Konkan Railway News , ०७/०३/२०२४: यंदा होळी सण साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी रेल्वेकडून एक खुशखबर आहे. कोकण रेल्वे मार्गावर उधना-मंगुळुरु आणि सूरत-करमाळी अशा दोन विशेष गाड्यां चालविण्यात येणार आहेत. या गाड्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
1) Train No. 09057 / 09058 Udhna Jn. – Mangaluru Jn. – Udhna Jn. Bi- Weekly Special on Special Fare:
ही गाडी उधना आणि मंगुळुरु या स्थानकांदरम्यान विशेष शुल्कासह चालविण्यात येणार आहे.
Train no. 09057 Udhna Jn. – Mangaluru Jn. Bi-Weekly Special on Special Fare:
दिनांक २०/०३/२०२४(बुधवार) आणि २४/०३/२०२४ (रविवार) या दिवशी ही गाडी उधना या स्थानकावरुन रात्री ०८:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ०७:०० वाजता मंगुळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09058 Mangaluru Jn. – Udhna Jn. Bi-Weekly Special on Special Fare
दिनांक २१/०३/२०२४(गुरुवार) आणि २५/०३/२०२४ (सोमवार) या दिवशी ही गाडी मंगुळुरु या स्थानकावरुन रात्री १०:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:०५ वाजता उधना या स्थानकावर पोहोचेल.
एकूण २२ डबे = टू टायर एसी – ०१+ थ्री टायर एसी – ०३ + सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४, एसएलआर – ०२
2) Train no. 09193 / 09194 Surat – Karmali – Surat Special on Special Fare (Weekly) :
ही गाडी सुरत आणि करमाळी या स्थानकांदरम्यान विशेष शुल्कासह चालविण्यात येणार आहे.
Train no. 09193 Surat – Karmali Special on Special Fare (Weekly):
गुरवार दिनांक २१/०३/२०२४ आणि २८/०३/२०२४ या दिवशी ही गाडी सुरत या स्थानकावरुन संध्याकाळी ७:५० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी दुपारी १२:०० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09194 Karmali – Surat Special on Special Fare (Weekly)
शुक्रवार दिनांक २२/०३/२०२४ आणि २९/०३/२०२४ या दिवशी ही गाडी करमाळी या स्थानकावरुन दुपारी ०२:४५ वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०८:४५ वाजता सुरत या स्थानकावर पोहोचेल.
एकूण २२ डबे = टू टायर एसी – ०१+ थ्री टायर एसी – ०३ + सेकंड स्लीपर – १२, जनरल – ०४, एसएलआर – ०२
आरक्षण
या गाड्यांचे आरक्षण दिनांक ०९/०३/२०२४ या दिवशी तिकीट खिडक्यांवर आणि ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेत स्थळास भेट द्यावी किंवा NTES अँप्लिकेशन डाउनलोड करावे असे आवाहन कोंकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
होळीसाठी कोकण रेल्वेमार्गावर गुजरातहून अजून दोन विशेष गाड्या; आरक्षण 'या' तारखेपासून – Kokanai
रत्नागिरी: कोकणातील ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा पायाभूत विकासाकरीता शाश्वत वाढीव निधी उपलब्ध होण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत तीर्थक्षेत्रांना सुमारे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर या प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश आहे.
अयोध्यास्थित प्रभू श्रीराम जन्मभूमी मंदिर विकास या संकल्पनेच्या धर्तीवर महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महत्वपूर्ण अशा ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेस मंजुरी देण्यात आली. या योजनेतंर्गत कोकणातील ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांना दोन कोटीऐवजी पाच कोटींचा विकासनिधी उपलब्ध करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी भाविक आणि यात्रेकरूंना विविध सोयीसुविधा पुरवणे आवश्यक आहे; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंजा उत्पन्नामुळे या सोयीसुविधा पुरवणे शक्य होत नाही म्हणून शासनाने ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी पाच कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तीर्थक्षेत्रांना नवीन प्रस्तावित निकषाप्रमाणे ३ कोटी इतका निधी मंजूर करण्यात येणार आहे. प्रादेशिक योजनेत आणखी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या निधीमधून विविध सुविधा निर्माण करण्यास मदत होणार आहे. त्यामध्ये तीर्थक्षेत्राकडे जाणारे रस्ते, पथदीप, मंदिर परिसर, संरक्षक भिंत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, स्नानगृह, भाविकांसाठी भक्तनिवास, परिसर सुशोभीकरण, वृक्षारोपण, वाहनतळ यासंह पर्यटकांची सुरक्षितता, अशा विविध सुविधा या ठिकाणी करता येणार आहेत.
