Khed: उतारावर बसचा ब्रेक फेल; चालकाच्या सतर्कतेमुळे २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले

   Follow us on        

भोसते, खेड (ता. खेड)

खेड तालुक्यातील भोसते गावातून विद्यार्थ्यांना घेऊन शहराकडे येणाऱ्या एका खासगी शाळेच्या बसचे ब्रेक अचानक फेल झाल्याची घटना घडली. मात्र बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे एक मोठा अपघात टळला असून, सुमारे २० ते २५ विद्यार्थ्यांचे प्राण वाचले आहेत. ही घटना शहरातील जगबुडी नदीच्या किनारी घडली असून नागरिकांमध्ये मोठा हलकल्लोळ उडाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भोसते गावातून खेडकडे येणारी शाळेची बस अचानक ब्रेक फेल झाल्याने एका उतारावरून वेगात खाली येत होती. या ठिकाणी विद्युत महामंडळाचा मोठा ट्रान्सफॉर्मर असून, शेजारीच भोसते पूल आहे. या पुलावरून नेहमीच दुचाकी, चारचाकी वाहने आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत अपघात घडल्यास मोठ्या जिवितहानीची शक्यता होती.

ब्रेक फेल झाल्याचे लक्षात येताच चालकाने विलक्षण संयम राखत आणि प्रसंगावधान राखत, वाहन एका बाजूला वळवले आणि झाडांमध्ये अडवले. त्यामुळे बसची गती कमी झाली आणि ती थांबली. जर चालकाने योग्य वेळी निर्णय घेतला नसता, तर बस पुलावरून सरळ वाहतुकीतून येणाऱ्या वाहनांना धडकली असती आणि मोठा अपघात झाला असता.

या बसमध्ये सुमारे २० ते २५ विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी प्रवास करत होते. चालकाच्या सतर्कतेमुळे त्यांच्या जीवाला धोका टळला आहे. नागरिकांनी “देव तारी त्याला कोण मारी” अशा भावना व्यक्त करत चालकाचे कौतुक केले आहे.

 

Facebook Comments Box

मुंबई-गोवा महामार्गावर अपघातात युवती गंभीर जखमी

   Follow us on        

मुंबई-गोवा महामार्ग | ३० जुलै: मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे एका भरधाव ट्रकने मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात दिशा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) या तरुणी गंभीररीत्या जखमी झाली.

संतप्त ग्रामस्थांनी घटनास्थळी एकत्र येत वाहतूक रोखून धरली. अपघातग्रस्त ट्रकला घेराव घालण्यात आला आणि चालकाविरुद्ध तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्थानिक पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

दरम्यान, अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. जखमी युवतीला तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिक नागरिकांनी महामार्गावरील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अधिक गस्त आणि वेगमर्यादा काटेकोरपणे पाळण्याची मागणी केली आहे.

 

Facebook Comments Box

Konkan Railway: स्वातंत्र्यदिनाच्या लांब सुट्टीसाठी मुंबई-सावंतवाडी विशेष गाड्या चालविण्यात याव्यात

   Follow us on        

मुंबई, ३० जुलै २०२५: येत्या १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यानच्या लांब सुट्टीच्या पार्श्वभूमीवर, कोकणमार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई ते सावंतवाडी मार्गावर विशेष गाड्या चालवाव्यात, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कडून करण्यात आली आहे.

मुंबई–कोकण दरम्यान धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस, वंदे भारत, तेजस, जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस यांसारख्या सर्व गाड्यांचे आरक्षण या काळात प्रचंड गर्दीमुळे प्रतीक्षा यादी अथवा “नो रूम” (REGRET) दाखवत आहेत.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जर वेळेवर अतिरिक्त गाड्यांची घोषणा झाली नाही, तर पनवेल, ठाणे, दादर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. याआधीही अशा लांब सुट्ट्यांमध्ये अपुरी रेल्वे व्यवस्था असल्याने रेल्वेरोको, दगडफेक आणि प्रवाशांना आरक्षित तिकीट असूनही चढता न आल्याच्या घटना घडल्या आहेत.

