![]()
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पाचही पथकर नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी टोलवसुली बंद केल्याचा निर्णय ताजा असतानाच मोठा गाजावाजा करुन उभारण्यात आलेल्या शिवडी-न्हावाशेवा ‘अटल सेतू’वरील वाहनांची संख्या लक्षणीय प्रमाणात रोडावल्याने टोलमुक्तीचा फटका ‘अटल सेतू’ला बसल्याची चर्चा आता जोर धरु लागली आहे. ॲाक्टोबर महिन्यात अटल सेतूवरुन सात लाख सात हजार १०४ वाहनांनी प्रवास केल्याची नोंद झाली. ही संख्या नोव्हेंबर महिन्यात सहा लाख ६९ हजार ९२ पर्यत खाली घसरली असून पथकर नाक्यांवरील टोलमाफी हे कारण यामागे असू शकते का, यावर आता चर्चा सुरु झाली आहे. विशेष म्हणजे, या काळात अटल सेतूवरुन हलक्या वाहनांची संख्या सर्वाधिक घटली आहे.
मुंबई – नवी मुंबई प्रवास अतिवेगवान व्हावा यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) शिवडी – न्हावाशेवा असा २१.८ किमी लांबीचा सागरी सेतू बांधला आहे. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता तोंडावर असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जानेवारी महिन्यात हा सेतू वाहतूक सेवेत दाखल झाला. मुंबई ते नवी मुंबई हे अंतर जेमतेम १२ ते १५ मिनिटांत कापणे यामुळे शक्य झाले. नवी मुंबईच्या दक्षिणेकडील उलवे, उरण, द्रोणागिरी, जासई, पनवेल, गव्हाण यासारख्या उपनगरांमधील रहिवाशांसाठी मुंबई या सेतूमुळे जवळ आल्याने येथील प्रवासी नागरिकांचा मोठा प्रतिसाद अटल सेतूला मिळेल असे दावेही केले जात होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने हा सेतू सुरु करताना एका बाजूस प्रवासासाठी २५० रुपयांचा टोल आकारण्याचा निर्णय जाहीर केला आणि नियमित कामानिमित्त मुंबईत येजा करणाऱ्या प्रवाशांचा भ्रमनिरास झाल्याचे पहायला मिळाले. तशा प्रतिक्रियाही या उपनगरांमध्ये उमटल्या. असे असले तरी पुणे तसेच मुंबई-गोवा महामार्गावरुन मुंबईच्या दिशेने येजा करणाऱ्या प्रवाशांसाठी अटल सेतू सोयीचा ठरल्याचे चित्र आहे. असे असले तरी अजूनही नजिकच्या महिन्यांमध्ये या सेतूवरुन प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या दहा लाखांच्या पलिकडे पोहोचलेली नाही. राज्य सरकारने मुंबईच्या वेशीवरील पथकर नाक्यावरील टोल वसुली बंद करण्याचा निर्णय घेताच अटल सेतूवरील प्रवाशी वाहनांची संख्या आणखी कमी झाली असून यामध्ये हलक्या वाहनांची संख्या अधिक असल्याचे पहायला मिळत आहे.
![]()
आजचे पंचांग
- तिथि-पंचमी – 12:10:00 पर्यंत
- नक्षत्र-श्रवण – 17:19:02 पर्यंत
- करण-बालव – 12:10:00 पर्यंत, कौलव – 23:41:35 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-घ्रुव – 10:42:29 पर्यंत
- वार- शुक्रवार
- सूर्योदय- 07. 01
- सूर्यास्त- 17.59
- चन्द्र-राशि-मकर – 29:07:32 पर्यंत
- चंद्रोदय- 11:16:59
- चंद्रास्त- 22:44:00
- ऋतु- हेमंत
- महापरिनिर्वाण दिन
- १७६८: एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- १८७७: द वॉशिंग्टन पोस्ट या वृत्तपत्राच्या प्रकाशनास सुरूवात झाली.
- १८९७: परवाना टॅक्सीकॅब सुरु करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.
- १९१७: फिनलँड (रशियापासुन) स्वतंत्र झाला.
