१० डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 27:45:08 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 13:31:09 पर्यंत
  • करण-तैतुल – 16:56:36 पर्यंत, गर – 27:45:08 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्यतापता – 22:02:30 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 07:03
  • सूर्यास्त- 18:00
  • चन्द्र-राशि-मीन
  • चंद्रोदय- 13:52:59
  • चंद्रास्त- 26:36:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • अल्फ्रेड नोबेल दिवस
महत्त्वाच्या घटना:
  • १७९९: ला जगात सर्वात आधी फ्रांसने आजच्या दिवशी मेट्रिक सिस्टम चा उपयोग केला.
  • १८६८: पॅलेस ऑफ वेस्टमिन्स्टर, लंडन येथे पहिले वाहतुक नियंत्रक दिवे (traffic signals) बसवण्यात आले. सुरुवातीला हे रेल्वेच्या सिग्नल्स (semaphore) सारखे होते आणि रात्री प्रकाशित करण्यासाठी लाल व हिरव्या रंगाच्या गॅसच्या दिव्यांचा वापर करण्यात येत असे.
  • १८८७: ला आस्ट्रिया, हंगरी, इटली और ब्रिटेन या देशांनी बाल्कन सैन्य करारावर सह्या केल्या.
  • १९०१: नोबेल पारितोषिकांचे प्रथमच वितरण करण्यात आले.
  • १९०२: तस्मानिया मध्ये आजच्या दिवशी महिलांना मतदान करण्याचा अधिकार मिळाला.
  • १९०२: कर्नाटक चे माजी मुख्यमंत्री एस. निजलिंगप्पा यांचा जन्म.
  • १९०३: पियरे क्यूरी और मैरी क्यूरी यांना भौतिक शास्त्रातील नोबल पुरस्कार मिळाला.
  • १९०६: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष थिओडोर रुझवेल्ट यांना नोबेल शांति पुरस्कार देण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले अमेरिकन होत.
  • १९१६: ’संगीत स्वयंवर’ या संगीत नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
  • १९४८: मानवी हक्क दिन.
  • १९६२: ला नोबेल पुरस्कार विजेता अल्बर्ट लूथली यांनी दक्षिण आफ्रिकी मध्ये वर्णभेद समाप्त करण्याची अपील केली.
  • १९७८: ईस्त्रायलचे अध्यक्ष मेनाकेम बेगिन आणि सीरीयाचे अध्यक्ष अन्वर सादात यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • १९९८: अर्थशास्त्र मध्ये नोबेल पारितोषिक अर्थतज्ञ प्रा. अमर्त्य सेन यांना प्रदान.
  • २०००: ला पाकिस्तान च्या माजी प्रधानमंत्री नवाज शरीफ यांना पाकिस्तान मधून १० वर्षासाठी हद्दपार करण्यात आले.
  • २००२: ला अमेरिकेची दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी यूनाइटेड एयरलाइंस पूर्णपणे कंगाल घोषित करण्यात आली.
  • २००३: भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर यांनी कसोटी क्रिकेट मध्ये ३५वे शतक केले.
  • २००४: ला अनिल कुंबळे ने कपिल देव ला मागे टाकत कसोटी सामन्यात सर्वात जास्त विकेट घेणारे पहिले भारतीय बनले.
  • २००८: प्रा. अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले.
  • २०१४: भारताचे कैलाश सत्यर्थी आणि पाकिस्तानची मलाला युसुफझाई यांना संयुकतपणे नोबेल शांति पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • २०१५: सालमन खान यांना सदोष मनुष्यवधाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८७०: सर यदुनाथ सरकार – औरंगजेबाचे पाच खंडात विस्तृत चरित्र लिहिणारे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे इतिहासकार (मृत्यू: १९ मे १९५८)
  • १८७८: चक्रवर्ती राजगोपालाचारी – भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल, मद्रास इलाख्याचे मुख्यमंत्री, स्वातंत्र्यसेनानी, कायदेपंडित, मुत्सद्दी आणि लेखक (मृत्यू: २५ डिसेंबर १९७२)
  • १८८०: डॉ. श्रीपाद कृष्ण बेलवलकर – प्राच्यविद्यातज्ञ, संस्कृत पंडित. अमेरिकेच्या हॉर्वर्ड विद्यापीठात भवभूतीच्या उत्तर रामचरितावर प्रबंध लिहून त्यांनी डॉक्टरेट मिळवली. (मृत्यू: ८ जानेवारी १९६७ – पुणे)
  • १८९२: व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक (मृत्यू: १५ मार्च १९३७)
  • १९०८: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित तसेच पुरातत्व विज्ञान मध्ये तज्ञ असलेले हसमुख धीरजलाल संकलीया यांचा जन्म.
  • १९०८: भारतीय पुरातत्वावेत्ते हसमुख धीरजलाल सांकलिया यांचा जन्म.
  • १९२८: लोक सभेचे सदस्य चंद्रकांत भंडारे यांचा जन्म.
  • १९५७: भारतीय-अमेरिकन गुरू आणि शिक्षक प्रेमा रावत यांचा जन्म.
  • १९६०: भारतीय चित्रपट सृष्टीच्या अभिनेत्री रती अग्निहोत्री यांचा जन्म.
  • १९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू धवल कुलकर्णी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८९६: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (जन्म: २१ आक्टॊबर १८३३)
  • १९२०: होरॅस डॉज – ’डॉज मोटर कंपनी’चे एक संस्थापक (जन्म: १७ मे १८६८)
  • १९५३: भारतीय-इंग्रजी विद्वान आणि अनुवादक अब्दुल्ला यूसुफ अली यांचे निधन. (जन्म: १४ एप्रिल १८७२)
  • १९५५: आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर – लेखक व गांधीवादी तत्त्वचिंतक (जन्म: २६ सप्टेंबर १८९४)
  • १९६४: शंकर गणेश दाते – ग्रंथसूचीकार (जन्म: १७ ऑगस्ट १९०५)
  • १९६३: सरदार कोवालम माधव तथा के. एम. पणीक्‍कर – भारताचे चीन, इजिप्त आणि फ्रान्समधील राजदूत, इतिहासपंडित (जन्म: ३ जून १८९५)
  • १९६३: आफ्रिकी देश झांझिबार यांनी आजच्या दिवशी ब्रिटन पासून स्वतंत्र घोषित केले.
  • १९९२: भारताच्या गुजरात मध्ये पहिली होवरक्राफ्ट सेवा सुरु झाली.
  • १९९४: यासिर अराफात, यित्जाक रॉबिन आणि शिमोन पेरेज यांना नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • १९९५: स्वातंत्र्य सैनिक चौधरी दिगंबर सिंह यांचे निधन.
  • १९९९: क्रोएशिया देशाचे पहिले अध्यक्ष फ्रांजो तुुममन यांचे निधन. (जन्म: १४ मे १९२२)
  • २००१: अशोक कुमार गांगूली ऊर्फ ‘दादामुनी’ – चित्रपट अभिनेते, पद्मश्री (१९६२), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८९), ५३ वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत सुमारे ४०० चित्रपटांत भूमिका केल्या (जन्म: १३ आक्टॊबर १९११)
  • २००३: श्रीकांत ठाकरे – संगीतकार (जन्म: ? ? ????
  • २००९: दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (जन्म: १७ सप्टेंबर १९३८)

