Category Archives: सिंधुदुर्ग
“तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या वतीने राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्यपदी, उर्वरित ५ जागांपैकी एका जागेवर, श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या नावाचे नामनिर्देशन व शिक्कामोर्तब करण्यासाठी ६७३ पानांचा प्रस्ताव सादर.
Follow us on



मुंबई: कोकण व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भूमिपूत्र, प्रशासकीय स्वराज्य घडविण्यासाठी व शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण व्हावे यासाठी शैक्षणिक चळवळ राबवून अविरतपणे ज्ञानदान करणारे, प्रसिद्ध स्पर्धा परीक्षा व्याख्याते, उच्चविद्याविभूषित, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांची *समाजसेवा, कला व शिक्षण या क्षेत्रात* उर्वरित ५ जागांपैकी एका जागेवर राज्यपाल नियुक्त नामनिर्देशित सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी *“तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेच्या वतीने, श्री. सचिन यशवंत रेडकर, अध्यक्ष, तिमिरातुनी तेजाकडे यांनी राज्यपाल कार्यालयास दिनांक १९/११/२०२४ रोजी निवेदनासोबत शोधप्रबंध स्वरूपातील दस्तावेजांप्रमाणे भाग I, II, III, IV स्वरूपात ६७३ पानांचा प्रस्ताव सादर केला.* या प्रस्तावासोबत महाराष्ट्र व कोकणातील सर्वच घटकातील इच्छुक सामाजिक संस्था/मंडळांनी राज्यपालांना संबोधित केलेले शिफारस सह पाठिंबा पत्र सुद्धा संलग्न केले आहेत अशी माहिती त्यांच्यामार्फत देण्यात आली आहे.
भारतीय राज्यघटनेतील कलम 171 (5) खंड (3) च्या उपखंड (ई) अंतर्गत राज्यपालांनी नामनिर्देशित केले जाणारे सदस्य खालीलप्रमाणे अशा बाबींच्या संदर्भात विशेष ज्ञान किंवा व्यावहारिक अनुभव असलेल्या व्यक्तींचा समावेश असेल, म्हणजे: साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि समाजसेवा असे नमूद आहे. कार्यकारी प्रमुख या नात्याने माननीय राज्यपाल आपल्या स्वविवेकाधीन (डिस्क्रेशनरी) अधिकारांचा वापर करून, सदर प्रस्तावातील संलग्न दस्तावेजांचे अवलोकन करून याबाबतीत योग्य निर्णय घेऊन, कोकण भूमिपुत्र, मा. श्री. सत्यवान यशवंत रेडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील. त्याचप्रमाणे या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सरकारमधील इच्छुक पक्ष सुद्धा आपल्या माध्यमातून, राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या, उच्चशिक्षित व्यक्तिच्या ज्ञानाचा तसेच अनुभवाचा समाजाला फायदा व्हावा व विधानपरिषदेत सदस्यपदी वर्णी लागावी यासाठी नवीन मंत्रिमंडळात नक्कीच चर्चेद्वारे शिफारस करून नामनिर्देशन यादीत नाव समाविष्ट करतील असा आम्हाला व समस्त कोकणवासियांना, हितचिंतकांना एक मतदार व सुजाण नागरिक स्वरूपात आत्मविश्वास आहे, उच्चशिक्षित तरूण व्यक्तींनी विधानपरिषदेत येणे व सत्ताधारी पक्षांनी अशा व्यक्तींना संधी देणे ही लोकशाही च्या अनुषंगाने काळाची गरज आहे, तरच समाजात आमुलाग्र बदल घडू शकतील असे मत “तिमिरातुनी तेजाकडे” या संस्थेचे अध्यक्ष, श्री. सचिन यशवंत रेडकर यांनी व्यक्त केले.




