Category Archives: कोकण

कोकण रेल्वे मार्गावर धावणार एलटीटी – थिवी दिवाळी स्पेशल ट्रेन; आरक्षण शुक्रवारपासून खुले..

 

Konkan Railway News: दिवाळी सुट्टीत गावी जाणाऱ्या कोकणकरांसाठी  एक महत्वाची बातमी आहे.  कोकण रेल्वे मध्यरेल्वेच्या सहकार्याने दिवाळी हंगामात आठवड्यातुन तीन दिवस धावणारी एक दिवाळी स्पेशल गाडी चालविणार आहे.

Train No. 01129 / 01130 Lokmanya Tilak (T) – Thivim – Lokmanya Tilak (T) Special (Tri-Weekly) :

ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस ते थिवीम या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहे. 

Train No. 01129  Lokmanya Tilak (T) – Thivim –  Special (Tri-Weekly) :

दिनांक 01/11/2023 ते 29/11/2023 शनिवार, सोमवार आणि बुधवार या दिवशी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावरुन रात्री 22:15 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी सकाळी 10:00 वाजता थीवी या स्थानकावर पोहोचेल.

Train No. 01130 Thivim- Lokmanya Tilak (T) –  Special (Tri-Weekly) :

दिनांक 02/11/2023 ते 30/11/2023 रविवार , मंगळवार आणि गुरुवार या दिवशी ही गाडी थीवी या स्थानकावरुन संध्याकाळी 15:00 वाजता सुटेल ती दुसऱ्या दिवशी पहाटे 04:05 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल

या गाडीचे थांबे

ठाणे, पनवेल, रोहा,माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे , राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड , कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड.

डब्यांची संरचना

फर्स्ट एसी  – 01,  टू टायर एसी + फर्स्ट एसी (एकत्रित) – 01 +थ्री टायर एसी – 04  + सेकंड  स्लीपर – 09 + जनरल –  04+ एसएलआर व अन्य – 02   असे मिळून एकूण 21  डबे

आरक्षण

Trains no. 01130 Thivim – Lokmanya Tilak या गाडीचे आरक्षण परवा दिनांक २७ ऑक्टोबर 2023 पासून रेल्वेच्या सर्व तिकीट खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर उपलब्ध होणार आहेत. 

 

 

 

 

Loading

अबब! गरवताना गळाला लागला चक्क २० किलोचा मासा

राजापूर: फावल्या वेळात गरवून मासे पकडणे हा बऱ्याच जणांचा आवडता छंद. तीन ते चार तास गरवून फक्त कालवणापुरते मासे भेटले तरी पुरे असे म्हणून वेळ घालवणारे पण तुम्ही पहिले असतील. पण एक कल्पना करा गरवताना एक दोन किलो नाही तर चक्क २० किलोचा मासा गळाला लागला तर? तुमची प्रतिक्रिया काय असेल?
हो असे झाले आहे.. बाकाळे गावातील राहुल वामन राऊत याला समुद्रकिनारी गरवताना काल चक्क 20 किलो वजनाचा कोकेर मासा गळाला लागला आहे. त्याने तो साखरी नाटे येथील विक्री केंद्रावर नेऊन विकला त्याला 180 रुपये किलोचा दर मिळाला आहे. म्हणजे त्याला एकूण या माशापासून  3600 रुपये इतका फायदा झाला आहे.
मजुरीची कामे करून चा उदरनिर्वाह करणारा राहुल फावल्या वेळात संध्याकाळी कामावरून सुटल्यावर बाकाळे परिसरातील समुद्रा जवळच्या कड्यावर मासे गरवण्यासाठी जात असतो. त्याच्यासारखे बरेच तरुण  युवक लोखंडी रॉड म्हणजेच गरीच्या साह्याने मासेमारी करताना दिसतात. 

