Category Archives: सिंधुदुर्ग
सावंतवाडी :सावंतवाडी रोड स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्यासाठी व नवीन रेल्वे गाड्यांना सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्यासाठी पुरेसे माध्यम असताना तसेच या स्थानकावरील अवलंबून प्रवासी वर्गाला, सावंतवाडीतील नागरिकांना, वेंगुर्ले व दोडामार्ग मधील नागरिकांना आणि कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विश्वासात न घेता कोकण रेल्वे प्रशासनाने वारंवार सावंतवाडी टर्मिनस (?) वर जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने सावंतवाडीवासियांनी एकदिलाने व एकजुटीने वेळीच एकत्र येऊन कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात लढ्यासाठी चर्चा आणि विचार विनिमय करून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, व सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बचाव समिती 2.0 स्थापन करण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांची सभा रविवार दिनांक २६/११/२०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री राम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आयोजित केली असल्याचे सावंतवाडी टर्मिनस प्रेमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले असून या सभेस सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे.
अलीकडेच कोकण रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने सावंतवाडीकरांना रेल्वेच तिकीट परवडत नाही म्हणून खिल्ली उडवली होती तोच प्रत्यय पुन्हा देखील घडला, ही अपमानास्पद वागणूक न कळतपणे सावंतवाडीकरांची आहे.या साठी सनदशीर तसेच कायदेशीर मार्गाने जाण्याची तयारी केली पाहिजे, या संदर्भात तरी या सभेला आपली उपस्थिती प्रार्थनीय असून या सभेस आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन ॲड, श्री संदीप निंबाळकर, श्री अभिमन्यू लोंढे, श्री मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
बांदा: पत्रादेवी चेकनाक्यावरून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याच अनुषंगाने थेट पत्रादेवी-गोव्याच्या हद्दीत ज्या ठिकाणी मोपा हद्दीतला पत्रादेवी पोलिस चेकनाका आहे.
त्या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिस मोठ्या प्रमाणात गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करत असल्याचे चित्र शनिवारी (ता.१८) सायंकाळी दिसून आले.
मागच्या काही महिन्यांपासून गोव्यातून महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत होती. पत्रादेवी चेकनाक्यावर न सापडणारी वाहने थेट सिंधुदुर्गातील बांदा, इन्सुली, आरोस या भागात अडवली जात होती आणि लाखो रुपयांची दारू हस्तगत करण्याची प्रक्रिया महाराष्ट्र पोलिस करत होते.
मात्र, पेडणे अबकारी विभागाकडून तशा प्रकारची कारवाई का होत नव्हती, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांनी गोव्याच्या हद्दीमध्ये येऊन मागच्या तीन दिवसांपासून ही नाकाबंदी सुरू केलेली आहे. केवळ दुचाकी नव्हे तर प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात असल्याचे चित्र पत्रादेवी चेकनाक्यावर प्रत्यक्ष भेट दिली असता दिसून आले.
सिंधुदुर्ग :दक्षिण कोकणचे प्रती पंढरपूर आणि लोटांगण साठी प्रसिध्द असणाऱ्या सोनुर्ली येथील श्री देवी माऊली वार्षिक जत्रोत्सव येत्या दि. 28 नोव्हेंबर रोजी संपन्न होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासह गोवा व कर्नाटक राज्य आणि महाराष्ट्र राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात तसेच लोटांगण नवसही फेडतात.
श्री देवी माऊली जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. देवीच्या वार्षिक जत्रोत्सवासाठी लाखो भाविक उपस्थित राहून देवीचे दर्शन घेतात. जिल्ह्यातील मोठ्या जत्रांना सोनुर्लीच्या जत्रेपासून प्रारंभ होतो.
या जत्रोत्सवाला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तसेच इतर राज्यातून मोठ्या संख्येने भाविक नवस बोलणे व नवस फेडण्यासाठी येत असतात. या जत्रोत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन सोनूर्ली माऊली देवस्थानं कमिटी पदाधिकरी यांनी केले आहे
देवगड : देवगड आगाराची वरेरी देवगड या दुपारच्या एसटी प्रवासी फेरीला दुपारी दोनच्या सुमाराला तळवडे खडवी येथे तीव्र उतारावर ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी नजीकच्या मांगरावर अडकली अपघातात तळेबाजार हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाल्याचे समजते. या एसटी प्रवासी फेरीचे ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला. देवगड आगराची वरेरी तळवडे मार्गे देवगडकडे परतीच्या प्रवासाला येत असताना हा अपघात घडला सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. या प्रवासी फेरीत सुमारे १५ विद्यार्थी अन्य १ प्रवास करीत होते त्यापैकी तीन विद्यार्थीनीना किरकोळ दुखापत झाली. आहे.
