Follow us on
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हे एक वादग्रस्त प्रकरण महाराष्ट्रात गाजत आहे., जे ऐतिहासिक सत्यता आणि सांस्कृतिक भावनांभोवती फिरते. ही समाधी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ आहे आणि ती वाघ्या नावाच्या कुत्र्याची असल्याचे मानले जाते. लोककथेनुसार, वाघ्या हा शिवाजी महाराजांचा निष्ठावान कुत्रा होता, ज्याने १६८० मध्ये महाराजांच्या निधनानंतर त्यांच्या चितेत उडी मारून प्राण त्यागले. ही कथा निष्ठेचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध आहे, विशेषत: राम गणेश गडकरी यांच्या “राजसंन्यास” नाटकामुळे, ज्यामध्ये या घटनेचा उल्लेख आहे.
प्रकरणाची मुळे अशी आहेत की, १९२७ मध्ये शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार झाला आणि त्यानंतर सुमारे १०-१२ वर्षांनी, म्हणजे १९३६ मध्ये, रायगड स्मारक समितीने गडकरींच्या नाटकाला आधार मानून वाघ्याचा पुतळा आणि समाधी उभारली. पण या कथेला ऐतिहासिक पुराव्यांचा आधार नाही. शिवकालीन दस्तऐवज किंवा समकालीन नोंदींमध्ये वाघ्या नावाच्या कुत्र्याचा किंवा अशा घटनेचा उल्लेख सापडत नाही. भारतीय पुरातत्व विभागानेही (ASI) असा कोणताही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले आहे.
या समाधीवरून वाद का आहे? काही इतिहासकार आणि शिवप्रेमी, जसे की संभाजीराजे छत्रपती, यांचे म्हणणे आहे की ही समाधी कपोलकल्पित आहे आणि शिवाजी महाराजांच्या समाधीजवळ अशी संरचना असणे हा त्यांच्या स्मृतीचा अपमान आहे. संभाजीराजे यांनी २०२५ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून ही समाधी ३१ मेपर्यंत हटवण्याची मागणी केली, कारण ती ऐतिहासिकदृष्ट्या सिद्ध नसलेली आणि रायगडावरील अतिक्रमण आहे. याउलट, काही लोकांना ही समाधी सांस्कृतिक आणि भावनिक मूल्य असलेली वाटते, कारण ती निष्ठेचे प्रतीक म्हणून पाहिली जाते.
दुसरीकडे, संभाजी भिडे यांनी वाघ्याची कथा सत्य असल्याचा दावा केला आहे आणि संभाजीराजेंच्या विधानाला विरोध दर्शवला आहे. त्यांनी ही कथा लोकपरंपरेतून आल्याचे सांगितले, परंतु ठोस पुराव्यांऐवजी त्यांचा भर भावनिक आणि पारंपरिक विश्वासांवर आहे.
भारतीय पुरातत्व विभागानेही असा खुलासा केला आहे की, वाघ्या कुत्र्याच्या समाधीचे ऐतिहासिक महत्त्व सिद्ध करणारी कोणतीही माहिती किंवा पुरावे त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत.
या वादात अनेक बाजू आहेत:
ऐतिहासिक सत्यतेचा मुद्दा: वाघ्याची कथा लोककथा असू शकते, पण ती सिद्ध करणारे ठोस पुरावे नाहीत. काहींच्या मते, समाधी उभारताना सापडलेली हाडे उद-मांजराची होती, कुत्र्याची नव्हे.
सांस्कृतिक महत्त्व: काही समुदाय, उदा. धनगर समाजाचे नेते लक्ष्मण हाके, यांनी समाधी हटवण्यास विरोध केला आहे, कारण त्यांना ती परंपरेचा भाग वाटते.
राजकीय आणि सामाजिक आयाम: हा वाद औरंगजेबाच्या कबरीसारख्या इतर प्रकरणांशी जोडला गेला असून, काहींनी याला राजकीय रंग दिला आहे.
