Author Archives: Kokanai Digital

आमची पश्चिम रेल्वे मुंबई प्रवासी संघटनेच्या वतीने मुंबई लोकल संदर्भात पश्चिम रेल्वेच्या डिआरएम यांच्याकडे विविध मागण्या

   Follow us on        

दिवसेंदिवस मुंबई लोकलमधील गर्दी वाढत असल्याने प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाला काही पर्याय सुचवले आहेत यामध्ये मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशाच्या एकूण करांपैकी २५% कर हा फक्त मुंबई शहर भरते तरीही दरदिवसाला मुंबई लोकल मधून पडून ५ ते ६ प्रवाशांचा बळी जातोय त्यामुळे सर्व लोकल सेफ्टी डोअरच्या चालवाव्यात,मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे,मध्य रेल्वे व हार्बर लाईन वर प्रवाशांच्या तुलनेत लोकल चालवण्यासाठी भुयारी मार्गाचा पावर करावा. ( उदा. बुलेट ट्रेन ) किंवा रेल्वे ब्रिज डबलिंगचा ( उदा. मेट्रो ) सारखा वापर करावा म्हणजे खालून जलद लोकल, मेल,एक्सप्रेस तर ब्रिजवरून स्लो लोकल चालवल्या जातील.याच्याने भविष्यात प्रवाशांच्या तुलनेत मुंबई लोकल चालवता येतील.

मुंबई आणि उपनगरांच्या दक्षिणेकडे मोठया प्रमाणात इंडस्ट्रीज तर उत्तरेच्या बाजूला मोठी रेसिडेंसी असल्याने मुंबई लोकलचा समतोल बिघडतोय,म्हणून सकाळी मुंबईच्या दिशेने तर संध्याकाळी मुंबईच्या बाहेर जाताना मोठी गर्दी दिसतेय,यासाठी पालघर,बोईसर, वसई,वाडा,भिवंडी,कल्याण,कर्जत व नवी मुंबई ह्या परिसरात मोठया इंडस्ट्रिज आहेत म्हणून येथे ट्रान्सपोर्ट हब बनवून येथे लोकल व मेट्रोचे प्रमाण वाढवल्यास सकाळी व संध्याकाळी अप आणि डाऊन मार्गावरील मुंबई लोकलच्या गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल,पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेच्या मुंबई लोकलचे स्वतंत्र्य झोन बनवावे,पश्चिम रेल्वे वरील गर्दी कमी करण्यासाठी सर्व लोकल १५ डब्यांच्या चालवाव्यात.

एसी लोकलसंदर्भात पश्चिम रेल्वेच्या नेहमीच्या लोकल रद्द करून त्या ठिकाणी एसी लोकल सुरू करू नयेत त्यासाठी नवीन वेळापत्रक बनवावे सर्वसामान्यांना एसी लोकल परवडत नसल्याने फक्त ३०%  प्रवासीच त्यातून प्रवास करतात परिणामी त्याचा मागील लोकल वर भार येऊन प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो लटकून प्रवास केल्याने लोकल अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे.

मुंबईच्या तिन्ही मार्गावरील एसी लोकलचा तिकीट दर कमी करावा विरार ते चर्चगेट दरम्यान एसी लोकलचा मासिक पास २२०० रू.आहे १२ ते १५ हजारावर काम करणाऱ्या मुंबईकरानी हे पैसे आणायचे कोठून? यासाठी १) सामान्य लोकल वाढवा किंवा ते शक्य नसल्यास २) त्या सर्व स्क्रॅप करून त्याबदल्यात सेफ्टी डोअरच्या एसी किंवा नॉनएसी लोकल सरसकट सेकंड क्लासच्या तिकीट दरांमध्ये चालवाव्यात किंवा ३) एसी चे तीन कोच सामान्य लोकलला जोडावेत, त्याच्याने जनरल,फर्स्ट क्लास व एसी एकत्रच धावतील.

