Category Archives: कोकण रेल्वे

गणेशभक्तांसाठी ‘मोदी एक्सप्रेस’चा डबल धमाका – मोफत विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

कोकणवासीय गणेशभक्तांसाठी यंदाही “मोदी एक्सप्रेस”चा डबल धमाका घेऊन येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने सलग १३व्या वर्षी मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोफत रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली जात आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, २३ आणि २४ ऑगस्ट २०२५ रोजी या विशेष गाड्या धावणार असून प्रवाशांसाठी मोफत भोजनाची सोयही केली जाणार आहे.

ही सेवा खास करून लोकसभा आणि विधानसभेतील प्रचंड प्रतिसादाबद्दल जनतेचे आभार मानण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. बुकिंगसाठी ठिकाण: भाजप तालुका मंडळ अध्यक्ष, शिवाजी सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ११ वाजता दादर स्टेशन, प्लॅटफॉर्म क्रमांक १४.

या उपक्रमाचे आयोजन केंद्रीय मंत्री नितेश नारायणराव राणे यांनी केले असून, यामुळे हजारो चाकरमान्यांना सोयीस्कर आणि मोफत प्रवासाची संधी मिळणार आहे.

Konkan Railway: राजापूर रोड स्थानकावर नेत्रावती एक्स्प्रेसला थांबा मंजूर; प्रवाशांना मोठा दिलासा

   Follow us on        

राजापूर : कोकण रेल्वे प्रशासनाकडून राजापूरकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. १६३४५/१६३४६ लोकमान्य टिळक (टर्मिनस) – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेसया गाडीला आता राजापूर रोड स्थानकावर थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही सुविधा १५ ऑगस्ट २०२५ पासून लागू होणार आहे. सुरवातीला हा थांबा प्रायोगिक तत्वावर असणार आहे.

गाडी थांब्याची वेळ
गाडी क्रमांक १६३४५ : लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम सेंट्रल “नेत्रावती” एक्स्प्रेस रोज संध्याकाळी ७:४० ते ७:४२ राजापूर रोड येथे थांबेल.

गाडी क्रमांक १६३४६ : तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस “नेत्रावती” एक्स्प्रेस रोज सकाळी ७:३८ ते ७:४० येथे थांबेल.

अलीकडेच सांगली जिल्ह्याचे आमदार सदाभाऊ खोत यांनी या स्थानकावर जनशताब्दी एक्स्प्रेस आणि नेत्रावती एक्स्प्रेस या गाड्यांना राजापूर स्थानकावर थांबा द्यावा अशी मागणी केली होती — या मागणीचा पाठपुरावा करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना यावर्षीच्या मे महिन्यात पत्र लिहून कोकण रेल्वेवरील राजापूर रोड स्थानकावर महत्त्वाच्या गाड्यांना थांबा देण्याची विनंती केली होती.

राजापूर रोड स्थानक हे कोकण रेल्वेवरील एक महत्त्वाचे स्थानक असून, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रवाशांसाठी ते मुख्य संपर्क केंद्र आहे. पूर्वी नेत्रावती एक्स्प्रेसला येथे थांबा नव्हता, त्यामुळे प्रवाशांना रत्नागिरी किंवा कणकवली स्थानकांचा वापर करावा लागत असे. स्थानिक नागरिक आणि प्रवासी संघटनांनी अनेक वर्षांपासून या गाडीला थांबा देण्याची मागणी केली होती.

नेत्रावती एक्स्प्रेस ही गाडी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि केरळची राजधानी तिरुवनंतपुरम यांना जोडणारी लांब पल्ल्याची महत्त्वाची सेवा आहे. दररोज धावणारी ही गाडी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ या चार राज्यांतून प्रवास करते. ‘नेत्रावती’ नदीवरून या गाडीला नाव देण्यात आले आहे.

या प्रायोगिक थांब्यामुळे कोकणातील विशेषतः राजापूर आणि आसपासच्या भागातील प्रवाशांना थेट मुंबई, गोवा, मंगळुरू आणि केरळकडे जाणे सुलभ होईल. तसेच मुंबईहून परतताना प्रवाशांना घरी पोहोचणे सोपे होईल.

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार ‘वीकेंड स्पेशल’ ट्रेन

   Follow us on        

Konkan Railway : स्वातंत्र्यदिन आणि त्याला लागून आलेल्या सुट्ट्यांमध्ये कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे .

०१५०२ / ०१५०१ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. साप्ताहिक विशेष गाडी

गाडी क्र. ०१५०२ मडगाव जं. – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष गाडी मडगाव जं. येथून १७ ऑगस्ट (रविवार) रोजी दुपारी १६:३० वाजता सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:०० वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे पोहोचेल.

