मुंबई : कर्नाटकमधील परिवहन महामंडळ प्रवाशांना देत असलेल्या लांब पल्ल्याच्या उत्तम सेवेसाठी ओळखले जाते. कर्नाटक परिवहन सेवेतर्फे चालवण्यात येणाऱ्या ‘गरुडा’, ‘ऐरावत’, ‘अंबारी’ आदी लांबपल्ल्याच्या सेवा प्रवासीभिमुख ठरल्या आहेत. त्यामुळे कर्नाटक परिवहन विभागाचा अभ्यास करण्यासाठी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कर्नाटकात दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते. लवकरच कर्नाटक परिवहन विभागाचा पॅटर्न महाराष्ट्रात राबविण्यात येण्याची शक्यता आहे.
इतर राज्यातील चांगल्या गोष्टींना भेट देऊन त्या आपल्या राज्यात कशा अमलात आणता येतील याचा अभ्यास करावा. जेणेकरून विविध ठिकाणच्या नाविन्यपूर्ण योजना आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध होतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन करताना सांगितले होते. याचाच एक भाग म्हणून प्रताप सरनाईक १ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या दौऱ्यावर गेले होते . या दोन दिवसीय दौऱ्यात ते कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेची माहिती घेतली. त्यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, नितीन मैद (महाव्यवस्थापक वाहतूक) व नंदकुमार कोलारकर (महाव्यवस्थापक यंत्र) हे अधिकारी होते.
या दौऱ्यात त्यांनी बंगळुरू येथे कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाला भेट देऊन त्यांच्या “ऐरावत”, “अंबारी”, “राजहंस”, तसेच “कर्नाटक सर्वोदय”, “कर्नाटक सिरीगंधा” या प्रतिष्ठित लांब पल्ल्याच्या बस सेवेचा अभ्यास केला.
”कर्नाटक परिवहन सेवेतील आधुनिक तंत्रज्ञान, प्रादेशिक व्यवस्थापन, प्रवाशांसाठीच्या उत्कृष्ट सोयी-सुविधा, जसे की वायफाय, ई-तिकीट, ऑनलाईन बुकिंग, आणि युरिनल सारख्या सेवांचा समावेश प्रभावी वाटला. ही सेवा खासगी बसेसच्या तुलनेत सुरक्षित व वेळेवर असल्याने प्रवाशांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनानुसार, इतर राज्यांतील यशस्वी योजना महाराष्ट्रात राबवण्याचा विचार आहे. कर्नाटक परिवहन सेवेतील आदर्श कल्पना आपल्या एसटी महामंडळासाठी उपयोगी ठरतील यासाठी सकारात्मक पाऊल उचलणार आहे.”
प्रताप सरनाईक
परिवहन मंत्री, महाराष्ट्र राज्य
आजचे पंचांग
- तिथि-षष्ठी – 28:39:25 पर्यंत
- नक्षत्र-रेवती – 23:17:29 पर्यंत
- करण-कौलव – 17:46:11 पर्यंत, तैतुल – 28:39:25 पर्यंत
- पक्ष-शुक्ल
- योग-साघ्य – 27:02:08 पर्यंत
- वार-सोमवार
- सूर्योदय-07:14
- सूर्यास्त-18:31
- चन्द्र राशि-मीन – 23:17:29 पर्यंत
- चंद्रोदय-10:31:59
- चंद्रास्त-23:23:59
- ऋतु-शिशिर
- १७८३: स्पेनने अमेरिकेच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली.
- १८१५: स्विझर्लंड येथे पहिली पनीर बनविण्याचा कारखाना बनविण्यात आला.
- १८७०: अमेरिकेच्या संविधानातील १५ वा बदल अमलात आला त्यामुळे मतदानातील वंशभेद संपुष्टात आले.
- १९२५: भारतात पहिल्यांदाच विजेवर चालणारी रेल्वे व्हिक्टोरिया टर्मिनस ते कुर्ला या स्थानकांदरम्यान सुरू झाली.