Loading

वर्षभरात ११ अपघात; ५ कर्मचाऱ्यांचा बळी…महावितरण अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

सिंधुदुर्ग : मागील दोन दिवसांत महावितरणमध्ये कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा सावंतवाडी व वेंगुर्ला येथे अपघात घडलेला असून त्यात एक कर्मचारी जीवास मुकला आहे. सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे झालेल्या  अपघात प्रकरणात पुन्हा एकदा मृत कर्मचाऱ्यांकडे काम करताना संरक्षक साहित्य नसल्याचे दिसून आले आहे.मागील वर्षभरात ११ अपघात होऊन त्यात ५ कर्मचाऱ्यांचा बळी जाऊन देखील महावितरणचे निर्ढावलेले अधिकारी व ठेकेदार सुशेगात असल्याचा आरोप मनसेचे माजी तालुकाध्यक्ष तथा स्वाभिमान कामगार संघटना सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रसाद गावडे यांनी केला आहे.कंत्राटदार किंवा महावितरणकडून कामगारांना बूट ,हॅंड ग्लोज ,सेफ्टी बेल्ट, हॅल्मेट आदी संरक्षक साहित्य पुरवले जात नसल्याने कर्मचारी अपघाताचे बळी ठरत आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांना योग्य तांत्रिक प्रशिक्षण देऊनच विद्युत वाहिन्यांवरील काम देणे नियमाधीन असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणचे अधिकारी व ठेकेदाराची मुजोरी चाललेली आहे.

महावितरणचे अधिक्षक अभियंता व कार्यकारी अभियंत्यांनी एसी केबिनच्या बाहेर पडून कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करत आहेत हे पहावे म्हणजे कर्मचाऱ्यांच्या व्यथा समजतील. आणि मर्जीतला ठेकेदार नेमण्यापेक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांना संरक्षक साहित्य देणारा ठेकेदार नेमावा असा टोला देखील गावडेंनी लगावला आहे. जिल्हयाचे विद्युत निरीक्षक झोपले आहेत का ? असा सवाल उपस्थित करत ओरोस येथील विद्युत निरीक्षक कार्यालयाला लॉक  लावण्याचा इशारा मनसेच्या वतीने गावडे यांनी दिला आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना कुणीही वाली राहिला नसून मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना मदत दिल्याच्या खोट्या बातम्या प्रसिद्ध करणे म्हणजे मृतांच्या वारसांनी जणू चेष्टाचं केल्यासारखे आहे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी मागील वर्षभरातील अपघाती मृत्यू प्रकरणी दोषी असलेला ठेकेदार व महावितरणचे अधिकारी यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश द्यावेत व मृतांच्या वारसांना नुकसान भरपाई देऊन अपघाती कर्मचाऱ्यांना व त्यांच्या वारसांना न्याय द्यावा अशी मागणी गावडेंनी केलेली आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर गुरुवारी मेगाब्लॉक; जनशताब्दी एक्सप्रेससह ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम

Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर पुढील आठवड्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. या मेगाब्लॉक मुळे मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
A) गुरुवार दिनांक २६ ऑक्टोबर रोजी चिपळूण – संगमेश्वर रोड दरम्यान सकाळी ०७:३० ते १०:३० या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येत आहे. या मेगाब्लॉक मुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 01139 Nagpur – Madgaon Jn. Special
दिनांक २५ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी चिपळूण ते कोलाड दरम्यान १०० मिनिटे उशिराने धावणार आहे.
२)Train no. 12051 Mumbai CSMT – Madgaon Jn. Jan Shatabdi Express
दिनांक २६ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी कोलाड ते चिपळूण दरम्यान ४० मिनिटे उशिराने धावणार आहे.
3)Train no. 16346 Thiruvananthapuram Central – Lokmanya Tilak (T) Netravati Express
दिनांक २५ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी रत्नागिरी ते संगमेश्वर दरम्यान ४० मिनिटे उशिराने धावणार आहे.
B) दिनांक २६ऑक्टोबर (गुरुवार) रोजी मडगाव – कुमता दरम्यान  ११:००  ते १४:००  या वेळेत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या मेगाब्लॉकमुळे खालील गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
१) Train no. 06602 Mangaluru Central – Madgaon Jn. Special / Train no. 06601 Madgaon Jn. – Mangaluru Central Special
दिनांक २६ ऑक्टोबर रोजी प्रवास सुरु करणाऱ्या या गाड्या कुमता ते मडगाव दरम्यान रद्द करण्यात आल्या आहेत. 

