Konkan Railway News : कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आज सकाळी आठच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेस (Konkan Kanya Express) मुंबईहून गोव्याकडे जात असताना कोकिसरे रेल्वे फाटकापासून काही अंतरावर अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रेन बंद पडली होती. त्यानंतर राजापूर स्टेशनवरुन नवीन इंजिन उपलब्ध करण्यात आले असून इंजिन बदलण्यात आले होते.
आताच्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक पूर्वपदावर आली आहे. काही गाड्या वगळता सर्व गाड्या काही मिनिटांच्या फरकाने धावत आहेत.
KONKAN RAILWAY NEWS : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. ह्या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा मार्च-२०२३ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. हि गाडी ह्या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी ३०/१२/२०२२ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०३ मार्च २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी ०२/०१/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०४ एप्रिल २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
Konkan Railway News :ठाणे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म वर होणाऱ्या गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी ठाणे स्थानकावरून पुढे जाणार्या लांब पल्ल्याच्या गाड्यांबाबत काही बदल केले गेले आहेत. दिनांक 01 डिसेंबर 2022 पासून हे बदल अंमलात आणले गेले आहेत अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे यांच्या मार्फत देण्यात आली आहे.
कोकणात जाणार्या सर्व गाड्यांसाठी खालील बदल करण्यात आलेले आहेत.
कोकणात जाणार्या सर्व गाड्यांचे ठाण्याला उघडणारे जनरल डबे शेवटी म्हणजे (दादर दिशेने) केले आहेत. त्यामुळे ह्या डब्यांसाठी लागणारी रांग आता मागे लागत आहे.
मुंबई वरून कोकणात जाणार्या तुतारी व मांडवी एक्सप्रेस ठाणे स्टेशनला प्लॅटफॉर्म नं. 5 वर तर कोकण कन्या आणि मंगलोर एक़्सप्रेस या गाड्या प्लॅटफॉर्म नं 7 वर येत आहेत.
Follow us on
ठाणे स्थानकावरून कोकणरेल्वेने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि.) ठाणे मार्फत करण्यात आले आहे.
Konkan Railway News :प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकणरेल्वे आणि मध्य रेल्वेने कोंकण रेल्वे मार्गावर चार हिवाळी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या कोकणात पर्यटनाचा हंगाम चालू आहे, तसेच येत्या ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर साजरे करण्यासाठी गोवा राज्याला येणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ह्या गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक ०४.१२.२०२२ रोजी सर्व तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टल वर चालू होणार आहे.
खालील गाड्या अतिरिक्त शुल्कासह चालविण्यात येणार आहेत.
1) Train No 01453/01454 LTT – MANGALURU – LTT Special Weekly
ह्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळरू जंक्शन ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01453
S.N.
Station Name
TIME
Day
1
LOKMANYATILAK T
22:15
1
2
THANE
22:38
1
3
PANVEL
23:40
1
4
ROHA
01:10
2
5
KHED
02:30
2
6
CHIPLUN
02:54
2
7
SANGMESHWAR
03:22
2
8
RATNAGIRI
03:55
2
9
KANKAVALI
05:40
2
10
SINDHUDURG
05:54
2
11
KUDAL
06:06
2
12
SAWANTWADI ROAD
06:28
2
13
THIVIM
07:02
2
14
KARMALI
07:24
2
15
MADGAON
08:45
2
16
KARWAR
09:38
2
17
GOKARNA ROAD
10:12
2
18
KUMTA
10:34
2
19
MURDESHWAR
11:12
2
20
BHATKAL
11:28
2
21
MOOKAMBIKA ROAD
11:42
2
22
KUNDAPURA
13:02
2
23
UDUPI
13:40
2
24
MULKI
14:32
2
25
SURATHKAL
15:02
2
26
MANGALURU JN
17:05
2
ही गाडी 09 डिसेंबर 2022 ते 6 जानेवारी 2023 दरम्यान दर शुक्रवारी चालविण्यात येणार आहे.
