Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: प्रवाशांसाठी खुशखबर: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        

​Konkan Railway: रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन तिरुवनंतपुरम सेंट्रल आणि मदार जंक्शन दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या (Train no. 06013 / 06014) कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​विस्तारित फेऱ्यांचे वेळापत्रक:

रेल्वेने जाहीर केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, दोन्ही दिशेकडील फेऱ्या खालीलप्रमाणे वाढवण्यात आल्या आहेत:

​गाडी क्रमांक 06013 (तिरुवनंतपुरम सेंट्रल ते मदार जंक्शन): ही गाडी दर बुधवारी धावते. यापूर्वी ही गाडी ११ मार्च २०२६ पर्यंत अधिसूचित होती, मात्र आता ती १८ मार्च २०२६ ते २५ मार्च २०२६ या कालावधीतही उपलब्ध असेल.

​गाडी क्रमांक 06014 (मदार जंक्शन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल): ही गाडी दर शनिवारी धावते. या गाडीची मुदत १४ मार्च २०२६ वरून वाढवून आता २१ मार्च २०२६ ते २८ मार्च २०२६ पर्यंत करण्यात आली आहे.

​प्रवाशांना या गाड्यांचे सविस्तर थांबे आणि वेळापत्रक जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऐन प्रवासाच्या काळात या फेऱ्या वाढल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

कोकण रेल्वेमध्ये ‘परवानाधारक पोर्टर’ पदांसाठी भरती; ४९ जागांसाठी अर्ज सुरू

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने रत्नागिरी क्षेत्रातील विविध रेल्वे स्थानकांसाठी ‘परवानाधारक पोर्टर’ (Licensed Porter) पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ७ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत पत्रकानुसार, प्रवाशांचे सामान वाहून नेण्यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

​विविध स्थानकांसाठी रिक्त जागा

​या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ४९ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ८ जागा रत्नागिरी स्थानकासाठी, तर कणकवलीसाठी ७, कुडाळसाठी ६ आणि चिपळूणसाठी ५ जागा रिक्त आहेत. याशिवाय खेड आणि सावंतवाडी रोड येथे प्रत्येकी ४, तर माणगाव आणि संगमेश्वर रोड येथे प्रत्येकी ३ जागांसाठी भरती केली जाणार आहे. सिंधुदुर्ग स्थानकासाठी २ जागा असून वीर, सावर्डा, आरवली रोड, आडवली रोड, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड आणि कणकवलीच्या लगतच्या स्थानकांसाठी प्रत्येकी १ जागेची आवश्यकता आहे.

​जातीनिहाय आरक्षण

​एकूण ४९ जागांचे वर्गीकरण आरक्षणाच्या नियमांनुसार करण्यात आले आहे. यामध्ये सामान्य प्रवर्गासाठी २१, ओबीसीसाठी १३, अनुसूचित जातीसाठी (SC) ७, अनुसूचित जमातीसाठी (ST) ४ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) ४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

​या नियुक्तीबाबत रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. परवानाधारक पोर्टर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नोकरीचा कोणताही हक्क सांगता येणार नाही. तसेच, परिस्थितीनुसार रेल्वे प्रशासन हा परवाना कधीही रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार एर्नाकुलम–अंबाला होळी विशेष एक्सप्रेस

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रवासी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिण रेल्वेने एर्नाकुलम जंक्शन–अंबाला कॅन्टोनमेंट दरम्यान एकमार्गी विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक ०६०७४ एर्नाकुलम जंक्शन – अंबाला कॅन्टोनमेंट वन-वे एक्सप्रेस स्पेशल ही गाडी ११ मार्च २०२६ (बुधवार) रोजी एर्नाकुलम जंक्शन येथून सकाळी ०९.५० वाजता सुटणार असून तिसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता अंबाला कॅन्टोनमेंट येथे पोहोचणार आहे. ही सेवा एकदाच चालवण्यात येणार आहे.

या गाडीची रचना पुढीलप्रमाणे असेल:

१ एसी थ्री टियर डबा

१३ स्लीपर वर्ग डबे

३ जनरल सेकंड क्लास डबे

२ दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल जनरल सेकंड क्लास डबे

 

स्थानके, वेळ व तारीख:

एर्नाकुलम जंक्शन – ०९:५० (११ मार्च)

अलुवा – १०:१२ / १०:१४ (११ मार्च)

त्रिशूर – ११:०७ / ११:१० (११ मार्च)

शोरनूर – १२:०० / १२:०५ (११ मार्च)

तिरूर – १२:४३ / १२:४५ (११ मार्च)

कोझिकोड – १३:२२ / १३:२५ (११ मार्च)

कन्नूर – १४:४२ / १४:४५ (११ मार्च)

कासरगोड – १५:४८ / १५:५० (११ मार्च)

मंगळुरू जंक्शन – १७:०० / १७:१० (११ मार्च)

