Author Archives: Kokanai Digital

०५ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • दिनांक : 5 जून 2025
  • वार : गुरुवार
  • माह (अमावस्यांत) : ज्येष्ठ
  • माह (पूर्णिमांत) : ज्येष्ठ
  • ऋतु : ग्रीष्म
  • आयन : उत्तरायण
  • पक्ष : शुक्ल पक्ष
  • तिथी : दशमी तिथी (6 जून रात्री 02:15 पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
  • नक्षत्र : हस्त नक्षत्र (6 जून सकाळी 06:33 पर्यंत) त्यानंतर चित्रा नक्षत्र
  • योग : सिद्धि योग (सकाळी 09:12 पर्यंत) त्यानंतर  व्यातीपात योग
  • करण : तैतुला करण (दुपारी 01:02 पर्यंत) त्यानंतर गराजा करण
  • चंद्र राशी : कन्या राशी
  • सूर्य राशी : वृषभ राशी
  • अशुभ मुहूर्त:
  • राहु काळ : दुपारी 02:16 ते दुपारी 03:55 पर्यंत
  • शुभ मुहूर्त:
  • अभिजित : दुपारी 12:11 ते दुपारी 01:03
  • सूर्योदय : सकाळी 06:07
  • सूर्यास्त : सायंकाळी 07:18
  • संवत्सर : विश्वावसु
  • संवत्सर(उत्तर) : सिद्धार्थी
  • विक्रम संवत: 2082 विक्रम संवत
  • शक संवत: 1947 शक संवत
जागतिक दिन :
  • जागतिक पर्यावरण दिन
  • जागतिक धावण्याचा दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1915 : डेन्मार्कने आपल्या घटनेत सुधारणा करून महिलांना मतदानाचा अधिकार दिला.
  • 1959 : सिंगापूरचे पहिले सरकार स्थापन झाले.
  • 1952 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोलंबिया विद्यापीठाने ‘डॉक्टर ऑफ लॉ’ ही सन्मान पदवी दिली.
  • 1968 : अमेरिकेचे अध्यक्षपदाचे उमेदवार रॉबर्ट एफ. केनेडी यांना गोळ्या घालण्यात आल्या आणि दुसऱ्याच दिवशी केनेडी यांचा मृत्यू झाला.
  • 1974 : जागतिक पर्यावरण दिन
  • 1975 : सुएझ कालवा वाहतुकीसाठी पुन्हा खुला. 1967 पासून, हा कलवा वापरण्यास 8 वर्षे बंदी होती.
  • 1977 : ऐपल ने ऐपल 2 संगणक सादर केला.
  • 1977 : सेशेल्स मधे उठाव.
  • 1980 : भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक आणि ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस चे संस्थापक नारायण मल्हार जोशी यांच्या सन्मानार्थ पोस्टल तिकिटांचे अनावरण करण्यात आले.
  • 1994 : वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने इंग्लिश काउंटी क्रिकेट स्पर्धेत वॉर्विकशायरविरुद्ध नाबाद 501 धावांची खेळी करून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
  • 2003 : पाकिस्तान आणि भारतात तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे तापमान 50 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त झाले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1723 : ‘अ‍ॅडॅम स्मिथ’ – स्कॉटिश अर्थशास्त्रज्ञ आणि तत्त्ववेत्ता, यांचा जन्म. (मृत्यू: 17 जुलै 1790)
  • 1879 : ‘नारायण मल्हार जोशी’ – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक, यांचा जन्म. (मृत्यू: 30 मे 1955)
  • 1881 : ‘गोविंदराव टेंबे’ – हार्मोनियम वादक, अभिनेते व संगीतकार, नाट्यसंगीताचे पहिले शिल्पकार, पहिल्या बोलपटाचे संगीत दिग्दर्शक, संगीत क्षेत्रातील पहिले सौंदर्य मीमांसक, संगीतिकांचे प्रवर्तक, यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑक्टोबर 1955)
  • 1883 : ‘जॉन मायनार्ड केन्स’ – ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ, यांचा जन्म. (मृत्यू: 21 एप्रिल 1946)
  • 1908 : ‘रवि नारायण रेड्डी’ – कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया चे सहसंस्थापक, यांचा जन्म. (मृत्यू: 7 सप्टेंबर 1991)
  • 1946 : ‘पॅट्रिक हेड’ – विल्यम्स एफ1 टीम चे सहसंस्थापक, यांचा जन्म.
  • 1952  : ‘मुकेश भट्ट’ – भारतीय चित्रपट निर्माते व अभिनेता, यांचा जन्म.
  • 1961 : ‘रमेश कृष्णन’ – भारतीय टेनिस खेळाडू आणि प्रशिक्षक, यांचा जन्म.
  • 1972 : ‘योगी आदित्यनाथ’ –  भारतीय राजकारणी, महंत व उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री, यांचा जन्म.
  • 1976  : ‘सोनालिका जोशी’ – तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील माधवी भिडे भूमिका करणारी भारतीय टेलिव्हिजन अभिनेत्री, यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1950 : ‘हरिश्चंद्र बिराजदार’ – कुस्तीगीर व प्रशिक्षक, यांचे निधन. (जन्म: 14 सप्टेंबर 2011)
  • 1973 : ‘माधव सदाशिव गोळवलक’र तथा ‘श्री गुरूजी’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक, यांचे निधन. (जन्म : 19 फेब्रुवारी 1906)
  • 1996 : ‘आचार्य कुबेर नाथ राय’ – भारतीय कवि आणि विद्वान, यांचे निधन. (जन्म: 26 मार्च 1933)
  • 1999 : राजमाता श्रीमंत ‘छत्रपती सुमित्राराजे शाहूमहाराज भोसले’ यांचे निधन.
  • 2004  : ‘रोनाल्ड विल्सन रेगन’ – अमेरिकेचे माजी अध्यक्ष, यांचे निधन.
  • 2004 : ‘रोनाल्ड रेगन’ – अमेरिकेचे 40 वे राष्ट्राध्यक्ष, यांचे निधन. (जन्म: 6 फेब्रुवारी 1911)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

