Category Archives: कोकण

सावंतवाडीत सापडलेल्या ‘त्या’ बैलाला प्रतीक्षा आहे मालकाची….

 कोणतेही वाहन थांबले किंवा एखादी व्यक्ति जवळ येत आहे असे वाटले तर हा बैल चटदिशी त्या दिशेकडे आपली मान वळवून बघतो. कदाचित आपला मालक आपल्याला न्यायाला आला असेल अशी एक आशा त्याच्या मनात प्रज्वलित होते. पण दुसर्‍याच क्षणी त्याचा हिरमोड होऊन डोळ्यात अश्रू येतात.
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : हल्लीच सावंतवाडी तालुक्यातील कारीवडे गावात एक बैल सापडला आहे. या बैलाच्या पाठीवर व्यंग असलेला पाचवा पाय असल्यामुळे हा बैल विशेष चर्चेत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यालगतच्या कोल्हापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील लोक देवाचा बैल (पांगुळ बैल) घेऊन कोकणात आपल्या उपजीविकेसाठी येतात अशापैकी कोणाच्या मालकीचा हा बैल असून त्याची मालकाबरोबर ताटातूट झाली असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. 
हा बैल कारिवडे येथील ग्रामस्थ संजय जाधव यांच्या घरी बांधून ठेवण्यात आलेला आहे. या बैलाच्या चारा व पाण्याची व्यवस्था समाजसेवक आणि माजी आरोग्य सभापती मंगेश तळवणेकर तसेच रवी परब व इतर ग्रामस्थांनी केली आहे. बैल सापडल्याची बातमी त्यांनी पत्रकारांना देऊन या बैलाच्या मालकाने संपर्क साधून तो घेऊन जावा असे आवाहन केले होते. पण १० ते १२ दिवस उलटले तरी अजून या बैलाच्या मालकाचा पत्ता लागला नाही आहे. 
सर्वात मोठी समस्या म्हणजे हा बैल येथील ओली चार आणि सुके गवत किंवा पेंड खात नाही. त्याला लागणारा चारा येथील आजूबाजूच्या गावी सध्या उपलब्ध नाही आहे. त्यामुळे तो मालवण तालुक्यातील धामापूर येथून तो आणावा लागतो. कारिवडे ते धामापूर हे अंतर जवळ जवळ ४० किमी आहे. चारा जास्त दिवस टिकत नसल्याने दर २ दिवसांनी तो आणावा लागतो. दुसरे म्हणजे या बैलाला असे सोडून देऊ शकत नाही कारण त्याची उपासमार होईल. पुढील काही महिने येथील नद्यांचे पाणी पण आटते त्यामुळे पाणीपण त्याला भेटणार नाही. 
कोणतेही वाहन थांबले किंवा एखादी व्यक्ति जवळ येत आहे असे वाटले तर हा बैल चटदिशी त्या दिशेकडे आपली मान वळवून बघतो. कदाचित आपला मालक आपल्याला न्यायाला आला असेल अशी एक आशा त्याच्या मनात प्रज्वलित होते. पण दुसर्‍याच क्षणी हिरमोड होऊन डोळ्यात अश्रू येतात. प्राण्यांना भावना असतात हे ऐकण्यात आले होते पण त्याची प्रत्यक्ष अनुभूती येथील ग्रामस्थ घेत आहेत. 
 कारिवडे गावचे  मंगेश तळवणेकर आणि त्यांच्या सहकाऱयांनी या बैलाला असाच वाऱ्यावर न सोडता त्याची जबाबदारी घेऊन भूतदया आणि माणुसकीचे दर्शन घडवले आहे. 
ही बातमी सर्वदूर पोहचवा जेणेकरून मूळ मालकापर्यंत हि बातमी पोहोचेल आणि आणि या बैलाची त्याच्या मालकाशी भेट होईल. जो कोणी मालक असेल त्यांनी ९४२१२६९४४४ या नंबरवर संपर्क साधावा. इथे येऊन ओळख पटल्यानंतरच हा बैल सुपूर्त करण्यात येईल. त्याचबरोबर वाहतुकीचा खर्च करण्यात येईल असे मंगेश तळवणेकर म्हणाले आहेत. 
   

