Category Archives: कोकण

Revas Reddy Coastal Highway: कुणकेश्वर व काळबादेवी पुलांसाठी ‘विजय एम मिस्त्री’ ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी ठरली

   Follow us on        
Revas Reddy Coastal Highway Updates:विजय एम मिस्त्री कन्स्ट्रक्शन प्रा. लिमिटेड (VMCPL) ला शुक्रवारी  रेवस रेड्डी या सागरी महार्गावरील कुणकेश्वर आणि काळबादेवी येथील दोन नवीन पुलांच्या नागरी बांधकामासाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी म्हणून घोषित करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य महामार्ग SH-4 (रेवस-रेड्डी कोस्टल हायवे) वरील दोन्ही पूल हे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे खाड्या आणि नद्यांवर बांधण्यात येणाऱ्या 8 नवीन पुलांच्या मालिकेचा भाग आहेत. 
MSRDC ने दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी मार्च 2024 मध्ये 3 वर्षांच्या बांधकाम मुदतीसह निविदा मागवल्या होत्या. 15 मे रोजी कुणकेश्वर पुलाच्या कंत्राटासाठी एकूण 3 आणि काळबादेवी पुलाच्या कंत्राटासाठी एकूण 2 निविदा उघडण्यात आल्या होत्या.
कुणकेश्वर पूल
1.6 किमी कुणकेश्वर पूल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर मंदिरासमोर बांधण्यात येणार आहे.  यामध्ये 165 मीटर लांबीच्या मुख्य स्पॅनसह 330 मीटर लांबीचा “आयकॉनिक केबल-स्टेड” पूल हे घटक समाविष्ट आहेत.
MSRDC चा अंदाज: रु. 158.69 कोटी
कंपनी  बोली
Vijay M Mistry 187.53
Ashoka 196.78
T and T Infra तांत्रिकदृष्ट्या अपात्र
“iconic” cable-stayed Kunkeshwar Bridge
काळबादेवी पूल
2 लेन असलेला 1.8 किमी लांबीचा काळबादेवी पूल रत्नागिरी जिल्ह्यातील काळबादेवी खाडीवर बांधण्यात येणार आहे.
MSRDC चा अंदाज: रु. 291.64 कोटी
कंपनी  बोली
Vijay M Mistry 353.32
Ashoka 367.47
“Iconic” cable-stayed Kalbadevi Bridge
विजय एम मिस्त्री यांची रु. कुणकेश्वर पुलासाठी 187.53 कोटी आणि रु. काळबादेवी पुलासाठी 353.32 कोटी MSRDC च्या अंदाजापेक्षा 18.18% आणि 21.15% जास्त होत आहे. त्यामुळे MSRDC आणि  बोली लावणारी कंपनी यांच्यात वाटाघाटी होऊन बोलीच्या दुसऱ्या फेरीत निर्णय घेतला जाणार आहे. 



या मार्गावरील निविदांची आतापर्यंतची माहिती 
• आगरदांडा क्रीक ब्रिज – HCC सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• धरमतर क्रीक ब्रिज – Afcons इन्फ्रास्ट्रक्चर ही सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• जयगड खाडी पूल – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुंडलिका ब्रिज – अशोका बिल्डकॉन सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• कुणकेश्वर पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी  सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• काळबादेवी पूल – विजय एम मिस्त्री बांधकाम कंपनी  सर्वात कमी बोली लावणारी कंपनी आहे.
• बाणकोट खाडी पूल – बोलीसुरू आहे (निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)
• दाभोळ खाडी पूल – बोली सुरू आहे ( निविदा उघडण्याची तारीख: ७ जून)

दक्षिणेकडील राज्यांसाठी नवीन गाडी देण्याची कोकण रेल्वेची तयारी; पनवेल-कोचुवेली गाडी लवकरच सुरु होणार