- १९७१: भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
- १९७८: स्पेनने सार्वमत चाचणीच्या कौलावरुन नवीन संविधान अंगीकारले.
- १९८१: डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली ’पोलर सर्कल’ या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली. ९ जानेवारी १९८२ रोजी रात्री साडेबारा वाजता अंटार्क्टिकावर पोचली. भारत हा अंटार्क्टिका मोहीम करणारा तेरावा देश बनला.
- १९९२: अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत सुमारे १,५०० लोक ठार झाले.
- १९९७: जपान च्या क्योटो मध्ये आंतरराष्ट्रीय हवामान परिषदच्या सम्मेलनाचे उद्घाटन.
- १९९८: बँकॉक मध्ये १३ वी आशियाई क्रीडा स्पर्धेला सुरुवात.
- १९९८: ह्यूगो चावेझ यांना व्हेनेझुएला चे राष्ट्रपती म्हणून निवडल्या गेले.
- १९९९: जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ’ऑलिम्पिक ऑर्डर’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
- २०००: थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या हस्ते केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
- २००६: ला नासाने मार्स ग्लोबल सर्वेयर ने काढलेले फोटो सार्वजनिक केले.
- २००७: ला ऑस्ट्रेलिया च्या शाळेमध्ये शीख विध्यार्थ्यांना कृपाण आणि मुस्लीम विध्यार्थ्यांना हिजाब नेण्यास परवानगी मिळाली होती.
- १४२१: हेन्री (सहावा) – इंग्लंडचा राजा (मृत्यू: २१ मे १४७१)
- १७३२: वॉरन हेस्टिंग्ज – भारताचा पहिला गव्हर्नर जनरल (मृत्यू: २२ ऑगस्ट १८१८)
- १८२३: मॅक्समुल्लर – जर्मन विचारवंत (मृत्यू: २८ आक्टोबर १९००)
- १८६१: रेव्हरंड नारायण वामन तथा ना. वा. टिळक – कवी व लेखक (मृत्यू: ९ मे १९१९)
- १८५३: हरप्रसाद शास्त्री – संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ, इतिहासकार (मृत्यू: १७ नोव्हेंबर १९३१)
- १९१६: ’गंधर्व भूषण’ जयराम शिलेदार (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९२)
- १९१७: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचा जन्म. (मृत्यू: ५ मे २००८)
- १९२३: वसंत सबनीस – लेखक व पटकथाकार (मृत्यू: १५ आक्टोबर २००२)
- १९३२: कमलेश्वर – पद्मभूषण पुरस्कार विजेते हिन्दी लेखक, पटकथालेखक, दूरदर्शनचे अतिरिक्त संचालक (मृत्यू: २७ जानेवारी २००७)
- १९४५: अभितेने शेखर कपूर यांचा जन्म.
- १९४८: भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांचा जन्म.
- १९८५: भारतीय क्रिकेटपटू आर. पी. सिंग यांचा जन्म.
- १८९२: सीमेन्स कंपनीचे संस्थापक वर्नेर व्होंन सीमेन्स यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८१६)
- १९५६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अस्पृश्यांच्या मुक्तिसंग्रामाचे खंदे नेते, अस्पृश्य समजल्या जाणार्या जातितील पहिले मॅट्रिक व पहिले पदवीधर, इंग्लंडमध्ये वकिलीतील बॅरिस्टरची परीक्षा दिली आणि अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. (जन्म: १४ एप्रिल १८९१)
- १९७१: भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक कमलाकांत वामन केळकर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १९०२)
- १९७६: क्रांतिसिंह नाना पाटील – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) संस्थापक आणि कम्युनिस्ट पक्षाचे खासदार (जन्म: ३ ऑगस्ट १९००)
- १९९८: ला परमवीर चक्र विजेता मेजर होशियार यांना वीरमरण.
- २००९: ला भारतीय अभिनेत्री बिना राय यांचे निधन.
- २०१३: नेल्सन मंडेला तथा ’मदीबा’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: १८ जुलै १९१८)
- २०१५: ला भारतीय चित्रपट अभिनेता राम मोहन याचे निधन.
