Author Archives: Kokanai Digital

….अन्यथा महाराष्ट्रदिनी सावंतवाडी स्थानकावर पुन्हा ‘रेल रोको’…प्रवासी संघटनेचा इशारा

   Follow us on        
सावंतवाडी: कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी स्थानक हे तळकोकणातील महत्त्वाचे स्थानक असून या ठिकाणी कोकणवासी आणि पर्यटकांची नेहमी रेलचेल असते. येथील स्थानक टर्मिनस घोषित होऊन तब्बल दहा वर्षे उलटली परंतु हे काम देखील गेली अनेक वर्षे रखडले आहे. ह्या स्थानकातून कोरोना काळात एकूण सहा गाड्या काढून घेण्यात आल्या होत्या. या संदर्भात कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी या संघटनेने या बद्दल अनेक वेळा आवाज उठवला असून या ठिकाणी तब्बल तीन वेळा आंदोलन देखील केले होते, आताच २६ जानेवारी २०२६ रोजी केलेल्या रेल रोको आंदोलनाची दखल महाराष्ट्रातील जनतेने घेतली होती. तरी देखील कोकण रेल्वे प्रशासनाकडून याची योग्य दखल घेण्यात आली नाही असेच या वरून दिसते.
सावंतवाडी स्थानकाचे उत्पन्न आणि प्रवासी संख्या ह्या रेल्वे बोर्डाच्या मानकापेक्षा अधिक असून देखील येथे थांबे न देण्यामागे कोकण रेल्वे प्रशासनाचे काय हित आहे हे मात्र अनुत्तरित आहे.या वर्षात आधी रोहा आणि आता कुमठा येथे नवीन थांबे मंजूर झाले परंतु सावंतवाडी स्थानकात काढून घेण्यात आलेले थांबे पुन्हा देण्यात रेल्वे प्रशासन एवढा आखडता हात का घेत आहे हा प्रश्न सामान्य कोकणकर जनतेला पडला आहे.
कोरोना काळात काढून घेण्यात आलेल्या १२२३१ /३२ त्रिवेंद्रम – निजामुद्दीन – त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस, १२२०/०२ एल टी टी – कोचुवेली – एल टी टी गरीब रथ एक्सप्रेस या गडांचा थांबा अजूनही पूर्ववत केला गेला आहे. त्याबरोचर मुंबई सीएसएमटी  – मंगलोर या गाडीला सावंतवाडी येथे थांबा देण्यात यावा या मागणीलाही वारंवार केराची टोपली दाखवली जात आहे. मुंबई – गोवा वंदे भारत एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी येथे थांबा मिळणे अपेक्षित होते. मात्र तिथेही या स्थानकाला डावलले गेले आहे.  कोकण रेल्वे प्रशासन जर असेच करणार असेल तर पुन्हा महाराष्ट्र दिनी भव्य रेल रोको करू असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी  ने दिला आहे.

१० मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-एकादशी – 07:47:23 पर्यंत
  • नक्षत्र-पुष्य – 24:52:10 पर्यंत
  • करण-विष्टि – 07:47:23 पर्यंत, भाव – 19:58:24 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-शोभन – 13:55:54 पर्यंत
  • वार-सोमवार
  • सूर्योदय- 06:53
  • सूर्यास्त- 18:45
  • चन्द्र-राशि-कर्क
  • चंद्रोदय- 15:28:59
  • चंद्रास्त- 28:57:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) स्थापना दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1922: ‘महात्मा गांधींना’ प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल 6 वर्षांचा तुरुंगवास.
  • 1922 : चीनने परमाणु अप्रसार संधीवर हस्ताक्षर केले होते.
  • 1929: मिस्र देशाच्या सरकारने देशातील महिलांना घटस्फोटाचे मर्यादित अधिकार दिले
  • 1945 : दुसऱ्या महायुद्धादरम्यान, अमेरिकन हवाई दलाने जपानची राजधानी टोकियोवर जोरदार बॉम्बहल्ला चढवला. त्यामुळे टोकियोतील एक लाखाहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला होता
  • 1952: केंद्रीय मंत्री ‘काकासाहेब गाडगीळ’ यांनी पिंपरी येथे हिंदुस्थान अँटिबायोटिक्सच्या पेनिसिलीन कारखान्याची पायाभरणी केली.
  • 1969 : गोल्डा मीर यांची इस्रायलच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली.
  • 1969 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल स्थापना (CISF)
  • 1972: वेलकम थिएटर निर्मित, विजय तेंडुलकर लिखित व कमलाकर सारंग दिग्दर्शित सखाराम बाईंडर या नाटकाचा पहिला प्रयोग दादर येथील शिवाजी मंदिर येथे झाला.
  • 1977: युरेनसला शनीच्या सारखे कडा असल्याचे आढळून आले.
  • 1985: रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेट संघाकडून चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सचा किताब देण्यात आला.
  • 1998: भारतीय बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंदने लिनरेस सुपर ग्रँडमास्टर बुद्धिबळ स्पर्धा जिंकली
  • 2010: भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आले
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1628 : इटालियन डॉक्टर ‘मार्सेलिओ माल्पिघी लादेन’ यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 1694)
  • 1918: गायक आणि अभिनेते ‘सौदागर नागनाथ गोरे’ उर्फ ‘छोटा गंधर्व’ यांचा जन्म. (मृत्यू: 31 डिसेंबर 1997)
  • 1929: कवी ‘मंगेश पाडगावकर’ यांचा जन्म.
  • 1945: केंद्रीय रेल्वे मंत्री – ‘माधवराव शिवाजीराव शिंदे’ यांचा जन्म. (मृत्यू: 30 सप्टेंबर 2001 – मैनपुरी, उत्तर प्रदेश)
  • 1957: अलकायदा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक – ओसामा बिन लादेन जन्म. (मृत्यू: 2 मे 2011)
  • 1974: ट्विटर चे सह-संस्थापक – ‘बिझ स्टोन’ यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1872 : इटालियन स्वातंत्र्यसैनिक ‘जोसेफ मॅझिनी’ यांचे निधन (जन्म: 22 जून 1805)
  • 1897 : पहिल्या महिला शिक्षिका आणि समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांचे निधन. (जन्म: 3 जानेवारी 1831)
  • 1940 : रशियन कथा, कादंबरीकार आणि नाटककार बुल गाकॉव्ह मिखाईल यांचे निधन.
  • 1959 : पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅ. मुकुंद जयकर यांचे निधन. (जन्म: 13 नोव्हेंबर 1873)
  • 1971 : कोकण गांधी सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन यांचे निधन. (जन्म: 4 नोव्हेंबर 1894)
  • 1985 : सोविएत रशियातील कम्युनिस्ट पक्षाचे सचिव कॉन्स्टँटिन चेरेनेन्को यांचे निधन. (जन्म: 24 सप्टेंबर 1911)
  • 1999: प्रसिद्ध कवी वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचे निधन. (जन्म: 27 फेब्रुवारी 1912)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: पुणे – कल्याण – सावंतवाडी विशेष गाडी चालविण्यात यावी

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि कोकण यांना जोडणारी थेट विशेष रेल्वे गाडी चालविण्यात यावी अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे. पुणे ते सावंतवाडी दरम्यान कल्याण मार्गे विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांवरील ताण कमी होऊन पुणे आणि कोकण दरम्यानची कनेक्टिव्हिटी वाढेल, असे कोकण विकास समितीचे अध्यक्ष जयवंत शंकर दरेकर यांनी ईमेल द्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पुणे आणि कोकण दरम्यान थेट रेल्वे गाडी नसल्यामुळे प्रवाशांना खूप त्रास सहन करावा लागतो. मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये प्रचंड गर्दी असते, त्यामुळे प्रवासाचा अनुभव खूपच त्रासदायक होतो. या मार्गावर विशेष रेल्वे सुरू केल्यास प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल आणि कोकणच्या विकासाला चालना मिळेल, असे दरेकर यांनी म्हटले आहे.

यापूर्वी या मार्गावर विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या, ज्यांना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा या मार्गावर विशेष गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी कोकण विकास समितीने केली आहे.

या गाडीला खालील थांबे देण्यात यावेत

पुणे – चिंचवड – तळेगाव – लोणावळा – कर्जत – कल्याण – पनवेल – पेण – रोहा – माणगाव – वीर – सापे वामने – करंजाडी – खेड – चिपळूण – सावर्डा – अरावली रोड – संगमेश्वर रोड – रत्नागिरी – आडवली – विलावडे – राजापूर रोड – वैभववाडी रोड – नांदगाव रोड – कणकवली – सिंधुदुर्ग – कुडाळ – झारप – सावंतवाडी रोड

रेल्वे प्रशासन या मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर विशेष रेल्वे गाडी सुरू करेल, अशी अपेक्षा कोकण विकास समितीने व्यक्त केली आहे.

