Category Archives: सिंधुदुर्ग

सिंधुनगरीत बीएसएनएलच्या टॉवरला भीषण आग; टॉवरवरील केबल व स्क्रॅप मटेरियल जळून खाक…

सिंधुदुर्ग | सिंधुनगरीत काल रविवारी सायंकाळी प्रशासकीय संकुलानजीक असलेल्या बीएसएनएलच्या टॉवरला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत टॉवरवरील केबल व दूरसंचार विभागाचे स्क्रॅप मटेरियल जळून खाक झाले. 

टॉवरच्या खाली वाढलेल्या गवतामुळे टॉवरला आग. 

प्रशासकीय संकुलानजीकच बीएसएनएलचा टॉवर व कार्यालयीन इमारत तसेच निवासस्थाने आहेत. सध्या बीएसएनएल विभागाने ही मालमत्ता दुर्लक्षित केल्यामुळे वाढलेल्या गवतास रविवारी (दि. २८) सायंकाळी सव्वा ७ च्या दरम्यान लागलेली आग बीएसएनएलच्या टॉवरपर्यंत पोहोचली. या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान कुडाळ एमआयडीसीचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणली. त्यानंतर कुडाळ नगरपंचायतीचे अग्निशमन दल पोहचले. या आगीत बीएसएनएलच्या स्क्रॅप मटेरियलचे हे फार मोठे नुकसान झाले आहे. या प्रकारामुळे बीएसएनएल विभागाच्या अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा निदर्शनास आला आहे. या टॉवरच्या खाली वाढलेले गवत आधीच साफ केले असते तर ही आग टॉवरपर्यंत पोहोचली नसती. 

 

Loading

गणेशोत्सवास कोकणात जाण्यासाठी विमान सेवेचा पर्याय उपलब्ध; तिकीटदरही आवाक्यात…

Ganesh Chaturthi 2023 | गणेश चतुर्थीला गावी जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेचे आरक्षण मिळण्यासाठी खूप मोठी कसरत करावी लागत आहे. येथे दलालांचा सुळसुळाट असल्याने कसरत करूनही तिकीट मिळणे कठीण झाले आहे. शेवटी दुसरा कोणता पर्याय नसल्याने दुप्पट ते तिप्पट भावात याच दलालांकडून तिकीट खरेदी करून प्रवास करावा लागतो. पण एसी वगळता ईतर श्रेणीतुन प्रवास करताना आरक्षण असूनही मोठा त्रास सहन करावा लागतो. या डब्यांना जनरल डब्यांचे स्वरुप येते.
दुसरीकडे मुंबई गोवा महामार्ग अजूनपर्यंत अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम केल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी अजूनही एकेरी मार्गाने वाहतुक सुरू आहे. या कारणांमुळे गणेश चतुर्थी उत्सवा दरम्यान या मार्गावर वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण होणार आहेत.
या सर्व गोष्टीचा सर्वात जास्त त्रास सहन करावा लागतो तो तळकोकणातील चाकरमान्यांना. कारण अशा स्थितीत 500 किलोमीटर प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागेल. मात्र आता त्यांना एक प्रवासाचा सोयीचा पर्याय उपलब्ध झाला आहे. सिंधुदुर्ग आणि गोवा सीमेवर पेडणे MOPA येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्याने आता मुंबईवरून तळकोकणात काही तासांत पोहचणे शक्य झाले आहे. या विमानतळावरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला आणि कुडाळ तालुके जवळ आहेत, त्यामुळे या तालुक्यातील प्रवाशांसाठी गावी पोहोचण्यासाठी हा एक सोयीचा व जलद पर्याय होऊ शकतो. 
आमच्या प्रतिनिधीने https://www.ixigo.com/ या ऑनलाईन फ्लाईट बुकिंग करणाऱ्या वेब पोर्टल वर चेक केले असता मुंबई ते गोवा SpiceJet या विमानसेवा देणार्‍या कंपनीचा तिकीटदर किमान १८१८ रुपये एव्हढा दाखवत आहे. त्यात INSTANT  हा कुपन कोडे अप्लाय केल्यावर ३०० रुपये सूट मिळत आहे. मात्र सुविधा शुल्क पकडून एक तिकीट १८१७ रुपये एवढ्या वाजवी दराला मिळत आहे. 
टीप –  बातमीत दिलेले तिकीट दर दिनांक 24 मे रोजी चेक करण्यात आले आहेत . विमानसेवेच्या तिकिटांचे दर काही बाबींवर अवलंबून असून ते अस्थिर असतात याची कृपया नोंद घ्यावी






