Author Archives: Kokanai Digital

१ मार्च पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-द्वितीया – 24:11:48 पर्यंत
  • नक्षत्र-पूर्वाभाद्रपद – 11:23:23 पर्यंत
  • करण-बालव – 13:45:51 पर्यंत, कौलव – 24:11:48 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-साघ्य – 16:24:18 पर्यंत
  • वार- शनिवार
  • सूर्योदय- 06:00
  • सूर्यास्त- 18:42
  • चन्द्र-राशि-मीन
  • चंद्रोदय- 07:48:59
  • चंद्रास्त- 20:11:59
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • जागतिक समुद्री गवत दिन
  • शून्य भेदभाव दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1803: ओहायो अमेरिकेचे 17 वे राज्य बनले.
  • 1872: जगातील पहिले राष्ट्रीय उद्यान, यलोस्टोन राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.
  • 1873: ई. रेमिंग्टन अँड सन्स कंपनीने पहिल्या व्यावहारिक टाइपरायटरचे उत्पादन सुरू केले.
  • 1893: अभियंते निकोला टेस्ला यांनी पहिल्या रेडिओ चे प्रात्यक्षिक दाखवले.
  • 1896: हेन्री बेकरेल यांनी किरणोत्सर्गी कण शोधले.
  • 1901: ऑस्ट्रेलियन सैन्याची स्थापना झाली.
  • 1907: टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना झाली.
  • 1936: अमेरिकेतील महाकाय हूवर धरण पूर्ण झाले.
  • 1946: बँक ऑफ इंग्लंडचे राष्ट्रीयीकरण झाले.
  • 1947: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपले कामकाज सुरू केले.
  • 1948: गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना.
  • 2002: हबल स्पेस टेलिस्कोपची सेवा देण्यासाठी एसटीएस-109 वर स्पेस शटल कोलंबिया लाँच करण्यात आले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1683: ‘सांग्यांग ग्यात्सो’ – 6वे दलाई लामा (मृत्यू : 15 नोव्हेंबर 1706)
  • 1922: ‘डॉ. नारायण विष्णू धर्माधिकारी’ – महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे यांचा जन्म.
  • 1922: ‘यित्झॅक राबिन’ – नोबेल पारितोषिक विजेते इस्त्रायलचे 5 वे पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू: 4 नोव्हेंबर 1995)
  • 1930: ‘राम प्रसाद गोएंका’ – उद्योगपती यांचा जन्म. (मृत्यू: 14 एप्रिल 2013)
  • 1944: ‘बुद्धदेव भट्टाचार्य’ – पश्चिम बंगाल चे 7वे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1951: ‘नितीश कुमार’ – भारतीय राजकारणी आणि बिहारचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1955: ‘एस. डी. शिबुलाल’ – इन्फोसिस टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक यांचा जन्म.
  • 1968: ‘सलील अंकोला’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1914: ‘गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड’ – भारताचे 36वे गव्हर्नर-जनरल यांचे निधन. (जन्म: 9 जून 1845)
  • 1989: ‘वसंतदादा पाटील’ – महाराष्ट्राचे 5वे आणि 9वे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 13 नोव्हेंबर 1917)
  • 1999: ‘पंडित दत्तात्रयशास्त्री धुंडिराज कवीश्वर’ – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित यांचे निधन. (जन्म: 13 फेब्रुवारी 1910)
  • 2003: ‘गौरी देशपांडे’ – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री यांचे निधन. (जन्म: 11 फेब्रुवारी 1942)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway | होळी आणि उन्हाळी हंगामासाठी पाश्चिम रेल्वेच्या विशेष गाडीची घोषणा; एकूण ७० फेर्‍या

