आजचे पंचांग
- तिथि-पौर्णिमा – 14:33:29 पर्यंत
- नक्षत्र-मृगशिरा – 26:20:36 पर्यंत
- करण-भाव – 14:33:29 पर्यंत, बालव – 25:28:00 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शुभ – 26:02:49 पर्यंत
- वार- रविवार
- सूर्योदय- 07:06
- सूर्यास्त- 18:02
- चन्द्र-राशि-वृषभ – 15:05:00 पर्यंत
- चंद्रोदय- 17:57:59
- चंद्रास्त- चंद्रोस्त नहीं
- ऋतु- हेमंत




सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीची आज महत्त्वाची बैठक सावंतवाडीतील श्रीराम वाचन मंदीर, सावंतवाडी येथे सायंकाळी ५:३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत सावंतवाडी रेल्वे स्थानकातील समस्या, अपूर्ण अवस्थेत असलेले सावंतवाडी टर्मिनस, प्रवाश्यांच्या समस्या आदी विषयांवर चर्चा होणार असून या बैठकीत कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटना,सावंतवाडी अध्यक्ष/सचिव यांच्याकडून करण्यात आले आहे.
आजचे पंचांग
- तिथि-चतुर्दशी – 17:00:54 पर्यंत
- नक्षत्र-रोहिणी – 27:55:16 पर्यंत
- करण-वणिज – 17:00:54 पर्यंत, विष्टि – 27:44:51 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-सिद्ध – 08:26:00 पर्यंत, साघ्य – 29:06:38 पर्यंत
- वार- शनिवार
- सूर्योदय- 07:05
- सूर्यास्त- 18:01
- चन्द्र-राशि-वृषभ
- चंद्रोदय- 16:59:00
- चंद्रास्त- 30:53:59
- ऋतु- हेमंत
- राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस.
- शहीद बुद्धीजीवी दिन – बांग्लादेश
- राज्य दिन – अमेरिका-अलाबामा
- १८१९: अलाबामा हे अमेरिकेचे २२ वे राज्य बनले.
- १८९६: ग्लासगो अंडरग्राऊंड रेल्वे सुरु झाली.
- १९०३: किटीहॉक, नॉर्थ कॅरोलिना येथे राईट बंधूंनी उड्डाणाचा पहिला प्रयत्न केला.
- १९११: रुआल आमुन्सन यांनी दक्षिण ध्रुवाची मोहीम पूर्ण केली.
- १९२१: बनारस हिंदू विश्वविद्यालयाने एनी बेसेन्ट यांना ‘डॉक्टर ऑफ़ लेटर्स ची पदवी ने सन्मानित केले.
- १९२९: ’प्रभात’चा ’गोपालकृष्ण’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
- १९३९: फिनलंडवर आक्रमण करण्यासाठी सोव्हिएत युनियन ला लीग ऑफ नेशन्समधून काढून टाकले.
- १९४१: दुसरे महायुद्ध – जपानने थायलँडबरोबर सहकार्याचा करार केला.
- १९५०: UNHCR ची स्थापना.
- १९६१: टांझानियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
- १९६२ : नासाचे मरिनर २ (चित्रीत), जगातले पहिले अवकाशयान झाले जे शुक्र ग्रहाच्या जवळुन यशस्वी रीत्या उडाले.
- १९८३: हुसैन मोहम्मद इरशाद यांनी स्वतःला बांगलादेश चे राष्ट्रपती घोषित केले.
- १९९७: ग्रीनहाउस गॅसचे उत्सर्जन कमी करण्यासाठी सर्व देशांची संमती.
- १९९८: २३ व्या काहिरा अंतरराष्ट्रीय फ़िल्म समारोह तमिळ चित्रपट “टेररिस्ट” साठी सर्वोत्कृष्ट भूमिकेसाठी आयशा धारकर यांना जूरी पुरस्कार ने सन्मानित केल्या गेले
- २०००: जॉर्ज वॉकर बुश हे अमेरिकेचे ४३ वे राष्ट्राध्यक्षपदी निवडल्या गेले.