थोडक्यात, वाघ्या कुत्र्याची समाधी ही एका कथेवर आधारित आहे, ज्याला ऐतिहासिक आधार नाही, पण ती सांस्कृतिक प्रतीक म्हणून टिकून आहे. सध्या, संभाजीराजे आणि समर्थक ती हटवण्याची मागणी करत आहेत, तर काहींना ती ठेवायची आहे. हे प्रकरण ऐतिहासिक अचूकता आणि भावनिक मूल्यांमधील संघर्षाचे उदाहरण आहे…
रत्नागिरी:निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या श्री कुलस्वामिनी भवानी – वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ तसेच पुजारी यांच्याकडून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती.
१३ मार्च रोजी रात्रौ हुताशनी पोर्णिमेला वाडी-वाडीतील ग्रामस्थांनी पूजन करून होळी प्रज्वलित केली. १४ मार्च रोजी सकाळी श्री कुलस्वामिनी भवानी- वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थांनी आणलेली लाकडे, कवळ, शेणी व गवत इत्यादीने सजविलेल्या होमाची पुजाऱ्यानी पारंपारिक पद्धतीने गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते यथासांग विधीवत पुजा करुन घेतली. गावच्या पुजाऱ्यानी (गुरवानी) मंदिरातून चांदीने मढविलेली पालखी सजवून “कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी” या देवतांची रुपी लावून मंदिरा व होमा समोरील मानाच्या नूतन सहाणेवर आसनस्थ केली. सकाळी ९ वाजता ढोल, ताश्यांच्या गजरात, वाजंत्र्यासह होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलीत करुन ग्रामस्थांनी होळीत अग्निदेवतेस श्रीफळ अर्पण केले. होमाभोवती पालखीची प्रदक्षिणा घालून “भैरी- केदाराच्या चांगभलं” असे म्हणत पालखी उंचावून उपस्थित भाविकांना उत्साहवर्धक वातावरणात दर्शन देण्यात आले तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा होता. सुवासिनींनी सहाणेवर पालखीतील देवींच्या आस्थेने ओट्या भरल्या व नंतर पालखी मंदिरात स्थानापन्न करण्यात आली. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला प्रज्वलीत करण्यात आलेल्या ह्या होळीला “‘भद्रेचा शिमगा'” असे संबोधले जाते, कारण या दिवशी भद्रा करण असते. हुताशनी पौर्णिमेला घराघरांतून पूरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला. संध्याकाळी चार वाजता पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन जागृत शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर नेण्यात आली. लिंगेश्वर वाडीतून पालखीचा “छबिना” काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजत-गाजत रात्रौ मंदिरात आणण्यात आली. छबिन्याच्या वेळी वाडी-वाडीतील ग्रामस्थांनी आकर्षक विद्युत रोषणाई सह रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी केली व गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात पालखीचे जल्लोषात स्वागत केले. वाडी- वाडीतील सुवासिनींनी छबेन्याच्या वेळी ठिकठिकाणी पालखीतील देवतांची आरती करुन ओट्या भरल्या. गावचा छबेना भक्तिमय आणि अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात व आनंदात पार पडला.
होमाच्या दिवशी व्यापाऱ्यांनी कुरमुर्यांचे, शेंगदाण्याचे लाडू, मिठाई, सरबत, आइस्क्रीम तसेच विविध प्रकारची खेळणी अशी नाना तऱ्हेची दुकाने थाटली होती.
रूढी परंपरे प्रमाणे १५ रोजी पालखी प्रथम तळेवाडीतील मानकऱ्यांच्या घरी नेण्यात आली व नंतर निम्मेगाव येथील मानकऱ्यांच्या घरी नेण्यात आली. तदनंतर निम्मेगाव येथील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली व अशा प्रकारे १६ रोजी तळेवाडी – दत्तवाडी १७ रोजी लिंगेश्वरवाडी, १८ रोजी राधाकृष्णवाडी येथे नेण्यात आली. १९ तारखेला पालखी कुंभरवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली. त्याच दिवशी पालखी संध्याकाळी परत मंदिरात आणून रुढी परंपरेप्रमाणे विधिवत पूजन करुन “धुळवड” (रंगपंचमी) साजरी करण्यात आली, यालाच “शिंपणे” असे म्हणतात. यावेळी अनेक ग्रामस्थांनी मंदिरात गुलाल उधळून रंगपंचमी साजरी केली. शिंपणे झाल्यावर पालखी पुनश्च कुंभरवाडीतील उर्वरीत घरे घेण्यासाठी नेण्यात आली.