   Follow us on        
Konkan Railway News: या वर्षी होळीला आणि उन्हाळी सुट्टीत कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. या वर्षी उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पाश्चिम रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक विशेष द्वि-साप्ताहिक गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही  द्वि-साप्ताहिक स्पेशल ही गाडी उधना जंक्शन येथून दिनांक  ०२/०३/२०२५  ते २९/०६/२०२५ पर्यंत दर बुधवारी आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल आणि मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ७.४५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण ३५ फेर्‍या होणार आहेत.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल  ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून दिनांक  ०३/०३/२०२५  ते ३०/०६/२०२५ पर्यंत गुरुवारी आणि सोमवारी रात्री १०.१० वाजता मंगळुरु जं. येथून निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३:०५ वाजता पोहोचेल. या गाडीच्या एकूण ३५ फेर्‍या होणार आहेत.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
डब्यांची रचना : एकूण २२ आयसिएफ कोच = टू टियर एसी –  ०१ कोच, थ्री टियर एसी – ०५ कोच, स्लीपर – १२ कोच, जनरल – ०२ कोच,  एसएलआर – ०२.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

२८ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-प्रथम – 27:18:47 पर्यंत
  • नक्षत्र-शतभिष – 13:41:12 पर्यंत
  • करण-किन्स्तुघ्ना – 16:49:30 पर्यंत, भाव – 27:18:47 पर्यंत
  • पक्ष- शुक्ल
  • योग-सिद्ध – 20:07:11 पर्यंत
  • वार- शुक्रवार
  • सूर्योदय- 07:01
  • सूर्यास्त- 18:42
  • चन्द्र-राशि-कुंभ – 29:58:41 पर्यंत
  • चंद्रोदय- 07:09:00
  • चंद्रास्त- 19:11:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • राष्ट्रीय विज्ञान दिन
  • रेअर डिसीज डे (28 किंवा 29 फेब्रुवारी)
महत्त्वाच्या घटना :
  • 1922: इजिप्तला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1928: डॉ. सी. व्ही. रमन यांच्या भौतिकशास्त्रातील शोधाला रमन इफेक्ट असे नाव देण्यात आले. हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो.
  • 1935: शास्त्रज्ञ वॉलेस कॅरोथर्स यांनी नायलॉनचा शोध लावला.
  • 1940: बास्केटबॉल पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर प्रसारित झाला.
  • 1959: डिस्कव्हरर 1, एक अमेरिकन गुप्तचर उपग्रह जो ध्रुवीय कक्षेत पोहोचण्याचा पहिला उद्देश होता, त्याचे प्रक्षेपण करण्यात आले परंतु कक्षा गाठण्यात अपयश आले.
  • 1990: एसटीएस-36 वर स्पेस शटल अटलांटिसचे प्रक्षेपण झाले.
  • 2024: भारताचे पंतप्रधान मोदी यांनी भारतातील दुसऱ्या अंतराळ स्पेसपोर्टचे ‘कुलशेखरपट्टिनम’ उद्घाटन केले.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1873: ‘सर जॉन सायमन’ – सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 11 जानेवारी 1954)
  • 1897: ‘डॉ. शंकर दामोदर पेंडसे’ – मराठी ग्रंथकार यांचा जन्म. (मृत्यू: 23 ऑगस्ट 1974)
  • 1901: ‘लिनस कार्ल पॉलिंग’ – रसायनशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 19 ऑगस्ट 1994)
  • 1927: ‘कृष्णकांत’ – भारताचे 10 वे उपराष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: 27 जुलै 2002)
  • 1929: ‘रंगास्वामी श्रीनिवासन’ – भारतीय-अमेरिकन संशोधन यांचा जन्म.
  • 1942: ‘ब्रायन जोन्स’ – द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 3 जुलै 1969)
  • 1944: ‘रवींद्र जैन’ – पद्मश्री पुरस्कार प्राप्त, भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 9 ऑक्टोबर 2015)
  • 1947: ‘दिग्विजय सिंग’ – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1948: ‘बिनेंश्वर ब्रह्मा’ – भारतीय कवी, लेखक, आणि शिक्षक यांचा जन्म. (मृत्यू : 19 ऑगस्ट 2000)
  • 1948: ‘विदुषी पद्मा तळवलकर’ – ग्वाल्हेर-किराणा-जयपूर घराण्याच्या ख्याल गायिका यांचा जन्म.
  • 1951: ‘करसन घावरी’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1572: ‘उदयसिंग II’ – मेवाड देशाचे राजा यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1522)
  • 1926: ‘गोविंद त्र्यंबक दरेकर’ – स्वातंत्र्यशाहीर यांचे निधन. (जन्म: 9 फेब्रुवारी 1874)
  • 1936: ‘कमला नेहरू’ – पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी यांचे निधन. (जन्म: 1 ऑगस्ट 1899)
  • 1963: ‘डॉ. राजेन्द्र प्रसाद’ – भारताचे पहिले राष्ट्रपती यांचे निधन. (जन्म: 3 डिसेंबर 1884)
  • 1966: ‘उदयशंकर भट्ट’ – आधुनिक हिंदी नाटककार, एकांकिकाकार, कवी आणि कादंबरीकार यांचे निधन. (जन्म: 3 ऑगस्ट 1898)
  • 1967: ‘हेन्री लूस’ – टाईम मॅगझिन चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म: 3 एप्रिल 1898)
  • 1995: ‘कॄष्ण गंगाधर दिक्षीत’ – कथा, संवाद व गीतलेखक यांचे निधन. (जन्म: 12 एप्रिल 1914)
  • 1998: ‘राजा गोसावी’ – अभिनेता यांचे निधन. (जन्म: 28 मार्च 1925)
  • 1999: ‘भगवंतराव श्रीपतराव पंतप्रतिनिधी’ – औध संस्थानचे राजे यांचे निधन.


