नागपूर: रेल्वेत प्रवाशांकडून वातानुकूलित (एसी) कोचला जास्त मागणी असल्याने ‘स्लिपर कोच’ कमी करून ‘एसी कोच’ वाढवले गेले, असा दावा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केला.
मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी मध्य रेल्वेसह देशभरात प्रवासी गाड्यांमधील सातत्याने स्लिपर कोच कमी होऊन वातानुकूलित ‘थ्री टायर एसी कोच’ वाढत असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यावर राम करण यादव पुढे म्हणाले, रेल्वेत सातत्याने प्रवाशांकडून ‘स्लिपर’च्या तुलनेत ‘थ्री टायर एसी’ची मागणी जास्त वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे वातानुकूलित कोच वाढवले गेले.
देशातील काही ठिकाणी मागणीनुसार ‘स्लिपर कोच’च्याही गाड्या चालवल्या जात आहेत. त्यातच सध्या ‘एसी थ्री टायर’ आणि ‘स्लिपर कोच’मधील सीटच्या प्रवासी भाड्यात खूप जास्त फरक नाही. रेल्वेकडून सातत्याने पायाभूत सुविधा बळकट केली जात असून थ्री लाईन, फोर लाईनसह इतरही कामांना गती दिली गेली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मग कमी झालेल्या पॅसेंजर रेल्वे पुन्हा चालवण्याबाबत प्रक्रिया होण्याची आशा आहे. मध्य रेल्वेत अमृत भारत योजनेअंतर्गत १५ रेल्वे स्थानकांचा विकास होत असल्याचेही यादव म्हणाले.
महाव्यवस्थापकांचा दावा कितपत योग्य?
कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या आणि मांडवी या दोन गाड्यांचे दोन स्लीपर डबे कमी करून त्या जागी दोन ‘ईकाॅनाॅमी थ्री टायर एसी’ चे डबे जोडले गेले आहेत. या दोन्ही गाड्या मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर चालवते. या गाड्यांना स्लीपर कोचपेक्षा एसी कोचला जास्त मागणी होती हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. कारण या गाड्यांच्या स्लीपर कोच च्या तिकीट चार महिने आगावू बूक करताना भेटणे मुश्किल होत असे. मग मागणी कमी कशी असा प्रश्न प्रवाशांकडून विचाराला जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्लीपर श्रेणी आणि थ्री टायर एसी यांच्या तिकीट दरांमध्ये जास्त फरक नाही असे महाव्यवस्थापक बोलत आहेत. पण खरे पाहता थ्री टायर एसी चे प्रवासभाडे स्लीपर श्रेणीपेक्षा जवळपास तिप्पट आहे. त्यामुळे त्यांचा हा दावा पण चुकीचा आहे असे प्रवाशांकडून बोलले जात आहे.
मुंबई: रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील सहा विधानसभा मतदारांतून प्रत्येकी अडीचशे या प्रमाणे दीड हजार रामभक्तांना आम्ही अयोध्यावारी घडविणार आहोत. त्यासाठी ८ फेब्रुवारीला पनवेल येथून विशेष ट्रेन सुटेल आणि १० फेब्रुवारीला अयोध्यानगरीत श्रीराम दर्शन घेता येईल. तसेच सकाळच्या महाआरतीमध्येही सहभागी होता येणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.