Loading

Mumbai Goa Highway | “माझ्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता तेरा वर्षापासून बांधू शकलो नाही…” केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर कबुली

नागपूर: मुंबई गोवा हा महामार्ग इतके वर्ष बनू शकला नाही त्यासाठी मी स्वतः जबाबदार आहे. मी त्यासाठी कोणालाही जबाबदार धरणार नाही, असं खुद्द केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी एका मुलाखतीत बोलताना म्हटलं आहे. तसेच या डिसेंबर अखेरपर्यंत मुंबई गोवा महामार्ग बनवून पूर्ण होईल अशी ग्वाही नितीन गडकरी यांनी दिली आहे. नागपुरात एका वृत्तपत्र समूहाच्या वतीने आयोजित ”मनातले गडकरी” या मुलाखतीत मुलाखतकार प्रसिध्द अभिनेता प्रशांत दामले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना नितीन गडकरी बोलत होते.
“मुंबई गोवा मार्ग पहिले महाराष्ट्र सरकारला काम दिलं होतं. त्यानंतर बऱ्याच अडचणी आल्या. जागा हस्तांतरित करण्याच्या अजूनही येतात. त्यासाठी कोणाला जबाबदार धरत नाही. या रस्त्यासाठी मी 75 ते 80 म्हणजे सर्वात जास्त बैठका घेतल्या आहेत. तरी पण मला म्हणावं तसं यश मिळालं नाही. यावर यावर्षी डिसेंबर महिन्याच्या आत मुंबई गोवा मार्ग पूर्ण होईल. मी मुंबई ते दिल्ली 1380 किलोमीटरचा रस्ता जवळपास पूर्ण केला. पण माझ्या घरासमोरचा दोन किलोमीटरचा रस्ता मी तेरा वर्षापासून बांधू शकलो नाही. नागपुरात बाराशे कोटीचा मल्टी मॉडेल हब स्टेशन होतं ते एकदा मी रद्द केलं. पण आता ते स्टेशन रेल्वे बांधत असून 1200 कोटी लॉजिस्टिक कॅपिटल साठी भारत सरकारने दिले. भारतातील सर्वात मोठा लॉजिस्टिक पार्क तयार करत आहे वादाचे मुद्दे सोडवले भारतातील सगळ्यात मोठा प्रोजेक्ट बनवण्याचा ते स्वप्न आहे ते पूर्ण करेल,” असेही नितीन गडकरी म्हणाले.

विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Loading

दसरा दिवाळीच्या सुट्टीत गोव्याला जाण्याचा प्लॅन आखत असाल तर ही बातमी नक्की वाचा; हॉटेल रूम्स टंचाईमुळे होऊ शकते गैरसोय

गोवा वार्ता: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गोव्यात प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जवळपास 17000 लोक गोव्यात येणार आहेत. यात सुमारे 12000 खेळाडूंचांच समावेश आहे. याशिवाय प्रशिक्षक, टेक्निकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ, इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचे सदस्य आणि व्हीआयपींचाही समावेश असणार आहे.त्यासाठी राज्यातील 100 हून अधिक हॉटेल्स स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAI) तर्फे बूक करण्यात आली आहेत. त्यामुळे गोव्यात रूम्सची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एकीकडे नॅशनल स्पर्धा सुरू झालेली असताना गोव्यात पर्यटन हंगामालाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे पर्यटकांचा ओघ देखील गोव्याकडे सुरू आहे. तसेच ही स्पर्धा 9 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 
या कारणाने आता जर गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर एकवेळ आपल्या बजेट चा विचार करून तसा प्लॅन करा. हॉटेल रूमच्या जास्त मागणीमुळे त्यांचे भाव वाढून तुमची ट्रिप महागडी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Loading