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: होळीसाठी कोकणरेल्वे मार्गावर अजून एका गाडीची घोषणा

   Follow us on        
Konkan  Railway: होळीसाठी कोकणात जाणाऱ्या  प्रवाशांसाठी खुशखबर आहे. होळी सण २०२५ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेच्या समन्वयाने अजून एक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचा तपशील खालीलप्रमाणे आहे,
गाडी क्र. ०१०६३/०१०६४ लोकमान्य टिळक (टी) – तिरुवनंतपुरम उत्तर लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष: 
गाडी क्र. ०१०६३ लोकमान्य टिळक (टी) – तिरुअनंतपुरम उत्तर वीकली विशेष ही विशेष गाडी लोकमान्य टिळक (टी) येथून गुरुवार दिनांक  ०६/०३/२०२५ आणि १३/०३/२०२५ रोजी १६;०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २२:४५ वाजता तिरुअनंतपुरम उत्तरला पोहोचेल.
गाडी क्र. ०१०६४ तिरुवनंतपुरम उत्तर – लोकमान्य टिळक (टी) साप्ताहिक विशेष ही विशेष गाडी  तिरुअनंतपुरम उत्तर येथून शनिवार, दिनांक ०८/०३/२०२५ आणि १५/०३/२०२५ रोजी १६:२० वाजता सुटेल आणि  लोकमान्य टिळक (टी) येथे तिसऱ्या दिवशी ००:४५  वाजता पोहोचेल.
ही गाडी ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी , थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमठा, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका, सुरेंद्र रोड, सुरेंद्र रोड, उंबरनाथ रोड मंगळुरू जं, कासरगोड, कन्नूर, कालिकत, तिरूर, शोरानूर जं., त्रिसूर, एर्नाकुलम टाउन, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, मावेलीकारा, कायनकुलम आणि कोल्लम जं. या स्थानकावर थांबणार आहे.
डब्यांची रचना: एकूण 22 एलएचबी कोच: टू टायर एसी –  ०१ कोच, थ्री टायर एसी – ०६ कोच, स्लीपर – ०९  कोच, जनरल – ०४ कोच, जनरेटर कार – ०१, एसएलआर – ०१
प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.




Traffic block at CSMT: कोकण रेल्वेमार्गावर धावणार्‍या १० गाड्यांवर परिणाम होणार

   Follow us on        

Megablock on Central Railway: मुंबई सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या कामासाठी मध्यरेल्वे या स्थानकावर या आठवड्यात एक ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे या स्थानकावरून सुटणार्‍या काही गाड्यांच्या आरंभ आणि अंतिम स्थानकांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आला आहे. यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या गाड्यांचा समावेश असून याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे.