श्री. जठार म्हणालेत ८ फेब्रुवारीला पनवेल येथून विशेष ट्रेन सुटेल आणि १० फेब्रुवारीला अयोध्यानगरीत श्रीराम दर्शन घेता येईल. तसेच सकाळच्या महाआरतीमध्येही सहभागी होता येणार आहे
या ट्रेनचा प्रमुख आपण आणि स्थानिक नेते असणार आहेत. विधानसभा प्रमुख सावंतवाडी राजन तेली, कणकवली आ. नितेश राणे, कुडाळ येथून निलेश राणे, रत्नागिरी बाळ माने या नेत्यांकडे त्या त्या मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर या इच्छुक राम भक्तांनी या ट्रेनमधून अयोध्या वारी करण्यासाठी भाजपच्या तालुकानिहाय मंडल अधिकारी तथा तालुकाध्यक्षांकडे संपर्क साधावयाचा आहे असे ते पुढे म्हणालेत.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या सोमवारी आणि मंगळवारी दिनांक ०५ आणि ०६ फेब्रुवारी रोजी कोकण रेल्वेच्या वेर्णा ते माजोर्डा या विभागां दरम्यान रेल्वेच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. एकूण दोन तास हा मेगाब्लॉक चालणार आहे. या मेगाब्लॉक मुळे सोमवार दिनांक ५ फेब्रुवारीला मुंबई सिएसएमटी वरून सुटणाऱ्या गाडी क्रमांक 22229 Mumbai CSMT – Madgaon Jn. Vande Bharat या गाडीच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून ही गाडी रत्नगिरी ते करमाळी या स्थानकांदरम्यान सुमारे १ तास उशिराने चालविण्यात येणार आहे.
आंबोली: परप्रांतीय मोठ्याप्रमाणात कोकणात जमिनी विकत घेत आहेत. एक चांगली गुतंवणूक म्हणून जमिनी खरेदी करण्यात येत आहेत. तर काही बांधकाम व्यावसायिक जमिनी विकत घेऊन तेथे इमारतीची बांधकामे करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असून कोकणच्या निसर्गाला हानी पोहचत आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ आंबोली येथेही असेच प्रकार चालू असल्याने येथील ग्रामस्थ जागरूक झाले आहेत. काल दिनांक ३१ जानेवारीला आ बोली ग्रामपंचायत कार्यालय येथे आंबोलीतील गावठण फौजदारवाडी ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी बाहेरच्या तसेच परप्रांतीय लोकांना जमिनी विकण्यास मज्जाव करण्याबाबत ठराव घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना स्वाक्षरींचे निवेदन दिले. जमीन ही गावची असल्याने विकण्याचा कोणाला अधिकार नाही, असा ठराव घेण्यात आला. आंबोलीतील बाकी वाडीतील ग्रामस्थांनाही गावातील जमीन विक्रीला पायबंद घालण्याची मागणी केली आहे.
गावातील १५ एकर जागा परस्पर विकल्याचा आरोप
आंबोली असलेला कबुलायतदार गावकर जमिन प्रश्न शासन दरबारी सुटण्याच्या मार्गावर असल्याचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर हिरण्यकेशी रस्त्यालगत १५ एकर जागा गावाबाहेरील व्यक्तींना काही स्थानिकांनी परस्पर विकल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. संबंधित जागेत जेसेबीने सपाटीकरण सुरू आहे. याविरोधात गावठण ग्रामस्थांनी एल्गार केला असून ते अतिक्रमविरोधात एकवटले. प्रशासनाला स्वाक्षरींचे निवेदन देऊन जिल्ह्याधिकाऱ्यांनी तत्काळ पंचनामे करावे; अन्यथा आंबोली ग्रामस्थांतर्फे आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
गावातील १९९९ नंतर विकलेल्या सर्व जागेचा सर्व्हे व्हावा तसेच तलाठी कार्यालयात भ्रष्टाचार करून घातलेल्या नोंदी काढून टाकाव्यात आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ यावर आदेश काढून पंचनामे करावेत आणि गाव वाचवावे, अशी मागणी गावठणवाडी ग्रामस्थांनी केली. दरम्यान, सरपंच सावित्री पालेकर, सदस्य काशीराम राऊत, ग्रामसेवक संदीप गोसावी, तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास गावडे, प्रकाश गुरव, बबन गावडे, बाळकृष्ण गावडे, अंकुश राऊत, कांता गुरव, प्रथमेश गावडे, मोतीराम सावंत, रंजना गावडे, काशीबाई गावडे, सुनील राऊत, दीपक मेस्त्री, शंकर गावडे, अमित गुरव, राकेश अमृस्कर, झिला गावडे आदी उपस्थित होते.
