Mumbai -Goa Highway News: एकीकडे समृद्धी महामार्ग अवघ्या ५/६ वर्षात पूर्ण करून महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी हा महामार्ग पूर्ण करून दाखवल्याच्या आपल्या कर्तृत्वाचे गोडवे गाण्यात मग्न आहेत. तर दुसरीकडे “खड्ड्यात” गेलेला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करण्यासाठी काही ठोस पावले तर सोडा तर ह्या प्रश्नावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलणे पण टाळत आहेत. त्यामुळे शांत असणारा कोकणी माणूस आता आपला राग विविध माध्यमातून व्यक्त करू लागला आहे. ह्यात आता मराठी कलाकार पण सामील झाल्याचे दिसत आहे. मराठी अभिनेता अभिजीत केळकर याने इन्स्ट्राग्राम पोस्टच्या माध्यमातून आपला राग व्यक्त केला आहे.
एका युझर च्या पोस्ट ला त्याने रिप्लाय देताना नक्की काय म्हणाला अभिजीत?
मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची 12 वर्ष कोणत्या हिशोबाने मोजली ते कळेल का ? नाही म्हणजे तसा भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊन गेली , आपल्याला संताप व्यक्त करायला आपलं हक्काच स्थान मिळालय मग 12 वर्षच का ? आधीची 60-65 वर्ष काय कोकणात सोन्याचा धुर निघत होता का ? ह्यासाठी नुसत्या संतापी पोस्ट टाकून आणि वर्षातून एकदा सुट्टीला कोकणात जाऊन कस भागेल ? त्यासाठी स्थानिक प्रतिनिधी जबाबदार आहेत ना ? त्यांना निवडून द्यायला पुण्या मुंबईची किंवा उर्वरित महाराष्ट्रातील लोक येत नाहीत. आधी कोकणकरांनी सुधारावे मग कोकण सुधारेल ! समृद्धी म्हणजे काय बँकेत ठेवलेली ठेव नाही की काढली आणि दिली कुणालाही ! मोठ्या महामार्गांवर अपेक्षित असलेली जड वाहतूक किती प्रमाणात आहे हो कोकणात ? त्यामुळे उगाच तुमच्या वैयक्तिक संतापाला सामाजिक करून इतरांचे सामाजिक जीवन आनंदमय करू नका.
सिंधुदुर्ग : सध्या महाराष्ट्र कर्नाटक हा सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे. भाषावार प्रांतरचनेच्या काही चुकांमुळे आज ह्या सीमा भागातील आपल्या मराठी बांधवाना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ह्या वादाला खूप वर्षाचा इतिहास आहे. एकीकडे हा वाद चालू असताना तळकोकणातील एका तालुक्यातील युवा वर्गाने चक्क दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी २०१९ पासून आंदोलन सुरु केले आहे. जरी हे आंदोलन सध्या लहान प्रमाणात असले तरी ते ह्यावर उपाय न शोधल्यास ते पुढे वाढून त्याचे परिणाम दिसतील हे नक्की.
गोव्याच्या सीमेवर असणारा तळकोकणातील दोडामार्ग तालुका. याच दोडामार्ग तालुक्यातील तरुणवर्ग येथील सातत्याच्या मूलभूत सुविधांच्या उपेक्षा आणि वंचिततेला कंटाळून ‘आम्हाला गोव्यात सामावून घ्या!’ असे म्हणत उभा राहिला आहे. सुरवातीला व्हॅट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून सुरू झालेली ही चळवळ हळू हळू व्यापक होत असून दोडामार्गच्या रोजच्या जगण्यातील मूलभूत प्रश्न घेऊन उभी राहिली आहे. ह्यासंबंधी एक दोन बैठका पण घेण्यात आल्याचे समजते.
अशी मागणी का होत आहे ?
दोडामार्ग तालुका अजूनही रोजगार आणि आरोग्य इत्यादी मूलभूत गोष्टीसाठी गोवा ह्या राज्यावर अवलंबून आहे. कारण ह्या सुविधा देण्यास स्थानिक आणि राज्य सरकार अपयशी ठरत आहे. सारा रोजगार, उद्योग जर गोव्यात आहे, येथील लोकप्रतिनिधी वर्षानुवर्षं आमच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे सुद्धा लक्ष देत नसतील, तर आपला तालुकाच गोव्यात समाविष्ट करावा अशी मागणी येथील तरुणांकडून होऊ लागली आहे.
