Matheran toy train: हिवाळी पर्यटनासाठी माथेरानला जाण्याचा बेत असलेल्या पर्यटकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येथे धावणारी टॉय ट्रेन सेवा पुन्हा एकदा सुरू होत आहे.
दरवर्षी पावसाळ्यात चार महिने अतिवृष्टीमुळे दरडी कोसळण्याची भीती असते. या कारणास्तव मिनीट्रेनची ही सेवा बंद करण्यात येते. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी ही मिनीट्रेनची सेवा सुरु होते.का
ही तांत्रिक आडचणींमुळे या वर्षी 1 नोव्हेंबरपासून माथेरानची ही मिनी ट्रेन सुरु करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे
४००४: ४००४ ई. पू.: उस्शेर कालक्रमानुसार सुमारे संध्याकाळी सहा वाजता जग तयार केले गेले.
१६३३: लियाओउलू उपसागाराची लढाई: मिंग राजघराण्याने डच ईस्ट इंडिया कंपनीला पराभूत केले.
१७९७: बलूनमधून १००० मीटर उंच जाऊन पॅराशूटच्या साहाय्याने आंद्रे जॅक्कस गार्नेरिन जमिनीवर उतरणारा पहिला मानव बनला.
१८६७: नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ कोलंबिया ची पायाभरणी करण्यात आली.
१८७८: सेलफोर्ट येथे ब्राऊंटन आणि स्वींटन संघा दरम्यान पहिला रग्बी सामना खेळला गेला.
१९२७: निकोला टेस्ला यांनी सिंगल-फेज इलेक्ट्रिकसह सहा नवीन शोध लावले.
१९३८: चेस्टर कार्लसनने जगातील पहिले झेरॉक्स मशिन तयार केले.
१९६३: पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
१९६४: फ्रेन्च लेखक, कवी आणि तत्त्वज्ञ जेआँ-पॉल सार्त्र यांना नोबेल पुरस्कार मिळाला पण त्यांनी तो नाकारला.
१९९४: भारतीय उद्योगपती नवीनभाई सी. दवे यांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांचा उद्योग व शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ’कोट ऑफ आर्म्स’ पुरस्कार जाहीर
पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते भाक्रा धरण राष्ट्राला अर्पण करण्यात आले.
२००१: ग्रँड थेफ्ट ऑटो ३ हा वीडीओ गेम प्रकाशित झाला.
२००८: भारताने आपल्या पहिल्या मानवविरहित चांद्रयानाचे (चांद्रयान-१) प्रक्षेपण केले.
२०१६: भारतीय कबड्डी संघाने भारतातील अहमदाबाद येथे आयोजित कबड्डीचा विश्व कप जिंकला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१६८८: इतिहासातील सर्वात शक्तिशाली इराणी राज्यकर्ते नादिर शाह यांचा जन्मदिन
१६८९: जॉन (पाचवा) – पोर्तुगालचा राजा (मृत्यू: ३१ जुलै १७५०)
१६९८: नादिर शहा – पर्शियाचा सम्राट (मृत्यू: १९ जून १७४७)
१८७३: तीर्थराम हिरानंद गोसावी ऊर्फ ’स्वामी रामतीर्थ’ – गोस्वामी तुलसीदासांचे वंशज असणारे अमृतानुभवी संत (मृत्यू: १७ आक्टोबर १९०६)
१९००: भारतीय स्वातंत्र्यसैनिक अश्फाक़ुला खान यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर १९२७)
१९०३: पद्मभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय कैरा जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक त्रिभुवनदास किशीभाई पटेल यांचा जन्मदिन.
१९४२: रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार (मृत्यू: १८ एप्रिल १९९९ – न्यूयॉर्क)
१९४६: भारतीय वंशीय अमेरिकन लेखक आणि वैकल्पिक-वैद्यकीय सल्लागार दीपक चोप्रा यांचा जन्मदिन.