Loading

आंगणेवाडीच्या जत्रेसाठी आणि होळीसाठी कोकण रेल्वेची विशेष गाडी…

संग्रहित फोटो
Konkan Railway News 27-01-23: पुढील महिन्यात ४ तारखेला होणाऱ्या मालवण येथील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या जत्रेसाठी आणि होळी सणाकरिता कोकण रेल्वेने मध्य रेल्वेच्या साहाय्याने या मार्गावर एक आठवडी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.  
खालील गाडी मध्यरेल्वेच्या सहकार्याने  यामार्गावर चालविण्यात येणार आहे.
1) Train no. 01453 / 01454 Lokmanya Tilak (T) –  Surathkal – Lokmanya Tilak (T) Special (Weekly):
Train no. 01453 Lokmanya Tilak (T) – Surathkal Special (Weekly)
ही गाडी दिनांक  03/02/2023 ते 31/03/2023 या दरम्यान दर शुक्रवारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री  22:15 वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी 15:30 वाजता सुरतकल या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01454 Surathkal – Lokmanya Tilak (T) – Special (Weekly)
ही गाडी दिनांक  04/02/2023 ते 01/04/2023 या दरम्यान दर शनिवारी ही गाडी सुरतकल या स्थानकावरुन संध्याकाळी 19:40 वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी 14:25 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगांव, कारवार, गोकरण रोड, कुमठा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैंदूर, कुंदापूर, उडुपी, मुल्की
डब्यांची संरचना
एसएलआर – ०2 + सेकंड सीटिंग – 03 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 03 + टू टायर एसी – 01   असे मिळून एकूण 17   डबे
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेत स्थळास भेट द्यावी किंवा NTES अँप्लिकेशन डाउनलोड करावे असे आवाहन कोंकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. 

Loading

कोकण रेल्वेमार्गावर पनवेल ते मडगाव दरम्यान रविवारी विशेष गाडी…आरक्षण उद्यापासून…

Konkan Railway News : या आठवड्यात जर तुमचा अचानक कोकणात जायचा प्लॅन बनला असेल तर  तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. कोकणरेल्वेने पनवेल ते मडगाव दरम्यान एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाडी मध्यरेल्वेच्या सहकार्याने  यामार्गावर चालविण्यात येणार आहे.
Train No. 01430 / 01429  Madgaon Jn.  – Panvel – Madgaon Jn. Special
Train No. 01430 Madgaon Jn.  – Panvel Special
ही गाडी दिनांक  29/01/2023 रोजी रविवारी ही गाडी मडगाव या स्थानकावरुन सकाळी 08.30 वाजता सुटेल व संध्याकाळी 20 .10  वाजता पनवेल  या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 01429   Panvel – Madgaon Jn.  Special
ही गाडी दिनांक  29/01/2023 रोजी रविवारी ही गाडी पनवेल या स्थानकावरुन संध्याकाळी  21:15 वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी  08:30  वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ,सावंतवाडी रोड, थिवीम आणि करमाळी 
डब्यांची संरचना
एसएलआर – 01 + जनरेटर कार – 01 + सेकंड सीटिंग – 04 + स्लीपर – 07 + थ्री टायर एसी – 02 + टू टायर एसी – 01  + एकत्रित (टू टायर एसी + फर्स्ट एसी) – 01 असे मिळून एकूण 17  LHB  डबे
आरक्षण
या दोन्ही गाड्यांचे आरक्षण उद्या दिनांक 28/01/2023 रोजी रेल्वेच्या सर्व अधिकृत तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाइन पोर्टल वर उपलब्ध होईल अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
वेळापत्रक
T-01429 Station Name T-01430
08:30 MADGAON 08:30
06:14 KARMALI 09:14
05:54 THIVIM 09:36
04:54 SAWANTWADI ROAD 10:20
04:32 KUDAL 10:42
04:18 SINDHUDURG 10:56
04:00 KANKAVALI 11:12
03:36 VAIBHAVWADI RD 11:42
03:14 RAJAPUR ROAD 12:02
02:25 RATNAGIRI 15:05
01:10 SANGMESHWAR 15:42
00:32 CHIPLUN 16:32
00:10 KHED 17:02
23:02 MANGAON 18:10
22:40 ROHA 18:50
21:15 PANVEL 20:10