आरंभ स्थानकांमध्ये बदल करण्यात आलेल्या गाड्या

दिनांक ०१ मार्च रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक २०१११ सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल या स्थानकावरून या स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु जाणार आहे.

दिनांक ०२ मार्च रोजी सुटणारी गाडी क्रमांक १२०५१ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२२२९ मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस, गाडी क्रमांक २२११९ मुंबई मडगाव तेजस एक्सप्रेस या गाड्या दादरवरून या स्थानकावरील नियोजित वेळेत आपला प्रवास सुरु करणार आहेत. तर गाडी क्रमांक १०१०३ सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्सप्रेस ही गाडी आपला प्रवास पनवेल स्थानकावरून पनवेल स्थानकावरील नियोजित वेळेत सुरु करणार आहे.

 

अंतिम स्थानकांत बदल करण्यात आलेल्या गाड्या

गाडी क्रमांक २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२०५२ मुंबई मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांचा प्रवास दिनांक २६ फेब्रुवारी ते ०१ मार्च दरम्यान दादरला तर  गाडी क्रमांक १२१३४ मंगलोर मुंबई एक्सप्रेस या गाडीचा प्रवास ठाण्याला संपविण्यात येणार आहे.

दिनांक ०१ मार्च रोजी गाडी क्रमांक २०११२ मडगाव -सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस, गाडी क्रमांक १०१०४ मडगाव -सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस-या गाड्यांचा प्रवास पनवेल स्थानकावर संपविण्यात येणार आहे.

२७ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-चतुर्दशी – 08:57:29 पर्यंत, अमावस्या – 30:16:57 पर्यंत
  • नक्षत्र-धनिष्ठा – 15:44:35 पर्यंत
  • करण-शकुन – 08:57:29 पर्यंत, चतुष्पाद – 19:39:59 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-शिव – 23:40:27 पर्यंत
  • वार- गुरूवार
  • सूर्योदय- 07. 01
  • सूर्यास्त- 18:42
  • चन्द्र-राशि-कुंभ
  • चंद्रोदय- चंद्रोदय नाही
  • चंद्रास्त- 18:10:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • मराठी भाषा गौरव दिन
महत्त्वाच्या घटना :
  • 1594: हेन्री चौथा फ्रान्सचा राजा झाला.
  • 1844: डोमिनिकन रिपब्लिकला हैतीपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1900: ब्रिटिश लेबर पार्टीची स्थापना.
  • 1940: मार्टिन कामेन आणि सॅम रुबेन यांनी कार्बन-14 चा शोध लावला.
  • 1967: डॉमिनिकाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
  • 2001: चांदीपूर तळावर जमिनीपासून आकाशापर्यंत अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणाऱ्या स्वदेशी विकसित आकाश क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.
  • 1912: ‘विष्णू वामन शिरवाडकर’ – ‘कुसुमाग्रज’  यांचा जन्म, त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी, 2013 रोजी घेण्यात आला
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1912: ‘विष्णू वामन शिरवाडकर’ – ‘कुसुमाग्रज’ – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी यांचा जन्म(मृत्यू: 10 मार्च 1999)
  • 1925: ‘शोइचिरो टोयोडा’ – टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू : 14 फेब्रुवारी 2023)
  • 1926: ‘ज्योत्स्‍ना देवधर’ – मराठी व हिन्दी लेखिका यांचा जन्म. (मृत्यू: 17 जानेवारी 2013)
  • 1932: ‘एलिझाबेथ टेलर’ – ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू: 23 मार्च 2011)
  • 1986: ‘संदीप सिंग’ – भारतीय हॉकी खेळाडू यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1892: ‘लुई वूत्तोन’ – फॅशन कंपनी लुई वूत्तोन चे डिझायनर यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1821)
  • 1894: ‘कार्ल श्मिट’ – जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 जून 1822)
  • 1987: ‘अदि मर्झबान’ – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक यांचे निधन.
  • 1931: ‘चंद्रशेखर आझाद’ – थोर क्रांतिकारक यांनी प्राण मातृभूमीला अर्पण केले. (जन्म: 23 जुलै 1906)
  • 1956: ‘गणेश वासुदेव मावळणकर’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचे निधन. (जन्म: 27 नोव्हेंबर 1888)
  • 1987: ‘अदि मर्झबान’ – अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार आणि संपादक यांचे निधन.
  • 1997: ‘श्यामलाल बाबू राय’ – गीतकार यांचे निधन.
  • 2010: ‘नानाजी देशमुख’ – भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म: 11 ऑक्टोबर 1916)
  • 2012: ‘वेल्लोर जी. रामभद्रन’ – तामिळनाडू, भारतातील मृदंगम कलाकार यांचे निधन. (जन्म: 4 ऑगस्ट 1929)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

