Konkan Railway News:बयाणा येथे होणाऱ्या प्री-नॉनइंटरलॉक,नॉनइंटरलॉक कार्यसाठी मध्य रेल्वेने एक विशेष ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक साठी या मार्गावरून जाणाऱ्या अनेक गाड्या रद्द केल्या गेल्या आहेत. या ब्लॉकमुळे कोंकणरेल्वे मार्गावरील खालील दर्शवलेल्या गाड्या दिलेल्या दिवशी रद्द करण्यात आलेल्या आहेत.
रत्नागिरी: रत्नागिरी, राजापूर तालुक्यातील ८ कातळशिल्प राज्य संरक्षित करण्याचा अंतिम प्रस्ताव पुरातत्व विभागाने शासनाकडे पाठविला आहे. विशेष म्हणजे अंतिम अधिसूचनेसाठीचा हा प्रस्ताव आहे. अंतिम अधिसूचना काढल्यानंतर आठह कातळ शिल्पे राज्य संरक्षित होणार आहे.
खाली नमूद केलेली कातळशिल्पे संरक्षित करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.
भगवतीनगर,
चवे,
देवीहसोळ,
कापडगाव,
उक्षी,
कशेळी,
वाढारूणदे,
बारसू या रत्नागिरी राजापूर तालुक्यातील आठ गावांचा समावेश आहे.
ही शिल्प एका विशिष्ठ जागेत न आढळता समुद्र किनार्यालगत सुमारे ३०० कि.मी. अंतरावर विविध ठिकाणी आढळून येतात. कोकणातील या कातळशिल्पावर अश्मयुगी संस्कृती रूजली होती, असा अनुभव कातळशिल्पांचा शोध घेणार्या सुधीर रिसबूड, धनंजय मराठे यांना आला. जिल्ह्यात आजवर ५२ गावसड्यावर १ हजार २०० पेक्षा अधिक कातळशिल्पांचा शोध लागला आहे. काही शिल्पांच्या भोवती गूढकथा परंपरा दिसतात. या कातळशिल्पांना पर्यटनाची जोड दिल्यास संरक्षण आणि जतन होवू शकते. म्हणून सुधीर रिसबूड, त्यांच्या सहकार्यांनी अनेक प्रयत्न केले आहेत. त्याला काही प्रमाणात यश आले आहे.
संगमेश्वर: मूचरी ता.संगमेश्वर येथे मुचरी ते घोटलवाडी या रस्त्याच्या बाजूस मादी बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला असून २ ते ३ वर्षे अंदाजे वय असलेल्या या बिबट्याचा मृत्यू ४ दिवसांपूर्वी झाला असावा, असा अंदाज आहे. याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास परिक्षेत्र वनअधिकारी रत्नागिरी श्री.प्रकाश सुतार करत आहेत. वाहनाच्या धडकेत या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे
मूचरी ता.संगमेश्वर येथे मुचरी ते घोटलवाडी या रस्त्याच्या बाजूस बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचे स्थानिक ग्रामस्थ श्री.सुर्वे व पोलिस पाटील यांनी कळविल्या नंतर परिक्षेत्र वन अधिकारी यांनी त्यांचे अधिनस्त कर्मचारी यांच्यासमवेत घटनास्थळी समक्ष पाहणी केली. त्यावेळी सदर बिबट्या मृत अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले व ती मादी आहे.
या बिबट्याचा मृत्यू ४ दिवसा पूर्वी झाला असावा. बिबट्याचा मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत झाला असावा असा अंदाज आहे
Konkan Railway News:प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन फेब्रुवारी अखेरपर्यंत चालविण्यात आलेल्या नागपूर ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या Nagpur – Madgaon Jn – Nagpur Special (Bi-Weekly) 01139/01140 या विशेष रेल्वे गाडीला जुलै -२०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
नियमित वेळापत्रक
01139/Nagpur – Madgaon Bi-weekly Special आठवड्यातून दर बुधवार आणि शनिवारी धावणारी हि गाडी २५/०२/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती ती ०७ जून २०२३ पर्यंत नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे.
01140/Madgaon – Nagpur Bi-weekly Special आठवड्यातून दर शुक्रवार आणि रविवारी धावणारी हि गाडी २६/०२/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती ती ०८ जून २०२३ पर्यंत नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे.
पावसाळी वेळापत्रक
या गाड्या १० जून २०२३ ते ०२ जुलै २०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार चालविण्यात येणार आहेत.
01139/Nagpur – Madgaon Bi-weekly Special ही गाडी १० जून २०२३ ते ०१ जुलै २०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार गाडी नागपूर स्थानकावरून दुपारी १५:०५ ला निघेल ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १७:४५ ला मडगाव स्थानकावर पोहोचेल.
01140/Madgaon – Nagpur Bi-weekly Special ही गाडी ११ जून २०२३ ते ०२ जुलै २०२३ पर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार हि गाडी मडगाव स्थानकावरून संध्याकाळी १९:०० वाजता निघेल ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:३० वाजता नागपूर स्थानकावर पोहोचेल.
नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा, पुलगाव, धामणगाव बडनेरा, अकोला मलकापूर, शेंगाव, भुसावळ, नाशिक, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, कणकवली, कुडाळ, थिवीम तसेच करमाळी या स्थानकांवर थांबणार आहे.
या गाडीला 2 Tier AC – 01, 3 Tier AC – 04, Sleeper – 11, General – 04, SLR-02 असे एकूण 22 डबे असणार आहेत.
अधिक माहितीसाठी या संकेतस्थळास भेट द्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनतर्फे करण्यात आलेले आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
सिंधुदुर्ग | कणकवली शहरात गुरुवारी दहावीत शिकणाऱ्या दोन अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. या मुलींचे अपहरण झाले अशी त्यांच्या पालकांची तक्रार आहे. तशी तक्रार त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त की, दोन अल्पवयीन मुली गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याचा सुमारास विद्यामंदिर येथे गेल्या होत्या. तेथून आपण रिक्षाने भालचंद्र महाराज यांच्या मठाजवळ जावून नंतर त्यांच्या एका मैत्रीणकडे जाणार असल्याचे त्यांनी घरी सांगितले होते. मात्र, रात्री दोघीही घरी न परतल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घ्यायला सुरुवात केली मात्र त्या दोघी कुठे सापडल्या नाहीत. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात जावून कोणीतरी अज्ञात इसमाने त्या दोघींचे अपहरण केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात भादंवी कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.
जिल्हय़ात मुलांचे अपहरणकर्त्यांची टोळी सक्रिय?
चार दिवसांपूर्वी याच तालुक्यातील सावडाव येथे सहा शाळकरी मुलांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. तसेच जिल्ह्याच्या ईतर भागातून पण या बाबतच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुलांचे अपहरण करणारी टोळी सक्रिय असल्याची भीती आता नागरिकां मध्ये निर्माण होत आहे.
KONKAN RAILWAY NEWS : कोंकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या मार्गावर विशेष गाडी म्हणून चालविण्यात येणाऱ्या एका गाडीचा जून -२०२३ पर्यंत विस्तार करण्यात आला आहे. ही गाडी या आधीच्या वेळापत्रकानुसार, स्थानकानुसार आणि डब्यांच्या संरचनेप्रमाणे चालविण्यात येणार आहे.
02198 Jabalpur Jn. – Coimbatore Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर शुक्रवारी धावणारी हि गाडी ३१/०३/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०२ जून २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
02197 – Coimbatore Jn. – Jabalpur Jn. Weekly Superfast Festival Special
आठवड्यातून दर सोमवारी धावणारी हि गाडी ०३/०४/२०२३ पर्यंत चालविण्यात येणार होती तिची सेवा ०५ जुन २०२३ पर्यंत विस्तारित केली गेली आहे.
Breaking News :केंद्रीय निवडणूक आयोगाने आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला मोठा धक्का दिला. शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वातील पक्षाला देण्यात आले आहे.
निवडणूक आयोगाने ज्या बहुमतावर शिंदे हेच खरे शिवसेनेचे नेते आणि त्यांच्याच गटाला धनुष्यबाण दिले आहे ती आकडेवारी पुढीलप्रमाणे
सिंधुदुर्ग | मध्य रेल्वे आणि कोंकण रेल्वे जोडणारा प्रस्तावित कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग मागील दहा वर्षांपासून रखडला आहे. या प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाची मान्यता प्राप्त झाली असून त्याचा समावेश 2011-12 च्या रेल्वे अर्थसंकल्पात करण्यात आला होता. कोकण रेल्वे मंडळाने या प्रकल्पाचे सविस्तर सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवालही सादर केला होता. प्रस्तावित सर्वेक्षणानुसार कोल्हापूर-वैभववाडी हा मार्ग व्यवहार्य असल्याची नोंद आहे. मात्र त्यावर अद्याप कोणतेही काम झालेले नाही. हा रेल्वे मार्ग झाल्यास हा 107 किलोमीटरचा रेल्वे मार्ग वैभववाडी उंबर्डे, उपळे, गगन बावडा आदी भागातून जाणार आहे.
काय आहेत अडथळे?