२० रोजी तांदळेवाडी-गुरववाडी व खांबेवाडी, २१ रोजी दत्तवाडी (हनुमान नगर), २२ रोजी वेतकोंडवाडी, २३ रोजी भारतीवाडी, २४ रोजी तांबडवाडी आणि २५ रोजी सुतारवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली.
प्रत्येक घरात राखणेचे, पूजेचे श्रीफळ पालखीत अर्पण करण्यात आले, तसेच माहेरवाशिणीनी व सासरवाशिनिणी ओट्या भरल्या. काही ठिकाणी नवस करण्यात आले तर काही ठिकाणी नवस फेडण्यात आले. पुजाऱ्यानी रूढी परंपरेप्रमाणे देवतांस “आर्जव” घातले. गोडाधोडाचे नैवद्य दाखविण्यात आले. पालखी वाहणाऱ्या सेवकांस “भोई” असे संबोधले जाते. तसेच पुजारी, भोई, ताशावाला व ढोलवाला बांधवांना स्वखुशीने बक्षीस देण्यात येते त्यास ”पोस्त”असे संबोधले जाते.
घरोघरी पालखी नेण्यात येते यास *भोवनी* असे संबोधले जाते. सदर शिमगोत्सवास अनेक चाकरमानी कुटुंबियांसह आवर्जुन उपस्थित होते. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजत-गाजत वाडी-वाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आसनस्थ करण्यात आली. रात्रौ ग्रामस्थ वाडीतील पाळ्यांप्रमाणे मंदिरात पहाऱ्यासाठी (सेवेसाठी)उपस्थित राहिले होते.
सदर कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. पालखीसोबत अब्दागिरी व भगवे निशाण नाचवत ढोल, ताशा वाजविण्यात आला. परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधवानी पालखीसोबत ताशा वाजवीला , अशा या सांस्कृतिक, सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिमगोत्सवाची सांगता सुतारवाडीतील घरे झाल्यावर मंगळवार दिनांक २५ मार्च, २०२५ रोजी (कांदल) रुपी भंडारुन करण्यात आली. या उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.
राखले पावित्र्याचे भान!
वाढविले संस्कृतीची शान!!
ठेवले उत्सवांचे भान!
केला देवतांचा सन्मान!!
आपले:- ग्रामस्थ श्री क्षेत्र टेरव.
संकलन :- श्री सुधाकर राधिका कृष्णाजीराव कदम, ( विशेष कार्यकारी अधिकारी) राधाकृष्णवाडी, श्री क्षेत्र टेरव.
सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबई.
आजचे पंचांग
- तिथि-त्रयोदशी – 23:06:16 पर्यंत
- नक्षत्र-शतभिष – 24:34:30 पर्यंत
- करण-गर – 12:30:16 पर्यंत, वणिज – 23:06:16 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-साघ्य – 09:24:22 पर्यंत, शुभ – 29:55:51 पर्यंत
- वार- गुरूवार
- सूर्योदय- 06:39
- सूर्यास्त- 18:50
- चन्द्र-राशि-कुंभ
- चंद्रोदय- 29:38:59
- चंद्रास्त- 16:51:00
- ऋतु- वसंत
- जागतिक रंगभूमी दिवस
- 1794 : अमेरिकन नौदलाची स्थापना झाली.
- 1854 : क्रिमियन युद्ध – इंग्लडने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
- 1958 : निकिता ख्रुश्चेव्ह सोव्हिएत रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
- 1966 : 20 मार्च रोजी दक्षिण लंडनमधील एका बागेत पिकल्स नावाच्या कुत्र्याला चोरी गेलेली विश्वचषक फुटबॉल ट्रॉफी सापडली. परुंतु त्यानंतर 1983 मध्ये पुन्हा कप चोरीला गेला.