Railway Updates: रेल्वेमंत्र्यांकडून मिरज कॉर्डलाईन प्रकल्पाला मंजुरी! आता प्रवास सुसाट होणार

रेल्वे मंत्रालयाने १२८.७८ कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन ( १.७३ किमी ) प्रकल्पाला मान्यता दिली आहे. या संदर्भात रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी निर्णय घेतला आहे. या प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे रेल्वेच्या प्रवासी आणि मालमत्ता गाड्यांची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
रेल्वे कनेक्टीव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढविण्यासाठी रेल्वे मंत्र्यानी मोठे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वे अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या या मिरज कॉर्ड  ( Miraj Chord Line ) लाईनमुळे पश्चिम महाराष्ट्रातील मिरज जंक्शनवरील रेल्वे इंजिनांना बदलण्याची झंझट वाचणार आहे. त्यामुळे रेल्वेची परिचलन सुलभ होऊन प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे.
इंटरचेंज पॉईंट मिळणार
मिरज कॉर्ड लाईन ( १.७३ किमी )  प्रकल्पाला रेल्वे मंत्रालयाने मंजूरी दिल्याने मल्टी ट्रॅकिंग, फ्लायओव्हर आणि बायपास लाईन क्षमतेत वाढ होणार आहे. तसेच मिरज जंक्शनवरील रेल्वे परिचलन  सुलभ होणार आहे. त्यामुळे मिरज-पुणे, मिरज-कोल्हापूर, मिरज-पंढरपूर आणि मिरज-लोंढा सारख्या मार्गांना जोडणारा एक प्रमुख इंटरचेंज पॉईंट उपलब्ध होणार आहे.
सध्या कुर्डुवाडू किंवा हुब्बाळी येथून येणारी आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनला १२० मिनिटांचा काळ लागतो.  कारण इंजिन किंवा ब्रेक व्हॅन बदलण्यासाठी मिरज येथे ट्रेनला मागे घेऊन डब्बे जोडण्याची वेळ जातो. त्यामुळे या ट्रेनच्या प्रवाशांचा वेळ वाया जातो. पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधा अपग्रेड करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे आणि या प्रदेशात अधिक कार्यक्षम गतीने मालगाडी आणि प्रवासी रेल्वे गाड्यांचा मार्ग मोकळा होणार आहे.  मिरज ते कोल्हापूर जलद प्रवासा व्हावा यासाठी या जोड मार्गाची मागणी प्रवाशांकडून होत होती. आता दीर्घकाळापासूनची ही मागणी पूर्ण होणार आहे.