Konkan Railway: उधना – मंगळुरू विशेष एक्सप्रेसला अतिरिक्त कोच

   Follow us on        
Konkan Railway: प्रवाशांची  अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर होळी सणासाठी चालविण्यात आलेल्या गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन मंगळुरू-  उधना जंक्शन  या गाडीला तात्पुरत्या स्वरूपात एक अतिरिक्त स्लीपर डबा जोडण्यात येणार आहे. याबद्दल अधिक तपशील खालीलप्रमाणे
१. उधना जंक्शनवरून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक ०९०५७ उधना जंक्शन मंगळुरू जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसला ०९ मार्च २०२५ रोजीच्या प्रवासासाठी अतिरिक्त एक स्लीपर क्लास कोच जोडण्यात येणार आहे.
२. मंगळुरू जंक्शनवरून सुटणाऱ्या ट्रेन क्रमांक ०९०५८ मंगळुरू जंक्शन उधना जंक्शन द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसला १० मार्च २०२५ रोजीच्या प्रवासासाठी अतिरिक्त एक स्लीपर क्लास कोच जोडण्यात येणार आहे.
प्रवाशांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्हातील रेल्वे स्थानकांवरील समस्या मार्गी लावणार – मंत्री नितेश राणे

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वेच्या सहा स्टेशन वरील अडीअडचणी व समस्या मार्गी लावण्याबरोबरच आवश्यक सुविधा शासनाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील. कोकण रेल्वे वरिष्ठ अधिकारी, सीएमडी आणि प्रवासी समन्वय समिती यांचा येत्या काही दिवसांत स्टेशन पाहणी दौरा करू, तसेच रेल्वेच्या विविध जलद गाड्या आणि सिंधुदुर्ग व वैभववाडी स्थानकातील पीआरएस सिस्टीम बाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा करून लवकरात लवकर तोडगा काढला जाईल.
सिंधुदुगनगरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री कक्ष उद्घाटनानंतर कोकण रेल्वे प्रवासी समिती अध्यक्ष प्रकाश पावसकर व जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर यांनी मंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन कोकण रेल्वेच्या विविध प्रश्नांबाबत चर्चा केली. सा. बां. विभाग कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड तसेच रेल्वे प्रवासी संघटनेचे साई आंबेरकर, शुभम परब, संजय वालावलकर, स्वप्निल गावडे आदींसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

सिंधुदुर्ग: असनिये गावात पट्टेरी वाघाचा वावर?

   Follow us on        
सिंधुदुर्ग: असनिये गावात कणेवाडी येथे शुक्रवारी रात्री एका घराच्या आवारात कुत्र्याचा जंगली प्राण्याने फडशा पडला असल्याची घटना समोर आली आहे. हा जंगली प्राणी पट्टेरी वाघ असल्याचे ग्रामास्थांचे म्हणणे आहे. या घटनेमुळे असनिये परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
कणेवाडी येथील दिनेश सावंत यांच्या घरातील कुत्रा रात्री अचानक गायब झाला. त्यानंतर त्याचा माग काढला असता त्याला घराच्या आवारात पटेरी वाघाच्या पायाचे अनेक ठसे मिळाले. या परिसरात पट्टेरी वाघ अनेक वेळा ग्रामस्थांना दृष्टीस पडत असून हा बिबट्या नसून पटेरी वाघच असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी या पट्टेरी वाघाच्या पायाचे ठसे ही टिपले. पट्टेरी वाघाच्या या दहशतीमुळे बागायतीमध्ये काजू गोळा करण्यासाठी आणि लाकडांसाठी जंगलात जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून वनखात्याने याची तात्काळ दखल घेऊन या पट्टेरी वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.

पट्टेरी वाघ कि बिबट्या?

दरम्यान याबाबत निवृत्त विभागीय वन अधिकारी सुभाष पुराणिक तसेच बांदा वनपाल प्रमोद सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, ग्रामस्थांनी टिपलेले हे ठसे पट्टेरी वाघाचे नसून ते बिबट्याचे आहेत. तसेच वाघ जंगलातून भर वस्तीत येऊन शिकार करण्याची शक्यता नाही. त्यामुळे हा बिबट्या असल्याचे सांगितले.

९ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-दशमी – 07:47:53 पर्यंत
  • नक्षत्र-पुनर्वसु – 23:56:05 पर्यंत
  • करण-गर – 07:47:53 पर्यंत, वणिज – 19:43:50 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सौभाग्य – 14:57:55 पर्यंत
  • वार- रविवार
  • सूर्योदय- 06:54
  • सूर्यास्त- 18:45
  • चन्द्र-राशि-मिथुन – 17:46:37 पर्यंत
  • चंद्रोदय- 14:30:00
  • चंद्रास्त- 28:15:00
  • ऋतु- वसंत