- 1977 : टेनेरिफ बेटावरील धावपट्टीवर पॅन ॲम आणि के.एल.एम. या दोन बोईंग 747 विमानांची टक्कर होऊन 583 लोकांचा मृत्यू झाला होता.
- 1992 : पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारने तानसेन पुरस्कार प्रदान केला.
- 2000 : चित्रपट निर्माते व दिग्दर्शक ‘बी. आर. चोप्रा’ यांना फाय फाउंडेशनतर्फे ‘राष्ट्रभूषण पुरस्कार’ जाहीर.
- 1785 : ‘लुई’ (सतरावा) – फ्रान्सचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 8 जून 1795)
- 1845 : ‘विलहेम राँटजेन’ – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 10 फेब्रुवारी 1923)
- 1863 : ‘हेन्री रॉयस’ – रोल्स-रॉइस लिमिटेड चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 22 एप्रिल 1933)
- 1901 : ‘कार्ल बार्क्स’ – डोनाल्ड डक चे हास्यचित्रकार यांचा जन्म. (मृत्यू: 25 ऑगस्ट 2000)
- 1922 : ‘स्टेफन वल’ – फ्रांसचे लेखक
- 1898 : सर ‘सय्यद अहमद खान’ – भारतीय शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि तत्त्ववेत्ते यांचे निधन. (जन्म: 17 ऑक्टोबर 1817)
- 1952 : ‘काइचिरो टोयोटा’ – टोयोटा मोटर कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म: 11 जून 1894)
- 1967 : ‘जेरोस्लॉव्ह हेरॉव्हस्की’ – नोबेल पारितोषिक विजेते झेक रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 20 डिसेंबर 1890)
- 1968 : ‘यूरी गगारिन’ – पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर यांचे निधन. (जन्म: 9 मार्च 1934)
- 1992 : ‘प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले’ – साहित्यिक, गरवारे वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य यांचे निधन.
- 1997 : ‘भार्गवराम आचरेकर’ – संगीत नाटकातील अभिनेते व गायक यांचे निधन.
- 2000 : ‘प्रिया राजवंश’ – हिन्दी चित्रपट अभिनेत्री
सावंतवाडी: सावंतवाडी शहर ते ओटवणे मार्गावरील चराठा येथे अल्टो कार मधून होत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध वाहतुकीवर धाड टाकीत २ लाख ३८ हजार रुपये किमतीच्या गुटखा व अन्य तंबाखूजन्य पदार्थांसहित एक लाख रुपये किमतीची अल्टो कार मिळून सुमारे ३ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले. बाबाजी विजय नाईक (४२, रा. खासकीलवाडा सावंतवाडी) व उमेश रघुनाथ सावंत (५०, रा. वायंगणी तालुका मालवण) अशी संशयतांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी उशिरा ही कारवाई केली.
ओटवणे ते चराठा अशी कारमधून अवैध गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला प्राप्त झाली होती. त्यानुसार पाळत ठेवून मंगळवारी सायंकाळी उशिरा सावंतवाडीच्या दिशेने येत असलेल्या संशयित अल्टो कारला थांबवून त्याची पाहणी केली असता या गाडीत अवैध गुटख्यासह तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. हा सर्व मुद्देमाल तसेच अल्टो कार ताब्यात घेण्यात आली तर या अवैध वाहतूक प्रकरणी दोघांवर कारवाई करण्यात आली.
या दोघांना सावंतवाडी पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक समीर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गुरुनाथ कोयंडे, हवालदार प्रकाश कदम, जयेश करमळकर यांनी ही कारवाई केली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.
आजचे पंचांग
- तिथि-द्वादशी – 25:46:01 पर्यंत
- नक्षत्र-धनिष्ठा – 26:30:48 पर्यंत
- करण-कौलव – 14:52:32 पर्यंत, तैतुल – 25:46:01 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-सिद्ध – 12:25:05 पर्यंत
- वार- बुधवार
- सूर्योदय- 06:40
- सूर्यास्त- 18:49
- चन्द्र-राशि-मकर – 15:15:47 पर्यंत
- चंद्रोदय- 28:57:59
- चंद्रास्त- 15:48:59
- ऋतु- वसंत
- जागतिक पर्पल दिवस (World Purple Day)
- 1552 : गुरू अमर दास हे शिखांचे तिसरे गुरू बनले.