उडुपी – १९:३० / १९:३२ (११ मार्च)

कुंदापूर – २०:१० / २०:१२ (११ मार्च)

मूकांबिका रोड – बिंदूर – २०:४२ / २०:४४ (११ मार्च)

मुरुडेश्वर – २१:३० / २१:३२ (११ मार्च)

कुमटा – २२:१० / २२:१२ (११ मार्च)

कारवार – २३:१० / २३:१२ (११ मार्च)

१२ मार्च २०२६ (गुरुवार)

मडगाव – ००:१० / ००:२०

थिवीम – ०१:०० / ०१:०२

सावंतवाडी रोड – ०१:४० / ०१:४२

कणकवली – ०२:२० / ०२:२२

राजापूर रोड – ०३:१८ / ०३:२०

रत्नागिरी – ०४:३५ / ०४:४०

संगमेश्वर रोड – ०५:२५ / ०५:२७

चिपळूण – ०६:१० / ०६:१५

खेड – ०६:४० / ०६:४२

माणगाव – ०८:१२ / ०८:१४

रोहा – ०९:०० / ०९:०५

पनवेल – १०:२५ / १०:३५

वसई रोड – १२:३५ / १२:४५

सूरत – १५:२६ / १५:२८

वडोदरा – १७:०४ / १७:१२

कोटा – २३:५१ / २३:५६

१३ मार्च २०२६ (शुक्रवार)

मथुरा – ०४:१५ / ०४:२०

नवी दिल्ली – ०७:३५ / ०७:४५

अंबाला कॅन्टोनमेंट – ११:२५ (पोहोच)

कोकण रेल्वे प्रवासात साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला

   Follow us on        

कणकवली : मुंबईहून कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे  साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राकेश सदानंद मिठबावकर (वय ३५, रा. कुर्ला-मुंबई, मूळ रा. पडेल-देवगड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिठबावकर हे पत्नी आणि मेहुण्यासोबत ८ मार्च रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता एलटीटी–मडगाव एक्सप्रेसने मुंबईहून देवगडकडे निघाले होते. दुपारी सुमारे १.३० वाजता गाडी कणकवली रेल्वे स्थानकावर पोहोचली. गाडीतून उतरण्यासाठी सामान आवरत असताना दागिन्यांची बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण डब्यात बॅगचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही.

दरम्यान गाडी सावंतवाडी स्थानकावर पोहोचल्यावर त्यांनी तात्काळ तेथील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र ही घटना कणकवली स्थानकाच्या दरम्यान उघडकीस आल्याने त्यांना कणकवली येथे तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मिठबावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ३२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ३ ग्रॅम वजनाचे छोटे मंगळसूत्र असा ऐवज आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.

सर्व बाबी अनुकूल, तरीही विलंब का? २० डब्यांच्या मुंबई–गोवा वंदेभारत एक्सप्रेसची प्रतीक्षा कायम

   Follow us on        

मुंबई: मुंबई–मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्र. २२२२९/२२२३०) या अत्यंत लोकप्रिय गाडीची क्षमता तातडीने वाढवून ती २० डब्यांची करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. मध्य रेल्वेअंतर्गत सर्वाधिक प्रवासी प्रतिसाद मिळणारी ही वंदे भारत सेवा सध्या केवळ ८ डब्यांसह चालवली जात असून, सुरुवातीपासूनच सातत्याने उच्च प्रवासी गर्दी असूनही क्षमतेत वाढ न होणे आश्चर्यकारक आणि अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेतील अनेक वंदे भारत गाड्या ९० टक्क्यांहून अधिक प्रवासी भराव नोंदवताच १६ किंवा २० डब्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत, त्यामुळे मुंबई–मडगाव मार्गालाही त्याच धर्तीवर वाढ मिळावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, नांदेड–मुंबई आणि सोलापूर–मुंबई वंदे भारत गाड्यांची मालकी व देखभाल जबाबदारी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे वर्ग झाल्याने मुंबईतील देखभाल सुविधा व पिट लाईनची क्षमता मोठ्या प्रमाणात मोकळी झाली आहे. त्यामुळे मुंबई–मडगाव वंदे भारतला कायमस्वरूपी २० डब्यांची रचना देण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

उच्च मागणी असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावर अजूनही कमी क्षमतेची गाडी चालवली जाणे योग्य नसल्याचे सांगत रेल्वे बोर्ड तसेच संबंधित विभागांनी तातडीने निर्णय घेऊन ही वाढ प्राधान्याने लागू करावी, अशी मागणी कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी संबधित आस्थापना आणि लोकप्रतिनिधींना ईमेल द्वारे केली आहे. कोकणातील प्रवासी या दीर्घकालीन आणि रास्त मागणीच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी येथे थांबा देणे गरजेचे

या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त एका स्थानकावर, म्हणजे कणकवली येथेच थांबा आहे. राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेल्या या जिल्ह्यात अशा प्रीमियम गाड्यांना पुरेसे थांबे न देणे हा मोठा विरोधाभास म्हणावा लागेल. तळकोकणातील सावंतवाडी येथे या गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी गाडी सुरू झाल्यापासून सातत्याने होत आहे. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी वंदे भारत एक्स्प्रेससाठी सावंतवाडी थांब्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत हा थांबा मिळालेला नाही. ही गाडी २० डब्यांची करून तिला सावंतवाडी येथे थांबा मिळावा, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) प्रयत्नशील आहे.