याआधीही प्रवाशांकडून अनेक वेळा विशेष गाड्यांची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे यंदाच्या लांब सुट्टीसाठी सीएसएमटी–सावंतवाडी रोड आणि बांद्रा टर्मिनस–सावंतवाडी रोड दरम्यान विशेष गाड्यांची तातडीने घोषणा करावी, अशी प्रवाशांची आग्रही मागणी आहे.

विशेष गाड्या न सोडल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ई-मेल निवेदनाद्वारे समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.

 

Facebook Comments Box

कोकण रेल्वेची भरती – २०२५: सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागांतील पदांसाठी थेट मुलाखती

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागात कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर केली असून, जम्मू-काश्मीरमधील कटरा ते बनिहाल दरम्यानच्या युएसबीआरएल प्रकल्पासाठी ही भरती करण्यात येणार आहे. एकूण २८ पदांसाठी ही भरती असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या पदांमध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (JTA) साठी ४ जागा आणि टेक्निशियन पदासाठी २४ जागांचा समावेश आहे.

या पदांसाठी उमेदवारांना पाच वर्षांच्या ठराविक कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार असून कामकाज समाधानकारक राहिल्यास कालावधी वाढविण्याचा अधिकार कोकण रेल्वेकडे राहील. JTA पदासाठी पात्र उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, IT किंवा संगणक शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच रेल्वेमधील सिग्नल प्रणालीत किमान एक वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. टेक्निशियन पदासाठी ITI, B.Sc. किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा आवश्यक असून अनुभव नसलेल्या उमेदवारांना नियुक्तीनंतर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

JTA पदासाठी मासिक एकूण वेतन ₹४३,३८०/- इतके असेल, तर टेक्निशियनसाठी ₹३७,५००/- इतके वेतन ठरविण्यात आले आहे. त्याशिवाय नियुक्त उमेदवारांना विमा संरक्षण, आरोग्य विमा भत्ता, रेल्वे पास, विश्रांतीगृह, प्रवास भत्ता, सुट्ट्या यांसारख्या विविध सुविधा देण्यात येणार आहेत. उमेदवाराचे वय १ जुलै २०२५ रोजी ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

JTA पदासाठी मुलाखत ५ ऑगस्ट २०२५ रोजी, तर टेक्निशियन पदासाठी ७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. दोन्ही मुलाखती सकाळी ९ ते १२ दरम्यान नोंदणीसह जम्मूतील त्रिन्ठा, ग्रानमोर येथील कोकण रेल्वेच्या प्रकल्प कार्यालयात पार पडतील. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि स्वमोसताखत प्रतिंसह अर्जाचा नमुना भरून आणणे बंधनकारक आहे.

ही संधी केवळ तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी असून, कंत्राटी स्वरूपाची असल्याने उमेदवारांनी सर्व अटी व नियम समजून घेऊनच अर्ज करावा. या भरतीबाबत अधिक माहिती व अर्ज नमुना कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.konkanrailway.com उपलब्ध आहे.

कोकण रेल्वेच्या या भरतीमुळे तांत्रिक क्षेत्रातील तरुणांना उत्तम संधी उपलब्ध होणार असून जम्मू-काश्मीरमधील प्रकल्पावर कार्य करण्याचा अनुभव मिळणार आहे. ही भरती पारदर्शक पद्धतीने थेट मुलाखतीद्वारे पार पडणार असल्यामुळे पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

Facebook Comments Box

सावंतवाडी स्थानकात गाड्यांच्या थांब्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

   Follow us on        

सिंधुदुर्ग : सावंतवाडी रोड (ZBTT) रेल्वे स्थानकात पुन्हा गाड्यांचे थांबे सुरु करण्यात यावे, तसेच काही नव्या गाड्यांनाही थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्यांनी १७ जुलै २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवले असून स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांवर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

