
2) Train No. 09057 / 09058 Udhna – Mangaluru Jn. – Udhna (Weekly) Special on Special Fare:

![]()

2) Train No. 09057 / 09058 Udhna – Mangaluru Jn. – Udhna (Weekly) Special on Special Fare:

![]()

Konkan Railway News :पश्चिम रेल्वेने कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ट्रेन क्र 20932 / 20931 इंदूर – कोचुवेली – इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत बदल केला आहे. या गाडीचे 02 स्लीपर कोच बदलून त्याऐवजी 02 इकॉनॉमी थ्री टायर एसी डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
20932 इंदूर-कोचुवेली साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीसाठी हा बदल दिनांक १९ डिसेंबर २०२३ पासून करण्यात येणार आहे.
20931कोचुवेली – इंदूर साप्ताहिक एक्सप्रेस या गाडीसाठी हा बदल दिनांक २२ डिसेंबर २०२३ पासून करण्यात येणार आहे.
| श्रेणी | सध्याची संरचना | सुधारित संरचना | बदल |
|---|---|---|---|
| टू टियर एसी | 02 | 02 | बदल नाही |
| थ्री टायर एसी | 06 | 06 | बदल नाही |
| इकॉनॉमी थ्री टायर एसी | 00 | 02 | २ डबे वाढवले |
| स्लीपर | 08 | 06 | २ डबे कमी केले |
| जनरल | 03 | 03 | बदल नाही |
| जनरेटर कार | 01 | 01 | बदल नाही |
| एसएलआर | 01 | 01 | बदल नाही |
| पेन्ट्री कार | 01 | 01 | बदल नाही |
| एकूण | 22 | 22 | बदल नाही |
![]()

रत्नागिरी, दि. ०८ : रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड-आंबडवे रस्त्यावर आज सकाळी पावणेदहाच्या सुमारास सावरे फाटा ते घोसाळे फाटा यादरम्यान आंबडवे-मंडणगड-नालासोपारा एसटीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही आहे मात्र वाहकासह 12 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर आंबडवे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले आहेत.
चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.या अपघातात एसटी बस पलटी झाली आहे. मंडणगड-आंबडवे या रस्त्याचे अपूर्ण कामामुळे येथे अपघात होत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

![]()

राजापूर : राजापूर तालुक्यातील मौजे.कोदवली साईनगर येथे दुर्मिळ जातीचा पिसोरी हरीण हा वन्यप्राणी आढळून आला आहे. येथील श्री राजन मधुसूदन गोखले यांचे राहत्या घराच्या पडवीत हा वन्यप्राणी आढळून आला आहे.
या प्राण्याची माहिती प्रशांत करांडे यांनी वनविभागाला दिल्या वर वनपाल राजापूर सदानंद घाटगे, वनरक्षक विक्रम कुंभार तसेच रेस्कूटीमचे दिपक चव्हाण,प्रथमेश म्हादये,निलेश म्हादये, विजय म्हादये, गणेश गुरव, दिपक म्हादये जागेवर जाऊन सदर पिसोरीस पकडून पिंजऱ्यात सुरक्षित केले. त्यानंतर पशू वैद्यकिय अधिकारी राजापूर श्री. प्रभात किनरे यांच्याकडून त्याची तपासणी करून घेण्यात आली. सदरचा पिसोरी वन्यप्राणी हा नर जातीचा असुन त्याचे वय 7 ते 8 महिने असून तो सुस्थितीत असल्याची खात्री करून पशुवैद्यकीय अधिकारी राजापूर व मा. परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी यांचे आदेशा नुसार वन्यप्राण्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
![]()

जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती 2023: सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत गट-क संवर्गातील विविध पदांच्या 334 जागांसाठी सरळसेवा भरती 2023 जाहीर झाली आहे.
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग भरती पदाचे नाव/ पदानुसार जागा:
1) आरोग्य पर्यवेक्षक- 01
2) आरोग्य सेवक (पुरूष)- 55
3) आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला)- 121
4) औषध निर्माण अधिकारी- 11
5) कंत्राटी ग्रामसेवक- 45
6) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.)- 29
7) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)- 02
8) कनिष्ठ लेखा अधिकारी- 02
9) कनिष्ठ सहाय्यक लेखा- 04
10) मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका- 02
11) पशुधन पर्यवेक्षक- 18
12) प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 02
13) तारतंत्री- 01
14) वरिष्ठ सहाय्यक- 04
15) वरिष्ठ सहाय्यक लेखा- 07
16) विस्तार अधिकारी (कृषि)- 03
17) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे)- 27
अर्ज कसा कराल? शैक्षणिकदृष्टीने पात्र उमेदवारांनी दिनांक 25 ऑगस्ट 2023 पर्यंत अधिकृत वेबसाईट zpsindhudurg.maharashtra.gov.in ला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असे आवाहन शासनाने केले आहे.
जाहिरात
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/सिंधुदुर्ग-जिल्हा-जिल्हापरिषद-भरती-2023.pdf” title=”सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हापरिषद भरती 2023″]जाहिरातीची पीडीएफ फाईल येथे डाऊनलोड करा 👇🏻
![]()