Konkan Railway: खुशखबर! यंदाच्या गणेशचतुर्थीला रेल्वेने कार सुद्धा नेता येईल; कोकण रेल्वे नवीन सुविधा सुरु करण्याच्या तयारीत

   Follow us on        
Car RoRo Serviice on Konkan Railway: कोकण मार्गावर कारसाठी रोरो सेवा चालू करण्याचा आपला प्रयत्न असून या उपक्रमाला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभल्यास ही सेवा यांच्या गणेश चतुर्थीला चालू करण्यात येणार असल्याची माहिती कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे चेअरमेन आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी मंगळवारी बेलापूर येथील कोकण रेल्वेच्या प्रधान कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. एका फेरीत किमान ४० गाड्यांची वाहतूक करण्यासाठी बुकिंग केल्यास ही सेवा चालू करता येईल असे ते पुढे म्हणालेत.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीय मोठ्या संख्येने चारचाकी वाहनांसह गावाकडे जातात, पण खराब रस्ते आणि वाहतूक कोंडीमुळे त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. कोकण रेल्वे आता प्रवासी गाड्यांबरोबर हलक्या वाहनांसाठी रो-रो सेवा सुरू करण्याचा विचार करत आहे. यामुळे कोकणवासीयांच्या कार आणि इतर हलकी वाहने रेल्वे मार्गे गावापर्यंत पोहोचवता येतील. कोकण रेल्वेला ट्रकच्या रो-रो आणि मालवाहतूक सेवेतून सर्वाधिक उत्पन्न मिळते. आता हलक्या वाहनांसाठी ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना मोठा फायदा होईल.
मुंबई ते कोकण रस्त्याची स्थिती गेल्या अनेक दशकांपासून सुधारलेली नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी ही मोठी समस्या बनते. रो-रो सेवेमुळे रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होऊन प्रवास सुलभ होईल. मुंबईतील कोकणी व्यक्ती रस्त्यांच्या खराब अवस्थेमुळे रेल्वेला प्राधान्य देतात आणि आता रो-रो सेवेमुळे गाड्या असणाऱ्यांना अधिक सोय मिळेल. कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संतोष कुमार झा यांनी सांगितले की, रो-रो सेवेचा आराखडा पूर्ण झाल्यानंतर किती वाहने वाहून नेली जाऊ शकतील, याबाबत स्पष्टता येईल.
कोकण रेल्वेला प्रवासी सेवेपेक्षा मालवाहतूक आणि रो-रो सेवेतून अधिक उत्पन्न मिळते. हलक्या वाहनांसाठी ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना आणि रेल्वेला दोघांनाही फायदा होईल. ही सेवा विशेषतः सणांच्या काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी बनवेल. रो-रो सेवेमुळे रस्त्यावरील ताण कमी होईल आणि कोकणवासीयांना त्यांच्या गावी जाण्यासाठी एक नवीन, सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावर उद्यापासून २ दिवसांसाठी अवजड वाहनांना बंदी; कारण काय?

   Follow us on        
Mumbai Goa Highway:मुंबई – गोवा महामार्गावर गुरुवारी ०५ जून २०२५ आणि शुक्रवारी ०६ जून २०२५ अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी याबाबत आदेश जारी केले आहेत. शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी राज्यभरातून शिवभक्त मोठ्यासंख्येत रायगडावर येतात. त्यामुळे मुंबई- गोवा माहामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
रायगड जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, येत्या ५ जून २०२५ सायंकाळी ४.०० वाजल्यापासून ते ६ जून रात्री १०.०० वाजेपर्यंत या कालावधीत अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाकणफाटा, नागोठणे ते कशेडीपर्यंत तसेच माणगाव – निजामपूर मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, माणगाव ढालघरफाटा मार्गे पाचाड ते रायगड किल्ला, महाड नातेखिंड मार्गे पाचाड ते रायगड किल्ला या मार्गावर सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांसाठी बंद असणार आहे.