- १९२८: ‘सायमन गो बॅक’ या घोषणांनी सायमन कमिशनचा मुंबईत निषेध करण्यात आला.
- १९३४: आजच्या दिवशी विमानाने पार्सल पाठविण्याची सेवा सुरु झाली.
- १९६६: सोव्हिएत रशियाने लूना-९ हे मानवविरहित अंतराळयान चंद्रावर उतरवले.
- १९७२: जापान च्या साप्पारो नावाच्या शहरात पहिल्यांदा आशियात हिवाळी ऑलंपिक चे आयोजन केल्या गेले.
- १९९९: भारतीय राज्य जम्मू काश्मीर मध्ये डेमोक्रेटिक जनता दल या पार्टीची पुन:स्थापना करण्यात आली.
- २००६: आजच्या दिवशी इजिप्त चे जहाज एम.एस अल-सलाम बोकॅसिओ-९८ हे जहाज समुद्रात बुडाले.
- २००९: आजच्या दिवशी शिल्पा शेट्टी यांनी राजस्थान रॉयल्स मध्ये स्वतःची हिस्सेदारी खरेदी केली.
- २०१८: आजच्या दिवशी भारताच्या अंडर-१९ क्रिकेट टीमने चौथ्यांदा वर्ल्ड कप आपल्या नावावर केला.
- १८२१: डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल – वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर (मृत्यू: ३१ मे १९१०)
- १८३०: युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान रॉबर्ट आर्थर टॅलबोट यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९०३)
- १८८७: स्पेनचे पंतप्रधान हुआन नेग्रिन यांचा जन्म.
- १९००: तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २७ सप्टेंबर १९७५)
- १९०९: भारतीय स्वातंत्र्य सैनिक सुहासिनी गांगुली यांचा जन्म.
- १९३८: भारतीय चित्रपट अभिनेत्री वहीदा रहमान यांचा जन्म.
- १९६३: रघुराम राजन – भारतीय अर्थतज्ञ
- १९८३: चित्रपट अभिनेता सिलांबरासन यांचा जन्म.
- १४६८: जर्मन प्रकाशक, स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग यांचे निधन.
- १८३२: पहिले क्रांतिकारक व स्वातंत्र्यसैनिक उमाजी नाईक यांना ब्रिटिश सरकारने फाशी दिली. (जन्म: ७ सप्टेंबर १७९१)
- १९२४: वूड्रो विल्सन – अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २८ डिसेंबर १८५६)
- १९५१: वेगळ्या पाकिस्तानची मागणी करणाऱ्यांपैकी एक चौधरी रहमत अली यांचे निधन.
- १९६९: सी. एन. अण्णादुराई – तामिळनाडूचे मुख्यमंत्री (जन्म: १५ सप्टेंबर १९०९)
- २०००: ला प्रसिद्ध तबलावादक उस्ताद कुरैशी अल्ला रक्खा खान यांचे निधन.
- २०१२: ला बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक राज कवर यांचे निधन.
- २०१६: ला मध्य प्रदेश चे माजी गव्हर्नर बलराम जाखड यांचे निधन.
Mumbai Goa Highway:गेल्या १७ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाला आता नवीन डेडलाईन मिळाली आहे. दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र महामार्गाची सध्याची स्थिती आणि चालू असलेल्या कामाची गती पाहता प्रशासन ही नवीन डेडलाईन पाळण्यास अपयशी ठरणार असल्याचा आरोप मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने केला आहे. एवढ्यावरच न थांबता समितीने या महामार्गावरील प्रत्येक किलोमीटरच्या कामाची सध्याची स्थिती लिखित स्वरूपात सादर केली आहे. समितीने बनविलेल्या यादीनुसार बरेच काम अपूर्ण असून कामाचा वेग पाहता दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होणे अशक्य असल्याचे समितीचे म्हणणे आहे.