मागणी पूर्ण! सावंतवाडी–रेल्वे स्थानक–बांदा बससेवा सुरू; बस फेऱ्यांचे वेळापत्रक असे असेल

   Follow us on        

बांदा :सावंतवाडी रेल्वे स्टेशन–निगुडे–सोनूर्ली–बांदा या मार्गावर नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर प्रशासनाने याची दखल घेत बससेवा सुरू केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

निगुडे येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या सेवेचा लाभ विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना होणार असून रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचणे आता अधिक सोयीचे होणार आहे.

नवीन बससेवेअंतर्गत दिवसातून एकूण ११ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत नियमित वेळापत्रकानुसार बस धावणार असून सावंतवाडी रेल्वे स्टेशन, निगुडे, सोनूर्ली आणि बांदा या प्रमुख ठिकाणी थांबे असणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना शहराशी थेट जोडणी मिळाली आहे.

ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले असून भविष्यात फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नवीन बससेवा सुरू झाल्याने या भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नवीन बस फेरीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

१) बांदा – सकाळी ७:१५ (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सकाळी ८:००

२) सावंतवाडी – सकाळी ९:०० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – सकाळी ९:४५

३) बांदा – सकाळी ९:५० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सकाळी १०:३५

४) सावंतवाडी – सकाळी ११:३० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १२:१५

५) बांदा – सकाळी ११:३० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १२:१५

६) सावंतवाडी – दुपारी १२:२५ (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १३:१० (१:१०)

७) बांदा – दुपारी १३:२० (१:२०) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १३:४५ (१:४५)

८) सावंतवाडी – दुपारी १४:०० (२:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १४:४५ (२:४५)

९) बांदा – दुपारी १४:५५ (२:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १५:४० (३:४०)

१०) सावंतवाडी – सायं. १७:०० (५:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – सायं. १७:४५ (५:४५)

११) बांदा – सायं. १७:५५ (५:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सायं. १८:४० (६:४०)

 

 

 

Konkan Railway: तिरुवनंतपुरम – मदार होळी विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 06013 / 06014) अशी ही सेवा राहणार आहे.

गाडी क्र. 06013 तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन साप्ताहिक विशेष ४ मार्च २०२६ आणि ११ मार्च २०२६ (बुधवार) रोजी सकाळी ७:४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११:०० वाजता मदार जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी क्र. 06014 मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष ७ मार्च २०२६ आणि १४ मार्च २०२६ (शनिवार) रोजी रात्री ९:४० वाजता मदार जंक्शन येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी रात्री १२:४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे पोहोचेल.

ही विशेष गाडी कोल्लम, कायमकुलम, मावेलिकरा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, अलुवा, त्रिशूर, शोरनूर, कोझिकोड, कन्नूर, कासरगोड, मंगळुरू, उडुपी, मुरुडेश्वर, कुमटा, करवार, मडगाव, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, पनवेल, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, चित्तौडगड, भिलवाडा, बिजैनगर आणि अजमेर या स्थानकांवर थांबा घेणार आहे.

या गाडीमध्ये एकूण २२ डबे असतील. त्यात २० स्लीपर कोच आणि २ एसएलआर/डी डबे समाविष्ट आहेत.

Konkan Railway Updates 02/03/26: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! होळीसाठी मुंबई – मडगाव मार्गावर धावणार विशेष गाड्या

   Follow us on        

मुंबई: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई–मडगाव मार्गावर विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्यांमुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई CSMT – मडगाव – मुंबई CSMT विशेष (द्विसाप्ताहिक)

गाडी क्रमांक ०१०४९ मुंबई CSMT–मडगाव विशेष ही ३ मार्च २०२६ (मंगळवार) आणि ६ मार्च २०२६ (शुक्रवार) रोजी मुंबई CSMT येथून पहाटे ००:३० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १३:३० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

परतीची ०१०५० मडगाव–मुंबई CSMT विशेष ही ३ व ६ मार्च रोजी मडगावहून १६:३० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०५:२० वाजता मुंबई CSMT येथे पोहोचेल.

या गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमळी या स्थानकांवर थांबा असेल.