सिंधुदुर्ग : चिपी-मुंबई विमानसेवा २६ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. चिपी-मुंबई विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. मात्र त्याची मुदत येत्या २६ ऑक्टोबर रोजी संपणार असल्याने हवाई प्रवासाची तिकीट विक्री २६ तारखेपासून बंद होणार आहे.
ही विमानसेवा तीन वर्षांसाठी करार पद्धतीने सुरू करण्यात आली होती. त्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. एअर इंडियाच्या अलायन्स एअर या उपकंपनीमार्फत सिंधुदुर्ग ते मुंबई आणि मुंबई ते सिंधुदुर्ग मार्गावर विमानसेवा सुरू होती. मात्र, आता चिपी-मुंबई विमानसेवा बंद होत आहे. त्यामुळे ऐन दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना फटका बसणार आहे.
दरम्यान, चिपी-मुंबई या विमानसेवेला प्रवासी वर्गाचा सकारात्मक प्रतिसाद होता. मात्र आता ऐन निवडणुकीच्या काळात ही विमानसेवा बंद होत आहे. सामान्य जनता या विमान सेवेच्या लाभापासून वंचित राहणार असल्यामुळे अनेक नागरिकांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Special Appreciation Post 🙌🏻🎉@NiteshNRane – We are really grateful and thankful for this gesture😊 It wouldn’t have been possible without your efforts! Humble thanks for whatever you have done & doing. Looking forward to PRS counter and halt to Netravati Exp!
अखेर, FOB होतोय! pic.twitter.com/tySweXXVF7
— ONKAR LAD (@ONKARLAD27) October 11, 2024




सिंधुदुर्ग: सावंतवाडीकरांसाठी एक अभिमान वाटेल अशी बातमी समोर आली आहे. सावंतवाडी तालुक्यातील कौशल्य रोजगार उद्योजकता व नावीन्यता विभाग व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोलगाव सावंतवाडीस, ज्येष्ठ समाजवादी नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, सिंधुदुर्गातील कामगार चळवळीचे प्रणेते माजी आमदार स्वर्गीय जयानंद शिवराम मठकर यांचे नाव देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील 108 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या नावात बदल करून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती तसेच समाजसुधारकांची नावे देण्याचा शासन निर्णय जाहीर केला असून माजी आमदार ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर यांनी कोकण रेल्वेसाठी लढा दिला. कोकणातील सामाजिक आणि विकासात्मक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. त्यांचे नाव आज सावंतवाडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस दिल्याने ही समस्त सावंतवाडीकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
मठकर यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९२९ रोजी मुंबईत झाला. त्यांचे शिक्षणही मुंबईत झाले. मालवणच्या टोपीवाला स्मारक शाळेतही ते काही काळ शिक्षणासाठी होते. त्यांनी १९४२ मध्ये समाजवादी पक्षाच्या विचाराने प्रभावित होऊन सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात उडी घेतली.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कामगार आणि गरीब जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी वेचले. त्यासाठी आंदोलने, संघर्ष केले. ज्येष्ठ समाजवादी नेते बॅ. नाथ पै, मधु दंडवते, ना. ग. गोरे, मृणाल गोरे, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या ज्येष्ठ समाजवादी नेत्यांच्या बरोबर त्यांनी काम केले.
मठकर यांनी राजकीय, सामाजिक, ग्रंथालय, सहकार, कामगार, पत्रकारिता, साहित्य अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवला. कामगार आणि ग्रंथालय चळवळीत विशेष कार्य केले. पाटबंधारे, सार्वजनिक बांधकाम, वनखात्यातील रोजंदारी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले.
कामगार क्षेत्राबरोबरच तयांनी ग्रंथालय चळवळीसाठीही कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनातून जिल्ह्यात अनेक ग्रंथालये उभी राहिली. गोवामुक्ती संग्रामातही त्यांचा सक्रीय सहभाग होता. तेरेखोल किल्ल्यावर पाठवण्यात आलेल्या सत्याग्रहींच्या एका तुकडीचे नेतृत्वही त्यांनी केले होते.
पत्रकारितेतील त्यांचे योगदानही मोठे होते. १९५३ पासून ते १९७४ पर्यंत त्यांनी नवशक्ती, लोकमान्य, केसरी आदी वृत्तपत्रांत वार्ताहर म्हणून काम केले होते.




मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज वर्षा बंगल्यावर भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. विधानसभेचा थेट मुकाबला महायुती व महाविकास आघाडीमध्येच होणार आहे. दोन्ही आघाड्यांच्या घटक पक्षांमध्ये झालेल्या चर्चेनुसार ज्यांचा ज्या मतदारसंघात आमदार ती जागा त्याच पक्षाला सोडली जाणार आहे. त्यानुसार कुडाळ मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. येथून निलेश राणे इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत कुडाळ विधानसभा मतदारसंघावर राणे कुटुंबीयांनी दावा केल्याचे सांगितले जात आहे. महायुतीतील जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करु शकतात.
तळकोकणातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. माजी खासदार निलेश राणे कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ते भाजपाच्या की शिवसेना शिंदे पक्षाच्या चिन्हावर ही निव़डणूक लढवणार याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. ही जागा शिंदे गटाकडे गेल्यास ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.






सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३७ गावांमध्ये १ कोटी ६० लाख रुपये खर्च करून सौर हायमास्ट मंजूर केले गेले आहेत. जिल्हा वार्षिक अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत हे सौर हायमास्ट मंजूर करण्यात आले आहेत.
जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२४-२५ या आर्थिक वर्षात अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौर पथदीप मंजूर करण्याबाबत प्रस्ताव ग्रामपंचायत विभागाकडून दिला होता. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३७ गावांमध्ये हे हायमास्ट मंजूर झाले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले-कापाईवाडी सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी, पाणलोस रवळनाथ माऊली मंदिर, चौकूळ शंकर मंदिर, इन्सुली क्षेत्रफळ कोठावळे बांध हायवे सर्कलजवळ, वेंगुर्लेतील शेळपी मुंडयेवाडी, भोगवे शेवटचा स्टॉप जवळ, ग्रामपंचायत परबवाडा इमारत, ग्रामपंचायत खडपीवाडी कोचरा वेतोबा मंदिरजवळ, निवती किनारा, आडेली कांबळेवीर नेमळे रस्त्याजवळ (प्रभू खानोलकर घरानजीक), मालवणातील शिरवडे देव सिद्ध गणेश मंदिर, देव गांगेश्वर मंदिर, तळगाव सातेरी मंदिर खांदवाडी, चौके देवी भराडी मंदिर, आंबेरी वाक येथे, दोडामार्गातील झोळंबे रबेलवाडी प्राथमिक शाळेजवळ, गावठणवाडी सातेरी मंदिर देवस्थानसमोर, श्रीरामवाडी मासे लिलाव केंद्राजवळ, झोळंबे वरचीवाडी, कोलझर टेंबवाडी येथे, देवगड तालुक्यातील सौंदळे ग्रामपंचायत, कुडाळातील सोनवडे तर्फ कळसुली दुर्गानगर ब्राह्मण देव मंदिर तळी, वेताळ बांबर्डे वाघ भाटले वाडी वाघोबा मंदिर, खुर्द मायदेश्वर मंदिरनजीक, पिंगळी भद्रकाली मंदिर, कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर अंदुर्ले खिंड येथे,
कणकवलीतील हळवल श्रीराम मंदिर, नडगिवे ग्रामपंचायत आदी ३७ कामांना मंजुरी दिली आहे. याबाबतचे आदेश बांधकाम आणि संबंधित ग्रामपंचायतींना पाठविले आहेत. लवकरच या कामांना सुरुवात होईल, यादृष्टीने योग्य कार्यवाही करावी, अशाही सूचना दिल्या आहेत.