Category Archives: सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग: राणे कुटुंब – ०३, ईतर – ०१.. ईथेही राणे कुटुंबीयांचे वर्चस्व

   Follow us on        

सिंधुदुर्ग: घरात एक खासदारकी, दोन आमदारक्या, एक मंत्रिपद आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद असलेल्या राणे कुटुंबीयांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनात आणि राजकारणात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. शासनाच्या नियोजन विभागाकडील दि.२८ जानेवारी रोजीच्या शासन निर्णयान्वये जिल्हा नियोजन समितीवरील सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येत्या दि.३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत फक्त पालकमंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर व आमदार निलेश राणे असतील अशी शक्यता आहे. त्यामुळे राणे कुटुंबीयांचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे.

पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजन समितीची बैठक दि. ३ फेब्रुवारी रोजी आयोजित केली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नियोजित ४०० कोटींचा विकास आराखडा या बैठकीत मंजूर करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व जिल्हा नियोजन समित्यांवर “नामनिर्देशित सदस्य” व “विशेष निमंत्रित सदस्य” म्हणून राज्य शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या तसेच राज्यातील जिल्हा नियोजन समित्यांच्या कार्यकारी समित्यांवर “नामनिर्देशीत सदस्य” तसेच “विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.दरम्यान सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर २ नामनिर्देशित सदस्य व ९ विशेष निमंत्रित सदस्य म्हणून शासनाकडून करण्यात आलेल्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांकरिता ३ व्यक्तींना निमंत्रित करण्याबाबत यापूर्वी देण्यात आलेल्या सूचनादेखील रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांनी दिली आहे. त्यामुळे आता या समित्यांवर राणे कुटुंबीयांचे वर्चस्व असणार आहे.

सिंधदुर्ग जिल्ह्यातील परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात पालकमंत्री नितेश राणे यांचे मोठे विधान

   Follow us on        
सिंधुदुर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा हाती घेतल्यानंतर भाजप नेते आणि मत्स्य विकास मंत्री नितेश राणे परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झाले आहेत. बाहेरून आलेल्या परप्रांतीय फेरीवाल्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बाहेर काढणार असे विधान त्यांनी केले आहे.
माझ्या जिल्ह्यामध्ये परप्रांतीयांची मस्ती चालणार नाही. युपी- बिहार आणि बाहेरचे फेरीवाले इथे आले आहेत त्यांना जिल्ह्यातून बाहेर काढणार. जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने आपण जिल्ह्याच्या नागरिकांच्या सुरक्षितेतसाठी कोणतीही तडजोड करणार नसल्याचे ते म्हणाले.
अलीकडच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात परप्रांतीय फेरीवाल्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. कोकण रेल्वे मार्गावरून युपी बिहारला थेट जाणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे ही संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यांच्या वाढत्या संख्येबरोबर जिल्ह्यातील नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही परप्रांतीय बेकायदेशीररित्या अवैध ड्रुग्स आणि दारूच्या तस्करी मध्ये आढळून आले आहेत. या पार्श्ववभूमीवर मंत्री नितेश राणे यांनी हे विधान केले आहे.

“चिपी विमानतळाला टाळे ठोकणारच होतो पण…..” वैभव नाईक नक्की काय म्हणालेत?