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

402 वाचकांनी ही बातमी वाचली

Facebook Comments Box

०९ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि- अष्टमी – 08:04:55 पर्यंत, नवमी – 30:03:56 पर्यंत
  • नक्षत्र- पूर्वाभाद्रपद – 14:56:52 पर्यंत
  • करण- भाव – 08:04:55 पर्यंत, बालव – 19:06:47 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग- सिद्वि – 25:05:09 पर्यंत
  • वार- सोमवार
  • सूर्योदय- 07:03
  • सूर्यास्त- 18:00
  • चन्द्र राशि- कुंभ – 09:15:24 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:15:00
  • चंद्रास्त- 25:37:00

 

महत्त्वाच्या घटना:
  • १७५३: थोरले माधवराव पेशवे यांचा रमाबाई यांच्याशी विवाह झाला.
  • १७५८: मद्रास मध्ये सुरु झालेल्या तेरा महिन्यांच्या युद्धाला सुरुवात.
  • १८९२: इंग्लिश फुटबॉल क्लब न्यूकॅसल युनायटेडची स्थापना झाली
  • १८९८: बेलूर मठाची स्थापना झाली.
  • १९००: लॉन टेनिसमधील ’डेव्हिस कप’ स्पर्धांना सुरुवात झाली.
  • १९००: अमेरिकेतील सर्वधर्म परिषदेत भाग घेऊन स्वामी विवेकानंद भारतात मुंबईमध्ये परतले.
  • १९२४: हंगेरी आणि हॉलंड या दोन देशांमध्ये व्यापार करार झाला होता.
  • १९४१: चीन ने जर्मनी, इटली, आणि जपान यांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा केली.
  • १९४६: दिल्लीमध्ये घटना परिषदेची पहिली बैठक.
  • १९६१: पोर्तुगीज यांच्या ताब्यात असलेले दिव व दमण हे प्रांत भारतात समाविष्ट केले.
  • १९६१: ब्रिटन पासुन स्वतंत्र होऊन टांझानिया (Tanganyika) देशाचा जन्म
  • १९६६: बार्बाडोसचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
  • १९७१: संयुक्त अरब अमिरातींचा संयुक्त राष्ट्रसंघात (United Nations) प्रवेश.
  • १९७५: बारामती-पुणे थेट रेल्वेचा शुभारंभ.
  • १९९८: शेन वार्न और मार्क वॉ या दोघांनी १९९४ मध्ये श्रीलंका दौऱ्यावर असताना एका पाकिस्तान सट्टेबाजा कडून काही रक्कम घेतल्याची कबुली केली.
  • २००२: जॉन स्नो अमेरिकेचे नवीन अर्थमंत्री बनले.
  • २००६: पाकिस्तान ने अणु क्षमता असलेले क्षेपणास्त्र हत्फ़-3 गजनवी चे यशस्वी प्रक्षेपण केले.
  • २००७: पाकिस्तान च्या माजी प्रधानमंत्री बेनजीर भुट्टो यांनी पाकिस्तान सरकार सोबत पूर्णप्रकारे त्यांचे संबंध समाप्त केले.
  • २००८: इस्त्रो ने युरोप च्या प्रसिद्ध कंपनी एडीएम एस्ट्रीयस साठी नवीन उपग्रहाचे निर्माण केले होते.
  • २०१३: इंडोनेशिया मेंबिनटारो च्या जवळ एका ट्रेन अपघातात ६३ लोक जखमी झाले होते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १५०८: डच गणिती आणि नकाशे तज्ञ गेम्मा फ्रिसियस यांचा जन्म.
  • १४७८: भारताचे प्रसिद्ध कवी संत सूरदास यांचा जन्म.
  • १६०८: जॉन मिल्टन – कवी, विद्वान व मुत्सद्दी (मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४)
  • १८२५: भारताचे प्रमुख नायक राव तुला राम यांचा जन्म.
  • १८६८: फ्रिटझ हेबर – नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले (१९१८) जर्मन रसायनशास्त्रज्ञ. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ – बाझेल, स्वित्झर्लंड)
  • १८७०: भारतीय डॉक्टर आणि मिशनरी आयडा एस स्कडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)
  • १८७८: अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (मृत्यू: १६ मे १९५०)
