Category Archives: कोकण




सिंधुदुर्ग, २७ जुलै: सध्या संपूर्ण जग आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगीकार करत असून त्याद्वारे विकासाचे पुढच्या टप्प्यात जात आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI च्या जगात कित्येक क्षेत्रात मोठे बदल अनुभवण्यास येत आहेत. मात्र त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून काही समाज विघातक प्रवृत्त्या वापरकर्त्यांची फसवणूक करून आपला फायदा करून घेत असल्याच्या कित्येक घटना समोर येत आहेत.
अलीकडे रत्नागिरी जिल्हय़ात सायबर गुन्ह्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मोबाईल अॅप च्या माध्यामातून फसवणूक करण्याचे प्रयत्न झाल्याची घटना काल कोकणकरांनी अनुभवली. एका अपरिचित नंबरवरून ‘ सावंतवाडी टर्मिनस प्रेमी.apk’ हे मोबाईल ऍप्लिकेशन ईंन्स्टॉल करा असा व्हाट्सएप्प मेसेज कित्येक जणांना यायला सुरवात झाली. खरेतर असे कोणते ऍप्लिकेशनच नाही आहे. ही गोष्ट निदर्शनास येताच कोकण प्रवासी संघटना, सावंतवाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील गैरप्रकार टाळण्यासाठी कंबर कसली. ज्या नंबर वरून हे मेसेज येत होते त्या नंबरवर कॉल करुन नक्की प्रकार काय आहे तो जाणून घेतला. आपला नंबर हॅक झाला असून कोणीतरी दुसराच आपले व्हाट्सएप्प कंट्रोल करत असून हे मेसेज पाठवत असल्याचे त्या नंबरधारकाने कबूल केले. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन याबद्दल समाज माध्यमातून जनजागृती केली. ‘सावंतवाडी टर्मिनस प्रेमी’ नावाचे कोणतेही मोबाईल ऍप्लिकेशन आपण बनवले नसून त्यासंबंधी असे मेसेज आल्यास त्यावर दुर्लक्ष करावेत आणि तो नंबर ब्लॉक करावा असे आवाहन करणारे मेसेज व्हायरल करण्यात आलेत.
‘सावंतवाडी टर्मिनस प्रेमी’ हेच नाव का?
हॅकर्सने सावंतवाडी टर्मिनस प्रेमी.apk हेच नाव का निवडले असेल याबद्दल कुतूहल निर्माण होत आहे. साधारणपणे हॅकर्स हे एखाद्या भागातील युजर्सना टार्गेट करण्याआधी त्या भागाचा अभ्यास करतात. त्या भागात सध्या समाज माध्यमांवर कोणता विषय मोठ्या प्रमाणात चर्चिला जात किंवा लोकप्रिय आहे हे हेरतात आणि युजर्सना शंका येणार नाही अशा प्रकारे त्यासंबधित मेसेज पाठवतात. सध्या ‘सावंतवाडीत टर्मिनस व्हावे’ ही मोहीम मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होत आहे. त्यामुळे हॅकर्सने तोच विषय निवडला असल्याची शक्यता आहे.
पुरेशी काळजी घेणे आवश्यक
आपली फसवणूक होऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे. बनावट अॅप्सवरून आपल्या मोबाइलमधील डाटा ‘हॅक’ केला जाऊ शकतो. त्यामुळे ‘अॅप्स’ घेताना पुरेशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.









समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ
Follow us on



चिपळूण दि. २४ जुलै: निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या सदस्यांनी संगमेश्वर चिपळूण मतदारसंघाचे आमदार श्री शेखर निकम यांच्यासोबत आज कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांची विविध मागण्यांसाठी आज भेट घेतली. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून संतोष कुमार झा यांनी निवेदनात दिलेल्या मागण्यांसाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे वचन दिले असल्याचे पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले.
संगमेश्वर स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या पाहता येथे काही 9 गाड्यांना थांबा मिळावा अशी आमची मागणी होती. आमदार निकाम सर यांच्यामुळे या बैठकीचा योग जुळून आला असून निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या वतीने मी त्यांचे तसेच श्री झा साहेबांचे आभार मानतो. संगमेश्वरला लवकरच किमान 9 पैकी 3 गाडयांना थांबा मिळेल अशी आशा आज निर्माण झाली आहे. या प्रसंगी आमदार आदरणीय शेखर सर, ग्रुपच्या वतीने श्री दीपक पवार, संतोष पाटणे, समीर सप्रे, अशोक मुंडेकर, सुशांत फेपडे आदी उपस्थित होते अशी माहिती पत्रकार संदेश जिमन यांनी दिली.
संगमेश्वर मध्येच या तीन गाड्याना थांबा मिळण्याची दाट शक्यता
▪️1) 110099/11000 LTT मडगांव LTT
▪️2) 19577/19578 जामनगर तिरुनलवेली एक्सप्रेस
▪️3)20909/20910 कोचिंवेल्ली पोरबंदर एक्सप्रेस
समाजमाध्यमांचा, पत्रकारितेचा प्रभावी वापर आणि उत्तम राजकिय नेतृत्व यांचा उत्तम मिलाफ
पत्रकार संदेश जिमन यांनी समाज माध्यमातून नेहेमीच संगमेश्वर, चिपळूण येथील रेल्वे प्रवाशांसाठी आवाज उठवला आहे. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर या फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून मागच्या वर्षी नेत्रावती एक्सप्रेसला संगमेश्वर येथे थांबा मिळवून दिला होता. त्यांच्या कार्याचे त्यावेळी मोठे कौतुक झाले होते आणि प्रवासी संघटनेंकडून त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. सामान्य जनतेचा आवाज प्रशासनाकडे पोहोचविण्यासाठी समाज माध्यमांचा उत्तम वापर कसा करता येईल याचे एक उत्तम उदाहरण त्यांनी दिले आहे. आपल्या मतदारसंघातील रेल्वे प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी आणि सोयींसाठी आमदार शेखर निकम नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. रेल्वे प्रश्नासंबंधी त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला आहे. त्यांच्या रूपाने या मतदारसंघात एक उत्तम नेतृत्व लाभले असल्याची जनतेची भावना आहे.