![]()
![]()
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त दि. ६ डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना ही सुटी लागू राहणार आहे. बुधवारी या सुटीचे परिपत्रक काढण्यात आले.
चैत्यभूमी परिसरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त जय्यत तयारी सुरु आहे. ६ डिसेंबर रोजी राज्यभरातून मोठ्या संख्येने चैत्यभूमी येथे अनुयायी येतात. दरम्यान, त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी सार्वजनिक सुट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, शुक्रवारी मुंबईतील शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार असून दादर-वरळी परिसरात २ दिवस ड्राय-डे घोषित करण्यात आला आहे.

![]()
देवरुख: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि कोकण विकास संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आदरणीय रोहित तांबे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील सभापती निवास मध्ये, देवरुख पोलीस स्टेशनसमोर करण्यात आले असून दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीसह विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्या रुग्णालयात रुग्णांना रक्ताचा तुटवता भासत असून रक्तदान शिबिराद्वारे समाजहितासाठी रक्तदानाची चळवळ पुढे नेण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आरोग्य तपासणीसाठी आणि रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. “समाजासाठी ही एक छोटी सेवा आहे जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करणारी आहे,” असे रोहित तांबे यांनी सांगितले.
शिबिरात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी वाढण्यास हातभार लागतो.
![]()
आजचे पंचांग
- तिथि-चतुर्थी – 12:51:44 पर्यंत
- नक्षत्र-उत्तराषाढ़ा – 17:27:20 पर्यंत
- करण-विष्टि – 12:51:44 पर्यंत, भाव – 24:33:24 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-वृद्वि – 12:27:23 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 06:58:11
- सूर्यास्त- 18:00:21
- चन्द्र-राशि-मकर
- चंद्रोदय- 10:31:00
- चंद्रास्त- 21:45:00
- ऋतु- हेमंत
- International Volunteer Day for Economic and Social Development
- World Soil Day
- १८१२: मध्ये नेपोलियन बोनापार्ट ला रशियामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे तो फ्रांस मध्ये परत आला होता.
- १८४८: अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले
- १९०६: नॅशनल इन्शुरन्स कंपनी ची स्थापना.
- १९३२: जर्मनीत जन्मलेले स्विस भौतिकशास्त्रज अल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकन व्हिसा देण्यात आला.
- १९४५: फ्लाईट १९, फ्लोरिडा येथून निघालेली अमेरिकन नौदलाची ५ टी.बी. एम. ऍव्हेंजर विमाने स्क्वॉड्रन बर्म्युडा त्रिकोणात गायब झाली.
- १९४६: भारतामध्ये होम गार्ड संघटनेची स्थापना झाली होती.
- १९५०: मध्ये आताचे सिक्कीम हे राज्य भारताच्या संरक्षणाखाली आले होते.
- १९५७: इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.
- १९७१: भारताने बांगलादेश ला एक पूर्ण रुपी देश म्हणून मान्यता दिली होती.
- १९७३: गेराल्ड फोर्ड यांनी अमेरिकेच्या ४० वे उपराष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळला.
- १९८९: फ्रांसच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ किमी गती गाठून विश्वविक्रम केला.
- १९८९: मुलायम सिंह यादव पहिल्यांदा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री बनले.
- १९९३: मुलायम सिंह यादव पुन्हा उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री बनले.
- २००५: ब्रिटन ने समलिंगी पुरुष आणि समलिंगी स्त्री यांचे संबंध वैध मानल्या जातील असे नवीन कायदा अमलात आणला.
- २००८: कॉंग्रेस ने अशोक चव्हाण यांना महाराष्टाचे मुख्यमंत्री बनविण्यची घोषणा केली होती.
- २०१४: जागतिक मृदा दिन.
- २०१६: गौरव गिल यांनी आशिया पॅसिफिक रॅली चॅम्पिअनशिप किताब जिंकला.
- १८१८: भारतीय-पाकिस्तानी कवी आणि अनुवादक जोश मलिहाबादी यांचा जन्म. (मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)
- १८६३: पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ (मृत्यू: २९ आक्टोबर १९३३)
- १८७२: भारताचे प्रसिद्ध पंजाबी लेखक, कवी, भाई वीर सिंह यांचा जन्म.