![]()

![]()

![]()
सावंतवाडी | सागर तळवडेकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची गेल्याच आठवडय़ात दिल्लीत भेट घेत कोकण रेल्वे संदर्भातील मागण्यांबाबत चर्चा केल्यानंतर नांदगाव रेल्वे स्थानकावर तुतारी एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. अवघ्या 24 तासांत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्नासह स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आवाज उठवणाऱ्या सावंतवाडीकरांच्या मागण्यांच काय झालं ? हा प्रश्न तसाच आहे. की सावंतवाडीकरांना कुणी वाली उरलं नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.
पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गसह महाराष्ट्राच शेवटच रेल्वे स्थानक हे सावंतवाडी आहे. परंतु सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं रखडलेलं काम पूर्णत्वास यावं तसंच मोजक्याच गाड्यांना थांबा असल्यानं अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा. या प्रवासी संघटनांच्या मागण्यांना रेल्वे प्रशासनकडून आजवर केवळ केराची टोपलीच दाखवली गेली आहे. सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असूनही उत्पन्नाच्या बाबतीत अग्र क्रमांकावर आहे. मात्र, तरीही केवळ ९ रेल्वे गाड्यांना इथे थांबा दिला गेलाय. तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच फेज-वन च काम होऊन फेज-टू चं काम अद्याप पूर्ण झालेल नाही आहे. ते कधी पूर्णत्वास येईल याबाबत अवाक्षरही कुणी काढत नाही. टर्मिनस तर लांबची गोष्ट रेल्वे गाड्यांना थांबे सुद्धा मिळत नाहीत. रेल्वेनं ये-जा करायला सावंतवाडीकरांना कुडाळवारी करावी लागत आहे. शहरातील नागरिकांना नाहक अर्धा तास यासाठी बायरोड प्रवासात घालवावा लागत आहे. तालुक्यातील इतर गावांतील प्रवाशांबद्दल न बोलेल चांगलं. जर स्वतःची चारचाकी किंवा दुचाकी असेल तर ठीक अन्यथा सरकारी वाहनांचा विचार केला तर प्रवाशांचे होणारे हाल ? ‘अतिथी देवो भव’ म्हणून पाहुण्या चाकरमान्यांना स्थानकापर्यंत सोडायला जाणाऱ्या तासनतास स्थानकावर बसून राहणाऱ्या कोकणीमाणसाचा विचार आमचे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे कधी करणार ? हा एक यक्षप्रश्न बनून राहिला आहे.
कोंकण रेल्वे प्रशासनाला इथल्या स्थानिक जनतेबद्दल, चाकरमानी, तसेच प्रवाशांबद्दल आस्था आहे का ? सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असून ही या स्थानकाचे उत्पन्न हे १३.४ करोड व प्रवासी संख्या ही ३.५ लाख एवढी आहे. उत्पन्नाच्या बाबतीत १० व्या क्रमांकावर असताना येथे ५ दैनिक व ४ साप्ताहिक अशा एकूण ९ रेल्वे गाड्या थांबतात. सावंतवाडी स्थानकावर असा अन्याय का ? उत्पन्न , प्रवासी संख्या असून ही कमी थांबे का ? वारंवार सावंतवाडीवर हा अन्याय कशासाठी? की सावंतवाडीकरांना कुणी वाली राहीलेला नाही ?
![]()

संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावर संगमेश्वर ते रत्नागिरी सेक्शन(रत्नागिरी स्थानक वगळून) दरम्यान मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मंगळवार दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ‘मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
1) तिरुनेलवेली- जामनगर (१९५७७) या दि. ७ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु होणाऱ्या एक्स्प्रेसला ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास रोखून ठेवले जाणार आहे.
2) तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४६) ही ठोकूर ते रत्नागिरी स्थानकादरम्यान १ तास थांबवून ठेवली जाणार आहे.
![]()
Content Protected! Please Share it instead.