विरार नालासोपारा प्रवाशांच्या समस्या यामध्ये नालासोपारा हे पश्चिम रेल्वेवरील सर्वात जास्त लोकवस्तीचे स्टेशन आहे सकाळी कामाच्या वेळी विरारला रिटर्न जाऊन वेळ फुकट जात असल्याने ७ ते १० या वेळेत प्रत्येक २० मिनिटांनी यशवंतनगर यार्ड मधून फ्रेश लोकल प्लॅटफॉर्म नंबर २ वरून नालासोपारा ते चर्चगेट /दादर /अंधेरी अशा लोकल सुरू कराव्यात.

पश्चिम रेल्वेच्या विरार चर्चगेट लोकलमध्ये नालासोपारावाले रिटर्न येऊन प्रवास करत असल्याने सकाळी ६.३० ते १० या वेळेत विरारला येणाऱ्या फास्ट ट्रॅक वरील सर्व लोकल नालासोपारा प्लॅटफॉर्म नंबर ३ वर न थांबवता त्या थेट वसई वरून विरारला आणाव्यात व नालासोपारा प्लॅटफॉर्म नंबर १ वरील सर्व लोकल नेहमीप्रमाणे थांबवाव्यात,विरार लोकल असूनही विरारकरांना अंधेरी बांद्रापर्यंत बसायलाच मिळत नाही ( उदा. संध्याकाळी सर्व फास्ट लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्याने थांबत नाहीत त्याप्रमाणे सकाळी नालासोपाऱ्याला करावे )

सकाळी ७ ते १० या गर्दीच्या वेळेत प्रत्येक २० मिनिटांनी विरारच्या नारंगी रोड व यशवंत नगर यार्ड येथील यार्ड मधून प्लॅटफॉर्म ६ व १ वरून विरार ते चर्चगेट /दादर / अंधेरी अशा फास्ट लोकल सुरू कराव्यात.

विरार अंधेरी लोकल संदर्भात सकाळी गर्दीच्या वेळी विरार चर्चगेट लोकल ह्या अंधेरीला ३०% खाली होतात त्यामुळे सकाळी ७ ते १० व सायं. ६ ते १० या वेळेत विरार अंधेरी दरम्यान प्रत्येक २० मिनिटांनी जलद लोकल चालवाव्या,संध्याकाळी गर्दीच्या वेळी  ७.२५ ते ८.१३  दरम्यान २ अंधेरी विरार लोकल सुरू कराव्यात मधील ५० मिनिट अंधेरी विरार लोकलच नाही आहेत.

इतर महत्वाच्या मागण्या पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल टर्मिनस येथील लीज संपल्याच्या कारणांनी विरारच्या यशवंतनगर यार्डची निर्मिती करण्यात आली. रेल्वेने त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही खर्च केला मात्र हे यार्ड नेहमी रात्रीच्या वेळी खाली असल्याचे निदर्शनास येत आहे,येथे स्टेला लोकलच नसतात,असे का? असा सवाल प्रवासी संघटनेने केला आहे.

विरार चर्चगेट विरार सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी लेडीज स्पेशल लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात,गर्दीच्या वेळी मुंबई लोकलमध्ये जेष्ठ नागरिकांना त्यांच्या सीट पर्यंत पोहोचताच येत नाही त्यासाठी त्यांना स्वतंत्र बोगी मिळावी.

काही मुंबई लोकलमध्ये सेकंड क्लासच्या डब्यातील बसण्याच्या सिटस अत्यंत वाईट आहे त्यावर प्रवाशांना १० मिनिटे बसताच येत नाही.

पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात काही बदल करावेत यामध्ये सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ६ ते १० यावेळी डहाणू रोड ते वसई रोड अशा प्रत्येक २० मिनिटांनी लोकल सुरू कराव्यात.रात्री ११ नंतरच्या बऱ्याच लोकल भाईंदरच्या यार्डमध्ये येत असल्याचे निदर्शनास येत आहे, त्यातील काही लोकल विरारच्या यार्ड मध्ये आणाव्यात. व विरारला सर्व एसी लोकल प्लॅटफॉर्म नंबर १ वरूनच चालवाव्यात.

पहाटे ३ वाजून ३० मि.पासून चर्चगेट विरार लोकल सुरू कराव्यात.दिवसभरात चर्चगेट बोरीवली फास्ट लोकलच्या काही फेऱ्या रद्द करून त्या ठिकाणी डहाणू रोडच्या लोकल फेऱ्या वाढवाव्यात.पहाटे ५.८ मिनिटांची नालासोपारा बांद्रे लोकल विरार वरून सुरू करावी.