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Call on 9028602916 For More Details 

Loading

ओसरगाव येथील टोलनाका बांदा किंवा खारेपाटण येथे हलविण्यात यावा – सिंधुदुर्ग टोलमुक्ती समिती

सिंधुदुर्ग – येत्या ०१ जूनला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका सुरू होणार आहे. या टोल नाक्याला स्थानिकांकडून विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सिंधुदुर्ग टोलमुक्ती समितीने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

जर ओसरगाव येथे टोल वसुली करणार असाल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नोंदणी केलेल्या MH07 वाहनांना टोलमुक्ती मिळावी अशी सिंधुदुर्ग टोलमुक्ती समितीची भूमिका आहे. मात्र जर हा टोल नाका खारेपाटण किंवा बांदा या ठिकाणी शिफ्ट केल्यास आपला त्याला कोणताही विरोध नसेल अथवा टोल मुक्तीची मागणी नसेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

१ जूनला ओसरगाव टोल नाका सुरू झाल्यास टोलमुक्ती समितीतर्फे लाक्षणीय आंदोलन छेडले जाईल. असा इशारा टोलमुक्ती कृती सिमतीचेअध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये आणि पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. टोलमुक्ती कृती सिमती तर्फे कणकवली येथे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती.

Loading

सावधान | आंबोलीत ‘तो’ टस्कर परत येत आहे….

सिंधुदुर्ग : आंबोलीच्या नागिरकांमध्ये चिंता निर्माण होईल अशी एक बातमी आहे. आंबोली परिसरात गेली काही वर्षे ये-जा करणार्‍या महाकाय टस्करने आपला मोर्चा पुन्हा आंबोलीकडे वळवला आहे. शुकवारी तो आजरा येथे दिसला होता . येत्या 2 ते 4 दिवसांत हा टस्कर आंबोली परिसरात दाखल होण्याची शक्यता आहे. 
हा टस्कर अचानक रस्त्यावर येत असल्याने काही वेळा येथील वाहन चालकांची भंबेरी उडाली आहे. या टस्कर ने आंबोलीतील लोकवस्तीत शिरून तेथे हैदोस मांडला होता. दिवसा जंगलात राहून तो रात्री लोकवस्तीत धुडगूस घालतो. त्यामुळे त्याच्या येण्याने आंबोलीच्या जनतेमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारवाईच्या नावाखाली सिंधुदुर्ग वन विभागाचे कर्मचारी त्याला कोल्हापूर जिल्हा हद्दीत हुसकावून लावत आहेत. पण तिथे कोल्हापूर वन विभागाचे कर्मचारी त्याला पुन्हा आंबोली हद्दीत हुसकावतात यामुळे हा टस्कर गेली काही वर्षे सतत आंबोलीसह आजरा परिसरात ये-जा करत असतो.






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Call on 9028602916 For More Details 

Loading

साळगाव भांडारसावंतवाडी येथील श्री सावंत कुलस्वामि मंदिर वार्षिक उत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबीराचे आयोजन


सिंधुदुर्ग |कुडाळ तालुक्यातील साळगाव भांडारसावंतवाडी येथील श्री सावंत कुलस्वामि मंदिर मध्ये वार्षिक उत्सवाचे आयोजन दि. 20 मे व 21 मे रोजी केले आहे. शनिवार दि. 20 मे 2023 रोजी श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे. त्याच दिवशी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत रक्तदान शिबीर चे आयोजन केले आहे. रात्रौ 8:30 वाजता लहान मुला मुलींचे, महिलांचे नृत्य, गायन, वादन असे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत.

रविवार दि. 21 मे 2023 रोजी रात्रौ 8:30 वाजता कै. सुधीर कलिंगण प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ चा नाट्यप्रयोग होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमांचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. असे आवाहन श्री सावंत कुलस्वामि मंडळ ( भांडारसावंतवाडी साळगाव ) ने केले आहे.

Loading

तळकोकणात ‘बारसू-२’? दिल्लीतील मोठ्या उद्योगपतीकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमिनीची पाहणी….