समितीने मांडलेली महामार्गाची सद्यस्तिस्थि
टप्पा-०१ पनवेल ते कास -००/०० किमी ४२ किमी (४२ किमी)-
सदर टप्याची वर्क ऑर्डर २८ मार्च २०२३ रोजी देण्यात आलेली असून ३१ डिसेंबर २०२३ काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. सदर टप्प्यात ३८ किमी कॉन्क्रीट पूर्ण झालेली असून नित्कृष्ठ दर्जाचे काम करण्यात आलेले आहे. तर अद्यापही साईट पट्टी, दुभाजकांमध्ये शोभिवंत झाडे लावणे, ड्रेनेज लाईन, सूचना फलक यांसारखी कामे अद्यापही अपूर्ण आहेत व सदर टप्प्यात ०६ महिन्याच्या आतमध्ये खड्डे महामार्गाला पडलेले आहेत. सदर टप्पा ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही हे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची शाश्वती आम्हा कोकणवासीयांना नाही.
सदर टप्याची वर्क ऑर्डर ऑक्टोबर २०२२ रोजी देण्यात आलेली असून ३१ मे २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली होती. सदर टप्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. अद्यापही या टप्प्याची एक मार्गिका झालेली नाही. कासू ते वाकण महामार्ग नसून पायवाट झालेली आहे. महामार्गाला पेव्हर ब्लॉक दिसत आहेत. सदर टप्याचे काम दिवसाला १०० मीटर होत आहे यानुसार अंदाज लावल्यास हा महामार्ग पूर्ण होईल याची शाश्वती आम्हा कोकणकरांना नाही. तसेच या टप्यातील सर्व उड्डाणपुलाचे काम बाकी आहे, जनावरे, वहानांसाठीभुयारी मार्ग, साईटपट्टीचे काम बाकी आहे तर अद्यापही जमिनी ताब्यात घेतलेल्या नाहीत व अतिक्रमण हटावलेला नाही. या टप्प्यातील १२ किमी मध्ये ११ ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या भुयारी मार्गाचे काम १५-२० टक्के झालेला आहे तर नागोठणे येथील पुलाचे काम २०-२५ टक्के पूर्ण करण्यात आलेला आहे. याठिकाणी पेव्हर ब्लॉक असून वर खाली झाल्याने अपघात वाढत आहेत. सदर टप्प्याचे काम २००५ साली बनविण्यात आलेल्या आराखड्यानुसार होत असून २००५ साली वाहनांची संख्या व लोकसंख्या कमी होती व त्याआधारे काम चालू असल्याने भुयारी मार्ग अडचण ठरत आहेत. तसेच महामार्गावर भराव टाकल्याने शेतकऱ्या ची जमीन नकसान होत आहे.
टप्पा-०३ इंदापूर ते वडपाले-८४ किमी ते ११० (२६.७५ किमी)-
सदर टप्प्यात इंदापूर व माणगाव हे दोन बायपास येत असून सदर बायपासचे काम ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे अधिकारी वर्गाकडून ०४ जुलै २०२३ रोजी माणगाव येथे करण्यात आलेल्या आंदोलन दरम्यान आश्वासन देण्यात आलेले होते परंतु अद्यापही या दोन्ही बायपासचीही अवस्था बिकट आहे. सर्व अडचणी सुटल्या असून काम धीम्या गतीने का चालू आहे याबाबत आपण स्वतः पाठपुरावा करून सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. सदर ठिकाणी जनआक्रोश समितीच्यावतीने पाहणी केली असता अद्यापही सदर कामाला गती देण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत पूर्णता काम बंद असून नवीन ठेकेदार निवडन्यात येणार आहे. आपण स्वतः निरिक्षण केले असल्यास माणगांव शहरात दररोज वाहनांच्या ०४-०५ किलोमीटरच्या रांगा पहावयास मिळत असतील परिणामी सदर ठिकाणी कोकणकर व स्थानिक वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांना व प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. तर लोणेरे येथील ब्रिजचे काम अद्यापही बंद आहे.
