Konkan Railway: प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी–सावंतवाडी TOD विशेष एक्सप्रेस धावणार

   Follow us on        

मुंबईतील प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेकडून सीएसएमटी–सावंतवाडी रोड–सीएसएमटी दरम्यान TOD (ट्रेन ऑन डिमांड) विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन ही विशेष रेल्वे नियोजित करण्यात आली असून प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन DRM मुंबई मध्य यांनी केले आहे.

०११२९ सीएसएमटी–सावंतवाडी रोड TOD विशेष रेल्वे ही गाडी १४, १९ आणि २१ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री १२.२० वाजता सीएसएमटी येथून सुटणार आहे. ही गाडी दुपारी १२.३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचणार आहे.

तसेच, ०११३० सावंतवाडी रोड–सीएसएमटी TOD विशेष रेल्वे ही गाडी १५,२० आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.२० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता सीएसएमटी येथे पोहोचणार आहे.

या विशेष रेल्वेच्या डब्यांची रचना एकूण २२ आयसीएफ डब्यांची असून त्यामध्ये जनरल, स्लीपर आणि एसी डब्यांचा समावेश आहे. कोकण आणि मुंबईदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना यामुळे मोठा दिलासा मिळणार असून गर्दीच्या काळात प्रवाशांची गैरसोय टाळण्यास मदत होणार आहे.

स्थानके :

सीएसएमटी, दादर, ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड़, चिपळूण, सावरडा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आदवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.

डब्यांची रचना :

जनरल (GS) – ४, जनरल-कम-गार्ड (GSLRD) – २, एसी थ्री टियर (WGACCN) – ५, एसी टू टियर (WGACCW) – १, स्लीपर (WGSCN) – १०, एकूण डबे – २२ (आयसीएफ).

मध्य रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, जास्तीत जास्त प्रवाशांनी या TOD विशेष रेल्वे सेवेचा लाभ घ्यावा.

Facebook Comments Box

Ladki Bahin Yojna: e-KYC मध्ये चूक झाली असेल तर दुरुस्तीची अखेरची संधी

   Follow us on        

मुंबई: राज्यातील महिलांसाठी राबवण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत e-KYC प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे काही पात्र लाभार्थ्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही. e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडला गेल्याच्या तक्रारी महिला व बालविकास विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, अशा सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून e-KYC माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात येत आहे.

महिला व बालविकास विभागामार्फत ऑनलाइन पोर्टलवर दिनांक ३१ मार्च २०२६ पर्यंत e-KYC दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या लाभार्थ्यांनी e-KYC पूर्ण करूनही योजनेचा लाभ मिळालेला नाही, त्यांनी आपल्या नोंदी तपासून आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व पात्र बहिणींना योजनेचा लाभ मिळावा, हीच शासनाची प्रामाणिक भूमिका असून कोणतीही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींच्या e-KYC प्रक्रियेत चूक झाली आहे, त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

Metro Line 14: कांजूरमार्ग–बदलापूर मेट्रो लाइन बाबत मोठी अपडेट समोर

   Follow us on        

मुंबई: मुंबई मेट्रो लाईन १४ (कांजूरमार्ग–बदलापूर) प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावरून मोठा पाठिंबा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, OPEC Fund for International Development (OFID) या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाने गुरुवारी MMRDA चे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, IAS यांची भेट घेतली. या बैठकीत OFID ने मेट्रो लाईन १४ (कांजूरमार्ग–बदलापूर) तसेच इतर मेट्रो प्रकल्पांच्या अर्थसहाय्यासाठी ठाम रस व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे, OFID सध्या MMRDA च्या मेट्रो लाईन ५ (ठाणे–भिवंडी–कल्याण) या प्रकल्पात प्रणाली घटकांसाठी वित्तपुरवठा करणारा भागीदार आहे.

शिष्टमंडळात अल शायमा अल शैबी (उपाध्यक्षा – सार्वजनिक क्षेत्र संचालन), सोमनाथ बसु (संचालक – सेक्टर्स अँड थीम्स) आणि तोशिफुमी काझाओका (वरिष्ठ देश व्यवस्थापक) यांचा समावेश होता. यावेळी OFID ने ‘मुंबई 3.0’ तसेच महत्त्वाच्या पाणीपुरवठा प्रकल्पांमध्येही वित्तपुरवठ्याबाबत उत्सुकता दर्शवली असून, यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत सुविधा विकासाला नवी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे काम ‘मित्रा’कडे सोपवा; कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे मुख्यमंत्री सचिवालयात निवेदन