- 1902 : नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांचे केंद्रीय मध्यवर्ती कायदेमंडळात अर्थसंकल्पावर पहिले भाषण झाले.
- 1910 : लक्ष्मणराव किर्लोस्कर यांनी औंध मधील कुंडल रोडवर रेल्वे स्थानकाजवळ कारखाना उभारण्यास सुरूवात केली.
- 1942 : ऑश्विझ छळछावणी (Concentration Camp) पोलंडमधील ओश्फिन्चिम ह्या शहराजवळ नाझी जर्मनीने उभारलेली एक मोठी छळछावणी होती येथे पहिल्या महिला कैदी दाखल झाल्या.
- 1971 : बांगलादेशचा स्वातंत्र्यदिन
- 1972 : नवी दिल्लीतील विज्ञान भवनात पहिली जागतिक संस्कृत परिषद सुरू झाली.
- 1974 : गढवालमधील हेनवलघाटी येथे गौरा देवी यांच्या नेतृत्त्वाखाली चिपको आंदोलन सुरू झाले.
- 1979 : अन्वर सादात, मेनाकेम बेगिन आणि जिमी कार्टर यांनी वॉशिंग्टन येथे इस्त्रायल-इजिप्त शांतता करारावर सह्या केल्या.
- 2000 : व्लादिमीर पुतिन यांची रशियाच्या अध्यक्षपदी निवड झाली.
- 2013 : त्रिपूरा उच्च न्यायालयाची स्थापना.
- 1874 : ‘रॉबर्ट फ्रॉस्ट’ – अमेरिकन कवी यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1963)
- 1875 : ‘सिंगमन र्ही’ – दक्षिण कोरियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 19 जुलै 1965)
- 1879: ‘ओथमर अम्मांन’ (Othmar Hermann Ammann) – जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिज चे रचनाकार ( यांचा जन्म. (मृत्यू: 22 सप्टेंबर 1965)
- 1881 : ‘गुच्चियो गुच्ची’ – गुच्ची फॅशन कंपनी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 2 जानेवारी 1953)
- 1898: ‘रुडॉल्फ दास्स्लेर’ – पुमा से कंपनी चे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू: 27 ऑक्टोबर 1974)
- 1907 : ‘महादेवी वर्मा’ – हिन्दी कवयित्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 11 सप्टेंबर 1987)
- 1909 : ‘बाळकृष्ण दत्तात्रेय सातोस्कर’ – साहित्यिक, संशोधक, दैनिक गोमंतक चे पहिले संपादक यांचा जन्म. (मृत्यू: 27 नोव्हेंबर 2000)
- 1930 : ‘सांड्रा डे ओ’कॉनोर’ – अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश ( मृत्यू : 1 डिसेंबर 2023)
- 1933 : ‘कुबेरनाथ राय’ – भारतीय लेखक व हिन्दी निबंधकार. ( मृत्यू: 5 जून 1996)
- 1973 : ‘लॅरी पेज’ – गुगल चे सह-संस्थापक यांचा जन्म.
- 1985 : ‘प्रॉस्पर उत्सेया’ – झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
- 1827 : ‘लुडविग व्हान बेथोव्हेन’ – अठराव्या शतकातील एक श्रेष्ठ व प्रभावी संगीतकार यांचे निधन. (जन्म: 16 डिसेंबर 1770)
- 1885 : ‘अंसन स्तागेर’(Anson Stager) – वेस्टर्न युनियन चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 20 एप्रिल 1825)
- 1932 : ‘हेनरी मार्टिन लेलैंड’ – कैडिलैक आणि लिंकन कंपनी चे स्थापक यांचे निधन. (जन्म: 16 फेब्रुवारी 1843)
- 1945 : ‘डेविड लॉयड जॉर्ज’ – यूनाइटेड किंगडम चे प्रधानमंत्री यांचे निधन ( जन्म: 17 जानेवारी 1863)
- 1996 : ‘के. के. हेब्बर’ – चित्रकार यांचे निधन.