खासदार सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे की, कोविड-१९ महामारीपूर्वी १२२०१/१२२०२ (एलटीटी-कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेस) आणि १२४३४/१२४३१ (ह. निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम एक्सप्रेस) या गाड्यांचा सावंतवाडी स्थानकात नियमित थांबा होता. या थांब्यांमुळे स्थानिक प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा फायदा होत असे. मात्र, या थांब्यांच्या बंदीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

त्याचबरोबर १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) या गाडीला देखील सावंतवाडीत थांबा देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे मांडली आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात, कोकणात हजारो लोक प्रवास करतात आणि थांबा नसल्यामुळे प्रवासात अडचणी निर्माण होतात, असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयाकडे पुढील मागण्या मांडल्या आहेत:

  • गाडी क्र. १२२०१/१२२०२ आणि १२४३४/१२४३१ साठी सावंतवाडी येथे पुन्हा थांबा सुरू करावा

  • गाडी क्र. १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) साठी  सावंतवाडी येथे नवीन थांबा मंजूर करावा

या थांब्यामुळे स्थानिक जनतेच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण होतील आणि संपूर्ण कोकण परिसरात रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढेल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

Facebook Comments Box

३० जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-षष्ठी – 26:43:39 पर्यंत
  • नक्षत्र-हस्त – 21:53:56 पर्यंत
  • करण-कौलव – 13:42:43 पर्यंत, तैतुल – 26:43:39 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्ध – 27:40:13 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:17
  • सूर्यास्त- 19:13
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 10:56:59
  • चंद्रास्त- 22:52:59
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस
  • व्यक्तींच्या तस्करी विरुद्ध जागतिक दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 762 : 762ई.पुर्व : खलीफा अल मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
  • 1629 : इटलीच्या नेपल्स शहरात भूकंप झाला आणि सुमारे 10,000 लोकांचा मृत्यू झाला.
  • 1898 : विल्यम केलॉगने कॉर्नफ्लेक्स विकसित केले.
  • 1930 : पहिला विश्वचषक उरुग्वेने जिंकला.
  • 1945 – दुसरे महायुद्ध : जपानी पाणबुडी I-58 ने यूएसएस इंडियानापोलिस बुडवले आणि 883 नाविकांचा मृत्यू झाला. विमानाने वाचलेल्यांना लक्षात येईपर्यंत पुढील चार दिवसांत बहुतेकांचा मृत्यू होतो.
  • 1962 : ट्रान्स कॅनडा महामार्ग, जगातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग, सुमारे 8,030 किमी खुला झाला.
  • 1971 : अपोलो 15 चंद्रावर उतरले.
  • 1997 : राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार गायिका लता मंगेशकर यांना जाहीर.
  • 2000 : चंदन तस्कर वीरप्पनने अभिनेते डॉ. राजकुमार यांचे अपहरण केले.
  • 2001 : जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 2014 : पुणे जिल्ह्यातील माळीण गावात दरड कोसळून अनेक जणांचा मृत्यू.
  • 2020 : नासाच्या मंगळ 2020 मोहिमेचे केप कॅनवेरल एअर फोर्स स्टेशनवरून ॲटलस V रॉकेटवर प्रक्षेपण करण्यात आले