- १८९४: भारताचे माजी रेल्वे मंत्री राहिलेले एच. सी. दासप्पा यांचा जन्म
- १८९६: नोबेल पारितोषिक विजेते शास्रज्ञ कार्ल कोरी यांचा जन्म.
- १८९७: सेसेना एअरक्राफ्ट कॉर्पोरेशनचे संस्थापक क्लाईड व्हर्नन सेसेना यांचा जन्म. (मृत्यू: २० नोव्हेंबर १९५४)
- १८९८: भारताचे आणि पाकिस्तानचे प्रसिद्ध कवी जोश मलीहाबादी यांचा जन्म.
- १९०१: वेर्नर हायसेनबर्ग – ’क्वांटम मॅकॅनिक्स’मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: १ फेब्रुवारी १९७६)
- १९०१: वॉल्ट इलायन डिस्ने – अॅनिमेशनपटांचे प्रणेते, ’मिकी माऊस’चे जनक (मृत्यू: १५ डिसेंबर १९६६)
- १९०५: शेख अब्दुल्ला – शेर – ए – कश्मीर (मृत्यू: ८ सप्टेंबर १९८२)
- १९२७: भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) – थायलँडचा राजा
- १९३१: अॅडमिरल जयंत नाडकर्णी – १४ वे नौसेनाप्रमुख
- १९३१: १४ वे नौसेनाप्रमुख अॅडमिरल जयंत नाडकर्णी यांचा जन्म.
- १९३२: ला भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री नादिरा यांचा जन्म.
- १९३८: ला गुजरातचे प्रसिद्ध साहित्यकार रघुवीर चौधरी यांचा जन्म.
- १९४३: लक्ष्मण देशपांडे – ’वर्हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक (मृत्यू: २२ फेब्रुवारी २००९)
- १९६५: भारतीय फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांचा जन्म.
- १९६९: ला भारतीय शुटर अंजली भागवत यांचा जन्म.
- १९७४: भारतीय पत्रकार आणि लेखक रविश कुमार यांचा जन्म.
- १९८५: भारतीय क्रिकेटपटू शिखर धवन यांचा जन्म.
- १७९१: वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार (जन्म: २७ जानेवारी १७५६)
- १९२३: फ्रेंच चित्रकार क्लोद मोने यांचे निधन.
- १९२४: ला भारताचे प्रसिद्ध सामाजिक सेवक तसेच स्वतंत्र सैनिक एस. सुब्रह्मण्य अय्यर यांचे निधन.
- १९४१: ला भारताच्या प्रसिद्ध महिला चित्रकार अमृता शेरगिल यांचे निधन.
- १९४६: प्रवचनकार दादामहाराज सातारकर यांचे निधन.
- १९५०: योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी (जन्म: १५ ऑगस्ट १८७२ – कलकत्ता, पश्चिम बंगाल)
- १९५१: अवनींद्र नाथ टागोर – जलरंगचित्रकार (जन्म: ७ ऑगस्ट १८७१)
- १९५५: ला भारताचे प्रसिद्ध कवी, शायर मजाज़ यांचे निधन.
- १९५९: कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ’दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते. (जन्म: १३ जून १९०५ – नवानगर, काठियावाड, गुजराथ)
- १९६१: ला परमवीर चक्राने सन्मानित गुरबचन सिंह सालारिया यांना वीरमरण.
- १९७३: राकेश मोहन – हिन्दी नाटककार (जन्म: ८ जानेवारी १९२५)
- १९७३: रडार यंत्रणेचे शोधक रॉबर्ट वॉटसन-वॅट यांचे निधन. (जन्म: १२ एप्रिल १८९२)
- १९९१: डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले – संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
- १९९९: वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये – स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, आमदार आणि शेती व सिंचन या विषयांतील व्यासंगी मार्गदर्शक (जन्म: ? ? ????)
- २००४: ब्राझिलियन फुटबॉलपटू ख्रिश्चन जुनियर यांचे सामना सुरु असताना बेंगलोर येथे निधन.
