हंगामाच्या काळात प्रवाशांच्या मजबुरीचा फायदा घेऊन अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकारणाऱ्या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांना राज्य परिवहन विभागाने इशारा दिला आहे. नेहमीच्या भाड्यापेक्षा दीडपट किंवा दुप्पट प्रवास भाडे आकारत आहे अशी तक्रार आल्यास त्या व्यावसायिकावर कठोर कारवाई केली जाईल असे जाहीर करण्यात आले आहे.
गणेशोत्सवासाठी कोकणात गावी खूप मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जातो. रेल्वे आणि ST बससेवा आपल्या विशेष फेर्या ह्या काळात सोडतात. पण त्या अपुऱ्या पडतात त्यामुळे चाकरमानी खाजगी ट्रॅव्हल्स चा पर्याय निवडतात. ह्या मजबुरीचा फायदा खाजगी ट्रॅव्हल्स व्यावसायिक घेतात आणि दुप्पट भाडे आकारतात असे निदर्शनास आले आहे. ह्या काळात 700/800 असणारे प्रवासभाडे 1500/2000 च्या घरात जाते आणि ह्याचा फटका चाकरमान्यांचा खिशाला बसतो.
असे प्रकार आढळल्यास प्रवाशांनी प्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.
कोकणात गावी जाणार्या गणेशभक्तांसाठी खुशखबर. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाने काही गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
खालील गाड्या ह्या अतिरिक्त डब्यांसोबत चालविण्यात येतील. ह्या गाड्या आधी 12 डब्यांसोबत चालविण्यात येणार आहे असे जाहीर करण्यात आले होते. आता त्यात अतिरिक्त 5 डबे वाढवून त्या आता 17 डब्यांसोबत चालविण्यात येणार आहेत. AC Two Tier 2 डबे + AC Three Tier 2 डबे + AC Chair Car 1 डबा असे एकूण 5 अतिरिक्त डबे जोडण्यात येतील. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना ह्या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
1) Lokmanya Tilak T – Madgaon Weekly Express. 11099
ही गाडी 27.08.2022 आणि 10.09.2022 ह्या दिवशी (शनिवार) लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन ह्या दरम्यान चालवण्यात येणारी गाडी.
2) Madgaon – Lokmanya Tilak T Weekly Express. 11100
ही गाडी 28.08.2022 आणि 11.09.2022 ह्या दिवशी (रविवार) मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस ह्या दरम्यान चालवण्यात येणारी गाडी.
1) Lokmanya Tilak T – Madgaon Bi-Weekly Express. 11085
ही गाडी 29.08.2022 आणि 07.09.2022 ह्या दिवशी (सोमवार, बुधवार) लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव जंक्शन ह्या दरम्यान चालवण्यात येणारी गाडी.
2) Madgaon – Lokmanya Tilak T Weekly Express. 11086
ही गाडी 30.08.2022 आणि 08.09.2022 ह्या दिवशी (मंगळवार, गुरुवार) मडगाव जंक्शन ते लोकमान्य टिळक टर्मिनस ह्या दरम्यान चालवण्यात येणारी गाडी.
अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव आला आहे, त्यात कोकणात उत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना कोकण रेल्वेने खुशखबर दिली आहे. यंदा भाविकांची गावी जाण्यासाठी गर्दी पाहता ह्या अगोदर सोडलेल्या विशेष गाड्यांशिवाय अजून काही गाड्या सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ह्या अतिरिक्त गाड्यांचे आरक्षण दिनांक २५/०८/२०२२ रोजी सर्व आरक्षण खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टल वर उपलब्ध होईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
हि गाडी दिनांक ०२/०९/२०२२ आणि ०९/०९/२०२२ ह्या दिवशी (शुक्रवारी) मडगाव येथून दुपारी ३ वाजता सुटेल ती पनवेल स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०५:१० ला पोहचेल.
MADGAON JN – PANVEL-01595
हि गाडी दिनांक ०४/०९/२०२२ आणि ११/०९/२०२२ ह्या दिवशी (रविवारी) पनवेल येथून दुपारी १६.४५ वाजता सुटेल ती मडगाव स्टेशनला दुसऱ्यादिवशी सकाळी ०६:०० ला पोहचेल.