१९४७: दीपक चोप्रा – भारतीय वंशाचे अमेरिकन डॉक्टर व लेखक
१९४८: माईक हेंड्रिक – इंग्लंडचा गोलंदाज
१९८८: भारतीय अभिनेत्री परिणीती चोप्रा यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१६८०: मेवाड येथील सिसोदिया राजवंशाचे शासक महाराणा राज सिंह यांचे निधन.
१८९३: पंजाब येथील शीख साम्राज्य शासक महाराज रणजितसिंह यांचे छोटे पुत्र व शेवटचे शीख सम्राट महाराज दुलीप सिंह यांचे निधन.
१९१७: इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चचे संस्थापक चार्ल्स पार्डे ल्यूकिस यांचे निधन.
१९३३: बॅ. विठ्ठलभाई पटेल – थोर देशभक्त, राजकीय नेते आणि हिंदुस्थानच्या केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय अध्यक्ष, सरदार वल्लभभाई पटेल यांचे थोरले बंधू (जन्म: १८ फेब्रुवारी १८७१)
१९५४: भारतातील पश्चिम बंगाल राज्यातील बंगाली भाषिक कवी, लेखक, कादंबरीकार आणि निबंधकार जीवनानंद दास यांचे निधन.
१९७८: नारायण सीताराम तथा ना. सी. फडके – साहित्यिक व वक्ते (जन्म: ४ ऑगस्ट १८९४)
१९९१: ग. म. सोहोनी – देहदान चळवळीचे पुरस्कर्ते व देहदान सहाय्यक मंडळाचे संस्थापक (जन्म: ? ? ????)
१९९८: अजित खान ऊर्फ ’अजित’ – हिन्दी चित्रपटांतील खलनायक (जन्म: २७ जानेवारी १९२२)
२०००: अशोक मोतीलाल फिरोदिया – अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख कार्यवाह, सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती (जन्म: ? ? ????)
२०१४: भारतीय दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर अशोक कुमार यांचे निधन.
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
रत्नागिरी: महाराष्ट्र शासनाने ६५ वर्षावरील जेष्ठ नागरीकांसाठी एसटी ने प्रवास मोफत केला आहे. मात्र या वयोगटातील प्रवाश्यांची संख्या कमी आहे. शारीरीक अडचणीमुळे जेष्ठ नागरीकांना बस मध्ये चढणे, उतरणे कठीण जाते. तसेच त्यांना एस टी ने प्रवास करण्यास कुटुंबही नकार देतात. या स्थितीत ६५ वर्षापासुन वयोगटांतील जेष्ठ नागरीकांनाही मोफत प्रवासाचा लाभ मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे पावस विभाग अध्यक्ष संतोष पोकडे यांनी केली आहे.
आर्थिक अडचणीमुळे अनेक जेष्ठ नागरीकांना आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी प्रवास करता येत नाही. या समस्येचा सारासार विचार करून शासनाने या वयोगटातील नागरीकांनाही मोफत प्रवास योजनेत सहभागी करुन घ्यावे, तसेच या मागणीचे समर्थन पावस विभागातील काही सामाजिकक संस्थानीही केले असुन ६५ वर्षावरील सर्व जेष्ठ नागरीकांना मोफत एस टी प्रवासाची सुविधा मिळावी व शासनाने जेष्ठ नागरीकांच्या प्रवास सोईकडे विशेष लक्ष घालावे, असे संतोष पोकडे यांनी सांगितले.
नक्षत्र-रोहिणी – 06:50:29 पर्यंत, मृगशिरा – 29:51:08 पर्यंत
करण-कौलव – 15:19:31 पर्यंत, तैतुल – 26:31:19 पर्यंत
पक्ष-कृष्ण
योग-वरियान – 11:09:57 पर्यंत
वार-सोमवार
सूर्योदय-06:34:42
सूर्यास्त-18:11:06
दिनविशेष
महत्वाच्या घटना
१२९६: अल्लाउद्दिन खिलजी हे दिल्ली येथील शासक बनले.
१८५४: फ्लोरेन्स नायटिंगेल आणि इतर ३८ नर्सेसना क्रिमीयन युद्धात वैद्यकीय सेवेसाठी पाठवण्यात आले.