Konkan Railway: पावसाळ्यात मुंबई गोवा वंदेभारत एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढविणे अशक्य – मध्य रेल्वे

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर आठवड्यातून सहा दिवस धावणारी २२२२९/३० मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस पावसाळयात आठवड्यातून तीनच दिवस धावते. तर आठवड्यातून चार दिवस धावणारी ११०९९/१११०० एलटीटी मडगाव एक्सप्रेस पावसाळ्यात दोनच दिवस धावते. जास्त मागणी असणाऱ्या या दोन्ही गाड्यांच्या फेऱ्यांत कपात केल्याने कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना खासकरून खेड, कणकवली, सावंतवाडी, थिवीम इत्यादी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे या गाड्यांच्या फेऱ्यात कपात करू नये अशी विनंती कोकण विकास समितीतर्फे मध्य रेल्वे प्रशासनाला ई-मेल द्वारे दिलेल्या निवेदनात करण्यात आली होती.
 २२२२९/३० मुंबई – मडगाव एक्सप्रेस या गाडीला अतिरिक्त रेक उपलब्ध करून देऊन पावसाळ्यात सुद्धा ही गाडी आठवड्यातून सहा दिवस चालविण्यात यावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती. मात्र हा अतिरिक्त रेक उभा करून ठेवण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याचे मध्य रेल्वेने आपल्या उत्तरात कळविले आहे. (Due to stabling constraints it is not feasible) तर ११०९९/१११०० एलटीटी मडगाव एक्सप्रेस ही गाडी पावसाळ्यात आठवड्यातून चार दिवस चालविणे ही मागणी पूर्ण करणे कोकण रेल्वे च्या कक्षेत येते असे उत्तर देण्यात आले आहे. (Increase is frequency of this train during mansoon, matter pertains to Konkan Railway)
पावसाळ्यात फेऱ्यांत कपात करण्यात येणाऱ्या कोकण रेल्वे मार्गावरील गाड्या 
वेळापत्रक बदलल्या मुळे रेक अभावी काही गाड्यांच्या फेऱ्या कमी कराव्या लागतात. जसे की सकाळी सीएसएमटी वरून सुटणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस चा तोच रेक दुपारी मडगाव वरून सीएसएमटी साठी वापरला जातो. मात्र पावसाळी हंगामात गाड्यांचा वेग धीमा होत असल्याने तोच रेक समान दिवशी वापरता येत नाही. साहजिकच दुसऱ्या दिवशी मडगाव वरून सीएसएमटी साठी  तो रेक वापरला जातो. या कारणामुळे आठवड्यातून ६ दिवस धावणारी  ही गाडी पावसाळी हंगामात फक्त तीनच दिवस चालविण्यात येणार आहे. या कारणाने अजून काही  गाड्यांच्या फेऱ्यात कपात केली जाणार आहे. त्याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
1) 11099/11100 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T) Express
11099 Lokmanya Tilak (T) – Madgaon Jn. Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शुक्रवार आणि रविवार या दोन दिवशी धावणार आहे.
11100 Madgaon Jn. – Lokmanya Tilak (T)  Express
ही गाडी आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त शनिवार आणि सोमवार या दोन दिवशी धावणार आहे.
2) 22119/22120 Mumbai CSMT – Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
22119 Mumbai CSMT – Madgaon Jn. Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त मंगळवार,गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
22120 Madgaon Jn. – Mumbai CSMT Tejas Express
ही गाडी सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस धावते. ती पावसाळी हंगामात दिनांक१०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार फक्त बुधवार ,शुक्रवार, आणि रविवार  या तीनच दिवशी दिवशीच धावणार आहे.
३) 22229 /22230  Mumbai CSMT – Madgaon – Mumbai CSMT Vande Bharat Express
22229 CSMT MADGAON VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीनच दिवशी धावणार आहे.
22230 MADGAON CSMT VANDE BHARAT EXPRESS
ही गाडी आठवड्यातून शुक्रवार वगळता ६ दिवस धावते. मात्र ती पावसाळी हंगामात दिनांक १०/०६/२०२४ ते ३१/१०/२०२४ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या तीनच दिवशी धावणार आहे.

Mumbai to Konkan RoRo Service : मांडवा -माझगाव ते रत्नागिरी -मालवण सागरी मार्गावर गणेशचतुर्थीपूर्वी रो रो सेवा सुरु करणार – मंत्री नितेश राणे