रत्नागिरी : कोकण रेल्वेमधून प्रवास करताना चिपळूण – रत्नागिरी ही स्थानके आली कि खास करून वडापाव विकणारे फेरीवाले मोठ्या प्रमाणात गाडीत चढून वडापाव विक्री करतात. प्रवासी पण रास्त किंम्मत आणि गरम असल्याने हे वडापाव खरेदी करतात. मात्र हे फेरीवाले प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
समाज माध्यमांवर एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. एक वडापाव विक्रेता विक्रीस आणलेल्या वडापाव च्या ट्रे वर पाय ठेवून झोपला असल्याचा हा किळस आणणारा हा फोटो आहे. हा फोटो चिपळूण स्थानकावरील असल्याचे बोलले जात आहे.
या प्रकारामुळे कोकण रेल्वेच्या प्रवाशांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. रेल्वे कॅन्टीन च्या विक्रेत्यांकडून असे किळसदायक प्रकार घडल्याचे अनेक प्रकार समोर आले होते. त्यामुळे प्रवासी वर्ग या बाहेरील विक्रेत्यांकडून खाद्यपदार्थ घेत असे. मात्र इथेही असे अनुभव येत असल्याने प्रवासादरम्यान खाद्यपदार्थ घ्यावे कि न घ्यावे हा प्रश्न साहजिकच त्यांना पडला आहे. हे विक्रेते बहुतेक करून परप्रांतीय आहेत. विकताना ते असे किळसवाणे प्रकार करत असतील तर हे खाद्यपदार्थ बनवताना स्वच्छतेचे किती मापदंड पाळत असतील हा प्रश्न समोर आला आहे.
जाने. ३० : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या २०२४-२५ साठीच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून मराठा शासन काळातील लष्करीदृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी (दि. २९ जानेवारी) ही माहिती दिली. मराठा राजवटीत शत्रूशी झुंज देण्यासाठी ज्या १२ किल्ल्यांचा लष्करी तळासाठी वापर केला, त्या किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळण्यासाठी भारताकडून नामांकन मिळाले आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे.
Suvarnadurg-Fort.jpg
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, १७ व्या आणि १९ व्या शतकात मराठा शासन काळात या किल्ल्यांचा वापर करून राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला. सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात एकूण ३९० छोटे-मोठे किल्ले आहेत. त्यापैकी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी १२ किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून १२ पैकी आठ किल्ल्यांचे याआधीच संवर्धन करण्यात आलेले आहे.
Sindhudurg Fort
छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ व्या शतकात किल्ल्यांचा आधार घेत शत्रूला नामोहरण केले, त्यानंतर १८१८ पर्यंत पेशव्यांनी लष्करी कारवाया करण्यासाठी किल्ल्यांचा आधार घेतला.
Panhala Fort
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणीमध्ये होत असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आला आहे. भारतातील ४२ ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी सहा ठिकाणे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
वाशी, २९ जानेवारी : कोकणातील हापूस वाशी बाजारात दाखल व्हायला सुरूवात झाली आहे. वाशी बाजार समितीमध्ये जानेवारी महिन्यात हापूसची विक्रमी आवक झाली आहे. यावर्षी जानेवारीत बाजार समितीमध्ये विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. प्रतवारीनुसार या आंब्याला प्रतिपेटी सात हजार ते १२ हजारांचा दर मिळत आहे.
अद्याप आंबा हंगामाला पूर्णपणे सुरूवात झालेली नाही. दरवर्षी जानेवारी महिन्यात हापूसची २५ ते ३० पेट्यांची आवक होत असते. मात्र, यंदा जानेवारी महिन्यात वाशी बाजारात हापूसच्या विक्रमी ३६० पेट्यांची आवक झाली आहे. या आंब्याला दरही चांगला मिळत आहे.