१८७९: थॉमस एडीस यांनी दिव्यांच्या प्रकाशाच्या डिझाइनसाठी पेटंट दाखल केले.
१८८८: स्वीस सोशल डेमोक्रेटिक पार्टी सुरु झाली.
१९३४: जयप्रकाश नारायण यांनी ’काँग्रेस सोशालिस्ट पार्टी’ची स्थापना केली.
१९४३: सिंगापूर येथे आझाद हिन्द सेनेची स्थापना
१९४५: फ्रान्समधे स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळाला.
१९५१: डॉ. शामाप्रसाद मुकर्जी यांनी दिल्ली येथे ’भारतीय जनसंघ’ या पक्षाची स्थापना केली.
१९८३: प्रकाशाने निर्वातात १/२९९७९२४५८ सेकंदात कापलेले अंतर अशी १ मीटरची व्याख्या ठरवली गेली.
१९८७: भारतीय शांतिसेनेने (IPKF) जाफनातील एका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ७० तामिळ ठार झाले. यात रुग्ण, डॉक्टर व नर्सेसचा समावेश होता.
१९८९: जनरल अरुणकुमार वैद्य यांचे मारेकरी सुखदेवसिंग आणि हरविंदरसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
१९९२: अकराव्या ताश्कंद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात अभिनेत्री अपर्णा सेन यांना ‘महापृथ्वी‘ या बंगाली चित्रपटातील भूमिकेबद्दल सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.
१९९९: चित्रपट निर्माते बी. आर. चोप्रा यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार‘ जाहीर
२००२: मुंबई पोलिसांनी सलमान खान विरुद्ध वांद्रे दंडाधिकारी कोर्टात आरोपपत्र दाखल केले.
२०१८: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतील आपत्ती प्रतिसाद कार्यात सहभागी पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांचा सन्मान करण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या नावाने पुरस्कार जाहीर केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८३०: हिमालय भागाचा शोध लावणारे पहिले भारतीय व्यक्ती नैन सिंह रावत यांचा जन्मदिन.
१८३३: अल्फ्रेड नोबेल – स्वीडीश संशोधक आणि नोबेल पुरस्कारांचे प्रणेते (मृत्यू: १० डिसेंबर १८९६)
१८८७: भारतीय वकील आणि राजकारणी कृष्णा सिंह यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जानेवारी १९६१)
१९१७: राम फाटक – गायक व संगीतकार (मृत्यू: २६ सप्टेंबर २००२)
१९२०: धर्मभास्कर गं. ना. कोपरकर – वैदिक धर्म, संस्कृती, तत्त्वज्ञान यांचा विज्ञानाधारित अभ्यास करुन त्या संदर्भाचे लेखन, प्रकाशन, प्रचार व संशोधन त्यांनी केले. चार वेद, सहा शास्त्रे, मनुस्मृती, याज्ञवल्कस्मृती व इतर अनेक असे धर्म या विषयावर १९७ ग्रंथ त्यांनी लिहीले. त्यांना द्वारकापीठाच्या शंकराचार्यांकडून ’धर्मभास्कर’ तर करवीरपीठाच्या शंकराचार्यांकडून ’धर्मऋषी’ या पदव्या मिळाल्या होत्या.
१९३१: शम्मी कपूर – हिन्दी चित्रपट अभिनेता व निर्माता (मृत्यू: १४ ऑगस्ट २०११)
१९३८: प्रख्यात भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री आणि नर्तक हेलन यांचा जन्मदिन.
१९४०: एडसन अरांतेस डो नासिमेंटो उर्फ पेले – ब्राझीलचा फुटबॉलपटू
१९४९: बेंजामिन नेत्यान्याहू – इस्त्रायलचे ९वे पंतप्रधान
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१४२२: चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: १६ सप्टेंबर १३८०)
१८३५: मुथुस्वामी दीक्षीतार – तामिळ कवी व संगीतकार (जन्म: २४ मार्च १७७५)
१९८१: दत्तात्रय रामचंद्र बेन्द्रे – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कन्नड कवी (जन्म: ३१ जानेवारी १८९६ – धारवाड, कर्नाटक)
१९९०: भारतीय तत्त्ववेत्ता आणि लेखक प्रभात रंजन सरकार यांचे निधन. (जन्म: २१ मे १९२१)
१९९५: लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका (जन्म: ९ एप्रिल १९२५)
२०१०: भारतीय कवी आणि अनुवादक अ. अय्यप्पन यांचे निधन. (जन्म: २७ ऑक्टोबर १९४९)
२०१२: यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (जन्म: २७ सप्टेंबर १९३२)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
BJP Candidates List : आता होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भाजपाने ९९ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत.
