Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून विशेष गाडी; एकूण ३६ फेऱ्या – Kokanai https://t.co/ySt1OVxaAS#konkanrailway pic.twitter.com/YP0mmgIlQS
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) April 25, 2024
Konkan Railway | कोकण रेल्वे मार्गावर उद्यापासून विशेष गाडी; एकूण ३६ फेऱ्या – Kokanai https://t.co/ySt1OVxaAS#konkanrailway pic.twitter.com/YP0mmgIlQS
— Kokanai Live News – knowledge – Entertainment (@kokanai21) April 25, 2024
खेड दि. २४ एप्रिल: खेड बाजारपेठेत बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी भरणे येथील पेट्रोल पंपावर 500 रुपयाच्या तीन नोटा आढळून आल्या. मात्र या नोटा कोणाकडून आल्यात हे समजले नाही आहे. अशा अजुन बनावट नोटा चलनात असून पैसे घेताना नोटा व्यवस्थित तपासून न घेतल्यास तुमची फसवणूक होऊ शकते. जेव्हा ती नोट दुकानात किंवा बँकेत दिली जाईल तेव्हाच समोराचा जर तुम्हाला म्हणाला तर ती खोटी आहे तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे योग्य काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नोटा खऱ्या की खोट्या त्या कशा ओळखाल?
500 रुपयांच्या नोटा कशा ओळखायच्या याबाबत RBI ने काही खाणाखुणा सांगितल्या आहेत. 21 वेगवेगळ्या गोष्टी पडताळून तुम्ही नोट खरी आहे की नाही याची माहिती घेऊ शकता. यामध्ये अगदी छोटं अंतर असतं पण ते कळणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर मोठं नुकसान होऊ शकतं.
2000 आणि 500 रुपयांच्या नोटांची सत्यता तपासण्यासाठी तुम्ही या पायऱ्या फॉलो करू शकता:
वॉटरमार्क पहा: नोट प्रकाशापर्यंत धरून ठेवा आणि टिपेच्या दोन्ही बाजूंनी दिसणारा वेगळा वॉटरमार्क तपासा.
सुरक्षा थ्रेड सत्यापित करा: प्रत्येक नोटमध्ये एक सुरक्षा थ्रेड एम्बेड केलेला असतो. नोट प्रकाशापर्यंत धरा आणि सुरक्षा धागा दृश्यमान आणि अखंड असल्याची खात्री करा.
रंग बदलणारी शाई तपासा: नोटांच्या काही भागांमध्ये रंग बदलणारी शाई असते जी झुकल्यावर रंग बदलते. सत्यता सुनिश्चित करण्यासाठी हे वैशिष्ट्य सत्यापित करा.
पोत अनुभवा: अस्सल नोट्समध्ये एक वेगळा पोत असतो जो पृष्ठभागावर तुमची बोटे चालवून जाणवू शकतो.
खालील 21 गोष्टी तुम्हाला बनावट नोट आणि खरी नोट यातील फरक ओळखायला मदत करेल.