Konkan Railway News , ०६/०३/२०२४: शिगमोत्सव म्हणजे गणेश चतुर्थी नंतर कोकणात साजरा केला जाणार मोठा सण. हा सण साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी आपल्या घरी जातात. या निमित्ताने कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे प्रशासन विशेष गाड्या चालवते. यंदाही होळी सणाकरिता कोकण रेल्वेने पश्चिम रेल्वेच्या साहाय्याने या मार्गावर एक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Train no. 09412 / 09411 Ahmedabad Jn. – Madgaon Jn. – Ahmedabad Jn. Special on Special Fare (Weekly) :
ही गाडी अहमदाबाद आणि मडगाव या स्थानकांदरम्यान विशेष शुल्कासह यामार्गावर चालविण्यात येणार आहे.
Train no. 09412 Ahmedabad Jn. – Madgaon Jn. Special on Special Fare (Weekly):
दिनांक १९/०३/२०२४ आणि २६/०३/२०२४ मंगळवारी ही गाडी अहमदाबाद या स्थानकावरुन सकाळी ०९:३० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०५:३० वाजता मडगाव या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09411 Madgaon Jn. – Ahmedabad Jn. Special on Special Fare (Weekly)
दिनांक २०/०३/२०२४ आणि २७/०३/२०२४ बुधवारी ही गाडी मडगाव या स्थानकावरुन सकाळी ०८:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी सकाळी ०७:०० वाजता अहमदाबाद या स्थानकावर पोहोचेल.
या गाडीचे आरक्षण ०८/०३/२०२४ पासून सर्व टिकेट्स खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.
अधिक माहितीसाठी www.enquiry.indianrail.gov.inga या संकेत स्थळास भेट द्यावी किंवा NTES अँप्लिकेशन डाउनलोड करावे असे आवाहन कोंकण रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी : मंगळुरू ते मडगाव मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित भारमान मिळत नसल्याने मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या मंगळूरूपर्यंत विस्ताराचा घाट घातला जात आहे. या हालचालींना मुंबईपासून रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गसह गोव्यातूनही मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहे. कोकण विकास समितीने या हालचालींच्या विरोधात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पत्रव्यवहार करून तीव्र विरोध दर्शवत चांगली चालत असलेली गाडी विस्तारित करण्याऐवजी काही चांगले पर्याय देखील सुचवले आहेत.
अलीकडेच सुरू करण्यात आलेल्या मंगळूर मडगाव (२०६४५/२०६४६) वंदे भारत एक्सप्रेसला अपेक्षित भारमान मिळत नसल्याच्या कारणामुळे सुरुवातीपासूनच ९८ ते १००% प्रवासी भारमान मिळत असलेली मुंबई सीएसएमटी ते मडगाव ही वंदे भारत एक्सप्रेस(२२२२९/२२२३०) मंगळूरपर्यंत विस्तारित करण्याची मागणी दक्षिण कन्नडाचे खासदार नलीन कुमार कातिल यांनी रेल्वे मंत्रालयाकडे केली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार रेल्वे मंत्रालयस्तरावर देखील या दृष्टीने विचार होऊ लागला आहे. मात्र, याला कोकणसह गोव्यातून प्रचंड प्रमाणात विरोध होऊ लागला आहे.
मुंबई ते गोवा दरम्यान चालणाऱ्या (२२२२९/२२२३०) वंदे भारत एक्सप्रेसला सध्या मिळणारा प्रतिसाद पाहता ही गाडी आठ कोच ऐवजी सोळा कोच सहित चालविण्याची आवश्यकता आहे. मात्र हीच गाडी पुढे मंगळूरूपर्यंत चालविल्यास अनेक समस्या निर्माण होतील. त्यापेक्षा मंगळूर मडगाव (२०६४५/२०६४६) वंदे भारत एक्सप्रेसचा विस्तार मुंबई पर्यंत करून तिला कोकणातील चिपळूण, कुडाळ, सावंतवाडी या स्थानकांवर थांबा देण्यात यावा असा पर्याय कोकण विकास समितीने सुचवला आहे.
सिंधुदुर्ग, संपादकीय : नुकतीच बहुचर्चित नागपूर पत्रादेवी शक्तीपीठ एक्सप्रेसची अधिसूचना महाराष्ट्र राज्य विकास महामंडळ MSRTC तर्फे जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी समजण्यात येणारा हा मार्ग राज्यातील सर्वात लांब महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. एकूण 11 जिल्ह्यातून जाणारा महामार्गामुळे नागपूर गोवा हे अंतर फक्त 8 तासांवर येणार आहे. महाराष्ट्रातील साडे तीन शक्तिपीठांमधील तीन पूर्ण शक्तीपीठे म्हणून मान्यता असलेली माहुरची रेणुका माता, तुळजापूरची आई भवानी व कोल्हापूरची महालक्ष्मी देवी ही जोडली जाणार आहेत. या महामार्गाने पर्यटन विकास होणार असल्याचा सरकारचा दावा आहे.