   Follow us on        

मुंबई: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम आणि या प्रकल्पाबाबत कोकण रेल्वे महामंडळाची असलेली उदासीन भूमिका, या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी (मुंबई विभाग) यांच्या वतीने आज, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्यमंत्री सचिवालयात एक विशेष निवेदन सादर करण्यात आले. या पत्राद्वारे संघटनेने सावंतवाडी टर्मिनसचा प्रकल्प राज्य सरकारच्या ‘मित्रा’ (MITRA) संस्थेकडे हस्तांतरित करण्याची आणि उर्वरित कामांसाठी तातडीने अर्थसंकल्पीय तरतूद करण्याची आग्रही मागणी केली आहे. दहा वर्षांपूर्वी या कामाचे भूमिपूजन होऊनही प्रकल्प अद्याप अपूर्ण असल्याने कोकणवासियांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.

​या निवेदनात कोकण रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले आहेत. कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांनी (CMD) ‘सावंतवाडी हे केवळ वे-साइड स्टेशन आहे, टर्मिनस नाही’ असे खळबळजनक विधान केल्याचा दावा संघटनेने केला असून, हे विधान कोकणच्या विकासाला खीळ घालणारे असल्याचे त्यांनी नमूद केले. या बेजबाबदार विधानामुळे रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकत असल्याचे स्पष्ट होत असून, यामुळे स्थानिक जनतेत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

​टर्मिनसचे काम रखडल्यामुळे मुंबईत राहणाऱ्या चाकरमान्यांचे आणि पर्यटकांचे प्रचंड हाल होत असल्याकडेही या पत्रात लक्ष वेधण्यात आले आहे. सण-उत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात गावी जाण्यासाठी रेल्वे तिकीटांचा तुटवडा निर्माण होतो आणि काळाबाजार वाढतो. जोपर्यंत सावंतवाडी येथे हक्काचे टर्मिनस पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन गाड्या सुरू करणे शक्य होणार नाही, ही वस्तुस्थिती प्रशासनासमोर मांडण्यात आली आहे. त्यामुळे, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी मागणी प्रवासी संघटनेचे मुंबई विभागाचे संपर्कप्रमुख श्री. विनोद नाईक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.

Facebook Comments Box

Holi Special Trains: होळी सणासाठी रेल्वेकडून १,४१० विशेष गाड्यांचे नियोजन

   Follow us on        

नवी दिल्ली: होळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने यंदा विक्रमी संख्येने होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी देशभरात १,४१० हून अधिक होळी विशेष गाड्या चालवण्यात येणार असून ही संख्या वाढवून तब्बल १,५०० पर्यंत नेण्यात येणार आहे. या सर्व विशेष गाड्या मार्च महिन्यात धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात प्रमुख मार्गांवरील प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी होळी २०२५ दरम्यान एकूण १,१४४ विशेष गाड्यांचे संचालन करण्यात आले होते. यंदा त्या तुलनेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

विभागनिहाय गाड्यांचे नियोजन

मध्य रेल्वे (CR) कडून २०९ होळी विशेष गाड्या चालवण्यात येणार असून पश्चिम रेल्वे (WR) २३१ विशेष गाड्या चालवणार आहे. सर्वाधिक २८५ विशेष गाड्या पूर्व मध्य रेल्वे (ECR) कडून धावणार आहेत. त्यापाठोपाठ दक्षिण मध्य रेल्वे (SCR) १६०, उत्तर रेल्वे (NR) १०८ तर उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) ७१ विशेष गाड्या चालवणार आहे.

याशिवाय उत्तर मध्य रेल्वे (NCR) ६६, उत्तर पूर्व रेल्वे (NER) आणि पूर्व किनारा रेल्वे (ECOR) प्रत्येकी ६२ गाड्या चालवणार आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) ४७, पश्चिम मध्य रेल्वे (WCR) ४३, दक्षिण रेल्वे (SR) ३९ आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) १५ विशेष गाड्या चालवणार आहे. कोकण रेल्वेकडून ९ तर ईशान्य सीमांत रेल्वे (NFR) कडून २ विशेष गाड्यांचे संचालन होणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी, सुरक्षितता आणि कार्यक्षम सेवा देण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वे कटिबद्ध असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

Facebook Comments Box

महत्वाची बातमी! कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेसच्या टर्मिनलमध्ये बदल

   Follow us on        

मुंबई: कुर्ला स्थानकापुढील लोकल मार्गावरील आणि दादर स्थानकावरील ताण कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने दादर–तिरुनेलवेली–दादर साप्ताहिक एक्स्प्रेस (गाडी क्रमांक 22629/22630) च्या टर्मिनलमध्ये महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ही गाडी आता दादर स्थानकाऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथून सुटणार व तेथेच तिचा प्रवास संपणार आहे.