Loading

कुडाळ येथे एसटी बसला अपघात…चालकाच्या प्रसंगावधाने मोठा अनर्थ टळला …

भर उतारावर गाडी, अचानक  ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात येते. डाव्याबाजूला दरी तर उजव्याबाजूला घळण. मोठा अपघात टाळण्यासाठी निर्णय घेण्यासाठी काही क्षणांचाच अवधी. चालकाने या कठीण समयी प्रसंगावधान राखून आपल्या जिवाची पर्वा न करता उजव्या बाजूला  असलेल्या घळणीला गाडी आढळून थांबवली आणि मोठा अपघात टळला! 
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी : दि 26 जानेवारी रोजी सकाळी भोगवे वरून कुडाळला जाणाऱ्या एसटी बसला सकाळी 10:40 वाजण्याच्या सुमारास वालावल येथील उतार असलेल्या मार्गावरून जाताना अपघात झाला. एका बाजुला दरी तर दुसऱ्या बाजूला घळण आणि तीव्र उतार असलेल्या या मार्गावर ही बस थांबविणे गरजेचे होते. प्रसंगावधान राखून चालक तुषार गंवडे यांनी एका घळणीला बस आदळली व बस थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र या अपघातात गवंडे यांच्या पायाला दुखापत झाली. तसेच आठ प्रवासी किरकोळ जखमी झाले. एसटी बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व जखमींवरमीं वालावल प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. याबाबत एसटी बसचे वाहक हरीष करलकर यांनी निवती पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. या बसमध्ये ८ प्रवासी प्रवास करत होते.
सदरच्या अपघाताचे वृत्त समजतात निवती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. आर राणे यांनी भेट दिली. तर पोलीस एस. बी. नाईक अपघाताचा अधिक तपास करीत आहेत. 

Loading

मालवणात पहाटे आगीचा थरार.. २ दुकाने जळून खाक..

सिंधुदुर्ग : मालवण शहरातील धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड लागत असलेल्या दुकानांपैकी दोन दुकांनाना आज पहाटे आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवितहानी झाली नाही पण आगीत दोन्ही दुकाने जळून खाक झाली आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

याबाबतची माहिती अशी- धुरीवाडा बोर्डिंग ग्राउंड लगत अनेक दुकाने आहेत. यातील विलास परुळेकर यांचे शिलाई मशीन दुरुस्ती व विक्रीचे एक दुकान असून त्यांच्या दुकानाला अचानक आग लागली. मॉर्निग वॉकला गेलेल्या नागरिकांना ही आग लागल्याचे दिसून येताच त्यांनी अन्य लोकांशी संपर्क साधत याची माहिती दिली. स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन बंब ही दाखल झाला. यात दुकानातील नव्या व जुन्या अशा एकूण १२ ते १५ मशीन तसेच फर्निचरसह संपूर्ण दुकानच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. तर बाजूला असलेले मृणाल मोंडकर यांचे लेडीज टेलर व शिवणक्लास हेही दुकान जळून खाक झाले. यात मशीन साहित्य व ग्राहकांचे कपडे हे जळून खाक झाले. काही ग्राहकांचे लग्नाचे कपडेही दुकानात होते. तेही जळून नुकसान झाले.