चिपळूण: कुंभार्ली घाटात कारला अपघात होऊन दोघांचा मृत्यू; मोबाईल लोकेशनमुळे दोन दिवसांनी प्रकार उघडकीस

   Follow us on        

चिपळूण : पुणे येथून चिपळूणला येत असताना कुंभार्ली घाटातील काळकडा येथील अवघड वळणावरून कार 500 फूट दरीत कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. ही घटना दोन दिवसांपूर्वी रविवारी रात्री घडली. मात्र मंगळवारी दुपारी मोबाईल लोकेशनमुळे हा अपघात उघडकीस आला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की विश्वजित जगदीश खेडेकर (40) आपल्या मातोश्री सुरेखा जगदीश खेडेकर (70) आणि आपल्या पत्नी समवेत रविवारी चिपळूणला काही कामानिम्मीत निघाले. वाटेत विश्वजितने आपल्या पत्नीला सातारा येथे माहेरी सोडून तो आईला घेऊन चिपळूणकडे निघाला. वाटेत रात्री पाटणजवळ जेवणही केले. विश्वजितच्या पत्नीने या दोघांनाही वारंवार मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र विश्वजितचा मोबाईल बंद होता, तर सासू सुरेखा यांच्या मोबाईलची रिंग वाजत होती. शेवटी त्यांच्या पत्नीने जिथे ते जाणार होते तेथे फोन करून विचारणा केली. मात्र तिकडे कुणी पोहोचले नसल्याचे समजले.

वाटेत काही तरी विपरीत घडले असावे असा संशय त्यांना आला आणि त्यांनी पोलिसांची मदत मागितली. पोलिसानी दोघांचेही मोबाईल लोकेशन तपासले असता ते कुंभार्ली घाटात आढळून आले. त्यानंतर पोलीस, ग्रामस्थांसमवेत घाटात येऊ पाहणी सुरू केली. याचवेळी काळाकडा येथून कार घसरत गेल्याचे दिसून आल्यानंतर शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी 500 फूट दरीत कार सापडली. त्यामध्ये दोघेही मृतावस्थेत आढळले. रात्री क्रेनच्या माध्यमातून दोन्ही मृतदेहांसह कार दरीतून बाहेर काढण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमानेंसह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

तरुण मंडळ उचाट आयोजित ३८ वा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न.

   Follow us on        

वाडा: तरूण मंडळ उचाट आयोजित दिवंगत आधार स्तंभांच्या स्मरणार्थ ३८वा क्रीडा महोत्सव – समाजस्तरीय कबड्डी स्पर्धा २०२५, सर्व पदाधिकारी, सभासद तसेच ग्रामस्थ यांच्या उत्तम आयोजन, नियोजनामुळे यशस्वीपणे पार पडली.