  • १८८९: मध्ये आसाम मधील प्रथम असहयोगी चळवळीतील नेते चन्द्रनाथ शर्मा यांचा जन्म.
  • १९१३: पहिली महिला फोटोग्राफर होमी व्यारावाला यांचा जन्म.
  • १९१८: भारताचे प्रसिद्ध नाटककार कुशवाहा कान्त यांचा जन्म.
  • १९१९: केरळचे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांचा जन्म.
  • १९२२: अमेरिकेचे हास्यकलाकार रेड फॉक्स्स यांचा जन्म.
  • १९२९: प्रसिद्ध भारतीय कवी रघुवीर सहाय यांचा जन्म.
  • १९४६: सोनिया गांधी – जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी
  • १९४६: चित्रपट अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म.
  • १९८१: अभिनेत्री दिया मिर्झा यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७६१: हंबीरराव मोहिते यांच्या पुत्री ताराबाई यांचे निधन.
  • १९७१: भारतीय नौसेना सैनिक महेंद्रनाथ मुल्ला यांचे निधन.
  • १९४२: डॉ. द्वारकानाथ कोटणीस – हिंदी चिनी मैत्रीचे प्रतीक (जन्म: १० आक्टोबर १९१०)
  • १९९३: चित्रपट अभिनेत्री स्नेहप्रभा प्रधान यांचे निधन.
  • १९९७: के. शिवराम कारंथ – कन्‍नड लेखक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणवादी, चित्रपट निर्माते आणि विचारवंत (जन्म: १० आक्टोबर १९०२ – कोटा, दक्षिण कन्नडा, कर्नाटक)
  • २००७: भारतीय लेखक त्रिलोचन शास्त्री यांचे निधन.
  • २००९: प्रसिद्ध तबला वादक उस्ताद हनीफ मोहम्मद खान यांचे निधन.
  • २०१२: बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९२१)
  • pacer height=”20px”]

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

376 वाचकांनी ही बातमी वाचली

Facebook Comments Box

Sleeper Vande Bharat : पहिल्या स्लीपर वंदे भारत एक्सप्रेसचा संभाव्य मार्ग जाहीर

   Follow us on        

Sleeper Vande Bharat : चेअर कार वंदे भारत ट्रेन सध्या देशभरात लोकप्रिय होत आहे. आता त्याचे स्लीपर व्हर्जन लवकरच उपलब्ध होणार आहे. स्लीपर वंदे भारतच्या मदतीने प्रवाशांना झोपून आरामात लांबचा प्रवास करता येणार आहे. शुक्रवारी रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी समोर आली असून लोकांची प्रतीक्षा संपली आहे. वंदे भारत स्लीपर ट्रेनचा पहिला प्रोटोटाइप तयार करण्यात आला असून तो ट्रॅकवर चाचणीसाठी तयार आहे. या ट्रेनची चाचणीही लवकरच सुरू होऊ शकते.

पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन कोणत्या तारखेपासून धावणार हे रेल्वेने अद्याप अधिकृतरित्या जाहीर केले नसले तरी पुढील वर्षी जानेवारीत धावणारी दिल्ली-श्रीनगर वंदे भारत स्लीपर ट्रेन व्हर्जनमध्ये चालवली जाऊ शकते आणि ही ट्रेन पहिली स्लीपर व्हर्जन ट्रेन असेल, अशी अपेक्षा आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत स्लीपर वंदे भारतबाबत अनेक महत्त्वाची माहिती दिली आहे.

यापूर्वी २ डिसेंबर रोजी रेल्वेमंत्र्यांनी ‘वंदे भारत’ या चेअर कारबाबत सांगितले होते की, सध्या अशा १३६ गाड्या धावत आहेत. यापैकी १६ वंदे भारत एक्स्प्रेस सेवा तामिळनाडू राज्यातील स्थानकांच्या गरजा पूर्ण करत आहेत. दिल्ली ते बनारस दरम्यान सर्वात लांब पल्ल्याच्या वंदे भारत ट्रेन धावत असून ती ७७१ किमी चे अंतर पार करते. राज्यसभेत अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी सध्या नियोजित वंदे भारत स्लीपर ट्रेन आधुनिक सुविधा आणि प्रवासी सुविधांनी सुसज्ज आहेत.