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1818 : ‘एमिली ब्राँट’ – इंग्लिश लेखिका यांचा जन्म. (मृत्यू : 19 डिसेंबर 1848)
  • 1855 : ‘जॉर्ज विलहेम फॉन सिमेन्स’ – जर्मन उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू : 14 ऑक्टोबर 1919)
  • 1863 : ‘हेन्री फोर्ड’ – फोर्ड मोटार कंपनीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 7 एप्रिल 1947)
  • 1947 : ‘अर्नोल्ड श्वार्झनेगर’ – ऑस्ट्रियन अमेरिकन शरीरसौष्ठवपटू अभिनेते आणि कॅलिफोर्नियाचे 38वे राज्यपाल यांचा जन्म.
  • 1951 : ‘गॅरी यहूदा’ – भारतीय-इंग्रजी चित्रकार आणि मूर्तिकार यांचा जन्म.
  • 1973 : ‘सोनू निगम’ – पार्श्वगायक यांचा जन्म.
  • 1973 : ‘सोनू सूद’ – भारतीय चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1980 : ‘जेम्स अँडरसन’ – इंग्लिश क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 1622 : ‘संत तुलसीदास’ – यांनी देहत्याग केले.
  • 1718 : ‘विल्यम पेन’ – पेनसिल्व्हेनियाचे स्थापक यांचे निधन.
  • 1898 : ‘ऑटोफोन बिस्मार्क’ – जर्मनीचे पहिले चान्सलर यांचे निधन. (जन्म : 1 एप्रिल 1815)
  • 1930 : ‘जोन गॅम्पर’ – बार्सिलोना फुटबॉल क्लब चे स्थापक यांचे निधन. (जन्म : 22 नोव्हेंबर 1877)
  • 1947 : ‘जोसेफ कूक’ – ऑस्ट्रेलियाचे 6वे पंतप्रधान यांचे निधन.
  • 1960 : ‘गंगाधर बाळकृष्ण देशपांडे’ – कर्नाटक सिंह स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 31 मार्च 1871)
  • 1983 : ‘वसंतराव देशपांडे’ – शास्त्रीय नाट्यसंगीत गायक यांचे निधन. (जन्म : 2 मे 1920)
  • 1994 : ‘शंकर पाटील’ – मराठी ग्रामीण साहित्यिक, चित्रपट कथालेखक, महामंडळाचे संस्थापक सचिव यांचे निधन. (जन्म : 8 ऑगस्ट 1926)
  • 1995 : ‘डॉ. विनायक महादेव दांडेकर’ – अर्थतज्ञ, इंडियन स्कूल ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी चे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 6 जुलै 1920)
  • 1997 : ‘बाओडाई’ – व्हिएतनामचा राजा यांचे निधन.
  • 2007 : ‘इंगमार बर्गमन’ – स्विडिश चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2007 : ‘मिकेलांजेलो अँतोनियोनी’ – इटालियन चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन.
  • 2011 : ‘डॉ. अशोक रानडे’ – संगीत समीक्षक यांचे निधन. (जन्म : 25 ऑक्टोबर 1937)
  • 2013 : ‘बेंजामिन वॉकर’ – भारतीय-इंग्रजी लेखक, कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 25 नोव्हेंबर 1913)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

गणेशोत्सवात कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘शिवसेना एक्सप्रेस’

   Follow us on        

मुंबई, दि. २९: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी शिवसेनेच्या वतीने एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. ‘शिवसेना एक्सप्रेस’ नावाने मोफत विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येत असून, या सेवेमुळे अनेक चाकरमान्यांना वेळेवर आणि विनाखर्च आपल्या गावी गणपती साजरा करण्याची संधी मिळणार आहे.

ही विशेष रेल्वे २५ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकातून कुडाळकडे रवाना होणार आहे. मात्र ही मोफत सेवा फक्त पूर्वनियोजित बुकिंग केलेल्या प्रवाशांसाठीच उपलब्ध असणार आहे. बुकिंगसाठी सोमवार ते शनिवार दरम्यान सकाळी ११ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपर्क साधता येईल.

 

या उपक्रमाचे आयोजन कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९६६५८९६९६६ किंवा ९६६५२७०२३१ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Facebook Comments Box

बाप्पा पावला! गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर अजून काही गाड्यांची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: गणेशोत्सव २०२५ दरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय वाढण्याची शक्यता लक्षात घेता, प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाला अधिक सुलभ व आरामदायक करण्यासाठी कोकण रेल्वेने अजून काही अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

या गाड्या विशेषतः गणेशभक्त, सुट्टीसाठी कोकणात जाणारे प्रवासी आणि गावाकडची वाट धरू इच्छिणाऱ्यांसाठी नियोजित करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांची गर्दी कमी होईल आणि त्यांना सुट्टीचा आनंद अधिक निर्बंधांशिवाय घेता येईल.