१९७३: सिडनी ऑपेरा हाऊस चे उद्घाटन एलिझाबेथ (दुसरी) यांनी केले.
१९५०: कृ. भा. बाबर यांनी ’समाजशिक्षणमाला’ स्थापन केली. नवशिक्षीत आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंना ज्ञानाच्या विविध अंगांची ओळख व्हावी यासाठी श्री. बाबर व त्यांच्या कन्या डॉ. सरोजिनी बाबर यांनी या मालेत शेकडो पुस्तके प्रकाशित केली.
१९५२: केनियामधे आणीबाणी जाहीर करण्यात आली. जोमो केन्याटा व इतर प्रमुख नेत्यांचे अटकसत्र सुरू.
१९९१: उत्तरकाशी मधे ६.८ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १,००० पेक्षा अधिक जण मृत्यूमुखी पडले.
१९९५: ’ट्वेंटिएथ सेंचुरी फॉक्स’ या संस्थेकडून हिन्दी चित्रपटांतील अभिनेते देव आनंद यांना ’मॅन ऑफ द सेंचुरी’ हा सन्मान जाहीर
२००१: रंगभूमीवर सुमारे ४० वर्षे विविध प्रयोग करणारे पंडित सत्यदेव दुबे यांना ’विष्णुदास भावे गौरवपदक’ जाहीर
२०११: लिबीयन गृहयुद्ध – राष्ट्रीय परिवर्तन परिषदेच्या (National Transitional Council) च्या सैनिकांनी हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांना पकडून ठार केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
१८५५: गोवर्धनराम त्रिपाठी – गुजराथी लेखक, ’सरस्वतीचंद्र’ हा गाजलेला चित्रपट त्यांच्याच चार भागांतील कादंबरीवर आधारलेला आहे. (मृत्यू: ४ जानेवारी १९०७ – मुंबई)
१८९१: सर जेम्स चॅडविक – अणूमधील न्यूट्रॉनच्या शोधाबद्दल १९३५ मधे नोबेल पारितोषिक मिळालेले ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक (मृत्यू: २४ जुलै १९७४)
१८९३: जोमो केन्याटा – केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: २२ ऑगस्ट १९७८)
१९१६: मेहबूब हुसेन पटेल ऊर्फ ’शाहीर अमर शेख’ – लोकशाहीर (मृत्यू: २९ ऑगस्ट १९६९)
१९२०: साली भारतीय कायदेपंडित, मुत्सद्दी आणि पश्चिम बंगालमधील भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे राजकारणी व पश्चिम बंगाल राज्याचे माजी मुख्यमंत्री, पंजाब राज्याचे माजी राज्यपाल व अमेरिकेचे भारतीय राजदूत अशी अष्टपैलू कामगिरी सांभाळणारे सिद्धार्थ शंकर राय यांचा जन्मदिन.
१९२७: भारतीय कवी आणि समीक्षक गुंटूर सेशंदर शर्मा यांचा जन्म. (मृत्यू: ३० मे २००७)
१९३०: साली भारताची राजधानी दिल्ली येथील उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ यांचा जन्मदिन.
१९६३: नवजोत सिंग सिद्धू – क्रिकेटपटू, समालोचक व खासदार
१९७८: वीरेन्द्र सहवाग – धडाकेबाज फलंदाज
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
१८९०: सर रिचर्ड बर्टन – ब्रिटिश लेखक, कवी, संशोधक, मुत्सद्दी आणि गुप्तहेर (जन्म: १९ मार्च १८२१)
१९८२: भारतीय वरिष्ठ नागरी सेवक अधिकारी तसचं, केरळ आणि मध्य प्रदेश राज्यांचे राज्यपाल निरंजन नाथ वांचू यांचे निधन.