1 मूल्यवर्ग Denomination क्रमांकासह नोंदणी
2 मूल्यवर्ग संख्या असलेली अव्यक्त प्रतिमा
3 देवनागरी मधील मूल्यवर्ग अंक
4 मध्यभागी महात्मा गांधींचे छायाचित्र
5 नोटेच्या डाव्या बाजूला ‘RBI’ आणि Rs 2000′ अशी सूक्ष्म अक्षरे
6 देवनागरी, RBI मधील शिलालेख ‘भारत’ आणि कलर शिफ्टसह अंकांसह विंडो सुरक्षा धागा. नोट वाकलेली असताना थ्रेडचा रंग हिरव्या ते निळ्यामध्ये बदलतो
७ गॅरंटी क्लॉज, प्रॉमिस क्लॉजसह गव्हर्नरची स्वाक्षरी आणि उजवीकडे RBI चिन्ह
८ महात्मा गांधींचे पोर्ट्रेट आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क
9 संख्या पॅनेल ज्यामध्ये वरच्या डाव्या बाजूला आणि खालच्या उजव्या बाजूला लहान ते मोठ्या संख्येपर्यंत वाढत आहेत
10 रुपयाच्या चिन्हासह मूल्यवर्ग अंक, खाली उजवीकडे रंग बदलणारी शाई (हिरवा ते निळा)
11 उजवीकडे अशोक स्तंभाचे प्रतीक
12 उजवीकडे 2000 रु.च्या वरच्या प्रिंटसह क्षैतिज आयत
13 उचललेल्या प्रिंटमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला सात कोनीय ब्लीड रेषा
14 डावीकडे नोट छापण्याचे वर्ष
15 स्लोगनसह स्वच्छ भारत लोगो
16 भाषा पॅनेल मध्यभागी
17 मंगळयानचे आकृतिबंध
18 उजवीकडे देवनागरीमधील मूल्यवर्ग संख्या
19 उजवीकडे 500 रुपये वाढवलेले प्रिंट असलेले वर्तुळ
20 उंचावलेल्या प्रिंटमध्ये डाव्या आणि उजव्या बाजूला पाच कोनीय ब्लीड रेषा
21 लाल किल्ला: भारतीय ध्वजासह भारतीय वारसास्थळाची प्रतिमा
ही माहिती शक्य असेल तेवढी शेअर करा जेणेकरून अशा बनावट नोटांद्वारे सामान्य नागरिकांची फसवणूक टाळता येईल.
Konkan Railway News: दक्षिणेकडील शोरनूर जंक्शन दरम्यान ब्रिज क्रमांक 02 (UP) चे रि-गर्डरिंगचे काम चालविण्याचा निर्णय दक्षिण रेल्वेने घेतला आहे. हे काम दिनांक 19/04/2024 ते 10/05/2024 पर्यंत चालू असणार आहे. या कामामुळे कोकण रेल्वेच्या तब्बल ४९ फेऱ्यांवर परिणाम होणार आहे. ऐन उन्हाळी हंगामात या गाडयांना लेटमार्क लागणार असल्याने; प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.
संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीकच्या माभळे येथील शासकीय विश्रामगृहाजवळ वृक्षतोड सुरू आहे. याची वनविभागाने चौकशी करावी, अशी मागणी येथील वनप्रेमींनी केली आहे.
महामार्गावरील माभळे येथे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. वनविभागाकडे पर्यावरणप्रेमींनी तक्रार केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर भेट दिली तसेच ती झाडे जप्तही केली होती. त्यानंतर पुन्हा झाडे तोडण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे येथील वनप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ही अवैध असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
भारतीय रेल्वे माहिती किंवा सुचना प्रसिद्धसाठी सोशल मीडिया चा मोठ्या प्रमाणात वापर करते. त्यात फेसबुक, ट्विटर ही माध्यमे वापरली जातात. त्याचबरोबर रेल्वेचा प्रत्येक विभाग स्वतःचे अधिकृत संकेतस्थळ याकरिता वापरते. या माध्यमातून रेल्वे संबधित माहिती उदा. मेगाब्लॉक, विशेष गाड्यांची घोषणा आणि ईतर माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचवते. कोकण रेल्वे सुध्दा या माध्यमातून ही माहिती आपल्या प्रवाशांना देते. मात्र कोकणरेल्वे वर विशेष गाड्यां संबधित होणार्या घोषणा उशिराने होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून होत आहे. कोकण रेल्वे माहिती प्रसिद्ध करेपर्यंत विशेष गाड्यांचे आरक्षणही चालू होऊन फुल्ल झालेले असते.
अगदी ताजे उदाहरण द्यायचे झाले तर काल कोकण रेल्वेने आपल्या संकेतस्थळावर आणि समाज माध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या वास्को द गामा – मुझफ्फरपूर 07309/07310 विशेष गाडीच्या प्रसिद्धी पत्रकाचे (Press Note) चे देता येईल. या विशेष गाडीच्या फेर्या दिनांक 17 एप्रिल पासून सुरू होणार आहेत. मात्र कोकण रेल्वे प्रशासनाने या गाडीचे प्रसिद्धीपत्रक अगदी एक दिवस आधी म्हणजे 16 एप्रिल रोजी प्रसिद्ध केले आहे. तोपर्यंत या गाडीचे आरक्षण फुल होऊन प्रतीक्षायादी खूपच वर पर्यंत जावून पोचली आहे. कोकणच्या प्रवाशांना या गाडीची कल्पना नसल्याने या गाडीचा फायदा उत्तरप्रदेश तसेच पाश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना झाला आहे.