- 1996 : ‘डेव्हिड पॅकार्ड’ – हेल्वेट पॅकार्ड कंपनीचे एक संस्थापक यांचे निधन. (जन्म: 7 सप्टेंबर 1912)
- 1997 : ‘नवलमल फिरोदिया’ – गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक आणि उद्योगपती यांचे निधन. (जन्म: 9 सप्टेंबर 1910)
- 1999: ‘आनंद शंकर’ – प्रयोगशील संगीतकार यांचे निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1942)
- 2003 : ‘हरेन पंड्या’ – गुजरातचे माजी गृह मंत्री यांचे निधन. (जन्म: 25 जून 1950)
- 2008 : ‘बाबुराव बागूल’ – दलित साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 17 जुलै 1930)
- 2009 : ‘ग्रिसेल्डा अल्वारेझ’ – मेक्सिकोतील पहिल्या महिला गव्हर्नर यांचे निधन (जन्म: 5 एप्रिल 1913)
- 2012 : ‘माणिकराव गोडघाटे‘ – प्रसिद्ध पराङमुख गीतकार व कवी यांचे निधन. (जन्म: 10 मे 1940)
🔘 आज रात्री मुंबई सीएसएमटी येथून सुटणारी कोकणकन्या अडीच तास उशिराने सुटणार
Follow us onKonkan Railway :ओव्हरहेड वायर तुटल्याने पुन्हा एकदा कोकण रेल्वे मार्गावर विघ्न निर्माण झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर खेड दिवाण खवटी येथे ओव्हरहेड वायर आज मंगळवारी संध्याकाळी ६-६.१५ वाजण्याच्या सुमारास तुटली. यामुळे मांडवी आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्यांवर परिणाम झाला. दोन्ही गाड्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत . मात्र याची माहिती मिळताच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे तत्काळ उपाय योजना सुरु करण्यात आल्या. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तुटलेली ओव्हर हेड वायर जोडण्यात आली होती. फिट सर्टिफिकेट मिळून काही वेळातच थांबलेल्या गाड्या मार्गस्थ होतील असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.
या घटनेमुळे रेल्वे मार्गावरील केवळ दोन गाड्यांचे वेळापत्रक काही मिनिटांसाठी विस्कळीत झाले आहे. मात्र अन्यथा उर्वरित गाड्या नियमित वेळेत धावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबून आहे तर गोव्याच्या दिशेने जाणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस ला रोहा स्थानकात थांबवून ठेवण्यात आली आहे.
आजची मुंबई – मडगाव कोकणकन्या उशिराने
गोव्या वरून मुंबईला निघालेली मांडवी एक्सप्रेस उशिरा धावत असल्याने आज रात्री मुंबई सीएसएमटी येथून सुटणारी कोकणकन्या अडीच तास उशिराने म्हणजे रात्री एक वाजून तीस मिनिटाने सुटणार आहे.
आजचे पंचांग
- तिथि-एकादशी – 27:48:57 पर्यंत
- नक्षत्र-श्रवण – 27:50:47 पर्यंत
- करण-भाव – 16:34:31 पर्यंत, बालव – 27:48:57 पर्यंत
- पक्ष- कृष्ण
- योग-शिव – 14:52:46 पर्यंत
- वार- मंगळवार
- सूर्योदय- 06:41
- सूर्यास्त- 18:49
- चन्द्र-राशि-मकर
- चंद्रोदय- 28:15:59
- चंद्रास्त- 14:48:00
- ऋतु- वसंत
- गुलाम व्यापारातील बळींचा आंतरराष्ट्रीय स्मरण दिन (International Day of Remembrance of the Victims of Slavery and the Transatlantic Slave Trade )
- न जन्मलेल्या बालकाचा आंतरराष्ट्रीय दिवस (International Day of the Unborn Child)
- 1655 : क्रिस्टियन हायगेन्स यांनी शनीचा सर्वात मोठा चंद्र, टायटन शोधला.