- २००२: पाकिस्तान ने दक्षिण आफ्रिकेला हरवून दृष्टिहीन चा विश्वचषक जिंकला.
- २००८: अर्जेंटिना आणि भारतामध्ये खेळल्या गेलेल्या हॉकीच्या अंडर-२१ सामन्यात ४-४ ने सामना रद्द झाला होता.
- १५०३: नोट्रे डॅम (Nostradamus) – प्रसिद्ध फ्रेंच ज्योतिषी, गणितज्ञ व भविष्यवेत्ता (म्रुत्यू: २ जुलै १५६६)
- १५४६: टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (म्रुत्यू: २४ आक्टोबर १६०१)
- १८६४: उत्तर प्रदेश चे प्रसिद्ध वकील आणि सार्वजनिक कार्यकर्ते जगत नारायण मुल्ला यांचा जन्म.
- १८९५: जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९५२)
- १९१०: ला भारतीय कादंबरीकार उपेंद्रनाथ अशक यांचा जन्म.
- १९१८: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार – जागतिक कीर्तीचे थोर तत्त्ववेत्ते जे. कृष्णमूर्ती यांना त्यांनी योगविद्येचे पाठ दिले. ‘Light on Yoga’ हा त्यांचा ग्रंथ जगात ’योगविद्येचे बायबल’ समजला जातो.
- १९२२: ला प्रसिद्ध भौतिक शास्त्राचे प्रसिद्ध वैज्ञानिक निकोले बासोव यांचा जन्म.
- १९२४: राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ’द ग्रेटेस्ट शो मॅन’ (मृत्यू: २ जून १९८८)
- १९३४: श्याम बेनेगल – चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक
- १९२८: प्रसाद सावकार – गायक व नट
- १९३६: ला बंगाली आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करणारे प्रसिद्ध अभिनेता विश्वजीत चटर्जी यांचा जन्म.
- १९३९: सतीश दुभाषी – चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते (मृत्यू: १२ सप्टेंबर १९८०)
- १९४६: संजय गांधी – राजकारणी व इंदिरा गांधी यांचे पुत्र (मृत्यू: २३ जून १९८०)
- १९५३: विजय अमृतराज – भारतीय लॉनटेनिसपटू
- १९६२: ला माजी भारतीय क्रिकेटर भरत अरुण यांचा जन्म.
- १९८४: भारतीय अभिनेते आणि निर्माते राणा दग्गुबटी यांचा जन्म.
- १९९४: ला भारतीय क्रिकेटर कुलदीप यादव यांचा जन्म.
- १७९९: जॉर्ज वॉशिंग्टन – अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष (जन्म: २२ फेब्रुवारी १७३२)
- १९४३: कॉर्नफ्लेक्सचे निर्माते जॉन हार्वे केलॉग यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १८५२)
- १९६६: शंकरदास केसरीलाल ऊर्फ ‘शैलेन्द्र’ – गीतकार (जन्म: ३० ऑगस्ट १९२३)
- १९७१: ला भारताचे परमवीर चक्र पुरस्काराने सन्मानित झालेले मिलिटरी ऑफिसर निर्मल जीत सिंग शहीद झाले होते.
- १९७७: गजानन दिगंबर तथा ग. दि. माडगूळकर – गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते. गीतरामायणामुळे त्यांना ’महाराष्ट्राचे वाल्मिकी’ म्हणून ओळखले जाते. (जन्म: १ आक्टोबर १९१९)
- १९७९: भारताचे माजी क्रिकेट खेळाडू निरोडे चौधरी यांचे निधन.
