Category Archives: कोकण

Konkan Railway: सावंतवाडी स्थानकाच्या नामकरणासाठी शासनातर्फे सकारात्मक हालचाली सुरू….

   Follow us on        

मुंबई:कोकणरेल्वेच्या सावंतवाडी स्थानकाचे ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ LMDT असे नामकरण करावे या कोकणकरांच्या मागणीला महाराष्ट्र शासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे या स्थानकाचे लवकरच नामकरण होईल अशी आशा निर्माण झाली आहे.

या स्थानकाच्या नामांतराची मागणी झाली तेव्हा एखाद्या रेल्वे स्थानकाचे नामांतर करावयाचे झाल्यास त्या राज्यातील शासनाने रेल्वे विभागाला तशी शिफारस करणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून उत्तर आले होते. त्यानुसार कोकण विकास समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिनांक ०३ जून २०२४ रोजी निवेदन सादर करून शासनातर्फे तशी शिफारस करण्याची विनंती केली होती. सरकारतर्फे या निवेदनाची दखल घेतली गेली आहे. दिनांक २७ जून रोजी राज्य गृह (परिवहन) विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या नामकरणाबाबत लिखित स्वरूपात त्यांचे अभिप्राय सादर करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यावरून मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेली ही मागणी लवकरच पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे.

कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय मधु दंडवते यांच्याकडे जाते. सावंतवाडी स्थानकाचे ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ LMDT असे नामकरण केल्यास त्यांच्या कार्याचा गौरव होईल यासाठी प्रयत्न चालू आहेत.

 

Loading

… तर येत्या विधानसभा निवडणुकीत NOTA पर्याय वापरू- जनआक्रोश समिती सभेत कोकणकरांचा ईशारा

   Follow us on        

मुंबई :मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्याच्या न पाळलेल्या तारखा, लोकप्रतिनिधींकडून मिळणारी पोकळ आश्वासने आणि नेहमीप्रमाणे पाहिल्याच पावसात महामार्गाची होणारी दयनीय अवस्था यामुळे वैतागलेला कोकणकर जनआक्रोश समितीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.

रखडलेला महामार्ग पूर्ण होण्याचे नाव घेत नाही. कोकणातील बहुतेक लोकप्रतिनिधी सत्ताधारी पक्षात असूनही ही अवस्था आहे. केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्री महाराष्ट्रातील असूनही ही परिस्थिती आहे. राज्य सरकारने जनतेला नको असलेले महामार्ग बनवण्याच्या अट्टहास धरला आहे. त्यांना मुंबई गोवा महामार्गाच्या परिस्थितीबद्दल देणे घेणे नाही. या सर्वांना वैतागून पुन्हा एकदा जनआक्रोश समिती आक्रमक झाली आहे. शनिवार दिनांक २९ जून रोजी समितीची निर्धार सभा मुंबई येथे पार पडली. या सभेत मुंबई गोवा महामार्गाच्या कामाच्या पूर्ततेसाठी आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी काही निर्णय घेण्यात आले.

प्रशासनाला जागे करण्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर माणगाव येथे २८ जुलै २०२४ रोजी जनआक्रोश समितीतर्फे होमहवन घालण्यात येणार आहे. तसेच दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. कोकणातील लोकप्रतिनिधी महामार्ग संदर्भात आवाज उठवीत नसल्याने त्यांच्या घरासमोर निदर्शन करून त्यांना जागे करण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

निवडणुकीवर बहिष्कार टाकणे

लोकसभेला ३७००० कोकणकरांनी नोटाला मतदान केले. विधानसभेला देखील कोकणातील उमेदवार यांच्या विरोधात NOTA मतदान करण्यात येईल असा सज्जड इशारा देण्यात आला.