(Also Read >कोकणातील ग्रामपंचायतीचा हायटेक फंडा! करवसुलीसाठी ‘क्यूआर कोड’ सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत…)

दुकान मालक, स्थानिक नागरिक तसेच मंदार केणी, महेश सारंग, राजू बिडये, भाई कासवकर यासह अन्य नागरिक, नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझवली. मात्र दोन्ही दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुकानांना लागूनच अन्य काही दुकाने आहेत. त्यांनाही धोका निर्माण झाला होता. मात्र आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.

या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार गंगाराम कोकरे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा व पुढील प्रक्रिया महसूल प्रशासनाच्या माध्यमातून सुरू होती.

Loading

श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा २ फेब्रुवारी रोजी

सावंतवाडी । प्रतिनिधी : तळकोकणातील जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या,महाराष्ट्र व गोवा राज्यासह अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सावंतवाडी येथील ३६५ खेडयांचा अधिपती असलेल्या श्री देव उपरलकर देवस्थानचा वार्षिक अभिषेक पूजा सोहळा गुरुवार २ फेब्रुवारी रोजी साजरा होणार आहे. सावंतवाडीतील राजघराण्याचे दैवत असलेल्या या देवस्थानचा वाढदिवस दरवर्षी मोठा उत्सव म्हणून साजरा होतो.यावर्षीही त्या निमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
होणारे कार्य्रक्रम 
सकाळी अभिषेक व पूजा, उत्सवानिमित्त पूजापाठ, त्यानंतर सर्व भाविकांना दर्शन व तिर्थप्रसाद,नामांकीत भजनी कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ७ वाजता सावंतवाडी येथील महापुरुष दशावतार नाटयमंडळाचा नाटयप्रयोग होणार आहे.
कार्यक्रमाला सर्व भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन श्री देव उपरलकर देवस्थानचे मानकरी विद्याधर नाईक शितप व शुभम नाईक शितप यांनी केले आहे.

Loading

कोकणातील ग्रामपंचायतीचा हायटेक फंडा! करवसुलीसाठी ‘क्यूआर कोड’ सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत…

रायगड : रोजच्या जीवनातील आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत यासाठी ‘क्यूआर कोड’ चा वापर आता सर्वच ठिकाणी होताना दिसत आहे. रोख रक्कम सोबत बाळगण्याची गरज नाही आणि सुट्ट्या पैशाचे टेन्शन ह्या ‘क्यूआर कोड’ मुळे नाहीसे होताना दिसत आहे. याच ‘क्यूआर कोड’ सुविधेंचा लाभ घेऊन आपल्या नागरिकांना कर भरणे सुलभ व्हावे याकरिता रायगड तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायतीने एक हायटेक फंडा वापरला आहे. अशी सुविधा देणारी चेंढरे ग्रामपंचायत ही राज्यातील पहिली ग्रामपंचात ठरली आहे.
ग्रामपंचायतीने प्रत्येक घरावर ‘क्यूआर कोड’ चे स्टिकर्स लावले आहेत. प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून त्याचे ‘क्यूआर कोड’ बनविण्यात आलेले आहेत. हे ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून नागरिकांना आपला कर  भरणे शक्य होणार आहे. त्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात जाण्याची गरज नाही. तसेच हा ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून नागरिकांना आपल्या इतर समस्या सोडवता येतील. नागरिकांना आकर्षित करण्यासाठी  ‘क्यूआर कोड’ द्वारे इतर मनोरंजक माहिती दिली जात आहे. भविष्यात हा ‘क्यूआर कोड’ स्कॅन करून इतर सुविधेंचा लाभ पण नागरिकांना घरबसल्या देण्याचा आपला प्रयत्न आहे असे ग्रामपंचायती द्वारे सांगण्यात आले आहे. ग्रामपंचातीच्या या प्रयोगाचे चांगलेच कौतुक होत आहे. 

Loading

आमदार भडकले आणि हातात दांडा घेवून बाहेर पडले.