मागे गोवा सरकारने आपल्या राज्यातील आरोग्य सेवेसाठी परराज्यातील नागरिकांवर बंधने आणली होती. त्यावेळी त्यावेळचे विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी गोवा राज्यसरकारला विनंती करून हि सेवा पुन्हा चालू करून घेतली होती. सीमेच्या बंधनामुळे ह्या तालुक्यातील नागरिकांना गोव्यातील काही सेवेचा लाभ घेताना अडथळा होतो. ह्या सर्व कारणामुळे आपल्याला मूलभूत सुविधा तरी द्या नाहीतर गोवा राज्यात समाविष्ट होऊ द्या अशी मागणी होत आहे.
गोवा राज्य अगदी शांत राज्य म्हणून ओळखले जाते. इथे मराठी टक्का पण जास्त आहे. गोवामुक्तीसाठी मराठी जनता पुढे सरली होती त्यामुळे अजूनही गोवा आणि मराठी माणूस यांचे नाते जवळचे आहे. ह्या राज्यात विलीन झाल्यास काही तोटा न होता उलट फायदाच होईल अशी येथील काही तरुणांची भावना आहे.
Follow us on
ह्या प्रश्नात आता अजून एक ट्विस्ट आले आहे. महाराष्ट्र आणि गोवा सीमेलगत गोवा राज्यात मोपा गावात आंतराष्ट्रीय स्तराचे विमानतळ बनत आहे. दोडामार्ग तालुक्यापासून ते फक्त १९ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. साहजिकच त्यामुळे दोडामार्ग तालुक्याचा विकास होईल. इथल्या जमीनीचे भाव वाढले आहेत. गोव्यात जागेची मर्यादा आहे त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा इथे वळवला आहे. काही गुंतवणूदार इथे जमिनी खरेदी करून त्यावर रेसिडेन्टशल प्रोजेक्ट उभे करत आहेत. पुढच्या काही वर्षात येथील चित्र वेगळे असेल. विकासात सीमेचा अडथळा येत असल्याचे कारण दाखवून हि चळवळ अधिक तीव्र होईल आणि ह्या चळवळीस आर्थिक आणि राजकीय पाठबळ मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाराष्ट्र शासनाने ह्या गोष्टीची दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न गंभीर होण्याअगोदर त्याची दखल घेतली पाहिजे तरच हा तालुक्याचे गोवा राज्यात विलीनीकरण होण्यापासून रोखू शकतो.
Mopa Airport Newa: दक्षिण गोव्याच्या पेडणे येथील मोपा गावातील ‘मोपा’ या विमानतळाचे लोकार्पण उद्या 11 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. प्रत्यक्षात हा विमानतळ पाच जानेवारी 2023 पासून कार्यरत होणार आहेत. ह्या प्रकल्पामुळे गोव्याच्या विकासात खूप मोलाची भर पडेल. आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये मोपा विमानतळाचा देशात दुसरा क्रमांक लागणार आहे. जागतिक स्तरावरील पर्यटन केंद्र गोव्यात आहे. सुरवातीच्या काळात 40 ते 50 लाख ह्या प्रवासी ह्या विमानतळावरून प्रवास करणार असा अंदाज मांडला आहे. तर पुढील काही वर्षात ही संख्या 1 ते दीड कोटी होणार आहे असाही अंदाज आहे. साहजिकच पुढील 5 ते 10 वर्षात गोव्याचा चेहरामोहरा बदलणार आहे.हे विमानतळ जिल्ह्यातून अगदी जवळ असलेल्या मोपा गावात होत असल्याने, हे विमानतळ गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्हा असे दोघांसाठीही महत्त्वपूर्ण असणार आहे. दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ले आणि कुडाळ हे तालुके फक्त 15 ते 50 मिनिटाच्या अंतरावर आहेत.
प्रवासी वाहतुकीचा एक उत्तम पर्याय.
सिंधुदुर्गातील चिपी विमानतळ हे डोमेस्टिक विमानतळ आहे त्यामळे तेथील उड्डाणाला मर्यादा आहेत. दिवसातून एक किंवा दोन उड्डाणे होत आहेत. मोपा विमानतळ हे आंतराष्ट्रीय विमानतळ असल्याने थेथे जगातील मुख्य देशासोबत आणि देशातील मुख्य शहरांसोबत वाहतूक होणार आहे. तसेच हे विमानतळ सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्याला चिपी ह्या विमानतळापेक्षा जवळ आहे. मुंबई गोवा या महामार्गामुळे गोवा राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही अवघ्या काही मिनिटांवर आले आहे. वाहतुकीचा एक उत्तम पर्याय म्हणून तळकोकणाला ह्या विमानतळाच्या माध्यमातून भेटेल.
