर स्थानका दरम्यान एक विशेष अनारक्षित गाडी चालविण्यात येणार आहे. या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण दोन फेऱ्या होणार आहेत.

०११०१ नवीन अमरावती – वीर अनारक्षित विशेष गाडी गुरुवार दि. ६ फेब्रुवारी, २०२५ दुपारी १५:३० ला नवीन अमरावती येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:४५ ला वीर येथे पोहोचेल.

०११०२ वीर – नवीन अमरावती अनारक्षित विशेष गाडी मंगळवार दि. ११ फेब्रुवारी, २०२५ रात्री २२:०० ला वीर येथून सुटेल व दुसऱ्या दिवशी दुपारी १२:३० ला नवी अमरावती येथे पोहोचेल.

या गाडीला बडनेरा, मुर्तुजापूर,अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल आणि रोहा येथे थांबे देण्यात आले आहेत.

ही गाडी पूर्णपणे अनारक्षित स्वरूपाची असून तिला १६ अनारक्षित डबे आणि २ एसएलआर डबे जोडण्यात येणार आहेत.

Facebook Comments Box

दावोसमध्ये महाराष्ट्र ‘Unstoppable’. आतापर्यंत झालेत 4 लाख 99 हजार 321 कोटींचे 20 सामंजस्य करार; यादी ईथे वाचा

   Follow us on        

Davos Parishad 2025: दावोसमध्ये होणाऱ्या जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिल्झर्लंड दौऱ्यावर गेलेत. या परिषदेमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी गुंतवणूक होत असून काल एकाच दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात विक्रमी 4 लाख 99 हजार 321 कोटींच्या गुंतवणुकीचे एकूण 20 सामंजस्य करार केले आहेत. यातून सुमारे 92,235 इतकी रोजगारनिर्मिती होणार आहे. गडचिरोली, पुणे, रत्नागिरी, नागपूर या भागांमध्ये विविध कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. उद्या आणखी कंपन्यांमध्ये करार होण्याची शक्यता आहे.

आता पर्यंत झालेले सामंजस्य करार 

1) कल्याणी समूह:

क्षेत्र : संरक्षण, स्टील, ईव्ही

गुंतवणूक : 5200 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : गडचिरोली

 

2) रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लि.

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 16,500 कोटी

रोजगार : 2450

कोणत्या भागात : रत्नागिरी

 

3) बालासोर अलॉय लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 17,000 कोटी

रोजगार : 3200

 

 

4) विराज प्रोफाईल्स प्रा. लि.

क्षेत्र : स्टील आणि मेटल्स

गुंतवणूक : 12,000 कोटी

रोजगार : 3500

कोणत्या भागात : पालघर

 

5) एबी इनबेव

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 750 कोटी

रोजगार : 35

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

 

6) जेएसडब्ल्यू समूह

क्षेत्र : स्टील, नवीनीकरणीय ऊर्जा, पायाभूत सुविधा, सिमेंट, लिथियम-आयर्न बॅटरिज, सोलर वेफर आणि सेल मॉड्युल्स

गुंतवणूक : 3,00,000 कोटी

रोजगार : 10,000

कोणत्या भागात : गडचिरोली

 

7) वारी एनर्जी

क्षेत्र : हरित ऊर्जा, सौर उपकरणे

गुंतवणूक : 30,000 कोटी

रोजगार : 7500

कोणत्या भागात : नागपूर

 

8) टेम्बो

क्षेत्र : संरक्षण

गुंतवणूक : 1000 कोटी

रोजगार : 300

कोणत्या भागात : रायगड

 

9) एल माँट

क्षेत्र : पायाभूत सुविधा

गुंतवणूक : 2000 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : पुणे

 

10) ब्लॅकस्टोन

क्षेत्र : माहिती तंत्रज्ञान

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 1000

कोणत्या भागात : एमएमआर

 

11) ब्लॅकस्टोन आणि पंचशील रियालिटी

क्षेत्र : डेटा सेंटर्स

गुंतवणूक : 25,000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर

 

12) अवनी पॉवर बॅटरिज

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 10,521 कोटी

रोजगार : 5000

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

 