गाडी क्र. ०१५०१ लोकमान्य टिळक (टी) – मडगाव जं. साप्ताहिक विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून १८ ऑगस्ट २०२५ (सोमवार) रोजी सकाळी ०८:३० वाजता सुटेल व त्याच दिवशी रात्री २२:४० वाजता मडगाव जं. येथे पोहोचेल.

थांबे: कारमळी, थिवीम, सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली , रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड़, माणगाव, रोहा, पेन, पनवेल व ठाणे.

रचना: एकूण २० एलएचबी डबे = एसी २ टियर – ०१ डबा, एसी ३ टियर – ०३ डबे, एसी ३ टियर इकॉनॉमी – ०२ डबे, स्लीपर – ०८ डबे, जनरल – ०४ डबे, एसएलआर – ०१, जनरेटर कार – ०१.

गाडी क्र. ०१५०२ आणि ०१५०१ साठी आरक्षण १२ ऑगस्ट २०२५ पासून सर्व पीआरएस केंद्रांवर, इंटरनेट व आयआरसीटीसी वेबसाईटवर खुले होईल.

 

Sangameshwar: फक्त चर्चा… कृती शून्य! संगमेश्वरची पुन्हा थट्टा!

गणपती बाप्पाच्या कृपाशीर्वादाने वेगवान हालचाली घडोत, हीच जनसामान्यांची कामना!

   Follow us on        

गेल्या काही दिवसांपासून संगमेश्वर वासी जनतेला आनंदाचं भरतं आलं होतं! कारणही तसंच खास, आपल्या मतदार क्षेत्राचे नामदार खासदार नारायण राणे आपल्या तीन एक्स्प्रेसना संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा मिळावा या मागणीचे पत्रक घेऊन रेल्वे मंत्री अश्विनीकुमार वैष्णव यांना दिल्ली येथे भेटले. या वेळी कोकण रेल्वेकडून दिलेल्या सकारात्मक प्रस्तावाची प्रत जोडली होती.

योगायोग म्हणजे त्याच दिवशी खासदार सुनील तटकरे हे सुद्धा अंजनी, कोलाड या स्थानकांवर काही एक्स्प्रेसना थांबा मिळावा या मागणीसाठी रेल्वे मंत्र्यांच्या भेटीला गेले होते. तसा तो दिवस कोकणातील जनतेसाठी आनंदाचा. ऐन गणेशोत्सवात अतिरिक्त रेल्वे गाड्या, आणि सोबत एक्स्प्रेसना थांबा मिळणार म्हणून सगळेच आनंदात!

पण काही दिवसांनी अंजनी,कोलाड स्थानकावर रेल्वे गाड्यांना थांबा मंजूर झाल्याचे पत्र मिळाले. पण संगमेश्वरच्या जनतेला प्रतिक्षेत ठेवले होते. आता खूप दिवस झाले. जवळपास एक महिना लोटला तरी मागण्यांचा विचार रेल्वे बोर्ड किंवा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी केला नाही.

दोन्ही कार्यालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता रेल्वे बोर्ड कोकण रेल्वे बोर्डाने अधिकृत आदेश दिले असल्याचे कळविले. खातरजमा करण्यासाठी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, अशा आशयाचे रेल्वे बोर्डाचे पत्र प्राप्त न झाल्याचे सांगितले जात आहे. चेंडूची टोलवाटोलव केली जाते आहे.

नेमकी रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे यांच्या डोक्यात नेमकं चाललंय काय?

एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या मतदार क्षेत्रातील खासदार आपापल्या क्षेत्रातील समस्या घेऊन येतात. रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करतात. त्यातील एका खासदारांच्या मागणीला त्वरित हिरवा झेंडा दाखवला गेला. मग मागील दोन अडीच वर्षांपासून कायम पाठपुरावा करीत असलेल्या मागणीला प्रतिक्षा यादीत ढकलून वजनाचा फेरफार रेल्वे बोर्ड आणि कोकण रेल्वे प्रशासनाने आमच्या निदर्शनास आणून दिला आहे काय? अशी आगपाखड जनसामान्यांनी केली आहे.

कोंबड्या बकऱ्यांसारखा खचखच गर्दीने भरलेल्या रेल्वेचा प्रवास कोकणी माणूस करतो. कधी जास्तीची अपेक्षा न करणारा कोकणी माणूस कायम अन्याय सहन करतो आहे. संगमेश्वर तालुक्यात छत्रपती संभाजी महाराज, अनेक धार्मिक स्थळे, गडकोट, निसर्गरम्य ठिकाणे यांमुळे आता पर्यटन वाढले. पण या कंटाळवाण्या रेल्वे प्रवासामुळे पर्यटक नाखुश आहेत.