- २००७: राकेश मोहन – हिन्दी नाटककार म. वा. धोंड – टीकाकार (जन्म: ३ आक्टोबर १९१४)
- २०१३: दक्षिण आफ्रिकेचे पहिले श्वेतवर्णीय राष्ट्राध्यक्ष नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १९१८)
- २०१५: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक किशनराव भुजंगराव राजूरकर यांचे निधन.
- २०१६: तामिळ नाडू च्या मुख्यमंत्री जे. जयललिता उर्फ अम्मा यांचे तीव्र हृदयविकारानंतर निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९४८)
![]()
EPFO Updates: केंद्र सरकार आता भविष्य निर्वाह निधीशी (EPFO) संबंधित व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. सरकारचा EPFO ३.० उपक्रमांतर्गत EPFO सदस्यांसाठी सेवा वाढविण्याचा उद्देश आहे. रिपोर्ट्सनुसार, या योजनेचा एक भाग म्हणून केंद्रीय कामगार मंत्रालय कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये योगदान वाढविण्याचा आणि डेबिट कार्डसारखे एटीएम (ATM card) कार्ड जारी करण्याबाबत विचार करत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना भविष्यात थेट ‘एटीएम’मधून पैसे काढता येतील. ही योजना मे-जून २०२५ पर्यंत लागू होण्याची शक्यता आहे.
सध्या EPF सदस्याला पीएफचे पैसे काढण्यासाठी ७ ते १० दिवस वाट पाहावी लागते. हा वेळ पीएफचे सर्व पैसे काढण्याची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे EPFO ला सादर केल्यानंतर लागतो. यात अधिक वेळ वाया जातो.
सध्या पगारदार कर्मचारी दर महिन्याला त्यांच्या कमाईच्या १२ टक्के रक्कम त्यांच्या EPF खात्यासाठी योगदान देतात. दरम्यान, नियोक्ता ३.६७ टक्के रक्कम EPF खात्यात जमा करतात. उर्वरित ८.३३ टक्के कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये (EPS) वितरीत केली जाते. नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) खात्यात ०.५० टक्के योगदानदेखील देतो.
![]()
Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना सध्या सोसाव्या लागत असलेल्या अनेक गैरसोयीवर उपाय असलेल्या कोकण रेल्वे विलिनीकरणच्या प्रश्नाला आता खासदार संसदेत मांडत असल्याचे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत खासदार धैर्यशील पाटील यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला आहे. त्यावर चार राज्यांच्या हक्क सोडण्यावर कोकण रेल्वेचे विलीनीकरण अवलंबून असल्याने ते काहीसे किचकट आहे, असे उत्तर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे.
कंपनी अॅक्टनुसार कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची नोंदणी झाली आहे. यात भांडवली खर्चासाठी भारतीय रेल्वे, महाराष्ट्र सरकार, कर्नाटक सरकार, केरळ आणि गोवा सरकार यांनी गुंतवणूक केली आहे. 25 वर्षांपासून कोकण रेल्वेसाठी रेल्वे मंत्रालय भागीदार असून कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचा खर्च चार राज्ये करत आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करणे हे चार राज्यांच्या हक्क सोडण्याच्या अटीवरच अवलंबून आहे. त्यामुळे हा प्रश्न केवळ केंद्र सरकारचा नसून चार राज्यांच्या अखत्यारितील ही आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांत कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण, रोहा ते वीर सेक्शनचे दुपदरीकरण, अतिरिक्त थांबे यावर भर देतानाच प्रवाशांना सोयीसुविधा देण्यावरही भर दिला दिला गेला आहे असे उत्तर रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिले आहे. तसेच कोकण रेल्वे मार्गावर गेल्या पाच वर्षांत सात नवीन ट्रेन सुरू करण्यात आल्या आहेत त्यात दोन वंदे भारत ट्रेन चा समावेश आहे. प्रवासी तसेच स्थानिकांच्या सोयीसाठी ओव्हरब्रिज, सबवे, पाथवे, नवीन प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण या सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात येत आहेत असे ते म्हणाले.