ह्या गाड्या रोहा, माणगाव, वीर, सापे वामने ,खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रॊड, थिवीम, करमाळी ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
डब्यांची स्थिती = 18 Second Seating (SL) + 01 Generator Car + 01 SLR = Total -20 Coaches _________________________________________________________________________________________________________________
हि गाडी दिनांक ०३/०९/२०२२ आणि १०/०९/२०२२ ह्या दिवशी (शनिवारी) पनवेल येथून सकाळी ५.४० वाजता सुटेल ती रत्नागिरी स्टेशनला त्याच दिवशी सकाळी ११:४५ ला पोहचेल.
RATNAGIRI – PANVEL -01592
हि गाडी दिनांक ०३/०९/२०२२ आणि १०/०९/२०२२ ह्या दिवशी (शनिवारी) रत्नागिरी येथून दुपारी ०३:०५ वाजता सुटेल ती पनवेल स्टेशन ला त्याच दिवशी रात्री १०:३५ ला पोहचेल.
ह्या गाड्या रोहा, माणगाव, वीर, सापे वामने ,खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
डब्यांची स्थिती = 18 Second Seating (SL) + 01 Generator Car + 01 SLR = Total -20 Coaches
हि गाडी दिनांक ०४/०९/२०२२ आणि ११/०९/२०२२ ह्या दिवशी (रविवारी ) पनवेल येथून रात्री ०१:३० वाजता सुटेल ती रत्नागिरी स्टेशनला त्याच दिवशी सकाळी ०७:३० ला पोहचेल.
RATNAGIRI – PANVEL -01594
हि गाडी दिनांक ०४/०९/२०२२ आणि ११/०९/२०२ ह्या दिवशी (रविवारी) रत्नागिरी येथून सकाळी ०८:२० वाजता सुटेल ती पनवेल स्टेशनला त्याच दिवशी दुपारी 03:२० ला पोहचेल.
ह्या गाड्या रोहा, माणगाव, वीर, सापे वामने ,खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, ह्या सर्व स्थानकांवर थांबतील.
डब्यांची स्थिती = 18 Second Seating (SL) + 01 Generator Car + 01 SLR = Total -20 Coaches
1) UDHANA- MADGAON – UDHANA BI-WEEKLY SPECIAL ON SPECIAL FARE
UDHANA – MADGAON JN – 09020
हि गाडी दिनांक २७/०८/२०२२आणि २९/०८/२०२२ ह्या दिवशी (शनिवार आणि सोमवार) उधना येथून दुपारी ३.२५ वाजता सुटेल ती मडगाव स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०९:३० ला पोहचेल.
MADGAON JN – UDHANA – 09019
हि गाडी दिनांक २८/०८/२०२२आणि ३०/०८/२०२२ ह्या दिवशी (रविवार आणि मंगळवार) मडगाव येथून सकाळी १०:२० वाजता सुटेल ती उधना स्टेशन ला दुसऱ्यादिवशी सकाळी ०५:०० ला पोहचेल.
मुंबई गोवा महामार्गाबाबत सह्याद्री अतिथीगृहात कोकणातील लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत आज बांधकाममंत्री रविन्द्र चव्हाण यांनी आज एक बैठक आयोजित केली होती.
गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचा रस्तेमार्ग प्रवास अधिक सुखकर होण्यासाठी कोकणातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे २५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावीत. पूर्ण ताकदीने आणि युद्धपातळीवर काम करा, अशा सूचना बांधकाममंत्री रविन्द्र चव्हाण यांनी या बैठकीत दिल्या.
प्रत्येक जिल्ह्यात रस्ते दुरुस्तीचे काम करणाऱ्या एजन्सीज वाढवून येत्या आठवड्यात प्रामुख्याने खड्डे भरण्याचे काम पूर्ण करणार तसेच याबाबत कोकणातल्या लोकप्रतिनिधींना घेऊनच ते स्वतः सदर कामाच्या प्रगतीचा आढावा प्रत्यक्ष स्थळावर जाऊनच घेणार असे ते बोलले.
याच बरोबर संपूर्ण महामार्गावर वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी जास्तीत जास्त ट्रॅफिक वॉर्डन तैनात करून वाहतुक व्यवस्थापन सुरळीत ठेवण्याचे आदेशही या बैठकी दरम्यान वाहतूक विभागाला दिले आहेत असे त्यांनी पुढे सांगितले.
या बैठकीत शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, खासदार सुनील तटकरे, खासदार विनायक राऊत, आमदार प्रवीण दरेकर, भरत गोगवले, नितेश राणे, वैभव नाईक,आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) एस. एस. साळुंखे, सचिव (बांधकाम) पी. डी. नवघरे, मुख्य अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) संतोष शेलार, कोकण विभागाचे मुख्य अभियंता एस. एन. राजभोग, रायगडच्या वरिष्ठ अभियंता श्रीमती सुषमा गायकवाड, रत्नागिरीच्या वरिष्ठ अभियंता श्रीमती नाईक, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता (राष्ट्रीय महामार्ग) श्री. जाधव आदी उपस्थित होते.
