मुंबई :एप्रिल 2022 पासून पुढील 9 महिन्यात राज्यातील मद्य विक्रीत कमालीची वाढ झाली आहे. खासकरून विदेशी मद्य विक्रीत वाढ झाली आहे. ह्या विक्री वाढीमुळे सरकारच्या महसुलात 30% वाढ झाली आहे. मद्यविक्रीच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी विदेशी मद्यावर कमी करण्यात आलेले उत्पादन शुल्क, तसेच अन्य उपाययोजनांनंतर ही वाढ दिसून आली आहे. तळीरामांनी मागील नऊ महिन्यांत रिचविलेल्या मद्यामुळे राज्याच्या तिजोरीत १४ हजार ४८० कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
कोरोनानंतर सर्व व्यवहार सुरळीत झाल्याने, मद्य विक्रीमध्येही जोमाने वाढ झाली आहे. मागील वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या महिन्यात ३५ कोटी लीटर देशी मद्य विक्री झाली होती. यंदा याच कालावधीत ही विक्री ३४.५ कोटी लीटरवर पोहोचली आहे. तर विदेशी मद्य १७.५ कोटी लीटर विकले गेले होते, यंदा नऊ महिन्यांत २३.५ कोटी लीटर विदेशी मद्याची विक्री झाली आहे.
मुंबई :नुकताच चित्र वाघ यांनी ट्वीट करत उर्फी जावेदला कपड्यांवरुन सुनावले होते. आता त्यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहित उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आपल्या हटके आणि अतरंगी फॅशनमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती सोशल मीडियावर सतत रिविलिंग ड्रेस घालून व्हिडीओ शेअर करताना दिसते. तिने अनेकवेळा कपड्यांमुळे ट्रोल केले जाते. पण उर्फी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करते. आता भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीला कपड्यांवरुन सुनावले. आता उर्फीच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. कारण चित्रा यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेत उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली.
चित्रा वाघ मुंबईतील महिलांवर होणारा अत्याचार असो किंवा राजकारणातील काही गणित ते नेहमी परखड मत मांडताना दिसतात. सध्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असताना त्यांनी सोशल मीडियावर रिविलिंग ड्रेसमधील व्हिडीओ शेअर करत असल्याने संताप व्यक्त केला आहे.
त्यांनी आपल्या पत्रात असे म्हंटले आहे…
‘उर्फी जावेद या अभिनेत्रीने भर रस्त्यात आपल्या देहाचे केलेले प्रदर्शन समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनले आहे. घटनेने दिलेला आचार, विचार, स्वातंत्र्याचा हक्क इतक्या उघड्या नागड्या मनोवृत्तीत प्रकट होईल याची कोणीच कल्पना केली नसेल. स्त्री देहाचे असे मुंबईतील सार्वजनिक ठिकाणी भर रस्त्यातील अत्यंत हीन, किळसवाणे प्रदर्शन भारतीय संस्कृतीच्या, सभ्यतेला कलंक आहे. या अभिनेत्रीने खासगी जीवनात काय करावे याच्याशी समाजाला काहीच देणेघेणे नाही’
पुढे पत्रात त्यांनी, ‘मात्र केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी या अभिनेत्रीने आपल्या देहाचा मांडलेला बाजार चीड आणणारा आहे. तिला आपल्या देहाचे प्रदर्शन करायचे असेल तर तिने ते चार भिंतीच्या आड जरुर करावे, मात्र अशा पद्धतीच्या भावना चेतवणाऱ्या कृत्याने समाजातील विकृत मनोवृत्तीला आपण खतपाणी घालत आहोत याची या अभिनेत्रीला जाणीव नसेल. या कृत्याबद्दल सदर अभिनेत्रीवर तातडीने संबंधित कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाची मागणी आहे’
Konkan Railway News :मुंबई कन्याकुमारी नव्या गाडीच्या निमित्ताने महाराष्ट्रावर अन्यायाची रेल्वेची परंपरा कायम, महाराष्ट्रीय प्रवाशांच्या जखमेवर मीठ
गेली अनेक वर्षे कोकणवासी रेल्वेकडे मुंबई चिपळूण, मुंबई रत्नागिरी, वसई सावंतवाडी, कल्याण सावंतवाडी गाड्यांची मागणी करत आहे. परंतु रेल्वे प्रशासन प्रत्येक वेळी मुंबईतील क्षमता, कोकण रेल्वेचा एकेरी मार्ग, मार्गाचा १४०% वापर, डब्यांची उपलब्धता किंवा रेल्वे बोर्ड अशी एक ना अनेक कारणं देऊन नकारच देत असते. मुंबई विभागात नवीन गाडी सुरु करण्यासाठी क्षमताच नसल्यामुळे मुंबईहून चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीसाठी नवीन गाडी सुरु करता येणार नाही असे उत्तर मध्य रेल्वेने कोंकण विकास समितीला हल्लीच दिले होते. परंतु त्याच मुंबई विभागाकडे कन्याकुमारी गाडी सुरु करण्याची क्षमता आहे हे विशेष.
