Author Archives: Kokanai Digital

दक्षिण मध्य रेल्वेची मराठवाड्याला ३ नवीन एक्सप्रेस गाड्या आणि १ नवीन पॅसेंजर गाडीची भेट

   Follow us on        

Railway Updates: ​मराठवाड्याच्या रेल्वे प्रवाशांसाठी प्रशासनाने आनंदाची बातमी दिली आहे. नांदेड मंडळांतर्गत तीन नवीन साप्ताहिक एक्सप्रेस, एक नवीन डेमू (DEMO) सवारी गाडी आणि एका विद्यमान गाडीच्या विस्ताराची घोषणा करण्यात आली आहे.

​या नवीन गाड्यांची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे:

​१. नांदेड – तिरुचानूर – नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस (१७६३३/३४)

​प्रारंभ: ९ मे पासून प्रत्येक शनिवारी (नांदेडून).

​वेळ: शनिवारी दुपारी १६:४५ वाजता सुटून रविवारी दुपारी १२:२० वाजता तिरुचानूरला पोहोचेल.

​परतीचा प्रवास: १० मे पासून प्रत्येक रविवारी तिरुचानूरहून १९:४५ ला निघून सोमवारी १८:२० वाजता नांदेडला पोहोचेल.

​कोच: १६ कोच (१ AC फर्स्ट, १ AC टू-टियर, ४ AC थ्री-टियर, ६ स्लिपर, ४ जनरल).

​२. जालना – तिरुचानूर – जालना साप्ताहिक एक्सप्रेस (१७६२३/२४)

​प्रारंभ: ११ मे पासून प्रत्येक सोमवारी (जालन्याहून).

​वेळ: सोमवारी सकाळी ७:०० वाजता सुटून मंगळवारी दुपारी १२:०० वाजता तिरुचानूरला पोहोचेल.

​परतीचा प्रवास: १२ मे पासून प्रत्येक मंगळवारी तिरुचानूरहून १५:१५ ला निघून बुधवारी रात्री २१:०० वाजता जालन्याला पोहोचेल.

​कोच: २२ कोच (३ AC टू-टियर, ५ AC थ्री-टियर, १० स्लिपर, ४ जनरल).

३. तिरुपती – पंढरपूर – तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस (१७४३७/३८)

​प्रारंभ: १६ मे पासून प्रत्येक शनिवारी (तिरुपतीहून).

​वेळ: शनिवारी १६:०० वाजता सुटून रविवारी सायंकाळी १९:०० वाजता पंढरपूरला पोहोचेल.

​परतीचा प्रवास: १७ मे पासून प्रत्येक रविवारी रात्री २०:०० वाजता पंढरपूरहून निघून सोमवारी रात्री २३:३० ला तिरुपतीला पोहोचेल.

​प्रमुख थांबे: लातूर, धाराशिव, बार्शी टाउन, कुर्डुवाडी, बीदर.

​४. नवीन डेमू (DEMU) सवारी गाडी (७७६२३/२४)

​मार्ग: पूर्णा – जालना – हुजूर साहिब नांदेड.

​दिनांक: ४ मे पासून पूर्णेहून आणि ५ मे पासून जालन्याहून दररोज धावणार.

​कोच: ८ डबे (द्वितीय श्रेणी).

​५. रायचूर – परभणी गाडीचा जालन्यापर्यंत विस्तार (१७६६३/६४)

​रायचूर – परभणी आणि परभणी – जालना या गाड्यांचे एकत्रीकरण करून आता ही गाडी थेट रायचूर ते जालना दरम्यान चालवली जाईल. ही सेवा ५/६ मे पासून सुरू होत आहे. रायचूर ते परभणी दरम्यानच्या जुन्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ तातडीने सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला

   Follow us on        

लोणावळा:१ मे २०२६ रोजी सलग सुट्ट्यांमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पर्यटकांच्या ओघामुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. रणरणत्या उन्हामुळे एकापाठोपाठ १० ते १२ वाहने नादुरुस्त (ब्रेकडाउन) झाल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. या भीषण कोंडीचा फटका खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह हजारो प्रवाशांना बसला असून, नागरिक तब्बल ३ ते ४ तास एकाच जागी अडकून पडले होते. विशेषतः लोणावळा आणि खोपोली परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