अवकाळी पावसामुळे बऱ्याच ठिकाणी आंब्याचा मोहराची गळ झाली होता. तसेच बुरशीजन्य रोग आणि रसशोषक कीडींचाही प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे आंबा पिकाचे नुकसान झाले. पावसामुळे मोहर गळ झाल्याने पुनर्मोहराची प्रकिया लांबली. परिणामी फळ तयार होण्याच्या प्रक्रियेलाही उशीर झाला. परंतु काही भागात अवकाळीचा फटका बसूनही योग्य व्यवस्थापनामुळे फळ वेळेत तयार झाले आहे.
मागील वर्षी आंब्याचे उत्पादन घटले होते. त्यामुळे यंदाच्या हंगामात आंब्याचे चांगल्या प्रमाणत उत्पादन राहील, असा अंदाज व्यापाऱ्यांना होता. मात्र, मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसामुळे एप्रिलमध्ये येणाऱ्या आंब्याचा मोहर काळा पडला. याशिवाय रसशोषक कीडीचाही मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे एप्रिलच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.
Konkan Railway News: कोकणात गावी जाण्यासाठी कोकणवासीयांची आणि गोवेकरांची पहिली पसंद असलेल्या कोकणकन्या आणि मांडवी एक्सप्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. या गाड्यांचे २ स्लीपर डबे कमी करून त्या जागी इकॉनॉमी २ थ्री टायर एसी डबे जोडले जाणार आहेत. हा बदल कायमस्वरूपासाठी करण्यात येणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक १०१०४/१०१०३ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. “मांडवी” एक्सप्रेस आणि ट्रेन क्र. २०११२ /२०१११ मडगाव जं. – मुंबई सीएसएमटी – मडगाव जं. कोकणकन्या एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांत हा बदल दिनांक ०१ फेब्रुवारी २०२४ गुरुवारपासून पासून अमलांत आणला जाणार आहे.
श्रेणी
सध्याची संरचना
सुधारित संरचना
बदल
(फर्स्ट एसी + टू टियर एसी संयुक्त )
01
01
बदल नाही
टू टियर एसी
01
01
बदल नाही
थ्री टायर एसी
04
04
बदल नाही
इकॉनॉमी थ्री टायर एसी
00
02
02 डबे वाढवले
स्लीपर
09
07
02 डबे कमी केले
जनरल
04
04
बदल नाही
एसएलआर
01
01
बदल नाही
पेन्ट्री कार
01
01
बदल नाही
जनरेटर कार
01
01
बदल नाही
एकूण
22 LHB
22 LHB
कोकणातील प्रवाशांकडून नाराजीचे सूर
या गाड्यांचे सेकंड स्लीपर डबे कमी केल्याने कोकणातील प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होताना दिसत आहे. या आधी या गाडीला ११ स्लीपर डबे होते त्यानंतर ते ९ वर आणलेत. आता तर त्यातही कपात करून ७ वर आणले आहेत. याचा खूप मोठा तोटा कोकणातील सामान्य प्रवाशांना सोसावा लागणार आहे. कारण त्यावरील श्रेणीचे तिकीट त्यांना परवडणारे नाही. आधीच तिकीट मिळणे खूप कठीण त्यात हे डबे कमी केल्याने अधिकच कठीण झाले आहे.
गोवा आणि दक्षिणेकडील प्रवाशांचे हित नजरेसमोर ठेवून असे बदल होत असतील तर कोकण रेल्वे नक्की कोणासाठी हा प्रश्न आता विचारण्यात येत आहे.
सावंतवाडी दि. २७: विविध मागण्यांसाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई व कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह सहयोगी २३ संस्थांच्या वतीने काल झालेलया लाक्षणिक उपोषणाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. स्थानिक तसेच मुंबईहून चाकरमानी पण मोठ्या संख्येत आले होते. हजारो नागरिकांनी उपोषणास उपस्थिती दर्शविली.