- २००६: अटलांटिक रिकॉर्ड्सचे सहसंस्थापक अत्लम एर्टेगुन यांचे निधन. (जन्म: ३१ जुलै १९२३)
- २००५: ला मराठी चित्रपट सृष्टीचे कलाकार सुधीर जोशी यांचे निधन.
- २०१३: भारतीय चित्रकार सी एन करुणाकरन यांचे निधन.




Konkan Railway Updates:एकीकडे कोकणरेल्वे मार्गावर होणाऱ्या गर्दी कमी करण्यासाठी या मार्गावर चालविण्यात येणाऱ्या गाड्या पूर्ण क्षमतेने चालविण्यासाठी त्यांच्या डब्यांत वाढ करण्यात यावी अशी मागणी होत असताना रेल्वे प्रशासन मात्र गाड्यांचे सध्या असलेले डबे कमी करताना दिसत आहे. कोकण रेल्वे प्रशासनने अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धपत्रकानुसार कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन गाड्यांच्या डब्यांच्या संरचनेत बदल करून डबे कमी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. तपशील खालीलप्रमाणे
१) ११०९९ / १११०० लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस
एलएचबी स्वरूपात चालविण्यात येणाऱ्या या गाडीच्या टू टियर एसी आणि थ्री टियर एसीचा प्रत्येकी १ डबा कमी करण्यात आला आहे.
सध्याची संरचना: फर्स्ट एसी – ०१ , २ टियर एसी – ०२, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०८, सामान्य – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१
सुधारित संरचना: फर्स्ट एसी – ०१ , २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०५, स्लीपर – ०८, सामान्य – ०२, पँट्री कार – ०१, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१
दिनांक १२ जानेवारी २०२४ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.
२) २२११३ /२२११४ लोकमान्य टिळक (टी) – कोचुवेली – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस
एलएचबी स्वरूपात चालविण्यात येणाऱ्या या गाडीच्या टू टियर एसी आणि थ्री टियर एसीचा प्रत्येकी १ डबा कमी करण्यात आला आहे.
सध्याची संरचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०७, स्लीपर – ०९, सामान्य – ०३ ,जनरेटर कार – ०२
सुधारित संरचना: २ टियर एसी – ०१, ३ टियर एसी – ०६, स्लीपर – ०९, सामान्य – ०३ ,जनरेटर कार – ०१ ,एसएलआर – ०१
दिनांक १४ जानेवारी २०२५ पासून हा बदल अमलांत आणला जाणार आहे.
आजचे पंचांग
- तिथि-त्रयोदशी – 19:42:16 पर्यंत
- नक्षत्र-भरणी – 07:50:48 पर्यंत, कृत्तिका – 29:48:31 पर्यंत
- करण-कौलव – 09:05:19 पर्यंत, तैेतिल – 19:42:16 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-शिव – 11:53:37 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 07:05
- सूर्यास्त- 18:01
- चन्द्र-राशि-मेष – 13:19:53 पर्यंत
- चंद्रोदय- 16:03:59
- चंद्रास्त- 29:47:00
- ऋतु- हेमंत
- माल्टाचा प्रजासत्ताक दिन
- जागतिक व्हायोलिन दिवस
- १९३०: ’प्रभात’चा ’उदयकाल’ हा चित्रपट मुंबईच्या ’मॅजेस्टिक’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. आधी या चित्रपटाचे नाव ’स्वराज्याचे तोरण’ असे होते. परंतु तो सेन्सॉरमधे अडकल्यामुळे त्यात बरीच काट छाट करावी लागली व त्याचे नावही बदलले.
- १९३७: ला जपान आणि चीन या दोघांमध्ये झालेल्या युद्धात नरसंहार आणि अत्याचाराचे युग सुरु झाले होते.
- १९४१: दुसरे महायुद्ध – हंगेरी व रुमानियाने अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
- १९८१: पोलंड मध्ये मार्शल लॉ चा कब्जा.
- १९८९: जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या मुलीचे आतंकवाद्यांनी अपहरण करून ५ आतंकवाद्यांना सोडून घेतले होते.