रात्री ११.१२ मिनिटांची अंधेरी नालासोपारा लोकल अंधेरी विरार करावी.डहाणू रोड / बोईसर ते विरार लोकल सायंकाळी ७ च्या दरम्यान सुरू करावी.सकाळी ७.१८ मि.विरार दादर फास्ट लोकलला नालासोपाऱ्याला थांबा देऊन ती विरार चर्चगेट अशी चालवावी.

चर्चगेट विरार सायंकाळी ६.२२ मिनिटांची एसी फास्ट लोकल सामान्य लोकल म्हणून चालवावी.सकाळच्या ७.१९ आणि ८.२४ मिनिटांची विरार बोरीवली १५ डब्यांच्या स्लो लोकल अंधेरी पर्यंत चालवाव्यात. तर पुढे सकाळी ८ ते ९ दरम्याने ४ अंधेरी चर्चगेट स्लो लोकल आहेत त्यातील काही कमी कराव्यात.सायं. ६.५१ ते ८.४४ यांच्यामध्ये १ तास ५३ मिनिटात चर्चगेट विरार स्लो लोकल नाही आहेत तर दरम्यानच्या काळात ४ चर्चगेट ते विरार / भाईंदर स्लो लोकल चालवाव्यात.

सायंकाळी ६ नंतर प्रत्येक अर्ध्या तासाने दादर ते विरार लोकल चालवाव्यात.सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते १० दरम्यान विरार चर्चगेट विरार काही लोकल डबल फास्ट कराव्यात तर काहीना अल्टरनेट थांबे द्यावेत.डहाणू दिवा ते पनवेल मेमू प्रत्येक तासाला सोडावी किंवा त्या मार्गावर लोकल सुरू कराव्यात.

निवेदनावर अध्यक्ष श्री.अनिल मोरे व सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सहया केल्या असून त्याच्या प्रति रेल्वेमंत्री,राज्याचे मुंख्यमंत्री,जनरल मॅनेजर पश्चिम रेल्वे,मुंबईचे खासदार श्री.पियुष गोयल,श्री.हेमंत सावरा,श्री.अरविंद सावंत,सौ.वर्षा गायकवाड व स्टेशन मास्तर विरार,नालासोपारा व वसई रोड यांना देण्यात आल्या आहेत.

मालवण: स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ६० फूट उंच पुतळा उभारला जाणार

   Follow us on        

मुंबई: मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारला जाणार आहे. या निविदेचा तपशील जाहीर झाला आहे. नवा पुतळा हा ६० फुटांचा असणार आहे. हा पुतळा पुतळा नव्याने उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. शिवरायांच्या पुतळ्याची पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत उंची ६० फूट असेल असे निविदेच्या तपशीलात म्हटले आहे. या पुतळ्याच्या उभारणीसाठी २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर उभारणार पुतळा

निविदेच्या अटी,शर्तींमध्ये या पुतळ्याची उभारणी स्टॅच्यू ऑफ युनिटी्च्या धर्तीवर करण्यात येणार असल्याचे म्हटले असून पुतळ्याची उभारणीवर ही IIT मुंबईची तज्ज्ञ मंडळी लक्ष ठेवणार आहेत. या पुतळ्याच्या उभारणीसाठी 6 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. पुतळ्यासाठी एक समिती तयार करण्यात आली असून या समितीच्या प्रमुख सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर असणार आहेत. त्यांच्याशिवाय IIT मुंबईची तज्ज्ञ मंडळी या समितीत असणार आहेत.

निविदेत काय म्हटले आहे?

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने पुतळ्यासाठीची निविदा प्रसिद्ध केली आहे. शिवरायांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल-दुरुस्ती यासाठी ही निविदा आहे.हा पुतळा 60 फुटी असणार असून तो उभारण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे.

सिंधुदुर्ग: जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी भात पिकासाठी ताडपत्री खरेदी अनुदान योजना; अर्ज कसा कराल?