एका बोगद्याचे काम झालेले असून पहिल्याच पावसात गळती पहायला मिळली तर दूसऱ्या बोगद्याचे काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते परंतु अद्यापही बोगदा व त्यापुढील ब्रिजचे काम बाकी आहे. टप्पा-०६ – कशेडी १६१ किमी ते परशुराम घाट २०५ किमी
सदर टप्प्यात खेड रेल्वे स्थानक येथील ब्रिजचे काम अपूर्ण असून परशुराम घाटातील परिस्थिती बिकट आहे, सदर घाट क्षेत्रात योग्यरित्या व सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काम अपेक्षित आहे. टप्पा-०७ – परशुराम घाट २०५ किमी ते आरवली २४१ किमी-
सदर टप्प्यातील चिपळूण येथील ब्रिज दुर्घटना घडली व यानंतर सदर ब्रिज तोडण्यात आले व नव्याने सदर ब्रिजचे काम होणे अपेक्षित असताना अद्यापही कामाला सुरुवात नाही. टप्पा-०८ व ०९-आरवली ते वाकेड –
सदर टप्यातील ३५% काम झालेले असून उर्वरित सर्व काम रखडलेले आहे व सदर कामाची किलोमीटरनुसार परिस्थिती दर्शवीत आहोत. तरी सदर कामाला गती देऊन लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.
Video | धक्कादायक! धावत्या एसटी बसचे पुढील चाक निखळले; मोठा अनर्थ होता होता टळला – Kokanai
सविस्तर वृत्त#Staccident https://t.co/yEnyi55xXw pic.twitter.com/tRAUbv2z8l— Kokanai Digital News Channel (@kokanai21) February 2, 2025
[edsanimate_start entry_animation_type= "fadeIn" entry_delay= "0" entry_duration= "1" entry_timing= "linear" exit_animation_type= "" exit_delay= "" exit_duration= "" exit_timing= "" animation_repeat= "infinite" keep= "yes" animate_on= "load" scroll_offset= "" custom_css_class= ""]
[edsanimate_end]
कोल्हापूरः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गोवा बनावटीचा मोठा मद्यसाठ जप्त केला आहे. चारचाकीत लपवून मद्याची तस्करीचा प्रयत्न उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. याप्रकरणी सावंतवाडी येथील २१ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. हॉकी मैदान ते सायबर चौक रोडवर शनिवारी (०१ फेब्रुवारी) पहाटे ५.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.
सदर युकारचे वय २१ असून तो आजगाव, शिरोडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील राहणारा आहे. . त्याच्या कारमधून विविध बँडच्या ७५० मिलीचे ४० बॉक्स, १८० मिलीचे ३५ बॉक्स आणि बलेनो कार असा एकूण १० लाख ०६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापैकी केवळ मद्याची किंमत ०५ लाख ०६ हजार ४०० रुपये एवढी आहे.
ST Fare Hike:हकिम समितीने निश्चित केलेल्या सुत्रानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, मुंबई यांना टप्पा वाहतूक सेवांच्या भाडेदरामध्ये १४.९५ टक्के वाढ केल्यामुळे एसटी प्रवास आता महागला आहे. भाडेवाढ दिनांक २५ जानेवारीपासून एसटीच्या गाडयांना लागू करण्या आली आहे. ही भाडेवाढ खालीलप्रमाणे आहे.
अशी आहे भाडेवाढ
- सेवेचा प्रकार : साधी बस – सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये,
- जलद सेवा (साधारण) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.
- रात्र सेवा (साधारण बस) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ८.७० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १०.०५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) ११ रुपये.
- निम आराम : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर, ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.
- विनावातानुकूलीत शयन आसनी: सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १३.६५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये.
- विनावातानुकूलीत शयनयान : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. ११.८५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १४.७५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.
- शिवशाही (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १२.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १४.२० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १६ रुपये.
- जनशिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १२.९५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १४.९० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.
- शिवशाही स्लिपर (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १३.३५ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.
- शिवनेरी (वातानुकूलीत) : सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १८.५० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर २१.२५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २३ रुपये.