कालच माध्यमांवर सर्वत्र मुंबई गोवा महामार्गाच्या काही भागाचा खड्ड्यांमुळे झालेल्या अवस्थेचा विडिओ व्हायरल झाला होता. पुढच्याच आठवडय़ात गणेशोत्सवासाठी ह्या मार्गावर खूप मोठ्या प्रमाणात रहदारी होणार आहे. ह्या सर्व पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आल्याचे समजते.
रत्नागिरी : कालची बातमी मीडियाकडून चुकीच्या पद्धतीने दाखवली गेली आहे. जनतेला घटनास्थळी नेमके काय घडले होते हे सांगण्यासाठी मी हा विडिओ पोस्ट करत आहे असे आज माजी खासदार निलेश राणे हे म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या बोलण्याच्या पूर्ण विडिओ आज ट्विटर वर पोस्ट केला आहे.
आंदोलनकर्त्यांचा आरोप होता कि माझ्यासोबत असलेल्या कार्यकर्त्याने शिवी घातली, कदाचित अनावधानाने असा प्रकार घडला असेल त्यामुळे मी माफी मागितली. मी माघार घेतली कारण ती सर्व आपलीच माणसे होती आणि काही अनुचित प्रकार घडू नये आणि प्रकरण हाताबाहेर जाऊ नये आम्ही थोडे नमते घेतले, कारण काही विपरीत घडले असते तर माझ्या त्या आई बहिणींवर केसेस पडल्या असत्या आणि मला ते नको होते, म्हणून मी हात जोडलेत. एवढेच नाही तर मी त्यांना तुम्ही मला बोलवाल तिथे मी चर्चेसाठी यायला तयार आहे. त्यांचे ते आंदोलन यशश्वी झाले असून पूर्ण देशभर पोहोचले आहे त्यामुळे आता त्यांनी हे आंदोलन थांबवावे ह्यासाठी मी त्यांना विनंती केली होती. पण हि सर्व बातमी काहीश्या चुकीच्या पद्धतीने मीडिया वर दाखवली गेली होती त्यामुळे मला हा विडिओ पोस्ट करावा लागला आहे असे ते म्हणाले आहेत.
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे, गणेश चतुर्थीसाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या उत्साह वाढत चालला आहे. मागील २ वर्षाप्रमाणे काही निर्बंध नसल्याने मोठ्या संख्येने चाकरमानी गावी जाणार आहेत. कोकण रेल्वेच्या नियमित आणि विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले आहे. दुसरा पर्याय आहे तो म्हणजे मुंबई-गोवा महामार्ग. पण ह्या महामार्गाची आताची अवस्था पाहता ह्या मार्गे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल होणार आहेत.
ह्या मार्गावर अनेक ठिकाणी खड्ड्यांची रांगोळी तयार झाली आहे. हि सर्व परिस्थती खूपच चीड निर्माण करणारी आहे. गणेशोत्सव काळात ह्या रस्त्यावर किती रहदारी असते ह्याची कल्पना असून सुद्धा ह्यावर उपाय होत नाही आहे. दरवर्षीचे हे रडगाणे झाले आहे. मुंबई – गोवा महामार्ग तयार होण्याचा कमला पण कमालीची दिरंगाई होताना दिसत आहे.
याचपार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी मुंबई-गोवा महामार्गाचा विषय विधानसभेमध्ये मांडला. कोकणातील सर्वच आमदारांनी या विषयावरुन सरकारला प्रश्न विचारमाऱ्या जाधव यांची पाठराखण केली. अखेर मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या महामार्गाचं काम २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन सभागृहामध्ये दिलं.
सध्या या रस्त्यावर पडलेले खड्डे लवकरात लवकर बुजवून तात्पुरत्या स्वरूपात हा महामार्ग वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी होत आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने कोकण मार्गावर नियमित फेऱ्यांशिवाय काही विशेष गाड्या ह्या आधीच सोल्डल्या आहेत. त्या गाड्यांचे आरक्षण जवळपास फुल झाले आहे. प्रवासाचा वाढत प्रतिसाद पाहता कोकण रेल्वेने ह्या कालावधी साठी आजून काही गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे
LTT MAJN AC SPL (01173)
दिनांक २४.०८.२०२२, ३१.०८.२०२२ आणि ०७.०९.२०२२ रोजी बुधवारी हि गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते मंगळुरु दरम्यान चालवली जाईल. ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
S.N.
