Category Archives: सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील ३७ गावांतील ठिकाणे ‘सौर हायमास्ट’ ने उजळणार

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३७ गावांमध्ये १ कोटी ६० लाख रुपये खर्च करून सौर हायमास्ट मंजूर केले गेले आहेत. जिल्हा वार्षिक अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत हे सौर हायमास्ट मंजूर करण्यात आले आहेत.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२४-२५ या आर्थिक वर्षात अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौर पथदीप मंजूर करण्याबाबत प्रस्ताव ग्रामपंचायत विभागाकडून दिला होता. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३७ गावांमध्ये हे हायमास्ट मंजूर झाले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले-कापाईवाडी सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी, पाणलोस रवळनाथ माऊली मंदिर, चौकूळ शंकर मंदिर, इन्सुली क्षेत्रफळ कोठावळे बांध हायवे सर्कलजवळ, वेंगुर्लेतील शेळपी मुंडयेवाडी, भोगवे शेवटचा स्टॉप जवळ, ग्रामपंचायत परबवाडा इमारत, ग्रामपंचायत खडपीवाडी कोचरा वेतोबा मंदिरजवळ, निवती किनारा, आडेली कांबळेवीर नेमळे रस्त्याजवळ (प्रभू खानोलकर घरानजीक), मालवणातील शिरवडे देव सिद्ध गणेश मंदिर, देव गांगेश्वर मंदिर, तळगाव सातेरी मंदिर खांदवाडी, चौके देवी भराडी मंदिर, आंबेरी वाक येथे, दोडामार्गातील झोळंबे रबेलवाडी प्राथमिक शाळेजवळ, गावठणवाडी सातेरी मंदिर देवस्थानसमोर, श्रीरामवाडी मासे लिलाव केंद्राजवळ, झोळंबे वरचीवाडी, कोलझर टेंबवाडी येथे, देवगड तालुक्यातील सौंदळे ग्रामपंचायत, कुडाळातील सोनवडे तर्फ कळसुली दुर्गानगर ब्राह्मण देव मंदिर तळी, वेताळ बांबर्डे वाघ भाटले वाडी वाघोबा मंदिर, खुर्द मायदेश्वर मंदिरनजीक, पिंगळी भद्रकाली मंदिर, कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर अंदुर्ले खिंड येथे,
कणकवलीतील हळवल श्रीराम मंदिर, नडगिवे ग्रामपंचायत आदी ३७ कामांना मंजुरी दिली आहे. याबाबतचे आदेश बांधकाम आणि संबंधित ग्रामपंचायतींना पाठविले आहेत. लवकरच या कामांना सुरुवात होईल, यादृष्टीने योग्य कार्यवाही करावी, अशाही सूचना दिल्या आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावी – दीपक केसरकर

   Follow us on        

मुंबई: सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे छत्रपती शिवाजी maharajaaMcaa १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा. त्याचबरोबर या परिसरात भव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची शिवसृष्टी उभारण्यात यावी, अशी विनंती शालेय शिक्षण तथा मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे

मंत्री श्री.केसरकर यांनी मुख्यमंत्री श्री.शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे प्रत्यक्ष भेट घेऊन यासंदर्भातील विनंतीपत्र तसेच ‘ऊर्जा हिंदुत्वाची’ या शीर्षकाखाली सविस्तर आराखड्यासह प्रस्ताव सादर केला. मालवण येथे भारतीय नौदलामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता. नुकत्याच घडलेल्या दुर्देवी घटनेमध्ये हा पुतळा कोसळला. यामुळे याच ठिकाणी पुन्हा नव्याने १०० फूट उंचीचा पुतळा उभारण्यात यावा, त्याचबरोबर सध्या ३३ गुंठे जागेवर असलेल्या स्मारकाऐवजी लगतच्या परिसराचा विकास करुन तेथे भव्य दिव्य आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावी, अशी विनंती श्री.केसरकर यांनी kolaI Aaho.

