Category Archives: कोकण

Konkan Railway | तुतारी एक्सप्रेसला उद्यासाठी अतिरिक्त स्लीपर कोच…

सिंधुदुर्ग, ०२ फेब्रु. : मालवण तालुक्यातील आंगणेवाडीची प्रसिद्ध भराडी देवीची जत्रा चालू झाली आहे. संपूर्ण देशातून भक्त आंगणेवाडी येथे येण्यास सुरवातही झाली आहे. भाविकांचा वाढणारा प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील चालणार्‍या तुतारी एक्सप्रेस या गाडीला एक अतिरिक्त स्लीपर डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की आज मध्यरात्री म्हणजे दिनांक 03 मार्च रोजी सुटणार्‍या 11003 दादर – सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस या गाडीला एक स्लीपर अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.

परतीच्या प्रवासात दिनांक 04 मार्च रोजी सुटणार्‍या 11004 सावंतवाडी- दादर या गाडीला एक स्लीपर अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.

या अतिरिक्त कोचममुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना फायदा होणार आहे.

 

 

PDF: नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचा अंतिम आराखडा जाहीर; अधिसूचना जारी. ‘या’ गावांतून जाणार हा महामार्ग

मुंबई दि. १ मार्च २०२४: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार या महामार्गास राज्य महामार्ग (विशेष )क्रमांक १० म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या अंतिम आराखड्यानुसार कोकणातील खालील गावातून हा महामार्ग जाणार असून लवकरच भूमी अधिग्रहण करण्याचे काम चालू करण्यात येणार आहे.
आंबोली, कीतवडे,गेळे,वेर्ले, पारपोली, नेने, फणसवडे, उदेली, घाराप, फुकेरी,असनिये, तांबोळी, डेगवे, बांदा 

‘शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्यादरम्यान असला तरी हा महामार्ग पवनार, वर्धा येथून सुरू होणार असून गोवा, पत्रादेवी येथे येऊन संपेल. नागपूर – वर्धा असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून जाणार आहे.

११ हजार हेक्टर जागेची गरज

समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून यासाठी अंदाजे ९ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागली आहे. नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग ८०५ किमीचा असून यासाठी अंदाजे ११ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागण्याची शक्यता आहे. तर हे भूंसापदन एमएसआरडीसीसाठी मोठे आव्हान असणार आहे.

अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावेदारी कोणाची? नारायण राणे यांचे ट्विट चर्चेत

मुंबई, २९ फेब्रु. २०२४ :  लवकरच लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुती आणि मित्रपक्षांकडून रस्सीखेच होताना दिसतेय.

शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभेची तयारी सुरु केली असल्याची चर्चा होताना दिसत आहे. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा भाजपची असून भाजपच या जागेवर निवडणूक लढणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून करण्यात आला आहे.

लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्‍या जागेसंबंधी आपला हक्‍क दाखवित आहेत. रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे.’, असं ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं असून ते ट्वीट चांगलंच चर्चेत आलंय.

 

Sawantwadi: रुग्णालयात टाक्यांसाठी लागणारा धागा नाही; रात्री २ वाजता नातेवाईकांची पळापळ. रुग्णालय प्रशासनाचा गलथान कारभार समोर