कोकण रेल्वे कडून समाधानकारक उत्तरे नाहीत
दरम्यान, कोंकण रेलवे कॉपर्पोरेशन लि. रत्नागिरीचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रविंद्र कांबळे यांच पत्र घेऊन कोकण रेल्वेचे कणकवली येथील अधिकारी घनश्याम उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले. यावेळी रेल्वे प्रशासनान दिलेलं हे पत्र म्हणजे प्रवाशांची केवळ फसवणूक करण्याचा प्रकार आहे. आमच्या मागण्यांबाबत यात कोणतीही स्पष्टता नाही. यात सूरु असणाऱ्या रेल्वे गाड्यांचीच माहिती आहे. आमच्या इतर मागण्या तुमच्या अधिकारात नाही तर हे पत्र घेऊन तरी का आलात ? रेल्वे प्रशासन आम्हाला मुर्ख समजत का ? असा सवाल उपोषणकर्त्यांनी केला.
केंदीय मंत्री नारायण राणे यांचे आश्वासन
माजी आमदार राजन तेली यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी भ्रमणध्वनीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संवाद साधून दिला. नारायण राणे यांनी फेब्रुवारीच्या पाहिल्या आठवड्यात संघटनेच्या प्रतिनिधींची भेट घालून देवून काही प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने उपोषण स्थगित केले.
लाक्षणिक उपोषण की ‘रेल रोको’?
रेल्वे प्रशासनाने या उपोषणाला ‘रेल रोको’ असे नाव देण्याचा कुटील खेळ खेळल्याचा प्रकार घडला. आंदोलनास ‘लाक्षणिक उपोषण’ च्या जागी ‘रेल रोको’ आंदोलन असे नाव दिल्यास नागरिक घाबरून या आंदोलनास उपस्थिती दाखवणार नाही असा या मागे हेतू होता. मात्र रेल्वे प्रशासनाचा हा हेतू साध्य झाला नाही. उलट या उपोषणास अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी जमली होती.
मुळात उपोषणाची माहिती अगोदर एक महिना आगाऊ सूचना देऊन पोलीस खात्याला फक्त उपोषण आहे असे सांगितले होते मात्र कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सुद्धा रेल रोको आणि रस्ता रोको आंदोलन होणार आहे अशी दिशाभूल करणारी माहिती दिली तसेच एवढ्यावरती न थांबता तेच पत्र उपोषण करताना मंडपात आणून दिले आमच्या मागण्या काय होत्या कशा होत्या त्या विकृतपणे कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी आपल्या मनाने लिहिल्या असा आरोप कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी केला आहे.
आमरण उपोषणचा इशारा
उपोषण स्थगित केले असले तरीही मागण्या मान्य न झाल्यास २३ फेब्रुवारी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष अॅड संदीप निंबाळकर यांनी दिला.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, सावंतवाडीकरांच्या हक्काची रेल्वे आहे. यासाठी माजी आमदार जयानंद मठकर, डी.के.सावंत यांसह सावंतवाडीकरांनी योगदान दिलं आहे. आपल्या जमिनी यासाठी दिल्यात. त्यामुळे कोकण रेल्वे व सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस उभारणी एका टप्प्याच काम पूर्ण झालेले असताना दुसऱ्या टप्प्याच काम निधी अभावी रखडलं आहे. लोकांची फसवणूक करण्याच काम स्थानिक आमदारांकडून केलं जातं आहे अशी टीका त्यांनी केली. तर रेल्वे रोको पेक्षा जिल्ह्यातील मंत्र्यांची गाड्या रोखा असं विधान माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर यांनी केल. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीचे शांताराम नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, प्रवासी संघटनेचे राजू कांबळे, सुनील उतेकर,कमलताई परूळेकर, युसुफ आर्ते, अँड देवदत्त परूळेकर, रमेश बोंद्रे, अभिमन्यू लोंढे, अँड नकुल पार्सेकर सागर तळवडेकर,सागर नाणोसकर,सिमा मठकर,आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील गावांचे सरपंच यांसह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. रेल्वे टर्मिनस पूर्ण झालच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईचे अध्यक्ष शांताराम नाईक, प्रमुख राजू कांबळे, संजय सावंत, रुपेश दर्गे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, श्वेता शिरोडकर, अण्णा केसरकर, यशवंत जडयार, प्रमोद गावडे,अभिमन्यू लोंढे, शेखर पाडगांवकर, भाई देऊलकर, महेश परूळेकर, बाळासाहेब बोर्डेकर, रमेश बोंद्रे, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, महेंद्र सांगेलकर, अँड. नकुल पार्सेकर, सागर नाणोसकर, सागर तळवडेकर, भुषण बांदिवडेकर, रविंद्र ओगले, प्रमोद गावडे,विहंग गोठोस्कर, देव्या सुर्याजी, वजराठ ग्राम पंचायत सरपंच अन्यण्या पुराणिक, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, दीपेश परब,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, नेमळे सरपंच.सौ भैरे,,निरवडे सरपंच.सुहानी गावडे आरोंदा उपसरपंच ,मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, गुरू गावकर, श्री तानावडे,किरण मातोंडकर, समीर मातोंडकर, राधा तळवडेकर, सुधीर राऊळ, हिदायतुल्ला खान, निलेश कुडव, स्नेहल जामदार, सुधीर पराडकर, सीमा मठकर, कल्पना बांदेकर, सायली दुभाषी, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, बाळा गावडे, सिद्धेश सावंत, विनायक गांवस, राज पवार, सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर, सुरेश गावडे, गुणाजी गावडे, गुरुप्रसाद गवंडे, समीर वंजारी, रफिक मेमन,मुंबईतून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे शेखर बागवे,बाळ वेळकर,दिपक चव्हाण,सुभाष लाड,श्रीकांत सावंत,अभिषेक अनंत शिंदे,राजाराम कुंडेकर,सुरेंद्र पवार,प्रशिल लाड,अतुल चव्हाण,अशोक देवरूखकर,संदेश लाड,पराग लाड,संजना पालव,मनोज पिंपळकर,रंजन पाळेकर, शेखर पाडगावकर, प्रमोद गावडे, चंद्रकांत कासार,बाळा गावडे,वसंत धुरी, जगन्नाथ पंडित, उदय पारीपत्ते, शांताराम (बाबू) पंडित, शिवराम पंडित आदी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले होते.
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाचे संरेखन अखेर निश्चित केले आहे. कोल्हापूर ते सावंतवाडी दरम्यान लागणाऱ्या आंबोली घाटाखालून हा महामार्ग येणार आहे. आंबोली घाटातून मोठा बोगदा खोदला जाऊन तेथून हा महामार्ग जाणार असल्याने कोल्हापूर ते कोकण अंतर १ तासात गाठणे शक्य होणार आहे.
सध्या आंबोली घाटातून वाहतूक खूप धीम्या गतीने होते. पावसाळ्यात अनेकदा वाहतूक धोक्याची होते. दरी कोसळल्याने वाहतूक कित्येकदा बंद होते. मात्र शक्तीपीठ महामार्ग झाल्यास पश्चिम महाराष्ट्र आणि तळकोकण जवळ येणार आहे.
समृद्धी महामार्गापेक्षाही मोठा नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग बांधण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात जोडणारा महामार्ग असावा, यातून एमएसआरडीसीने समृद्धी महामार्गाची संकल्पना पुढे आणली. त्यातही विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील धार्मिक स्थळांना, देवस्थानांना जोडणारा आणि तेथील पर्यटनासह सर्वांगीण विकासाला चालना देणारा महामार्ग असावा. यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग एमएसआरडीसीने हाती घेतला आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सध्या सल्लागार कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. येत्या सहा महिन्यात हा आराखडा तयार होण्याची शक्यता आहे.