कोकण रेल्वे प्रवासी संघटनांच्या नवीन गाड्यांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवून दक्षिणेकडील राज्यांसाठी नवीन गाडी चालविण्याची कोकण रेल्वेची तयारी
   Follow us on        
Railway Updates: कोकण रेल्वेमार्गावर पनवेल – कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेस सुरु करण्यात येणार आहे. कोकण रेल्वेने ही गाडी चालवण्याची संमती दिली असल्याची माहिती आहे. मात्र ही सेवा कधी सुरू होणार हे स्पष्ट नाही असा खुलासा मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने केला आहे.
सध्या नेत्रावती एक्स्प्रेस ही मुंबईहून केरळला जाणारी एकमेव दैनिक गाडी आहे. कोकण रेल्वे मार्ग सुरु झाल्यावर तीन गाड्यांची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्या गाड्या दैनिक स्वरूपाच्या नसून आठवड्यातून २ दिवस धावणाऱ्या आहेत. मुंबई-कन्याकुमारी डेली ट्रेन जयंती जनता एक्स्प्रेस चे रूपांतर पुणे-कन्याकुमारी  झाल्यामुळे, केरळातील मल्याळीं जनतेने मुंबईसाठीची एक दैनंदिन ट्रेन गमावली आहे.
या स्थितीत मुंबई-केरळ दैनिक गाडी सुरू करण्याची मागणी मध्य रेल्वे आणि दक्षिण रेल्वेने गेल्या वेळापत्रक समितीच्या बैठकीत केली होती. या बैठकीत दैनिक ट्रेनचे वेळापत्रक काढण्यात अडचणी येत असल्याने दररोजच्या ऐवजी साप्ताहिक सेवेच्या विनंतीवर विचार करण्याचे कोकण रेल्वेने सुचवले होते. त्यानुसार ही गाडी आठवड्यातून एकदाच धावणार असल्याचे मान्य करण्यात आले आहे.
ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस किंवा मुंबईतील इतर ठिकाणाहून सोडावी, अशी शिफारस दक्षिण रेल्वेने केली आहे. तथापि, मध्य रेल्वेने सांगितले की शहरातील सर्व टर्मिनस जास्तीत जास्त क्षमतेने कार्यरत आहेत, त्यामुळे ट्रेन पनवेलहून निघू सोडण्यात येईल.  या निर्णयानंतर आता लवकरच पनवेल – कोचुवेली या नवीन साप्ताहिक गाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्यातील प्रवासी संघटनांची नाराजी.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनांनी वसई- सावंतवाडी, कल्याण – सावंतवाडी अशा गाड्या सोडण्यात याव्यात यासाठी रेल्वे प्रशासनाला वारंवार निवेदने देऊन मागण्या केल्या आहेत. मात्र कोकण रेल्वे पूर्ण क्षमतेने चालत असून या मार्गावर नवीन गाडी चालविणे शक्य नाही हे कारण देऊन या मागण्यांना केराची टोपली दाखवली आहे. मात्र आता दक्षिणेकडील राज्यासाठी नवीन गाडी कशी काय मंजूर केली गेली हा प्रश्न विचारला जात आहे.

Konkan Railway | शनिवारची तेजस एक्सप्रेस रद्द तर ‘या’ गाड्यांच्या आरंभ स्थानकात बदल 

   Follow us on        
Konkan Railway News: मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील १०-११ फलाटांच्या विस्तारीकरणाच्या पायाभूत कामासाठी तर ठाणे येथील फलाटांचे रुंदीकरण करण्यासाठी मध्यरेल्वेने तीन दिवसांचा जम्बोब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक दरम्यान उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहे.
या ब्लॉक चा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर झाला आहे.



रद्द करण्यात आलेल्या गाड्या 
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उद्या शनिवार दिनांक ०१ जून रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २२११९ तेजस एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.
आरंभ स्थानकात बदल करण्यात आलेल्या गाड्या (Short Origination)
पनवेल येथून सोडण्यात येणाऱ्या गाड्या 
उद्या दिनांक ०१ जून रोजी प्रवास सुरु करणाऱ्या १०१०३ सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस, १२१३३ सीएसएमट-मंगलोर एक्सप्रेस, २०१११ सीएसएमटी- मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकावरून सुरु होणार आहे.
दादर येथून सोडण्यात येणाऱ्या गाड्या 
उद्या दिनांक ०१ जून रोजी प्रवास सुरु करणाऱ्या १२०५१ सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस आणि २२२२० सीएसएमटी – मडगाव वंदेभारत एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांचा प्रवास दादर स्थानकावरून सुरु होणार आहे.

Konkan Railway | “…….तर सावंतवाडी स्थानकाच्या उत्पन्नात ५०% वाढ झाली असती.”