स्लीपर वंदे भारत ट्रेनचे फीचर्स –

1- ट्रेनमध्ये कवच तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

2- ही ट्रेन EN-45545 HL3 अग्निसुरक्षा मानकांनुसार असेल.

3-क्रॅशवर्थी आणि जर्क-फ्री सेमी परमानेंट कपलर आणि अँटी क्लाइंबर.

4- EN मानकांच्या  अनुरूप कारबॉडीचे क्रॅशवर्थी डिजाइन.

5- ऊर्जा दक्षतेसाठी अत्याधुनिक ब्रेकिंग सिस्टम.

6- इमरजन्सी स्थितीत प्रवासी आणि  ट्रेन व्यवस्थापक/लोको पायलट दरम्यान संवादासाठी आपातकालीन टॉक-बॅक यूनिट.

7- ट्रेनमध्ये सेंट्रली कंट्रोल्ड ऑटोमैटिक प्लग दरवाजे आणि रुंद गँगवे.

8-वरच्या बर्थवर चढण्यासाठी चांगल्या डिजाइनच्या शिड्या.

9- प्रत्येक कोचमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, एसी, सॅलून लायटिंग आदि सुविधा. यासोबतच आरसे व आकर्षक इंटेरिअर या ट्रेनमध्ये असणार आहे.

3138 वाचकांनी ही बातमी वाचली

Facebook Comments Box

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ‘या’ गाड्या पूर्ण क्षमतेने चालविण्याची गरज

कोकण रेल्वेच्या गाड्यांत जास्त मागणी आणि मर्यादित आसन उपलब्धता यामुळे वर्षभर गर्दी होत आहे. सध्या कोंकण रेल्वे मार्गाचा वापर दर Utilization  Rate 168% आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर ट्रेनची क्षमता वाढवण्याची तातडीची गरज आहे. सध्या कोकणरेल्वे, मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वे या विभागातर्फे  कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या  काही गाड्या आपल्या पूर्ण क्षमतेने धावत नसून त्यांची क्षमता वाढवण्यासाठी वाव आहे. कोकण विकास समितीने रेल्वे बोर्ड, विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री आणि  संबधीत आस्थापना आणि लोकप्रतिधींना या गोष्टीसाठी एक इमेलद्वारे मागणी केली आहे. या मागणी मध्ये कोकण रेल्वे मार्गावरील ज्या गाडयांची क्षमता वाढवता येणे शक्य आहे अशा गाड्यांची यादी आणि बदलांच्या शिफारशी देण्यात आल्या आहेत.
या शिफारशींची पूर्तता केल्याने अंदाजे 3,691 आसनांची (दररोज सुमारे 46 डबे) क्षमता वाढेल, ज्यामुळे प्रवाशांची सोय लक्षणीयरीत्या वाढेल आणि या अत्यंत वापरल्या जाणाऱ्या मार्गावरील गर्दी कमी होईल. नवीन रेल्वे सेवेची मागणी पाहता, या वाढीमुळे प्रवाशांना तात्काळ दिलासा मिळेल असे कोकण विकास समितीचे  जयवंत दरेकर यांनी या ई-मेल मध्ये नमूद केले  आहे.