- १९९१: मधुकर हिरालाल कनिया यांनी भारताचे २३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
- १९९६: कोफी अन्नान हे संयुक्त राष्ट्राचे महासचिव बनले होते.
- २००१: जैश-ए-मोहम्मद व लष्कर-ए-तय्यबा च्या अतिरेक्यांनी संसदभवनावर हल्ला केला.
- २००१: आजच्या दिवशीच दिल्लीच्या संसद भवनावर अतिरेक्यांचा हल्ला.
- २००२: ज्येष्ठ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यश चोप्रा यांना २००१ चा फाळके पुरस्कार जाहीर.
- २००३: इराकचे माजी राष्ट्रपती सद्दाम हुसेन यांना त्यांच्या घरून अटक.
- २००४: अपहरण आणि नरसंहार यांचे ९ आरोप चिली च्या माजी राष्ट्रपती वर लाऊन त्यांना घरामध्ये नजरबंद ठेवल्या गेले.
- २०१६: सायरस मिस्त्री यांना टी सी एस च्या संचालक मंडळ आणि अध्यक्ष पदावरून काढण्यात आले.
- २०१६: अँडी मरे आणि अँजेलीक्यू केरबर यांना आयटीएफ (इंटरनॅशनल टेनिस फेडेरेशन) ने २०१६ जागतिक विजेते घोषित केले.
- १७८०: योहान वुल्फगँग डोबेरायनर – जर्मन रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: २४ मार्च १८४९)
- १८०४: मेजर थॉमस कॅन्डी – कोशकार व शिक्षणतज्ञ, मराठीत विरामचिन्हे वापरण्यास त्यांनी प्रथम सुरूवात केली, इंडियन पीनल कोडचे त्यांनी मराठीत भाषांतर केले. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८७७)
- १८१६: सीमेन्सचे संस्थापक वर्नेर व्हॅन सीमेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १८९२)
- १८९९: पांडुरंग सातू नाईक – आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक (cinematographer), ’हंस पिक्चर्स’ चे एक भागीदार. ’छाया’, ’धर्मवीर’, ’प्रेमवीर (१९३७)’, ’ज्वाला (१९३८)’, ’ब्रह्मचारी’, ’ब्रँडीची बाटली (१९३९)’, ’देवता’, ’सुखाचा शोध (१९३९)’, ’लग्न पहावं करुन (१९४०)’, ’अर्धांगी (१९४०)’, ’पहिला पाळणा’, ’भक्त दामाजी (१९४२)’, ’पैसा बोलतो आहे (१९४३)’, ’रामशास्त्री (१९४४)’, ’लाखारानी (१९४५)’, ’चिराग कहाँ रोशनी कहाँ’ इत्यादी अनेक चित्रपटांचे उत्कष्ट छायालेखन त्यांनी केले. (मृत्यू: २१ ऑगस्ट १९७६ – मुंबई)
- १९०३: प्रसिद्ध कादंबरीकार इलाचंद्र जोशी यांचा जन्म.
- १९२५: प्रसिद्ध लेखक लक्ष्मी चंद्र जैन यांचा जन्म.
- १९४०: भारतीय अर्थशास्त्रज्ञ आणि शैक्षणिक संजय लोळ यांचा जन्म. (मृत्यू: १८ जुन २००५)
- १९५४: भारतीय ऑटोलरीगोलॉजिस्ट आणि राजकारणी हर्षवर्धन यांचा जन्म.
- १९५५: मनोहर पर्रीकर – गोव्याचे मुख्यमंत्री
- १९६०: प्रसिद्ध दक्षिणात्य चित्रपटांचे अभिनेते व्यंकटेश दग्गुबाती यांचा जन्म.
- १०४८: ला फारसी विद्वान लेखक अलबेरूनी यांचे निधन.