Train No 01454
S.N.
Station Name
Time
Day
1
MANGALURU JN
18:45
1
2
SURATHKAL
19:40
1
3
MULKI
19:52
1
4
UDUPI
20:14
1
5
KUNDAPURA
21:02
1
6
MOOKAMBIKA ROAD
21:26
1
7
BHATKAL
21:44
1
8
MURDESHWAR
22:00
1
9
KUMTA
22:30
1
10
GOKARNA ROAD
22:52
1
11
KARWAR
23:22
1
12
MADGAON
00:30
2
13
KARMALI
01:02
2
14
THIVIM
01:24
2
15
SAWANTWADI ROAD
01:52
2
16
KUDAL
02:24
2
17
SINDHUDURG
02:36
2
18
KANKAVALI
02:52
2
19
RATNAGIRI
05:55
2
20
SANGMESHWAR
06:52
2
21
CHIPLUN
07:42
2
22
KHED
08:12
2
23
ROHA
12:00
2
24
PANVEL
13:10
2
25
THANE
13:50
2
26
LOKMANYATILAK T
14:25
2
ही गाडी 10 डिसेंबर 2022 ते 7 जानेवारी 2023 दरम्यान दर शनिवारी चालविण्यात येणार आहे.
konkan Railway News :कोंकण रेल्वेमार्गावर धावणारी अजून एक गाडी आता आरामदायक एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) सहित धावणार आहे. १९२६०/१९२५९ भावनगर- कोचुवेल्ली- भावनगर हि गाडी २० डिसेंबर पासून नव्या लाल, पांढऱ्या रूपासह रुळावर धावताना दिसणार आहे. सध्या हि गाडी IRS डब्यांसहित चालवली जात आहे.
ह्या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत पण खालीलप्रमाणे बदल केला आहे.
जनरेटर कार – ०१ + एसलआर – ०१ + सेकंड सीटिंग – ०३ + स्लीपर – ०८ + थ्री टायर एसी – ०६ + टू टायर एसी – २ + पॅन्टरी कार – ०१ असे मिळून एकूण २२ डबे
ह्या गाडीचे मडगाव पर्यंतचे कोकणातील थांबे
वसई रोड, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, थिवीम आणि मडगाव
एलएचबी (लिंक हॉफमॅन बुश) कोच ची वैशिष्ट्ये
LHB Coach
एलएचबी कोच प्रवाशांच्या दृष्टीने सुरक्षित व प्रशस्त असे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्जित असतात.
मजबूत आणि वजनाने हलके असल्यामुळे गाडीचा वेगही वाढतो.
इतर कोचच्या तुलनेत एलएचबी कोचची लांबी ही १.५ मी. जास्त असल्याने त्यात स्लीपर आणि थ्री टायर एसी डब्यात ८ बर्थ जास्त बसतात तर टू टायर एसी डब्यात ४ बर्थ जास्त बसतात. त्यामुळे अधिक प्रवासी क्षमता.
अधिक सुरक्षित- अपघात झाल्यास डबे एकमेकांवर चढत नाही त्यामुळे कमी हानी होते.
Konkan Railway News:डिसेंबर महिन्यातील पर्यटन हंगाम, कोकणातील जत्रेला जाणाऱ्या कोकणवासीयांची गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वेने एक एकेरी मार्गी गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक 01427 एकेरी विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवार दिनांक ३ डिसेंबर २०२२ रोजी ००.२० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी १२.१५ वाजता पोहोचेल.
Konkan Railway News : पर्यटनाचा हंगाम, तळकोंकणातील जत्रेचा हंगाम तसेच कोकण मार्गावरील गाडयांना गर्दी होत असल्याने कोंकण रेल्वेने ह्यावर उपाय म्हणून कोंकण मार्गावरील काही गाडयांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
अधिक माहितीसाठी ww.enquiry.indianrail.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्यात यावी. प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनामार्फत केले गेले आहे.