   Follow us on        
सावंतवाडी, प्रतिनिधी: गर्दीच्या स्थानकांत गाडयांना थांबे दिलेत कि प्रवासी संख्या वाढते आणि परिणामी  त्या स्थानकाचे उत्पन्न वाढते हे सरळ गणित आहे. गेल्या वर्षी गोवा आणि दक्षणेकडील  काही स्थानकावर गाडयांना थांबे मंजूर झालेत, त्यांचे फलित म्हणून त्या त्या स्थानकाचे उत्त्पन्न चांगल्या टक्क्यांनी वाढले. गोव्याच्या कानाकोना या स्थानकावर गांधीधाम-नागरकोईल आणि नेत्रावती या गाड्यांचे थांबे मंजूर करण्यात आले. त्याचा चांगला परिणाम होऊन त्या स्थानकांच्या उत्पन्नात २३२% भरीव वाढ झाली. तर बारकुर या स्थानकावर मत्यगंधा या गाडीला थांबा देण्यात आला. त्या स्थानकाचे उत्पन्न सुमारे ४४% वाढले.
मात्र गरज आणि मागणी असूनही कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी (टर्मिनस) स्थानकावर गेल्या काही वर्षात गाडयांना थांबे न देऊनही या स्थानकांच्या उत्पन्नात चांगली वाढ झाल्याची दिसत आहे.  २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्येत आणि उत्पन्नात अनुक्रमे १२% आणि ९% इतकी वाढ झाली. मागणी आणि गरज असूनही एकाही गाडीला येथे थांबा दिला नसताना ही वाढ झाली ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. काही नियमित गाडयांना येथे थांबे दिले असते तर  या स्थानकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात जवळपास ३०% ते ५०% ने वाढ झाली असती असे रेल्वे अभ्यासकांचे मत आहे.



सावंतवाडी स्थानकांच्या टर्मिनस चे काम रखडले आहे. अनेक सुविधांचा अभाव आहे. स्थानकाचे बाहेरून सुशोभीकरण करण्याचे काम चालू आहे. ही एक चांगली गोष्ट आहे पण काही मूलभूत बाबींचा पण विचार करणे गरजेचे आहे.  येथील प्लॅटफॉर्म वर पुरेशा प्रमाणात निवारा शेडची सोय नाही; त्यामुळे पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होत आहेत. इतर स्थानकावर गाड्यांचे थांबे सहज मंजूर होत असताना येथे अत्यंत गरज असताना वारंवार आंदोलने, मागण्या करूनही थांबे का मंजूर होत नाही आहेत हा एक यक्षप्रश्नच म्हणावा लागेल.

आंबोलीत पुन्हा जमीन हडपण्याचा प्रयत्न; वातावरण तापणार

भलताच सातबारा दाखवून भूमिअभिलेख अधिकार्‍यांना हाताशी धरून जमीन प्रयत्न. स्थानिक ग्रामस्थांचा आंदोलनाचा ईशारा. 

   Follow us on        

आंबोली, दि-३०:– महिन्याभरापूर्वी येथील जमीन बेकायदा हडपून त्यावर बांधकाम केल्याच्या विरोधात ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते. तसाच प्रकार आंबोलीत दुसऱ्या भूखंडात घडत आहे. सर्वे क्रमांक ८४ड मध्ये परप्रांतीयांनी अतिक्रमण केले असून, भलताच सातबारा दाखवून आपली नावे असल्याचे सांगत भूमिअभिलेख ला हाताशी धरत मोजणी करत आहे,याला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला असून पुन्हा एकदा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

23 नंबर सर्वे मध्ये झालेले अतिक्रमण हटवण्यात आले त्याला एक महिना ही पूर्ण न होता परत तोच प्रकार आंबोलीत चालू आहे आंबोली मधील सर्वे नंबर 84 ड महाराष्ट्र शासनाच्या जमिनीमध्ये परप्रांतीयांनी सर्वे करून जमीन हडपण्याचा प्रकार चालू केला आहे. आंबोलीतील जमिनी महाराष्ट्र शासनच्या नावावर करून सरकारचा धन दांडगे आणि भूमापिया यांच्याकडून महाराष्ट्र शासनाच्या जमिनी बळकवण्याचा प्रयत्न चालू आहे असा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र शासन या नावाने सातबारा असूनही भूमी अभिलेख अधिकारी पोलीस प्रोटेक्शन सह महाराष्ट्र शासनाच्या जमिनीचा सर्वे करत आहेत आणि भूमाफियांना जमीन वाटप करत आहेत .महाराष्ट्र शासनाच्या जागेवर परप्रांतीयांचा परस्पर सर्वे करून भूमी अभिलेख काय सिद्ध करत आहे असा प्रश्न येथील ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. या प्रकारामुळे आंबोलीतील भूमिपुत्रांमध्ये संतापाचे वातावरण आहे. महाराष्ट्र शासनाच्या जमिनीत परप्रांतीयांनी अतिक्रमण केले तर पुन्हा एकदा त्रीव आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