Video : मुंबई एलटीटी – मडगाव एक्सप्रेसच्या पॅन्ट्रीमध्ये उंदरांचा सुळसुळाट

Mice in Train’s Pantry: मुंबई-गोवा ट्रेनच्या पॅन्ट्रीमधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पॅन्ट्रीमध्ये ठेवलेले खाद्यपदार्थ उंदीर खात असल्याचा व्हिडीओ एका रेल्वे प्रवाशाने शूट केला आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानेतर रेल्वेतील कॅटरिंग सेवांची स्वच्छता आणि सुरक्षिततेचा याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे.

रविवारी एलटीटी-मडगाव ट्रेनच्या पॅन्ट्रीमध्ये चित्रित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये उंदीर खाद्यपदार्थांवर ताव मारताना दिसत आहेत. मध्य रेल्वेने देखील या व्हिडीओची पुष्टी केली आहे. मात्र, ट्रेनमधील खानपान सेवा हाताळणाऱ्या आयआरसीटीसीच्या एजन्सीने मध्य रेल्वेवर ठपका ठेवत लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला येथील रेल्वे यार्डमध्ये उंदरांचा प्रादुर्भाव असल्याचा आरोप केला आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी केली. पण, रेल्वे डब्यांमध्ये आणि रेल्वे यार्डमध्ये उंदीर नियंत्रणाचे उपाय नियमितपणे केले जातात, असे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.

 

 

 

Loading

मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या वेगामध्ये आणि फेऱ्यांमध्ये ०१ नोव्हेंबर पासून वाढ; होणार २ तासांची बचत.

मुंबई : अलीकडेच सुरु झालेल्या  मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या वेग १ नोव्हेंबर २०२३ पासून वाढणार आहे. त्यामुळे वंदे भारत ट्रेनच्या प्रवास कालावधीत दहा तासांवरून अवघ्या ७ तास ४५ मिनिटांवर येणार आहे. त्यामुळे साधारणतः मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या प्रवासाचा वेळ दोन तासांनी वाचणार आहे.
 त्याच बरोबर या गाड्याच्या फेऱ्याही पूर्ववत करण्यात येणार आहेत. दिनांक ०१ नोव्हेंबर पासून ही गाडी शुक्रवार वगळता दररोज चालविण्यात येणार आहे.
पावसाळयात अपघात टाळण्यासाठी कोकण रेल्वे मार्गावर पावसाळी वेळापत्रकाप्रमाणे गाड्या चालविल्या जातात. या वेळापत्रकामुळे पावसाळ्यात वंदे भारत एक्सप्रेस या गाडीचा वेगही कमी करण्यात आला होता. तसेच फेऱ्याही कमी करून ही गाडी आठवड्यातून फक्त ३ दिवस चालविण्यात येत होती. 
 
सध्या मान्सून वेळापत्रकानुसार, ट्रेन क्रमांक २२२२९ मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५. २५ वाजता सीएसएमटी मुंबईहून निघते आणि मडगावला दुपारी ३. ३० वाजता पोहोचते. साधरणात मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या प्रवासाच्या वेळ १० तास लागत आहे.
 
मात्र, १ नोव्हेंबर २०२३ पासून नॉन मान्सून वेळापत्रकानुसार, ट्रेन क्रमांक २२२२९ मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस सकाळी ५. २५ वाजता सीएसएमटी मुंबईहून निघेल आणि मडगावला दुपारी १ वाजून १० मिनिटात पोहचणार आहे. त्यामुळे साधारणतः मुंबई- मडगाव वंदे भारत ट्रेनच्या प्रवासाच्या वेळ साधारणता दोन तास वाचणार आहे.
 
असे असणार नॉन मान्सून वेळापत्रक-
  
२२२२९/२२२३०मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (आठवड्याचे ६ दिवस) शुक्रवार वगळता.
 