Station Name
Departure Time
Day
1
LOKMANYATILAK T
20:50
1
2
THANE
21:15
1
3
PANVEL
22:00
1
4
ROHA
23:20
1
5
MANGAON
23:52
1
6
KHED
00:56
2
7
CHIPLUN
01:34
2
8
SAVARDA
02:06
2
9
SANGMESHWAR
02:32
2
10
RATNAGIRI
03:15
2
11
ADAVALI
03:52
2
12
VILAVADE
04:12
2
13
RAJAPUR ROAD
04:50
2
14
VAIBHAVWADI RD
05:12
2
15
KANKAVALI
05:42
2
16
SINDHUDURG
06:12
2
17
KUDAL
06:24
2
18
SAWANTWADI ROAD
07:02
2
19
THIVIM
07:32
2
20
KARMALI
07:52
2
21
MADGAON
09:20
2
22
CANCONA
09:58
2
23
KARWAR
10:32
2
24
ANKOLA
11:02
2
25
GOKARNA ROAD
11:12
2
26
KUMTA
11:32
2
27
HONNAVAR
11:46
2
28
MURDESHWAR
12:12
2
29
BHATKAL
12:30
2
30
MOOKAMBIKA ROAD
12:50
2
31
KUNDAPURA
13:22
2
32
UDUPI
14:04
2
33
MULKI
15:02
2
34
SURATHKAL
15:22
2
35
MANGALURU JN
17:05
2
MAJN LTT AC SPL (01174)
दिनांक २५.०८.२०२२, ०१.०९.२०२२ आणि ०८.०९.२०२२ रोजी गुरुवारी हि गाडी मंगळुरु ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान चालवली जाईल. ह्या गाडीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे
S.N.
Station Name
Departure Time
Day
1
MANGALURU JN
20:15
1
2
SURATHKAL
21:11
1
3
MULKI
21:21
1
4
UDUPI
22:12
1
5
KUNDAPURA
22:52
1
6
MOOKAMBIKA ROAD
23:20
1
7
BHATKAL
23:38
1
8
MURDESHWAR
23:58
1
9
HONNAVAR
00:20
2
10
KUMTA
00:36
2
11
GOKARNA ROAD
00:58
2
12
ANKOLA
01:12
2
13
KARWAR
01:42
2
14
CANCONA
02:12
2
15
MADGAON
03:25
2
16
KARMALI
04:02
2
17
THIVIM
04:22
2
18
SAWANTWADI ROAD
05:02
2
19
KUDAL
05:22
2
20
SINDHUDURG
05:34
2
21
KANKAVALI
05:52
2
22
VAIBHAVWADI RD
06:52
2
23
RAJAPUR ROAD
07:22
2
24
VILAVADE
07:42
2
25
ADAVALI
08:02
2
26
RATNAGIRI
09:36
2
27
SANGMESHWAR
10:12
2
28
SAVARDA
10:52
2
29
CHIPLUN
11:32
2
30
KHED
11:52
2
31
MANGAON
13:32
2
32
ROHA
14:35
2
33
PANVEL
15:45
2
34
THANE
16:25
2
35
LOKMANYATILAK T
17:30
2
डब्यांची स्थिती – FIRST AC – 01 COACH + 2 TIER AC – 03 COACHES + 3 TIER AC – 15 COACHES + PANTRY CAR- 01 + GENERATOR CAR – 02
ह्या गाड्यांचे आरक्षण आणि अधिक माहितीसाठी https://enquiry.indianrail.gov.in ह्या संकेतस्थळास भेट द्या.
कुडाळ :मराठी माणसं व्यवसाय करत नाहीत, व्यवसायात करण्यात कमी पडतात. मागे पडतात आणि म्हणुन दुसर्या राज्यातील लोक ईथे येऊन उद्योगधंदे करतात हे कुठे तरी थांबले पाहीजे म्हणुन सगळेच बोलतात, लिहीतात आणि जोरदार टिका पण करतात पण ह्यात बदल घडवून आणायचा असेल तर फक्त बोलून लिहून नाही चालणार तर गरज आहे प्रत्यक्षात कृती करण्याची आणि आपल्या मातीतल्या उद्योजकांना साथ देण्याची.