धक्कादायक! सावंतवाडी तालुक्यातील वेत्येत सापडली मानवी हाडे

   Follow us on        

सावंतवाडी दि. २८ मे. सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावातील कैलास धाब्याच्या पाठीमागे मानवी हाड कवटी सहित आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

वेत्ये रोडवर असलेल्या कैलास धाब्याच्या पाठीमागे काल संध्याकाळी येथील एका स्थानिकाला मानवी हाडे असल्याचे दिसली, त्यांनी संबंधित धाबे मालकाला याची कल्पना दिली त्यानंतर वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी घटनास्थळी येत पाहणी करून पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व सदरची हाडे पंचनामा करून ताब्यात घेतली अधिक तपास सुरू आहे.

 

Palghar Train Accident: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्या पर्यायी मार्गाने चालविण्यात येणार

   Follow us on        
Konkan Railway News:मंगळवारी संध्याकाळी पालघर स्थानकावरील दुर्घटनेमुळे गुजरात मुंबई दरम्यान होणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. अजूनही रूळ वाहतुकीसाठी उपलब्ध झाले नसून काही गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेट व पर्यायी मार्गावरून वळविण्यात आलेल्या आहेत. या दुर्घटनेचा फटका कोंकण रेल्वेलाही फटका बसला असून पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकण मार्गे दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. यातील काही गाड्या पर्यायी मार्गाने वळविण्यात आलेल्या असून त्याबाबत पश्चिम रेल्वेने प्रवाशांना प्रसिद्धी माध्यमातून सूचित केले आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार खालील दोन गाड्या सुरत – जळगाव – इगतपुरी – कल्याण – पनवेल – रोहा या मार्गाने वळविण्यात आलेल्या आहेत.
१) दिनांक २८ मे रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक १६३११  श्रीगंगानगर – कोचुवेली एक्सप्रेस
२) दिनांक २८ मे रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०९३२ इंदोर – कोचुवेली एक्सप्रेस

पालघर मालगाडी दुर्घटना: कोकण रेल्वे मार्गावरील दोन गाड्या रखडणार

   Follow us on        

Palghar Train Derailment : पश्चिम रेल्वेच्या पालघर येथे यार्डात मालगाडी घसरल्याने सुरत ते मुंबई अप मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी घडली. यामुळे घटनास्थळी एकच खळबळ उडाली. मालगाडीत मोठ्या प्रमाणावर लोखंडी प्लेटची वाहतूक केली जात होती. या घटनेनंतर मालगाडीचा डबे उचलण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु झाले आहे. या अपघातानंतर अनेक गाड्यांना शॉर्ट टर्मिनेट केले आहे तर काही गाड्यांना वळविण्यात आले आहे. मात्र या मार्गावरील धावणाऱ्या एक्सप्रेस गाड्यांचे वेळापत्रक विस्कळित झाले आहे. यामध्ये पश्चिम रेल्वे मार्गावरून कोकणात जाणार्‍या खालील दोन गाड्यांचा समावेश आहे.

आज दिनांक २८ मे या दिवशी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १२४३२ – हजरत निजामुद्दीन-तिरुवनंतपुरम राजधानी एक्सप्रेस.

आज दिनांक २८ मे या दिवशी प्रवास सुरू करणारी गाडी क्रमांक १९२६०– कोचुवेली एक्सप्रेस.

पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर मालगाडीचे 7 डब्बे रुळावरून घसरले आहेत. डहाणूवरून मुंबईच्या दिशेने येणारी सर्व रेल्वे वाहतूक सेवा त्यामुळे ठप्प झाली आहे. लोखंडी कॉइल घेऊन गुजरातवरून मुंबईच्या अप दिशेने येणाऱ्या मालगाडीचे डबे पालघर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर घसरले आहेत. रुळावर मालगाडीचे डब्बे तीन डबे घसल्याने, दोन्ही रेल्वे रुळावरील वाहतूक सध्या ठप्प झाली आहे. पालघर रेल्वेस्थानाकात एकूण चार रेल्वे मार्ग आहेत. सध्या मुंबई, विरारहून डहाणू, गुजरातच्या दिशेला जाणारी रेल्वे सेवा धीम्या गतीने सुरू आहे. मात्र गुजरातवरून मुंबई, विरारकडे येणारी सेवा ठप्प झाली आहे. रेल्वे प्रशासन, पोलीस, रेल्वे पोलीस, आरपीएफ सर्व यंत्रणा घटनास्थळावर दाखल झाली आहे. यंत्रसामुग्री आणून घसरलेले डब्बे बाजूला करून रेल्वे सेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल असे म्हटले जात आहे.