- 1807 : गुलाम व्यापार कायद्याद्वारे ब्रिटीश साम्राज्यात गुलाम व्यापार बंद करण्यात आला.
- 1885 : पुणे यथे फर्ग्युसन महाविद्यालय सुरू झाले.
- 1898 : शिवरामपंत परांजपे यांचे ‘काळ’ हे साप्ताहिक सुरू झाले.
- 1929 : लाहोर काँग्रेसचे ऐतिहासिक अधिवेशन सुरू झाले.
- 1997 : जगदीश शरण वर्मा यांनी भारताचे 27 वे सरन्यायाधीश म्हणुन पदभार स्वीकारला.
- 2000: 17 वर्षीय जलतरणपटू रुपाली रेपाळेने दक्षिण आफ्रिकेतील रॉबेन आयलंड बे (खाडी) पार केले. या खाडीत पोहणारी ती सर्वात तरुण जलतरणपटू आहे.
- 2013 : मणिपूर उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- 2013 : मेघालय उच्च न्यायालयाची स्थापना झाली.
- 1932 : वसंत पुरुषोत्तम काळे ऊर्फ ‘व. पु. काळे’ – लेखक व कथाकथनकार यांचा जन्म.
- 1933 : ‘वसंत गोवारीकर’ – शास्त्रज्ञ यांचा जन्म.
- 1937 : ‘टॉम मोनाघन’ – डॉमिनोज पिझ्झा चे निर्माते यांचा जन्म.
- 1947 : सर ‘एल्ट्न जॉन इंग्लिश’ – संगीतकार व गायक यांचा जन्म.
- 1956 : ‘मुकूल शिवपुत्र ग्वाल्हेर’ – घराण्याचे गायक यांचा जन्म
- 1931 : ‘गणेश शंकर विद्यार्थी’ – भारतीय पत्रकार, राजकारणी व स्वतंत्रता आंदोलन कार्यकर्ता यांचे निधन. (जन्म: 26 ऑक्टोबर 1890)
- 1940 : रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, उपन्यास सम्राट यांचे निधन. (जन्म: 11 डिसेंबर 1867)
- 1975 : ‘फैसल’ – सौदी अरेबियाचा राजा यांचे निधन.
- 1991 : ‘वामनराव सडोलीकर’ – जयपूर अत्रौली घराण्याचे गायक यांचे निधन. (जन्म: 16 सप्टेंबर 1907)
- 1993 : ‘मधुकर केचे’ – साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1932)
- 2014 : भारतीय चित्रपट अभिनेत्री नंदा यांचे निधन. (जन्म: 8 जानेवारी 1939)
नवी दिल्ली: सरकारने लोकसभा आणि राज्यसभा खासदारांच्या पगारात वाढ केली आहे. खासदारांच्या पगारासोबतच इतर भत्ते आणि माजी खासदारांच्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे. ही वाढ १ एप्रिल २०२३ पासून लागू झाली आहे. त्यामुळे खासदारांना जबरदस्त लाभ मिळणार आहे.
संसदीय कामकाज मंत्रालयाने सोमवारी एक नोटिफिकेशन काढले. या नोटिफिकेशननुसार, लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचा पगार १ लाख रुपयांवरून १.२४ लाख रुपये प्रति महिना झाला आहे. त्याचबरोबर, दैनिक भत्ता २००० रुपयांवरून २,५०० रुपये झाला आहे.
खासदारांच्या पगारात वाढ झाली आहे, त्याचप्रमाणे माजी खासदारांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये पण वाढ झाली आहे. पूर्वी माजी खासदारांना २५,००० रुपये पेन्शन मिळत होती, ती आता ३१,००० रुपये प्रति महिना मिळणार आहे. ज्या माजी खासदारांनी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ सेवा दिली आहे, त्यांना मिळणारी जास्तीची पेन्शन २,००० रुपयांवरून २,५०० रुपये झाली आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. याआधी,एप्रिल २०१८ मध्ये खासदारांच्या पगार आणि भत्त्यांमध्ये बदल करण्यात आला होता.