१९६१: व्ही. एस. गुहा – मानववंशशास्त्रज्ञ. १९४६ मध्ये त्यांच्या प्रयत्नांनी कलकत्ता येथे भारतीय मानववंशशास्त्र संशोधन संस्था स्थापन झाली. भारतात जनगणनेच्या कार्यात त्यांनी मौलिक भर घातली. (जन्म: ? ? ????)
१९६४: हर्बर्ट हूव्हर – अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १० ऑगस्ट १८७४)
१९७४: कृष्णाजी गणेश फुलंब्रीकर तथा ’मास्टर कृष्णराव’ – प्रतिभावान गायक, अभिनेते व संगीतकार, त्यांच्या गायनात ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर घराण्यांचा संगम दिसून येई. ’वंदे मातरम’ला त्यांनी दिलेली चाल लोकप्रिय ठरली. (जन्म: २० जानेवारी १८९८)
१९८४: पॉल डायरॅक – नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ८ ऑगस्ट १९०२)
१९९६: दि. वि. तथा ’बंडोपंत’ गोखले – पत्रकार, युद्धशास्त्राचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
१९९९: माधवराव लिमये – समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार (जन्म: ? ? १९१५)
२००९: वीरसेन आनंदराव तथा ’बाबा’ कदम – गुप्तहेरकथालेखक (जन्म: ४ मे १९२९)
२०१०: पार्थसारथी शर्मा – क्रिकेटपटू (जन्म: ५ जानेवारी १९४८)
२०११: मुअम्मर गडाफी – लिबीयाचे हुकूमशहा (जन्म: ७ जून १९४२)
दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.
नवी दिल्ली: भारतीय रेल्वेला सध्या कर्मचाऱ्यांच्या कमतरतेने त्रस्त केले आहे. अनेक वर्षांपासून रेल्वेत पुरेशा प्रमाणात कर्मचारी नियुक्ती झालेली नाही. त्यामुळे उपलब्ध यंत्रणांवर खूप ताण येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी रेल्वे आपल्या अराजपत्रित Retired कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेणार आहे. तशा आशयाचे पत्र रेल्वे बोर्डाने सर्व प्रादेशिक व्यवस्थापकांना लिहिले आहे.
६५ वर्षांखालील सेवानिवृत्त कर्मचारी पर्यवेक्षक आणि ट्रॅक पुरुष यासारख्या भूमिकांसाठी अर्ज करू शकतात. मुदतवाढीच्या पर्यायासह नियुक्त्या दोन वर्षांसाठी राहतील. सर्व रेल्वे झोनचे महाव्यवस्थापक या सेवानिवृत्तांना त्यांच्या शारीरिक तंदुरुस्ती Fitness आणि गेल्या पाच वर्षातील कामगिरीच्या रेटिंगच्या आधारे नियुक्त करू शकतील अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वेत सध्या सुपरवायजर व कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेत भरती झाली नसल्याने सध्याच्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण आहे. हा ताण कमी करण्यासाठी व नव्याने तरुण कर्मचाऱ्यांची भरती करुन त्यांना प्रशिक्षण देण्याऐवजी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आपल्या पदावर काम करण्यासाठी आमंत्रित केले आहे. पुनर्नियुक्त कर्मचाऱ्यांना त्यांना निवृत्त होताना असलेले वेतन दिले जाणार आहे मात्र त्यातून त्यांचे मूळ पेन्शन वजा केले जाईल. त्यांना प्रवासासाठी आणि अधिकृत टूरसाठी प्रवास भत्ते देखील मिळतील परंतु अतिरिक्त लाभ किंवा पगार वाढीसाठी ते पात्र नसतील.
वाढत्या रेल्वे अपघात आणि कमी होत जाणारे कर्मचारी वर्ग यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या रेल्वे अपघात आणि कमी होत जाणारे कर्मचारी वर्ग यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत भारतीय रेल्वेच्या सर्व विभागात Zones एकूण २५००० कर्मचारी भरती करण्याचे उद्दिष्ट आहे.