   Follow us on        
सिंधुदुर्ग: सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत भात पिकासाठी प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
जिल्ह्यात साधारणत: ३५०० मि.मी. पाऊस पडतो. या पावसामुळे काढणीच्या वेळेस साधारणत: १५ ते २० टक्के नुकसान होते. भात पिकाचे काढणीच्या वेळेत होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना २०२४-२५ अंतर्गत प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेकरिता ७५ टक्के अनुदान तत्त्वावर मंजुरी दिली आहे. या योजनेस पात्र शेतकऱ्याकडे ०.१० हेक्टर क्षेत्र भात पिकाखालील असावे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला तसेच अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा परिषद कृषी विभाग यांची जिल्हास्तरीय खरेदी समितीने निश्चित केलेला दर २ हजार प्रति प्लास्टिक ताडपत्री आहे. त्यानुसार ७५ टक्के अनुदानाप्रमाणे प्लास्टिक ताडपत्रीसाठी जास्तीत जास्त १ हजार ५०० रुपये प्रति ताडपत्री अनुदान देय राहील. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त एक ताडपत्री खरेदी करता येईल. सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत आंबा पिकासाठी प्लास्टिक क्रेट्स आणि प्लास्टिक ताडपत्री योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून तो तालुका कृषी कार्यालय अथवा संबंधित क्षेत्रीय कृषी सहायक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. योजनेसाठी सातबारा, ८ अ उतारा , बँक पासबुक, आधार कार्ड व रेशन कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.

सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन दुप्पटीने वाढणार; राज्यसरकारचा अजून एक मोठा निर्णय

 

   Follow us on        

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार काही मोठे आणि महत्वाचे निर्णय घेऊन सर्व स्तरातील मतदारांना खुश करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यानुसार आजच मंत्रिमंडळाने सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार वाढवले जाणार आहे, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन मिळेल.

मानधनात किती वाढ होणार ?

राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांचं सध्याचं मानधन त्या-त्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. त्यानुसार, ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २००० पर्यंत आहे, त्या सरपंचाचं मानधन ३ हजार रुपयांवरून ६ हजार रुपये होणार आहे. तर, या ग्रामपंचायतींच्या उपसरंपचांचं मानधन १ हजार रुपयांवरून २ हजार रुपये होणार आहे.

दोन हजार ते आठ हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचं मानधन ४ हजार रुपयावरून ८ हजार रुपये होणार आहे. तर, उपसरपंचांचं मानधन दीड हजार रुपयांवरून ३ हजार रुपये होईल.

ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८ हजारपेक्षा जास्त आहे, तेथील सरपंचांचं मानधन ५ हजार रुपयांवरून १० हजार रुपये तर, उपसरपंचांचं मानधन २ हजार रुपयांवरून ४ हजार रुपये होणार आहे.

या निर्णयामुळे राज्यावर वर्षभरात 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे

 

 

Konkan Railway: तब्बल १५ स्लीपर कोच असलेल्या विशेष गाडीला जानेवारीपर्यंत मुदतवाढ

    Follow us on        
Konkan Railway News: या वर्षी  कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांपैकी एका गाडीची सेवा जानेवारी २०२५ अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १५ स्लीपर कोच असलेल्या या गाडीला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात आलेला प्रतिसाद पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक ०९ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून दिनांक  दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल ती  मंगळुरू जंक्शनला  दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५  वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल  ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून गुरुवार आणि सोमवारी रात्री १० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २१:०५ वाजता पोहोचेल.गुरुवार आणि सोमवारी रात्री २२:१०  वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३ :०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

देशातील हायस्पीड वंदे कार्गो लवकरच रूळांवर…

   Follow us on        

Vande Bharat Cargo: प्रवाशांना वंदे भारत मेट्रो, वंदे स्लीपर, वंदे मेट्रो( नमो भारत रॅपिड रेल) या ट्रेन धावण्यास सज्ज झाल्यानंतर आता मालवाहतुकीसाठी लेटेस्ट टॅक्नलॉजी असलेली वंदे कार्गो ट्रेन धावणार आहे. वंदे कार्गो ट्रेनची पहिली झलक समोर आली असून रेल्वे लवकरच वंदे कार्गो ट्रेनला प्रवाशांच्या सेवेत आणणार आहे.