ऐन सणासुदीच्या दिवसांत अतिरिक्त सोडण्यात येत असलेल्या रेल्वे गाड्या, त्यात मागणी जवळजवळ मान्य झाल्याचा विश्वास यामुळे सगळे चाकरमानी आणि संगमेश्वरची जनता खुशीत होती. पण खासदार नारायण राणे यांच्या भेटीनंतरही उपेक्षित रहावे लागत असेल तर हा मोठ्या प्रतिष्ठेचा विषय आहे. संगमेश्वरच्या या मागण्यांसाठी आमदार, खासदार रेल्वे मंत्र्यांशी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करतात. पण तरीही मागण्यांचा विचार होत नाही. प्रतिक्षा यादीत कुठवर संगमेश्वर वासी यांच्या मागण्या घुटमळत ठेवणार? या गणेशोत्सवात थांबे मिळाले तरच बाप्पा पावले म्हणू!

नाहीतर जनसामान्यांचा असंतोष उफाळून येणार,हे मात्र नक्की!

-रुपेश मनोहर कदम/सायले

Railway Updates: ५२ गाड्यांसाठी नवीन थांबे जाहीर; कोकण रेल्वे मार्गावर ४ गाड्यांचा समावेश.. यादी इथे वाचा

   Follow us on        

Railway Updates:प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने विविध मार्गांवरील गाड्यांना काही ठिकाणी नवीन थांबे मंजूर केले आहेत. नुकत्याच जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार एकूण ५२ गाड्यांना इगतपुरी, देवळाली, भडली, मोहोळ, भिवंडी रोड, वालिवडे, विलाड, वांबोरी, सारोळा, राहुरी, रंजनगाव रोड, पाधेगाव, कासठी, चितळी, बेलवंडी, अकोलनेर, रोहा, पेन, जांबारा, हिरडगड, मार्तूर, कुलाळी आदी स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.

या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, साईनगर शिर्डी, अमरावती, गोंदिया, गोरखपूर, हावडा, कोल्हापूर, निजामाबाद, पुणे, सावंतवाडी रोड, दादर, दिवा, बेंगळुरू, जोधपूर, इंदूर, हैदराबाद, विजयपूर अशा विविध मार्गांवरील एक्सप्रेस आणि पॅसेंजर गाड्यांचा समावेश आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील ११००३/११००४ दादर–सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस आणि १०१०५/ ५०१०५ दिवा–सावंतवाडी एक्सप्रेस यांनाही अनुक्रमे रोहा व पेन येथे थांबे मंजूर झाले आहेत.

क्रमांक गाडी क्रमांक / नाव स्थानक
१२१८८ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – जबलपूर एक्सप्रेस इगतपुरी
१२१८७ जबलपूर – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस इगतपुरी
१२१३२ साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस इगतपुरी
१२१३१ दादर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस इगतपुरी
१२११२ अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस इगतपुरी
१२१११ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – अमरावती एक्सप्रेस इगतपुरी
१२१०६ गोंदिया – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस इगतपुरी
१२१०५ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – गोंदिया एक्सप्रेस इगतपुरी
२२५३७ गोरखपूर – लोकमान्य टिळक (टी) एक्सप्रेस देवळाली
१० १२८१० हावडा – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस देवळाली
११ १२८०९ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – हावडा एक्सप्रेस देवळाली
१२ २२५३८ लोकमान्य टिळक (टी) – गोरखपूर एक्सप्रेस देवळाली
१३ ५९०७६ भुसावळ – नंदुरबार पॅसेंजर भडली
१४ ५९०७५ नंदुरबार – भुसावळ पॅसेंजर भडली
१५ १२११६ सोलापूर – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस मोहोळ
१६ १२११५ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – सोलापूर एक्सप्रेस मोहोळ
१७ १६५०८ बेंगळुरू – जोधपूर एक्सप्रेस भिवंडी रोड
१८ १६५०७ जोधपूर – बेंगळुरू एक्सप्रेस भिवंडी रोड
१९ ११०३० कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज (टी) एक्सप्रेस वालिवडे
२० ११०२९ छत्रपती शिवाजी महाराज (टी) – कोल्हापूर एक्सप्रेस वालिवडे
२१ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस विलाड
२२ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस विलाड
२३ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस वांबोरी
२४ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस सारोळा
२५ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस सारोळा
२६ ११०४२ साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस राहुरी
२७ ११०४१ दादर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस राहुरी
२८ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस रंजनगाव रोड
२९ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस रंजनगाव रोड
३० ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस पाधेगाव
३१ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस पाधेगाव
३२ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस कासठी
३३ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस कासठी
३४ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस चितळी
३५ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस चितळी
३६ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस बेलवंडी
३७ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस बेलवंडी
३८ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस अकोलनेर
३९ ११४०९ दौंड – निजामाबाद एक्सप्रेस अकोलनेर
४० ११००४ सावंतवाडी रोड – दादर एक्सप्रेस रोहा
४१ ११००३ दादर – सावंतवाडी रोड एक्सप्रेस रोहा
४२ ५०१०५ सावंतवाडी रोड – दिवा एक्सप्रेस पेन
४३ १०१०५ दिवा – सावंतवाडी रोड एक्सप्रेस पेन
४४ १९३४४ नैनपूर – इंदूर एक्सप्रेस जांबारा
४५ १९३४३ इंदूर – नैनपूर एक्सप्रेस जांबारा
४६ १९३४४ नैनपूर – इंदूर एक्सप्रेस हिरडगड
४७ १९३४३ इंदूर – नैनपूर एक्सप्रेस हिरडगड
४८ १७०३० हैदराबाद – विजयापूरा एक्सप्रेस मार्तूर
४९ १७०२९ विजयापूरा – हैदराबाद एक्सप्रेस मार्तूर
५० १७०३० हैदराबाद – विजयापूरा एक्सप्रेस कुलाळी
५१ १७०२९ विजयापूरा – हैदराबाद एक्सप्रेस कुलाळी
५२ ११४१० निजामाबाद – पुणे एक्सप्रेस वांबोरी

