Category Archives: कोकण
Konkan Railway News : प्रजासत्ताक दिन आणि माघी गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणार्या प्रवाशांच्या सोयीसाठी कोंकण रेल्वेने या मार्गावर एक विशेष गाडी गाडी सोडायचा निर्णय घेतला आहे.
खालील गाडी पाश्चिम रेल्वेच्या सहकार्याने विशेष शुल्कासह यामार्गावर चालविण्यात येणार आहे.
Train no. 09470/ 09469 Ahmedabad Jn. – Karmali – Ahmedabad Jn. (Weekly) Special on Special Fare.
ह्या गाडी अहमदाबाद ते करमाळी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे.
Train no. 09470 Ahmedabad Jn. – Karmali
ही गाडी दिनांक 24/01/2023 रोजी मंगळवारी ही गाडी अहमदाबाद या स्थानकावरुन सकाळी 09.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी 04.30 वाजता करमाळी स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09469 Karmali – Ahmedabad Jn
ही गाडी दिनांक 25/01/2023 रोजी बुधवारी ही गाडी करमाळी स्थानकावरुन सकाळी 09.20 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी संध्याकाळी 07.00 वाजता अहमदाबाद स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे थांबे
वडोदरा, सूरत, वापी, पालघर, वसई रोड ,पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड , नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम.
डब्यांची संरचना
एसएलआर – 01 + जनरेटर कार – 01 + सेकंड सीटिंग – ०4 + स्लीपर – 08 + थ्री टायर एसी – 06 + टू टायर एसी 02 असे मिळून एकूण 22 डबे
आरक्षण
09469 या गाडीचे आरक्षण उद्या दिनांक 21/01/2023 रोजी रेल्वेच्या सर्व अधिकृत तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाइन पोर्टल वर उपलब्ध होईल अशी माहिती कोकण रेल्वे तर्फे देण्यात आली आहे.
वेळापत्रक
मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात हॉटेल व्यावसायिक आणि ‘होम स्टे’ धारक यांची संख्या लक्षणीय आहे. सरकारच्या पर्यटन विभागामार्फत या उद्योगाला चालना देण्यासाठी अशा हॉटेल आणि ‘होम स्टे’ला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. उद्योगाला ला महावितरण मार्फत होणारा वीजपुरवठा विशिष्ठ सवलतीच्या दराने केला जातो. परंतु, अजूनही पर्यटन उद्योजकांना – हॉटेल/होम स्टे चालकांना मात्र व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो. या दोन वीजदरातील फरकमोठा असल्याने, पर्यटन व्यवसायिकांना नाहक प्रचंड मोठा भुर्दंड पडतो आहे. ही बाब सरकार दरबारी पोचविण्यासाठी आमदार ऊमा खापरे आणि दापोलीतील मिहीर महाजन यांनी सुरुवातीला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली. तसेच हा विषय महावितरणकडून मार्गी लागण्याचे आवश्यक असल्याने राज्याचे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली.
रत्नागिरी : कोकण रेल्वे सुरू होऊन अनेक वर्षे लोटली तरी राजापूरवासीयांच्या स्थानकावरील समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. राजापूर रोड रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी आलेले कोकण रेल्वे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर संजय गुप्ता यांची पंचक्रोशी ग्रामविकास समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी भेट घेतली. त्यांच्याशी रेल्वेस्थानकावरील सुविधा आणि समस्यांबाबत संदर्भात चर्चा करून एक निवेदन सादर केले.
त्यांना दिलेल्या निवेदनात राजापूर रेल्वेस्थानकासाठी खालील मागण्या करण्यात आलेल्या आहेत.
- स्थानकात लिफ्ट सुरू करणे
- जनशताब्दी तसेच गोवा संपर्कक्रांती एक्स्प्रेस किंवा इतर एक्स्प्रेस गाड्यांना राजापूरचा थांबा देणे फलाट क्रमांक २ चे काम करून सुसज्ज करावे,
- कोविड काळात बंद करण्यात आलेला तिकिटांचा कोटा पूर्ववत सुरू करून त्यात वाढ करण्यात यावी
- पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम सुरू करणे
- राजापूर शहरात पोस्ट कार्यालयात तिकीट आरक्षण सुविधा उपलब्ध करून द्यावी
- प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेस्टेशन ते राजापूर शहर बस सेवा कायम सुरू ठेवावी,
- स्टेशनबाहेर रिक्षा स्टँड सुरू करावा
- या समस्यांबाबत यापूर्वी खासदार विनायक राऊत यांनाही निवेदन देण्यात आले होते

Vision Abroad

सिंधुदुर्गः मुंबई गोवा महामार्गावर आजची पहाट प्रवाशांसाठी काळरात्र ठरली आहे. माणगाव येथे भीषण कार आणि ट्रक च्या धडकेने ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास . कणकवली येथे खासगी बस उलटून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, २३ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
{Also Read >मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे भीषण अपघात.. अपघातात ९ जणांचा मृत्यू.)