आता विमानाप्रमाणेच ट्रेनमध्येही पार्सल सप्लाय होणार आहेत. वंदे भारत ट्रेनच्या धर्तीवर आता माल वाहतूक करण्यासाठी हायस्पीड मालगाड्या चालवण्याची तयारी सुरू आहे. रेल्वे सेवा अधिक चांगली आणि आधुनिक करण्यावर भर देत आहे. चेन्नई येथील रेल्वे कोच फॅक्ट्रीत वंदे कार्गो ट्रेनचं काम सुरू आहे. ज्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत आणि वंदे मेट्रो ट्रेनच्या कोचचे काम करण्यात आले आहे तिथेच हाय स्पीड वंदे कार्गो तयार होत आहे.

कमी अतंर असलेल्या शहरांत वंदे भारत कार्गो ट्रेन चालवण्यात येण्याची शक्यता आहे. या Vande Cargo मध्ये प्रवाशांसाठी कोणतीही सीट नसणार आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या Vande Cargo गाड्यांचा वापर कमी वेळेत एका शहरातून दुस-या शहरात सुलभ आणि सुरक्षित माल वाहतुकीसाठी केला जाईल. या Vande Cargo गाड्या डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्णपणे तयार होतील अशी माहिती देण्यात आली आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्हय़ातील ३७ गावांतील ठिकाणे ‘सौर हायमास्ट’ ने उजळणार

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३७ गावांमध्ये १ कोटी ६० लाख रुपये खर्च करून सौर हायमास्ट मंजूर केले गेले आहेत. जिल्हा वार्षिक अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत हे सौर हायमास्ट मंजूर करण्यात आले आहेत.

जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०२४-२५ या आर्थिक वर्षात अपारंपरिक ऊर्जा विकास कार्यक्रमांतर्गत सौर पथदीप मंजूर करण्याबाबत प्रस्ताव ग्रामपंचायत विभागाकडून दिला होता. जिल्ह्यातील आठही तालुक्यातील ३७ गावांमध्ये हे हायमास्ट मंजूर झाले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी तालुक्यातील शेर्ले-कापाईवाडी सार्वजनिक गणेशोत्सव ठिकाणी, पाणलोस रवळनाथ माऊली मंदिर, चौकूळ शंकर मंदिर, इन्सुली क्षेत्रफळ कोठावळे बांध हायवे सर्कलजवळ, वेंगुर्लेतील शेळपी मुंडयेवाडी, भोगवे शेवटचा स्टॉप जवळ, ग्रामपंचायत परबवाडा इमारत, ग्रामपंचायत खडपीवाडी कोचरा वेतोबा मंदिरजवळ, निवती किनारा, आडेली कांबळेवीर नेमळे रस्त्याजवळ (प्रभू खानोलकर घरानजीक), मालवणातील शिरवडे देव सिद्ध गणेश मंदिर, देव गांगेश्वर मंदिर, तळगाव सातेरी मंदिर खांदवाडी, चौके देवी भराडी मंदिर, आंबेरी वाक येथे, दोडामार्गातील झोळंबे रबेलवाडी प्राथमिक शाळेजवळ, गावठणवाडी सातेरी मंदिर देवस्थानसमोर, श्रीरामवाडी मासे लिलाव केंद्राजवळ, झोळंबे वरचीवाडी, कोलझर टेंबवाडी येथे, देवगड तालुक्यातील सौंदळे ग्रामपंचायत, कुडाळातील सोनवडे तर्फ कळसुली दुर्गानगर ब्राह्मण देव मंदिर तळी, वेताळ बांबर्डे वाघ भाटले वाडी वाघोबा मंदिर, खुर्द मायदेश्वर मंदिरनजीक, पिंगळी भद्रकाली मंदिर, कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर अंदुर्ले खिंड येथे,
कणकवलीतील हळवल श्रीराम मंदिर, नडगिवे ग्रामपंचायत आदी ३७ कामांना मंजुरी दिली आहे. याबाबतचे आदेश बांधकाम आणि संबंधित ग्रामपंचायतींना पाठविले आहेत. लवकरच या कामांना सुरुवात होईल, यादृष्टीने योग्य कार्यवाही करावी, अशाही सूचना दिल्या आहेत.