Konkan Railway: कार-ऑन-ट्रेन सेवेला आता कोकणातही ‘हॉल्ट’

 

   Follow us on        

Konkan Railway: कोकण रेल्वे महामंडळाने कोलाड (महाराष्ट्र) ते वेर्णा (गोवा) दरम्यान सुरू केलेल्या रो-रो (Ro-Ro) कार ट्रान्सपोर्टेशन सेवेला आता नवा थांबा मिळाला आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार आणि सोयीसाठी नांदगाव रोड स्थानकावर या सेवेसाठी अतिरिक्त थांबा जाहीर करण्यात आला आहे. यामुळे कार मालकांसाठी ही सेवा अधिक लवचिक आणि उपयोगी ठरणार आहे. आता प्रवासी कोलाड, नांदगाव रोड किंवा वेर्णा या कोणत्याही स्थानकावरून कार लोड आणि अनलोड करू शकतील.

या सेवेसाठी नोंदणीची अंतिम मुदत १८ ऑगस्ट २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. कोलाड ते वेर्णा दरम्यान एका कारसाठी भाडे ₹७८७५/- (५% GST सहित) आहे, तर कोलाड ते नांदगाव दरम्यानचे भाडे ₹५४६०/- इतके आहे. प्रत्येक कारसाठी ₹४०००/- नोंदणी शुल्क आकारले जाईल, जे सेवेसाठी पात्र ठरल्यास अंतिम भाड्यातून वजा केले जाईल. मात्र, जर १६ हून कमी बुकिंग्स प्राप्त झाल्या तर सेवा रद्द करण्यात येईल आणि नोंदणी शुल्क परत करण्यात येईल.

कार लोड झाल्यानंतर चालक किंवा सहप्रवाशांना कारमध्ये बसून प्रवास करण्याची परवानगी नसेल. त्याऐवजी प्रवाशांनी रेल्वेच्या कोचमध्ये 3AC किंवा 2S वर्गात तिकिट काढून प्रवास करावा लागेल. एका कार बुकिंगवर ३ प्रवासी (२ जण 3AC आणि १ जण 2S) प्रवास करू शकतात. अतिरिक्त प्रवासी केवळ रिक्त जागा उपलब्ध असल्यासच प्रवास करू शकतील.

या नव्या थांब्यामुळे वेळापत्रकातही बदल करण्यात आला आहे. कोलाडहून वेर्णाकडे जाणारी सेवा दुपारी ३ वाजता सुटेल आणि नांदगाव रोडवर रात्री १० वाजता पोहोचेल, तर दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता वेर्णा स्थानकात आगमन होईल. वेर्णाहून परतीच्या प्रवासात गाडी दुपारी ३ वाजता सुटेल, नांदगावला रात्री ८ वाजता पोहोचेल आणि कोलाडला दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता पोहोचेल.