4843 वाचकांनी ही बातमी वाचली

Facebook Comments Box

०८ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-सप्तमी – 09:46:31 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 16:03:47 पर्यंत
  • करण-वणिज – 09:46:31 पर्यंत, विष्टि – 20:58:12 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वज्र – 27:53:05 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 07:02
  • सूर्यास्त- 17;59
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 12:37:59
  • चंद्रास्त- 24:40:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • जपानमध्ये हा दिवस बोधी दिवस (Bodhi Day) म्हणून साजरा केला जातो.
महत्त्वाच्या घटना:
  • १७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला. मानाजी आंग्रे आणि खंडोजी मानकर यांच्या नेतृत्वाखाली मराठी आरमाराने हा विजय मिळवला.
  • १९२३: अमेरिका आणि जर्मनी मध्ये मित्रासंधी होऊन हस्ताक्षर झाले होते.
  • १९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलँड, हाँगकाँग, फिलिपाइन्स व डच इस्ट इंडिज वर हल्ला केला. याच्या एकच दिवस आधी जपानने अमेरिकेतील पर्ल हार्बरवर हल्ला चढवला होता.
  • १९५५: युरोप परिषदेने युरोपचा ध्वज अवलंबला.
  • १९५६: ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न येथे ऑलंपिक खेळांचा समारोप झाला.
  • १९६७: आयएनएस कलवारी भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आले.
  • १९७१: भारत पाक युद्ध – भारतीय आरमाराने पाकिस्तानातील कराची बंदरावर हल्ला केला.
  • १९७६: अमेरिका ने नेवादा येथे अणुबॉम्ब चाचणी केली होती.
  • १९८०: इंग्रजी संगीतकार जॉन लेलेन यांना त्यांच्या घराबाहेर एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर गोळीबार केला.
  • १९८५: सार्क परिषदेची स्थापना.
  • १९९८: कर्नल ह्यूगो शावेज यांनी व्हेनेझुएला चे राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला.
  • १९९८: ऑलंपिक च्या इतिहासात महिलांचा बर्फावर खेळल्या जाणारा हॉकी खेळाला खेळल्या गेले.
  • १९९८: फिनलँड ने स्वीडन ला ६-० ने बर्फावरील खेळल्या जाणाऱ्या हॉकी मध्ये हरवले होते.
  • २०००: ब्रिटन आणि रशिया या दोन देशांत सुरक्षा करार पार पडला.
  • २००३: जेव्हा राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये निलंबना चा काळ वाढविल्यामुळे झिंबाब्वे ने स्वतःला वेगळे करून घेतले.
  • २००३: वसुंधरा राजे ह्या राजस्थान च्या मुख्यमंत्री बनल्या.
  • २००३: उमा भारती ह्या मध्य प्रदेश च्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्या.
  • २००४: पाकिस्तान ने ७०० किलोमीटर दूर मारा करणारी शाहीन-१ नावाच्या क्षेपणास्त्राचे यशस्वी रित्या परीक्षण केले.
  • २००४: रवींद्रनाथ टागोर यांच्या चोरीस गेलेल्या नोबेल पदकाची प्रकृतीची स्वीडन सरकारने भेट दिली.
  • २००४: ख्रिश्चन ज्युनियर या फुटबॉलपटूच्या मृत्यूस कारण ठरलेल्या मोहन बागानचा गोळी सुब्रतो पॉलवर बंदी.
  • २००७: अमेरिकी संघटना NATA ने दक्षिणी अफगानिस्तान च्या मुसाकला जिल्ह्यात असलेल्या तालिबानी आतंकवाद्यांवर हल्ला केला होता.
  • २०१६: इंडोनेशियातील असेह प्रांतात ६.५ रिश्टर चा भूकंप. यात किमान ९७ लोक मृत्युमुखी.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १७२०: बालाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १७६१)
  • १७६५: एली व्हिटनी – कापसाच्या जिनिंग मशीनचा संशोधक (मृत्यू: ८ जानेवारी १८२५)
  • १८६१: जनरल मोटर्स आणि शेवरलेट चे संस्थापक विलियम सी. दुरंत यांचा जन्म. (मृत्यू: १८ मार्च १९४७)
  • १८७५: भारताचे स्वातंत्र्य सैनिक तेज बहादुर सप्रू यांचा जन्म.
  • १८७७: नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक (मृत्यू: १ मार्च १९५५)
  • १८९४: पॉपय कार्टून चे निर्माते ई. सी. सेगर यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑक्टोबर १९३८)
  • १८९७: पं. बाळकृष्ण शर्मा ऊर्फ ’नवीन’ – हिन्दी कवी. हिन्दीला राष्ट्रभाषा म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्‍न केले. (मृत्यू: २९ एप्रिल १९६०)
  • १९००: उदय शंकर – जागतिक कीर्तीचे नर्तक व नृत्यदिग्दर्शक, पद्मविभूषण (१९७१), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (१९६२) व फेलोशिप विजेते. त्यांनी अल्मोडा येथे ’इंडिया कल्चरल सेंटर’ची स्थापना केली. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९७७)
  • १९०१: भारताच्या संसद चे सदस्य अमरनाथ विद्यालंकार यांचा जन्म.
  • १९२७: पंजाब चे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांचा जन्म.
  • १९३५: धर्मेन्द्र – चित्रपट अभिनेता
  • १९४२: भारतीय क्रिकेटपटू हेमंत कानिटकर यांचा जन्म.
  • १९४४: शर्मिला टागोर – चित्रपट अभिनेत्री.
  • १९५१: नोर्थेन अंड शेल चे संस्थापक रिचर्ड डेसमंड यांचा जन्म
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १९४७: भारताचे स्वातंत्र्य सैनिक भाई परमानन्द यांचे निधन.
  • १९७८: गोल्डा मायर – शिक्षिका व इस्त्रायलच्या ४ थ्या पंतप्रधान (जन्म: ३ मे १८९८)
  • २००४: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन.
  • २०१३: नोबेल पारितोषिके ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि शैक्षणिक जॉन कॉर्नफॉथ यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९१७)
  • २०१५: जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये विधार्थ्यांचे आवडते आणि प्रसिद्धी असलेले लेखक रमाशंकर यादव यांचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