ही गोष्ट पहिल्यांदाच झाले असे नाही. असे प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार प्रवासी करत आहेत. पाश्चिम आणि मध्य रेल्वे ज्या विशेष गाड्या चालवते त्या गाड्यांची माहिती कोकण रेल्वे योग्य वेळेत आपल्या प्रवाशांपर्यत का पोहोचवत नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
कोकण रेल्वे प्रशासनाला या गाड्यांची कल्पना नसते असे होऊच शकत नाही. कारण कोणतीही विशेष गाडी चालविण्यासाठी त्या योजनेत संबधित विभागाला सामील करून घेऊनच विशेष गाडी सोडण्यात येते. तर मग यामागचे कारण काय? प्रवाशांच्या सेवेपेक्षा आर्थिक फायदा बघून रेल्वे असे जाणूनबुजून तर करत नाही ना? अशी शंका प्रवाशांच्या मनात निर्माण झाली आहे.
अर्धवट माहिती का?
कित्येकदा रेल्वे प्रशासन विशेष गाड्यांची घोषणा तर करते मात्र आरक्षणाची तारीख जाहीर करत नाही. यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण होतो. विशेष गाड्यांची माहिती प्रसिद्ध करताना त्यासोबत आरक्षणाची तारीख ही जाहीर करण्यात यावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
मुंबई दि.१५ एप्रिल :लोकसभा निवडणूक ऐन उन्हाळी सुट्टीत आली़ असल्याने मुंबई पुण्यातील राजकारण्यांची चिंता वाढली आहे. मुंबई पुण्यातून लाखो चाकरमानी निवडणुकीच्या काळात गावी जाणार असल्यामुळे नेते, कार्यकर्ते यांची धास्ती वाढली आहे.
आतापासूनच पुढे मे अखेरपर्यंत मेल-एक्स्प्रेस आणि खाजगी ट्रॅव्हल्सचे तिकीट आरक्षण फुल्ल झाले आहे. रेल्वेच्या अतिरिक्त गाड्याही फुल्ल झाल्या आहेत.
मुंबईत दिनांक 20 मे रोजी मतदान आहे. मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली बदलापुर तसेच वसई विरार येथे मोठया प्रमाणात कोकणातील चाकरमानी वास्तव्यास आहे. कोकणातील आंबे फणस चाखण्यासाठी तसेच उन्हाळी सुट्टी घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. यंदा लोकसभा निवडणुक असल्याने चाकरमानी गावी जाणार नाहीत आणि येथेच राहून आपले कर्तव्य पार पाडणार असे वाटत होते. रेल्वे, एसटी खाजगी वाहनांच्या आरक्षणाची स्थिती पाहता यंदाही मोठ्या प्रमाणात चाकरमानी उन्हाळी सुट्टीत गावीच जाणार असल्याचे दिसत आहे. 20 मेपर्यंत तरी चाकरमानी परततील की नाही या या विचाराने राजकारण्यांना चैन पडेनाशी झाली आहे.
कोकणात जाणाऱ्या खासगी बसगाड्यांचा प्रवाशाचा ओघ पाहता १,२०० रुपयाच्या तिकीटदरात ३०० रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. १५ एप्रिल ते १५ मे या महिनाभराच्या काळात किमान ५ लाखांहून अधिक चाकरमानी गावाकडे जाणार असल्याचा अंदाज वाहतूक एजन्सीकडून व्यक्त करण्यात आला आहे यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होणार हे निश्चित आहे. २०१४ आणि २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत ४० आणि ४५ टक्क्यांवर अडकलेली लोकसभा मतदानाची टक्केवारी यंदाही तशीच राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Content Protected! Please Share it instead.