


Alert: It has been reported that a malicious and fake mobile app campaign is in circulation where some fraudsters are sending phishing links at a mass level and insisting users download fake ‘IRCTC Rail Connect’ mobile app to trick common citizens into fraudulent activities.…
— IRCTC (@IRCTCofficial) August 4, 2023
Mumbai Goa Highway : ”सिधी-सिंगरौली तसेच मुंबई गोवा महामार्ग रखडल्याने आपणास अपराधीपणा वाटतो, मुंबई ते गोवा आणि देशातील सिधी-सिंगरौली महामार्गांवर एक पुस्तक लिहिता येईल” हे वक्तव्य आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे. ते बुधवारी राज्यसभेच्या कामकाजादरम्यान आपल्याच पक्षाच्या खासदाराच्या प्रश्नावर उत्तर देताना ते बोलत होते.
भाजप खासदार अजय प्रताप यांनी गडकरींचे कौतुक करताना म्हटले की, संपूर्ण देशात त्यांची ख्याती आहे, मात्र सिधी-सिंगरौली रस्त्याबाबत तेथील जनता निराश झाली आहे. या प्रश्नावर सभापती जगदीप धनखड यांनीही हसू आले. गडकरींच्या वाहतूक क्षेत्रातील कामाचेही त्यांनी कौतुक केले. हसत हसत ते म्हणाले की, केवळ भारतातच नाही तर देशाबाहेरही त्यांच्या कामाचे कौतुक होत आहे. विशेष गोष्ट म्हणजे नितीन गडकरी यांना फक्त सिधी-सिंगरौली या महामार्गाबद्दल प्रश्न विचारला असता, त्यांनी स्वतःहून मुंबई गोवा महामार्गाचा उल्लेख केला आहे. ज्या प्रकारे त्यांनी उत्तर दिले त्यावरून त्यांची हतबलता दिसून आली आहे.
अपराधीपणा वाटतोय
मध्य प्रदेशचे भाजप खासदार अजय प्रताप सिंह यांच्या प्रश्नावर हसत गडकरी म्हणाले की, हे अगदी बरोबर आहे. याचे उत्तर देताना मलाही अपराधीपणा वाटतो. मुंबई ते गोवा आणि देशातील सिधी-सिंगरौली महामार्गांवर एक पुस्तक लिहिता येईल.
Heavy Rainfall Warning : बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression) निर्माण झाले असून ते संध्याकाळपर्यंत खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील २४ तासांत Gangetic WestBengal ओलांडण्याची शक्यता असल्याने पुढील ४,५ दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यताभारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान खात्याने येत्या ४ दिवसांचा राज्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला असून काही विभागांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
आज दिनांक ०१ ऑगस्ट रोजी सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिनांक ०२ ऑगस्ट रोजी या दोन जिल्हय़ाव्यतिरिक्त पुणे आणि रायगड जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दिनांक ०३ ऑगस्ट रोजी वरील चार जिल्ह्या व्यतिरिक्त ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे.
दिनांक ०४ ऑगस्ट रोजी कोणत्याही जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला गेला नाही आहे.
1 Aug: बांगलादेश किनार्यावर बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (Deep Depression).संध्याकाळपर्यंत ते खेपुपाराच्या पूर्वेला बांगलादेश किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता
नंतर,पुढील २४ तासांत Gangetic WestBengalओलांडण्याची शक्यता
पुढील ४,५ दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
IMD pic.twitter.com/NNYa9YFtJK— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 1, 2023
अलर्ट आणि त्यांचे अर्थ
⊗ ग्रीन अलर्ट – धोका नाही Green Alert
⊗ यलो अलर्ट – सतर्क रहा Yellow Alert
⊗ ऑरेंज अलर्ट – तयार रहा Orange Alert
⊗ रेड अलर्ट – कृतीची वेळ Red Alert
ठाणे : गर्डर मशिन कोसळल्याने समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी आहेत.
समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ही मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली.घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल व शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून जवळपास 10 ते 15 जण तिथं अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस आणि चिखलामुळे सध्या मदतकार्यात अडथळे येत असल्याचीही माहिती आहे.
हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की, त्याबाबतची माहिती मिळताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे मालेगाव येथून अपघात स्थळी पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला.
मुंबई: शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरांचं ओझं कमी व्हावं यासाठी शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर एक नवीन प्रयोग हाती घेत आहेत. आता विद्यार्थ्यांना सर्व विषयांचे एकच पुस्तक तयार करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक वर्गात दर तीन महिन्याने सेमिस्टरमध्ये 3 ते 4 पुस्तक एकत्र करुन एकच पुस्तक शाळेत आणावे लागणार आहे. प्रयोग पहिली ते सातवी पर्यंतच्या इयत्तेसाठी असणार आहे
पहिले ते पाचवीतील विद्यार्थ्यांना वर्षातून तीन महिन्याला 1 पुस्तक अशी तीन पुस्तकं असतील. यामध्ये सर्व विषयाचा अभ्यासक्रम एकत्र केला जाणार आहे. तर सहावी आणि सातवीसाठी वर्षभरात चार पुस्तकामध्ये या वर्गाचा अभ्यासक्रम पूर्ण असणार आहे. त्यामुळे वर्षात 3 ते 4 पुस्तकं दर तीन महिन्यात बदलावी जरी लागत असली तरी वर्गात मात्र शिकण्यासाठी एकच पुस्तक घेऊन जावं लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हा विषय सातत्याने चर्चेत असतो. न्यायालयाने या मुद्द्यावरुन शिक्षण विभागाला वारंवार फटकारले आहे.
सध्या शाळेचे वेळापत्रक पाहून विद्यार्थी रोज पाच ते सहा पुस्तके , वह्या दप्तरात घेऊन जातात. आता मात्र हा प्रयोग प्रत्यक्षात आला तर विद्यार्थ्यांना दप्तरात एकच पुस्तक न्यावं लागणार आहे.
सुरुवातीला पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी काही जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपाय अमलात येणार आहे. सर्व विषयांसाठी एकच पुस्तक तयार करण्याचा प्रयोग केला जाणार असल्याची माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काल नाशिक मध्ये दिली..
Content Protected! Please Share it instead.