राज्यातील तमाम जनतेला अभिमान वाटावा अशी एक अभिमानाची बातमी समोर आली आहे. आता जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि मराठा लष्करी इतिहास शिकवला जाणार आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सेंटर ऑफ एक्सलन्स सुरू करण्यात येणार आहे. या द्वार अखंड भारताची संकल्पना आणि हिंदवी स्वराज्यासाठी शिवरायांचा संघर्ष शिकवला जाणार आहे. जेएनयूच्या – कुलगुरू प्रा. शांति श्री घुलीपूडी पंडित यांनी याबाबत माहिती दिली.
हा अभ्यासक्रम जेएनयू येथील स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज अंतर्गत सुरू केला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज सेंटर फॉर सिक्युरिटी अँड स्ट्रैटिजिक स्टडीज वा नावाने सुरू होणाऱ्या या अभ्यासक्रमाला महाराष्ट्र सरकारचे सहकार्य लाभणार आहे. या कोर्समध्ये इतर विषयांसह भारतीय सामरिक विचार, मराठा लष्करी इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची नौदल रणनीती आणि गनिमी युद्ध शिकविण्यावर भर दिला जाईल. जेएनयूमध्ये मराठा ग्रँड स्ट्रॅटेजि, गुरिल्ला डिप्लोमसी, शिवाजी महाराजांच्या काळातील स्टेटक्राफ्ट आणि त्यानंतर स्टेटक्रापट इत्यादी सहा अभ्यासक्रम शिकवण्याचा प्रस्ताव आहे. या कोर्ससाठी पहिल्या पाच वर्षात सुमारे १५ ते ३५ कोटी रुपये खर्च येऊ शकतो.
महाराष्ट्र सरकारकडून १० कोटींचा निधी
“आम्हाला भारतीय ज्ञान व्यवस्थेत बदल घडवून आणायचा होता आणि भारताच्या सुरक्षा आणि धोरणात्मक अभ्यासासाठी पर्यायी मॉडेल्स आणायचे होते. जेएनयुमधील सध्याचा अभ्यासक्रम हा प्रामुख्याने पाश्चात्य अँग्लो-अमेरिकन मॉडेलचा आहे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, विशेषतः त्यांची नौदल शाखा, त्यांची नौदल युद्धाची संकल्पना आणि हिंदवी स्वराज या संकल्पनेचा नीट अभ्यास केलेला नाही. आम्हाला वाटले की यांचाही अभ्यास करायला हवा. महाराष्ट्र सरकारने या उपक्रमासाठी खूप उत्साह दाखवला आणि आम्हाला १० कोटी रुपयेही दिले. भारत बदलाच्या काळातून जात आहे आणि म्हणूनच आपला इतिहास आणि प्रतीके पुनर्मूल्यांकन करणे देखील महत्त्वाचे आहे. असं जेएनयूच्या प्राचार्या शातिश्री धुलीपुडी पंडित यांनी सांगितलं.
Indian Railway: भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमांत एक मोठा बदल केला आहे. सध्या आगाऊ आरक्षण 120 दिवस आधी करता येते त्यात बदल करून ही मर्यादा 60 दिवसांवर आणण्यात आली आहे . म्हणजे आता रेल्वे आरक्षण फक्त 60 दिवस अगोदर करता येणार आहे. गुरुवारी (17 ऑक्टोबर 2024) रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता आगाऊ आरक्षणाची अंतिम मुदत कमी करण्यात आली आहे. यामुळे लोकांना आगाऊ तिकीट काढण्यासाठी कमी वेळ मिळेल.
रेल्वेने या अधिसूचनेत म्हटले आहे की 1 नोव्हेंबर 2024 पासून, ट्रेनमधील आगाऊ आरक्षणाची सध्याची वेळ मर्यादा 120 दिवसांवरून 60 दिवसांपर्यंत कमी केली जाईल (प्रवासाची तारीख वगळता). तथापि, 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत 120 दिवसांच्या ARP अंतर्गत केलेले सर्व बुकिंग कायम राहतील. हा नवा नियम नोव्हेंबरपासून केलेल्या बुकिंगवर लागू होणार आहे.
