
CBSE Board 12th Result Update : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसईने यंदाच्या वर्षातील इयत्ता आज बारावीचा निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये बारावीच्या परीक्षेत एकूण 87.98 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याची माहिती बोर्डाने दिली आहे. दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या या परीक्षेत सुमारे 17 लाख विद्यार्थी बसले होते.या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. एकूण 91% मुलीं या परीक्षेत पास झाल्या आहेत. तर मुलांचा निकाल 85.12% एवढा लागला आहे.
या लिंकवर पाहा तुमचा निकाल
नॉन उपनगरीय स्थानके NSG | ||
स्थानकांची वर्गवारी | कमाई | प्रवासी संख्या |
NSG 1 | 500 कोटीपेक्षा जास्त | 2 कोटींहून अधिक |
NSG 2 | 100 ते 500 कोटी | 1 ते 2 कोटी |
NSG 3 | 20 ते 100 कोटी | 50 लाख ते 1 कोटी |
NSG 4 | 10 ते 20 कोटी | 20 लाख ते 50 लाख |
NSG 5 | 1 ते 10 कोटी | 10 लाख ते 20 लाख |
NSG 6 | 1 कोटी पेक्षा कमी | 10 लाख पेक्षा कमी |
उपनगरीय स्थानके SG | ||
स्थानकांची वर्गवारी | कमाई | प्रवासी संख्या |
SG 1 | 25 कोटीपेक्षा जास्त | 3 कोटींहून अधिक |
SG 2 | 10 ते 25 कोटी | 1 ते 3 कोटी |
SG 3 | 10 कोटी पेक्षा कमी | 1 कोटी पेक्षा कमी |
हॉल्ट स्थानके | HG | |
स्थानकांची वर्गवारी | कमाई | प्रवासी संख्या |
HG 1 | 50 लाखपेक्षा जास्त | 3 लाखपेक्षा जास्त |
HG 2 | 5 लाख ते 50 लाख | 1 लाख ते 3 लाख |
HG 3 | 5 लाख पेक्षा कमी | 1 लाख पेक्षा कमी |
NSG2 (१ स्थानक)
मडगाव जं.
NSG3 (७ स्थानके)
चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, थिविम, करमाळी, उडुपी
NSG4 (२ स्थानके)
सावंतवाडी रोड, कारवार
NSG5 (२२ स्थानके)
माणगाव, वीर, खेड, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, सिंधुदुर्ग, पेर्नेम, अंकोला, गोकर्ण रोड, कुमटा, होन्नावर, मुर्डेश्वर, भटकळ, कुंदापुरा, बारकुर, मुल्की, सुरथकल
NSG6 (३३ स्थानके)
कोलाड, इंदापूर, गोरेगाव रोड, सपे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाण खवटी, अंजनी, कामठे, कडवई, उक्षी, भोके, निवासर, वेरावली, खारेपाटण, नांदगाव रोड, झाराप, मदुरे, वेर्ना, माजोर्डा जं., बल्ली, कानाकोना, लोलिम, अस्नोती, हार्वर्ड, मानकी, शिरूर, बिजूर, सेनापुरा, इन्नांजे, पाडुबिद्री, नंदीकूर, ठाकूर
HG1 (१ स्थानक)
बाइंदूर मुकांबिका रोड
HG2 (२ स्थानके)
सौंदल, सुरावली
HG3 (१ स्थानक)
चित्रपूर
Ad -
Mumbai Local: तापमानाचा पारा वाढला आहे. मुंबईत तर गरमी वाढल्याने नागरिक तर हैराण झाले आहेत. मात्र उपनगरीय लोकल सेवेत एसी लोकल चा भरणा केल्याने काही जास्त पैसे मोजून गारेगार प्रवासाचा अनुभव घेणे आता शक्य झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पण आता वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. काही प्रवाशांकडे एसी लोकलचे तिकिट अथवा पास नसूनसुद्धा सर्रास या लोकल मध्ये प्रवास करत असल्याचे दिसत आहे. परिणामी एसी लोकल्स मध्ये सामान्य लोकल्स प्रमाणे गर्दी पाहायला मिळत आहे. कित्येकवेळा गर्दीमुळे स्वयंचलित दरवाजे बंद होण्यास अडथळा निर्माण होऊन गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होत आहे.