महत्त्वाच्या घटना :
  • 1796 : ‘नेपोलियन बोनापार्ट’ यांनी पहिली बायको ‘जोसेफिना’ यांच्यासोबत लग्न केले.
  • 1945 : दुसरे महायुद्ध: अमेरिकेच्या B-29 विमानांनी जपानच्या टोकियो शहरावर बॉम्बहल्ला केला. यामध्ये १ लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला.
  • 1959 : बार्बी ही जगप्रसिद्ध बाहुली लाँच झाली.
  • 1991 : युगोस्लाव्ह अध्यक्ष ‘स्लोबोदान मिलोसेविक’ यांच्या विरोधात राजधानी बेलग्रेडमध्ये प्रचंड निदर्शने
  • 1992 : कवी आणि लेखक डॉ. हरिवंशराय बच्‍चन यांना नवी दिल्लीत के. के. बिर्ला प्रतिष्ठानने आयोजित समारंभात पहिला सरस्वती पुरस्कार उपराष्ट्रपती यांच्या हस्ते देण्यात आला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1824 : ‘अमासा लेलँड स्टॅनफोर्ड’ – अमेरिकन स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 21 जून 1893)
  • 1863 : ‘भाऊराव बापूजी कोल्हटकर’ – गायक आणि नट यांचा जन्म. (मृत्यू: 13 फेब्रुवारी 1901)
  • 1899 : ‘यशवंत दिनकर पेंढारकर‘ – महाराष्ट्राचे कवी यांचा जन्म. (मृत्यू: 26 नोव्हेंबर 1985)
  • 1930 : ‘युसुफखान महंमद पठाण’ – संत साहित्याचे अभ्यासक यांचा जन्म.
  • 1931 : ‘डॉ. करणसिंग’ – माजी केंद्रीय मंत्री.
  • 1933 : ‘लॉयड प्राइस’ – अमेरिकन गायक-गीतकार.
  • 1934 : ‘युरी गगारीन’ – पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर यांचा जन्म. (मृत्यू: 27 मार्च 1968)
  • 1935 : ‘अँड्र्यू वितेर्बी’ – क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक.
  • 1943 : जेम्स ऊर्फ ‘बॉबी फिश’र अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2008)
  • 1951: ‘झाकीर हुसेन’ – प्रख्यात तबलावादक -पद्यभूषण, पद्मश्री उस्ताद.
  • 1952: ‘सौदामिनी देशमुख’ – पहिल्या वैमानिक कप्तान.
  • 1956 : ‘शशी थरूर’ – केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ.
  • 1970 : ‘नवीन जिंदाल’ – भारतीय उद्योगपती.
  • 1985 : ‘पार्थिव पटेल’ – भारतीय क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1650 : संत तुकाराम यांचा वैकुंठवास.
  • 1851: डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ हान्स क्रिस्टियन ओरस्टेड यांचे निधन. (जन्म: 14 ऑगस्ट 1777)
  • 1888 : जर्मन सम्राट विल्हेल्म (पहिला) यांचे निधन. (जन्म: 22 मार्च 1797)
  • 1969 : सर होर्मुसजी पेरोशॉ तथा ‘होमी मोदी’ – उद्योगपती, प्रशासक व संसदपटू यांचे निधन. (जन्म: 23 सप्टेंबर 1881)
  • 1992 : ‘मेनाकेम बेगीन’ इस्त्रायलचे 6 वे पंतप्रधान व नोबेल पारितोषिक विजेते यांचे निधन. (जन्म: 16 ऑगस्ट 1913)
  • 1994 : ‘देविका राणी’ पद्मश्री, दादासाहेब फाळके व सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेत्या अभिनेत्री यांचे निधन. (जन्म: 30 ऑगस्ट 1908)
  • 2000 : अभिनेत्री उषा मराठे – खेर ऊर्फ उषा किरण यांचे निधन. (जन्म: 22 एप्रिल 1929)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

HSRP Number Plate: सावधान! हाय सिक्योरिटी नंबर प्लेट नोंदणी करण्यासाठी आपण वापरत असलेली वेबसाइट बनावट तर नाही ना? बनावट आणि खऱ्या वेबसाइटच्या नावांची यादी ईथे वाचा…

   Follow us on        

HSRP Number Plate Update: राज्यामध्ये हाय सिक्योरिटी नंबर प्लेट राज्य सरकारने अनिवार्य केली आहे. येत्या 30 एप्रिलपासून राज्यामध्ये वाहनांना हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावणं हे बंधनकारक असणार आहे. यानंतर तुम्ही हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावली नाही तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. हाय सिक्योरिटी नंबर प्लेट लावणं हे बंधनकारक झाल्यामुळे अनेकांनी या नंबर प्लेट लावण्यास सुरुवात केली आहे. मात्र आता यामध्येही अडथळे येत असल्याचं दिसतंय. सायबर गुन्हेगारांनी यामध्ये आपला डाव साधला आहे.