स्पर्धेत सहभागी २२ संघानी आपल्या बहारदार खेळाचे प्रदर्शन करून क्रीडा रसिकांची मने जिंकली. उपांत्य फेरीत वाघजाई कोळकेवाडी संघाने प्रतिस्पर्धी कळकवणे क्रीडा मंडळास पराभुत करून तर केदारनाथ कोयनावेळे संघाने प्रतिस्पर्धी कादवड क्रीडा मंडळास पराभुत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अपेक्षेप्रमाणे अंतिम सामन्यात केदारनाथ संघाने उत्तम बचाव करत मध्यंतरापर्यत ५ गुणांची आघाडी घेत सामन्यात रंगत आणली. दुसऱ्या सत्रात पवन मोरे, ओमकार कदम, निखिल, किरण, विपुल यांच्या बहारदार खेळाने आघाडी १० गुणांनी वाढविण्यात केदारनाथ संघ यशस्वी झाला. वाघजाई कोळकेवाडी संघाच्या आदित्य शिंदे व श्रीपाद कुंभार यांनी यशस्वी सुपर टॅकल करत सामन्यात पुन्हा रंगत आणली पण अंतिम सामन्यात चढाईपटु आपले सर्वोत्तम प्रदर्शन करण्यात कमी पडल्याने वाघजाई संघाला उपविजेपदावर समाधान मानावे लागले तर केदारनाथ संघाने चढाई व सर्वोत्तम बचावाचा जोरावर समाजस्तरीय स्पर्धेतील सलग दुसऱ्या अंतिम विजेतेपदाला गवसणी घातली.

केदारनाथच्या ओमकार कदम सुरेख सुंदर अष्टपैलु खेळाचे प्रदशर्न करीत सर्वोत्तम खेळाडु तर वाघजाईच्या साईराज कुंभार सर्वोत्तम चढाईपटु व प्रोस्टार आदित्य शिंदे सर्वोत्तम पक्कडपटू होण्याचा मान पटकावला. जय भवानी क्रीडा मंडळ टेरव या संघास शिस्तबद्ध संघ म्हणून गौरविण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभास राष्ट्रीय खेळाडू सुशील ब्रीद, रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव शिंदे, ठाणे शहर रा. काँ. (शरद पवार गट) अरविंदराव मोरे, संयोजक कोकण पदवीधर प्रकोष्ठ भाजपा सचिनराव मोरे, दसपटी विभाग क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अरुणराव शिंदे, उचाट शिक्षण संस्था अध्यक्ष प्रभाकरराव मोरे, अशोक बुवा मोरे हे व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

२६ फेब्रुवारी पंचांग आणि दिनविशेष

आजचे पंचांग

  • तिथि-त्रयोदशी – 11:11:31 पर्यंत
  • नक्षत्र-श्रवण – 17:24:25 पर्यंत
  • करण-वणिज – 11:11:31 पर्यंत, विष्टि – 22:08:21 पर्यंत
  • पक्ष- कृष्ण
  • योग-परिघ – 26:57:09 पर्यंत
  • वार- बुधवार
  • सूर्योदय- 07:02
  • सूर्यास्त- 18:41
  • चन्द्र-राशि-मकर – 28:36:00 पर्यंत
  • चंद्रोदय- 30:22:59
  • चंद्रास्त- 16:33:00
  • ऋतु- वसंत