   Follow us on        
रत्नागिरी : राज्यातील रस्ते आणि रेल्वे मार्गासोबतच जलवाहतुकीला प्राधान्य देण्यासाठी लवकरच मांडवा, माझगाव ते रत्नागिरी आणि मालवण सागरी मार्गाद्वारे रो रो सेवा सुरु करण्यात येणार आहे, या निमित्ताने नवा अध्याय राज्यात सुरु होईल, असे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सांगितले.
रत्नागिरीच्या दौ-यावर असताना ते म्हणाले, राज्यात दळणवळण व्यवस्था भक्कम करण्यासाठी रस्ते आणि रेल्वे बरोबर जलवाहतूक वाढावी यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्याचाच भाग म्हणून येत्या गणेशोत्सवापर्यंत मांडवा आणि माजगाव येथून रो रो जलसेवा सुरू करण्यात येणार असल्याचे राणे यांनी सांगितले. या रो रो जलसेवेमुळे रत्नागिरीपर्यंत तीन तासात तर मालवण, विजयदुर्गपर्यंत साडेचार ते पाच तासात पोहोचता येणार आहे.
या रो रो जलसेवेमध्ये जवळपास १०० गाड्या आणि ५०० प्रवासी घेऊन माजगाव येथून सोडणे शक्य होणार आहे. यासाठी लागणारी बोट किंवा क्रूज महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आली आहे. गणेश चतुर्थीच्यापूर्वी हि सेवा सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे नितेश राणे यावेळ पत्रकारांना सांगितले.

०४ जून पंचांग आणि दिनविशेष


आजचे पंचांग 

  • तिथिनवमी- 23:56:35 पर्यंत
  • नक्षत्र-उत्तरा-फाल्गुनी – 27:36:05 पर्यंत
  • करण-बालव – 10:53:56 पर्यंत, कौलव – 23:56:35 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-वज्र – 08:27:57 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 06:00:03
  • सूर्यास्त- 19:13:23
  • चन्द्र-राशि-सिंह – 07:35:47 पर्यंत
  • चंद्रोदय- 13:35:00
  • चंद्रास्त- 25:52:00
  • ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
  • आक्रमकतेचा बळी ठरलेल्या निष्पाप मुलांचा आंतरराष्ट्रीय दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1674 : राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्णतुला झाली. ब्रिटिश वकिलातीच्या मते त्यांचे वजन सुमारे 73 किलो भरले.
  • 1876 : ट्रान्सकॉन्टिनेंटल एक्सप्रेस रेल्वेमार्ग ही युनायटेड स्टेट्सच्या दोन किनार्यांना जोडणारी पहिली प्रवासी ट्रेन होती.
  • 1878 : ऑट्टोमन साम्राज्याने सायप्रस युनायटेड किंगडमला दिले.
  • 1896 : हेन्री फोर्ड यांनी तयार केलेल्या पहिल्या मोटारीचे यशस्वी परीक्षण.
  • 1944 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी रोम जिंकला.
  • 1970 : टोंगाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1979 : घानामध्ये लष्करी उठाव.
  • 1994 : वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराने 8 डावात 7 शतकांचा नवा विक्रम केला.
  • 1994 : गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • 1997 : इन्सॅट-2डी या संपूर्ण भारतीय बनावटीच्या उपग्रहाचे फ्रेंच गयानातील कौरो येथून यशस्वीरित्या प्रक्षेपित करण्यात आला.
  • 2001 : नेपाळचा शेवटचा राजा ज्ञानेंद्र सिंहासनावर बसला.
  • 2010 : स्पेसएक्स फाल्कन 9 रॉकेट पहिले उड्डाण.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1738 : ‘जॉर्ज (तिसरा)’ – इंग्लंडचा राजा यांचा जन्म. (मृत्यू: 29 जानेवारी 1820)
  • 1904 : ‘भगत पुराण सिंह’ – भारतीय प्रकाशक, पर्यावरणवादी यांचा जन्म. (मृत्यू: 5 ऑगस्ट 1992)
  • 1910 : ‘ख्रिस्तोफर कॉकेरेल्म’ – होव्हर्क्राफ्ट चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 1 जुन 1999)
  • 1915 : ‘मालिबो केएटा’ – माली देशाचे पहिले अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 16 मे 1977)
  • 1936 : ‘नूतन बहल’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 21 फेब्रुवारी 1991)
  • 1946 : ‘एस.पी. बालसुब्रह्मण्यम’ – दाक्षिणात्य चित्रपटातील पार्श्वगायक पद्मश्री व पद्मभूषण यांचा जन्म.
  • 1947 : ‘अशोक सराफ’ – विनोदी अभिनेता यांचा जन्म.
  • 1959 : ‘अनिल अंबानी’ – भारतीय उद्योगपती आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरचे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1974 : भारतीय शेफ ‘जॅकब सहाय्या कुमार अरुनी’ यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 2012)
  • 1975 : ‘अँजेलिना जोली’ – अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1990 : ‘जेत्सुनपेमा वांग्चुक’ – भूतानची राणी यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1918 : ‘गोविंद वासुदेव कानिटकर’ – मराठी साहित्यिक यांचे निधन.
  • 1947 : ‘पंडित धर्मानंद कोसंबी’ – बौद्ध धर्माचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म: 9 ऑक्टोबर 1876)
  • 1962 : ‘चार्ल्स विल्यम बीब’ – अमेरिकन निसर्गतज्ज्ञ यांचे निधन.
  • 1998 : ‘डॉ.अश्विन दासगुप्ता’ – इतिहासतज्ज्ञ यांचे निधन.
  • 1998 : ‘गोविंद वासुदेव कानिटकर’ – मराठी साहित्यिक यांचे निधन.
  • 2020 : ‘बासु चटर्जी’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचे निधन. (जन्म: 10 जानेवारी 1930)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