कोकणाला किती फायदा?
हा महामार्ग तळकोकणातून जाणार असल्याने त्याचा फायदा कोकणच्या पर्यटन वाढीस होणार असल्याचा दावाही केला जात आहे. महामार्ग जेथून जातो त्या भागाचा विकास होतो ही गोष्ट साहजिक आहे. मात्र आखणी करताना एखाद्या भागाचा विचार करून त्याप्रमाणे आखणी केली असती तर त्या भागाचा किंवा प्रदेशाचा अधिक विकास होतो. मात्र या महामार्गाचा आराखडा बनवताना कोकणचा विकास किंवा कोकणच्या पर्यटनाचा विकास या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या गेल्या नसल्याचे दिसत आहे.
गोव्याला तारक; कोकणास मारक
हा मार्ग कोल्हापूरहून फणसवडे, घारपी आणि बांदामार्गे सरळ गोव्याच्या सीमेला मिळणार आहे.या मार्गात कोकणातील एकही पर्यटनस्थळ किंवा शहर लागत नाही आहे. आंबोली घाटातही बोगदा पाडून हा मार्ग पुढे येणार आहे. त्यामुळे आंबोली पर्यटनस्थळ सुद्धा पर्यटकांना या मार्गात भेटणार नाही. या कारणाने नागपूर किंवा पाश्चिम महाराष्ट्रातून येणारा पर्यटक हा महामार्गामुळे सरळ गोव्यात जाणार आहे. त्यामुळे कोकण पेक्षा गोव्याच्या पर्यटनास या महामार्गाचा अधिक फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सध्याच्या कोल्हापूर आंबोली या मार्गाने गोव्याला जाणारा पर्यटक नवीन एक्सप्रेस मार्गाचा वापर करणार असल्याने त्याचा आंबोली आणि सावंतवाडी पर्यटन स्थळांवर विपरीत परिणाम होणार आहे.
आंबोली ते सावंतवाडी इंटरचेंज गरजेचा
महामार्ग सावंतवाडी शहरातून किंवा शहराच्या अगदी जवळून गेला असता तर त्याचा खूप मोठा फायदा सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या विकासाला झाला असता. काही बाबींमुळे हे जर शक्य नसेल तर या महामार्गाला एक इंटरचेंज सांगलीच्या धर्तीवर किंवा आता आजरावासिय मागत आहेत त्या धर्तीवर सावंतवाडी साठी द्यावा. जेणेकरून सिंधुदुर्ग चे पर्यटन बहरेल आणि सिंधुदुर्ग वासियांना आणि कोकण वासियांना धार्मिक पर्यटनासाठी अजून एक महामार्ग उपलब्ध होईल असे मत येथील स्थानिक श्री. सागर तळवडेकर यांनी केली आहे.
गेली १७ वर्षे कोकण रेल्वे प्रवाशांसाठी तसेच इतर कोकणातील प्रश्नांसाठी लढणार्या कोकण रेल्वे प्रवासी संघाचे श्री. राजू कांबळे आणि ईतर कार्यकर्त्यांनी काल आई भराडी देवीच्या जत्रेला हजेरी लावून ६२५ नारळांचे तोरण देवीस अर्पण करून कोकणवासियांनी प्रशासनाकडे केलेल्या मागण्या पूर्ण होवो असे साकडे घातले.
मागण्यांचे फलक चर्चेत
कोकणातील प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघातर्फे विविध मागण्या रेल्वे प्रशासनाकडे ठेवण्यात आल्या आहेत. याच प्रमाणे मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे या प्रकारच्या ईतर मागण्याही संघटना करत आहे. काल जत्रेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांच्या हातात या मागणीचे फलक होते. हे फलक ईतर सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते.
कोणत्या मागण्या होत्या या फलकांवर?
कोकणावरच नेहमी अन्याय का? कोकणवासियांना न्याय मिळणार का?
कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेतील विलीनीकरण करण्यात यावे.
“अमृत भारत योजनेत” कोकण रेल्वेवरील फायद्याचे आणि महत्त्वाचे स्थानकांत पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास समावेश करण्यात यावा.
सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकास रेल्वे टर्मिनल्स चा दर्जा मिळण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार आदरणीय प्रा. मधू दंडवते साहेबांचे, ‘प्रा. मधू दंडवते सावंतवाडी रोड रेल्वे टर्मिनल्स’ असे नामांतरण करण्यात यावे.
कोकणातील महत्त्वाच्या सर्व स्थानकात पत्रा शेड, दिवा, पंखा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रतिक्षालय, फलाटांची उंची, आसनव्यवस्था यांची पुरेपूर सोय करणे.