या गाडीची रचना एकूण २० डबे असून त्यात ३ टियर एसी (इकॉनॉमी) – १८ डबे आणि जनरेटर कार – २ डबे असतील.


लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष

गाडी क्रमांक ०१०४७ लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव विशेष ही ७ मार्च २०२६ (शनिवार) रोजी रात्री २२:१५ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता मडगाव येथे पोहोचेल.

परतीची ०१०४८ मडगाव–लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष ही ८ मार्च २०२६ (रविवार) रोजी सायंकाळी १८:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:५० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.

या गाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम व करमळी येथे थांबा असेल.

या गाडीची रचना २२ डबे अशी असून त्यात २ टियर एसी – १, ३ टियर एसी – ६, स्लीपर – ९, जनरल – ४, जनरेटर कार – १ आणि एसएलआर – १ डबा असेल.

कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांची ‘लेट लतीफी’ संपेना! होळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल

   Follow us on        

ठाणे: कोकणातील लाडक्या ‘शिमगा’ म्हणजेच होळीच्या सणासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास यंदा अत्यंत खडतर ठरला. रविवारी सकाळी मुंबई सीएसएमटी स्थानकातून सुटणारी तेजस एक्स्प्रेस तब्बल सात तास उशिराने धावल्यामुळे मुंबई, ठाणे आणि पनवेल रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी रखडपट्टी झाली. सकाळी ५:४० वाजता सुटणारी ही गाडी प्रत्यक्षात दुपारी १२ वाजून ५८ मिनिटांनी सुटली.

रेल्वे प्रशासनाकडून गाडी उशिरा असल्याची पूर्वसूचना वेळेवर न मिळाल्याने, अनेक प्रवासी पहाटेच स्थानकावर पोहोचले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांचे प्रचंड हाल झाले. विशेषतः ठाणे रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक ५ वर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती, मात्र तिथे स्वच्छतागृहे किंवा विश्रांतीगृहांची कोणतीही सोय नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.

​या विलंबाबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती वेळेत देण्यात आली नाही. सुरुवातीला गाडी १०:५० ला सुटेल असे सांगण्यात आले, पण प्रत्यक्षात तिला सात तास उशीर झाला. कोकण रेल्वेच्या मार्गावरील दुहेरीकरणाच्या कामामुळे हा उशीर झाल्याची चर्चा प्रवाशांमध्ये होती.

तेजस, जनशताब्दी आणि मांडवी यांसारख्या गाड्यांना होणारा उशीर आता नित्याचीच बाब झाली असून, सण-उत्सवाच्या काळात रेल्वेच्या या ढिसाळ नियोजनामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या नावाने अक्षरशः ‘शिमगा’ केला. एका दिवसाच्या या खोळंब्याचा परिणाम परतीच्या प्रवासावरही होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, कोकणातील रेल्वे समस्यांकडे राज्य सरकारनेही लक्ष देण्याची मागणी होत आहे. अलीकडेच बोट सेवेचा शुभारंभ करताना कोकणाच्या विकासाचा उल्लेख झाला असला, तरी रेल्वे प्रवासातील अडचणींचाही गांभीर्याने विचार करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्यांची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाला सुधारणा करण्यास भाग पाडावे, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये मुदतवाढ!

   Follow us on        

मुंबई: प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची सोय लक्षात घेऊन मध्य रेल्वेने (Central Railway) मोठा निर्णय घेतला आहे. नागपूर-मडगाव, दादर-गोरखपूर आणि दादर-बलिया यांसारख्या महत्त्वाच्या मार्गांवर धावणाऱ्या सहा विशेष गाड्यांच्या कालावधीत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदतवाढ १ मार्च २०२६ पासून पुढील सूचना मिळेपर्यंत लागू असेल.

​विशेष म्हणजे, या गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये किंवा डब्यांच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

​या गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये झाली वाढ:

​नागपूर – मडगाव विशेष (०११३९): ही गाडी आता दर बुधवार आणि शनिवारी धावेल.

​मडगाव – नागपूर विशेष (०११४०): ही गाडी आता दर गुरुवार आणि रविवारी धावेल.

​दादर – गोरखपूर विशेष (०१०२७): ही गाडी आठवड्यातून चार दिवस म्हणजे दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी धावेल.

​गोरखपूर – दादर विशेष (०१०२८): ही गाडी दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी धावेल.

​दादर – बलिया विशेष (०१०२५): ही गाडी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी धावेल.

​बलिया – दादर विशेष (०१०२६): ही गाडी दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी धावेल.

​प्रवाशांसाठी सूचना:

​रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रवाशांनी सविस्तर वेळापत्रक आणि थांब्यांच्या माहितीसाठी enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES (National Train Enquiry System) अ‍ॅपचा वापर करावा. या निर्णयामुळे उन्हाळी सुट्ट्या किंवा इतर सणासुदीच्या काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search