सिंधुदुर्ग – दिनांक १५ मे सोमवारी एका मोठ्या उद्योगपतीने दोडामार्ग तालुक्यातील शिरवल या भागास भेट देऊन तेथील जमिनीची पाहणी केल्याने अनेक चर्चांना ऊत आले आहे. या उद्योगपती नाव समजले नसले तरी तो एक दिल्लीतील मोठा उद्योगपती असलयाचे समजते. सुमारे १० ते १२ गाड्यांचा ताफा त्याच्याबरोबर होता, तसेच  स्थानिक प्रशासनाने त्याला या दौऱ्यासाठी सुरक्षा दिल्याचे समजते. पण याबाबत कोणतीही बातमी किंवा माहिती प्रशासनतर्फे प्रसिद्धीसाठी दिली नाही आहे, त्यामुळे जनतेला अंधारात ठेवून काहीतरी शिजवले जात आहे असे तर्क लावण्यात येत आहेत.
 
तळकोकणातील दोडामार्ग तालुका गोवा राज्याच्या सीमेला लागून आहे. अलीकडेच गोवा – महाराष्ट्र सीमेवर नवीन विमानतळ झाल्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील जमिनींवर भूमाफियांची, परप्रांतीयांची वक्रदृष्टी पडली आहे. अलीकडेच या तालुकयातील काही जमिनीबाबत गैरव्यवहार झाल्याचे उघडकीस आले आहे. बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाच्या पार्श्ववभूमीवर जमिनीचे अनेक गैरव्यवहार झाले होते. तसाच प्रकार येथे होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे .मोठ्या उद्योगपतींनी पण येथे रस दाखविला असल्याने येथे पण एक प्रकल्प येईल का असे तर्क लावले जात आहेत.  






मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.
Call on 9028602916 For More Details 

Loading

हापूस आंब्याची आवक वाढली; दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात

Mangos Rates Update : वातावरणातील उष्मा वाढत आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. परिणामी बाजारात सर्वच ठिकाणांच्या आंब्यांचे दर घसरले आहेत. 

वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे फळे लवकर तयार होत आहेत. बाजारात आंब्यांची आवकही वाढत आहे. अगदी हापूस आंब्यापासून दक्षिण भारत, गुजरातकडील आंब्यांचे दरही कमी झाले. त्यामुळे खवय्यांना मनसोक्त आंब्याचा आस्वाद घेता येणार आहे. 

मागील आठवड्यापासून सर्वच ठिकाणांच्या आंब्यांची आवक बाजारात वाढू लागली आहे. यात प्रामुख्याने कोकणातील हापूस आंब्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे हापूसचे दर कमी झाले असून, त्यांच्यापाठोपाठ इतर आंब्यांच्या दरात घसरण झाली आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे.

पूर्वी १०००-१२०० रुपये प्रति डझन एवढा भाव असलेला हापूस आता ६०० ते ८०० रुपयांत मिळत आहे. 

 

 

Loading

मुंबई-गोवा महामार्गामुळे सर्वात कमनशिबी ठरले ‘हे’ शहर; पर्यटनावर झाला परिणाम

 रस्ते, महामार्ग हे विकासाला हातभार लावत असतात. रस्त्यांमुळे कनेक्टिव्हिटी वाढते, व्यापाराची मोठी संधी निर्माण होते. अविकसित असलेल्या खेड्यांचे रूपांतर शहरात होते. मात्र मुंबई गोवा महार्गावरील एका शहराच्या बाबतीत उलट झाले आहे.
मुंबई-गोवा महामार्गामुळे तळकोकणातील सावंतवाडी या शहराला फायदा न होता तोटा झाला आहे. पूर्वी मुंबई गोवा मार्ग सावंतवाडी शहरातून जात होता. मात्र नवीन महामार्ग सावंतवाडी शहराच्या बाहेरून जात आहे. सावंतवाडी शहरापासून सुमारे १२ ते १४ किलोमीटर अंतरावरून झाराप येथून हा मार्ग मळगाववरून गोव्याला जातो. त्यामुळे नव्या मुंबई गोवा महामार्गामुळे सर्वात जास्त नुकसान या शहराचे झाले आहे.
मुंबईतुन गोव्याला जाणारा मोठा प्रवासवर्ग या मार्गावरून प्रवास करतो. जेव्हा हा मार्ग सावंतवाडी शहरातून जात होता तेव्हा आपोआपच येथील पर्यटनाची जाहिरात होत असे. जुना राजवाडा, नयनरम्य मोती तलाव आणि आजूबाजूची पर्यटन स्थळे पर्यटकांना येथे थांबा घेण्यास भाग पाडत असत. पर्यटक येथे थांबून येथील बाजारपेठेतील लाकडी खेळणी, कोकणी मेवा आणि इतर वस्तू आवर्जून खरेदी करायचे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळत असे. 
मात्र आता चित्र पालटले आहे. महामार्ग शहराच्या बाहेरून गेल्यामुळे येथील पर्यटनाची पीछेहाट होत आहे. त्यामुळे या नवीन महामार्गामुळे सर्वात जास्त नुकसान या शहराला झाले आहे. सावंतवाडी शहरातील हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा याचा मोठा फटका बसला आहे. मुंबईहून गोव्याकडे जाणार्‍या बसेस सुद्धा बायपास मार्गावरून जात असल्याने मुंबई आणि गोव्यात जाण्यास उपलब्ध असणार्‍या पर्यायांत घट झाली आहे. 
 हे नुकसान भरून काढण्यासाठी किमान प्रस्तावित संकेश्वर – बांदा महामार्ग तरी या शहरातून जावा अशी जोरदार मागणी होत आहे.    