   Follow us on        
कुडाळ : चिपी विमानतळ टाळे ठोकणारच होतो पण जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केल्यामुळे आम्ही गप्प राहिलो असे विधान माजी आमदार वैभव नाईक यांनी आज केले. सद्यस्थितीत थोडे दिवस थांबा, विमानतळाला टाळे ठोकू नका अशी जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केल्यामुळे आम्ही गप्प आहोत,पण नजीकच्या काळात आम्ही चिपी विमानतळाला टाळे ठोकणार हे निश्चित असल्याचा पुनरुच्चार शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला आहे. कुडाळ येथे आंदोलना दरम्यान माध्यमांशी ते बोलत होते.
यावेळी वैभव नाईक म्हणाले की, चिपी-मुबंई सेवा बंद आहे; याबाबत माध्यमांच्या वतीने आम्ही आवाज उठवला होता. परंतु या ठिकाणच्या राजकीय सत्ताधाऱ्यांनी आमची भूमिका समजावून न घेता आमच्या विरोधात भूमिका घेत आमच्या घराला टाळा ठोकण्याचा इशारा दिला. चिपी-पुणे विमानसेवा सुरू आहे, परंतु शनिवारीच हवामानातील बदलामुळे ते विमान अचानक रद्द करण्यात आले.परिणामी प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. रविवारी तर प्रवाशांची यापेक्षाही मोठी गैरसोय झाली.
पुण्यावरून चिपीसाठी येणारे विमान अचानकपणे गोवा येथे लँडिंग करण्याची नामुष्की विमान प्रशासनावर आली. याबाबत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो तर या विमानतळासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा अद्याप उपलब्ध झालेल्या नाहीत, त्यामुळे रात्री सोडाच चिपी विमानतळावर दिवसाही विमान उतरू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे.यासाठी विमानतळ प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांकडे लाईट सुविधा पुरवा अशी लेखी पत्राद्वारे मागणी केली असल्याचे नाईक यांनी सांगितले.

पुण्याहून सिंधुदुर्गासाठी निघालेले विमान चीपी विमानतळावर न उतरता गोव्याला उतरले; कारण काय?

   Follow us on        

सिंधुदुर्ग : पुण्याहून सिंधुदुर्गातील चीपीसाठी निघालेले विमान सिंधुदुर्ग जिल्हय़ात न उतरवता ते चक्क गोव्याच्या दिशेने नेवून मोपा विमानतळावर उतरविण्यात आले. खराब हवामानामुळे धावपट्टीवर धुके असल्याच्या कारणाने निर्णय घेण्यात आला. या कारणाने आज प्रवास करणार्‍या ४५ प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

फ्लाय ९१ चे विमान पुणेहून सिंधुदुर्ग साठी  ४५ प्रवाशांना घेऊन निघाले. मात्र शनिवारी सकाळी चीपी विमानतळावर धुके असल्याने हे विमान गोवा मोपा विमानतळावर उतरण्यात आले व तिकडून प्रवाशांना कारने मोफत सिंधुदुर्गात आणण्यात आले. हवामान खराब असल्याचा अंदाज आल्याने हे विमान गोव्याच्या दिशेने नेण्यात आले. या दरम्यान चिपी ते पुणे प्रवास करण्यासाठी  प्रवासी चिपी विमानतळावर दाखल झाले होते. मात्र विमान न आल्याने प्रवाशांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

सिंधुदुर्गात येणारे विमान आज शनिवारी पुन्हा एकदा खराब हवामानामुळे रद्द करण्यात आले .या विमानतळावर दिवसा येणारी विमाने खराब हवामानामुळे वारंवार रद्द करण्याची नामुष्की येत आहे याकरिता या विमानतळावर नाईट लँडिंग ची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशीही मागणी प्रवाशांकडून होत आहे.

 

 

कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती सावंतवाडी स्थानकावर साजरी

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तर्फे आज सावंतवाडी रेल्वे स्थानकावर कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांची १०१ वी जयंती सावंतवाडी स्थानकात साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली होती.
यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे प्रमुख सल्लागार जगदीश मांजरेकर, अभिमन्यु लोंढे, नंदू तारी, पुंडलिक दळवी, सुभाष शिरसाट संघटनेचे सचिव मिहिर मठकर, संपर्क प्रमुख भूषण बांदिवडेकर, सुधीर राऊळ, साईल नाईक, विहंग गोठोस्कर, मेहुल रेडीज, सागर तळवडेकर, रिक्षा संघटनेचे सर्व पदाधिकारी आणि प्रवासी उपस्थित होते
कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते कोकणात रेल्वे आणण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे.  त्यांच्यामुळे कोकणात रेल्वे आणण्याचे अशक्य कार्य पूर्णत्वास आले. त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा यासाठी सावंतवाडी टर्मिनसला प्रा. मधू दंडवते यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने लावून धरली आहे. या मागणी व्यतिरिक्त सावंतवाडी  टर्मिनस चे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे, या स्थानकावर महत्वाच्या नियमित गाडयांना थांबे देण्यात यावेत आणि इतर मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी संघटनेने येत्या प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारीला  ‘रेल रोको’ आंदोलन करायचे ठरविले आहे. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा असे आवाहन संघटनेने केले आहे.