सोशल मीडियावर ठाणे स्थानकावरील एका एसी लोकलची एक चित्रफित व्हायरल होत आहे. या चित्रफितीत एका डब्यात प्रवाशांची एवढी गर्दी झाली की गाडीचे स्वयंचलित दरवाजे बंद होत नव्हते. एसी लोकल पासधारक आणि तिकीटधारक प्रवाशांनी याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी दावा केला आहे की गाडीत गर्दी करणाऱ्या बहुतेक जणांकडे एसीचा पास नसतो तरीपण ते एसी लोकल मध्ये प्रवास करत आहेत. सुरवातीला या गाड्यांमध्ये नेहमी दिसणारे टीसी पण आजकाल गायबच असतात त्यामुळे अशा प्रवाशांचे फावतच आहे. मात्र त्यामुळे ज्या प्रवाशांनी एसी वर्गाचा पास किंवा तिकीटे खरेदी केली आहेत त्या प्रवाशांवर अन्याय होत आहे. रेल्वे प्रशासनाने याची दखल घेऊन या समस्येवर उपाय काढावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
Morning scene at #Thane
AC Locals bursting at the Seams
with doors struggling to close.With TTE's absent during peak hours, its a FREE for all, Wonder how many are genuine passengers? @Central_Railway @drmmumbaicr @RailMinIndia
🎥 @csmohdpic.twitter.com/NZI0mmN1jd
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) May 9, 2024
कौल जनतेचा
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात मैदान कोण मारणार?
*नारायण राणे* की *विनायक राऊत*
आपला उमेदवार मागे ईथेही मागे पडता नये… खालील लिंक वर क्लिक करून आपले मत नोंदवा…
व्यक्त व्हा…रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?#LokasabhaElection2024 #Ratnagiri #sindhudurg #narayanrane #vinayakraut #ShivsenaUBT #bjp
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) May 8, 2024
Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यातील मतदान आज पार पाडले. महाराष्ट्र राज्यात 54.98% एवढे मतदान झाले असून सर्वात जास्त मतदान कोल्हापूर मतदारसंघात (63.71%) झाले आहे तर सर्वात कमी मतदान माढा मतदारसंघात (47.84%) एवढे झाले आहे.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 53.75% मतदान झाले आहे. या मतदारसंघात सावंतवाडीत सर्वाधिक 60.30% एवढे मतदान झाले असून राजापुरात सर्वात कमी 47.31% एवढे मतदान झाले आहे.
रायगड लोकसभा मतदारसंघात 50.31% मतदान झाले आहे. या मतदारसंघात दापोली येथे सर्वाधिक 59.12% एवढे मतदान झाले असून महाड मध्ये सर्वात कमी 45.60% एवढे मतदान झाले आहे.
देशात आज निवडणूकीच्या तिसर्या टप्प्यात एकूण 61.60% एवढे मतदान झाले असून आसाम राज्यात सर्वाधिक सुमारे 75.30% एवढे मतदान झाले आहे तर महाराष्ट्र राज्य टक्केवारीत (54.98%) सर्वात मागे आहे. अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्याने उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. मतदानाच्या टक्क्यावर वाढलेल्या तापमानाचा परिणाम झाला असून मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे.
टीप : वरील आकडेवारी शासनाच्या अधिकृत माध्यमांतून उपलब्ध झाली असली तरी ती अंदाजित स्वरूपाची आहे. ही माहिती टप्प्याटप्प्याने येत असल्याने त्यात काहीशी वाढ अपेक्षित आहे. यात टपालाने केलेल्या मतांचा समावेश नाही आहे.
Ad -
Content Protected! Please Share it instead.