- १७८४: सॅम्युअल जॉन्सन – ब्रिटिश साहित्यिक, टीकाकार, पत्रकार व विचारवंत (जन्म: १८ सप्टेंबर १७०९)
- १९२२: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हेंस हाफस्टाइन यांचे निधन. (जन्म: ४ डिसेंबर १८६१)
- १९३०: फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ (जन्म: ३ सप्टेंबर १८६९)
- १९६१: अॅना मेरी रॉबर्टसन ऊर्फ ’ग्रँडमा मोझेस’ यांचे वयाच्या १०२ व्या वर्षी निधन. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी पेंटिंगच्या छंदाची सुरूवात केली आणि त्यात प्रसिद्धी मिळवली. अमेरिकन ग्रामीण जीवनावरील त्यांची पेंटिग्ज आजही प्रसिद्ध आहेत. (जन्म: ? ? १८६०)
- १९८६: स्मिता पाटील – अभिनेत्री. त्यांचे ’निशांत’, ’मंथन’, ’भूमिका’, ’जैत रे जैत’, ’गमन’, ’चक्र’, ’उंबरठा’ इत्यादी चित्रपट लोकप्रिय झाले. पद्मश्री (१९८५), दोन राष्ट्रीय पुरस्कार व एक फिल्मफेअर अॅवॉर्ड (जन्म: १७ आक्टोबर १९५५ – पुणे)
- १९९४: विश्वनाथ अण्णा तथा तात्यासाहेब कोरे – सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, वारणा परिसराच्या विकासाचे शिल्पकार, वारणा सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, यशवंतराव चव्हाण यांचे निकटचे सहकारी (जन्म: १७ आक्टोबर १९१७ – कोडोवली, पन्हाळा, कोल्हापूर)
- १९९६: श्रीधर पुरुषोत्तम तथा शिरुभाऊ लिमये – स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, कॅपिटॉल बॉम्बस्फोटाचे सूत्रधार, (जन्म: ? ? ????)
- २००६: अमेरिकन फुटबॉल लीग आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप टेनिसचे संस्थापक लामर हंट यांचे निधन. (जन्म: २ ऑगस्ट १९३२)




पळस्पे ते इंदापुर डीसेबंर २०२४ अखेरपर्यंत शक्य नाही पुलाचे कामही बंद
रायगड प्रतिनीधी:-गणेश नवगरे: महाराष्ट्र राज्यातिल लोकसभा निडणुकीपुर्वी मुबंई गोवा राष्ट्रिय महामार्गाचे काम डिसेंबरपर्यंत २०२४ पर्यंत पुर्ण हो़ईल व महामार्गाचे काम हे युध्दपातळीवर सुरू असल्याचे आश्वासने कोकणातील सर्व पक्षाच्या नेते मंडळीनीं आपल्या भाषणशैलीतुन जनतेला दिली होती.माञ सध्या सुरू असेले महामार्गाचे काम कासव गतीने सुरू असुन या संदर्भमार्गावरील अनेक पुलांची कामे अध्याप अपुर्णच आहेत या महामार्गवरील कामे पुर्ण होण्यास कमीत कमी तीन ते चार वर्ष लागण्याची शक्यता दिसुन येत आहे.
मुबंई गोवा महामार्गावरील वडखळ पर्यंतचे काम पुर्ण झाले आहे: माञ नागेठणे, कोलाड, पुई,माणगाव येथील प्रमुख पुलांचें काम अर्धवट आहे. पळस्पे ते इंदापुर हा तब्बल ८४ किलोमीटरचा रस्ता सर्वात तापदायक होता.याचे दोन टप्प्यात विभाजन केल्यानतंर पळस्पे ते कासू पर्यंत काम होत आले आहे. माञ त्या नतंर काम पुर्ण ठप्प झाले आहे.
