


Vision Abroad



Vision Abroad
Ratnagiri News :कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम आता मार्गी लागणार आहे. गेली पाच वर्षे राखलेल्या ह्या कामाच्या भूसंपादनासह सर्व अडथळे दूर झाले आहेत. डिसेंबरमध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
ह्या कामासाठी ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. ह्या कामासाठी 2 हजार 114 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. एकूण 134 कि.मी. रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. त्याकरिता 667.13 हेक्टर जमीन आवश्यक आहे. यापैकी बहुतांश जमीन संपादित करण्यात आली आहे. हा महामार्ग पूर्वी शहरातून जात होता. आता केर्ली बायपास काढण्यात आला आहे. केर्ली-शिये-चोकाकमार्गे रत्नागिरी-नागपूर या महामार्गास जोडला जाणार आहे.
हेही वाचा : ‘जनआक्रोश आंदोलन मुंबई-गोवा महामार्ग नियोजन समिती’ची येत्या रविवारी सभा.
या गावांतून जाणार महामार्ग…
शाहूवाडी तालुक्यातील आंबा, तळेवडे, केर्ले, चांदोली, चनवाड, वारूळ, वालूर, निळे, करुंगळे, येलूर, जाधववाडी, कडवे, पेरिड, भैरेवाडी, कोपार्डे, ससेगाव, करंजोशी, सावे, गोगवे, बांबवडे, वाडीचरण, चरण, डोणोली, खुटाळवाडी; पन्हाळा तालुक्यातील आवळी, देवाळे, नावली, बोरपाडळे, नेबापूर, अंबवडे, पिंपळे-सुर्वे, दानेवाडी, कुशिरे; करवीर तालुक्यातील केर्ले, पडवळवाडी, केर्ली, भुयेवाडी, भुये, जठारवाडी, शिये; तर हातकणंगले तालुक्यातील टोप, नागाव, वडगाव, हेर्ले, माले आणि चोकाक.
हेही वाचा : कोकण रेल्वेचा दिलासा….कोकणातील उद्योजकांसाठी नवीन सुविधा….
खालील गाड्या ह्या अतिरिक्त डब्यांसहित धावणार आहेत.
अ. क्र. ट्रेनचे नाव
अतिरिक्त डबे दिनांक कोकणातील थांबे
3 19260 Bhavnagar - Kochuveli Express One Sleeper Coach On 29/11/2022 Vasai Road,
Panvel Jn, Roha, Chiplun,
Ratnagiri, Sindhudurg, Thivim
4 19259 Kochuveli - Bhavnagar Express One Sleeper Coach On 01/12/2022 Vasai Road,
Panvel Jn, Roha, Chiplun,
Ratnagiri, Sindhudurg, Thivim
7 22908 Hapa - Madgaon Jn. Express One Sleeper Coach From 30/11/2022 to 28/12/2022 Vasai Road
Panvel Jn, Khed, ,
Ratnagiri, Kudal, Thivim
1 20924 Gandhidham - Tirunelveli Express One Sleeper Coach From 28/11/2022 to 26/12/2022 Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
6 19577 Tirunelveli - Jamnagar Express One Sleeper Coach From 05/12/2022 to 27/12/2022 Boisar, Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
8 22907 Madgaon Jn. - Hapa Express One Sleeper Coach From 02/12/2022 to 30/12/2022 Vasai Road
Panvel Jn, Khed, ,
Ratnagiri, Kudal, Thivim
5 19578 Jamnagar - Tirunelveli Express One Sleeper Coach From 02/12/2022 to 24/12/2022 Boisar, Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
2 20923 Tirunelveli - Gandhidham Express One Sleeper Coach From 01/12/2022 to 29/12/2022 Vasai Road,
Panvel Jn,
Ratnagiri
अधिक माहितीसाठी ww.enquiry.indianrail.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्यात यावी. प्रवाशांनी ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनामार्फत केले गेले आहे.