२२२२९ सीएसएमटी मुंबईहून ०५.२५वाजता निघेल आणि मडगावला दुपारी १.१० वाजता पोहोचेल.
 
२२२३० मडगावहून दुपारी २.४० वाजता निघेल आणि रात्री १०. २५ वाजता सीएसएमटी मुंबईला पोहोचेल.
 
MAO VANDE BHARAT TIMETABLE (From 1st Nov)
Station Name Down
22229
Up
22230
C SHIVAJI MAH T 05:25 22:25
DADAR 05:32 22:05
THANE 05:52 21:35
PANVEL 06:30 21:00
KHED 08:24 19:08
RATNAGIRI 09:45 17:45
KANKAVALI 11:10 16:18
THIVIM 12:16 15:20
MADGAON 13:10 14:40

Loading

बळवली-पत्रादेवी ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेस सुरवात

मुंबई : बळवली – पत्रादेवी ग्रीनफिल्ड सहापदरी द्रुतगती महामार्गासंबधी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेस सुरवात झाली असून भूधारकांना तशा नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत. 
सुमारे ३८८ किलोमीटरच्या या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून काम करणार आहे.
हा कोकण द्रुतगती महामार्ग झाल्यानंतर मुंबईसाठी सर्वात गतिमान महामार्ग तयार होईल. हा महामार्ग नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाईल. त्यामुळे कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे सोयीचे होईल. कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा तसेच रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी असा जाणार आहे. महामार्ग पेण जिह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल आणि एकूण ४ टप्प्यात या महामार्गाचे बांधकाम करण्यात येईल.
या महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते कोकण अगदी कमी वेळामध्ये पार करता येणार आहे. त्याच बरोबर मुंबई गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.

Loading

माणगाव वासियांना रेल्वेची ‘दसरा’ भेट; ३ गाडयांना माणगाव स्थानकावर थांबे मंजूर

रायगड: माणगाव वासियांना कोकण रेल्वे कडून एक चांगली बातमी येत आहे. रेल्वे प्रशासनाने माणगाव स्थानकावर लांब पल्ल्याच्या तीन गाडयांना थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरवातीस हे थांबे प्रायोगिक तत्वावर असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून त्यांना कायम करण्यात येणार आहे.
खालील गाड्या माणगाव स्थानकावर थांबणार आहेत.
1)Train no. 16333 / 16334 Veraval – Thiruvananthapuram Central – Veraval Weekly Express
गाडी क्रमांक 16333 वेरावल- तिरुवानंतपुरम सेंट्रल ही गाडी दिनांक 19 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:40 तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:50 अशी असणार आहे.
गाडी क्रमांक 16334 तिरुवानंतपुरम – वेरावल सेंट्रल ही गाडी दिनांक 23 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी व बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार संध्याकाळी  07:00 अशी असणार आहे.
 2) Train no. 19259 / 19260 Kochuveli – Bhavnagar – Kochuveli Weekly Express
 
गाडी क्रमांक 19259 कोचुवेली  – भावनगर वीकली एक्सप्रेस  ही गाडी दिनांक 19 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी व बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार संध्याकाळी  07:00 अशी असणार आहे.
गाडी क्रमांक 19260 भावनगर – कोचुवेली वीकली एक्सप्रेस  ही गाडी दिनांक 24 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:40 तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:50 अशी असणार आहे.
3) Train no. 16335 / 16336 Gandhidham – Nagercoil – Gandhidham Weekly express
गाडी क्रमांक 16335 गांधीधाम – नागरकोईल एक्सप्रेस  ही गाडी दिनांक 20 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:40 तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:50 अशी असणार आहे.
गाडी क्रमांक 16336 नागरकोईल – गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी  दिनांक 24 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी व बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार संध्याकाळी  07:00 अशी असणार आहे.
हे सर्व थांबे २ मिनिटांचे असतील. 

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search