मालवण : कर्जबाजारीपणाला कंटाळून सचिन सहदेव डिकवलकर (वय ३८, रा. डिकवल-बौद्धवाडी) यांनी ठासणीच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी (ता. २७) रात्री आठच्यासुमारास घडला.त्याने गावात खळबळ उडाली. याबाबतची वर्दी त्यांच्या भावाने पोलिस (Police) ठाण्यात दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डिकवलकर मुंबई येथे पत्नी व मोठ्या मुलासह राहात होते. त्यांचा लहान मुलगा डिकवल येथे मूळ घरी राहात होता.
मुंबईहून आपल्या लहान मुलाला नेण्यासाठी काही दिवसांपूर्वी डिकवल येथे आले होते. कर्जबाजारी झाल्याने त्यांच्यात नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
सिंधुदुर्ग : वंचितांची दिवाळी तेजोमय करण्यासाठी “उमेद फौंडेशन,सिंधुदुर्ग” कडून “एक पणती वंचितांच्या दारी “या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंबे आणि वृद्धाश्रम, अनाथ आश्रम मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी तेजोमय गोड व्हावी यासाठी उमेद फाउंडेशनने विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे.
त्यासाठी उमेद फाउंडेशनच्या वतीने या वंचित घटकांना पणत्या,आकाश कंदील, दिवाळी फराळ, देऊन त्यांची दिवाळी आनंदमय करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांना आवाहन करण्यात येते की आपणही या उपक्रमात सहभागी होऊन मोलाचा हातभार लावावा.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्वतः कडील तयार केलेला दिवाळी फराळ/ पणत्या/ आकाशकंदील असे दिवाळी उपयुक्त साहित्य द्यावयाचे असल्यास आपण उमेद फाउंडेशनकडे दि. 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोहोच करावे.तसेच फराळासाठी आर्थिक मदत द्यावयाची असल्यास ऑनलाईन स्वरूपात/ रोख स्वरूपात उमेद फाउंडेशनकडे खालील अकाउंटवरती जमा करता येईल.यासाठी आर्थिक मदत पाठवण्याकरिता बँक अकाउंट माहिती
A/C name =UMED FOUNDATION,
A/C Number- 636701000890 ,बँकेचे नाव -ICICI BANK
IFSC Code =ICIC0006367
Google pay/Phone pay – 7972395675
तसेच वस्तू स्वरूपात मदत देणाऱ्यांनी स्वतः कडील तयार केलेला दिवाळी फराळ देणार असल्यास देतांना त्याचे व्यवस्थित पॅकेट करून द्यावेत.तसेच आर्थिक मदत एका कुटुंबासाठी फराळ – 300 रू. , दोन कुटुंबासाठी फराळ – 600 रू.या टप्प्यात रक्कम स्वीकारली येईल. आपण दिलेल्या 300 रु. मदतीतून खालील प्रकारे एका गरजू कुटूंबासाठी दिवाळी किट बनविण्यात येईल. अंघोळीचा मोती साबण, सुगंधी तेल, उटणे, आकाश कंदील, पणत्या, लाडू (250 ग्रॅम), चिवडा (500 ग्रॅम) चकली (250 ग्रॅम), शंकरपाळी ( 250 ग्रॅम ) इ.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब, वंचित कुटुंबे तसेच जिल्ह्यातील वृद्धाश्रम आणि आश्रम व गरजू कुटुंबे यांचा समावेश असेल.वंचितांच्या जीवनात थोडासा प्रकाश आणून त्यांची दिवाळी तेजोमय करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी योगदान द्यावे असे मत राजेंद्र एस.पाटील- प्रमुख, सामाजिक दिवाळी मोहिम,सिंधुदुर्ग 8888650077 यांनी व्यक्त केले आहे.