हेही वाचा : पेण येथे रेल रोको आंदोलन…”ह्या” आहेत मागण्या…
मुंबई :देशाच्या स्वराज्याच्या आणि स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये कोकण प्रदेशाचे मोठे योगदान आहे. संपूर्ण भारत देशाचे दैवत स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची राजधानी कोकणात म्हणजे रायगड किल्ल्यावर केली. , सरखेल कानोजी आंग्रे ,नरवीर तानाजी मालुसरे, सरसेनापती नेताजी पालकर, महान सेनानी बाजीराव पेशवे, लोकमान्य टिळक , महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके , मातृशक्तीचे देशातील सर्वात मोठे प्रतीक झाशीची राणी लक्ष्मीबाई भारतरत्न विनोबा भावे ,भारतरत्न महर्षी कर्वे अशी अनेक नररत्न या देशाला कोकण प्रदेशाने दिली. या महान व्यक्तिमत्त्वांना राष्ट्रपुरुषांना मानवंदनादेण्यासाठी भव्य स्वराज्य भूमी कोकण महोत्सव आणि अभियान कोकण बिझनेस फोरम व मी मुंबई तर्फे आयोजित करण्यात येत आहे.
हेही वाचा : पर्यटन संचालनालयामार्फत महाड येथील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नि:शुल्क सहलीचे आयोजन
राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणिउपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे विशेष सहकार्य या अभियानाला मिळणार आहे. कोकणचे सुपुत्र मुंबई प्रदेश भाजपा अध्यक्ष आमदार आशिषजी शेलार हे या अभियानाचे अध्यक्ष आहेत, विधान परिषदेतील मा. प्रवीण दरेकर याचे संयोजक आहेत.यावेळी भव्य उद्योग प्रदर्शन , सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे
कोकणातील इतिहास संस्कृती परंपरा लोककला उद्योग यांचा भव्य महोत्सव स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आला आहे. देशाचे उद्योग मंत्री नारायणराव राणे आणि त्यांचे एमएसएमई मंत्रालय या उपक्रमाला विशेष सहकार्य करत आहेत. राज्याच्या उद्योग मंत्री उदय जी सामंत या महोत्सवात सहभागी झाले आहेत. आत्मनिर्भर कोकण अंतर्गत कोकणातील तरुणांना कोकणात उद्योग उभारण्यासाठी विशेष मार्गदर्शन आणि समन्वय याच कार्यक्रमात करण्यात येणार आहे. यासाठी भव्य परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता आमदार प्रसादजी लाड यांनी पुढाकार घेतला आहे. कोकण विकास आघाडीचे अध्यक्ष सुहास आडेवरेकर यांची संपूर्ण टीम या उपक्रमात सहभागी झाली आहे.
स्वराज्य भूमी कोकण महोत्सव कार्यक्रमाची रूपरेषा
कालावधी :६ ते ९ डिसेंबर
स्थळ : नेस्को कॉम्प्लेक्स ,वेस्टन एक्सप्रेस हायवे गोरेगाव
कार्यक्रमपत्रिका
६ डिसेंबर
सकाळी ८-३०. भव्य उद्घाटन
प्रमुख उपस्थिती आणि उद्घाटक
माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, माननीय केंद्रीयमंत्री नारायणराव राणे साहेब, महोत्सव प्रमुख, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय पर्यटन मंत्री मंगल प्रभातजी लोढा साहेब
संध्याकाळी ४ ते ६
स्वराज्यभूमी मंथन परिषद
प्रमुख अतिथी रघुजीराजे आंग्रे , सरखेल कान्होजी आंग्रे यांची वंशज. व अन्य प्रमुख व्यक्तिमत्वांचे वंशज
संध्याकाळी ६ ते ९
आंबा काजू उद्योग परिषद
प्रमुख अतिथी. माननीय गिरीशजी महाजन, ग्राम विकास मंत्री, महाराष्ट्र
सचिव, / व्यवस्थापकीय संचालक. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ
दिनांक ७ डिसेंबर
सकाळी ११ ते दुपारी ४
कोकण मत्स्य उद्योग परिषद आणि निसर्ग संवर्धन परिषद
प्रमुख उपस्थिती वन आणि मत्स्य उद्योग मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार साहेब , सचिव- मत्स्य उद्योग विभाग / सचिव -वनविभाग
संध्याकाळी चार ते आठ
स्वराज्यभूमी सागरी परिषद
प्रमुख अतिथी. माननीय दादाजी भुसे बंदर विकास मंत्री महाराष्ट्र शासन
सचिव बंदर विकास, सी ई ओ महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड
गुरुवार दिनांक 8 डिसेंबर
सकाळी दहा ते दुपारी चार
स्वराज्य भूमी कोकण पायाभूत सुविधा व उद्योग विकास परिषद
प्रमुख उपस्थिती.
सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रवींद्र जी चव्हाण साहेब.
एम एम आर डी ए , सिडको , एमएसआरडीसी ,कोकण रेल्वे विविध विभागाचे प्रमुख.
एम एस एम इ , खादी ग्रामोद्योग, नाबार्ड, अण्णासाहेब पाटील महामंडळ उद्योग संचालनालय विविध उद्योग विकासाच्या योजना आणि त्या विभागाचे प्रमुख.
संध्याकाळी चार ते आठ
स्वराज्यभुमी सीएसआर परिषद
कोकणातील मोठे उद्योग समूह आणि कोकणातील मोठ्या सामाजिक ग्रामीण विकास शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांचे स्नेहसंमेलन.
प्रमुख उपस्थिती
राज्याचे उद्योग मंत्री मा. उदयजी सामंत साहेब
शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर
स्वराज्यभूमी पर्यटन उद्योग विकास परिषद
प्रमुख उपस्थिती मा. मंगल प्रभात लोढा साहेब, पर्यटन मंत्री, सचिव पर्यटन विभागसं, चालक पर्यटन संचनालय
संध्याकाळी सहा वाजता भव्य समारोप
प्रमुख उपस्थिती महोत्सव प्रमुख आणि केंद्रीय सूक्ष्म आणि लघु उद्योग मंत्री मा नारायणराव राणे साहेब
निमंत्रक /शब्दांकन : माननीय संजय यादवराव, संयोजक आणि समन्वयक
सहभागी होण्यासाठी गुगल फॉर्म
https://docs.google.com/forms/d/17d47nRRv-3egyy80ZhYMH1dtl-_eFuvzwKxfqWa36rM/edit
Vision Abroad
Block "Google News" not found
Konkan Railway News :कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या दिवाणखवटी ते विन्हेरे स्टेशनदरम्यान ओव्हर हेड एक्युपमेंट वायर तुटली आहे.यामुळे मध्यरात्रीपासून कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. सर्व गाड्या इलेक्ट्रिक इंजिनवर धावत असल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला आहे.अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या.
Read Also : मुंबई सीएसएमटी मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस नेहमीच उशिरा – प्रवाशांचे हाल
मडगाव-मुंबई कोकणकन्या एक्स्प्रेस वीर स्टेशनवर रखडली होती. अनेक गाड्या विविध स्थानकांमध्ये खोळंबल्या होत्या. पण अखेर पाच तासांनी बिघाड दुरुस्त करण्यास रेल्वे प्रशासनाला यश आलं. त्यानंतर कोकणकन्या एक्सप्रेस मार्गस्थ झाली. कोकण रेल्वे प्रशासनाकडून इलेक्ट्रिकऐवजी डिझेल इंजिनची उपलब्धता करून हळूहळू एक्सप्रेस मार्गस्थ करण्यात येत आहेत. तरीही अद्यापही कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक उशिरानंच सुरु आहे. कोकण रेल्वे मार्गावरील अनेक गाड्या तीन ते चार तास उशिरानं धावत आहेत. कोकण कन्या, तुतारी, मंगलोर एक्स्प्रेस, मडगांव एक्स्प्रेस अशा अनेक गाड्या उशिरानं धावत आहेत. यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहेत मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.
Read Also :कोकण रेल्वेचा दिलासा….कोकणातील उद्योजकांसाठी नवीन सुविधा….
Read Also : पेण येथे रेल रोको आंदोलन…”ह्या” आहेत मागण्या…
सावंतवाडी : गव्याच्या हल्ल्यात सावंतवाडी तालुक्यात एका शेतकर्याचा मृत्यू झाला आहे. चौकुळ केगदवाडी येथील ७० वर्षीय शेतकरी सोनू साबा परब असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे., बुधवारी (दि.२३) रात्री उशिरा ही दुर्देवी घटना घडली.सोनू परब हे काही कामानिमित्त बुधवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास जंगलाच्या दिशेने गेले होते. परंतु रात्री उशिरापर्यंत ते घरी परतलेच नाहीत. यानंतर कुटुंबियांनी शोधाशोध सुरू केली. दरम्यान परब यांचा मृतदेह रक्ताळलेल्या अवस्थेत खालचा भाटला तळीकडे आढळून आला. याबाबत पोलीस व वनकर्मचाऱ्यांना माहिती देण्यात आली.