या विशेष गाड्यांचे वेळापत्रक, मार्ग व थांबे यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:

१) क्रमांक ०११३१ / ०११३२ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (आठवड्यातून दोनदा): 

गाडी क्रमांक ०११३१ लोकमान्य टिळक (टी) – सावंतवाडी रोड विशेष (आठवड्यातून दोनदा) २८/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०४/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी सकाळी ८:४५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथून सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी २२:२० वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३२ सावंतवाडी रोड – लोकमान्य टिळक (टी) विशेष (द्वि-साप्ताहिक) सावंतवाडी रोडवरून २८/०८/२०२५, ३१/०८/२०२५, ०४/०९/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी २३:२० वाजता सुटेल. ही गाडी लोकमान्य टिळक (टी) येथे दुसऱ्या दिवशी १२:३० वाजता पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबेल.

रचना : एकूण २२ कोच = ३ टायर एसी – ०२ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०६ कोच, एसएलआर – ०२.

२) ट्रेन क्रमांक ०११३३ / ०११३४ दिवा जंक्शन – खेड – दिवा जंक्शन मेमू स्पेशल (दैनिक): 

गाडी क्रमांक ०११३३ दिवा जंक्शन – खेड मेमू स्पेशल (दैनिक) २२/०८/२०२५ ते ०८/०९/२०२५ पर्यंत दररोज दिवा जंक्शन येथून दुपारी १:४० वाजता सुटेल. ही ट्रेन त्याच दिवशी रात्री २०:०० वाजता खेड येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३४ खेड – दिवा जंक्शन मेमू स्पेशल (दैनिक) २३/०८/२०२५ ते ०९/०९/२०२५ पर्यंत दररोज सकाळी ८:०० वाजता खेड येथून निघेल. ही ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:०० वाजता दिवा जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी निलजे, तळोजा पंचनंद, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेण, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे,दिवाणखवती,कळंबणी बुद्रुक,येथे थांबेल.

रचना : एकूण 08 मेमू कोच.

३) गाडी क्रमांक ०१००४ / ०१००३ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेष: )

गाडी क्रमांक ०१००४ मडगाव जंक्शन – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष (दैनिक) दर रविवारी म्हणजे २४/०८/२०२५, ३१/०८/२०२५ आणि ०७/०९/२०२५ रोजी १६:३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ६:०० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१००३ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून दर सोमवारी म्हणजेच २५/०८/२०२५, ०१/०९/२०२५ आणि ०८/०९/२०२५ रोजी सकाळी ८:२० वाजता सुटेल. ही गाडी त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

थांबे – करमाळी, थिविम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड, माणगाव, रोहा, पेण, पनवेल आणि ठाणे

डब्यांची रचना : एकूण २० एलएचबी कोच = २ टायर एसी – ०१ कोच, ३ टायर एसी – ०३ कोच, ३ टायर एसी इकॉनॉमी – ०२ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

या गाड्यांसाठी आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आली नसून लवकरच त्याची ती जाहीर करण्यात येणार आहे.

Facebook Comments Box

कोकणातील नागपंचमी: सर्पपूजेचा श्रद्धेचा सण

   Follow us on        

भारताची संस्कृती ही निसर्गपूजेवर आधारित आहे आणि विविध जीवसृष्टीशी सहअस्तित्वाचा संदेश देणारे सण आपण साजरे करतो. त्यातीलच एक महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी, विशेषतः कोकणातील नागपंचमी ही पारंपरिक, सांस्कृतिक आणि पर्यावरणपूरक श्रद्धेची सुंदर अभिव्यक्ती आहे.

नागपंचमीचा पारंपरिक संदर्भ

श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमी साजरी केली जाते. यामागे प्राचीन आख्यायिका, धार्मिक कथा आणि लोकसाहित्य आहेत. पुराणानुसार, या दिवशी शेषनागाची पूजा केल्यास भय, रोग, संकट टळते आणि सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते. कोकणात नागदेवतेबद्दल विशेष श्रद्धा असून घराघरांतून या दिवशी सर्पपूजा केली जाते.