मध्यरेल्वेच्या २२ विशेष गाड्यांचा डिसेंबरपर्यंत विस्तार; कोकण रेल्वे मार्गावरील एका गाडीचा समावेश

   Follow us on        
Railway News : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी  मध्य रेल्वेने उन्हाळी हंगामासाठी काही विशेष गाड्यांच्या फेऱ्यांची कालावधी डिसेंबरपर्यंत विस्तारित  करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये एकूण २२ विशेष गाड्यांचा अतिरिक्त फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत.
या यादीत कोकण रेल्वे मार्गावरील आठवड्यातून दोन दिवस चालविण्यात येणार्‍या  ०११३९/०११४० नागपूर-मडगाव- नागपूर या गाडीचा समावेश आहे. या गाडीची सेवा या वर्षाच्या सप्टेंबर अखेरीस संपणार होती. मात्र तिची सेवा डिसेंबर अखेरपर्यंत वाढविण्यात आली आहे. दोन्ही बाजूने प्रत्येकी  २६  प्रमाणे या गाडीच्या एकूण ५२ फेऱ्या होणार आहेत.
गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव ही विशेष गाडी दिनांक २८ डिसेंबर २०२४ पर्यंत चालविण्यात येणार असून गाडी क्रमांक ०११४० मडगाव – नागपूर ही गाडी दिनांक २९ डिसेंबर २०२४ पर्यंत या आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे, डब्यांच्या संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.
थांबे: वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवी आणि करमळी

 

Konkan: रेल्वेच्या ‘या’ कहाण्या अधुऱ्याच….

   Follow us on        

वाचकांचे व्यासपीठ: कोकण रेल्वे २५ वर्षापूर्वी कोकणात आली. कोकण रेल्वे मार्ग साकारणे हे अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक कार्य KRCL कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीने आणि त्यावेळेच्या लोकप्रतिनिधींनी अगदी लीलया पेलले. मात्र त्यानंतर आतापर्यंत पाहिजे तसा विकास कोकण रेल्वेचा झाला नाही. असे नाही की प्रयत्न झालेच नाही. कोकण रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यासाठी अनेक योजना, प्रस्ताव पुढे आलेत, मात्र त्यांना मूर्त स्वरूप देण्यात अपयश आले. कोणत्या आहेत या योजना आणि प्रस्ताव हे थोडक्यात पाहू.

राज्यात पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना चिपळूण कराड रेल्वे मार्ग होणार असे जाहीर केले गेले होते. या प्रस्तावाला ७ मार्च २०१२ रोजी मंत्रिमंडळात मान्यताही दिली गेली होती. मात्र त्यानंतर यासाठी प्रयत्न झाले नाहीत. मात्र कोकण आणि पाश्चिम महाराष्ट्र यांना जोडणारा रेल्वे मार्ग मृगजळच ठरला आहे.

माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू रेल्वे यांच्या प्रयत्नाने कोल्हापूर वैभववाडी मार्ग याबाबत सर्वेक्षण झाले होते. मात्र पुढे यासाठी म्हणावे तसे प्रयत्न न झाल्याने हाही मार्ग रखडला. आपत्कालीन परिस्थितीमध्ये हा मार्ग होणे काळाची गरज आहे त्यामुळे गणपती मे महिन्याच्या सुट्टीमध्ये ज्यादा गाड्याअप किंवा डाउन कोल्हापूर मार्गे वळवता येतील व गाड्यांचा होणारा खोळंबा रोखता येईल.

विद्यमान खासदार नारायण राणे काँग्रेसच्या सत्तेत मंत्री असताना सावंतवाडी ते रेडी रेल्वे मार्ग टाकण्याचे सुतवाच झाले होते त्याचे पुढे काय झाले? कणकवली ते रेडी पर्यंत स्वतंत्र टॉय ट्रेन सिंधुदुर्ग जिल्ह्यात फिरणार अशी रेवडी त्याच वेळेला उडवली होती त्या रेवडीचे पुढे काय झाले? हे देखील प्रश्नच आहेत.