कोकण रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे भारतीय रेल्वेत विलीन करावी अशी मागणी राज्यसभेत केल्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनांनी आमदार धैर्यशील पाटील यांचे आभार मानले आहेत.
”अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची मागणी आणि कोकणातील रेल्वे मार्गाच्या विकासाकरिता महत्वाचा असलेला हा मुद्दा संपूर्ण देशासमोर मांडण्यासाठी संसदीय आयुधाचा वापर केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. ज्याप्रमाणे कोकण रेल्वेच्या उभारणीसाठी स्वर्गीय मधू दंडवते आणि जॉर्ज फर्नांडिस यांचे स्मरण आजही केले जाते त्याचप्रमाणे कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण ही देखील ऐतिहासिक घटना असेल. त्यासाठी संसदेत पाठपुरावा केल्याबद्दल आपलेही नाव इतिहासात नोंदवले जाईल यात शंका नाही. लवकरच आपली भेट घेऊन आम्ही आमची भूमिका आणखी विस्तृतपणे मांडू. तूर्तास आपले खूप खूप आभार.” या शब्दात पत्र आणि ईमेल पाठवून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र ने यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले असल्याची माहिती संघटनेचे सचिव अक्षय महापदी यांनी दिली आहे.
![]()
आजचे पंचांग
- तिथि-तृतीया – 13:12:40 पर्यंत
- नक्षत्र-पूर्वाषाढ़ा – 17:15:35 पर्यंत
- करण-गर – 13:12:40 पर्यंत, वणिज – 25:04:52 पर्यंत
- पक्ष- शुक्ल
- योग-गण्ड – 13:56:00 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 06:57:35
- सूर्यास्त- 18:00:08
- चन्द्र-राशि-धनु – 23:20:28 पर्यंत
- चंद्रोदय- 09:41:00
- चंद्रास्त- 20:44:00
- ऋतु- हेमंत
- भारतीय नौसेना दिन
- १८२९: भारतीयांचा कट्टर विरोध असूनही लॉर्ड बेंटिंगने जाहीरनामा काढून सतीच्या प्रथेला मदत करणाऱ्यांना खुनी ठरवले जाईल असा कायदा केला. तसेच सतीप्रथा बंद केली.
- १८८१: लॉस ऍन्जेलिस टाइम्स वृत्तपत्राचा पहिला अंक प्रकाशित झाला.
- १८८८: भारताचे प्रसिद्ध इतिहासकार रमेश चंद्र मजूमदार यांचा जन्म.
- १९२४: मुंबईतील ’गेटवे ऑफ इंडिया’चे उद्घाटन झाले.
- १९४८: भारतीय लष्कराचे सरसेनापती म्हणून जनरल करिअप्पा यांची नेमणूक झाली. त्यांनी १५ जानेवारी १९४९ रोजी ब्रिटिशांकडुन भारतीय सेनेची सूत्रे हाती घेतली.
- १९५९: ला भारत आणि नेपाल मध्ये गंडक सिंचन व विद्युत प्रकल्पांवर सह्या झाल्या.
- १९६७: थुंबा येथील तळावरुन ’रोहिणी’ या पहिल्या भारतीय अग्निबाणाचे यशस्वी उड्डाण
- १९७१: भारतीय नौदलाने कराचीतील पाकिस्तानी नौदलावर हल्ला केला.
- १९७१: ला भारत आणि पाकिस्तान बिघडत्या संबंधांना पाहून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने आपत्काल मध्ये बैठक बोलावली होती.
- १९७५: सुरीनामचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
- १९९१: पॅन अॅम या अमेरिकन विमानकंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.
- १९९३: उस्ताद झिया फरिदुद्दीन डागर आणि पंडित एस. सी. आर. भट यांना मध्यप्रदेश सरकारचा ’तानसेन सन्मान’ जाहीर
- १९९६: ला अमेरिकेच्या नासाने मार्स पाथफ़ाउंडर नावाचे अवकाशयान मंगळावर पाठवले होते.
- १९९७: संगीत दिग्दर्शक कल्याणजी-आनंदजी यांना मध्यप्रदेश सरकारचा ’लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान
- २००३: अशोक गहलोत १२ व्या विधानसभेसाठी निवडल्या गेले होते.