ताजसारख्या ट्रेनला नियम लागू होत नाहीत
ताजसारख्या दिवसा काही वेळा धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांच्या बाबतीत कोणताही बदल होणार नाही, असेही रेल्वेने म्हटले आहे. एक्स्प्रेस, गोमती एक्स्प्रेस इत्यादींमध्ये आगाऊ आरक्षणाची वेळ मर्यादा कमी आहे. याशिवाय विदेशी पर्यटकांसाठी ३६५ दिवसांच्या मर्यादेत कोणताही बदल होणार नाही.
Indian Railway : रेल्वे तिकीट बुकिंग आरक्षणाची मर्यादा 120 दिवसांवरून 60 दिवसांवर येणार.. दिनांक 01 नोव्हेंबरपासून नवीन बदल लागु होणार.#IndianRailways
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर सुरवातीपासून धावणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस येत्या फेब्रुवारीपासून एलएचबी कोचसहित धावणार असल्याची माहिती दक्षिण रेल्वेने प्रसिद्ध केली आहे. अलीकडेच या गाडीच्या छताचा भाग कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती त्यामुळे या गाडीचे जुने डबे बदलून नवीन स्वरूपाचे एलएचबी कोच जोडण्यात यावेत अशी मागणी प्रवासी संघटनेनंकडून होत होती.
दक्षिण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १२६२०/१२६१९ मंगुळुरु – एलटीटी – मंगुळुरु मत्स्यगंधा एक्सप्रेस दिनांक १७ फेब्रुवारीपासून एलएचबी कोचसहित धावणार आहे.
डब्यांच्या संरचनेत बदल
ही गाडी सध्या २३ आयआरएस कोच सहित धावत असून सुधारित डब्यांच्या संरचनेनुसार २२ एलएचबी डब्यांसह चालविण्यात येणार आहे.
सध्याची संरचना – एसी टू टियर – ०२, एसी थ्री टियर – ०४, सलीपर – ११, जनरल – ०४, एसएलआर – ०२ असे मिळून एकूण २३ आयआरएस डबे
सुधारित संरचना – एसी टू टियर – ०२, एसी थ्री टियर – ०४, एसी थ्री टियर इकॉनॉमी – ०२, सलीपर – ०८, जनरल – ०४, दिव्यांगनासाठी – ०१, ब्रेकव्हॅन – ०१ असे मिळून एकूण २२ एलएचबी डबे
सुधारित संरचनेत या गाडीच्या जनरल डब्यांत कपात करण्यात आली असून त्यांची संख्या ११ वरुन ८ वर आणण्यात आली आहे. तर एसी थ्री टियर इकॉनॉमीचे २ जोडण्यात येणार आहेत.
देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील प्रवासी, पर्यटक आणि व्यापाऱ्यांसाठी मे १९९८ रोजी मत्स्यगंधा एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. मात्र गेल्या २६ वर्षांत या रेल्वेगाडीत कोणतेही बदल करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे या रेल्वेगाडीचे डबे खराब झाले असून, मोडकळीस आले होते. गेल्या पाच वर्षांपासून प्रवासी संघटनाकडून या रेल्वेगाडीला लिंके हॉफमन बुश (एलएचबी) डबे जोडण्याची मागणी रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंडळ आणि दक्षिण रेल्वेकडे करण्यात येत होती. तर, जुलै २०२४ रोजी उडुपी – चिकमंगलुरू येथील खासदार कोटा श्रीनिवास पुजारी यांनी रेल्वेमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीदरम्यान मत्स्यगंधा एक्स्प्रेससाठी एलएचबी डबे जोडण्याची मागणीही केली होती. अलीकडेच या गाडीच्या छताचा काही भाग कोसळल्याचा विडिओ एका प्रवाशाने X या समाज माध्यमावर पोस्ट केला होता.