कोकण रेल्वेच्या उभारणीत भारतीय रेल्वे ५१%, महाराष्ट्र राज्य शासन २२%, कर्नाटक राज्य शासन १५% तर गोवा आणि केरळ राज्य शासन प्रत्येकी ६% इतका आर्थिक सहभाग आहे. परंतु गाडीचे दक्षिणेकडील शेवटचे स्थानक विचारात घेतल्यास महाराष्ट्राला ३, गोवा, कर्नाटक आणि केरळला प्रत्येकी ५ ते ६ आणि तामिळनाडूला १ इतक्या सरासरी प्रतिदिन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. यातून महाराष्ट्रातील प्रवासी कसे प्रवास करत असतील आणि कोकण रेल्वेच्या निमित्ताने महाराष्ट्राला काय मिळाले याची कल्पना येते.
सावंतवाडीच्या पुढे गोव्याला जाणाऱ्या नियमित किंवा विशेष गाड्या महाड, लांजा तालुक्यात न थांबता तर मडगावच्या पुढे जाणाऱ्या गाड्या माणगाव, महाड, संगमेश्वर, लांजा, राजापूर, वैभववाडी तालुक्यांना वगळून पुढे जातात. मंगळुरूच्या पुढे जाताना तर प्रत्येक जिल्ह्यात एकच थांबा मिळतो. एक एक टप्पा सोडून पुढे जाणाऱ्या प्रत्येक गाडीसाठी महाराष्ट्रातील थांब्यांचा बळी दिला जातो. सध्या चालणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव, मंगळुरु विशेष गाड्यांचे थांबे बघितल्यास त्याचीच प्रचिती येते.
नवीन गाड्या मिळणे दूरच आहेत त्या गाड्यांना महाराष्ट्रात वाढीव थांबे मिळणेही कठीणच आहे. प्रवाशांनी आंदोलन केल्याशिवाय कोणताही वाढीव थांबा मिळालेला नाही. सध्या जनशताब्दी, मंगला, लोकमान्य टिळक करमळी, कोचुवेली एक्सप्रेसला खेड, नेत्रावती, मत्स्यगंधाला संगमेश्वर, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव आणि नागपूर मडगाव एक्सप्रेसला वैभववाडी, तेजस एक्सप्रेसला कणकवली, मुंबई मंगळुरु आणि नागपूर मडगाव एक्सप्रेसला सावंतवाडी थांब्यांची प्रतीक्षा आहे. त्यासाठीही मागणी, निवेदन, आंदोलनाचं सत्र सुरूच आहे.