13) जेन्सोल

क्षेत्र : इलेक्ट्रॉनिक्स

गुंतवणूक : 4000 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : छत्रपती संभाजीनगर

 

14) बिसलरी इंटरनॅशनल

क्षेत्र : अन्न आणि पेये

गुंतवणूक : 250 कोटी

रोजगार : 600

कोणत्या भागात : एमएमआर

 

15) एच टू ई पॉवर

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 10,750 कोटी

रोजगार : 1850

कोणत्या भागात : पुणे

 

16) झेड आर टू समूह

क्षेत्र : ग्रीन डायड्रोजन अँड केमिकल्स

गुंतवणूक : 17,500 कोटी

रोजगार : 23,000

 

17) ब्ल्यू एनर्जी मोटर्स

क्षेत्र : ऑटोमोबाईल्स, ईव्ही

गुंतवणूक : 3500 कोटी

रोजगार : 4000

कोणत्या भागात : पुणे

 

18) इस्सार (ब्ल्यू एनर्जीसोबत सहकार्याने)

क्षेत्र : हरित ऊर्जा

गुंतवणूक : 8000 कोटी

रोजगार : 2000

 

19) बुक माय शो

क्षेत्र : करमणूक

गुंतवणूक : 1700 कोटी

रोजगार : 500

कोणत्या भागात : एमएमआर

 

20) वेल्स्पून

क्षेत्र : लॉजिस्टीक

गुंतवणूक : 8500 कोटी

रोजगार : 17,300

 

 

Facebook Comments Box

अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरण तपासात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल टेरव रत्नागिरीचे सुपुत्र सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कदम यांचा प्रशंसापत्र देवून गौरव

   Follow us on        

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील टेरव गावातील दत्तवाडीचे सुपुत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश सुरेशराव कदम, विलेपार्ले पोलीस ठाणे, मुंबई यांनी अथक परिश्रम, कौशल्य, सातत्य व चिकाटीने सिने अभिनेते सैफ अली खान यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या बांगला देशी नागरिकत्व असलेल्या आरोपीला अटक करणाऱ्या पथकामध्ये सहभागी होऊन ३५० सरकारी व खाजगी सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करून, तांत्रिक कौशल्याचा वापर व दिवस रात्र तपास करून आरोपीस शिताफीने अटक केले.

सदर उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्माननीय सत्यनारायण चौधरी पोलिस सह. आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) बृहन्मुंबई यांनी प्रशंसापत्र देवून महेश कदम यांचं गौरव केला आहे. तसेच जय भवानी ग्रामोन्नती मंडळ मुंबई, सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत टेरव, मंदिर व्यवस्थापन समिती टेरव, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट मुंबई, दसपटी क्रीडा मंडळ मुंबई, रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट मजरे दादर, समस्त ग्रामस्थ टेरव यांनी व इतर अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

कुलस्वामीनी श्री भवानी व ग्रामदैवत श्री वाघजाई मातेच्या कृपाशीर्वादाने उत्तरोत्तर महेशराव यांची अशीच प्रगती होत राहो अशी सदीच्छा टेरव ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

Facebook Comments Box

२२ जानेवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-अष्टमी – 15:21:09 पर्यंत
  • नक्षत्र-स्वाति – 26:35:03 पर्यंत
  • करण-कौलव – 15:21:09 पर्यंत, तैतुल – 28:34:08 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शूल – 28:36:48 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:17
  • सूर्यास्त- 18:23
  • चन्द्र-राशि-तुळ
  • चंद्रोदय- 25:37:00
  • चंद्रास्त- 12:20:00
  • ऋतु- शिशिर