Konkan Railway News :मुंबई गोवा महामार्ग गेल्या १२ वर्षांपासून रखडला आहे, अनेक ठिकाणी रस्त्याची दुर्दशा झाली असल्याने ह्या महामार्गाने वाहतूक करणे खूपच गैरसोयीचे झाले आहे. ह्या सर्वात कोकणातील उद्योजकांना कोकण रेल्वेने एक दिलासादायक बातमी दिली आहे. मुंबईतील जेएनपीटी बंदरापासून रत्नागिरीपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाकडून कंटेनर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरक्षित प्रवास आणि वेळेची बचत असा दृष्टिकोन रेल्वेने ठेवला असून पहिली कंटेनर ट्रेन २९ नोव्हेंबर २०२२ रोजी रत्नागिरी स्थानकातून सोडण्यात येणार आहे. या सुविधेचा व्यापाऱ्यांकडून लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनाकडून केले गेले आहे. ह्या सुविधेंचा लाभ कोकणातील स्थानिक उद्योजकांना होणार आहे. मालाची वाहतूक अधिक वेगवान आणि कमी खर्चात करण्यासाठी ह्या सेवेचा लाभ घेता येईल. कोकणात उत्पादित उत्पादने मुंबईतील जेएनपीटी बंदरातून जगाच्या विविध भागात निर्यात केली जातात. येथील उत्पादनेही त्यांच्या गुणांसाठी ओळखले जातात. त्यामुळेच जगभरात प्रचंड मागणी असते. मुंबई गोवा हायवे वाहतुकीस योग्य नाही आहे. त्यावरुन वाहतूक करताना दमछाक होते आणि वेळही अधिक लागतो. रस्ते अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे जेएनपीटी आणि रत्नागिरी दरम्यानचा हा प्रवास सुरळीत करण्यासाठी कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागाने कंटेनर ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या ट्रेनमध्ये चाळीस फूट आणि वीस फूट लांबीचे कंटेनर मालाच्या वाहतुकीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. निर्यातीसाठी वातानुकूलीत आणि कोरडे कंटेनरही यामध्ये वापरले जाणार आहेत. मालाची वाहतूक सुलभ आणि गतिमान होण्यासाठी कोकण रेल्वेची ही सेवा उपयुक्त ठरणार आहे. कोकणातून होणाऱ्या व्यापाराला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
पेण: आपल्या विविध मागण्याकरिता आणि पेण रेल्वे स्थानकात सध्याच्या गैरसोयी रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून आणून देण्यासाठी माझं पेण आणि रेल्वे प्रवासी सन्मान समिती तर्फे पुढील महिन्यात ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे.
ह्या मागण्यांमध्ये मुख्य मागणी म्हणजे ह्या स्थानकाला काही गाड्यांचे थांबे मिळवणे हि असली तरी अजून काही मागण्या आहेत. पेण तालुका हा जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असून त्याची लोकसंख्या सुमारे २ लाखापेक्षा जास्त आहे. पेण तालुक्यातून मुंबई,नवी मुंबई, पनवेल, माणगाव, रोहा आणि इतर ठिकाणी नोकरी, शिक्षण तसेच व्यापाराच्या कारणासाठी नियमित प्रवास करतात. त्याचप्रमाणे काही मोठ्या कंपन्या पण तालुक्यात आहेत. सुबक मूर्तीसाठी पेण तालुका पूर्ण विश्वात प्रसिद्ध आहे. हे रेल्वे स्थानक मुंबई गोवा हायवे च्या जवळ आहे. ह्या सर्व गोष्टी अनुकूल असताना पेण ह्या रेल्वे स्थानकाला रेल्वे प्रशासनाकडून योग्य सन्मान भेटत नाही आहे अशी ह्या समितीची तक्रार आहे.