महाराष्ट्रात गाड्यांची कमतरता असतानाही त्यावर कहर म्हणून गोव्यातून सुटून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना कोकण रेल्वेने रत्नागिरी आणि रत्नागिरीच्या उत्तरेकडे केवळ १८-२०% आरक्षण कोटा दिलेला आहे. उर्वरित ८०% जागा रत्नागिरीच्या दक्षिणेकडच्या स्थानकांनाच उपलब्ध होतात. हे वाटपही समान ठेवण्याची मागणी प्रवासी करत आहेत. परंतु त्याकडे लक्ष दिले जात नाही. पुरेशा गाड्या नाहीतच परंतु ज्या आहेत त्यात आरक्षण कोटाही देणार नाही अशी रेल्वेची भूमिका आहे.
कोरोना संकटाचा फायदा घेऊन रेल्वेने शून्य आधारित वेळापत्रक लागू करताना पॅसेंजर गाड्यांचे थांबे कमी करून एक्सप्रेसमध्ये रूपांतर केले. वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने रत्नागिरी दादर पॅसेंजरची वाट दिव्यापर्यंतच अडवली खरी परंतु त्याचा किती फायदा झाला हा संशोधनाचा विषय ठरेल. सप्टेंबर २०२१ पासून ५०१०३ दिवा रत्नागिरी पॅसेंजर तर जानेवारी २०२२ पासून ५०१०४ रत्नागिरी दिवा पॅसेंजर वेळेत आपल्या गंतव्यस्थानी पोहोचलेल्या नाहीत. मध्य रेल्वेवर ५-१० थांबे कमी करूनही रत्नागिरी दिवा आणि सावंतवाडी दिवा गाड्यांच्या प्रवास वेळेत अपेक्षित घट झालेली नाही. रत्नागिरी दादरची रत्नागिरी दिवा केल्यावर त्याच वेळेत दादरवरून बलिया/गोरखपूर गाडी सुरू झालेली आहे. यावरून रत्नागिरी दादर दिव्याला का ठेवली याची कल्पना येते.
इतके गंभीर प्रश्न असतानाही आता नवीन मुंबई कन्याकुमारी गाडी चालवण्यात येत आहे. तिला सुपरफास्ट म्हटले आहे परंतु थांबे पाहिल्यास ती केवळ कोकण रेल्वेवरच सुपरफास्ट असल्याचे दिसते. महाराष्ट्रातील दोन थांब्यांमधील सरासरी अंतर ५५ किलोमीटर तर कोकण रेल्वेच्या बाहेर सरासरी ४० किलोमीटरवर थांबे आहेत. रोहा ते चिपळूण १२८ किलोमीटर आणि रत्नागिरी ते कणकवली १११ किलोमीटरमध्ये एकही थांबा नाही. खेडसारख्या महत्वाच्या स्थानकावर सध्या धावणाऱ्या गाड्यांना थांबे देण्याची मागणी असताना या नव्या गाडीलाही खेड येथे थांबा दिलेला नाही. रविवारी रत्नागिरी किंवा चिपळूणमधून मुंबईकडे जाणाऱ्या नवीन गाडीची नितांत गरज असताना त्याच दिवशी ही कन्याकुमारी गाडी परत येणार आहे. म्हणजे पुन्हा स्थानिक प्रवाशांच्या पदरी निराशाच आहे कारण गाडी असली तरी तिला पुरेसा कोटा मिळणार नाही, तिला महाराष्ट्रात मोजके तीन चार थांबे आहेत आणि इतक्या लांबून येणाऱ्या गाडीत चढायला मिळणे अशक्यप्राय गोष्ट असेल.
पूर्वी मुंबई कन्याकुमारी दरम्यान चालणारी जयंती जनता एक्सप्रेस पुणे ते मुंबई दरम्यान प्रवासी नसल्याचे कारण देऊन पुण्याला शॉर्ट टर्मिनेट केली गेली आणि आता नवीन मुंबई कन्याकुमारी गाडी देण्यात येत आहे. मग आधी सुरु असलेली गाडी पुण्याला नेलीच कशासाठी असा प्रश्न उपस्थित होतो. यातून नेमकं काय साध्य झालं? त्याहीपेक्षा महाराष्ट्रात गाड्या सुरु करताना क्षमता नाही परंतु इतर राज्यात गाड्या सहज सुरु होऊ शकतात हा महाराष्ट्रातील नागरिकांना डिवचण्याचा प्रकार आहे.