सावंतवाडी आंबोलीमार्गे बेळगाव जोडण्याची एक रेवडी मध्यंतरी उडवली केली होती त्यामध्ये सीमा वरती भागातील काही आमदार खासदार सक्रिय झाले होते त्याचे पुढे काय झाले ?

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सावंतवाडी रेल्वे टर्मिनस याचा कोनशिला समारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला होता. खरं म्हणजे सावंतवाडी टर्मिनस काळाची गरज आहे. मे महिन्यामध्ये आणि गणपती मध्ये सावंतवाडी टर्मिनस जर पूर्ण झाले तर जादा गाड्या सोडता येतील तसेच वसई सावंतवाडी कल्याण सावंतवाडी पुणे सावंतवाडी अशा गाड्या सोडता येतील

सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न येत्या दिवाळीपूर्वी सोडवून निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी त्या टर्मिनसचे उद्घाटन करा आणि त्याला मधु दंडवते यांचे नाव द्या कारण कोकण रेल्वे मार्गावर रेल्वे आणण्याचे श्रेय फक्त आणि फक्त मधू दंडवते जॉर्ज फर्नांडिस यांना जाते. 2024 साल हे मधु दंडवते यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे तरी या वर्षात टर्मिनसला त्यांचे नाव देऊन सावंतवाडी टर्मिनस वरून स्पेशल गाडी वसई किंवा कल्याण पर्यंत सोडण्यात यावी हीच मधु दंडवते यांना आदरांजली ठरेल. पाणी भरण्याची आणि पाण्याची सोय आता दीपक केसरकर यांनी पूर्णत्वास नेलेली आहे तिलारी प्रकल्पातून पाणी देण्याची योजना त्यांनी मंजूर केलेली आहे तरी लवकरात लवकर सावंतवाडी टर्मिनस पूर्ण करून मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे.

 

श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर 

संस्थापक सदस्य कोकणरेल्वे

सल्लागार :अखंड कोकण रेल्वे सेवा समिती

कंपनी गुजरातला नेण्यात आल्याची बातमी खोटी; रिन्यू कंपनीने जारी केला खुलासा

   Follow us on        

नागपूर: नागपुरातील सुरू होणारी कंपनी गुजरातला नेण्यात आली असल्याची बातमी काल व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. विरोधकांनी या गोष्टीवरून मोठ्या प्रमाणात सरकारवर ताशेरे ओढले होते. मात्र ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे रिन्यू कंपनीने म्हंटले आहे. याबाबत कंपनीने एक लिखित खुलासा जारी केला आहे.

कंपनीने काय म्हटले आहे खुलाश्यात..

महाराष्ट्र सरकारशी चर्चा अपूर्ण राहिल्याने किंवा वीज दर प्रचंड असल्याने महाराष्ट्रात गुंतवणूक करणार नाही, असे आम्ही म्हटल्याचे वृत्त धादांत खोटे. हे वृत्त नुसते दिशाभूल करणारे नाही, तर अतिशय बेजबाबदारपणाचे आहे. महाराष्ट्रात आम्ही सौर उत्पादनात अपस्ट्रीम व्हॅल्यूचेनमध्ये गुंतवणूक करणार आहोत, ती गुजरातमध्ये करणार नाही. रिन्यू ही महाराष्ट्रातील सर्वांत मोठी कंपनी आहे आणि महाराष्ट्राबाबत आमची वचनबद्धता आहे. महाराष्ट्रात आम्ही 550 मेवॉ क्षमता स्थापित केली आहे आणि आणखी 2000 मेवॉ चे काम सुरु आहे. 2026 पर्यंतचा हा आराखडा असून, त्यासाठी 15,000 कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे. याशिवाय पंप स्टोरेज, ग्रीन डायड्रोजन क्षेत्रात सुद्धा आम्ही राज्यात काम करणार असून, यातून 30 हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. कंपनी महावितरणला 550 मेवॉ वीज स्पर्धात्मक दरात देत असून, सध्याचे प्रकल्प आणि येणारे प्रकल्प असे मिळून 1 लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आम्ही करणार आहोत

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search