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा निष्फळ, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी २६ जानेवारीला रेल रोको आंदोलन करण्यावर ठाम.

   Follow us on        

सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानकावर परिपूर्ण रेल्वे टर्मिनस व्हावे, या ठिकाणी नवीन टर्मिनस प्लॅटफॉर्म आणि बिल्डिंग व्हावी, या स्थानकाचा समावेश केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेत करावा तसेच सावंतवाडी स्थानकावरून कोरोना काळात काढून घेण्यात आलेला १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस व १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा इत्यादी मागण्यांसाठी येत्या २६ जानेवारीला कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ही अराजकीय संघटना रेल रोको आंदोलन करणार आहे. त्याबाबत ची नोटीस संबंधित प्रशासनाला दिलेली होती त्याचाच भाग म्हणून रेल्वे प्रशासनाकडून क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री शैलेश आंबर्डेकर यांनी आज कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि रेल रोको करू नये असा आशयाचे पत्र संघटनेला सुपूर्द केले.परंतु कोकण रेल्वेने दिलेल्या पत्रात संघटनेच्या मागण्यांसंदर्भात एकही सकारात्मक बाब नसल्याने संघटनेने आपण आपल्या भूमिकेवर ठाम आहोत अशा आशयाचे पत्र क्षेत्रीय वाहतूक प्रबंधक श्री आंबर्डेकर यांना सुपूर्द केले. तसेच आमच्या मागण्यांसंदर्भात बेलापूर येथे व्यवस्थापकीय संचालक श्री संतोष कुमार झा यांचा अध्यक्षतेखाली २३ जानेवारीच्या अगोदर बैठक आयोजित करावी अशी विनंती संघटनेने केली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष ऍड श्री संदीप निंबाळकर, सचिव श्री मिहिर मठकर, सल्लागार श्री सुभाष शिरसाट आदी उपस्थित होते.

रेल रोको च्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी ची पालकमंत्री श्री नितेश राणे आणि आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट

   Follow us on        

सिंधुदुर्ग: २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नियोजित सावंतवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी चे मुंबई प्रतिनिधींनी आज सिंधुदुर्गचे नवनियुक्त पालकमंत्री ना. श्री नितेश राणे यांची भेट घेतली. सावंतवाडी टर्मिनस च्या उर्वरित कामासाठी निधीची तरतूद करावी, सावंतवाडीत रेल्वेचे परिपूर्ण टर्मिनस उभारण्यासाठी आपण राज्यशासनामार्फत निधी उपलब्ध करावा, या ठिकाणी कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या गाडी क्र. १२४३१/३२ राजधानी एक्सप्रेस आणि १२२०१/०२ गरीब रथ एक्स्प्रेस चा थांबा पूर्ववत करावा. नव्याने १२१३३/३४ मंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेस ला सावंतवाडी थांबा मिळावा, आणि कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करावे या विषयावर पालकमंत्री श्री नितेश राणे यांचे लक्ष वेधण्यात आले. यावर आपण योग्य कार्यवाही करून येत्या काही महिन्यात ही कामे मार्गी लावू असे आश्वासन संघटनेच्या पदाधिकाऱ्याना दिले. यावेळी पालकमंत्री राणे यांचा संघटनेतर्फे शाल आणि भगवी टोपी घालून सत्कार करण्यात आला.

त्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कल्याण पूर्व च्या आमदार श्रीमती सुलभा गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना सावंतवाडी टर्मिनस आणि कोकण रेल्वेचे विलीनीकरण या संदर्भात निवेदन देण्यात आले. आणि सावंतवाडी टर्मिनस का गरजेचे आहे हे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पटवून दिले. त्यावर आमदार श्रीमती गायकवाड मॅडम यांनी या संदर्भात आपण राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा कानावर हा विषय घालते असे संघटनेला आश्र्वासित केले.