१. कोरोना पूर्व काळात पेण स्थानकात थांबणारी दिवा-सावंतवाडी-दिवा (१०१०५/१०१०६) ह्या गाडीला पेण, कासू, नागोठणे, रोहा येथे पूर्ववत थांबा मिळावा.
२. कोरोना काळात सामान्य Passenger गाडयांना लावलेले अधिक तिकीट दर पूर्ववत करण्यात यावेत.
३. रोहा – पनवेल – रोहा या मार्गावर मेमू गाड्यांच्या फेऱ्या वाढवाव्यात आणि त्या नियमित वेळापत्रकानुसार असाव्यात.
४. पेण दिवा पेण मेमू शनिवार आणि रविवार देखील सुरु राहावी.
५ यादीतील किमान ५ एक्सप्रेस गाडयांना पेण येथे थांबा देण्यात यावा.
याचप्रमाणे स्थानकावर अतिरिक्त तिकीट खिडकी, तिकीट तपासणीस नेमण्यात यावा असे रेल्वेच्या हितासाठी काही मागण्या पण आहेत.
ह्या सर्व मागण्या दिनांक १०.१२.२०२२ पर्यंत पूर्ण करण्यात याव्यात नाहीतर दिनांक ११.१२.२०२२ रोजी सकाळी ११ वाजता रेल रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा “माझं पेण” आणि “रेल्वे प्रवासी सन्मान समिती” ने दिला आहे.
Konkan Railway News :१२०५१/१२०५२ मुंबई सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस हि चाकरमान्यांना मुंबईमधून कोकणात आणि कोकणातून मुंबईला कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचवणारी एक्सप्रेस म्हणून ओळखली जाते. एवढेच नाही तर ह्या एक्सप्रेस ने त्याच दिवशी कोकणात जाऊन पुन्हा मुंबईला येते असे ह्या गाडीचे वेळापत्रक आहे. सकाळी मुंबई सीएसमटी स्थानकावरून सकाळी ५.१० वाजता सुटणारी हि एक्सप्रेस मडगावला त्याच दिवशी दुपारी १४.१० ला पोचते. परतीच्या प्रवासात हि गाडी मडगाव स्थानकावरून १४.४० ला सुटून ती छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे २३.३० ला पोहोचते. त्यामुळे ह्या गाडीला कोकणवासीयांची पहिली पसंदी आहे.
पण अलीकडच्या काही दिवसात हि गाडी नेहमीच उशिरा धावत असल्याचे दिसत आहे. कोकणातून मुंबईला येताना प्रवाशांना खूप मनस्ताप करावा लागत आहे. ठाणे, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे हि गाडी रात्री १.३० / २.०० च्या दरम्यान पोचत असल्याने उपनगरीय लोकल्स ने पुढचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल होत आहेत. कारण ह्या वेळेला उपनगरीय रेल्वे गाड्या बंद असतात, त्यामुळे दूर जाणाऱ्या प्रवाशांना सकाळच्या पहिल्या ट्रेन चे प्रतीक्षा करावी लागते किंवा इतर महागड्या पर्याय निवडावा लागतो.
पावसाळी वेळापत्रक होते तेव्हा कोकण रेल्वे दोन स्वतंत्र गाड्या ह्या मार्गावर चालवीत असे, त्यामळे हि समस्या येत नसे. हि गाडी वेळेवर असे. आता १२०५१ जी गाडी दुपारी १४.१० ला पोहोचते तीच गाडी १४.४० ला १२०५२ परतीच्या प्रवासाला सोडण्यात येत आहे. त्यामुळे मुंबई वरून मडगाव ला जाणारी गाडी जर उशिरा गेली तर त्याचा परिणाम तेथून मुंबईसाठी सुटणाऱ्या १२०५२ गाडी वर होतो आणि उगमस्थानावरूनच हि गाडी उशिरा निघते. त्यामुळे दोन स्वतंत्र गाड्या वापरण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.