नोंदणीसाठी कोलाड, वेर्णा किंवा कणकवली (नांदगावसाठी) स्थानकावर संपर्क करता येईल. अधिक माहितीसाठी आणि अटी व शर्तींसाठी अधिकृत संकेतस्थळ www.konkanrailway.com येथे भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोकण रेल्वेच्या समस्या आणि उपाययोजना: सागर तळवडेकर यांची अभ्यासपूर्ण मांडणी

   Follow us on        

सावंतवाडी | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोकण रेल्वे संदर्भात गेल्या काही वर्षांत झालेली जनजागृती वाखाणण्याजोगी असून, युवकांच्या सहभागातून कोकण रेल्वे संदर्भातील विविध प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे उपाध्यक्ष व अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे संपर्क प्रमुख श्री. सागर तळवडेकर यांनी “कोकण रेल्वे समस्या आणि निवारण – माझ्या नजरेतून” या शीर्षकाखाली तीन महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकत सरकारला प्रश्न विचारले आहेत.

“कोकण रेल्वे समस्या आणि निवारण.
माझ्या नजरेतून..

नमस्कार मंडळी, काही वर्षापासून कोकण रेल्वे संदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंबहुना तळकोकणात जी जनजागृती झालीत ती खरच वाखण्याजोगे आहे. याआपल्या माहिती साठी सांगतो की 2017 ते 2020 पर्यंत सावंतवाडीचे कै. डी के सावंत यांनी जी रेल्वे संदर्भात मुहूर्त बांधली ती आता कुठे रंगू लागली आहे. कोरोना काळात कोणालाही न कळता सावंतवाडी आणि कणकवली स्थानकावरून गाड्या कमी करण्यात आल्या, परंतु तेव्हा याचा विरोध कोणी केला नव्हता, त्यात सावंतवाडी येथील प्रस्तावित टर्मिनसचे काम देखील ठप्प पडले होते.
‎दरम्यानच्या काळात सावंतवाडीतील काही तरुणांनी बॅनर लावून केलेली रेल्वे प्रशासनाची थट्टा पूर्ण जिल्हाभर गाजली होती.आणि येथूनच या सिंधुदुर्गात कोकण रेल्वे महामंडळाविरोधात कोकणवासीयांची नकारात्मकता दिसून यायला लागली.
‎वर्षं 2022, जेव्हा कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवली आणि सावंतवाडी स्थानकातून काढण्यात आलेले थांबे कर्नाटक राज्यातील स्थानकांना देण्यात आले तेव्हा सावंतवाडीतील काही युवकांच्या मनात पाल चुकचुकली. आणि इथूनच काल पर्यंत झालेले आंदोलन हे त्याचेच फळ. आणि हो कोकणातील अजून स्थानकांवर पुढेही आंदोलने होतील..!! 

समस्या क्र. १.- कोकण रेल्वे नेमकी कोणाची..??

‎बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस या महनीय व्यक्तींमुळे रेल्वे कोकणात आली खरी, परंतु फायदा कोकणाला काही झालाच नाही. मुळात कोकण रेल्वे हे एक महामंडळ असल्याकारणाने याला अर्थसंकल्पीय तरतूदच नाही. त्यामुळे प्रवासी, मालवाहतूक, आदी उत्पन्नावर या महामंडळाला आपला कारभार हाकावा लागतो.
‎उपाय- या महामंडळाचे भारतीय रेल्वे मध्ये विलिनीकरण करणे.आणि कोकण रेल्वेचा रत्नागिरी विभाग मध्य रेल्वे कडे हस्तांतरित करणे. यासाठी महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांनी आपली संमती देणे आवश्यक आहे.
‎महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा केलीय. त्यासाठी आम्ही युवकांनी मेल मोहीम करून हा मुद्दा खासदार धैर्यशील मोहिते, सुनील तटकरे, नरेश म्हस्के, रविंद्र वाईकर आदींकडून लोकसभेत आणि राज्यसभेत उपस्थित केला.(त्यांनी मांडलेला मजकूर आणि आम्ही केलेली मेल मोहिमेतील मजकूर यात १०० टक्के साधर्म्य होते) १ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबईतील मुंबई प्रेस क्लब मध्ये पत्रकार परिषद घेऊन या विषयाला महाराष्ट्राच्या कोपऱ्याकोपऱ्यात पोचवले होते.

समस्या क्र. २.- कोकणी माणसांना तिकिटे, नवीन गाड्या कधी मिळणार..?? खरंच टर्मिनसची आवश्यकता असते का??