सावंतवाडी: तळकोकणात सरकारी आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. काल गरजेच्या वेळी उपजिल्हा रुग्णालयात टाके घालण्या साठी लागणारा धागा उपलब्ध नसल्यामुळे जखमी रुग्णास जवळपास सव्वा तास रखडवल्याचा प्रकार येथे घडला. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांनी हा धागा आणण्यासाठी नातेवाईकांना पळापळ करण्यास लावली.
सविस्तर वृत्त असे की सावंतवाडी शहरात काल रात्री पावणे एक वाजता एक व्यक्ती गाडी रस्त्यावर स्लिप होवून अपघात झाला होता. व अपघात झालेल्या व्यक्तीला हाताला,पायाला डोक्याला चांगल्याच जखमा झाल्या होत्या. त्या नंतर अपघातातील जखमी रुग्णाला सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णाला मोठ्या जखमा झाल्याने त्याला टाके पडले मात्र टाके घालण्या साठी लागणारा धागा रुग्णालयात उपलब्ध नाही तो बाहेरून घेवून या असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. त्यानंतर तो धागा शोधण्यासाठी नातेवाईक वेलनेस मध्ये गेले तेथे देखील सापडला नाही त्या नंतर त्यांनी जे जे मेडीकल गाठले तेथे देखील धागा सापडला नाही. अश्या अनेक ठिकाणी धाग्या साठी हेलपाट्या मारल्या नंतर शेवटी सर्वोदय नगर मध्ये धागा सापडला. व त्यानंतर नातेवाईक रुग्णालयात आले व नंतर टाके घालण्यात आले. तोपर्यंत सव्वा तास रुग्ण रक्त बंबाळ परिस्थितीत तसाच रुग्णालयात होता. असा भयंकर अनुभव रुग्णाच्या नातेवाईकांना आला.
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मतदार संघातील हा प्रकार आहे. एकीकडे येथे मल्टि स्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्याच्या गोष्टी केल्या जात असताना असे प्रकार घडत असतील तर सामान्य नागरिकांनी शासनाकडून कोणती अपेक्षा करावी असा प्रश्न विचारण्यात येत आहे.

Kashedi Tunnel: नियम तोडून चुकीच्या दिशेने होणाऱ्या वाहतुकीमुळे अपघाताची शक्यता वाढली

Kashedi Tunnel :मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणार्‍या हलक्या वजनाच्या एकेरी वाहतुकीसाठी खुला झाल्याने प्रवास वेगवान अन आरामदायी झाला आहे. मात्र रात्रीच्या सुमारास मुंबईच्या दिशेनेही जाणारी वाहने बोगद्यातून मार्गस्थ होत असल्याने वाहनचालकांची फसगतच होत आहे. विरूद्ध दिशेने धावणार्‍या वाहनांमुळे बोगद्यात एकेरी वाहतुकीची पायमल्ली सुरू आहे. नियोजनाच्या अभावामुळे अपघातांचा धोका कायम असून वाहनचालकांची सुरक्षितता ऐरणीवरच आली आहे.
एकेरी वाहतुक चालू केली असली तरीही हा नियम धाब्यावर बसवून सर्रासपणे विरोधी बाजूने म्हणजे गोव्यावरून मुंबईच्या दिशेने सुद्धा काही वाहनचालक वाहने चालवताना दिसत आहे. एखादा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का? अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात यावी  तसेच वाहतुकीचे योग्य नियोजन करण्यात यावे अशी मागणी होत आहे.
शिमगोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्याच्या दृष्टीने बोगद्यातील अंतर्गत कामांनी वेग घेतला होता. त्यानुसार २४ फेब्रुवारीपासून कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला झाला आहे.

Kokan railway | तेजस एक्सप्रेसमध्ये मराठी वृत्तपत्रे उपलब्ध का नाहीत? प्रवाशांकडून नाराजी व्यक्त

मुंबई:जलद प्रवास आणि अत्याधुनिक सुविधांचा लाभ मिळावा यासाठी प्रवासी तेजस आणि वंदे भारत एक्सप्रेसंना प्राधान्य देतात. या गाड्यांचा जवळपास 90% मार्ग Route महाराष्ट्र राज्यात असल्याने या दोन्ही गाड्यांतून मोठ्या प्रमाणावर मराठी भाषक प्रवास करीत असतात. परंतु प्रवाशांना मराठीऐवजी इंग्रजीच वृत्तपत्र उपलब्ध करण्यात येते. याबद्दल प्रवासी खंत व्यक्त करू लागले आहेत.

