Category Archives: कोकण

मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेसची यशस्वी वाटचाल

   Follow us on        
Konkan Railway:मुंबई-गोवा मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आता पर्यंत सुरु करण्यात आलेल्या वंदे भारत एक्सप्रेसच्या यशश्वी मार्गात या मार्गाची  गणना होता आहे. या गाडीच्या प्रवाशांची संख्याही वेगाने वाढत आहे. आरामदायी आणि वेगवान प्रवासाच्या चाहत्या वर्गाकडून या गाडीला तुफान प्रतिसाद मिळत आहे.
मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांत एकूण ५० हजार ७३९ प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केला आहे. वेगवान, सुरक्षित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या ट्रेनला प्रवासी आणि पर्यटकांचा मोठा प्रतिसाद लाभत आहे.

मागील २ महिन्यांची प्रवासी संख्या

मार्ग जानेवारी  फेब्रुवारी एकूण
सीएसएमटी-मडगाव १३,१९६ ११,६१४ २४,८१०
मडगाव-सीएसएमटी १३,२४५ १२,६८४ २५,९२९
सेमी-हायस्पीड ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. पहिल्याच फेरीत या ट्रेनच्या ५३३ आसन क्षमतेपैकी ४७७आसने भरली होती; प्रारंभी ९१.४४ ते ९३.११ टक्के क्षमतेने धावणाऱ्या या ट्रेनला सध्या ९५ टक्के प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेनला सध्या आठ डबे असून प्रवाशांसाठी आरामदायी आसने, वेगवान सेवा आणि आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत रेल्वे मंत्रालयाने वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती केली असून ती किफायतशीर दरात उपलब्ध आहे. सध्या मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी-सोलापूर, सीएसएमटी-शिर्डी, सीएसएमटी-जालना आणि सीएसएमटी-मडगाव या वंदे भारत गाड्या धावत आहेत. या सर्व गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत असून सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.

Video: लहान मुलांच्या आरोग्याशी खेळ; फिरत्या विक्रेत्याच्या कुल्फीमध्ये आढळल्या अळ्या

   Follow us on        

सावंतवाडी: सावंतवाडीतील कलंबीस्त गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे आलेल्या एका फिरत्या विक्रेत्याच्या कुल्फीमध्ये किडे सापडले आहेत. हा प्रकार समजल्यानंतर येथील जागृत ग्रामस्थांनी त्या विक्रेत्याला धारेवर धरले आहे.

याबद्दल जाब विचारल्यानंतर विक्रेत्याने यात आपली काही चूक नसून या खाद्यपदार्थांची मी फक्त विक्री करत आहे असे सांगितले. त्याने जेथून हे खाद्यपदार्थ विकत घेतो त्या व्यावसायिकाचे नावही सांगितले.

या प्रकारामुळे या विक्रेत्यांकडून हे पदार्थ विकत घेणार्‍या लहान मुलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हे पदार्थ बनवताना योग्य ती स्वच्छता राखली जात नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशा व्यावसायिकांवर योग्य वेळी कारवाई केली गेली नाही तर पुढे या निष्काळजीपणामुळे जीव गमावण्यांची शक्यता नाकारता येत नाही. केंद्र सरकारने अन्नसुरक्षेसाठी FSSAI या संस्थेची नियुक्ती स्थापना केली आहे. या संस्थेने या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Loading

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार पाटणा – वास्को द गामा विशेष एक्सप्रेस

   Follow us on        
Konkan Railway: होळी उत्सव – २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी ट्रेन क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल या गाडी चालविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनातर्फे  घेण्यात आला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहेत.
१) गाडी क्रमांक ०७३११ / ०७३१२ वास्को द गामा – पटना – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल:
ट्रेन क्रमांक ०७३११ वास्को द गामा – पटना एक्सप्रेस स्पेशल मंगळवार, ११/०३/२०२५ रोजी दुपारी ४:०० वाजता वास्को द गामा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी १०:३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०७३१२ पाटणा – वास्को द गामा एक्सप्रेस स्पेशल शनिवार, १५/०३/२०२५ रोजी सायंकाळी ५:४० वाजता पाटणा येथून निघेल आणि तिसऱ्या दिवशी १०.३० वाजता वास्को द गामा येथे पोहोचेल.
ही गाडी मडगाव जंक्शन, थिविम, सावंतवाडी रोड, रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, कल्याण जंक्शन, नाशिक रोड, मनमाड जंक्शन, भुसावळ, खांडवा जंक्शन, इटारसी जंक्शन, जबलपूर, कटनी, सतना, प्रयागराज , पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आरा आणि दानापूर स्टेशन या स्थानकांवर थांबेल.
रचना : एकूण २० एलएचबी कोच = दोन टायर एसी – ०१  कोच, थ्री टायर एसी – ०५  कोच, स्लीपर – १२  कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

….अन्यथा महाराष्ट्रदिनी सावंतवाडी स्थानकावर पुन्हा ‘रेल रोको’…प्रवासी संघटनेचा इशारा

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानक हे तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक असून या ठिकाणी कोकणवासी आणि पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. येथील स्थानक टर्मिनस घोषित होऊन तब्बल दहा वर्षे उलटली परंतु हे काम देखील गेली अनेक वर्षे रखडले आहे. ह्या स्थानकातून कोरोना काळात एकूण सहा गाड्या काढून घेण्यात आल्या होत्या. या संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी या संघटनेने या बद्दल अनेक वेळा आवाज उठवला असून या ठिकाणी तब्बल तीन वेळा आंदोलन देखील केले होते, आताच २६ जानेवारी २०२६ रोजी केलेल्या रेल रोको आंदोलनाची दखल महाराष्ट्रातील जनतेने घेतली होती. तरी देखील कोकण रेल्वे प्रशासनाकडून याची योग्य दखल घेण्यात आली नाही असेच या वरून दिसते.
सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या ह्या रेल्वे बोर्डाच्या मानकापेक्षा अधिक असून देखील येथे थांबे न देण्यामागे कोकण रेल्वे प्रशासनाचे काय हित आहे हे मात्र अनुत्तरित आहे.या वर्षात आधी रोहा आणि आता कुमठा येथे नवीन थांबे मंजूर झाले परंतु सावंतवाडी स्थानकात काढून घेण्यात आलेले थांबे पुन्हा देण्यात रेल्वे प्रशासन एवढा आखडता हात का घेत आहे हा प्रश्न सामान्य कोकणकर जनतेला पडला आहे.
कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या १२२३१ /३२ त्रिवेंद्रम – निजामुद्दीन – त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस, १२२०/०२ एल टी टी – कोचुवेली – एल टी टी गरीब रथ एक्सप्रेस या गडांचा थांबा अजूनही पूर्ववत केला गेला आहे. त्याबरोचर मुंबई सीएसएमटी  – मंगलोर या गाडीला सावंतवाडी येथे थांबा देण्यात यावा या मागणीलाही वारंवार केराची टोपली दाखवली जात आहे. मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी येथे थांबा मिळणे अपेक्षित होते. मात्र तिथेही या स्थानकाला डावलले गेले आहे.  कोकण रेल्वे प्रशासन जर असेच करणार असेल तर पुन्हा महाराष्ट्र दिनी भव्य रेल रोको करू असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी  ने दिला आहे.

Konkan Railway: पुणे – कल्याण – सावंतवाडी विशेष गाडी चालविण्यात यावी

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि कोकण यांना जोडणारी थेट विशेष रेल्वे गाडी चालविण्यात यावी अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे. पुणे ते सावंतवाडी दरम्यान कल्याण मार्गे विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरील ताण कमी होऊन पुणे आणि कोकण दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढेल, असे कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेल द्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पुणे आणि कोकण दरम्यान थेट रेल्वे गाडी नसल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते, त्यामुळे प्रवासाचा अनुभव खूपच त्रासदायक होतो. या मार्गावर विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि कोकणच्या विकासाला चालना मिळेल, असे दरेकर यांनी म्हटले आहे.

यापूर्वी या मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या, ज्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा या मार्गावर विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.

या गाडीला खालील थांबे देण्यात यावेत

पुणे – चिंचवड – तळेगाव – लोणावळा – कर्जत – कल्याण – पनवेल – पेण – रोहा – माणगाव – वीर – सापे वामने – करंजाडी – खेड – चिपळूण – सावर्डा – अरावली रोड – संगमेश्वर रोड – रत्नागिरी – आडवली – विलावडे – राजापूर रोड – वैभववाडी रोड – नांदगाव रोड – कणकवली – सिंधुदुर्ग – कुडाळ – झारप – सावंतवाडी रोड

रेल्वे प्रशासन या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर विशेष रेल्वे गाडी सुरू करेल, अशी अपेक्षा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.

Konkan Railway: उधना – मंगळुरू विशेष एक्सप्रेसला अतिरिक्त कोच

   Follow us on        
Konkan Railway: प्रवाशांची  अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर होळी सणासाठी चालविण्यात आलेल्या गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन मंगळुरू-  उधना जंक्शन  या गाडीला तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त स्लीपर डबा जोडण्यात येणार आहे. याबद्दल अधिक तपशील खालीलप्रमाणे
१. उधना जंक्शनवरून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक ०९०५७ उधना जंक्शन मंगळुरू जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसला ०९ मार्च २०२५ रोजीच्या प्रवासासाठी अतिरिक्त एक स्लीपर क्लास कोच जोडण्यात येणार आहे.
२. मंगळुरू जंक्शनवरून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक ०९०५८ मंगळुरू जंक्शन उधना जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसला १० मार्च २०२५ रोजीच्या प्रवासासाठी अतिरिक्त एक स्लीपर क्लास कोच जोडण्यात येणार आहे.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हातील रेल्वे स्थानकांवरील समस्या मार्गी लावणार – मंत्री नितेश राणे

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वेच्या सहा स्टेशन वरील अडीअडचणी व समस्या मार्गी लावण्याबरोबरच आवश्यक सुविधा शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील. कोकण रेल्वे वरिष्ठ अधिकारी, सीएमडी आणि प्रवासी समन्वय समिती यांचा येत्या काही दिवसांत स्टेशन पाहणी दौरा करू, तसेच रेल्वेच्या विविध जलद गाड्या आणि सिंधुदुर्ग व वैभववाडी स्थानकातील पीआरएस सिस्टीम बाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढला जाईल.
सिंधुदुगनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कक्ष उद्घाटनानंतर कोकण रेल्वे प्रवासी समिती अध्यक्ष प्रकाश पावसकर व जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. सा. बां. विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड तसेच रेल्वे प्रवासी संघटनेचे साई आंबेरकर, शुभम परब, संजय वालावलकर, स्वप्निल गावडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग: असनिये गावात पट्टेरी वाघाचा वावर?

   Follow us on        
सिंधुदुर्ग: असनिये गावात कणेवाडी येथे शुक्रवारी रात्री एका घराच्या आवारात कुत्र्याचा जंगली प्राण्याने फडशा पडला असल्याची घटना समोर आली आहे. हा जंगली प्राणी पट्टेरी वाघ असल्याचे ग्रामास्थांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे असनिये परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
कणेवाडी येथील दिनेश सावंत यांच्या घरातील कुत्रा रात्री अचानक गायब झाला. त्यानंतर त्याचा माग काढला असता त्याला घराच्या आवारात पटेरी वाघाच्या पायाचे अनेक ठसे मिळाले. या परिसरात पट्टेरी वाघ अनेक वेळा ग्रामस्थांना दृष्टीस पडत असून हा बिबट्या नसून पटेरी वाघच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी या पट्टेरी वाघाच्या पायाचे ठसे ही टिपले. पट्टेरी वाघाच्या या दहशतीमुळे बागायतीमध्ये काजू गोळा करण्यासाठी आणि लाकडांसाठी जंगलात जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून वनखात्याने याची तात्काळ दखल घेऊन या पट्टेरी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

पट्टेरी वाघ कि बिबट्या?