‎कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्वच गाड्या ह्या बारामाही फुल धावतात, त्यामुळे आपला कोकणी माणूस हा वेटींग वरच राहतो.याला मूळ कारण काय असावे बरे..?? काही लोक म्हणतील एजंट..!!परंतु मी म्हणतो याला एजंट कारणीभूत नाही, एजंट हे तांत्रिक कारण असूच शकत नाही. मूळ कारण हे टर्मिनस सुविधा आहे.
‎कोकणात टर्मिनस नसल्याकारणाने येथून गाड्या सोडण्यावर निर्बंध येतात.त्यामुळे कोकणसाठी नवीन गाडी सोडायची म्हटल्यावर ती गोव्यातील मडगाव स्थानकापर्यंत सोडली जाते,आणि इथेच सगळा खेळ होऊन जातो. कारण गोव्यात बाराही महिने पर्यटकांचा भरणा चालू असतो, गोव्यातील मडगाव आणि थिवी हे स्थानक प्रवासी संख्या आणि उत्पन्नात अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. म्हणून गाडी जर गोव्यापर्यंत गेली तर सर्वात जास्त तिकीट कोटा ही तेथील स्थानकांना अधिक मिळतो आणि आपली कोकणी जनता वेटींग वर मूग गिळून गप्प राहते आणि आपला रोष एजंट वर काढते.
‎उपाय – कोकणाला जर कोकणमर्यादित गाड्या हव्या असतील, पुरेसा तिकीट कोटा हवा असेल तर कोकणात स्वतंत्र टर्मिनसची नितांत आवश्यकता आहे.
त्यासाठी तत्कालीन रेल्वे मंत्री श्री सुरेश प्रभू यांनी सावंतवाडी येथे टर्मिनस मंजूर केले खरे परंतु कोकणवासीयांचा निद्रस्त भूमिकेमुळे हे टर्मिनस गेले १० वर्ष रखडले.
सावंतवाडीत जर टर्मिनस आणि कोचिंग डेपो झाला तर त्याचा फायदा फक्त सावंतवाडीला होणार नसून तर संपूर्ण कोकणला त्याचा फायदा होईल. ज्या प्रमाणे तुतारी एक्सप्रेस मध्ये फक्त कोकणी मनुष्य मुंबई पर्यंतचा प्रवास करतो तसाच प्रवास अजून काही गाड्या सावंतवाडी वरून सुरू झाल्यास होईल. त्यासाठी परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनस आणि कोचिंग डेपोची आवश्यकता आहे.

समस्या क्र. ३.- कोकण रेल्वे महामार्गाचे दुहेरीकरण कधी..??वाढीव थांबे कधी मिळणार..??सिंधुदुर्गात १५ गाड्या का थांबत नाहीत??येथील प्रवासी सुविधांचे काय..??

‎कोकण रेल्वे हे केंद्राचा रेल्वे मंत्रालय संलग्न महामंडळ आहे,ज्या मध्ये ४ राज्यांची हिस्सेदारी आहे. आणि सदर महामंडळ सध्या कर्जाच्या खाईत आहे, आजमितीस या महामंडळावर हजारो कोटीच्या घरात कर्ज आहे.
‎उपाय – आजचा घडीला कोकण रेल्वे मार्गाचे संपूर्ण दुहेरीकरण करण्यासाठी किमान ४० हजार कोटींची गरज आहे.जे एका महामंडळाला झेपण्यासारखे नाही. याचकारणाने सध्या या मार्गाचे दुहेरीकरण होणे शक्य नाही.या महामंडळाने टप्पा दुहेरीकरणाचा प्रस्ताव प्रत्येक राज्यसरकारला पाठवला होता परंतु त्याचे घोडे पुढे धावलेच नाहीत.
‎थांब्यासंदर्भात बोलायचे झाले तर त्याला मोठा जन लढा उभारावा लागतो कारण जो पर्यंत मागणी करत नाही तो पर्यंत त्याचा वर कारवाई होत नाही. मी एक रेल्वेचा अभ्यासक म्हणून हा मुद्दा उपस्थित केला होता परंतु तेव्हा माझ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते.त्याचे एक कारण म्हणजे आपली उदासीनता.त्यामुळेच कदाचित सिंधुदुर्गात एकूण १५ गाड्या थांबत नाहीत, त्यात सावंतवाडी स्थानकातून काढण्यात आलेली राजधानी एक्सप्रेस व गरीब रथ एक्सप्रेस आणि कणकवली स्थानकातून काढलेली हिसार कोइंबतूर एक्सप्रेसचा देखील समावेश आहे.