- शिवनेरी स्लिपर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. २२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर २५.३५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) २८ रुपये,
- ई बस ०९ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १२ रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १३.८० रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १५ रुपये,
- ई-शिवाई / ई बस १२ मिटर (वातानुकूलीत): सध्याचे भाडे प्रति टप्पा ६ कि.मी. १३.२० रुपये, दिनांक २५ जानेवारी २०२५ पासून सुधारीत भाडेदर ६ कि.मी.च्या प्रति टप्प्यासाठी प्रवास भाडेदर १५.१५ रुपये, प्रथम टप्प्यात प्रवास भाडेदर (अपघात निधीसह) (१ रुपये पटीत) १७ रुपये.
मुंबई पुण्यातून कोकणात जाण्यासाठी उपलब्ध असेलल्या काही सेवांचे सुधारित भाडे
| प्रवास | साधी सेवा | सेमी लक्झरी | शिवशाही | सामान्य स्लीपर |
| पुणे ते सावंतवाडी | ६५३ | ९४८ | ९६७ | – |
| पुणे ते कणकवली | ६०९ | ८२५ | ९०३ | ८९१ |
| पुणे ते रत्नागिरी | ५३९ | – | ७९९ | – |
| पुणे ते चिपळूण | ४२८ | – | ६३६ | ५७९ |
| कोल्हापूर ते सावंतवाडी | २५१ | ४०२ | – | – |
| कोल्हापूर ते कणकवली | २०७ | २७९ | – | – |
| कोल्हापूर ते रत्नागिरी | २३७ | – | – | – |
| कोल्हापूर ते चिपळूण | २८७ | – | – | – |
| मुंबई ते खेड | ३९८ | ५३८ | – | – |
| मुंबई ते चिपळूण | ४५८ | ६२० | – | ६२० |
| मुंबई ते दापोली | ३९८ | ५३८ | – | – |
| बोरिवली ते रत्नागिरी | ६३९ | – | – | – |
| मुंबई ते कणकवली | ७५० | – | ११५६ | – |
| मुंबई ते मालवण | – | – | १२६० | – |
| बोरिवली ते महाड | – | ५०२ | – | – |
आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 09:16:39 पर्यंत, पंचमी – 30:54:55 पर्यंत
- नक्षत्र-उत्तराभाद्रपद – 24:53:00 पर्यंत
- करण-विष्टि – 09:16:39 पर्यंत, भाव – 20:05:13 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शिव – 09:13:56 पर्यंत, सिद्ध – 30:05:33 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय-07:14
- सूर्यास्त- 18:30
- चन्द्र-राशि-मीन
- चंद्रोदय- 09:54:00
- चंद्रास्त- 22:25:00
- ऋतु- शिशिर
- World Wetland Day
- १६२६: आजच्या दिवशी पहिला चार्ल्स इंग्लंड चा राजा बनला.
- १८४८: कॅलिफोर्निया गोल्ड रश – सोने मिळवण्याच्या उद्देशाने चिनी स्थलांतरितांचा पहिला जथा कॅलिफोर्नियात दाखल झाला.
- १८६३: आजच्या दिवशी शंभू नाथ पंडित हे कोलकत्ता उच्च न्यायालयाचे पहिले न्यायाधीश बनले.
- १९०१: आजच्या दिवशी राणी विक्टोरिया चा अंतिम संस्कार करण्यात आला.
- १९३३: अॅडॉल्फ हिटलरने जर्मनीची संसद बरखास्त केली.
- १९४३: दुसरे महायुद्ध – स्टॅलिनग्राडच्या लढाईनंतर जर्मनीचे सैन्य सोवियेत संघाला शरण, जर्मन सैन्याच्या माघारीची सुरूवात
- १९५२: आजच्या दिवशी भारताला पहिल्या कसोटी सामन्यात विजय मिळाला.
- १९५७: गोवा मुक्तीसंग्राम – नानासाहेब गोरे, मधू लिमये, जगन्नाथराव जोशी यांची गोव्यातील तुरूंगातुन मुक्तता.
- १९६२: ४०० वर्षांनंतर नेपच्यून व प्लूटो यांची युति
- १९७१: इदी अमीन हे युगांडाचे सर्वेसर्वा बनले.