 

 

Loading

गणेशभक्तांना खुशखबर: तब्बल १५ स्लीपर असलेल्या विशेष गाडीला ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

    Follow us on        
Konkan Railway News: या वर्षी उन्हाळी सुट्टीत कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांपैकी एका गाडीची सेवा या वर्षीच्या ऑक्टोबर अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १५ स्लीपर डबे असलेली ही गाडी यंदा कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना फायद्याची ठरणार आहे.
पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष गाडीची सेवा  दिनांक ३१ ओक्टोम्बर २०२४ पर्यंत विस्तारित करण्यात येणार आहे. या गाडीची सेवा दिनांक जून अखेरपर्यंत समाप्त होणार होती. मात्र प्रवाशांच्या प्रतिसादामुळे या गाडीचा ओक्टोम्बर अखेरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे.
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून दिनांक  दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल ती  मंगळुरू जंक्शनला  दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५  वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल  ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून गुरुवार आणि सोमवारी रात्री १० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २१:०५ वाजता पोहोचेल.गुरुवार आणि सोमवारी रात्री २२:१०  वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३ :०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Loading

Traffic block at LTT: कोकण रेल्वेच्या २ दैनिक गाड्यांची सेवा महिनाभरासाठी पनवेलपर्यंतच

   Follow us on        
Konkan Railway News : लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरील आठ नंबर प्लॅटफॉर्म वरील पिट लाईनच्या दुरुस्तीसाठी एका महिन्याचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक दिनांक ०१ जुलै ते ३० जुलै पर्यंत चालणार आहे. या ब्लॉक मुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन दैनिक गाड्यांची सेवा पनवेल स्थानकापर्यंत मर्यादित केली आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 16346 – तिरुअनंतपुरम – एलटीटी नेत्रावती एक्स्प्रेस आणि 12620 – मंगुळुरु – एलटीटी मत्स्यगंधा एक्स्प्रेस या दोन एक्सप्रेस गाड्यांची सेवा दिनांक ३०/०६/२०२४ ते ३०/०७/२०२४ पर्यंत पनवेल स्थानकावर संपविण्यात येणार आहे.
16345 एलटीटी – तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस आणि 12619  एलटीटी – मंगुळुरु मत्स्यगंधा एक्स्प्रेस या गाड्यांची सेवा पनवेल स्थानकापासून सुरु करण्यात येणार आहे. दिनांक ०१/०७/२०२४ ते ३०/०७/२०२४ पर्यंत 16345 एलटीटी – तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस दुपारी १२:५० तर 12619 एलटीटी – मंगुळुरु मत्स्यगंधा एक्स्प्रेस संध्याकाळी १६:२५ वाजता पनवेल स्थानकावरून सोडण्यात येणार आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावरील अजून एक गाडी आता एलएचबी कोचसहित धावणार; डब्यांच्या संख्येतही वाढ

   Follow us on        
Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी आणखी एक गाडी आता एलएचबी कोच सहित धावणार आहे. गाडी क्रमांक 12202 / 12201 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Kochuveli Garib Rath Express  ही गाडी उद्या दिनांक २३ जूनपासून एलएचबी कोचसहित चालविण्यात येणार आहे.
या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार एलटीटी मुंबई ते कोचुवेली या मार्गावर धावताना गाडी क्रमांक (12202) दिनांक 23 जून 2024 च्या फेरीपासून तर कोचुवेली ते एलटीटी मुंबई  या मार्गावर धावताना गाडी क्रमांक (12201) दिनांक 24 जून 2024 च्या फेरीपासून या नवीन बदलासह चालवण्यात येणार आहे.
डब्यांच्या संख्येत वाढ 
या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला असून डब्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. आतापर्यंत ही गाडी थ्री टायर एसी – 11, एसी चेअर कार – 02 आणि जनरेटर कार – 02 असे मिळून एकूण १५ डब्यांची चालविण्यात येत होती. आता त्यात बदल करून थ्री टायर इकॉनॉमी एसी – 16, एसी चेअर कार – 02 आणि जनरेटर कार – 02 असे मिळून एकूण 21 एलएचबी डब्यांची चालविण्यात येणार आहे.