452 वाचकांनी ही बातमी वाचली

Facebook Comments Box

०७ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-षष्ठी – 11:08:13 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 16:51:11 पर्यंत
  • करण-तैतुल – 11:08:13 पर्यंत, गर – 22:29:51 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-व्याघात – 08:41:48 पर्यंत, हर्शण – 30:25:21 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 07.01
  • सूर्यास्त- 17.59
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- 11:58:59
  • चंद्रास्त- 23:42:59
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • International Civil Aviation Day
महत्त्वाच्या घटना:
  • १८२५: बाष्पशक्तीवर चालणारे ’एंटरप्राईज’ नावाचे जहाज कोलकाता बंदरात दाखल झाले. भारतात आलेले अशा प्रकारचे ते पहिले जहाज होते.
  • १८५६: भारतातील पहिला उच्‍चवर्णीय विधवा विवाह कोलकत्त्यात संपन्न झाला.
  • १९१७: पहिले महायुद्ध – अमेरिकेने ऑस्ट्रिया/हंगेरी विरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९३५: ’प्रभात’चा धर्मात्मा हा अस्पृष्योद्धारावरचा चित्रपटमुंबईतील ’कृष्ण’ सिनेमात प्रदर्शित झाला. हा चित्रपट ’प्रभात’ व बालगंधर्व यांनी ’बालगंधर्व-प्रभात’ या संयुक्त बॅनरखाली बनवला होता.
  • १९४१: द्वितीय विश्वयुद्धाच्या दरम्यान जपान ने अमेरिकेच्या पर्ल हार्बर वर हवाई हमाला केला होता.
  • १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने पर्ल हार्बरवर तुफानी हल्ला केला.
  • १९४४: निकोलै रेडेस्कु ने रोमानिया मध्ये सरकार स्थापन केले होते.
  • १९४९: भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.
  • १९७२: अमेरिकेने चंद्रावर जाणाऱ्या अपोलो १७ चे आजच्या दिवशीच प्रक्षेपण केले होते.
  • १९७५: इंडोनेशियाने पूर्व तिमोरवर हल्ला केला.
  • १९८८: यासर अराफात यांनी इस्त्राएलच्या अस्तित्त्वास मान्यता दिली.
  • १९९२: दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदा एकदिवसीय क्रिकेट सामना खेळल्या गेला.
  • १९९४: कन्‍नड साहित्यिक यू. आर. अनंतमूर्ती यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर
  • १९९५: फ्रेन्च गयानातील कोऊरू प्रक्षेपण केन्द्रावरुन ’इन्सॅट-२सी’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण
  • १९९५: अमेरिकेच्या नासाने गुरु ग्रहावर पाठविलेले गॅलीलियो स्पेस एअर क्राफ्ट गुरु वर पोहचले होते.
  • १९९८: ७२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वसंत बापट यांची निवड
  • २००१: विक्रमसिंघे श्रीलंकाचे नवीन प्रधानमंत्री म्हणून नियुक्त.
  • २००२: तुर्किश अभिनेत्री अजरा अकिन यांना मिस वर्ल्ड चा पुरस्कार.
  • २००३: रमन सिंग हे छत्तीसगड चे मुख्यमंत्री बनले.
  • २००४: हामिद करजई हे अफगाणिस्तान चे राष्ट्रपती पदाची शपथ घेतली.
  • २००८: भारतीय गोल्फ खेळाडू जीव मिल्खा सिंह यांनी जपान दौरा खिताब जिंकला.
  • २०१६: पाकिस्तान इंटरनॅशनल एरलाईन्स चे पीके ६६१ विमान कोसळले. यात ४७ लोकांचा मृत्यू.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १८७९: भारताचे क्रांतिकारक जतीन्द्रनाथ मुखर्जी यांचा जन्म.
  • १८८९: समाजशास्त्राचे विद्वान राधाकमल मुखर्जी यांचा जन्म.
  • १९०२: जनार्दन ग्यानोबा तथा ‘जे. जी.‘ नवले – भारतीय कसोटी क्रिकेट संघाचे पहिले यष्टिरक्षक (मृत्यू: ७ सप्टेंबर १९७९)
  • १९२१: प्रमुख स्वामी महाराज – स्वामीनारायण पंथातील अध्यात्मिक गुरू
  • १९२४: पोतुर्गाल चे मारियो सोरेस यांचा जन्म.
  • १९४०: भारतीय चित्रपट निर्माता कुमार सहानी यांचा जन्म.
  • १९५७: जिऑफ लॉसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १७८२: १८ व्या शतकाचा वीर योद्धा हैदर आली यांचा जन्म.
  • १८९४: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८०५)
  • १९४१: भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे – कवी (जन्म: २७ आक्टोबर १८७४)
  • १९४१: सुएझ कालव्याचे सहनिर्माते फर्डीनंट द लेशप्स यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८०५)
  • १९७६: डॉ. गोवर्धनदास पारिख – विचारवंत आणि शिक्षणतज्ञ (जन्म: ? ? ????)
  • १९८२: बाबूराव विजापुरे – संगीतशिक्षक? (जन्म: १७ जून १९०३)
  • १९९३: इव्होरी कोस्ट आयलंडचे पहिले अध्यक्ष फेलिक्स हॉफॉएट-बोजि यांचे निधन. (जन्म: १८ ऑक्टोबर १९०५)
  • १९९७: ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी शांतानंद सरस्वती यांचे अलाहाबाद येथील अलोपी आश्रमात निधन (जन्म: १६ जुलै १९१३ – अच्छाती, बस्ती, उत्तर प्रदेश)
  • २००४: अॅमवे चे सहसंस्थापक जय व्हॅन ऍन्डेल यांचे निधन. (जन्म: ३ जुन १९२४)
  • २००३: ला भारताचे पाचवे राष्ट्रपती फ़ख़रुद्दीन अली अहमद यांच्या पत्नी आणि भारतीय राजनीती मधील प्रसिद्ध बेगम आबिदा अहमद यांचे निधन.
  • २०१३: ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचे निधन.
  • २०१६: पाकिस्तानी गायक आणि इस्लाम धर्मप्रचारक जुनैद जमशेद यांचे विमान अपघातात निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