‎येथील प्रवासी सुविधासंदर्भात बोलायचे झाले तर आम्ही सिंधुदुर्गातील तरुण युवक गेले दोन वर्षे याचा पाठपुरावा करत आहोत याचे फलित म्हणजे वैभववाडी येथे पादचारी पूलचे काम सुरू आहे ( ओंकार लाड व टीम चे प्रयत्न), कणकवली येथे प्लॅटफॉर्म २ वर २५० मीटरचा COP ( कव्हर ऑन प्लॅटफॉर्म) म्हणजेच निवारा शेड, व खाली जाणारा सरकता जिना.(सुनीत चव्हाण आणि टीम). सिंधुदुर्ग येथे PRS सुविधा, वांद्रे मडगाव एक्स्प्रेसचा थांबा (शुभम परब आणि टीम).
सावंतवाडी येथे अप्रोच रोडचे काम ९० टक्के पूर्ण, PRS सुविधा पूर्णवेळ सुरू, वांद्रे – मडगाव व नागपूर मडगाव एक्स्प्रेसचे थांबे मिळाले, प्लॅटफॉर्म ३ वर १७० मीटरचा COP आणि लिफ्ट प्रस्तावित/ मंजूर. (सागर, मिहिर, भूषण आणि टीम) आदी.
मंडळी, या काही महत्त्वाचा समस्या जे मला वाटतात. याव्यतिरिक्त आपल्या काही समस्या असतील आणि माझ्याकडून काही चुकल्या असतील.तर त्या तुम्ही माझ्यापर्यंत पोचवू शकता. मी आणि माझी संपूर्ण टीम त्या सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न नक्कीच करू.‎‎आपल्या सूचनांचे नक्कीच स्वागत करून मी थांबतो.”


‎- ‎सागर तळवडेकर
‎उपाध्यक्ष, कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी.
‎संपर्क प्रमुख, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती महाराष्ट्र.

Konkan Railway: स्वातंत्र्यदिनाच्या लांब सुट्टीसाठी मुंबई-सावंतवाडी विशेष गाड्या चालविण्यात याव्यात

   Follow us on        

मुंबई, ३० जुलै २०२५: येत्या १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०२५ दरम्यानच्या लांब सुट्टीच्या पार्श्वभूमीवर, कोकणमार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई ते सावंतवाडी मार्गावर विशेष गाड्या चालवाव्यात, अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती कडून करण्यात आली आहे.

मुंबई–कोकण दरम्यान धावणाऱ्या कोकणकन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस, तुतारी एक्सप्रेस, दिवा-सावंतवाडी एक्सप्रेस, वंदे भारत, तेजस, जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस यांसारख्या सर्व गाड्यांचे आरक्षण या काळात प्रचंड गर्दीमुळे प्रतीक्षा यादी अथवा “नो रूम” (REGRET) दाखवत आहेत.

प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जर वेळेवर अतिरिक्त गाड्यांची घोषणा झाली नाही, तर पनवेल, ठाणे, दादर, रत्नागिरी आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर गंभीर स्थिती निर्माण होऊ शकते. याआधीही अशा लांब सुट्ट्यांमध्ये अपुरी रेल्वे व्यवस्था असल्याने रेल्वेरोको, दगडफेक आणि प्रवाशांना आरक्षित तिकीट असूनही चढता न आल्याच्या घटना घडल्या आहेत.

याआधीही प्रवाशांकडून अनेक वेळा विशेष गाड्यांची मागणी करण्यात आली होती, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे यंदाच्या लांब सुट्टीसाठी सीएसएमटी–सावंतवाडी रोड आणि बांद्रा टर्मिनस–सावंतवाडी रोड दरम्यान विशेष गाड्यांची तातडीने घोषणा करावी, अशी प्रवाशांची आग्रही मागणी आहे.

विशेष गाड्या न सोडल्यास परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ई-मेल निवेदनाद्वारे समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाला केली आहे.

 

कोकण रेल्वेची भरती – २०२५: सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागांतील पदांसाठी थेट मुलाखती

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) सिग्नल आणि टेलिकम्युनिकेशन विभागात कंत्राटी पद्धतीने भरती जाहीर केली असून, जम्मू-काश्मीरमधील कटरा ते बनिहाल दरम्यानच्या युएसबीआरएल प्रकल्पासाठी ही भरती करण्यात येणार आहे. एकूण २८ पदांसाठी ही भरती असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. या पदांमध्ये कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (JTA) साठी ४ जागा आणि टेक्निशियन पदासाठी २४ जागांचा समावेश आहे.