तरी, कोकण रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने इतर राज्यातील प्रवाशांची सोय करण्याआधी स्वतःच्या हद्दीतील विभागातील प्रवाशांचा उद्रेक होण्याआधी त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात. कारण, ते तुमचंच उत्तरदायित्व आहे. महाराष्ट्रातील स्थानिक प्रवासी आपल्या मागण्या घेऊन दक्षिण रेल्वेकडे जाऊ शकत नाहीत. मध्य रेल्वे, कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वेचे मुख्यालय महाराष्ट्रात असूनही आम्हाला किमान सोयींसाठी संघर्ष करावा लागतो हे आमचं दुर्दैव. आता महाराष्ट्रातील नागरिकांनीच एकत्र येऊन याचा विरोध करावा.
रत्नागिरी: शासनाने 5 फेब्रुवारी 2016 च्या अधिसुचनेनुसार 1 जानेवारी पासून पर्ससीन मासेमारी बंद केली आहे. त्यामुळे आजपासून हि मासेमारी ऑगस्ट महिन्याच्या अखेपर्यंत बंद राहणार आहे. महाराष्ट्र सागरी अधिनियमन 1981 अंतर्गत पर्ससीन मासेमारीच्या अनुषंगाने शासनाने 5 फेब्रुवारी 2016 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेतील महत्त्वाच्या तरतुदनुसार परवानाधारक पर्ससीन नौकांना सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत अधिसूचनेत नमूद केलेल्या क्षेत्रात व विहित जाळ्यांच्या आकाराचा वापर करून मासेमारी करता येईल.
1 जानेवारी ते 31 ऑगस्टया कालावधीत नौका पर्ससीन जाळ्या ने मासेमारी करताना आढळल्यास मत्स्यव्यवसाय विभागामार्फत महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियमन 1981 (3) महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन सुधारणा अध्यादेश 2021 मधील कलम 17 पो टकलम [5] जो कोणी पर्ससीन किंवा रिंगरिंसीन किंवा मोठ्या आसाचे ट्रॉल जाळे यांच्या विनियमनाशी संबंधित असणा ऱ्या आदेशा चे उल्लंघन केल्यास पहिल्या वेळी 1 लाख रुपयांचा दंड, दुसऱ्या वेळी सापडल्यास 3 लाख रुपये दंड आणि तिसऱ्या वेळी मासेमारी करताना सापडल्या स 6 ला ख रुपये दंड आकारला जाणार आहे.तसेच संबधीत नौका मूळ बंदरात किंवा अंमलबजावणी अधिकारीविहित करतील अशा बंदरात जप्तकरून ठेवण्यात येईल व अभिनिर्णय अधिकाऱ्यां कडे दावा दाखल करण्यात येईल.
ह्या बंदीचा मोठा फटका मासेमारी व्यावसायिकांवर आणि त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या इतर स्थानिक लोकांवर बसतो. उर्वरित ८ महिने नौका किनाऱ्यावर न वापरता ठेवल्याने खूप मोठा आर्थिक फटका मासेमारी व्यावसायिकांना बसत आहे.
Konkan Railway News :कोकणमधील गजानन महाराजांच्या भक्तांना एक खुशखबर आहे. कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या नागपूर मडगाव द्वि साप्ताहिक विशेष गाडीला आता शेगाव ह्या स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. . कोकणातून शेगावला जाणाऱ्या भाविकांची मागणी या थांब्यामुळे पूर्ण झाली आहे.