महत्त्वाच्या घटना:
  • १९०१: राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.
  • १९२४: रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
  • १९४७: भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर
  • १९६३: डेहराडून येथे अंधांसाठी राष्ट्रीय ग्रंथालय स्थापन केले.
  • १९७१: सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
  • १९९२: रॉबर्टा बॉन्डर ह्या अवकाशात जाणाऱ्या पहिला महिला ठरल्या.
  • १९९९: ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
  • २००१: ’आय. एन. एस. मुंबई’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.
  • २००६: इवा मोराल्स यांनी बोलीवियाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली.
  • २०१५: बेटी बचाओ, बेटी पढाओ या योजनेची स्थापना विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पानिपत हरियाणा येथे झाली.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५६१: सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (मृत्यू: ९ एप्रिल १६२६)
  • १८७७: आसाम चे प्रमुख कार्यकर्ते तरुण राम फुकन यांचा जन्म.
  • १८९२: भारताचे स्वातंत्र्य सैनिक ठाकुर रोशन सिंह यांचा जन्म.
  • १८९६: कवी सुर्यकांत त्रिपाठी उर्फ निशाला यांचा जन्म.
  • १८९७: भारताचे प्रसिद्ध गायक दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.
  • १८९९: हिंदुस्तानी संगीतज्ज्ञ दिलीप कुमार रॉय यांचा जन्म.
  • १९०९: यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)
  • १९११: मराठी लेखक अनिरुद्ध घनश्याम रेळे यांचा जन्म.
  • १९१६: हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (मृत्यू: १५ जानेवारी १९९४)
  • १९१६: सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक, चलती का नाम गाडी
  • १९२०: प्रा. ह. श्री. शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक (मृत्यू: ? ? ????)
  • १९२२: मराठी लेखिका शांता बुध्दिसागर यांचा जन्म.
  • १९३४: विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
  • १९४९: त्रिपुरा चे माजी मुख्यमंत्री माणिक सरकार यांचा जन्म.
  • १९५८: दोस्ती [१९६४], रात और दिन [१९६७], आंसू बन गये फूल [१९६९], जीवन मृत्यू [१९७०] हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. (मृत्यू: ९ जून १९९३)
  • १९७३: अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने गर्भपाताला मान्यता दिली, कोणतीही महिला गर्भवती असताना ६ महिन्यांपर्यंत गर्भपात करू शकते.
  • १९९६: कॅलिफोर्निया च्या वेधशाळेतील शास्त्रज्ञांनी पृथ्वी पासून ३,५०,००० प्रकाश वर्ष इतक्या अंतरावर असलेल्या दोन नवीन ग्रहांचा शोध लावला.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १२९७: योगी चांगदेव समाधिस्थ (जन्म: ? ? ????)
  • १६६६: ५ वा मुघल सम्राट शहाजहान याचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन (जन्म: ५ जानेवारी १५९२)
  • १६८२: समर्थ रामदास स्वामी (जन्म: ? ? १६०८)
  • १७९९: होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे – ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक
  • १९०१: व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी, हिने ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य केले. हिच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे अशी ख्याती होती. व्हिक्टोरिया राणीच्या काळातच भारत इंग्लंडचा गुलाम झाला. (जन्म: २४ मे १८१९)
  • १९६७: डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)
  • १९७२: स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (जन्म: ३ आक्टोबर १९०३)
  • १९७३: लिंडन बी. जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
  • १९७५: ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)
  • १९७८: हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)
  • २००४: भारतीय चित्रपट अभिनेत्री मेनका देवी यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती सावंतवाडी स्थानकावर साजरी

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तर्फे आज सावंतवाडी रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती सावंतवाडी स्थानकात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रमुख सल्लागार जगदीश मांजरेकर, अभिमन्यु लोंढे, नंदू तारी, पुंडलिक दळवी, सुभाष शिरसाट संघटनेचे सचिव मिहिर मठकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, सुधीर राऊळ, साईल नाईक, विहंग गोठोस्कर, मेहुल रेडीज, सागर तळवडेकर, रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि प्रवासी उपस्थित होते
कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते कोकणात रेल्वे आणण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे.  त्यांच्यामुळे कोकणात रेल्वे आणण्याचे अशक्य कार्य पूर्णत्वास आले. त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा यासाठी सावंतवाडी टर्मिनसला प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने लावून धरली आहे. या मागणी व्यतिरिक्त सावंतवाडी  टर्मिनस चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, या स्थानकावर महत्वाच्या नियमित गाडयांना थांबे देण्यात यावेत आणि इतर मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी संघटनेने येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला  ‘रेल रोको’ आंदोलन करायचे ठरविले आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेने केले आहे.
Facebook Comments Box

कोंकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती पनवेल स्थानकावर साजरी

   Follow us on        
पनवेल: कोंकण रेल्वेचे शिल्पकार माजी केंद्रीय मंत्री स्वगीय प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती आज मंगळवार दि.२१ जानेवारी,२०२५ रोजी पनवेल रेल्वे स्टेशनवर साजरी करण्यात आली. यासमयी पनवेल स्टेशन मॅनेजर केएस अग्रवाल व पनवेल रेल्वे पोलीस ठाणेचे पोनि तांबोळी यानी प्रतिमेस हार घालून आदराजली वाहीली,
यावेळी  महाराष्ट्र रेल्वे प्रवाशी महासंघ  व नवी मुंबई रेल्वे प्रवासी वेल्फेअर असो. अध्यक्ष तथा सेंट्रल कमिटी सदस्य ( ZRUCC Member ) श्री.अभिजीत  धुरत व आर.पी.आय्.(आर्.के )चे अध्यक्ष मा.राजाराम खरात साहेब,अश्वत्थामा ज्येष्ठ  नागरिक संघ नवीन पनवेलचे  अध्यक्ष श्री.प्रकाश विचारे,समाजसेविका रत्नमाला पाबळेकर,अॅड संजय गंगनाईक, डिप्टी स्टेशन मॅनेजर राकेश तिवारी, अॅड  यशवंत पाटील, महासंघाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुर्यकांत वाघमारे,रेणूका सांळुखे, संजीवनी पोसतांडेल सुरेन्द्र नेमळेकर,, श्रीविदया सरवणकर,एसके पाटील, डीजी मगरे, साहेबराव जाधव, काशीनाथ भोईर, चंदोदय वाघमारे इतर,मोठ्या संख्येने रेल्वे प्रवासी, रेल्वे कर्मचारी उपस्थित होते
Facebook Comments Box

Konkan Railway: तेजस एक्सप्रेसचे इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

   Follow us on        

Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसचे इंजिन रत्नागिरी करबुडे दरम्यान बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. या एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडण्यात आल्याने एका तासाने या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. मात्र या मार्गावरील काही गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. तर आज प्रस्थान करणारी गाडी क्रमांक २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस आज संध्याकाळी १८.०५ वाजता पुनर्नियोजित Rescheduled करण्यांत आली आहे.

कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस ही रेल्वे गाडी रत्नागिरी करबुडे दरम्याने आली असता या गादीचे इंजिन अचानक बंद पडले. हा प्रकार मंगळवार २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या ठीक ठिकाणी थांबवण्यात आल्या. इंजिन नादुरुस्त झाल्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एका तास खोळंबा झाला.

रत्नागिरी रेल्वे स्थानकातून नवीन इंजिन मागवण्यात येऊन तेजस एक्सप्रेस ही गाडी एका तासानंतर मार्गस्थ करण्यात आली. तेजस या गाडीला दुसरे इंजिन जोडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या मार्गावरील दिवा – सावंतवाडी, सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस, मडगाव – सीएसएमटी मांडवी, सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस या  गाड्या २ ते ३ तास उशिराने धावत आहेत.

Facebook Comments Box

Mumbai Local: पाश्चिम रेल्वे मार्गावर रुळाला तडे; मोठा अनर्थ टळला, वाहतुक रखडली

 

   Follow us on        

Mumbai Local: पश्चिम रेल्वेच्या वैतरणास्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब समोर आली आहे. हा प्रकार रेल्वे प्रशासनाच्या वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला असून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या पालघर स्थानकावर थांबवण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईकडे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वैतरणा स्थानकाजवळ मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील रेल्वे रुळाला तडा गेल्याची बाब आज सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तात्काळ या मार्गावरील गाड्या पालघर स्थानकावरच रोखल्या. वेळीच खबरदारी घेण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला.

या घटनेमुळे मुंबईच्या दिशेने होणारी वाहतुक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे सकाळी कामाला जाणार्‍या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. रूळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे रेल्वे अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search