Loading

कोकण रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी: कोकण रेल्वे मार्गावर ‘पॅच डबलिंग’ ची योजना

   Follow us on        

Konkan Railway News : दिवसेंदिवस वाढणारी प्रवासीसंख्या पाहता कोकण रेल्वे मार्गावर नवीन गाड्या चालविण्यात याव्यात यासाठी मोठी मागणी होत आहे. मात्र सिंगल रेल्वे रूळामुळे सध्या या मार्गावर गाड्या वाढवणे शक्य होत नाही. त्यामुळे याा मार्गाच्या दुहेेरीकरणाचा प्रस्ताव आला होता. परंतू या मार्गावर नैसर्गिक मर्यादा असल्याने आता ‘पॅच डबलिंग’ करण्याचा निर्णय कोकण रेल्वे महामंडळाने घेतला आहे. तसा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाकडे पाठवला असल्याची माहिती कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

पॅच डबलिंग म्हणजे काय? 

पॅच डबलिंग म्हणजे संपूर्ण मार्ग दुपदरीकरण न करता ज्या भागात शक्य आहे त्या भागांत दुहेरीकरण करणे. कोकण रेल्वे मार्ग कित्येक बोगद्यातून आणि पुलांवरून जात आहे. हे बोगदे आणि पुले सिंगल रूळांसाठी बांधण्यात आली आहेत. मार्गाचे दुपदरीकरण करताना या मार्गावर पुन्हा बोगदे पाडावे लागतील किंवा शक्य आहे तिथे रुंदीकरण करावे लागेल. नवीन पुले उभारावी लागतील. या गोष्टी खर्चिक आहेत. सपाट भागात मार्गाला दर किमी मागे 15 ते 20 कोटी तर डोंगराळ भागात दर किमीला 80 ते 100 कोटी इतका दुपदरीकरणाचा खर्च आहे. भविष्यात या गोष्टी कराव्याच लागतील मात्र सध्या ‘पॅच डबलिंग’ करून चांगल्या प्रमाणात कोकण रेल्वे मार्गावरील ताण कमी करणे शक्य होईल.

पॅचेसच्या स्वरुपात दुपदरीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सपाट आणि बोगदे नसलेल्या अशा 350 किमी मार्गापैकी काही पॅचेसवर दुपदरीकरण करण्याची योजना आहे.

कोकण रेल्वे मार्गावर गाड्या वाढविण्यासाठी अनेक मागण्या होत आहेत. मात्र कोकण रेल्वे आपल्या पूर्ण क्षमतेने चालविण्यात येत असून नवीन गाडी चालवणे शक्य नसल्याचे असे रेल्वे कडून उत्तर येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या मार्गावरील बहुतेक गाड्या खासकरुन कमी पल्ल्याच्या गाड्या आपले वेळापत्रक पाळत नाही आहेत. पॅच डबलिंग या समस्या सुटणार आहेत. त्याचबरोबर नवीन गाड्या चालविणे शक्य होणार आहे.

Loading

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर शनिवारी मुंबई – सावंतवाडी विशेष गाडी धावणार

Konkan Railway News:कोकण रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई  ते सावंतवाडी दरम्यान एक विशेष गाडी  चालविण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. 01171 /01172 सीएसएमटी – सावंतवाडी – सीएसएमटी ही स्पेशल गाडी येत्या शनिवारी चालविण्यात येणार आहे
01171 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून शनिवार दिनांक 22/06/2024 रोजी रात्री  00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 14.20 वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.
01172 स्पेशल सावंतवाडी रोडवरून शनिवार दिनांक 22/06/2024 रोजी 15.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
डब्यांची रचना: फर्स्ट क्लास एसी – 01, टू टियर एसी – 02, थ्री टियर एसी – 06, सेकंड स्लीपर – 01, जनरल- 06, एसएलआर – 02एकूण १८ कोच = फर्स्ट एसी – ०१ कोच, कंपोझिट (फर्स्ट एसी + २ टियर एसी) – ०१ कोच, २ टायर एसी – ०२ डबे, ३ टायर एसी – ०६ डबे, जनरल – ०६, एसएलआर – ०२.