या मार्गाचे काम कठीण असले तरी कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या माध्यमातून करण्यास वेळ लागणार नाही. कारण असे कठीण कामे कोकण रेल्वे मंडळाने या आधी केली आहेत. पण हा प्रकल्प कोकण रेल्वेकडे न देता मध्य रेल्वेमार्फत पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे निधीचा. या मार्गास रेल्वे मंत्रालयाकडून तसेच राज्य शासनाकडून निधी मंजूर होत नाही आहे.२०१७ च्या प्रस्तावानुसार या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ३४३८.४९ कोटी एवढा आहे. प्रकल्पाच्या एकूण खर्चापैकी ५० टक्के निधी रेल्वे मंत्रालय आणि उर्वरित महाराष्ट्र सरकार देणार आहे. २०१६ च्या अर्थसंकल्पातील २५० कोटीची तरतूद वगळता अजूनपर्यंत कोणतीही तरतूद त्या पुढच्या अर्थसंकल्पात केली गेली नाही आहे. निधीअभावी फक्त सर्वेक्षण वगळता कोणतेही काम चालू झाले नाही आहे. या मार्गाकरिता 683 हेक्टर भूसंपादन गरजेचे आहे, पण अजूनपर्यंत काहीच भूसंपादन झाले नाही आहे. २०१८ साली तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी कामास गती देण्याचा प्रयत्न केला गेला होता. २०२२ पर्यंत हा रेल्वेमार्ग पूर्ण होईल असे जाहीर करण्यात आले होते. पण त्यानंतर काहीच प्रगती झाली नाही. मिळाल्या फक्त पुढच्या तारखा!
कोल्हापूर आणि कोकणातील उद्योग, व्यापार वाढीच्यादृष्टीने हा रेल्वेमार्ग उपयुक्त आहे. 107 किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग वैभववाडी उंबर्डे, उपळे, गगन बावडा आदी भागातून जाणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील अतिशय मागास म्हणून ओळख असलेल्या या तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. कोल्हापुरातील शेती व इतर पूरक उत्पादने बाय रोड पाठवायची ठरवल्यास प्रचंड पैसा आणि वेळ खर्च करावा लागतो. येथील कंटेनरना न्हावाशेवा बंदरामध्ये चार-चार दिवस प्रतीक्षा करावी लागते. त्याचे भाडे भरावे लागते. मात्र हाच माल जयगडच्या बंदरापर्यंत रेल्वेने पोहचवला तर तो लवकर पाठवता येऊ शकेल. त्याचबरोबर या बंदराचा दुहेरी फायदाही होऊ शकतो. या बंदरावर कोळशाची वाहतूक मोठ्या प्रमाणावर आहे. कोल्हापूर परिसरातील साखर कारखान्यांच्या को-जनरेशन प्लँटमध्ये १५ टक्के कोळसा वापरता येऊ शकतो. तसेच येथील इंडस्ट्रिजसाठीही हा कोळसा मिळू शकेल. सध्या कोल्हापुरात आणण्यात येणारा कोळसा ट्रक वाहतुकीने कारखान्यांपर्यंत आणणे प्रचंड खर्चिक आहे. रेल्वेचा हा नवीन मार्ग सुरु झाल्यास आयात व निर्यात व्यवसायासाठी मोठा फायदा होऊ शकतो. कमी खर्चामध्ये ही वाहतूक होऊ शकते.
सिंधुदुर्ग |आकेरीतील श्री देव रामेश्वर देवस्थानाचा प्रसिद्ध वार्षिक रथोत्सव रविवारी १९ फेब्रुवारीरोजी संपन्न होत आहे. तसेच १८ फेब्रुवारीला महाशिवरात्र उत्सव साजरा होणार आहे. या निम्मिताने मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
१८ फेब्रुवारी
पहाटेपासून अभिषेक,दर्शन, नवस बोलणे/फेडणे,
रात्री भजन गायनाचा कार्यक्रम
पालखी मिरवणूक
आड दशावतार
भजनाचे कार्यक्रम
१९ फेब्रुवारी
पहाटेपासून अभिषेक,दर्शन.
सायंकाळी गायनाचा कार्यक्रम
रात्री पूर्ण, पालखी आणि श्रींची सवाद्य भव्य मिरवणूक
दशावतार नाट्यप्रयोग
भाविकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.
रत्नागिरी | उजाला पावडरच्या जाहिरातीबाबत माहिती देण्यासाठी आलेल्या दोन तरुणांनी सोन्याचे दागिने साफ करुन देतो सांगत दागिने लंपास केल्याची घटना गोळप विवेकानंद येथे घडली. याप्रकरणी अज्ञात दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद शोभा श्रीकांत पाटील (57, गोळप विवेकानंदनगर, गारवा घर नं. १३१९ रत्नागिरी) यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात दिली.
नक्की काय घडले? पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शोभा पाटील यांच्या घरी दोन अनोळखी तरुण आले. त्यांनी उजाला पावडरचे जाहिरातीबाबत माहिती दिली. त्यानंतर सोन्याचे दागिने साफ करुन देतो असे सांगितले. शोभा यांनी दागिने दिल्यानंतर त्यांनी गॅसवरील कुकरमध्ये साफ करण्यासाठी टाकले आहेत असे भासवले. शोभा या दागिने पाहण्यासाठी गेल्या असता दोघे तरुण दागिने घेऊन फरार झाले. कुकरमध्ये दागिने सापडलेच नाहीत. आपली फसवणूक झाल्याची लक्षात येताच पूर्णगड पोलीस ठाण्यात याबाबतची फिर्याद दिली. पोलिसांनी दोन अज्ञातावर भादविकलम 419, 420, 34 गुन्हा दाखल केला आहे.