प्रवाशांचे हाल संपता संपेनात; अजून एका एक्सप्रेसची सेवा ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित

   Follow us on        
Konkan Railway News:छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म नंबर 10 आणि 11 चे काम सुरू असल्यामुळे कोंकण रेल्वे मार्गावरील काही गाड्यांची सेवा दादर आणि पनवेल पर्यंत काही  कालावधीसाठी मर्यादित केली आहे, त्यामध्ये आता ११००४ सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस या गाडीचीही भर पडली आहे.
कोकण रेल्वेने आज दिनांक २८ मे रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार दिनांक २८ मे ते ०२ जून पर्यंत ११००४ सावंतवाडी – दादर तुतारी एक्सप्रेस या गाडीची सेवा ठाणे स्थानकापर्यंत मर्यादित Terminate करण्यात येणार आहे.
ऐन हंगामात प्रवाशांना मनस्ताप
कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांची सेवा पनवेल, दादर आणि ठाणे या स्थानकापर्यंत मर्यादित केली असल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मांडवी एक्सप्रेस ही गाडी पनवेल स्थानकापर्यंत  चालविण्यात येत आहे. मात्र तिचे वेळापत्रक पाळले जात नसून तिला पनवेल पर्यंत पोहोचायला उशीर होत आहे. अनेकदा त्या वेळेपर्यंत पनवेल ते ठाणे या लोकल मार्गावरील लोकल सेवा रात्री बंद होत असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवासात वरिष्ठ नागरिक, लहान मुलांना सांभाळत घरी पोहोचणे जिकरीचे झाले आहे.

खळबळजनक: रत्नागिरीतील कंपनीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८ जणांची फसवणूक केल्याचे उघड; गुन्हा दाखल

   Follow us on        
कुडाळ, दि.२८ मे: रत्नागिरी येथील एका कंपनीने सिंधुदुर्गात २.२५ कोटीची फसवणूक केल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी येथील एका जॉब वकर्सच्या नावाखाली प्रस्थापित झालेल्या प्रा. लि. कंपनीच्या विरोधात सिंधुदूर्गातील ७८ जणांनी आपली २.२५ कोटीची फसवणूक झाल्याचा गुन्हा कुडाळ पोलिसांत दाखल केला आहे.
ही कंपनी रत्नागिरी जिल्ह्यातील असून जॉब वकर्सच्या नावाने या कंपनीने सिंधुदुर्गातही आपली शाखा उघडली होती. विशेष म्हणजे पोलिस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर ही शाखा कार्यरत होती. रत्नागिरीत या कंपनीकडून गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची माहिती सिंधुदुर्गात वाऱ्यासारखी पसरताच सिंधुदुर्गातील गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी कुडाळ पोलिस ठाणे आवारात गर्दी केली. यावेळी ७८ जणांनी एकत्र येत आपल्या फसवणूकीची तक्रार कुडाळ पोलिसांकडे दिली आहे. त्यावर ७८ जणांची नावे व त्यासमोर आपण जमा केलेली रक्कम टाकण्यात आल्याचे समजते. यामध्ये २५ हजारांपासून १ लाख ७५ हजारांपर्यंतची रक्कम नमुद करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जवळपास २ कोटी २५ लाख रुपयांची ही ७८ जणांची रक्कम आहे.
दरम्यान, फसवणूक झालेल्यांचा आकडा अजुनही मोठा असून रक्कमही त्याच पटीत वाढण्याची शक्यता आहे.
याबाबत कुडाळ पोलिसांत रितसर तक्रार झाली नसल्याचे सांगण्यात आले असून या फसवणुकीत अनेक जनसामान्यांना गंडा बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तकार दारांच्या अर्जाची दखल घेऊन फसवणूक झालेल्यांनी तक्रार देण्यास पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search