ह्या विमानतळावर आलेले काही टक्के पर्यटक जरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वळविण्यात आपण यशस्वी झालो तरी त्यातून खूप चांगल्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊ शकते. पण त्यासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा जिल्ह्यात उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. याआधीच सिंधुदुर्ग जिल्हा ‘पर्यटन जिल्हा’ म्हणुन घोषित केला आहे. पण दुर्दैवाने ह्या दर्जाच्या सुविधा अजून जिल्ह्यात उपलब्ध केलेल्या नाही आहेत. ही एक संधी आहे जिचा लाभ घेऊन जिल्ह्याचा विकास करता येईल.
गोव्याचा विकास झाला, तेथील पर्यटन वाढले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उत्पादित होणाऱ्या उत्पादनांसाठी खूप मोठी बाजारपेठ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उद्योजकांना मिळेल. अंतर कमी असल्याने शेतमाल गोव्याला पाठवून त्यातून चांगले उत्पन्न मिळविता येईल. गोव्यात जागेची समस्या असल्याने तेथे शेती मोठ्या प्रमाणात होत नाही. त्यामुळे शेती उपदनासाठी ते लगतच्या दोडामार्ग आणि बांदा ह्या ठिकाणावर अवलंबून राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे मोपा विमानतळातून मालाची निर्यात पण शक्य होणार आहे. त्याचा फायदा सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांना खासकरून आंबा बागायतदारांना होऊ शकतो.
पण काही नकारात्मक बाजू पण आहेत. गोव्यात जागा कमी आहे, त्यामुळे तेथिल गुतंवणूकदार सिंधुदुर्गातील सीमेलगतच्या भागात वळेल आणि तेथील जमिनी खरेदी करेल. स्थानिक कोंकणवासियांनी आमिषाला बळी पडता आपले उद्योगे किंवा शेती द्वारे आपल्या जमिनीचा आपल्या प्रगतीचा उपयोग केला पाहिजे.
प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची आवश्यक्यता
ह्या संधीचे सोने करण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छा शक्तीची गरज आहे. ह्या आधी सिंधुदुर्गचा विकासात राजकिय समीकरणे मध्ये येत होती. आता ती समीकरणे बदललेली आहेत. जिल्ह्यात २ कॅबिनेट मंत्री आहेत आणि एक केंद्रीय मंत्री आहे. विशेष म्हणजे हि मंत्रीपदे राज्यात एकत्र आलेल्या पक्षाची आहेत त्यामुळे पहिल्यांदा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास करण्यास एक अनुकूल समीकरण तयार झाले आहे. सर्व गोष्टी जर पूर्वनियोजित पद्धीतीने केल्यात तर येणाऱ्या काही वर्षात त्याचा परिमाण दिसण्यास सुरवात होईल हे नक्की.
दुपारी दादर येथून सुटणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर हीच गाडी पुढे रत्नागिरी येथे तासभराच्या थांब्यांने रत्नागिरी मडगाव म्हणुन चालविण्यात येत होती,त्यामुळे तळकोकणात जाणार्या प्रवाशांना ह्या दोन्ही गाड्या सोयीच्या होत्या. आता ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात रद्द झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
KONKAN RAILWAY NEWS:रत्नागिरी ते मडगाव ह्या दरम्यान चालविण्यात येणाऱ्या 10101 रत्नागिरी-मडगाव आणि 10102 मडगाव-रत्नागिरी ह्या दोन गाड्या तात्पुरत्या काळापुरती रद्द केल्याचे कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
ह्या आधी एका दिनांक 22/10/2022 रोजी काढण्यात आलेल्या परिपत्रकाद्वारे ह्या गाड्या दिनांक 31/12/2022 पर्यन्त रद्द असल्याचे जाहीर करण्यात आले होते. आता ती मुदत दिनांक 31/03/2023 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे. रत्नागिरी ते मडगाव या स्थानकांदरम्यान रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने अभियांत्रिकी कारणासाठी हि गाडी रद्द ठेवण्यात येणार आहे असे कोंकण रेल्वेने जाहीर केले आहे.
दुपारी येथून सुटणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर हीच गाडी पुढे रत्नागिरी येथे तासभराच्या थांब्यांने रत्नागिरी मडगाव म्हणुन चालविण्यात येत होती,त्यामुळे तळकोकणात जाणार्या प्रवाशांना ह्या दोन्ही गाड्या सोयीच्या होत्या. आता ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात रद्द झाल्याने त्यांची गैरसोय होत आहे.