वनकर्मचाऱ्यांनी पाहणी केल्यानंतर परब यांचा मृत्यू गव्याच्या हल्ल्यात झाल्याचे निर्दशनास आले. यानंतर वनविभागाचे आंबोली वनक्षेत्रपाल विद्या घोडके-कांबळे व कर्मचाऱ्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी पाठवला. परब यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गवा रेड्यांचे प्रमाण खूप प्रमाणात वाढले आहे. रात्री जंगल दाटी प्रदेशातून प्रवास करणे खूप धोक्याचे बनले आहे त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
मुंबई :आज दिनांक-20.11.2022 रोजी दादर मुंबई येथे जनआक्रोश सभा कोकणकरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
सभा आयोजकांनी सदर सभेला 25 सामाजिक प्रतिष्ठान, संस्था, संघटना यांनी पाठींबा दिला आहे असे अशी माहिती दिली आहे. याच 25 संघटनेचे सभासद अंदाजित 01 लाखाच्या वर असून नक्कीच याचा फायदा जनआक्रोश आंदोलनाला होईल.तसेच 180 कोकणकर या सभेला उपस्थित राहिले.या सभेला कोकणकरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर सभेत जे काही शेवटी निर्णय घेण्यात आले त्यांची माहिती खालील प्रमाणे-
1. मुंबई गोवा महामार्ग ध्येयपूर्ती समिती अस नाव विचारात आणले आहे.
2. विविध 12 प्रकारच्या कमिटी असून ज्या सदस्यांना कोणत्याही कमिटीवर काम करावयाचा इच्छा असेल तर उद्या पाठविण्यात येणारा फॉर्म व्यवस्थितरित्या भरून सादर करावा यामधून नियुक्ती लवकरात लवकर करण्यात येईल.
3.ऑनलाईन पोर्टलद्वारे विविध माध्यमातून पत्र पाठविण्यात येतील.
4. गडकरी साहेब,मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री,आमदार,खासदार यांना पत्रव्यवहार करून अधिवेशन मध्ये मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गस्थ लावणे.
5.अपघातात मृत्यू झालेल्या नागरिकांना सरकारकडून मदत जाहीर करणे व यापुढे खराब महामार्गमुळे एखादा अपघात झाला तर प्रशासकीय अधिकारी, आमदार, खासदार व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करणे.
6.जर हे महामार्ग 2023 मध्ये पूर्ण झाले नाही तर लोकप्रतिनिधी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशा आशयचे पत्र देऊन त्यांच्याकडून पोचपावती घेणे.
7. यापुढे कोकणातील कोणतेही लोकप्रतिनिधी ट्रेन, विमानने कोकणात जाण्यासाठी वापर करीत असतील तर त्यांना अडवून महामार्गानेच प्रवास करावे अन्यथा जनआक्रोशच्या वतीने निषेध म्हणून आक्रमक भूमिका घेण्यात येईल.
8. जो पर्यंत पनवेल ते झारप 471 किलोमीटरचा रस्ता वापरण्यायोग्य व 100% काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारू नये.
9. बनविण्यात येणारा रस्त्या हा 10 वर्षात एकही खड्डा पडणार नाही अशी लेखी हमी देऊन नियमावली बनविण्यात यावी जेणेकरून बनणारा रस्त्या उत्तम दर्जाचा असेल.
10.जनजागृतीकरीता ठिकठिकाणी सभा आयोजित करून याबाबत जनआक्रोश कशासाठी आहे यासाठी माहिती देणे.
11. या वरील विषयात सरकार कडून दिरंगाई दिसत असेल किंवा 01 मे 2023 पर्यंत काम पूर्ण होईल अशा पद्धतीचे स्वरूप दिसत नसेल तर आझाद मैदान ते मंत्रालय असा जनआक्रोश आंदोलन उभारून मंत्रालयाला घेराव घालणे.
12.जो पर्यंत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होत नाही तोपर्यंत सर्व कोकणकरांच्या वतीने निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल यासाठी गावागावात जाऊन जनजागृती करण्यात येईल.
यांसारख्या अनेक विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.
सदर सभेतील चर्चा खालील लिंक वर बघू शकता.
Content Protected! Please Share it instead.