सिंधुदुर्ग :जिल्ह्यात राजकिय पक्षात होणारे राडे हे काही येथील जनतेला नवीन नाही आहेत. राजकारणातील हे राडे मुख्यतः कार्यकर्त्यांमध्ये होताना दिसतात, पण एका भडकलेला आमदार हातात दांडा घेऊन ह्या राड्यात सहभागी होण्यासाठी चालल्याचे दृश्य काल जिल्हय़ातील कणकवली तालुक्यात पाहायला मिळाले.

(Also Read >कोकणच्या मातीचा गंध असलेला ‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात!)

ह्याबाबत वृत्त असे की काल कणकवली तालुक्यातील कनेडी ह्या गावात भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जुपडलेतना राजकिय राग मनात ठेवून एका कारणाने बाचाबाची झाली होती. त्याचेपडलेत रूपांतर मारहाणीत होऊन त्याला गंभीर स्वरुप आले. ह्या परिसरातील दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्र जमले आणि त्यांचात राडा सुरू झाला. त्यानंतर मात्र पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. या सर्व प्रकाराने संतापलेले शिवसेना आमदार वैभव नाईक एका हातात दांडा घेऊन ते ह्या राड्यात सामील होणार होते तेवढय़ात त्यांना पोलीसांनी अडवून माघारी पाठवले.

 

 

 

 

 

 

 

Loading

रेल्वेस्थानक ते घर प्रवास होणार सुखकर! कोकणातील रेल्वेस्थानकांचा कायापालट होणार..

  • कोकण रेल्वेच्या महाराष्ट्र राज्यातील 37 स्थानकांचा कायापालट होणार. 
  • रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट.
  • सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे.
  • रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे

मुंबई : कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या राज्यातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके आहेत. ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीची कामे लवकरच सुरु करण्यात येणार आहे. यामुळे कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. रेल्वे स्थानकापासून मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांचा लवकरच कायापालट होणार आहे. त्याचप्रमाणे, रेल्वे स्थानकाच्या परिसराचेही मोठ्या प्रमाणात सुशोभिकरण होणार आहे. यासंदर्भात कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. यामुळे, कोकणातील पर्यटनाला चालना मिळेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

(Also Read>मराठी भाषेवर पुन्हा अन्याय…सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रांच्या अनुवाद भाषेत स्थान नाही….)

सह्याद्री अतिथीगृह येथे कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, उद्योग मंत्री उदय सामंत, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार नितेश राणे, आमदार निरंजन डावखरे, आमदार योगेश कदम, कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग, मुख्य अभियंता नागनाथ राव, मुख्य व्यवस्थापक गिरीश करंदीकर, उप अभियंता सुधीर कुलकर्णी, राजन तेली, दिपक पटवर्धन, केदार साठे, आदी उपस्थित होते.

कोकणातील पर्यटन स्थळांची ख्याती देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी येथील पायाभूत सुविधांचा विकास होणे अत्यंत आवश्यक आहे. आज झालेल्या सामंजस्य करारामुळे कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील रस्त्यांचा विकास होईल, जेणेकरून पर्यटन आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

(Also Read> कोकणातील ग्रामपंचायतीचा हायटेक फंडा! करवसुलीसाठी ‘क्यूआर कोड’ सुविधा देणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत…)

सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करणार – मंत्री रविंद्र चव्हाण

कोकण रेल्वे महामंडळ मर्यादित व सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या परस्पर सहकार्यामुळे ही सर्व कामी गतीने पूर्ण होतील, तसेच कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो चाकरमान्यांना याचा खऱ्याअर्थाने लवकरच फायदा होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.