- १९७१: इराणमधील रामसर येथे पाणथळ भूमीचे महत्त्व या विषयावर एक परिषद आयोजित करण्यात आली होती. मानवी जीवनातील पाणथळ भूमीचे महत्त्व समजावे म्हणून दरवर्षी २ फेब्रुवारी हा दिवस जगभर ’जागतिक पाणथळ भूमी दिन’ म्हणून साजरा केला जावा असा त्या परिषदेत निर्णय घेण्यात आला.
- २००६: महात्मा गांधी नरेगा कायदा आजच्या दिवसापासून २०० जिल्ह्यांमध्ये लागू केल्या गेले.
- २०१३: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी अमेरिकेत राहत असेलेल्या एका विदेशी शास्त्रज्ञाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
- १८५६: स्वामी श्रद्धानंद – स्वामी दयानंदांचे शिष्य, गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक, शिक्षणमहर्षी आणि आर्य समाजाचे प्रसारक (मृत्यू: २३ डिसेंबर १९२६)
- १८८४: डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर – ज्ञानकोशकार. ’महाराष्ट्रीय ज्ञानकोश’ हे त्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य होय. (मृत्यू: १० एप्रिल १९३७ – पुणे)
- १८८७: प्रसिद्ध राजनीतितज्ञ तसेच समाजसेविका अम्रित कौर यांचा जन्म.
- १९०५: अॅन रँड – जन्माने रशियन असलेल्या अमेरिकन लेखिका व तत्त्ववेत्त्या (मृत्यू: ६ मार्च १९८२)
- १९१५: प्रसिद्ध भारतीय लेखक खुशवंत सिंह यांचा जन्म.
- १९१६: त्रिपुरा चे माजी मुख्यमंत्री दसरथ देब यांचा जन्म.
- १९२३: ललित नारायण मिश्रा – केंद्रीय रेल्वे मंत्री, गृह राज्यमंत्री, अर्थ राज्यमंत्री, पहिल्या, दुसर्या व पाचव्या लोकसभेचे सदस्य, राज्यसभा खासदार (मृत्यू: ३ जानेवारी १९७५ – समस्तीपूर, बिहार)
- १९७०: संसद च्या सदस्य प्रज्ञा सिंग ठाकूर यांचा जन्म.
- १९७९: शमिता शेट्टी – अभिनेत्री
- १९८९: भारतीय अभिनेत्री संदीप धार यांचा जन्म.
- १९०७: दिमित्री मेंदेलिएव्ह – रशियन रसायनशास्त्रज (जन्म: ८ फेब्रुवारी १८३४)
- १९१७: महर्षी अण्णासाहेब पटवर्धन – लोकमान्य टिळकांचे स्नेही आणि विख्यात वैद्य यांनी देहत्याग केला. (जन्म: ४ मे १८४७)
- १९३०: वासुदेव गोविंद आपटे – लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व शकार. त्यांनी लहान मुलांसाठी ’आनंद’ हे मासिक सुरू केले होते. (जन्म: १२ एप्रिल १८७१)
- १९४१: हिंदी भाषेतील प्रसिद्ध साहित्यकार तसेच निबंधकार आचार्य रामचंद्र शुक्ला यांचे निधन.
- १९६०: हिंदी भाषेतील प्रसिद्ध लेखक आचार्य चतुरसेन शास्त्री यांचे निधन.
- १९७०: बर्ट्रांड रसेल – ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार (१८ मे १८७२)
- १९८२: ला राजस्थान चे माजी मुख्यमंत्री मोहन लाल सुखाडीया यांचे निधन.
- १९८७: अॅलिएस्टर मॅकलिन – स्कॉटिश साहसकथा लेखक (जन्म: २१ एप्रिल १९२२)
- २००७: विजय अरोरा – हिन्दी चित्रपट आणि टीव्ही अभिनेता (जन्म: २७ डिसेंबर १९४४)