महत्वांच्या रेल्वे स्थानकात प्रवाश्याच्या गर्दीचे प्रमाण पाहता बहूतेक जलद, मेल/एक्सप्रेस गाड्यांस वेळेच्या सोयीने थांबे देण्यात यावेत. (जनशताब्दि, वंदेभारत, तेजस आदि)
कोकणातील सर्व स्थानकांत प्रवासी आरक्षण तिकिटांचा कोटा काही अंशी वाढविण्यात याव्यात.शारीरिक व्यंग असलेल्या तसेच वय वर्षे ७५ आणि अधिक असणाऱ्या महीला/पुरुष वर्ग प्रवाशांस रेल्वे तिकिटावर सूट देण्यात यावी.
मुंबई – चिपळूण इंटरसिटी एक्सप्रेस दैनंदिन गाडी सुरू करावी.
मुंबई पोर्ट ट्रस्ट प्रकारचा प्रकल्प चिपळूण येथेही सुरू करण्यात यावा.
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण कामा मार्गस्थ करण्यात यावे.
Konkan Railway News :कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एलटीटी – मडगाव – एलटीटी एक्सप्रेस क्रमांक 11099/11100 या गाडीच्या आजच्या सेवेत काहीसा बदल करण्यात आला आहे.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मडगाव येथून लोकमान्य टिळक टर्मिनससाठी आज दिनांक 02 सुटणार्या 11100 मडगाव- एलटीटी एक्सप्रेस या गाडीची सेवा आज पनवेल पर्यंत मर्यादित करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे आज मधरात्री दिनांक 03 रोजी सुटणारी 11099 एलटीटी-मडगाव ही गाडी पनवेल या स्थानकावरून पहाटे 3 वाजून 30 मिनिटांनी मडगावसाठी रवाना होणार आहे.
सिंधुदुर्ग,०२ फेब्रु. : मालवण तालुक्यातील आंगणेवाडीची प्रसिद्ध भराडी देवीची जत्रा चालू झाली आहे. संपूर्ण देशातून भक्त आंगणेवाडी येथे येण्यास सुरवातही झाली आहे. भाविकांचा वाढणारा प्रतिसाद पाहून रेल्वे प्रशासनाने या मार्गावरील चालणार्या तुतारी एक्सप्रेस या गाडीला एक अतिरिक्त स्लीपर डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आज मध्यरात्री म्हणजे दिनांक 03 मार्च रोजी सुटणार्या 11003 दादर – सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस या गाडीला एक स्लीपर अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.
परतीच्या प्रवासात दिनांक 04 मार्च रोजी सुटणार्या 11004 सावंतवाडी- दादर या गाडीला एक स्लीपर अतिरिक्त डबा जोडला जाणार आहे.
या अतिरिक्त कोचममुळे प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना फायदा होणार आहे.
मुंबई दि. १ मार्च २०२४: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) नागपूर – गोवा शक्तीपीठ महामार्गाची अधिसूचना जाहीर केली आहे. या अधिसूचनेनुसार या महामार्गास राज्य महामार्ग (विशेष )क्रमांक १० म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या अंतिम आराखड्यानुसार कोकणातील खालील गावातून हा महामार्ग जाणार असून लवकरच भूमी अधिग्रहण करण्याचे काम चालू करण्यात येणार आहे.
‘शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्यादरम्यान असला तरी हा महामार्ग पवनार, वर्धा येथून सुरू होणार असून गोवा, पत्रादेवी येथे येऊन संपेल. नागपूर – वर्धा असा ८० किमीचा समृद्धी महामार्गाचा भाग आहे. त्यामुळे शक्तीपीठ वर्धा येथून सुरू होणार असून हा मार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या १२ जिल्ह्यातून जाणार आहे.
११ हजार हेक्टर जागेची गरज
समृद्धी महामार्ग ७०१ किमी लांबीचा असून यासाठी अंदाजे ९ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागली आहे. नागपूर – गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्ग ८०५ किमीचा असून यासाठी अंदाजे ११ हजार हेक्टर जागा संपादीत करावी लागण्याची शक्यता आहे. तर हे भूंसापदन एमएसआरडीसीसाठी मोठे आव्हान असणार आहे.
मुंबई, २९ फेब्रु. २०२४ : लवकरच लोकसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुती आणि मित्रपक्षांकडून रस्सीखेच होताना दिसतेय.
शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात लोकसभेची तयारी सुरु केली असल्याची चर्चा होताना दिसत आहे. मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग ही जागा भाजपची असून भाजपच या जागेवर निवडणूक लढणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणेंकडून करण्यात आला आहे.
लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे.’, असं ट्वीट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं असून ते ट्वीट चांगलंच चर्चेत आलंय.
लोकसभेची निवडणूक लवकरच जाहीर होईल. विविध पक्षाचे बरेच नेते रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेसंबंधी आपला हक्क दाखवित आहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेची जागा ही भारतीय जनता पक्षाची असुन भारतीय जनता पक्षच ही जागा लढवणार आहे.