वरील फोटो कोलाड येथे मुंबई गोवा महामार्गावर पडलेल्या मोठ्या खड्ड्याचा आहे. या खड्ड्यात पाणी साचून अक्षरशः तळे बनले आहे. त्यामुळे रस्त्यात गाडी घेऊन उतरायचे कि होडी असा प्रश्न कोकणकरांना पडला आहे.
Follow us on



Mumbai Goa Highway: कोकणातील लोकप्रतिनिधींसाठी अत्यंत शरमेची गोष्ट बनलेल्या, गेल्या १७ वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा एकदा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. या खड्डयांमुळे या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक बनले आहे. काही ठिकणी परिस्थिती इतकी खराब झाली आहे कि या महामार्गाला राष्ट्रीय महामार्ग बोलणेच हास्यास्पद ठरेल. वरील फोटो कोलाड येथील असून अजून बर्याच ठिकाणी अशीच परिस्थिती आहे. गणेश चतुर्थीला आता फक्त एकच महिना बाकी आहे. मग काय लोकांच्या समाधानासाठी तात्पुरती डागडुगी होईल आणि पुढील वर्षी पुन्हा तेच. महामार्गबाबत लोकप्रतिनिधी उदासीन असून कोकणकर देखील कमालीचे शांत आहेत, या महामार्गाची गरज चाकरमान्यांना फक्त गणेशोत्सव आणि शिमगोत्सव मध्येच भासते उर्वरित वेळेस कोकणात माणसच राहत नाहीत का असा प्रश्न पडतो.
सरकार गणेशोत्सव आणि शिमगोत्सव मध्ये डागडुजी करतात आणि कोकणकर आनंद मानतात पण आपण कधी विचार केलाय का? हा महामार्ग गणेशोत्सव आणि शिमगोत्सव पुरता मर्यादित नसून विकासाचा महामार्ग आहे. दळणवळण सुविधा नसल्याने कोकणात रोजगार नाही परिणामी गावच्या-गाव ओसाड पडून कोकणकरांनी पुणे -मुंबईची वाट पकडली. पण ही वाट पकडावीच का लागली कारण आपण कोकणकर आपल्या मागण्यांसाठी एकत्र झालोच नाही आणि याचाच फायदा लोकप्रतिनिधीनी घेतला. गणेशोत्सव करीता एसटी बुकिंग साठी, रेल्वे तिकीट साठी धडपड सुरु झालेय पण एसटी ने आपल्या गावी जाण्यासाठी रस्ता सुरक्षित आहे का? रेल्वे तिकीट मिळतोय का? तर याचा उत्तर आपल्याकडे नाही असच असेल. मग आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी, आपल्या महामार्गासाठी आपण पाठी का राहतोय? असा सवाल मुंबई गोवा महामार्गासाठी झटणाऱ्या जनआक्रोश समितीने केला आहे.
जनआक्रोश समिती तर्फे होमहवन
संकटे टाळण्यासाठी, सुखशांती आणण्यासाठी आपण आपल्या घरी होमहवन करतो. तसेच होमहवन आता या रखडलेल्या महामार्गाची आपल्याला करावयाचे आहे. त्यासाठी स्थळ आहे आता मागे न राहता २८ जुलै २०२४ रोजी माणगाव ST डेपोजवळ सकाळी ११:०० वाजता होमहवनकरीता एकत्रित येऊया आणि कोकणकरांची एकी दाखवूया असे आवाहन जनआक्रोश समितीचे सचिव रुपेश दर्गे यांनी केले आहे.
Proposal for Special Trains:कोकणातील गणेशभक्तांसाठी पश्चिम रेल्वेकडून एक खुशखबर आहे. मध्यरेल्वेने गणपती विशेष गाड्यांची यादी जाहीर केल्यानंतर पश्चिम रेल्वेनेही आपली गणपती विशेष गाड्यांची यादी तयार केली असून ती कोकण रेल्वे, मध्यरेल्वे आणि दक्षिण रेल्वेला मंजुरीसाठी पाठवली आहे. या यादीला या विभागांकडून हिरवा कंदील भेटल्यानंतर ती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. याआधी मध्यरेल्वेने जाहीर केलेल्या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण अवघे काही मिनिटातच फुल झाल्याने तिकिटे न मिळालेल्या प्रवाशांना आरक्षित तिकिटे मिळवण्याची अजून एक संधी भेटणार आहे.