या पदांसाठी उमेदवारांना पाच वर्षांच्या ठराविक कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार असून कामकाज समाधानकारक राहिल्यास कालावधी वाढविण्याचा अधिकार कोकण रेल्वेकडे राहील. JTA पदासाठी पात्र उमेदवारांकडे इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, IT किंवा संगणक शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा असणे आवश्यक आहे. तसेच रेल्वेमधील सिग्नल प्रणालीत किमान एक वर्षाचा अनुभव असणे अनिवार्य आहे. टेक्निशियन पदासाठी ITI, B.Sc. किंवा संबंधित शाखेतील डिप्लोमा आवश्यक असून अनुभव नसलेल्या उमेदवारांना नियुक्तीनंतर प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

JTA पदासाठी मासिक एकूण वेतन ₹४३,३८०/- इतके असेल, तर टेक्निशियनसाठी ₹३७,५००/- इतके वेतन ठरविण्यात आले आहे. त्याशिवाय नियुक्त उमेदवारांना विमा संरक्षण, आरोग्य विमा भत्ता, रेल्वे पास, विश्रांतीगृह, प्रवास भत्ता, सुट्ट्या यांसारख्या विविध सुविधा देण्यात येणार आहेत. उमेदवाराचे वय १ जुलै २०२५ रोजी ३० वर्षांपेक्षा अधिक नसावे. अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना केंद्र शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाणार आहे.

JTA पदासाठी मुलाखत ५ ऑगस्ट २०२५ रोजी, तर टेक्निशियन पदासाठी ७ ऑगस्ट २०२५ रोजी होणार आहे. दोन्ही मुलाखती सकाळी ९ ते १२ दरम्यान नोंदणीसह जम्मूतील त्रिन्ठा, ग्रानमोर येथील कोकण रेल्वेच्या प्रकल्प कार्यालयात पार पडतील. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहताना सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे आणि स्वमोसताखत प्रतिंसह अर्जाचा नमुना भरून आणणे बंधनकारक आहे.

ही संधी केवळ तांत्रिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी असून, कंत्राटी स्वरूपाची असल्याने उमेदवारांनी सर्व अटी व नियम समजून घेऊनच अर्ज करावा. या भरतीबाबत अधिक माहिती व अर्ज नमुना कोकण रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर www.konkanrailway.com उपलब्ध आहे.

कोकण रेल्वेच्या या भरतीमुळे तांत्रिक क्षेत्रातील तरुणांना उत्तम संधी उपलब्ध होणार असून जम्मू-काश्मीरमधील प्रकल्पावर कार्य करण्याचा अनुभव मिळणार आहे. ही भरती पारदर्शक पद्धतीने थेट मुलाखतीद्वारे पार पडणार असल्यामुळे पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.

सावंतवाडी स्थानकात गाड्यांच्या थांब्यांसाठी खासदार सुप्रिया सुळे यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी

   Follow us on        

सिंधुदुर्ग : सावंतवाडी रोड (ZBTT) रेल्वे स्थानकात पुन्हा गाड्यांचे थांबे सुरु करण्यात यावे, तसेच काही नव्या गाड्यांनाही थांबा देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्यांनी १७ जुलै २०२५ रोजी यासंदर्भात अधिकृत पत्र पाठवले असून स्थानिक नागरिकांच्या दीर्घकालीन मागण्यांवर लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

खासदार सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे की, कोविड-१९ महामारीपूर्वी १२२०१/१२२०२ (एलटीटी-कोचुवेली गरीब रथ एक्सप्रेस) आणि १२४३४/१२४३१ (ह. निजामुद्दीन-तिरुअनंतपुरम एक्सप्रेस) या गाड्यांचा सावंतवाडी स्थानकात नियमित थांबा होता. या थांब्यांमुळे स्थानिक प्रवासी आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना मोठा फायदा होत असे. मात्र, या थांब्यांच्या बंदीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

त्याचबरोबर १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) या गाडीला देखील सावंतवाडीत थांबा देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे मांडली आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात, कोकणात हजारो लोक प्रवास करतात आणि थांबा नसल्यामुळे प्रवासात अडचणी निर्माण होतात, असेही त्या म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयाकडे पुढील मागण्या मांडल्या आहेत:

  • गाडी क्र. १२२०१/१२२०२ आणि १२४३४/१२४३१ साठी सावंतवाडी येथे पुन्हा थांबा सुरू करावा

  • गाडी क्र. १२१३३/१२१३४ (मंगलोर एक्सप्रेस) साठी  सावंतवाडी येथे नवीन थांबा मंजूर करावा

या थांब्यामुळे स्थानिक जनतेच्या दीर्घकालीन मागण्या पूर्ण होतील आणि संपूर्ण कोकण परिसरात रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढेल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search