हाय सिक्योरिटी नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी सरकारने एक वेबसाइट दिली आहे. मात्र सायबर गुन्हेगारांनी येथेही अनेक बनावट वेबसाइट तयार केल्याचं आढळतंय. यावरुन ते सर्व सामान्य लोकांची फसवणूक करत आहेत. यामुळे तुम्हीही ऑनलाइन एचएसआरपी नंबर प्लेटची नोंदणी करत असाल तर सावध व्हा.

तुम्ही जेव्हा तुमच्या वाहनांची नोंदणी करता तेव्हा ती वेबसाइट ही परिवहन विभागाची अधिकृत वेबसाइट आहे की नाही याची खात्री करा. कारण शुल्काच्या बहाण्याने वाहन चालकांची मोठी फसवणूक केली जातेय.

बनावट संकेतस्थळांची (वेबसाईट्स) नावे

1-https://bookmyhssp.in/maharashtra.html

2-https://bookedmyhsrp.com/registration

3- https://www.bookmehsrp.com

4- https://bookingmyhsrp.com

5- https://indnumberplate.com

6- https://hsrprto.in

अधिकृत संकेतस्थळांची नावे

  1. https://mhhsrp.com
  2. https://hsrpmhzone2.in
  3. https://maharashtrahsrp.com

टीप: ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून नागरिकांत जागरूकता आणावी.

Foreign Investment: इथेही महाराष्ट्र अव्वल! केवळ 9 महिन्यात आली गेल्या १० वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक

   Follow us on        
केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर २०२४ अखेरचा अहवाल जाहीर केला असून, गेल्या १० वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक ही अवघ्या ९ महिन्यात महाराष्ट्राने प्राप्त केली आहे. २०२४-२०२५ या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यात आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आली आहे. ही गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्रर फडणवीस यांनी दिली आहे.
असे करताना महायुती सरकारने आपलाच २०१६-१७  या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडला आहे. अर्थात या आर्थिक वर्षातील एक तिमाही आणखी बाकी आहे.संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन! माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील. अशा शब्दात  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण महाराष्ट्राचे अभिनंदन केले आहे.

ब्राझील दौऱ्यात काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणारा करार- आ. दीपक केसरकर

   Follow us on        
काजू बोंड संदर्भात झालेल्या ब्राझील दौऱ्यात नॉन डिस्क्लोझर करार करण्यात आला आहे. लवकरच त्या कंपनीचे एमडी व टीम भारतात येणार आहेत. येथील काजूची ते पहाणी करणार असून त्यानंतर काजू बोंडावर प्रकिया सुरु केल्यावर चांगला दर काजू बागायतदारांना मिळणार आहे. काजू शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडेल असा विश्वास माजी मंत्री, सिंधुरत्न योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे ते आज बोलत होते.
2 लाख हेक्टर जमिनीवर काजूची लागवड होते. यातील काजू गरावर प्रक्रिया होते. मात्र, काजू बोंड फुकट जात. 3 हजार 200 कोटीचे काजू बोंड वाया जाते. ब्राझिल देशात यावर विशेष संशोधन झाले असून या बोंडापासून विविध प्रकारची पेये, काजूचा जूस, मिट आदिंसारखे पदार्थ बनवले जातात, असे केसरकर म्हणाले.
तसेच ब्राझील येथे भारतील गाईंचे संवर्धन केले आहे. यामध्ये संकरीत जाती देखील करण्यात आल्या आहेत. आपल्याकडील कोकण कपिला गाईंच्या दुग्ध उत्पादन वाढ व्हावी यादृष्टीने देखील यावेळी चर्चा झाली. त्या पद्धतीचे तंत्रज्ञान प्राप्त झाल्यानंतर व दुग्ध उत्पादन वाढ झाल्यावर कोकण कपिलाचा एटू मिल्क म्हणून वापर करता येईल असे केसरकर यांनी सांगितले. सावंतवाडीत महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्युझिकल फाऊंटन उभा राहत आहे. महिला, युवक यांच्यासाठी सिंधुरत्न योजनेतून पर्यटन प्रकल्प साकार होत आहेत. हाऊस बोटच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळणार आहे. तसेच ताज गृपच्या माध्यमातून माय बंगलो सारखा उपक्रम राबविण्यात येणार असुन उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पर्यटनासाठीच्या मिनी बसेसचा शुभारंभ लवकरच होणार आहे अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search

Join Our Whatsapp Group.