कोकणातील सण साजरा करण्याची वैशिष्ट्ये

कोकणातील नागपंचमीची पूजा वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने केली जाते:

नागपंचमीला घरोघरी नागदेवतेच्या मूर्तीची पूजा केली जाते. पूर्वी घरोघरी स्त्रिया नदीकाठची किंवा विशिष्ट मऊ माती घेऊन नागदेवतेच्या मूर्ती स्वतः तयार करत असत. आता या मूर्ती बाजारात उपलब्ध होत आहेत. या मूर्ती घराच्या पूजास्थानी ठेवून त्यांची विधिपूर्वक पूजा होते. नागदेवतेला दूध, फळे, लाह्या, नारळ यांचा नैवेद्य दाखवला जातो. साखर घालून केलेले दूध सर्पांना अर्पण करणे ही श्रद्धेची खूण मानली जाते. काही घरांमध्ये हळद-कुंकवाने किंवा शाडूने भिंतीवर किंवा उंबरठ्यावर नागाचे चित्र रंगवले जाते. हे चित्र संकटांपासून रक्षण करणारे मानले जाते.

कोकणात जंगल आणि शेतीशी नाते असल्याने सर्पांशी अनेक वेळा थेट सामना होतो. त्यामुळे त्यांच्याशी सौहार्दपूर्ण सहअस्तित्व राखण्याचा संदेश या सणातून मिळतो.

सांस्कृतिक आणि पर्यावरणीय दृष्टीने महत्त्व

नागपंचमीचा सण हा केवळ धार्मिकच नव्हे, तर पर्यावरणीय जागृतीचा संदेशही देतो. सापांचा परिसंस्थेतील महत्त्वाचा सहभाग असून त्यांचं अस्तित्व शेती आणि निसर्गासाठी आवश्यक आहे. सर्पांना न मारता त्यांना वाचवण्याचा संदेश नागपंचमी देतो.

कोकणातील नागपंचमी हा केवळ एक सण नाही, तर निसर्गाशी नातं जोडणारा, सजीव सृष्टीविषयी आदर निर्माण करणारा आणि पारंपरिक श्रद्धा जपणारा एक संस्कृतिक पर्व आहे. मातीतून मूर्ती बनवणं, नैवेद्य अर्पण करणं, सहअस्तित्वाचा विचार – हे सर्व कोकणातील जीवनपद्धतीचं प्रतिबिंब आहे.

Facebook Comments Box

२९ जुलै पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-पंचमी – 24:48:47 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 19:28:34 पर्यंत
  • करण-भाव – 12:03:07 पर्यंत, बालव – 24:48:47 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शिव – 27:04:48 पर्यंत
  • वार- मंगळवार
  • सूर्योदय- 06:17
  • सूर्यास्त- 19:13
  • चन्द्र-राशि-कन्या
  • चंद्रोदय- 10:07:59
  • चंद्रास्त- 22:21:00
  • ऋतु- वर्षा

जागतिक दिन :

  • आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन
  • पावसाचा दिवस

महत्त्वाच्या घटना :

  • 1852 : जोतिबा फुले यांचा विश्रामबाग वाडा येथे स्त्री शिक्षणाचे भारतीय प्रणेते म्हणून पुणे महाविद्यालयाचे प्राचार्य मेजर कँडी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
  • 1876 : फादर आयगेन, डॉ. महेंद्र सरकार यांनी इंडियन असोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सची स्थापना केली.
  • 1920 : अमेरिकेतील न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्को शहरांदरम्यान जगातील पहिली हवाई मेल सेवा सुरू झाली.
  • 1921 : ॲडॉल्फ हिटलर राष्ट्रीय समाजवादी जर्मन वर्कर्स पार्टीचा नेता बनला.
  • 1946 : टाटा एअरलाइन्सचे नाव बदलून एअर इंडिया करण्यात आले.
  • 1948 : 12 वर्षानंतर लंडनमध्ये 14 व्या ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात आले.
  • 1957 : आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीची स्थापना.
  • 1985 : मल्याळम लेखक टी. एस. पिल्ले यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
  • 1987 : भारत-श्रीलंका शांतता करारावर स्वाक्षरी झाली.
  • 1997 : हरनाम घोष कोलकाता, स्मृती पुरस्कार दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांना प्रथमच मराठी लेखकाला मिळाला.
  • 2021 : इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे रशियन मॉड्यूल इंजिनमध्ये बिघाड झाल्यानंतर तात्पुरते नियंत्रणाबाहेर गेले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