जागतिक दिन :
  • थर्मस बॉटल दिवस
महत्त्वाच्या घटना :
  • 1411: अहमदाबाद स्थापना दिवस
  • 1909: लंडनमधील पॅलेस थिएटरमध्ये सर्वसामान्यांना दाखवण्यात आलेला ‘किनेमाकलर’ हा पहिला यशस्वी रंगीत चित्रपट आहे.
  • 1945: दुसरे महायुद्ध: अमेरिकन सैन्याने जपानी लोकांकडून फिलीपिन्स बेट कोरेगिडोर परत मिळवले.
  • 1966: अपोलो कार्यक्रम: AS-201 चे प्रक्षेपण, सॅटर्न आयबी रॉकेटचे पहिले उड्डाण.
  • 1976: व्ही. एस. खांडेकर यांना त्यांच्या ‘ययाती’ या कादंबरीसाठी मराठीतील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 1984: भारतीय उपग्रह ‘इनसॅट-1-ई’ राष्ट्राला समर्पित करण्यात आला.
  • 1998: परळी-वैजनाथ औष्णिक वीज प्रकल्पाने एकाच दिवसात 14.709 दशलक्ष युनिट वीज निर्मिती करून (भारतात आणि त्यावेळी) वीज निर्मितीचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
  • 1874: ‘सूरसिंह तख्तसिंह गोहिल’ – प्रसिद्ध गुजराथी कवी यांचा जन्म.
  • 1887: ‘बी. एन. राऊ’ – भारतीय नागरी सेवक आणि कायदेतज्ज्ञ यांचा जन्म.
  • 1908: ‘लीला मुजुमदार’ – भारतीय लेखिका यांचा जन्म. (मृत्यू: 5 एप्रिल 2007)
  • 1922: ‘मनमोहन कृष्ण’ – अभिनेता यांचा जन्म.(मृत्यू: 3 नोव्हेंबर 1990)
  • 1937: ‘मनमोहन देसाई’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू: 1 मार्च 1994)
  • 1957: ‘शक्तिकांत दास’ – निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर यांचा जन्म
  • 1994: ‘बजरंग पुनिया’ – भारतीय पुरुष कुस्तीगीर यांचा जन्म
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
  • 1877: ‘मेजर थॉमस कॅन्डी’ – कोशकार व शिक्षणतज्ञ यांचे निधन. (जन्म: 13 डिसेंबर 1804)
  • 1886: ‘नर्मदाशंकर दवे’ – गुजराथी लेखक व समाजसुधारक यांचे निधन. (जन्म: 24 ऑगस्ट 1833)
  • 1887: ‘आनंदी गोपाळ जोशी’ – भारतीय डॉक्टर यांचा जन्म. (जन्म: 15 मार्च 1865)
  • 1903: ‘रिचर्ड जॉर्डन’ – गटलिंगगटलिंग गन चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 12 सप्टेंबर 1818)
  • 1937: ‘एल. के. अनंतकृष्ण अय्यर’ – मानववंशशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 6 जुलै 1862)
  • 1966: ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर’ – यांचे निधन. (जन्म: 28 मे 1883)
  • 1994: ‘एवेरी फिशर’ – फिशर इलेक्ट्रॉनिक्सचे निर्माते यांचे निधन. (जन्म: 4 मार्च 1906)
  • 2003: ‘राम वाईरकर’ – व्यंगचित्रकार यांचे निधन.
  • 2004: ‘शंकरराव चव्हाण’ – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांचे निधन. (जन्म: 14 जुलै 1920)
  • 2005: ‘जेफ रस्किन’ – अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ व मॅकिन्टॉश चे निर्माते यांचे निधन. (जन्म: 9 मार्च 1943)
  • 2010: ‘चंडीकादास अमृतराव देशमुख’ – समाजसुधारक व संघप्रचारक यांचे निधन. (जन्म: 11 ऑक्टोबर 1916)


दररोजच्या अपडेट्स साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Konkan Railway: दिवा स्थानकावरून कोकणरेल्वेच्या गाड्या सोडणे नियमबाह्य़ आणि गैरसोयीचे

   Follow us on        
Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ५०१०३/५०१०४ रत्नागिरी फास्ट पॅसेंजर आणि १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी दिवा एक्सप्रेस या दोन गाड्या दिवा स्थानकावरून सोडण्यात येतात. मात्र कोकण रेल्वे मार्गावर चालविण्यात येणाऱ्या या दोन गाड्यांसाठी सुरवातीचे स्थानक म्हणुन दिवा स्थानक गैरसोयीचे असून नियमबाह्य़ही आहे. या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी या स्थानकांवरून सोडण्यात याव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सेक्रेटरी अक्षय महापदी यांनी केली आहे.

रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन

दिवा स्थानकावर सध्या गाड्यांमध्ये पाणी भरण्याची सोय नाही आहे. रेल्वे बोर्डाने दिनांक १६.०४.२०१० रोजी जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार पुढील प्रवासात गैरसोय टाळण्यासाठी गाडयांना सुरवातीच्याच स्थानकावर पाणी भरणे बंधनकारक केले आहे. असे असताना येथून सुटणाऱ्या या दोन गाड्यामध्ये पाणी पुढील स्थानकावर म्हणजे पनवेल स्थानकावर भरण्यात येते. यावरून विभागीय रेल्वे प्रशासन रेल्वे बोर्डाच्या सुचना पाळत नसल्याचे स्पष्ट होत आहे. या गाड्यांना पनवेल स्थानकावर पाणी भरावे लागत असल्याने पनवेल स्थानकावर नियमित थांब्याच्या कालावधीपेक्षा अधिक कालावधीपर्यंत गाडी थांबवून ठेवावी लागत असल्याने प्रवाशांच्या वेळेचा अपव्यव होतो.
फक्त दोन गाड्यांसाठी दिवा स्थानकावर पाणी भरण्याची व्यवस्था करणे अव्यवहार्य आहे. दिवा परिसरात पाण्याची कमतरता पाहता अशी सोय केली तरी गाड्यांसाठी पाण्याची टंचाई भासू शकते. त्यापेक्षा या गाड्या पुढे दादर, सीएसएमटी नेल्यास त्यांच्यासाठी लागणारे पाणी आणि देखभालीचा प्रश्न राहणार नाही.

प्रवाशांसाठी गैरसोयीचे

मांडवी, जनशताब्दी, वंदे भारत, तेजस, नेत्रावती, मत्स्यगंधा, कोकणकन्या, मडगाव वांद्रे, लोकमान्य टिळक टर्मिनस मडगाव या गाड्या कोकणातील बहुतांश स्थानकांवर थांबत नाहीत. त्या स्थानकांवर केवळ सावंतवाडी एक्सप्रेस आणि रत्नागिरी पॅसेंजर या किंवा यांपैकी कोणतीतरी एकच गाडी थांबते. त्यामुळे या ठिकाणी प्रवास करणार्‍या प्रवाशांना इतर पर्यायच नाही. हे प्रवासी ठाणे, भांडुप, घाटकोपर, मुंबई, बोरिवली, मीरा-भायंदर, वसई  विरार येथील आहेत. या गाड्या दिवा स्थानकापर्यंत मर्यादित असल्याने या गाड्यांचा लाभ घेताना त्यांना खासकरून आबालवृद्धांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागतो त्यामुळे या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी पर्यत विस्तारित केल्यास त्यांचा त्रास बर्‍यापैकी वाचेल.

फलाटाची कमी लांबी

दिवा स्थानकावरील फलाटांची लांबी पुरेशी नसल्याने या गाडयांना अधिक डबे जोडण्यावर मर्यादा येत आहेत. १०१०५/१०१०६ दिवा सावंतवाडी दिवा ही गाडी एलएचबी स्वरूपात चालविण्यात येत असून सध्या ती १६ डब्यांच्या चालविण्यात येत आहे. कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गर्दी पाहता ही गाडी २२ डब्यांची करणे आवश्यक आहे. दिवा स्थानकांवरील कमी लांबीच्या प्लॅटफॉर्ममुळे ते शक्य होणार नाही.

दिवा स्थानकासाठी ५ डबे राखीव असावेत

सध्या या गाड्यादिवा स्थानकावरून सोडण्यात येत असल्याने कल्याण डोंबिवली आणि  दिवा भागातील प्रवाशांना ही गाडी सोयीची आहे. ही गाडी दादर किंवा मुंबई  सीएसएमटी स्थानकापर्यंत विस्तारित झाल्यास येथील प्रवाशांच्या सोयीसाठी किमान ५ जनरल डबे दिवा स्थानकाला राखीव ठेवावे, जेणेकरून या प्रवाशांना प्रवास करणे सोयीचे होईल.
या मुद्द्यांवर श्री.अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून या गाड्या दादर किंवा मुंबई सीएसएमटी स्थानकापर्यंत विस्तारित कराव्यात अशी इमेलद्वारे मागणी केली आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search