कणकवली येथे वागदे पुलानजीक खासगी बसला अपघात झाला आहे. पहाटे चारच्या सुमारास हा अपघात झाला असून गडनदी पूलावर धोकादायक वळणावर चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Mumbai Goa Highway News : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव येथे पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहेया अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. एक चार वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे. कार आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक झाली. कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे,
(Also Read >मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे भीषण अपघात.. अपघातात ९ जणांचा मृत्यू.)
ट्रक रस्त्याच्या विरुद्ध बाजूने येत असताना कार जोरदार धडकला. यात कारमधील लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला पाच पुरूषांचा समावेश आहे. माणगावपासून जवळच रेपोली इथं पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
गोरेगाव पोलीस तातडीने अपघात स्थळी दाखल झालेत. त्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मदत कार्य सुरु केले आहे. या अपघातात जखमी झालेल्या मुलाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे.
Station Name | Arrival Time |
C SHIVAJI MAH T | 00:20 |
DADAR | 00:32 |
THANE | 01:12 |
PANVEL | 02:05 |
ROHA | 03:25 |
KHED | 04:44 |
CHIPLUN | 05:03 |
RATNAGIRI | 06:30 |
KANKAVALI | 08:45 |
SAWANTWADI ROAD | 09:20 |
KARMALI | 10:46 |
MADGAON | 12:15 |
पेण: २५ जानेवारी रोजी साजरा होणाऱ्या माघी गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मुंबई ठाणे ह्या शहरांतून पालीसाठी दहा जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या जादा गाड्यांसाठी प्रवाशांनी आजच आपले आरक्षण निश्चित करण्याचे आवाहन एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
अष्टविनायकांपैकी एक स्थान असणाऱ्या पाली येथील बल्लाळेश्वर गणपतीचे दर्शन घेण्यासाठी माघी गणेशोत्सवाला मोठी यात्रा भरत असते. त्यातच यंदा २५ जानेवारी रोजी हा उत्सव साजरा होत असल्याने दुसऱ्या दिवशी प्रजासत्ताक दिनानिमित्त सुट्टी असल्याने या यावर्षी दरवर्षी पेक्षा भक्तांची जास्त गर्दी अपेक्षित आहे. याचा विचार करून एसटी महामंडळाने दहा जादा गाड्या मुंबई-ठाणे ह्या शहरातून सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
तसेच दहा गाड्यांव्यातिरिक्त पेण आगारातील चार बसेस, रोहा आगारातील दोन बसेस, अलिबाग आगारातील दोन बसेस आणि कर्जत आगारातील दोन बसेस अशा एकुण आणखी दहा बसेस पाली बस स्थानकातून लोकल प्रवासासाठी सज्ज ठेवण्याचा निर्णय देखील एसटी महामंडळाने घेतला आहे.
जादा गाड्यांचा प्रवाशांनी पुरेपूर वापर करून घ्यावा आणि आपले आरक्षण लवकरात लवकर निश्चित करून घेण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले आहे. या आरक्षणासाठी प्रवाशांनी एमएसआरटीसी मोबाईल ॲप आणि msrtc च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन आरक्षण निश्चित करावे असे एसटी महामंडळाकडून सूचित करण्यात आले आहे.
(Also Read >महाराष्ट्रात लवकरच दिसणार आहेत महिला एसटी बसचालक….)
महामंडळाच्या जादा गाड्या
24 जानेवारी
ठाणे ते पाली (17: 00 वाजता)
मुंबई ते पाली (17:00 वाजता)
बोरिवली ते पाली (17: 00वाजता)
25 जानेवारी
ठाणे ते पाली ( 5:30 वाजता)
मुंबई ते पाली (6:00 वाजता)
बोरिवली ते पाली (6:00 वाजता)
26 जानेवारी
पाली ते ठाणे ( 15: 00 वाजता)
पाली ते ठाणे ( 16: 00 वाजता)
पाली ते मुंबई ( 17:00 वाजता)
पाली ते बोरिवली ( 18:00 वाजता)
(Also Read>चिपळूणला लोककला महोत्सवाचे आयोजन..)
रत्नागिरी: चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचनालयाच्या वतीने चिपळूणमध्ये लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 5 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या लोककला महोत्सवाचा शुभारंभ सोहळा होणार आहे.
कोकणातील लोप लावत चाललेल्या सर्व प्रकारच्या लोककला, खाद्य संस्कृती आणि पर्यटन संस्कृतीचा जागर दिनांक ५ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत होणाऱ्या अनुभवायला मिळणार आहे.
पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत चा लोककला आणि खाद्य संस्कृतीचा समावेश देखील या लोककला महोत्सवात असणार आहे.
रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत लोककला महोत्सवाचे स्वागाध्यक्षपद तर संयोजन समिती अध्यक्ष म्हणून डॉ तानाजीराव चोरगे हे जबाबदारी सांभाळणार आहेत
पुढील महिन्यात 5 फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत लोककला महोत्सवाला होणार सुरवात होणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली
