Category Archives: कोकण

श्री क्षेत्र टेरव येथे शिमगोत्सव जल्लोषात आणि उत्साहात संपन्न.

   Follow us on        

रत्नागिरी:निसर्गरम्य श्री क्षेत्र टेरवच्या श्री कुलस्वामिनी भवानी – वाघजाई या सुप्रसिद्ध व जागृत देवस्थानचा शिमगोत्सव मोठ्या उत्साहात धार्मिक वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. देवस्थानचे मानकरी, ग्रामस्थ तसेच पुजारी यांच्याकडून उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती.

१३ मार्च रोजी रात्रौ हुताशनी पोर्णिमेला वाडी-वाडीतील ग्रामस्थांनी पूजन करून होळी प्रज्वलित केली. १४ मार्च रोजी सकाळी श्री कुलस्वामिनी भवानी- वाघजाई मंदिरासमोर ग्रामस्थांनी आणलेली लाकडे, कवळ, शेणी व गवत इत्यादीने सजविलेल्या होमाची पुजाऱ्यानी पारंपारिक पद्धतीने गावच्या मानकऱ्यांच्या हस्ते यथासांग विधीवत पुजा करुन घेतली. गावच्या पुजाऱ्यानी (गुरवानी) मंदिरातून चांदीने मढविलेली पालखी सजवून “कुलदैवत श्री भवानी, ग्रामदैवत श्री वाघजाई, भैरी, केदार, महालक्ष्मी व कुलस्वामिनी” या देवतांची रुपी लावून मंदिरा व होमा समोरील मानाच्या नूतन सहाणेवर आसनस्थ केली. सकाळी ९ वाजता ढोल, ताश्यांच्या गजरात, वाजंत्र्यासह होमाभोवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा झाल्यानंतर होम प्रज्वलीत करुन ग्रामस्थांनी होळीत अग्निदेवतेस श्रीफळ अर्पण केले. होमाभोवती पालखीची प्रदक्षिणा घालून “भैरी- केदाराच्या चांगभलं” असे म्हणत पालखी उंचावून उपस्थित भाविकांना उत्साहवर्धक वातावरणात दर्शन देण्यात आले तो क्षण डोळ्याचे पारणे फेडणारा होता. सुवासिनींनी सहाणेवर पालखीतील देवींच्या आस्थेने ओट्या भरल्या व नंतर पालखी मंदिरात स्थानापन्न करण्यात आली. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे वद्य प्रतिपदेला प्रज्वलीत करण्यात आलेल्या ह्या होळीला “‘भद्रेचा शिमगा'” असे संबोधले जाते, कारण या दिवशी भद्रा करण असते. हुताशनी पौर्णिमेला घराघरांतून पूरणपोळीचा नैवेद्य करण्यात आला. संध्याकाळी चार वाजता पालखी लिंगेश्वर वाडीतील स्वयंभू पुरातन जागृत शंकर मंदिर येथील मानाच्या सहाणेवर नेण्यात आली. लिंगेश्वर वाडीतून पालखीचा “छबिना” काढून निम्मेगाव, गुरववाडी, कुंभारवाडी, राधाकृष्णवाडी, भारतीवाडी आणि तळेवाडी अशी वाजत-गाजत रात्रौ मंदिरात आणण्यात आली. छबिन्याच्या वेळी वाडी-वाडीतील ग्रामस्थांनी आकर्षक विद्युत रोषणाई सह रांगोळी काढून फटाक्यांची आतिषबाजी केली व गुलाल उधळून ढोल ताशांच्या गजरात पालखीचे जल्लोषात स्वागत केले. वाडी- वाडीतील सुवासिनींनी छबेन्याच्या वेळी ठिकठिकाणी पालखीतील देवतांची आरती करुन ओट्या भरल्या. गावचा छबेना भक्तिमय आणि अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात व आनंदात पार पडला.

होमाच्या दिवशी व्यापाऱ्यांनी कुरमुर्यांचे, शेंगदाण्याचे लाडू, मिठाई, सरबत, आइस्क्रीम तसेच विविध प्रकारची खेळणी अशी नाना तऱ्हेची दुकाने थाटली होती.

रूढी परंपरे प्रमाणे १५ रोजी पालखी प्रथम तळेवाडीतील मानकऱ्यांच्या घरी नेण्यात आली व नंतर निम्मेगाव येथील मानकऱ्यांच्या घरी नेण्यात आली. तदनंतर निम्मेगाव येथील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली व अशा प्रकारे १६ रोजी तळेवाडी – दत्तवाडी १७ रोजी लिंगेश्वरवाडी, १८ रोजी राधाकृष्णवाडी येथे नेण्यात आली. १९ तारखेला पालखी कुंभरवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली. त्याच दिवशी पालखी संध्याकाळी परत मंदिरात आणून रुढी परंपरेप्रमाणे विधिवत पूजन करुन “धुळवड” (रंगपंचमी) साजरी करण्यात आली, यालाच “शिंपणे” असे म्हणतात. यावेळी अनेक ग्रामस्थांनी मंदिरात गुलाल उधळून रंगपंचमी साजरी केली. शिंपणे झाल्यावर पालखी पुनश्च कुंभरवाडीतील उर्वरीत घरे घेण्यासाठी नेण्यात आली.

२० रोजी तांदळेवाडी-गुरववाडी व खांबेवाडी, २१ रोजी दत्तवाडी (हनुमान नगर), २२ रोजी वेतकोंडवाडी, २३ रोजी भारतीवाडी, २४ रोजी तांबडवाडी आणि २५ रोजी सुतारवाडीतील ग्रामस्थांच्या घरी नेण्यात आली.

प्रत्येक घरात राखणेचे, पूजेचे श्रीफळ पालखीत अर्पण करण्यात आले, तसेच माहेरवाशिणीनी व सासरवाशिनिणी ओट्या भरल्या. काही ठिकाणी नवस करण्यात आले तर काही ठिकाणी नवस फेडण्यात आले. पुजाऱ्यानी रूढी परंपरेप्रमाणे देवतांस “आर्जव” घातले. गोडाधोडाचे नैवद्य दाखविण्यात आले. पालखी वाहणाऱ्या सेवकांस “भोई” असे संबोधले जाते. तसेच पुजारी, भोई, ताशावाला व ढोलवाला बांधवांना स्वखुशीने बक्षीस देण्यात येते त्यास ”पोस्त”असे संबोधले जाते.

 

घरोघरी पालखी नेण्यात येते यास *भोवनी* असे संबोधले जाते. सदर शिमगोत्सवास अनेक चाकरमानी कुटुंबियांसह आवर्जुन उपस्थित होते. पालखी कुठेही वास्तव्यास न राहता ती मिरवणुकीने वाजत-गाजत वाडी-वाडीतील घरे झाल्यावर रात्री मंदिरात आसनस्थ करण्यात आली. रात्रौ ग्रामस्थ वाडीतील पाळ्यांप्रमाणे मंदिरात पहाऱ्यासाठी (सेवेसाठी)उपस्थित राहिले होते.

 

सदर कालावधीत मंदिर सकाळी ७ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यात आले होते. पालखीसोबत अब्दागिरी व भगवे निशाण नाचवत ढोल, ताशा वाजविण्यात आला. परंपरेनुसार गावातील मुस्लिम बांधवानी पालखीसोबत ताशा वाजवीला , अशा या सांस्कृतिक, सामाजिक संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या शिमगोत्सवाची सांगता सुतारवाडीतील घरे झाल्यावर मंगळवार दिनांक २५ मार्च, २०२५ रोजी (कांदल) रुपी भंडारुन करण्यात आली. या उत्सवात सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने आणि उत्साहाने सहभागी झाले होते.

राखले पावित्र्याचे भान!

वाढविले संस्कृतीची शान!!

ठेवले उत्सवांचे भान!

केला देवतांचा सन्मान!!

आपले:- ग्रामस्थ श्री क्षेत्र टेरव.

संकलन :- श्री सुधाकर राधिका कृष्णाजीराव कदम, ( विशेष कार्यकारी अधिकारी) राधाकृष्णवाडी, श्री क्षेत्र टेरव.

सरस्वती कोचिंग क्लासेस, मुंबई.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर पुन्हा ओव्हरहेड वायर तुटली; दोन गाड्या रखडल्या

🔘 आज रात्री मुंबई सीएसएमटी येथून सुटणारी कोकणकन्या अडीच तास उशिराने सुटणार

   Follow us on        

Konkan Railway :ओव्हरहेड वायर तुटल्याने पुन्हा एकदा कोकण रेल्वे मार्गावर विघ्न निर्माण झाले आहे. कोकण रेल्वे मार्गावर खेड दिवाण खवटी येथे ओव्हरहेड वायर आज मंगळवारी संध्याकाळी ६-६.१५ वाजण्याच्या सुमारास तुटली. यामुळे मांडवी आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन गाड्यांवर परिणाम झाला. दोन्ही गाड्या स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या आहेत . मात्र याची माहिती मिळताच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे तत्काळ उपाय योजना सुरु करण्यात आल्या. संध्याकाळी ७ वाजेपर्यंत तुटलेली ओव्हर हेड वायर जोडण्यात आली होती. फिट सर्टिफिकेट मिळून काही वेळातच थांबलेल्या गाड्या मार्गस्थ होतील असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले.

या घटनेमुळे रेल्वे मार्गावरील केवळ दोन गाड्यांचे वेळापत्रक काही मिनिटांसाठी विस्कळीत झाले आहे. मात्र अन्यथा उर्वरित गाड्या नियमित वेळेत धावत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकारामुळे मुंबईकडे जाणारी मांडवी एक्सप्रेस खेड स्थानकात थांबून आहे तर गोव्याच्या दिशेने जाणारी मत्स्यगंधा एक्सप्रेस ला रोहा स्थानकात थांबवून ठेवण्यात आली आहे.

आजची मुंबई – मडगाव कोकणकन्या उशिराने

गोव्या वरून मुंबईला निघालेली मांडवी एक्सप्रेस उशिरा धावत असल्याने आज रात्री मुंबई सीएसएमटी येथून सुटणारी कोकणकन्या अडीच तास उशिराने म्हणजे रात्री एक वाजून तीस मिनिटाने सुटणार आहे.

Block at CSMT: कोकण रेल्वे मार्गावरील तीन गाड्यांचा प्रवास ठाणे-दादरपर्यंतच

   Follow us on        

Konkan Railway: मुंबई सीएसएमटी येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाचे काम अपूर्ण राहिल्याने या कामासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉक च्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. या वाढीव ब्लॉक मुळे काही गाड्यांचा प्रवास अलीकडच्या स्थानकांवर संपवण्यात येणार (Short termination) आहे. याबाबत अधिक माहिती खालील प्रमाणे

गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू जंक्शन – मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसचा प्रवास आजपासून दिनांक ३१/०३/२०२५ पर्यंत ठाणे स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक २२१२० मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी तेजस एक्सप्रेसचा प्रवास आजपासून ३१/०३/२०२५ पर्यंत दादर स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

गाडी क्रमांक १२०५२ मडगाव जंक्शन – मुंबई सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेसचा प्रवास आजपासून ३१/०३/२०२५ पर्यंत दादर स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर “धर्मवीर आनंद दिघे विशेष एक्सप्रेस” चालविण्यात यावी

   Follow us on        

ठाणे: कोकण रेल्वे मार्गावर गणेशोस्तव २०२५ साठी ठाणे ते सावंतवाडी दरम्यान “धर्मवीर आनंद दिघे एक्सप्रेस” गाडी सेवा सुरू करण्यासंबंधीचे निवेदन कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि) ठाणे यांच्यावतीने संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे काल दिनांक २२ मार्च रोजी सुपूर्त केले.

मध्य रेल्वेवरील ठाणे रेल्वे स्थानक हे महाराष्ट्रातील खूप महत्त्वाचे स्थानक गणले जाते. त्यातच ठाणे येथील सर्वेसर्वा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे ठाणे, हे ठाणे वासियांसाठी श्रद्धास्थान आहे. आणि ठाणे स्थानकातून कोकण रेल्वे मार्गावर जाणारे-येणारे कोकणवासी यांचे प्रवासी स्थानक ही आहे. दैनंदिन कोकणवासीय, कोकण प्रवासी या स्थानकातून कोकणात मोठ्या संख्येने प्रवास करीत असतात. गाड्यांची संख्या मुबलक प्रमाणात असली तरी प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महोदय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे कार्य ठाणे शहरास नवीन नाही. आपले सर्वतोपरी योगदान आणि समाजकार्यात मोठ्या प्रमाणात समाजसेवा घडवीत ठाण्यातील जनतेत आपले अढळ स्थान ठामपणे प्रखरतेने उमटवले होते ना आहेच ते न मिटण्यासारखे आहे. अशा थोर समाज सेवकास खरी आदरांजली देण्याकरिता गेली सतत तीन (३) वर्षे करीत असलेली मागणी ठाण्यातील लहानातल्या लहान संघटनेपासून राज्य पातळीवरील संघटना, कोकणवासिय, कोकण रेल्वे प्रवासी यांच्या जोरदार आणि प्रचंड मागणीनूसार कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ रजि ठाणे संघटना आपणांकडे सदर विषयांतर्गत निवेदन सादर करीत या वर्षांतरी कोकण वासियांना “धर्मवीर आनंद दिघे” एक्सप्रेस गाडी चा लाभ घेता येईल हीच अपेक्षा आहे. अशा आशयाचे निवेदन यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि)प्रमुख सल्लागार राजू कांबळे, अध्यक्ष सुजित लोंढे, सहसचिव अजिंक्य नार्वेकर, सल्लागार निलेश चव्हाण आणि संपर्कप्रमुख प्रमोद घाग, नामदेव चव्हाण सभासद साहिल सकपाळ हनुमंत निकम उपस्थित होते

यापूर्वीही कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ (रजि)यांच्या वतीने खासदार नरेश मस्के, खासदार संजीव नाईक, मा. खासदार कपिल पाटील, आमदार संजय केळकर यांना भेटून या मागणी संबधी निवेदने देण्यात आली आहेत. यावर्षी या मागणीचा विचार करण्यात येवून “धर्मवीर आनंद दिघे” एक्सप्रेस यावर्षीच्या गणेशोत्सवात धावेल अशी आशा संघटनेने व्यक्त केली आहे.

 

Loading

Konkan Railway: मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसवर कन्नडीगांचा डोळा

   Follow us on        
Mumbai Goa Vande Bharat Express:
मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेस पुढे मंगुळुरूपर्यंत विस्तारित करण्याचे प्रयत्न चालू झाले आहेत. सध्या कोकण रेल्वे मार्गावर धावत असलेली मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आणि मडगाव मंगुळुरु एक्सप्रेस या दोन्ही गाड्या एकत्र करून  मुंबई – मंगुळुरु अशी अखंड वंदे भारत एक्सप्रेस चालविण्याबाबत रेल्वे प्रशासन योजना आखत असल्याचे वृत्त मातृभूमी या आघाडीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.  कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्नशील आहेत.
मुंबई मंगुळुरु वंदे भारत अशी अखंड वंदे भारत सेवा सुरु झाल्यास हे अंतर १२ तासांत कापता येईल आणि कर्नाटक कोस्टल भागातील प्रवाशांना एक जलद वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होईल. सध्या कोकण रेल्वे मार्गावरील दोन्ही वंदे भारत एक्सप्रेसचा एकत्रित विचार करता त्या सरासरी ७० टक्के क्षमतेने धावत आहेत. मात्र मुंबई मंगुळुरु वंदे भारत अशी अखंड वंदे भारत सेवा सुरु झाल्यास हाच रेट १००% होईल असा युक्तिवाद करून ही मागणी करण्यात येत आहे.
सध्या मंगळुरू-गोवा वंदे भारत हा सर्वात कमी गर्दीच्या मार्गांपैकी एक आहे, ज्यामध्ये प्रवाशांची संख्या ४० टक्क्यांपेक्षा कमी आहे. यावर उपाय म्हणून, रेल्वेने सुरुवातीला कोझिकोडपर्यंत सेवा वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तथापि, कर्नाटकातील राजकीय नेत्यांच्या विरोधामुळे ही योजना रद्द करण्यात आली. मुंबई-गोवा वंदे भारतचा प्रवास दर (Occupancy Rate)सुमारे ९० टक्के होता, परंतु त्यानंतर तो सुमारे ७० टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. रेल्वेचा असा विश्वास आहे की मुंबई-गोवा आणि मंगळुरू-गोवा सेवा एकाच मुंबई-मंगळुरू मार्गात विलीन केल्याने पूर्ण प्रवासी क्षमता साध्य होण्यास मदत होईल.
सध्या, मुंबई-गोवा वंदे भारत सकाळी ५:२५ वाजता मुंबईहून निघते आणि दुपारी १:१० वाजता गोव्यात पोहोचते. प्रस्तावित वेळापत्रकानुसार, ती नंतर मंगळुरूला पोहोचेल तिथे संध्याकाळी ६:०० वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे, मंगळुरू-गोवा वंदे भारत सकाळी ८:३० वाजता मंगळुरूहून निघते आणि दुपारी १:१० वाजता गोव्यात पोहोचेल. जर ट्रेन मुंबईकडे निघाली तर ती रात्री ९:०० वाजता पोहोचेल अशी अपेक्षा आहे. तथापि, या वेळी मुंबईच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर गर्दीमुळे आव्हान निर्माण होऊ शकते. कारण याच वेळी अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या याच  वेळी मुंबईला येतात. मध्य रेल्वेने मुंबई-मंगळुरू वंदे भारत वेळापत्रकात बदल करण्याची आवश्यकता असल्याचे सूचित केले आहे.
वरील वृत्त मातृभूमी या आघाडीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे. कर्नाटकातील लोकप्रतिनिधींनी यासाठी प्रयत्न चालू केले आहेत. महाराष्ट्रातील कोकण रेल्वे  प्रवासी संघटनांनी याला विरोध केला आहे. . मुंबई-गोवा वंदे भारतचा प्रवास दर (Occupancy Rate) सुमारे ७० टक्क्यांपर्यंत आला असल्याची बातमी खोटी असून सध्या तो ९०% च्या वर आहे.  सध्याची मुंबई  गोवा वंदे भारत एक्सप्रेस तशीच ठेवून मुंबई ते मंगुळुरु दरम्यान स्लीपर वंदे भारत चालू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्रातील कोकण रेल्वे  प्रवासी संघटनांनी केली आहे.

मुंबई गोवा मार्ग पुढील ६ महिन्यात पूर्ण होणार; प्रकल्पाचा खर्च १९,४६९ कोटी रुपयांपर्यंत वाढणार – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

   Follow us on        
Mumbai Goa Highway:
संपूर्ण गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्ग-६६ चे चौपदरीकरण पुढील सहा महिन्यांत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. या मार्गाचे जवळजवळ ४६३ किमी लांबीचे काम आधीच पूर्ण झाले आहे, त्यामुळे संबंधित राज्य सरकारांशी झालेल्या चर्चेनंतर प्रकल्पाशी संबंधित सर्व प्रलंबित समस्या सोडवण्यात आल्या आहेत.
मुंबई आणि गोवादरम्यान कनेक्टिव्हिटी सुधारणे आणि प्रवासाचा वेळ कमी करणे हे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे, त्यामुळे या प्रदेशातील पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ होईल. तथापि, विविध समायोजन आणि व्याप्ती बदलांमुळे संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १९,४६९ कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.
या प्रकल्पाच्या पूर्णतेमुळे वाहतूक कार्यक्षमता सुधारेल, आर्थिक फायदे मिळतील आणि गोवा आणि मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांसाठी एकूण प्रवास अनुभव वाढेल अशी अपेक्षा आहे असे ते पुढे म्हणालेत.

Konkan Railway Disruption: मुंबईहून कोकणात जाणार्‍या दोन गाड्या उशिरा सुटणार

   Follow us on        

Konkan Railway 07:45 PM:

कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली स्थानका जवळ ओव्हरहेड सपोर्ट वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. परिणामी (पेअरींग गाड्या उशिराने धावत असल्याने) मुंबईहून गोव्यासाठी सुटणार्‍या दोन गाड्या उशिराने सोडण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आज दिनांक २२ मार्च रोजी सीएसएमटी मुंबई स्थानकावरून रात्री ११ वाजता सुटणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस २३ मार्च रोजी पहाटे ४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.

एलटीटी मुंबई या स्थानकावरून दिनांक २३ मार्च रोजी ००:४५ वाजता सुटणारी गाडी क्रमांक ११०९९ एलटीटी मडगाव एक्सप्रेस ही गाडी २३ मार्च रोजी सकाळी ०४:०० वाजता सोडण्यात येणार आहे.


Konkan Railway 06:15 PM:

कोकण रेल्वे मार्गावर आज आडवली जवळ ओव्हरहेड वायरला सपोर्ट करणारी वायर तुटल्याने कोकण रेल्वेची वाहतूक काही काळ बंद झाली होती. वायर तुटल्याने मंगला एक्स्प्रेस व मांडवी व अन्य काही गाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवण्यात आल्या होत्या.

आता ही वायर जोडण्यात आली असून रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरू झाली असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. तरी देखील त्याचा परिणाम कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर झाला असून कोकण रेल्वेच्या गाड्या अजूनही सुमारे दोन ते तीन उशिराने धावत आहेत.

कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांची सध्याची स्थिती.. (06:15 pm) 

सीएसएमटी मडगाव मांडवी एक्सप्रेस वैभववाडी स्थानकावर पोहोचली असून ती सुमारे ४ तास उशिराने धावत आहे तर मडगाव सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस आडवली स्थानकावरून नुकतीच निघाली असून ती सुमारे चार तास उशिराने धावत आहे. दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आताच आडवली स्थानकावर आली असून ती सुमारे साडेतीन तास उशिराने धावत आहे. मडगाव एलटीटी सिंधुदुर्ग स्थानकावर असून ती तीन तास उशिराने धावत आहे.

कोकण रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण आणि अन्य मागण्यांसाठी खासदार रविंद्र वायकर यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांसोबत भेट

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे तसेच महाराष्ट्रात रेल्वेच्या कारभारात मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे शिंदे सेनेचे खासदार रविंद्र वायकर यांनी निवेदनाद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री अश्वनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. खासदार वायकर यांनी काल केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची लोकसभेतील त्यांच्या दालनात भेट घेतली. रेल्वेशी निगडीत विविध विषयांचे त्यांना निवेदन दिले. यात जोगेश्वरी येथे नव्याने टर्मिनल बनवण्यात येत आहे, या टर्मिनलला हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टीमोडेल कनेक्टीविटीने जोडण्यात यावे. येथे पार्किंग, हॉटेल्स तसेच मॉल्सची सुविधा करण्यात यावी.

कोकण रेल्वेच्या दुपदरी कामासाठी बैठक घेण्यात येईल असे आश्वासन बजेट मध्ये देण्यात आले होते. पण हो बैठक अद्याप घेण्यात आली नसल्याकडे लक्ष वेधत कोकण रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाचे (३७० किलो मीटर) काम सुरु करण्यात यावे. कोकण रेल्वे स्वतंत्र महामंडळ असले तरी गोवा व महाराष्ट्र सरकारने भारतीय रेल्वे मध्ये विलीनिकरणास तयारी दर्शवली आहे अशी माहिती खासदार वायकर यांनी रेल्वे मंत्री यांनी दिली.

माननीय मंत्री महोदयांना दिलेल्या निवेदनात मांडलेल्या काही महत्त्वाच्या समस्या : 

  • जोगेश्वरीला जंक्शन हे हाँगकाँगच्या धर्तीवर मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटीने जोडलेले असावे. तसेच तिथे कार पार्किंग, हॉटेल, मॉल आदी सुविधा उपलब्ध असाव्या .
  • रेल्वे स्थानकांवरील, विशेषतः कल्याणच्या पुढच्या स्थानकांच्या, स्वच्छतागृहांची अवस्था बिकट आहे. दुर्गंधी, पाण्याचा अभाव, स्तनपान कक्षांची अनुपलब्धता इत्यादी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.
  • मराठी भाषेला आता राजभाषेचा दर्जा मिळाला असल्याने महाराष्ट्रात सर्वच कारभारात, विशेषतः रेल्वेच्या कारभारात मराठी भाषा अनिवार्य असावी.
  • एसी लोकलची फ्रिक्वेन्सी किंवा एसी गाड्यांची संख्या वाढवण्यात याव्या
  • उपनगरीय रेल्वेमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव डबा असूनही कित्येकदा इतर नागरिक त्या डब्यात प्रवास करत असल्याने ज्येष्ठ नागरिकांना उभे राहून प्रवास करावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांच्या या गैरसोयींवर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे.

 

कोकण रेल्वे

  • प्रवाशांची वाढती गर्दी आणि कोकण रेल्वेचा सिंगल ट्रॅक यामुळे होणाऱ्या अडचणींवर उपाय म्हणून कोकण रेल्वे डबल ट्रॅक करण्यासाठी प्रयत्न करून हा प्रकल्प पुढे नेण्यात यावा.
  • अनेक स्थानकांची स्वच्छता अत्यंत निकृष्ट आहे. पाणीपुरवठा आणि स्वच्छतागृहांची स्थितीही समाधानकारक नाही. आजही अनेक स्थानकांवर छत नसल्याने प्रवाशांना नाहक ऊन, पावसाचा सामना करावा लागत आहे.
  • कोकण रेल्वे मार्गावरील सर्व स्थानकांवर सोलर पॅनल बसवावेत.
  • कोकण रेल्वे मार्गावरील सर्व जुने बोगदे व पुलांचे सर्वेक्षण करून वेळोवेळी आवश्यकतेनुसार दुरुस्तीचे काम करण्यात यावे.
  • मालगाड्यांचे वेळापत्रक अशा प्रकारे ठरवावे की त्यामुळे प्रवासी गाड्यांच्या वेळापत्रकात अडथळा येणार नाही.

Konkan Railway: उन्हाळी हंगाम विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या उन्हाळी विशेष गाड्यांच्या आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आहे या गाड्यांचे आरक्षण दिनांक २४ मार्च २०२५ रोजी संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सकाळी ८ वाजल्यापासून उपलब्ध होणार असल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

१) गाडी क्रमांक ०११५१ / ०११५२ मुंबई सीएसएमटी- करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक): 

गाडी क्रमांक ०११५१ मुंबई सीएसएमटी – करमाळी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत मुंबई सीएसएमटीहून ००:२० वाजता सुटेल आणि ट्रेन त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता करमाळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११५२ करमाळी. – मुंबई सीएसएमटी स्पेशल (साप्ताहिक) दर गुरुवारी, १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत करमाळीहून दुपारी १:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिविम या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २२ कोच : दोन टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०५ कोच, स्लीपर – १० कोच, जनरल – ०४ कोच , SLR – ०२

२) गाडी क्रमांक ०११२९ / ०११३० लोकमान्य टिळक (टी) – करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष (साप्ताहिक): 

गाडी क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक (टी) – करमाळी विशेष साप्ताहिक १०/०४/२०२५ ते ०५/०६/२०२५ पर्यंत दर गुरुवारी लोकमान्य टिळक (टी) येथून २२:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२:०० वाजता करमाळीला पोहोचेल.

गाडी क्रमांक ०११३० करमाळी – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ११/०४/२०२५ ते ०६/०६/२०२५ पर्यंत दर शुक्रवारी करमाळीहून दुपारी २:३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवि या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण १९ एलएचबी कोच : फर्स्ट एसी – ०१ कोच, टू टायर एसी – ०२ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०८ कोच, जनरेटर कार – ०२

३) गाडी क्रमांक ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक: 

गाडी क्रमांक ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर विशेष साप्ताहिक ही गाडी दर गुरुवारी, ०३/०४/२०२५ ते २९/०५/२०२५ पर्यंत लोकमान्य टिळक (टी) येथून दुपारी ४:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुवनंतपुरम उत्तर येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) विशेष साप्ताहिक ही गाडी ०५/०४/२०२५ ते ३१/०५/२०२५ पर्यंत दर शनिवारी तिरुवनंतपुरम उत्तर येथून सायंकाळी ४:२० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक (टी) येथे ००:४५ वाजता पोहोचेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जंक्शन, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकुंदोब रोड, मुकुंदोब रोड, कुंडुरा रोड सुरथकल, मंगळुरु जं., कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकांवर थांबेल.

डब्यांची रचना : एकूण २२ एलएचबी कोच : टू टायर एसी – ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९ कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१.

Konkan Tourism: समुद्रावरून जाणाऱ्या कोकणातील पहिल्या रोपवेला मंजुरी

   Follow us on        
दापोली: दापोलीतील हर्णे येथे गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला असा समुद्रावरून जाणारा रोपवे व्हावा हे दापोलीतील पर्यटन प्रेमींचे आणि अभ्यासकांचे स्वप्न आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. दापोलीतील बांधकाम व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते, मिहीर दीपक महाजन यांनी दिल्ली येथे २०२० च्या ऑक्टोबर महिन्यात मा. नितीनजी गडकरी यांची भेट घेत दापोलीतील हर्णे येथे गोवा किल्ला ते सुवर्णदुर्ग किल्ला असा समुद्रावरून जाणारा रोपवे करण्याची मागणी केली असता ” महाराष्ट्र शासनाकडून प्रस्ताव आल्यास तात्काळ मान्यता देण्यात येईल असे आश्वाशित केले होते. या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्यासाठी विधान परिषदेच्या भाजपच्या आ. मा.सौ.उमा खापरे यांचे मोलाचे यांचे सहकार्य लाभले. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन पर्यटन मंत्री मा. मंगलप्रभात लोढा यांनी रोपवेसाठी पर्यटन विभागाला तसा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. पुरातत्व विभागाची देखील म्हत्वाची भूमिका असल्याने तत्कालीन सांस्कृतिक विभागाचे मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार यांनी सहकार्य करत रोपवेला गती देण्यात महत्वाची भूमिका निभावली होती.
महायुतीच्या गतिमान सरकारच्या दि. १८ फेब्रुवारीच्या कॅबिनेट मिटिंग मध्ये या रोपवे ला हिरवा कंदील देण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या पर्वतमाला योजनेअंतर्गत गोवा किल्ला- सुवर्णदुर्ग किल्ला हा रोपवे घेण्यात आला असून, केंद्र सरकारचे NHLM आणि महाराष्ट्र शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग या रोपवेचे काम कार्यान्वित करणार असल्याचा शासन निर्णय दि. १९ मार्च रोजी  झाला आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असणाऱ्या आणि सरखेल कान्होजी आंग्रेचे जन्मस्थान असणाऱ्या सुवर्णदुर्ग किल्ल्यावर जाण्यासाठी रोप वे झाल्याने दापोलीचे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन क्षेत्रातील महत्व अधोरेखित होणार आहे. विशेषत्वाने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेला देखील मोठी चालना मिळणार असून गृहराज्य मंत्री योगेश कदम नेतृत्वात हा प्रकल्प पूर्णत्वाला जाण्याची खात्री आहे. रोप-वे करीता या सर्वाचे सहकार्य लाभल्याने समस्त दापोलीकरांच्या वतीने मिहीर महाजन यांनी आभार मानले आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search