आपल्या मालवणी, कोकणी, मराठी माणसांना व्यावसायिक बनवण्यासाठी, त्यांच्या व्यवसायाला प्रसिद्धी देण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी, मार्केट उपलब्ध करुन देण्यासाठी अभिनव उद्योग प्रबोधिनी सतत वेगवेगळे उपक्रम राबवत आहे.
गणेशोस्तवाच्या पार्श्वभूमीवर अभिनवच्या टीमने कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक व्यावसायिकांचा भव्य शॉपिंग फेस्टिव्हल आयोजित केला आहे.
कुडाळ येथील सिद्धिविनायक हॉल परिसरात हा शॉपिंग फेस्टिव्हल 26-27-28-29 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 8 पर्यंत असणार आहे.
ह्या परीसरातील प्रत्येकाने या प्रदर्शनाला अवश्य भेट द्यावी आणि आपल्या स्थानिक लोकांकडून खरेदी करावी, त्यांना प्रोत्साहन द्यावे
राजापूर:शिवसेनेचा कोकणातील आणखी एक आमदार शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांनी कालपासून जोर धरला होता. शिंदे गटात जाऊ शकणारा हा शिवसेनेचा आमदार दुसरा-तिसरा कोणी नसून राजन साळवी हे आहेत ह्या आशयाच्या बातम्या काल प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेला अजून एक धक्का बसतो की काय अशा चर्चा होऊ लागल्या होत्या. अधिवेशन सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस आणि राजन साळवी यांची भेट झाल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राजन साळवी आता शिंदे गटात प्रवेश करतील, या चर्चेने जोर धरला होता.
पण आज ट्विटर च्या माध्यमातून ह्या बातम्या खोट्या आहेत असे जाहीर केले आहे. ”आमची निष्ठा मातोश्री कायम चरणी….काल आज व उद्या फक्त आमची निष्ठा शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे फक्त… ”
”निष्ठेचे प्रमाणपत्र दि.15 ऑक्टोबर 2002 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे ह्यांनी दिले मला खोक्याची गरज नाही….” ह्या ट्विट सोबत त्यांनी स्व. बाळासाहेबांसोबतचा आपला फोटो पोस्ट केला आहे.
राजन साळवी हे कोकणातील लांजा-राजापूर-साखरपा ह्या मतदार संघातून सलग 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले शिवसेनेचे आमदार आहेत.
सिंधुदुर्गनगरी, दि. 14 (जि.मा.का.) : देशाची फाळणी ही दु:खद करणारी गोष्ट आहे. या फाळणीमुळे स्थलांतरण प्राण गमावलेल्या आणि विस्थापनामुळे अनंत वेदना सहन केलेल्या भारतवासियांचे स्मरण करु या आणि त्यांना श्रध्दांजली वाहू या अशा शब्दात जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी श्रध्दांजली वाहिली.
14 ऑगस्ट 2022 या फाळणी दु:खद स्मृती दिनानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात प्रदर्शन भरविण्यात आले. यानिमित्त झालेल्या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, प्रशांत पानवेकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर, पोलीस अधीक्षक श्री. दाभाडे यांनी या चित्रप्रदर्शनाची सुरुवातीला पाहणी केली. यानंतर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी म्हणाल्या, फाळणीवर आधारित अनेक चित्रपट आणि पुस्तकांची निर्मिती झालेली आहे. ही चित्रपट पाहिल्यानंतर आणि पुस्तक वाचल्यानंतर फाळणीमध्ये भारतवासियांना त्यावेळचा क्लेष कसा होता, त्यांनी काय भोगलय हे आपल्याला समजून येते. फाळणीचा इतिहास सर्वांनी विशेषत: विद्यार्थ्यांनी समजून घ्यावा. यानिमित्ताने वेदना भोगलेल्या प्राण गमावलेल्या भारतवासियांचे स्मरण करु आणि श्रध्दांजली वाहू. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. नायर आणि पोलीस अधीक्षक श्री. दाभाडे यांनीही या वेळी श्रध्दांजली वाहिली. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी श्री. भडकवाड यांनी फाळणीबाबत माहिती दिली. फाळणीच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात दंगली झाल्या. लाखो लोकांचे स्थलांतरण झाले अनेक लोक मृत्यू पडले कित्येक जखमी झाले कित्येकांचे कुपोषणामुळे बळी गेले. रेल्वे रुळावर अनेकांचे बळी गेले. अनेकांच्या संपत्तीच्या अतोनात नुकसान झाले. विस्थापनामुळे अनंत वेदना सहन केलेल्या भारतवासियांना त्यांनी श्रध्दांजली वाहिली.