01139/01140 हे नागपूर ते गोव्यातील मडगाव दरम्यान आठवड्यातून दोन दिवस धावते. या गाडीला शेगाव स्थानकावर थांबा देण्यात यावा, अशी मागणी कोकण पट्ट्यातून शेगावच्या गजानन महाराजांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांकडून करण्यात येत होती. अखेर या मागणीची दखल घेऊन रेल्वेने नागपूर -मडगाव विशेष एक्सप्रेसला दिनांक 4 जानेवारी 2023 पासून थांबा मंजूर केला आहे.
गाडी क्रमांक 01140 ह्या गाडीची वेळ कुडाळ स्थानकावर रात्री 10:10 आहे ती दुसर्या दिवशी दुपारी 3:35 वाजता शेगावला पोहोचते आणि पुढे नागपूरला जाते.
गाडी क्रमांक 01139 ह्या गाडीची वेळ शेगाव स्थानकावर संध्याकाळी 07:23 आहे ती दुसर्या दिवशी दुपारी 12:36 वाजता कुडाळ स्थानकावर पोहोचते आणि पुढे मडगावला जाते.
ही गाडी तात्पुरत्या स्वरुपात चालविण्यात आलेली होती आणि दोन वेळा वाढिव कालावधी पण देण्यात आला होता. आता ह्या गाडीचा कालावधी फेब्रुवारी 2023 अखेरपर्यंत वाढविण्यात आला आहे. विदर्भ आणि कोकणाला जोडणाऱ्या ही गाडी कायमस्वरूपी करावी अशी मागणी होत आहे.
Konkan Railway News : नाताळची सुट्टी साजरी करण्यासाठी गोव्यात आणि कोकणात गेलेल्या पर्यटकांच्या परतीच्या प्रवासासाठी कोंकणरेल्वेने या मार्गावर अजून सहा विशेष फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या सहा फेऱ्या पुढीलप्रमाणे असतील.
Train no. 01461 / 01462 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ह्या गाड्या मुंबई सीएसएमटी ते कन्याकुमारी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01461 मुंबई सीएसएमटी – कन्याकुमारी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 05/01/2023 रोजी गुरुवारी ही गाडी मुंबई सीएसएमटी ह्या स्थानकावरुन दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 23.20 वाजता कन्याकुमारी स्थानकावर पोहोचेल
Train No 01462 कन्याकुमारी – मुंबई सीएसएमटी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 07/01/2023 रोजी शनिवारी ही गाडी कन्याकुमारी ह्या स्थानकावरुन दुपारी 14:15 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 21:50 वाजता मुंबई सीएसएमटी स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01463 / 01464 – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई – कन्याकुमारी – लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस
ह्या गाड्या लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ते कन्याकुमारी ह्या स्थानकांदरम्यान चालविण्यात येणार आहेत.
Train No 01463 लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई – कन्याकुमारी सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 12/01/2023 आणि 19/01/2023 रोजी गुरुवारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई ह्या स्थानकावरुन दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 23.20 वाजता कन्याकुमारी स्थानकावर पोहोचेल
Train No 01464 कन्याकुमारी – लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेस
ही गाडी दिनांक 14/01/2023 आणि 21/01/2023 रोजी शनिवारी ही गाडी कन्याकुमारी ह्या स्थानकावरुन दुपारी14.15 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी रात्री 21.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई स्थानकावर पोहोचेल.
सिंधुदुर्ग:गेली बारा वर्षे शिक्षक भरती न झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजारहून अधिक डिएड उमेदवारांचे भवितव्य अंधकारमय बनले आहे.
शालेय शिक्षणमंत्रीपद हे आता जिल्ह्यात आहे. त्यामुळे आता शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून त्यांना आशेचा एक किरण भेटला आहे. पण बहुतेक उमेदवारांची वयोमर्यादा संपत नाही असल्याने त्यांचे भवितव्य अंधकारमय होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्यांचा बद्दल विचार न केल्यास ते आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याच्या पावित्र्यात आहेत.