गाडी क्रमांक 22629 लोकमान्य टिळक टर्मिनस येथून गुरुवारी रात्री 20:45 वाजता सुटेल, तर ठाणे स्थानकावर 21:02 ते 21:05 दरम्यान थांबेल आणि शनिवारी पहाटे 03:55 वाजता तिरुनेलवेली येथे पोहोचेल.

त्याचप्रमाणे, गाडी क्रमांक 22630 तिरुनेलवेली येथून बुधवारी सकाळी 07:30 वाजता सुटून ठाणे स्थानकावर 14:27 ते 14:30 दरम्यान थांबेल आणि दादरऐवजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुपारी 15:00 वाजता दाखल होईल.

हा बदल 16 एप्रिल 2026 पासून लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुनेलवेली प्रवासासाठी, तर 15 एप्रिल 2026 पासून तिरुनेलवेली–लोकमान्य टिळक टर्मिनस प्रवासासाठी लागू होणार असून,

या निर्णयामुळे दादर स्थानकावरील गर्दी कमी होऊन मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना अधिक सोयीचा प्रवास उपलब्ध होणार आहे. मात्र कोकणातील आणि दक्षिणेकडील राज्यातील प्रवाशांना दादर ऐवजी एलटीटी स्थानक गाठण्यासाठी त्रास सहन करावा लागणार आहे.

Facebook Comments Box

धक्कादायक: सरपंच होता यावे यासाठी स्वतःच्या मुलीचा जीव घेतला!

   Follow us on        

नांदेड जिल्ह्यातील केरूर गावात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. २८ वर्षीय पांडुरंग कोंडमंगले याने आपल्या ६ वर्षांच्या जुळ्या मुलींपैकी एका मुलीला – प्राचीला – ठार मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे सर्व केवळ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदासाठी उभे राहण्यासाठी!

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात दोन मुलांपेक्षा जास्त मुल असलेल्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उमेदवारी करता येत नाही. पांडुरंगकडे एक मुलगा आणि जुळ्या दोन मुली अशी तीन मुले असल्याने तो सरपंचपदासाठी अपात्र ठरत होता. जून २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी तो सरपंच होण्यास आतुर होता.त्याने गावातील सरपंच गणेश शिंदे यांच्याशी सल्लामसलत केली. दोघे मित्र असल्याने त्यांनी कट रचला आणि जुळ्या मुलींपैकी मोठी मुलगी प्राचीला काढून टाकण्याचा निर्णय घेतला.

२९ जानेवारी २०२६ रोजी पांडुरंगने प्राचीला मोटारसायकलवर बसवून शेजारील तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील निजामसागर कालव्याजवळ नेले. तिथे त्याने मुलीला कालव्यात ढकलून दिले आणि पळ काढला.कालव्यातील शेतकरी आणि स्थानिकांनी पाण्यात पडण्याचा आवाज ऐकून धाव घेतली, पण मुलगी पोहता येत नसल्याने तिचा मृत्यू झाला. नंतर शव ओळख पटली आणि तपास सुरू झाला. पांडुरंगने गुन्हा कबूल केला. त्याच्यासोबत सरपंच गणेश शिंदे यालाही अटक करण्यात आली आहे.पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जन्म नोंदी बदलणे किंवा दत्तक देण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर हा अत्यंत क्रूर मार्ग निवडण्यात आला.

या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, मुलीच्या जीवितासाठी राजकीय स्वार्थ इतका खोलवर जाऊ शकतो याचे हे दुःखद उदाहरण ठरले आहे.

 

 

Facebook Comments Box

आजही जिवंत आहे माणुसकी! हरवलेले पाकीट प्रामाणिक हातांनी परत

   Follow us on        

संदेश सुरेश जिमन: या काळात स्वार्थ, संशय आणि बेपर्वाई वाढत असताना, संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे परिसरात घडलेली एक छोटीशी घटना माणुसकीवरचा विश्वास पुन्हा जागा करणारी ठरली आहे.

अंत्रवली मालपवाडी गावातील नितेश गंगाराम मालप हे कलंबस्ते येथे प्रवास करत असताना त्यांचे पाकीट हरवले. त्या पाकिटात केवळ पैसे नव्हते, तर त्यांच्या ओळखीचा आधार असलेली लायसन्स, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड आणि गाडीची मूळ कागदपत्रे होती. पाकीट हरवल्याचे लक्षात येताच चिंता, अस्वस्थता आणि भीती स्वाभाविकच होती.