 

कुडाळ रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण पूर्ण; आज लोकार्पण सोहळा

   Follow us on        

कुडाळ, दि. ४ सप्टें: कुडाळ रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज बुधवार दिनांक ४ रोजी दुपारी १२ वाजता खासदार नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन स्थानकांचे सुशोभीकरण केले आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या तिन्ही स्थानकांचे रूपडे पूर्णतः बदलून या स्थानकांना विमानतळाचे स्वरुप दिले गेले आहे. यासाठी जिल्हय़ाचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे. यापूर्वी कणकवली आणि सावंतवाडी या स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून गेल्याच महिन्यात त्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र कुडाळ रेल्वे स्थानकाचे काही काम अपूर्ण राहिले असल्याकारणाने त्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले होते.

कुडाळ स्थानकाच्या आजच्या या सोहोळ्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, विधानसभा परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्ह्या अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल यांनी केले आहे.

ST Stirke: सावंतवाडी आगार एसटी बस सेवा पूर्णपणे बंद; विद्यार्थी, चाकरमान्यांची मोठी गैरसोय

   Follow us on        

सावंतवाडी: आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी बस कर्मचार्‍यांनी संप पुकारून ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर नागरिकांना वेठीस धरले आहे. सावंतवाडी आगार आज पूर्ण बंद असून तिथून एकही बस सुटली नसल्याने शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे आणि गावाकडे येणार्‍या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे.

सावंतवाडी रेल्वे स्थानक आणि शहर यातील अंतर जास्त असल्याने एसटी बस चा सोयीचा पर्याय बंद असल्याने आज येथे येणार्‍या चाकरमान्यांना घरी पोहोचण्यासाठी मोठा आर्थिक फटका बसत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी बसेस नसल्याने आज शाळेत पोहोचू शकले नाहीत. अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थी सणाच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. राज्य शासनाने हा संप लवकरात लवकर मिटवून एसटी बसेस चालू कराव्यात अशी मागणी होत आहे

 

”..वैभव नाईक घटनास्थळी पंधरा मिनिटांत दाखल कसे?” निलेश राणे यांचा गंभीर आरोप

   Follow us on        

सिंधुदुर्ग: माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेना (उबाठा) आमदार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसे पोहोचू शकतात? असा प्रश्न विचारून मालवणला जे घडले ते जाणूनबुजून राजकीय फायद्यासाठी घडवून आणण्यात आले आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

काल रात्री उशिरा त्यांनी एक्स X वर पोस्ट करून हे आरोप केले आहेत.

आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो??? 

जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी.” असे ते या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

आधीच येथील वातावरण तापलेले असताना निलेश राणे यांच्या या पोस्टमुळे नवीन वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Bandra – Madgaon Express: बिगर पावसाळी वेळापत्रकात ही गाडी अधिक सोयीची – सागर तळवडेकर

   Follow us on        

सावंतवाडी: नुकतेच रेल्वे बोर्डाने नवीन बांद्रा ते मडगाव अशी कायमस्वरुपी द्वी-साप्ताहिक गाडी जाहीर केली असून या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, सिंधुदुर्ग,आणि कणकवली या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.

नवीन सुरू झालेली गाडी ही कोकणासाठी नक्कीच गरजेची आहे, मुंबई पासून कोकणापर्यंत सर्वच रेल्वे प्रवासी संघटनांनी या गाडी साठी प्रयत्न केले होते.परंतु सध्या या गाडीचे वेळापत्रक बघता ही गाडी काही अंशी गैरसोयीची असेल असे काही रेल्वे अभ्यासकांना वाटते. त्यामुळे सदर रेल्वेचे वेळापत्रक नियमित वेळापत्रकात (सध्या पावसाळी वेळापत्रक लागू आहे)बदल करावा असे अभ्यासक आणि प्रवासी सांगत आहेत.