शासनाने शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सुरू केले. पण ही प्रक्रिया क्लिष्ट असल्याने त्याचा फटका जिल्ह्यातील स्थानिक डीएड उमेदवारांना बसल्याचे दिसून आले. ज्ञानदानाचे पवित्र कार्य करण्याच्या हेतून जिल्ह्यातील अनेक तरुणांनी डीएड पदवी मिळविली. यानंतर त्यांना शिक्षक भरती होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, शासनाने शिक्षक पात्रता परिक्षा (टीईटी) घेण्यास सुरवात केल्याने तसेच ही परिक्षा जे उत्तीर्ण होतील, त्यांचीच भरती करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक डीएड उमेदवार हे भरतीपासून वंचित राहिले आहेत
रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागातर्फे वर्षअखेर साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘रत्नागिरी दर्शन‘ हि बस फेरी चालविण्यात येणार आहे. दिनांक २८ डिसेंबर ते ०१ जानेवारी दरम्यान दररोज हि सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या फेरीत पर्यटकांना रत्नागिरी,राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळे पाहता येतील. दररोज सकाळी ८ वाजता रत्नागिरी स्थानकातून हि बस सोडण्यात येणार आहे.
खालील पर्यटन स्थळे दाखविण्यात येतील.
आडिवरे,कशेळी कनकादित्य मंदिर, कशेळी देवघळी, गणेशगुळे, पावस, थिबा राजवाडा, भगवती किल्ला, लोकमान्य टिळक जन्मस्थान, आरेवारे समुद्रकिनारा आणि गणपतीपुळे ह्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता रत्नागिरी स्थानकावर हा प्रवास संपवला जाणार आहे.
नागपूर:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाला ‘बॅ. नाथ पै विमानतळ, सिंधुदुर्ग’ असे नाव देण्याच्या ठरावास आज विधानपरिषदेत मंजुरी मिळाली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी याबाबत शासकीय ठराव मांडला. दोन्ही सभागृहांच्या मंजुरीमुळे आता हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.
बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव योग्य
बॅरिस्टर नाथ पै हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्याचे सुपुत्र होते. नाथ पै यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. त्यांना यासाठी अनेकवेळा कारावास भोगावा लागला होता. गोवा मुक्ती संग्रामातही ते अग्रभागी होते. स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधीत्व केले होते. त्यांनी लोकसभेच्या राजापूर मतदारसंघातून १९५७, १९६२ आणि १९६७ या तीन निवडणुकीत विजय मिळवत १९५७ ते १९७१ अशी पंधरा वर्षे मतदारसंघाचे नेतृत्व केले. कोकण रेल्वेच्या संकल्पनेमध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात सरकारने त्यांचा सन्मान केला आहे. तसेच नाथ पै यांचे विमानतळाला नाव देण्याची सर्व पक्षांनी मागणी केली होती.
या विमानतळ परिसरात बॅ. नाथ पै यांचे जीवन चरित्र पुढील पिढीला कळावे यासाठी विस्तृत माहितीचे शिलालेख तसेच त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे स्मारक बांधून त्यांना गौरविण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले.
रत्नागिरी: महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळतर्फे (MIDC) रत्नागिरी येथे २ औद्योगिक क्षेत्रांकरिता उपलब्ध भूखंड वाटप केले जाणार आहे. हे वाटप “जसे आहे तसे व जेथे आहे तेथे” ह्या तत्वावर (सामान्य/अ.जा./अ.ज. ह्या प्रवगासाठी राखीव) ऑनलाईन सरळ पद्धतीने केले जाणार आहे. त्याकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ०४/०१/२०२२ संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
खालील औद्योगिक क्षेत्राकरिता अर्ज मागवले आहेत.
औद्योगिक क्षेत्र
वाटपास उपलब्ध क्षेत्र (हे. आर)
भूखंडाची संख्या
अतिरिक्त लोटे परशुराम
10.24
12
अडाळी
32.02
210
वाटप केल्या जाणाऱ्या भूखंडाचे दर,क्षेत्र आणि इतर माहितीसाठी खालील पीडीएफ फाईल डाऊनलोड करा.