Loading

कोकणात सापडले कातळसड्यावर असणारे जगातील पहिले अशनी विवर…

सिंधुदुर्ग –  तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयातील आंबोलीपासुन अवघ्या दहा कि. मी.अंतरावर असलेल्या चौकुळ या गावी  सुमारे पन्नास ते सत्तर हजार वर्षापूर्वी तयार झालेले अशनी विवर सापडले आहे. सिंधुदुर्गातीलच नव्हे तर सर्व भारतीय भूवैज्ञानिक व पर्यटकांना उत्साह देणारे संशोधन नुकतेच झाले असुन याबाबत अधिक अभ्यास चालू आहे. या संशोधनास सर्व अभ्यासाअंती दुजोरा भेटल्यास कोकणातील पर्यटनाच्या शिरपेचात अजून एक मनाचा तुरा रोवला जाणार आहे आणि  चौकुळ या गावाला आता ‘जागतिक भूवैज्ञानिक स्थळ’ म्हणून ओळखले जाणार आहे.
शिरूर(पुणे) येथील चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राध्यापक डाॕ.अतुल जेठे व प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी या येथील खमदादेव पठारावर भेट दिली असता पश्चिम घाटातील या पठारावर सुमारे पन्नास ते सत्तर हजार वर्षापूर्वी तयार झालेले अशनी विवर नजेरेला पडले.
डॉ. अतुल जेठे
या संदर्भात डाॕ. अतुल जेठे यांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे –
” चौकुळ येथील आज असलेल्या खमदादेव मंदिरापासुन पूर्वेकडे सुमारे ५००मीटर अंतरावर सुमारे पन्नास हजारहून अधिक वर्षापूर्वीआकाशातून एक पेटता अशनी येऊन येथील जांभ्या खडकाच्या कठीण पठारावर कोसळला व त्यामुळे वर्तुळाकार आकाराचे विवर तयार झाले. आज या विवरात काळसर -पिवळट रंगाची माती व त्यावर पावसाळ्यात उगवणारे गवत यांचे अस्तित्व आहे.पावसाळ्यात सर्वात जास्त म्हणजे ७२०से. मी. पेक्षा जास्त पाऊस पडणाऱ्या या विवराच्या ईशान्य दिशेकडून विवरातील पाणी वाहून जाते. या विवराचा पूर्व
-पश्चिम व्यास सुमारे १८०मीटर तर उत्तर-दक्षिण सुमारे २२० मीटर असुन विवराचा परिघ सुमारे ५२५ मीटर आहे.या विवराचा अधिक अभ्यास व संशोधन करण्यासाठी डाॕ. जेठे पावसाळ्यात पुन्हा भेट देणार आहेत.
या स्थळाला शासनाने ‘अति संवेदनाशील क्षेत्र (इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून संक्षित करावे अशी मागणी डाॕ. जेठे यांनी केली आहे.
भौगोलिक स्थान
या विवराचे पृथ्वीवरील भौगोलिक स्थान १५ अंश ५२ मिनिटे व ३९.५ सेकंद उत्तर अक्षवृत्त ते ७४अंश १ मिनिट ५४.५ सेकंद पूर रेखावृत्त असे आहे. समुद्र सपाटीपासुन हा भाग सुमारे ६३० मीटर उंचीवर आहे. घटप्रभा व कृष्णा या नद्यांच्या जोडणारी’ देवाची न्हय’ही नदी पूर्वेकडून पावसाळ्यात वहाते. भारतातीलच नव्हे; तर जगातील जांभ्या खडकावरील,(Laterite Rock) कातळसड्यावरील हे एकमेव विवर ठरण्याची शक्यता डाॕ.अतुल जेठे यांनी वर्तवली. असुन याला शास्त्रीय परिभाषेत ‘सिम्पल बाऊल क्रेटर’ म्हणजेच ‘साधे वर्तृळाकृती विवर’असे म्हणतात. आंबोली परिसरात सर्वात जास्त पाऊस या भागात पडत असल्याने वातावरणातून अतिगतिमान अशनीचा आघात झाल्यावर वर उसळून आलेली कड (Ejecta- Blanket) मृदेच्या धूपेमुळे नष्ट झाली असावी.
नामकरण-‘रजतकृष्ण’विवर
 या विवरावर दोन दिवस संशोधन केल्यावर आपल्या या शोधून काढलेल्या विवराला ‘ राजतकृष्ण Crater’ म्हणजेत ‘रजतकृष्ण विवर असे नाव डॉ.जेठे यांनी दिले आहे. २००९ पासुन भारतातील विविध विवरांचा भूशास्रीय अभ्यास करताना मौलिक मार्गदर्शन करणाऱ्या इस्रो (IIRS) डेहराडून (उत्तरा खंड)या जागतिक पातळीवर संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ व भूशास्र विभागाचे प्रमुख रजत चटर्जी यांचे शुभनाव व आपले सहकारी मित्र मराठी विभागात अध्यापन करणारे मालवणी बोली साहित्य व संस्कृतीचे ज्येष्ठ संशोधक मार्गदर्शक डाॕ. बाळकृष्ण लळीत यांच्या नावातील ‘कृष्ण’ यावरून चौकुळ येथील विवराचे ‘ रजतकृष्ण विवर’असे नामकरण या दोन्हींच्या  (गुरू आणि मित्र) यांच्या सन्मानार्थ केल्याचे डाॕ. अतुल जेठे यांनी सांगितले. यापूर्वी त्यांनी २०११साली शोधलेल्या लोणार जवळील विवराला ‘गगन विवर’असे नामकरण केले होते. या संशोधना दरम्यान चौकूळ येथील समाजसेविका मा.सौ. सुषमाताई गावडे,अनिल गावडे,प्रताप गावडे.मा.सरपंच गुलाबराव गावडे तसेच सरपंच श्री.सुरेश शेटवे डाॕ.सुश्रुत लळीत तसेत अन्य चौकुळ ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. या शोधकार्याचे चां ता. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॕ. के. सी. मोहिते व संस्था सचिव मा.श्री. नंदकुमार निकम यांनी डाॕ.अतुल जेठे यांचे अभिनंदन केले आहे.