ही गाडी सुरू व्हावी म्हणून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीने अथक प्रयत्न केले होते. त्यासाठी संघटनेने पत्र व्यवहार आणि हजारो मेल प्रशासनाला केलेले होते. संघटनेने ही गाडी बोरिवली – वसई – सावंतवाडी अशी सुरू करावी या साठी प्रयत्न केले होते. परंतु सावंतवाडी येथील रेल्वे टर्मिनस हे अपूर्ण असल्याकारणाने सध्या सावंतवाडी स्थानकात गाड्यांचे प्रायमरी मेंटेनन्स होत नसल्याने ही गाडी मडगाव पर्यंत धावणार आहे. कारण कोकण रेल्वे मार्गावर फक्त मडगाव येथे प्रायमरी मेंटेनन्स होते.आणि अशी सुविधा भविष्यात सावंतवाडी स्थानकात देखील उभी राहावी यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी प्रयत्नशील आहे आणि सदरचा पाठपुरावा सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीचे संपर्क प्रमुख सागर तळवडेकर यांनी दिली.

ही गाडी सुरू होण्यासाठी प्रयत्न करणारे केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल, खासदार नारायण राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, जिल्ह्याचे पालक मंत्री रविन्द्र चव्हाण साहेब, आमदार सुनील राणे, माजी खासदार श्री विनायक राऊत यांचे कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आभार मानले असून या गाडीचा लाभ वसई, भिवंडी, बोरिवली येथे राहणाऱ्या चाकरमान्यांना नक्की होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

सा. बां. कार्यालय तोडफोड प्रकरण: आ. वैभव नाईक यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल

   Follow us on        

मालवण: सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जाऊन तोडफोड केल्या प्रकरणी आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य दोघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालवणला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर संतप्त बनलेल्या आमदार वैभव नाईक यांच्यासह अन्य शिवप्रेमींनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयात शिरून तोडफोड केली होती.

राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेमुळे शिवप्रेमी संतप्त बनले होते. आमदार वैभव नाईक यांनी घटनास्थळी भेट देत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर दुपारी आमदार वैभव नाईक यांच्यासह उबाठा गटाचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी यांच्यासह अन्य शिवप्रेमी यांनी मेढा येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात जात कार्यालयातील साहित्याची, खिडक्यांची तोडफोड केली होती. त्यानुसार रात्री उशिरा पोलिसांनी दिलेल्या तक्रारीनुसार तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मालवण पुतळा दुर्घटना: महाराजांचा पुतळा कोसळण्याची कारणे कोणती?

   Follow us on        

सिंधुदुर्ग: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फुटी पुतळा कोसळण्याची घटना काल घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून याबाबत संताप व्यक्त केला गेला. पुतळा उभारणीत हलगर्जीपणा झाला असून हा पुतळा कोसळण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नौदलाने एक पथक नेमले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीबाबत नौदलाने सांगितले की, “राज्य सरकार आणि तज्ञांसह, नौदलाने या अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी एक पथक नियुक्त केले आहे.” लवकरच हे पथक या घटने मागची कारणे शोधून आपला अहवाल सादर करेल. मात्र त्याआधी पुतळा कोसळण्यामागची कोणते कारणे असू शकतात, कोणते आरोप होत आहेत ते पाहू.

निकृष्ट दर्जाचे काम?
राज्य सरकारने योग्य ती काळजी न घेतल्याने ही पडझड होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे. सरकारने कामाच्या दर्जाकडे फारसे लक्ष दिले नाही. केवळ कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे  शिवसेनेचे (यूबीटी) आमदार वैभव नाईक यांनीही कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत राज्य सरकारवर टीका केली आहे.

लोखंडी अँगल अर्धवट?
पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी १५ फूट खोलीचे लोखंडी अँगल टाकून पक्के बांधकाम करण्यात आले होते. त्यावर पुतळ्याचे पार्ट जोडण्यात आले. जमिनीतून उभारण्यात आलेले अँगल पुतळ्याच्या छातीपर्यंत उभारले असते तर पुतळा कोसळून पडला नसता, असे मत स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.

पुतळा निर्मितीसाठी खूप कमी कालावधी?
उद्घाटन करण्यासाठी घाई केल्यानेच पुतळा कोसळला, अशी टीका माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर या पुतळ्याच्या निर्मितीस खूपच कमी कालावधी भेटला असे या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे हे म्हणाले होते. अशा प्रकारच्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी किमान ३ वर्षे लागतात मात्र आपण हा पुतळा अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण केला असल्याचे ते म्हणाले होते.