यावेळी संघटनेचे मुंबई अध्यक्ष विनोद नाईक, प्रकाश येडगे, प्रशांत परब आदी संघटनेचे मुंबई विभागाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Sawantwadi: आंदोलनकर्त्यांना रेल रोको आंदोलनापासून परावृत्त करावे; प्रांताधिकाऱ्यांचे कोकण रेल्वे प्रशासनाला पत्र

सावंतवाडी: सावंतवाडी टर्मिनस चे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, येथे महत्वाच्या गाडयांना थांबे देण्यात  यावेत तसेच इतर मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी ने येत्या  २६ जानेवारी रोजी ‘रेल रोको’ आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची पूर्वकल्पना आणि सूचना संबंधित कार्यलये आणि अधिकाऱ्यांना पाठविण्यात आलेली आहेत.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून दिलेल्या इशाऱ्यानंतर सावंतवाडी विभाग प्रांताधिकारी यांनी कोकण रेल्वे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांना पत्रव्यवहार करत आंदोलनकर्ते यांना या आंदोलनापासून परावृत्त
करण्यात यावे, असे सांगितले आहे.
प्रांताधिकारी यांनी कोकण रेल्वे महामंडळ व्यवस्थापकीय संचालकांना दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांचा आंदोलन अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला आहे. सदर अर्जात सावंतवाडी रोड स्थानकावरील टर्मिनसचे भूमिपूजन झालेले असून रखडलेले रेल्वे टर्मिनमचे काम जलद गतीने करण्यात यावे. सावंतवाडी स्थानकाचा समावेश केंद्राच्या अमृत भारत स्थानक योजनेत करण्यास पुन्हा एकदा आवश्यक पाठपुरावा करणे, सावंतवाडी स्थानकचे नामकरण प्रा. मधु दंडवते असे करण्यासाठी ठराव मंजूर करण्यात यावा. कोरोना काळात ZBTT नुसार काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे. तसेच सावंतवाडी स्थानकात रेल्वे गाड्यांना थांबा देण्यात यावा अशा विविध मागण्याबाबत दि. २६ जानेवारी रोजी सावंतवाडी स्थानकात आंदोलन करणार या कार्यालयास कळविलेले आहे. सदरचा अर्ज पुढील उचित कार्यवाहीसाठी पाठविणेत आपलेकडे आहे. येत सदर अर्जाच्या अनुषंगाने आपले स्तरावरुन नियमाधीन कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीबाबत आंदोलनकर्ते यांना कळवून त्यांना आंदोलनापासून परावृत्त करण्यात यावे असे प्रांताधिकारी यांनी म्हटले आहे.

धक्कादायक | कुडाळ-पिंगुळी येथे नायब तहसीलदार व तलाठीच्या अंगावर डंपर घालण्याचा प्रयत्न; गुन्हा दाखल

   Follow us on        

सिंधुदुर्ग: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गुढीपूर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाई करायला गेलेले नायब तहसीलदार प्रतीक आढाव व तलाठी ओंकार केसरकर यांच्यावर डंपर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन डंपर चालकांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांच्या नेतृत्वाखाली पथक अवैध वाळू वाहतुकीवर कारवाईसाठी नियुक्त केले आहे. वालावल मंडळ अधिकारी धनंजय चंद्रकांत सिंगनाथ, चेंदवणचे ग्राम महसूल अधिकारी भरत नेरकर, तुळसुली तर्फ माणगावचे ओंकार संजय केसरकर, घाटकरनगरचे नीलेश गौतम कांबळे, माणकादेवीचेच्या स्नेहल जयवंत सागरे, सोनवडे तर्फ कळसुलीचे शिवदास राठोड, पणदूरचे रणजित कदम, शिवापूरचे सूरज भांदिगरे या कर्मचार्‍यांचा या पथकात समावेश आहे.