 

“संगमेश्वर स्थानकावर तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा” | शिष्टमंडळाने घेतली खासदार नारायण राणे यांची भेट.

   Follow us on        
संगमेश्वर | रुपेश मनोहर कदम/ सायले:  निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या पुढाकाराने संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकात मडगाव, जामनगर, पोरबंदर या तीन एक्स्प्रेसना थांबा मिळावा यासाठी गेल्या दीड वर्षापासून स्थानिक लोकप्रतिनिधीं, सर्व सामान्य जनतेला सोबत घेऊन निवेदन, आंदोलन, उपोषण,असे  मार्ग अवलंबले.
कोकण रेल्वेच्या रत्नागिरी, बेलापूर येथील कार्यालयात निवेदन दिली. प्रत्यक्षात संघटनेचे शिष्टमंडळ चर्चेसाठी को.रे. च्या मुख्य अधिकाऱ्यांना भेटले. भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या संगमेश्वर रोड स्थानकावर अन्याय का? ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करुन थांबा मिळावा म्हणून वारंवार विनंती करण्यात आली परंतु नेहमी केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे बोट दाखवत त्यांच्याकडून मंजुरी मिळण्यास उशीर होत असल्याचे कोकण रेल्वेकडून वारंवार सांगण्यात येते होते.
अखेर हा विषय मांडण्यासाठी खासदार नारायण राणे यांची दिनांक २८ मे २०२५ रोजी मुंबई येथे शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी संघटनेतर्फे श्री. दीपक पवार, श्री. संतोष पाटणे, श्री. मुकुंद सनगरे व श्री अशोक मुंडेकर हे उपस्थित होते. आपण आठवड्यात दिल्ली येथे रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन मंजुरीचा मार्ग मोकळा करुन देण्याचे वचन नारायण राणे यांनी या भेटी दरम्यान शिष्टमंडळाला दिले असल्याने आता तीन गाड्यांच्या थांब्याच्या मागणीची प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर या संघटनेने सांगितले आहे.
आता लवकरच आपल्या मागण्या मान्य होणार! संगमेश्वर येथील रेल्वे प्रवाशांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार. असा विश्वास निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी व्यक्त केला आहे.

Sindhudurg: शिवापूरच्या कन्येने पटकावले ”चल भावा सिटीत” शोचे विजेतेपद

   Follow us on        

मुंबई:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील शिवापूर गावची सुकन्या कु श्रृती शामसुंदर राऊळ हिला झी मराठी च्या “चल भावा सिटीत “या रिअॅलिटी शोमध्ये अंतिम सोहळ्यात विजेतेपद मिळविले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऋषिकेश चव्हाण या तिच्या सहकाऱ्यासह तिने हे यश मिळवले आहे. या यशने कुमारी श्रुतीने शिवापूर च्या इतिहासात कला क्षेत्रात मानाचा तुरा खोवला आहे.
“चल भावा सिटीत” या रिअॅलिटी शोमध्ये गेली तीन महिने श्रृती शामसुंदर राऊळ ही यशस्वी टास्क करत होती. अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या होत्या. श्रृती राऊळ ने चल भावा सिटीत” या कार्यक्रमात अभिनेता श्रेयश तळपदे यांच्या अनेक कठीण परीक्षा तिने यशस्वी केल्या. यात तिला वडील शामसुंदर राऊळ, आई लता राऊळ यांचे मार्गदर्शन लाभले. श्रृती च्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे. श्रृती हिने या पूर्वी गोवा सुंदरी विजेती ठरली होती.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search