Mumbai Goa Highway News :मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण राहिलेल्या कामासंदर्भात आज मंत्री रविंद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांसोबत सविस्तर आढावा घेतला.
मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण रस्त्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच या महामार्गावरील इंदापूर ते झाराप दरम्यानच्या चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करून जनतेला तातडीने दिलासा द्यावा अशी सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिल्या.
यावेळी मंत्री चव्हाण यांनी पनवेल ते इंदापूर या मार्गावरील कासू ते इंदापूर टप्पा १, पनवेल ते कासू (वडखळजवळ) टप्पा २, आदी रस्त्याची सद्यस्थिती, या मार्गावरील दुरुस्तीचे काम, त्याचप्रमाणे इंदापूर ते झाराप या रस्त्याचे बळकटीकरण व चौपदीकरणचे कामच्या सदयस्थितीच्या कामाबद्दल आढावा घेतला.
सर्व कामे तांत्रिकदृष्ट्या कशा पद्धतीने जलदगतीने पूर्ण करण्यात येतील याबाबत आवश्यक सूचना संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या. या महामार्गावरील परशुराम घाट, कशेडी घाट आदी घाट रस्त्याच्या लांबीतील उतारांचे स्थिरीकरण करुन अपघातमुक्त करण्याबाबत तसेच हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासंदर्भात सूचना मंत्री चव्हाण यांनी दिल्या.
या कामातील ज्या तांत्रिक व प्रशासकीय अडचणी असतील त्या दूर करण्याच्यादृष्टीने सर्वांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. परशुराम घाटातील ग्रामस्थांचे स्थानांतरण करण्यासाठी २ कोटी निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आलेला आहे, तो तात्काळ संबंधितांना वितरीत करण्यात यावा असे सार्वजनिक बांधकाम मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले.
Konkan News:बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या “मंदोस” चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम जाणवू शकतो. हवामान विभागानं (IMD) ने दिलेल्या माहितीनुसार आज आणि उद्या कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात काही प्रमाणात ढगाळ वातावरण असल्याचे चित्र आहे.
हवामान विभागानं तामिळनाडू राज्यातील अनेक जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये आज (8 डिसेंबर) शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. चक्रीवादळाच्या स्थितीमुळं महाराष्ट्रात थंडीचा जोर कमी होणार आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
Konkan Railway News : कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने आज कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. आज सकाळी आठच्या सुमारास कोकण कन्या एक्स्प्रेस (Konkan Kanya Express) मुंबईहून गोव्याकडे जात असताना कोकिसरे रेल्वे फाटकापासून काही अंतरावर अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रेन बंद पडली होती. त्यानंतर राजापूर स्टेशनवरुन नवीन इंजिन उपलब्ध करण्यात आले असून इंजिन बदलण्यात आले होते.
आताच्या माहितीनुसार कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुक पूर्वपदावर आली आहे. काही गाड्या वगळता सर्व गाड्या काही मिनिटांच्या फरकाने धावत आहेत.
सिंधुदुर्ग:ह्या महिन्यात होणार्या ग्रामपंचायत निवडणूकीच्या दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, जातीय सलोखा, कायदा व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी, त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व 37 (3) नुसार संपूर्ण जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. दिनांक 6 डिसेंबर रोजी 00.01 वाजल्यापासून ते दिनांक 20 डिसेंबर 2022 रोजी 24.00 वाजेपर्यंत हा आदेश राहील.
सध्याची राजकीय परिस्थिती, राजकिय पक्षांच्या एकमेकांच्या विरोधात केलेल्या टीका- टिप्पणीमूळे जिल्ह्यात दाखल झालेले गुन्हे यामुळे जिल्हय़ात तणाव निर्माण झाला आहे. येणार्या निवडणुकीत पुन्हा वाद निर्माण होऊन आंदोलनात्मक घटना घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात वैयक्तिक मागणीकरिता उपोषणे, मोर्चा, निदर्शने, रास्ता रोको वैगरे सारखे आंदोलनात्मक कार्यक्रमांचे वेळोवेळी नियोजन करण्यात येत असते. त्यामुळे या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संपूर्ण भूभागात खालील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे.
Follow us on
शासनाचा आदेश
कलम 37 (1)
शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.
दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे.
व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)
सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.
सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.
कलम 37(3)
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे.
हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .
वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.
KONKAN RAILWAY NEWS : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. ह्या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा मार्च-२०२३ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. हि गाडी ह्या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी ३०/१२/२०२२ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०३ मार्च २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी ०२/०१/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०४ एप्रिल २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
सिंधुदुर्ग :कोकणातील प्रत्येक गाव हा शासकीय कर्मचाऱ्यांचा गाव व्हावा आणि कोकणात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू व्हावं जेणेकरून कोकणातील विद्यार्थ्यांना यशाचे द्वार खुले व्हावे असं प्रतिपादन “तिमिरातुनी तेजाकडे” संस्थेचे संस्थापक, सिंधुदुर्ग चे सुपुत्र व प्रसिद्ध, उच्च शिक्षित स्पर्धा परीक्षा व्याख्याते, मा. श्री सत्यवान रेडकर (कनिष्ठ अनुवाद अधिकारी, मुंबई सीमाशुल्क, भारत सरकार ) यांनी केले. कळसुली शिक्षण संघ मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स प्रशालेच्या सभागृहामध्ये आयोजित केलेल्या निशुल्क स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन व्याख्यान ३ डिसेंबर २०२२ रोजी ते बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. सूर्यकांत रा. दळवी, कार्याध्यक्ष, कळसुली शिक्षण संघ, मुंबई, श्री जय दळवी, खजिनदार, कळसुली शिक्षण संघ मुंबई, श्री. के. आर. दळवी चेअरमन स्कूल कमिटी, श्री. नामदेव घाडीगावकर, उपाध्यक्ष, स्कूल कमिटी, श्री. रजनीकांत सावंत, स्कूल कमिटी सदस्य, श्री दयानंद सावंत, पोलिस निरीक्षक, भोईवाडा पोलिस स्टेशन मुंबई, श्री संदीप सावंत – बाल शिवाजी विद्यालय कणकवली पदाधिकारी, याशिवाय शिक्षक-पालक संघ उपाध्यक्ष श्री. शिवाजी गुरव, माजी वरिष्ठ लिपिक श्री. चंद्रसेन गोसावी, रणजीत सुतार, हेमंतकुमार परब, नारायण दळवी, सौ. श्वेता दळवी, सौ. सुकन्या कदम, सौ नीता गुरव आदी ग्रामस्थ, पालक, आजी – माजी विद्यार्थी, बहुसंख्येने उपस्थित होते.
Follow us on
या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष श्री सूर्यकांत दळवी सर यांनी श्री. सत्यवान रेडकर व श्री. दयानंद सावंत यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. तसेच इतर मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. प्रमुख मार्गदर्शक व व्याख्याते, श्री सत्यवान रेडकर यांचं हे १३४ वे निशुल्क व्याख्यान होतं. ONE MAN SHOW पद्धतीने विविध ज्वलंत उदाहरणे देत विनोदी खुमासदार, वक्तृत्व शैलीने त्यांनी मुलांना दोन तास खिळवून ठेवले. स्पर्धा परीक्षेचे विविध पैलू, सहभागी विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान मिळवण्याच्या विविध पद्धती त्याचप्रमाणे या क्षेत्रात असलेल्या विविध नोकरी व्यवसायाच्या संधी याबाबत विस्तृत माहिती दिली. १५० पेक्षा जास्त विद्यार्थांनी त्यांना विद्यार्थ्यांची मन की बात या सदराखाली पत्र लिहिली. ते सोशल मीडियावर याबाबतीत सक्रिय आहेत त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. त्याचप्रमाणे श्री के आर दळवी स्कूल कमिटी चेअरमन यांनीही विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी कानमंत्र दिले.
अध्यक्षीय भाषणात श्री. सूर्यकांत दळवी यांनी स्पर्धा परीक्षेचे महत्त्व त्यासाठी लागणारे परिश्रम आणि चिकाटीने केलेले प्रयत्न याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. व्ही. व्ही. वगरे यांनी या कार्यक्रमास शुभेछा दिल्या.
कळसूली दशक्रोतील विविध गावामध्ये बॅनर, व प्रसिद्धीपत्रकाद्वारे या कार्यक्रमाची जाहिरात करण्यात आली. या कार्यक्रमास ग्रामस्थ, पालक, आजी – माजी विद्यार्थी, यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबाबत सर्व स्तरातून संस्था पदाधिकार्यांचे विशेष कौतुक केले जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री सी.जी चव्हाण यांनी मानले.