कोकणातील पर्यटनाला चालना देण्याकरिता रायगड, रत्नागिरी व सिंधुदूर्ग कोकण रेल्वे स्थानकाच्या पोहोच मार्गाची देखभाल दुरुस्ती व परिसरातील सुशोभीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्यांची १० वर्षापर्यंत देखभाल दुरुस्ती करण्यात येणार आहे. भविष्यात हा सामंजस्य करार ३० वर्षापर्यंत वाढविण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या सामंजस्य करारानुसार सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रेल्वे स्थानकांच्या पोहोचमार्गाचे डांबरीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करुन या परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या सर्व प्रमुख रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण याच सामंजस्य कराराअंतर्गत हाती घेण्यात येणार आहे. या सुशोभीकरणाच्या अंतर्गत रेल्वे प्रवाश्यांसाठी विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या रेल्वे स्थानकांचा परिसर हा अत्याधुनिक स्वरुपाचा करण्याचा आमचा मानस असल्याचेही मंत्री श्री. चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले.

या नाटकाच्या प्रयोगाच्या चौकशीसाठी कृपया खालील फॉर्म भरावा.

 

Loading

कोकणच्या मातीचा गंध असलेला ‘पिकोलो’ २६ जानेवारीला चित्रपटगृहात!

मुंबई : येत्या २६ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या ‘पिकोलो’ चित्रपटाचा ट्रेलर मागील आठवड्यात प्रदर्शित झाला आहे. एका वेगळ्या धाटणीचा चित्रपट म्हणून ह्या चित्रपटाकडे पहिले जात आहे.
‘पिकोलो’ चित्रपट हा संगीतप्रेमी कलावंताची गोष्ट आहे. संगीताच्या साथीने जगण्याची नवी उमेद निर्माण करणारा हा कलावंत संगीतसाधनेत येणाऱ्या अडथळ्यांवर मात करीत आपली कला कशी जिवंत ठेवतो? व त्यासाठी त्याला कोण आणि कशी मदत करतो? हे ‘पिकोलो’ मध्ये पहायला मिळणार आहे. आनंदाने कसे जगावे याचा मूलमंत्र देणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेले प्रेमीयुगुल जगण्याच्या संघर्षावर संगीताची फुंकर घालून त्यातून कसा मार्ग काढतात? हे ‘पिकोलो’ चित्रपटात पहाणं रंजक ठरणार आहे.
राजेश मुद्दापूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर दिग्दर्शन अभिजीत वारंग यांनी केले आहे.  चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या प्रणव रावराणे आणि अश्विनी कासार या दोघांसोबत  किशोर चौघुले, अभय खडपकर, दीक्षा पुरळकर, नमिता गावकर, पद्मा वेंगुर्लेकर, विश्वजीत पालव, मिलिंद गुरव, हर्षद जाधव, रघु जगताप, रोहन जाधव, हर्षद राऊळ, शुभम सुतार, हर्षद परब, विद्याधर कार्लेकर आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रमोद शेलार यांची आहे. छायाचित्रण कार्तिक परमार तर संकलन पराग सावंत यांचे आहे.
कोकणच्या मातीचा गंध
ह्या चित्रपटाला कोकणच्या मातीचा गंध आहे. कारण ह्या चित्रपटाचे चित्रीकरण कोकणातील निवती आणि कोकणातील इतर भागात झाले आहे. कोकणात मूळ असेलेले आणि आपल्या मातीविषयी अतुल प्रेम असलेले अभिजीत वारंग यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांचे या आधीचे चित्रपट देखील कोकणात चित्रित झाले होते. त्यातील त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘पिकासो’ या अमेझॉन प्राईम  ओटीटी प्लँटफॉर्म वर प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटाने ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ‘विशेष उल्लेखनीय’ श्रेणीत गौरव प्राप्त केला होता. ह्या चित्रपटाचे चित्रीकरण तळकोकणातील कुडाळ ह्या गावात झाले होते. कोकणातील पारंपरिक कला दशावतार कलेवर हा चित्रपट आधारित होता.  कोकणात मूळ असल्याने इथे मला चित्रपट सुचतात आणि मी करतो असे त्यांचे म्हणणे आहे. एका आगामी हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन आणि चित्रीकरण पण ते कोकणात करणार आहेत असे म्हणाले आहेत.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search