मात्र हे पाकीट तेलेवाडी येथील ग्रामस्थ सुरेश उर्फ बाबू बावधाणे यांना सापडले आणि इथूनच माणुसकीचा खरा चेहरा समोर आला. कोणताही लोभ न धरता, कुठलीही अपेक्षा न ठेवता, त्यांनी प्रामाणिकपणाने ते पाकीट मूळ मालक नितेश मालप यांना शोधून काढून सुरक्षितपणे परत केले.

आज जिथे अनेकदा हरवलेली वस्तू परत मिळेल याची आशा मावळते, तिथे सुरेश उर्फ बाबू बावधाणे यांच्या या स्तुत्य कृतीने समाजाला प्रामाणिकपणाचा आणि माणुसकीचा दीप उजळून दाखवला आहे. त्यांच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांनी समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे.

Facebook Comments Box

Konkan Railway: आंगणेवाडी जत्रेनिमित्त आणखी विशेष रेल्वे गाड्यांची घोषणा; आजपासून आरक्षण सुरू

   Follow us on        

सावंतवाडी: कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी जत्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) आणि सावंतवाडी रोड दरम्यान विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे मुंबई व कोकणातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक ०१२१७ (लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी )

ही विशेष गाडी गुरुवार, ५ फेब्रुवारी २०२६ आणि शनिवार, ७ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री २०:२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ९:३० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१२१८ (सावंतवाडी – लोकमान्य टिळक टर्मिनस)

ही परतीची विशेष गाडी शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ आणि रविवार, ८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी १७:३० वाजता सावंतवाडी रोड येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दाखल होईल.

थांबे: ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.

आरक्षणाबाबत महत्त्वाची सूचना:

रेल्वे प्रशासनाकडून अद्याप अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झालेली नसली तरी, वेळापत्रकानुसार

गाडी क्र. ०१२१७ चे आरक्षण ५ फेब्रुवारी २०२६ सकाळी ८ वाजता,

तर गाडी क्र. ०१२१८ चे आरक्षण ५ किंवा ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू होण्याची शक्यता आहे.

Facebook Comments Box

रोहा-दिवा मेमू गाड्यांच्या विलंबाने प्रवासी हैराण; ‘रोहा रेल्वे प्रवासी समिती’ आक्रमक

   Follow us on        

रोहा (प्रतिनिधी):रोहा-दिवा-रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू (MEMU) गाड्यांच्या सततच्या विलंबामुळे चाकरमानी आणि विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रोहा रेल्वे प्रवासी समिती’ने रेल्वे प्रशासनाला साकडे घातले असून, मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना आणि पनवेल स्टेशन मास्तरांना लेखी तक्रार सादर केली आहे.

नेमकी अडचण काय?

गेल्या अनेक आठवड्यांपासून ६१०१०/६१०११, ६१०१५/६१०१६, आणि ६१०१२/६१०१३ या गाड्या नियमितपणे विलंबाने धावत आहेत. रोहा आणि दिवा दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी या गाड्या जीवनवाहिनी आहेत.  महत्त्वाच्या भेटी आणि कामाचे वेळापत्रक कोलमडत आहे.

मात्र गाड्यांच्या सततच्या अनिश्चिततेमुळे प्रवाशांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. नोकरीवर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळेवर पोहोचता न आल्याने कामाचे मोठे नुकसान होत असून, अनेकांच्या पगारावरही त्याचा परिणाम जाणवत आहे. वेळेत गंतव्यस्थानी न पोहोचल्यामुळे महत्त्वाच्या बैठका, अपॉइंटमेंट्स तसेच कामांचे नियोजन पूर्णपणे कोलमडत आहे. या सर्व परिस्थितीमुळे प्रवाशांना मानसिक तणाव आणि प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

या पार्श्वभूमीवर समितीने रेल्वे प्रशासनाकडे ठोस मागण्या केल्या आहेत. गाड्या उशिरा धावण्यामागील नेमकी कारणे शोधून त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, संबंधित गाड्यांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जाईल याची खात्री द्यावी तसेच प्रवाशांच्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेऊन त्यांना शक्य तितक्या लवकर दिलासा द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.

या निवेदनाची प्रत पनवेल स्टेशन मास्तरांनी स्वीकारली असून, त्यावर रेल्वे प्रशासन काय पाऊल उचलते, याकडे सर्व प्रवाशांचे लक्ष लागले आहे. जर परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घेण्याचे संकेतही प्रवाशांकडून मिळत आहेत.

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search