दरम्यान याबाबत निवृत्त विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक तसेच बांदा वनपाल प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रामस्थांनी टिपलेले हे ठसे पट्टेरी वाघाचे नसून ते बिबट्याचे आहेत. तसेच वाघ जंगलातून भर वस्तीत येऊन शिकार करण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा बिबट्या असल्याचे सांगितले.

ब्राझील दौऱ्यात काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणारा करार- आ. दीपक केसरकर

   Follow us on        
काजू बोंड संदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे एमडी व टीम भारतात येणार आहेत. येथील काजूची ते पहाणी करणार असून त्यानंतर काजू बोंडावर प्रकिया सुरु केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळणार आहे. काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल असा विश्वास माजी मंत्री, सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे ते आज बोलत होते.
2 लाख हेक्टर जमिनीवर काजूची लागवड होते. यातील काजू गरावर प्रक्रिया होते. मात्र, काजू बोंड फुकट जात. 3 हजार 200 कोटीचे काजू बोंड वाया जाते. ब्राझिल देशात यावर विशेष संशोधन झाले असून या बोंडापासून विविध प्रकारची पेये, काजूचा जूस, मिट आदिंसारखे पदार्थ बनवले जातात, असे केसरकर म्हणाले.
तसेच ब्राझील येथे भारतील गाईंचे संवर्धन केले आहे. यामध्ये संकरीत जाती देखील करण्यात आल्या आहेत. आपल्याकडील कोकण कपिला गाईंच्या दुग्ध उत्पादन वाढ व्हावी यादृष्टीने देखील यावेळी चर्चा झाली. त्या पद्धतीचे तंत्रज्ञान प्राप्त झाल्यानंतर व दुग्ध उत्पादन वाढ झाल्यावर कोकण कपिलाचा एटू मिल्क म्हणून वापर करता येईल असे केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्युझिकल फाऊंटन उभा राहत आहे. महिला, युवक यांच्यासाठी सिंधुरत्न योजनेतून पर्यटन प्रकल्प साकार होत आहेत. हाऊस बोटच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे. तसेच ताज गृपच्या माध्यमातून माय बंगलो सारखा उपक्रम राबविण्यात येणार असुन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पर्यटनासाठीच्या मिनी बसेसचा शुभारंभ लवकरच होणार आहे अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

Mandangad: तब्बल २७५ माकडे पकडून सोडली नैसर्गिक अधिवासात!

No block ID is set

मंडणगड: शहरातील नागरिक व तालुक्यातील शेतकऱ्यांना होणारा माकडांचा उपद्रव लक्षात घेऊन वनविभागाच्यावतीने 28 फेब्रुवारीपासून तालुक्यात वनविभागाच्यावतीने माकडे पकडण्यासाठी विशेष अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत 275 माकडे पकडून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. या अभियानांतर्गत मंगळवारी शहरात कार्यवाही करण्यात आली.

उपविभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई, सहाय्यक वनरक्षक प्रियांका लगड, दापोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान तालुक्यात आठ दिवस राबवण्यात येणार आहे. या अभियानात तालुक्यात माकडांची संख्या अधिक असलेली ठिकाणी शोधण्यात आली आहेत. त्या ठिकाणी माकडांना खाद्यपदार्थांचे आमिष दाखवून पिंजऱ्यात पकडण्यात येत आहे. पिंजऱ्यातील माकडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित सोडण्यात येते. मंगळवारी शहरातील गांधी चौक येथे पिंजरा लावून 50 माकडे पकडण्यात आली. वनपाल अनिल दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक ओमकार तळेकर, अमोल ब्रिहाडे, समाधान गिरी व सहकारी पाटील यांनी ही कार्यवाही यशस्वी केली. यावेळी नगराध्यक्षा अॅड. सोनल बेर्डे, उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे, राहुल कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. तालुक्यातील सोवेली, वेळास, बाणकोट, वेसवी, उमरोली, शिपोळे गावात अभियान राबवून 275 माकडांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search