अपूर्ण अभ्यास?
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मागील २ दिवस ताशी ४५ किमी वेगाचा वारा होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं होते . तर पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी येथील खाऱ्या हवेमुळे पुतळ्याच्या नट बोल्ड्सना गंज पकडली असे विधान केले आहे. कोणतेही बांधकाम करताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्याप्रमाणे बांधकामात बदल करणे अपेक्षित आहे. मात्र हा पुतळा उभारताना हा अभ्यास झाला नसल्याचे दिसून आले आहे.

सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्टला नौदलाला पाठविले होते पत्र

महाराजांच्या पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी ज्या नट-बोल्टचा वापर केला होता ते आता पाऊस आणि खारे वारे यामुळे गंजले असल्याने पुतळा विद्रूप दिसत आहे. तेव्हा संबंधित शिल्पकारांना सांगून कायमस्वरुपी उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे पत्र मालवणमधील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्ट रोजी नौदलाचे विभागीय सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना पत्र पाठवून पुतळ्याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यास कळविले होते. मात्र या पत्राची दखल का घेतली नाही याबाबत नौदलाकडून काही उत्तर आले नाही आहे.

 

 

संतापजनक: मालवणात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ९ महिन्यात कोसळला; शिवप्रेमी संतप्त

   Follow us on        
मालवण, दि. २६ ऑगस्ट : ज्या महाराजांचा त्यांनी केलेल्या मजबूत किल्ल्यांच्या बांधकामांची उदाहरणे देवून गौरव केला जातो त्यांचाच पुतळा अवघ्या काही महिन्यांत कोसळण्याची अपमानास्पद आणि चीड आणणारी घटना आज सकाळी मालवणात घडली आहे. मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना आज, सोमवारी दुपारी घडली. छत्रपतींचा पुतळा कोसळल्यामुळे येथील शिवप्रेमी संतप्त झाले असून निकृष्ट बांधकामामुळे हा पुतळा पडला असल्याचा आरोप केला आहे.
अवघ्या ९ महिन्यांत पुतळा कोसळला 
४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.  राजकोट येथे शिवपुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी आणि इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे पाच कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती. राज्य शासन आणि नौदल विभागाने निश्चित केल्या नंतरच राजकोट येथील जागेवर पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच होता. जमिनी पासून बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता.
शिवप्रेमी संतप्त
ज्या महाराजांचा त्यांनी केलेल्या मजबूत किल्ल्यांच्या बांधकामांची उदाहरणे देवून गौरव केला जातो त्यांचाच पुतळा अवघ्या काही महिन्यांत कोसळण्याची घटना अपमानास्पद आणि आणि चीड आणणारी असल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. हे बांधकाम बेजबाबदारपणे करण्यात आले असून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

आचरा समुद्रात नौका बुडाली; तिघांचा मृत्यू

   Follow us on        

मालवण: मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथे काल रविवारी मध्यरात्री नौका समुद्रात पलटी होऊन तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला असल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तर एक मच्छिमार पोहत किनाऱ्यावर येण्यात यशस्वी ठरल्याने सुदैवाने बचावला आहे. ऐन नारळी पौर्णिमेला झालेल्या या दुर्घटनेमुळे सर्जेकोट व हडी गावासह मच्छिमार बांधवांवर शोककळा पसरली आहे.

मृतांमध्ये पातीचे मालक सर्जेकोट मच्छिमार संस्थेचे व्हाईसचेअरमन गंगाराम उर्फ जीजी जनार्दन आडकर, हडी जठारवाडी येथील लक्ष्मण शिवाजी सुर्वे (65) व प्रसाद भरत सुर्वे (32) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत विजय अनंत धुरत (53) रा. मोर्वे देवगड हे पोहत किनार्‍यावर पोहचल्याने त्यांचा जीव बचावला असून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

दरम्यान, सकाळच्या सुमारास दुर्घटनेतील मच्छिमारांचे व्यांगणी येथे एकाचा तर सापळेबाग किनारी दोघांचे मृतदेह आढळून आले.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search