​या गंभीर परिस्थितीची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रवाशांना दिलासा देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला. कोंडीत अडकलेल्या सर्व वाहनांकडून टोल न घेण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. तसेच, या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून बहुप्रतीक्षित ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प (Missing Link Project) तातडीने सार्वजनिक वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

​वास्तविक हा प्रकल्प आज मध्यरात्रीनंतर लोकांसाठी खुला करण्याचे नियोजन होते. मात्र, घाटातील वाढती गर्दी आणि प्रवाशांचे हाल लक्षात घेता, उद्घाटन सोहळा संपताच हा मार्ग तात्काळ सुरू करण्यात आला आहे. या नवीन मार्गामुळे घाटातील प्रवासाचा वेळ वाचणार असून, रखडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या प्रशासनाकडून वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

अखेरपर्यंत सुटली नाही मायेची मिठी; जबलपूर दुर्घटनेत आई-मुलाचा करुण अंत, हृदयद्रावक फोटोने देश हळहळला

   Follow us on        

जबलपूर:निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी निघालेल्या पर्यटकांवर काळाने घाला घातला. ३० एप्रिल रोजी जबलपूरच्या बर्गी धरणात एमपी टुरिझमची क्रूझ बोट उलटून झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत ९ निष्पाप जीवांचा बळी गेला आहे. मात्र, या दुर्घटनेच्या १५ तासांनंतर समोर आलेल्या एका छायाचित्राने संपूर्ण देशाच्या काळजाचा ठोका चुकला आहे. मृत्यू समोर दिसत असतानाही एका आईने आपल्या काळजाच्या तुकड्याला मिठीत घट्ट धरून ठेवल्याचे पाहायला मिळाले.

​नर्मदा नदीच्या संथ पात्रात अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्याने पर्यटकांच्या आनंदाचे रूपांतर किंकाळ्यांमध्ये केले. सुमारे ३० प्रवाशांना घेऊन जाणारी बोट खमरिया बेटाजवळ वादळात सापडली आणि पाहता पाहता उलटली. बचाव पथकाने १५ जणांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले, तर ९ जणांचे मृतदेह हाती लागले. अद्यापही काही जण बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे.

​मरणानेही ज्यांना वेगळे केले नाही…

बचाव कार्यादरम्यान समोर आलेल्या एका दृश्याने उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीचे डोळे पाणावले. पाण्यात तरंगणाऱ्या एका माऊलीने आपल्या लहान मुलाला छातीशी इतके घट्ट धरून ठेवले होते की, मृत्यूनेही त्यांची ती मिठी सोडवली नव्हती. दोघांनीही लाईफ जॅकेट घातले होते, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. “आई” काय असते, हे त्या फोटोने पुन्हा एकदा सिद्ध केले. शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलाला वाचवण्याचा त्या माऊलीचा प्रयत्न आणि ती मायेची ओढ पाहून संपूर्ण सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे.

​प्रशासनाने तातडीने बचाव कार्य राबवले असले तरी, या घटनेने पर्यटनाच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. निसर्गाच्या लहरीपणापुढे मानवी प्रयत्न तोकडे पडले, पण त्या आई-मुलाच्या अमर प्रेमाची कहाणी आता प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. जखमींवर उपचार सुरू असून, बेपत्ता व्यक्ती सुखरूप मिळाव्यात यासाठी प्रार्थना केली जात आहे.

मुंबई: २.२४ लाख फुकट्या प्रवाशांना मध्यरेल्वेचा दणका; एका महिन्यात १६ कोटींचा दंड वसूल

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने एप्रिल २०२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध राबवलेल्या विशेष मोहिमेत ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. या एका महिन्यात रेल्वेने तब्बल २.२४ लाख विनातिकीट प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केली असून, त्यांच्याकडून १६ कोटी रुपयांचा महसूल वसूल केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या दंड वसुलीत १७० टक्क्यांची अवाढव्य वाढ झाली असून, रेल्वे प्रशासनासाठी हा एक मोठा टप्पा (माईलस्टोन) मानला जात आहे.