दरम्यान अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी महसूल विभागाने आता कंबर कसली आहे. यासाठी नेमलेले अधिकार्‍यांचे पथक सर्वत्र फिरत असताना शुक्रवार १७ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता या पथकाला पिंगुळी गुढीपूर येथील शिक्षक कॉलनी जवळ डंपर लागल्याचे आढळून आले.

या ठिकाणी चार डंपर होते. या डंपरांची तपासणी केली असता यामध्ये अनधिकृत अवैध वाळू भरल्याचे दिसून आले. हे डंपर कोणाचे आहेत किंवा याचे चालक कोण आहेत याची पडताळणी करण्यासाठी या ठिकाणी वाट अधिकाऱ्यांनी पाहिली. मात्र उशिरापर्यंत कुणी आले नाही त्यानंतर रात्री १ वाजता डंपर क्रमांक (एमएच- ०७- एक्स- ०२६७) चा चालक येथे उपस्थित झाला. त्याने आपले नाव मिलिंद नाईक असे सांगितले. त्या ठिकाणी पंच यादी केल्यानंतर हा डंपर कुडाळ तहसील कार्यालय येथे तलाठी निलेश कांबळे यांच्यासह पाठवून देण्यात आला.

उर्वरित तीन डंपरचे चालक यांची वाट पाहिल्यानंतर पथकातील काही कर्मचारी गस्तीसाठी गेले. त्यानंतर पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणच्या डंपर सुरू झाल्याचा आवाज आल्यामुळे नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे पाहण्यासाठी गेले (एमएच-०६- एक्यू ७०९७) या डंपरच्या चालकाला आवाज देऊन थांबण्यासाठी सांगितले. मात्र त्यांनी काही न ऐकता डंपर अंगावर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा नायब तहसीलदार प्रतीक आढाव हे बाजूला गेल्यामुळे वाचले. हा डंपर वेगाने निघून गेला त्याच्या पाठलाग नायब तहसीलदार यांनी केला मात्र तो मिळाला नाही. दरम्यान नायब तहसीलदार आढाव पुन्हा पिंगुळी येथे आले.

तर पकडलेल्या डंपर पैकी (एमएच -०७- सी- ६६३१) या डंपरच्या चालकांनी तलाठी ओंकार केसरकर यांच्या अंगावर डंपर घालून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यांनी दुसऱ्या बाजूला उडी मारल्यामुळे ते वाचले. याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार प्रतीक आढाव यांनी तक्रार दाखल केली असून दोन डंपर चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर दोन डंपर महसूल विभागाने कुडाळ तहसील कार्यालय येथे आणले आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा लवकरच ‘4G’ अपग्रेड होणार

   Follow us on        
4G Service in Sindhudurg: सिंधुदुर्गात येत्या ४ महिन्यात सर्वत्र ‘४जी’ सेवा कार्यान्वित होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विस्कळीत बीएसएनएलची सेवा सुधारण्यासाठी विद्यमान खासदार  नारायण राणे साहेब यांनी केंद्रीय दळणवळण व दूरसंचार विभाग मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना पत्र लिहिले होते. त्या पत्राची दखल घेण्यात आली आहे.
मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १८७ साईट पैकी १५५ नवीन आणि ३२ विद्यमान 2G व 3G टॉवर 4G टॉवर मध्ये रूपांतरित करण्याचे ठरवले आहे. त्यापैकी २५ टॉवर कार्यान्वित झालेले आहेत. फेस टू प्रकल्पांतर्गत 4G अपग्रेडेशनसाठी ३२३ साईट पैकी ३८ साईट 4G आणि २८५ विद्यमान साईट कार्यवाहीत करण्याची ठरवलेली आहेत. यातील ४ साइट्स कार्यान्वित झालेल्या आहेत, उर्वरित टॉवर हे जून २०२५ पर्यंत कार्यान्वित करण्याचे ठरवलेले आहे.
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला याचा फायदा होईल असा विश्वास कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी  व्यक्त केला आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search