- २००४: मारिया ज्युलिया मॅन्टीला हिने मिस वर्ल्ड चा पुरस्कार जिंकला होता.
- २००८: मध्ये लोकप्रिय रोमिला थापर यांना क्लूज पुरस्कारासाठी निवडल्या गेले.
- जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
- १८३५: सॅम्युअल बटलर – इंग्लिश लेखक (मृत्यू: १८ जून १९०२)
- १८५२: रशियन भौतिकशास्त्रज्ञ ओरेस्ट ख्वोल्सन यांचा जन्म.
- १८६१: आइसलँड देशाचे पहिले पंतप्रधान हंगेस हफस्टाइन यांचा जन्म. (मृत्यू: १३ डिसेंबर १९२२)
- १८९२: स्पेनचा हुकुमशहा फ्रान्सिस्को फ्रँको यांचा जन्म.
- १८९८: मध्ये भौतिकशास्त्राचे शास्त्रज्ञ श्रीनिवास कृष्णन यांचा जन्म.
- १९१०: आर. वेंकटरमण – भारताचे ८ वे राष्ट्रपती, केन्द्रीय मंत्री, कायदेपंडित, स्वातंत्र्यसेनानी (मृत्यू: २७ जानेवारी २००९)
- १९१०: मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल‘ – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते (मृत्यू: १७ जून १९६५)
- १९१०: मध्ये भारतीय क्रिकेटर अमर सिंग यांचा जन्म.
- १९१६: बळवंत गार्गी – पंजाबी नाटककार, दिग्दर्शक, कादंबरीकार व लघुकथाकार, पंजाब विद्यापीठातील भारतीय रंगभूमी विभागाचे प्रमुख, ‘थिएटर ऑफ इंडिया’ आणि ’फोक थिएटर ऑफ इंडिया’ या पुस्तकांचे लेखक (मृत्यू: २२ एप्रिल २००३ – मुंबई)
- १९१९: इंदर कुमार गुजराल – भारताचे १२ वे पंतप्रधान (मृत्यू: ३० नोव्हेंबर २०१२)
- १९३२: दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष रोह तै-वू यांचा जन्म.
- १९३५: शंकर काशिनाथ बोडस – पंडित विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या परंपरेतील गायक (मृत्यू: २० जुलै १९९५)
- १९४३: मराठी लेखक कॅथोलिक ख्रिस्ती फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचा जन्म.
- १९६२: मध्ये लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांचा जन्म.
- १९६३: मध्ये भारतीय चित्रपट सृष्टीचे कलाकार जावेद जाफरी यांचा जन्म.
- १९७७: भारतीय क्रिकेटर अजित आगरकर यांचा जन्म.
- १९७९: देशाच्या धावपटू सुनीता रानी यांचा जन्म.
- १८५०: विद्युत मोटरचे शोधक विल्यम स्टर्जन यांचे निधन. (जन्म: २२ मे १७८३)
- १९०२: डो जोन्स एंड कंपनी चे सहसंस्थापक चार्ल्स डो यांचे निधन. (जन्म: ६ नोव्हेंबर १८५१)
- ११३१: ओमर खय्याम – पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी (जन्म: १८ मे १०४८)
- १९६२: हास्य कवी अन्नपूर्णानंद यांचे निधन.
- १९७३: कवी गिरीश तथा शंकर केशव कानेटकर यांचे निधन. (जन्म: २८ ऑक्टोबर १८९३)
- १९७५: जर्मन तत्त्वज्ञ आणि लेखक हाना आरेंट यांचे निधन.
- १९८१: मराठी चित्रकार ज. ड. गोंधळेकर यांचे निधन.
- २०००: सुरिनाम प्रजासत्ताकचे पहिले पंतप्रधान हेन्क अर्रोन यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १९३६)
- २०१४: भारतीय वकील आणि न्यायाधीश व्ही. आर. कृष्ण अय्यर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९१५)
- २०१७: भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रसिद्ध कलाकार शशी कपूर यांचे निधन.
![]()