Loading

आंबोली घाटात लघुशंकेसाठी उतरलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा दरीत पडून मृत्यू….

आंबोली: गोव्यावरून कर्नाटक राज्यात जात असताना आंबोली येथे लघुशंकेसाठी उतरलेल्या छत्तीसगड येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचा दरीत कोसळल्याने आंबोली येथेजागीच मृत्यू झाला आहे. ही घटना काल सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर घडली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि मिथिलेश पॅकेरा हे छत्तीसगड पोलीस तुकडी बरोबर कर्नाटक होत असलेल्या निवडणुकीसाठी बंदोबस्तासाठी कर्नाटकात आले होते. दरम्यान काही काल सुट्टी असल्याने त्याने आणि त्याच्या इतर ४ मित्रांनी गोवा फिरायला जाण्याचा बेत आखला. तेथून परत येत असताना त्यांनी गाडी आंबोली येथे मुख्य धबधब्याच्या काही अंतरावर लघुशंकेसाठी गाडी थांबवली. मिथिलेश यांना काळोखात तुटलेल्या कठड्याचा अंदाज न आल्याने ते दरीत कोसळले. ही घटना घडताच त्यांच्या सहकाऱ्यांनी त्वरित आंबोली पोलीस स्टेशन ला कॉन्टॅक्ट केला आणि मदत मागवली. आंबोली रेस्क्यू टीमचे अजित नार्वेकर आणि मायकल डिसोझा आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले आणि दरीत उतरून बचावकार्य सुरु केले, मात्र परंतु तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. याबाबतची माहिती मिळतात सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके, प्रभारी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, पोलीस हवालदार दत्ता देसाई आदी सहका-यांनी त्या ठिकाणी धाव घेत सहकार्य केले. याबाबत उशिरा पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले..    

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search