438 वाचकांनी ही बातमी वाचली

Facebook Comments Box

पवनार – पत्रादेवी शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग पूर्णत्वास नेण्यासाठी हालचाली सुरू

   Follow us on        

Shaktipeeth Expressway Updates:वर्धा जिल्ह्यापासून सांगली जिल्ह्याच्या हद्दीपर्यंतच्या शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग प्रकल्पाला जनता पूर्ण पाठिंबा देत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी नंतर घेतलेल्या आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यानुसार या जिल्ह्यांमध्ये भूसंपादन सुरू करून पूर्ण केले जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

हा द्रुतगती मार्ग ज्या 12 जिल्ह्यांतून जातो, त्यापैकी केवळ सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातच विरोध आहे, ज्यांच्या जमिनी संपादित कराव्या लागणार आहेत, त्यांच्याशी चर्चा करून तोडगा काढला जाईल आणि या महामार्गाचे काम लवकरच सुरू केले जाईल असे ते म्हणालेत.

11 जिल्हय़ातून जाणार्‍या सुमारे 802 किलोमीटर लांबीच्या या द्रुतगती महामार्गाला शेतकर्‍यांनी विरोध केला होता. आत्ताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला त्यामुळे मोठा फटकाही बसला होता. त्यामुळ सावधानता म्हणुन विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेस तात्पुरती स्थगिती देण्यात आली होती. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे भेटले आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यास हालचाली झाल्या आहेत.

शक्तीपीठ एक्स्प्रेसमध्ये 802 किमी लांबीमध्ये 26 इंटरचेंज असतील.

  1.  पवनार-येळा
  2.  कळंब-राळेगाव
  3.  यवतमाळ
  4.  माहूरगड-आर्णी
  5.  पुसद
  6.  उमरखेड
  7.  हिंगोली-नांदेड
  8.  औंढा नागनाथ-बसमत
  9.  परभणी
  10.  गंगाखेड
  11.  परळी वैजनाथ
  12.  अंबेजोगाई-घाटनांदूर
  13.  लातूर
  14.  तुळजापूर-धाराशिव
  15.  बार्शी
  16.  सोलापूर
  17.  पंढरपूर-मंगळवेढा
  18.  सांगोला
  19.  सांगली
  20.  नरसोबाची वाडी
  21.  पट्टण कोडोली
  22.  कोल्हापूर बायपास
  23.  पन्हाळा
  24.  आदमपूर
  25.  गारगोटी
  26. बांदा-पत्रादेवी

7016 वाचकांनी ही बातमी वाचली

Facebook Comments Box

आंबोली-दोडामार्ग पट्ट्यात पट्टेरी वाघांचे अस्तित्व अधोरेखित; आतापर्यंतच्या विक्रमी संख्येची नोंद

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी ते दोडामार्ग या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल आठ पट्टेरी वाघांची नोंद झाली आहे. त्यात पाच मादी, तर तीन नर वाघांचा समावेश आहे. पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाघांची अधिकृतरीत्या वनविभागाच्या दप्तरी नोंद झाली आहे.
वनविभाग, सह्याद्री रिझर्व्ह फॉरेस्ट आणि वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन ट्रस्टच्या माध्यमातून जानेवारी ते मे दरम्यान सह्याद्री व्याघ्र प्रकल्प आणि कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्प या दोन्ही ठिकाणी हे सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये सिंधुदुर्गमध्ये आठ वाघांचे अस्तित्व वेगवेगळ्या कॅमेऱ्यामध्ये दिसून आले. हे वाघ सावंतवाडी तालुक्यातील आंबोली दोडामार्ग पट्ट्यात आढळून आले आहेत.
वनशक्ती संस्थेने मांगेली ते आंबोली हा वाघाचा कॉरिडॉर असून तो भाग संरक्षित करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिकेला दाखल केली आहे. दीर्घकाळ यावर सुनावणी सुरु आहे. या भागात पट्टेरी वाघ असल्याचे वन शक्तीने वेळोवेळी उच्च न्यायालयात सांगितले आहे. आता भागात विक्रमी नोंद झाल्याने या झाल्याने या मागणीला बळ मिळाले आहे.

1652 वाचकांनी ही बातमी वाचली

Facebook Comments Box

‘अटल सेतू’वरील वाहनांच्या संख्येत घट; कारण काय?

मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पाचही पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलवसुली बंद केल्याचा निर्णय ताजा असतानाच मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेल्या शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू’वरील वाहनांची संख्या लक्षणीय प्रमाणात रोडावल्याने टोलमुक्तीचा फटका ‘अटल सेतू’ला बसल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. ॲाक्टोबर महिन्यात अटल सेतूवरुन सात लाख सात हजार १०४ वाहनांनी प्रवास केल्याची नोंद झाली. ही संख्या नोव्हेंबर महिन्यात सहा लाख ६९ हजार ९२ पर्यत खाली घसरली असून पथकर नाक्यांवरील टोलमाफी हे कारण यामागे असू शकते का, यावर आता चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या काळात अटल सेतूवरुन हलक्या वाहनांची संख्या सर्वाधिक घटली आहे.

मुंबई – नवी मुंबई प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शिवडी – न्हावाशेवा असा २१.८ किमी लांबीचा सागरी सेतू बांधला आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात हा सेतू वाहतूक सेवेत दाखल झाला. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर जेमतेम १२ ते १५ मिनिटांत कापणे यामुळे शक्य झाले. नवी मुंबईच्या दक्षिणेकडील उलवे, उरण, द्रोणागिरी, जासई, पनवेल, गव्हाण यासारख्या उपनगरांमधील रहिवाशांसाठी मुंबई या सेतूमुळे जवळ आल्याने येथील प्रवासी नागरिकांचा मोठा प्रतिसाद अटल सेतूला मिळेल असे दावेही केले जात होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा सेतू सुरु करताना एका बाजूस प्रवासासाठी २५० रुपयांचा टोल आकारण्याचा निर्णय जाहीर केला आणि नियमित कामानिमित्त मुंबईत येजा करणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झाल्याचे पहायला मिळाले. तशा प्रतिक्रियाही या उपनगरांमध्ये उमटल्या. असे असले तरी पुणे तसेच मुंबई-गोवा महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने येजा करणाऱ्या प्रवाशांसाठी अटल सेतू सोयीचा ठरल्याचे चित्र आहे. असे असले तरी अजूनही नजिकच्या महिन्यांमध्ये या सेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दहा लाखांच्या पलिकडे पोहोचलेली नाही. राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पथकर नाक्यावरील टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेताच अटल सेतूवरील प्रवाशी वाहनांची संख्या आणखी कमी झाली असून यामध्ये हलक्या वाहनांची संख्या अधिक असल्याचे पहायला मिळत आहे.

7620 वाचकांनी ही बातमी वाचली

Facebook Comments Box

०६ डिसेंबर पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग 

  • तिथि-पंचमी – 12:10:00 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 17:19:02 पर्यंत
  • करण-बालव – 12:10:00 पर्यंत, कौलव – 23:41:35 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-घ्रुव – 10:42:29 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07. 01
  • सूर्यास्त- 17.59
  • चन्द्र-राशि-मकर – 29:07:32 पर्यंत
  • चंद्रोदय- 11:16:59
  • चंद्रास्त- 22:44:00
  • ऋतु- हेमंत
जागतिक दिवस:
  • महापरिनिर्वाण दिन
महत्त्वाच्या घटना:
  • १७६८: एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
  • १८७७: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.
  • १८९७: परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.
  • १९१७: फिनलँड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.
  • १९७१: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
  • १९७८: स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.
  • १९८१: डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.
  • १९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.
  • १९९७: जपान च्या क्योटो मध्ये आंतरराष्ट्रीय हवामान परिषदच्या सम्मेलनाचे उद्घाटन.
  • १९९८: बँकॉक मध्ये १३ वी आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात.
  • १९९८: ह्यूगो चावेझ यांना व्हेनेझुएला चे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले.
  • १९९९: जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ’ऑलिम्पिक ऑर्डर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
  • २००६: ला नासाने मार्स ग्लोबल सर्वेयर ने काढलेले फोटो सार्वजनिक केले.
  • २००७: ला ऑस्ट्रेलिया च्या शाळेमध्ये शीख विध्यार्थ्यांना कृपाण आणि मुस्लीम विध्यार्थ्यांना हिजाब नेण्यास परवानगी मिळाली होती.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • १४२१: हेन्‍री (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २१ मे १४७१)
  • १७३२: वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८)
  • १८२३: मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (मृत्यू: २८ आक्टोबर १९००)
  • १८६१: रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक (मृत्यू: ९ मे १९१९)
  • १८५३: हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३१)
  • १९१६: ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९२)
  • १९१७: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे २००८)
  • १९२३: वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार (मृत्यू: १५ आक्टोबर २००२)
  • १९३२: कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (मृत्यू: २७ जानेवारी २००७)
  • १९४५: अभितेने शेखर कपूर यांचा जन्म.
  • १९४८: भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा जन्म.
  • १९८५: भारतीय क्रिकेटपटू आर. पी. सिंग यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • १८९२: सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेन्स यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८१६)
  • १९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १४ एप्रिल १८९१)
  • १९७१: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९०२)
  • १९७६: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९००)
  • १९९८: ला परमवीर चक्र विजेता मेजर होशियार यांना वीरमरण.
  • २००९: ला भारतीय अभिनेत्री बिना राय यांचे निधन.
  • २०१३: नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १८ जुलै १९१८)
  • २०१५: ला भारतीय चित्रपट अभिनेता राम मोहन याचे निधन.

दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

402 वाचकांनी ही बातमी वाचली

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search

Join Our Whatsapp Group.