मुंबई :गणेशोत्सव हा सण समस्त कोकणकरांचा महत्वाचा सण आहे. ह्या उत्सवास मुंबई-पुण्यातून अगणित भक्त कोकणातील आपल्या गावी जातात .गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा म्हणून सरकार तसेच पक्ष प्रयत्नशील आहे.पक्षातर्फे ३०० पेक्षा अधिक बसेस ह्या मार्गावर सोडण्यात आल्या आहेत, त्यासोबत मोदी एक्सप्रेस हि सोडण्यात आली आहे. सरकारतर्फे ST बसेस च्या ज्यादा फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत तसेच रेल्वे मार्फत पण अनेक विशेष फेऱ्या सोडण्यात आलेल्या आहेत असे आज देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर बोलताना म्हणाले.
स्वतः रवींद्र चव्हाण यांनी मुंबई गोवा महामार्गावर उतरून ह्या मार्गावरील खड्डे बुजवण्याचे आणि हा रस्ता प्रवासासाठी सुखकर करण्याचे निर्देश दिले आहेत. ह्या महामार्गाचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही पुढील वर्षी पाठपुरावा करून नक्की सोडवू असे ते पुढे म्हणाले आहे.