Loading

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टीसींचा कोकण रेल्वेने केला सन्मान

   Follow us on        

रत्नागिरी : या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसाठी तब्बल 21 कोटी 17 लाख 80 हजार 741 रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेले काही काळ कोकण रेल्वेच्या मार्गावर अवैध आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या मंडळीविरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत कोकण रेल्वेच्या मार्गावर काम करणाऱ्या तिकीट तपासणीसांनी उत्कृष्ट कामगिरी  करत 78,115 कारवाया केल्या. यातून 21 कोटी 17 लाखांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्या आर्थिक वर्षात मार्गावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सर्व तिकीट तपासणीसांना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. संतोष कुमार झा यांनी गेल्या आर्थिक वर्षात तिकीट तपासणीसांनी केल्या कामगिरीचे कौतुक केले आहे.

Loading

मोठी बातमी: नारायण राणे यांची खासदारकी अडचणीत

   Follow us on        

मुंबई : लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातनिवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी विजय मिळवला. मात्र, नारायण राणेंची खासदारकी अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला आहे. त्यामुळे नारायण राणे यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर 5 वर्ष निवडणुक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी लादण्यात यावी, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाते नेते विनायक राऊत यांनी केली आहे. याबाबत, अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक ,अ‍ॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत कायदेशीर नोटिसही विनायक राऊत यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेली आहे.

निवडणूक प्रचार कालावधी 5 मे 2024 रोजी संपलेला असतांनाही भाजप कार्यकर्ते 6 मे रोजी देखील नारायण राणे यांचा प्रचार करीत होते, नारायण राणे समर्थक प्रचार संपलेला असतांनाही ई.व्ही.एम.मशीन दाखवून राणे साहेबांनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे या नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नारायण राणे यांचे पुत्र आमदार नीतेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले, “जर राणे साहेबांना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याचकडेच निधी मागायला यायचं आहे. त्यामुळे तेव्हा लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधी सुद्धा मिळणार नाही अशी धमकी 13 एप्रिल रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी दिली, त्याचाही उल्लेख या नोटिसमध्ये करण्यात आलेला आहे.

निवडणूक आचार संहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केलेला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगने चौकशी करावी, अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिसमधून केलेली आहे.

केंद्रीय निवडणुक आयोगाने 07 दिवसात या नोटिसवर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. तसेच भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल, असेही माजी खासदार विनायक राऊत यांनी म्हटले आहे. अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणुक निर्णय अधिकार्‍यांच्या मदतीने करण्यात आलेत हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे यांनी म्हटले म्हणाले.

 

 

Loading

मालवण: बांदिवडे त्रिंबक रस्त्याची अवस्था झाली दयनीय

   Follow us on        

मालवण: तालुक्यातील बांदिवडे ते त्रिंबक रस्त्याची अवस्था खूपच वाईट झाली आहे. येथील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत आहे. पाऊस अजून सुरू झाला नसताना रस्त्याची ही अवस्था असेल तर पुढील दोन महिन्यांत रस्ता खूपच धोकादायक बनणार आहे. त्यामुळे प्रशासनाने याची त्वरित दखल घेण्याची विनंती बांदिवडे ग्रामस्थांनी केली आहे.

बांदिवडे गावातील शाळेतील मुलांना तसेच ग्रामस्थांना रस्ता खराब असल्याने त्याचा खुपच त्रास सहन करावा लागत आहे. आजारी व्यक्तिंना आचरा किंवा मालवण येथे जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो. हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकारी व लोक नेत्यांनी लक्ष द्यावे अशी विनंती येथील बांदिवडे, पालयेवाडीतील सामाजिक कार्यकर्ते श्री. रमाकांत घाडीगावकर यांनी केली आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search