माणगाव बायपासचे काम न केल्याने ठेकेदार ब्लॅकलिस्ट करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या कामादरम्यान १०० वॉर्डन्स लावण्यासदंर्भात राष्ट्रिय महामार्ग प्राधिकरणाने सांगितले आहे.त्याच्या पुढच्या रसत्याचे काम हे एल एन टीकडे असुन बहुतांश काम पुर्ण झाले आहे.
मुबंई गोवा महामार्गाचे काम हे २०१० पासुन संथ गतीने सुरू आहे. ठेकेदारांच्या निष्काळजीमुळे महामार्गाचे काम रखडले आहे. महामार्गाचे काम होण्यासाठी कोकणकरांच्या जनआक्रोष समितीने माणगाव येथेआमरणऊपोषण केले होते याची दख़्खल प्रशासनानी घेतली होती,तसेत माणगाव येथे प्रशासकिय कार्यालयाला पञ देऊन दिंडीही काढण्यात आली होती.विषेश बाब म्हणजे स्वता बांधकाम मंञी रविंद्र चव्हाण यांनी तब्बल ५ वेळा पहाणी दौराही केला होता त्याच बरोबर कोकणकरांना दिलासा देण्यासाठी निवडणुकी पूर्वी स्वता मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनीही माणगाव पर्यंत पहाणी केली होती. जनआक्रोष या महामार्गाबाबत सतत पाठपुरावा करत असुन मिळतात फक्त खोट्या डेडलाईन ञस्त कोकणकर पुन्हा आंदोलनाच्या मार्गावर असुन पुढिल नियोजना बाबत सद्या जनआक्रोषची चर्चा सुरू आहे.या बाबत जनआक्रोष कडुन वारंवार सांगण्यात
येत आहे कि रोज आपघात होत आहेत परंतु अपघात ग्रस्तांना शासनाची कुठलिही मदत त्या परीवाराला मिळत नाही. दळवणालाही मोठा फटका बसतआहे. सुरूवातिला मुबंई गोवा महामार्ग हा ‘बिओटी तत्वावर बांधला जाणार होता; माञ प्रधानमंञी नरेद्रं मोदी हे पंतप्रधान झाल्यानतंर या महामार्गासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करुन दिला आहे परंतु दोन चार ठेकेदारांनी पळ काढल्याने महामार्गाचे काम रखडले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या मंञ्यानी अनेकदा खंत व्यक्त केली आहे.
“इंदापुरपर्यंत महामार्ग मार्च महीण्यापर्यंत पुर्ण होईल यासाठी आमचा प्रयत्न राहील ८४ किलोमिटर मार्गावरील १० किलोमिटरचे काम शिल्लक आहे हे काम प्रगतीपथावर आहे आमटेम,नागोठणे,कोलाड, पुई, आणि पुढे इंदापूर येथिल काही कामच्या टप्प्याचा समावेश आहे. महामार्गासाठी निधीही पुरेसा उपलब्ध आहे.”
-श्री यशवंत घोटकर-प्रकल्प संचालक,राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण




सिंधुदुर्ग:कोकणातील लोकांसाठी महत्त्वाची जत्रा म्हणजे आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा (Anganewadi Bharadi Jatra). दरवर्षी देवीला कौल लावून या जत्रेची तारीख ठरवली जाते. त्यामुळे आता यंदाच्या आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख देखील त्याचप्रमाणे जाहीर झाली आहे. यंदा ही जत्रा 22 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. कोणत्याही कॅलेंडर किंवा तिथीनुसार ही तारीख ठरत नसून देवीला कौल लावून ही तारीख ठरली जाते. आंगणेवाडी यात्रेच्या तारखेची अनेक जण आतुरतेने वाट पाहत असतात.
आंगणेवाडी जत्रा कोणत्याही तिथीवर अवलंबून नसते. देवीचा कौल घेऊनच यात्रेचा दिवस ठरविण्यात येतो. यावेळी सुमारे दहा लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेस उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.