  • 1838 : ‘शाहजहान बेगम’ – भोपाळच्या नवाब बेगम यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1901)
  • 1883 : ‘बेनिटो मुसोलिनी’ – इटलीचा हुकूमशहा यांचा जन्म. (मृत्यू : 28 एप्रिल 1945)
  • 1898 : ‘इसिदोरआयझॅक राबी’ – नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1904 : ‘जे. आर. डी. टाटा’ – भारतीय उद्योजग तसेच ते भारताचे पहिले वैमानिक आणि भारतीय विमान वाहतुकीचे जनक यांचा जन्म. (मृत्यू : 29 नोव्हेंबर 1993)
  • 1922 : ‘ब. मो. पुरंदरे’ – लेखक आणि शिवशाहीर यांचा जन्म.
  • 1925 : ‘शि. द. फडणीस’ – व्यंगचित्रकार यांचा जन्म.
  • 1937 : ‘डॅनियेल मॅकफॅडेन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ यांचा जन्म.
  • 1953 : ‘अनुप जलोटा’ – भजन गायक यांचा जन्म.
  • 1954 : ‘हर्षद मेहता’ – भारतीय स्टॉक ब्रोकर आणि एक दोषी फसवणूक करणारा यांचा जन्म.
  • 1959 : ‘संजय दत्त’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचा जन्म.
  • 1981 : ‘फर्नांडो अलोन्सो’ – स्पॅनिश फोर्मुला वन रेस कार ड्रायव्हर यांचा जन्म.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

  • 238 : 238ई.पुर्व : ‘बाल्बिनस’ – रोमन सम्राट यांचे निधन.
  • 1108 : ‘फिलिप (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 23 मे 1052)
  • 1891 : ‘पं. ईश्वरचंद्र विद्यासागर’ – यांचे निधन.
  • 1781 : ‘योहान कीज’ – जर्मन गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 14 सप्टेंबर 1713)
  • 1890 : ‘व्हिन्सेंटव्हॅन गॉग’ – डच चित्रकार यांचे निधन. (जन्म : 30 ऑगस्ट 1853)
  • 1891 : ‘ईश्वरचंद्र विद्यासागर’ – बंगाली समाजसुधारक यांचे निधन. (जन्म : 26 सप्टेंबर 1820)
  • 1900 : ‘उंबेर्तो पहिला’ – इटलीचा राजा यांचे निधन
  • 1987 : ‘बिभूतीभूशन मुखोपाध्याय’ – भारतीय लेखक, कवी आणि नाटककार यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1894)
  • 1994 : ‘डोरोथीक्रोफूट हॉजकिन’ – नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1996 : ‘अरुणा असफ अली’ – स्वातंत्र्यसेनानी यांचे निधन. (जन्म : 16 जुलै 1909)
  • 2002 : ‘सुधीर फडके’ – गायक व संगीतकार यांचे निधन. (जन्म : 25 जुलै 1919)
  • 2003 : ‘जॉनी वॉकर’ – हिंदी चित्रपट विनोदी अभिनेता यांचे निधन. (जन्म : 11 नोव्हेंबर 1926)
  • 2006 : ‘डॉ. निर्मलकुमार फडकुले’ – मराठी संत साहित्यातील विद्वान यांचे निधन. (जन्म : 16 नोव्हेंबर 1928)
  • 2009 : ‘महाराणी गायत्रीदेवी’ – जयपूरच्या राजमाता यांचे निधन. (जन्म : 23 मे 1919)
  • 2013 : ‘मुनीर हुसेन’ – भारतीय क्रिकेटरपटू यांचे निधन. (जन्म : 29 नोव्हेंबर 1929)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search