मनसेचे नेते नितीन सरदेसाई दादरवरून बुधवारी तेजस एक्स्प्रेसने रत्नागिरीला जात होते. यावेळी त्यांना मराठी वृत्तपत्र वाचण्यास हवा होता. मात्र तेजस एक्स्प्रेसमध्ये फक्त इंग्रजी वृत्तपत्र उपलब्ध होते. मराठी वृत्तपत्र उपलब्ध नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

मंगळवारी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला आणि बुधवारी मराठी भाषेची कशाप्रकारे गळचेपी होते, त्याचा अनुभव आला. आपल्याच राज्यातून सुरू होणार्‍या तेजस एक्स्प्रेसमध्ये मराठी वर्तमानपत्र नसणे. फक्त इंग्रजी वर्तमानपत्र असणे ही नक्कीच गौरवाची बाब नाही. यापुढे रेल्वेगाड्यांमध्ये मराठी वर्तमानपत्र मिळेल याची महाराष्ट्र नवनिर्माण सेना खात्री करेलच. परंतु प्रवाशांनी सुद्धा या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता सगळीकडेच मराठीचा आग्रह धरावा, असे मत मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी व्यक्त केले. त्यांनी या आवाहनाचा एक विडिओ प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध केला आहे.

 

गोव्याच्या धर्तीवर काजू उद्योगाला चालना देण्यात येईल – रवींद्र चव्हाण

मुंबई दि. २८ फेब्रु.: आज विधानभवनात अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत काजू प्रक्रिया उद्योगासंदर्भात तसेच काजू बियांना अनुदान देण्यासंदर्भात आपण भूमिका मांडली असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.
गोवा राज्य सरकारने काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, या निर्णयांच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील काजू उद्योग प्रक्रियेला चालना देण्यासाठी व काजूला चांगला भाव देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
गोवा राज्य सरकारने काजू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत, या निर्णयांच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील काजू उद्योग प्रक्रियेला चालना देण्यासाठी व काजूला चांगला भाव देण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार करावा, अशी मागणी देखील यावेळी केली.
या सर्व मागण्या आणि सूचनांवर सखोल विचार करून त्या दृष्टीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश पणन, अल्पसंख्यांक विकास आणि औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी कृषी विभागातील उपस्थित अधिकाऱ्यांना दिले आहेत. महायुती सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार असून या संदर्भात गतिमानतेने कृती करून कोकणातील शेतकऱ्यांचे हित जपेल, असा विश्वास आहे.
या बैठकीला आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम,  आमदार राजेश पाटील, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी आदी मान्यवर उपस्थित होते.

वाशी : सिंधुदुर्गातून हापूसची आवक वाढली; पेटीला मिळत आहे ‘एवढा’ दर

वाशी : नवी मुंबईतील वाशी येथील ए.पी.एम.सी. बाजारात साेमवारी काेकणातून पाच हजार  पेट्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. यामध्ये सर्वाधिक (६० टक्के) हापूस पेट्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून तर ४० टक्के रत्नागिरी  व रायगड जिल्ह्यातील आहेत. बाजारात दाखल झालेल्या आंबा पेटीला सध्या दोन ते पाच हजार रुपये इतका भाव मिळत आहे.
 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा मोठ्या प्रमाणावर बाजारात येत आहे. त्या तुलनेने रत्नागिरीचे प्रमाण अल्प आहे. सध्या रात्री गारठा व दिवसा उष्मा, असे तापमान असले तरी शेतकरी तयार आंबा काढून विक्रीला पाठवू लागले आहेत सध्या बाजारात कर्नाटक हापूस, बदामी, लालबाग, तोतापुरी आंबा विक्रीसाठी येत आहे. हापूस ८० ते १७५ रुपये किलो, बदामी ६० ते १२० रुपये किलो, लालबाग १०० ते १४० रुपये किलो, तोतापुरी ६० ते ७० रुपये किलो दराने विकला जात आहे गेल्या दोन आठवड्यांपासून हापूस विक्रीसाठी येत आहे. या आठवड्यापासून आवक वाढली आहे. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसचे प्रमाण ६० टक्के आहे. उर्वरित ४० टक्के आंबा रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील आहे. आंब्याच्या वर्गवारी, दर्जानुसार दर आकारण्यात येत आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकावर लुटमारीचा प्रकार

गोवा वार्ता : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांमध्ये आणि स्थानकांवर लुटमारीचे प्रकार वाढले आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव रेल्वे स्थानक परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर ४ अज्ञात युवकांकडून मारहाण करत एका युवकाला लुटण्याचा प्रकार घडला. त्यानंतर एटीएममधूनही पैसे काढायला भाग पाडून त्यांना लुटले. तक्रारीनंतर कोकण रेल्वे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
मडगाव रेल्वेस्थानक परिसरात परराज्यांतून आलेले अनेक लोक वस्ती करतात. याचाच त्रास आता प्रवाशांना होत असून प्लॅटफॉर्मवर कुणीही नसल्याचे पाहून रात्रीच्या वेळेला लुटमारीचा प्रकार घडला आहे. वरीर चोरीची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली होती. तक्रारदार मिथुन राज के. के. (३३, रा. केरळ) हे मडगाव रेल्वेस्थानकावरून स्वामी विवेकानंद रेल्वे हॉलिडे होम या ठिकाणी जात होते. प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वरून जात असताना फलाटावर कुणीही नसल्याची संधी साधून चार २० ते ३० वयोगटांतील युवकांनी त्यांना अडवले. त्यांनी मिथुन यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यांनी देण्यास नकार दिल्याने हाताच्या बुक्क्यांनी व थापटांनी त्यांना मारहाण करत त्यांच्या पाकिटातील १ हजार रुपये व रेल्वे ईमरजन्सी पास जबरदस्ती काढून घेतला. त्यानंतर मिथुनला बँक ऑफ इंडियाच्या एटीएमकडे नेत ५ हजार रुपये काढायला लावत त्या पैशांसह पाठीवरील पिशवी व त्य‍ातील ६५० रुपये काढून घेतले.
वरील प्रकारानंतर मिथुन राज के. के. यांनी तक्रार नोंद केली. या तक्रारीला अनुसरून कोकण रेल्वे पोलिसांनी चार अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांच्यासह कोकण रेल्वे पोलीस तपास करत आहेत.

मंडणगड | होळीसाठी परळ ते डौली एस् .टी. बससेवा सुरू

मुंबई, दि. २६ फेब्रु.: कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून शिमगा सण साजरा केला जातो. चाकरमानी हा चाकरीसाठी महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत जाऊन आपला उदरनिर्वाह करीत असतो. पण शिमगोत्सवानिमित्त चाकरमानी हा आपोआपच गावातील ओढीमुळे गावाकडे जाण्यास तयार होतो पण जाण्यासाठी गाडीचे काय? हे ओळखून पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांनी परेल एस.टी. आगारात जाऊन परळ डौली सुरु करण्याचे पञ परळ येथील वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांची प्रत्यक्षात कार्यालयात भेट घेऊन दिले.

यावेळी वरिष्ठ आगारप्रमुख नितीन चव्हाण म्हणाले गाडी सुरू होईल परंतु प्रवासी कमी मिळतात, पुरेसा भारमान नाही त्याचे काय? त्यावर सुभाष गुजर म्हणाले गाडी सुरू करा पुढच आम्ही बघु प्रवाशांची संख्या आम्ही वाढवण्यास समर्थ आहोत आणि ही गाडी आमच्यासाठी फायदेशिर आहे. सकाळी सहा वाजता गावी जाण्यासाठी गाडीत बसलो तर मुबंईला येण्यासाठी तर सोमवारी कामावर जाण्यासाठीही फायद्याची आहे. हे ऐकुन वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांनी २२ मार्च पासुन सिमगा सुरू होण्यापुर्वी एस.टी. पुर्व नियोजित आरक्षणासहीत एस.टी. सुरू होणार आहे. याची खात्रीच दिली आहे. त्यामुळेच पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search