​मागील वर्षीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, एप्रिल २०२५ मध्ये १.४२ लाख प्रवाशांकडून ५.९२ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला होता. मात्र, यंदा मुंबई विभागातील तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि कठोर नियोजनामुळे ही वसुली १६ कोटींच्या घरात पोहोचली आहे. मुंबईसारख्या प्रचंड गर्दीच्या रेल्वे जाळ्यामध्ये विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने राबवलेली ही मोहीम यशस्वी ठरली असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांना या कारवाईमुळे मोठा दणका बसला आहे. रेल्वे प्रशासनाने या यशाचे श्रेय आपल्या तिकीट तपासणी पथकाच्या अथक परिश्रमाला दिले आहे.

Mumbai Pune Expressway: ‘मिसिंग लिंक’ वरील बोगद्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये स्थान

   Follow us on        

मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित करणाऱ्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. या प्रकल्पातील २३.५ मीटर रुंदीच्या भव्य बोगद्याला ‘जगातील सर्वांत रुंद रस्ता बोगदा’ म्हणून प्रतिष्ठित ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये स्थान मिळाले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हा प्रकल्प साकारला असून, यामुळे देशाच्या पायाभूत सुविधांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

​या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात दोन मुख्य बोगद्यांचा समावेश असून, त्यातील एक ८.९ किलोमीटर तर दुसरा १.७५ किलोमीटर लांबीचा आहे. हे बोगदे खंडाळा घाटातील अवघड वळणे आणि अपघातप्रवण क्षेत्राला पूर्णपणे वळसा (बायपास) घालणार आहेत. यामुळे मुंबई आणि पुणे दरम्यानचे प्रवासाचे अंतर ६ किलोमीटरने कमी होणार असून, प्रवाशांचा सुमारे २० ते ३० मिनिटांचा वेळ वाचणार आहे. ६,६९५ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या या मेगा प्रकल्पात केवळ बोगदेच नव्हे, तर विलोभनीय केबल-स्टेड ब्रिज आणि उंच व्हायाडक्ट्सचाही समावेश आहे.

​महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात येणार आहे. याच सोहळ्यात ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’चे अधिकृत प्रमाणपत्रही प्रदान केले जाईल. या ‘मिसिंग लिंक’मुळे घाटातील वाहतूक कोंडीतून सुटका होणार असून, प्रवाशांना निसर्गरम्य आणि अत्याधुनिक प्रवासाचा अनुभव घेता येईल. सुरक्षितता आणि वेगाचा उत्तम मेळ घालणारा हा प्रकल्प राज्याच्या दळणवळण क्षेत्रात क्रांती घडवणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त युवासेनेतर्फे राज्यभरात ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण! चित्रपटगृहांची यादी ईथे तपासा

   Follow us on        

मुंबई: आज १ मे, महाराष्ट्र दिनाचा उत्साह संपूर्ण राज्यात ओसंडून वाहणार आहे. या मंगल दिनाचे औचित्य साधून युवासेनेच्या (शिंदे गट) वतीने महाराष्ट्रातील जनतेसाठी एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवछत्रपतींचा दैदीप्यमान इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण राज्यभरात ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

​युवासेनेचे कार्याध्यक्ष मा. पूर्वेश सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती देत शिवप्रेमींना हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

​प्रमुख शहरांमधील चित्रपटगृहे आणि वेळ

​या उपक्रमांतर्गत मुंबई, ठाणे, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर यांसह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये प्रमुख चित्रपटगृहात शो आयोजित करण्यात आले आहेत. काही महत्त्वाच्या ठिकाणच्या वेळा खालीलप्रमाणे आहेत:

१. मुंबई आणि परिसर (Mumbai & Region)

​मुंबई शहर:

​INOX मेट्रो, मरीन लाईन्स – ३.०५ PM

​PVR फिनिक्स, लोअर परेल – ३.०५ PM

​प्लाझा, दादर – २.१५ PM

​जयहिंद मुक्ता A2, लालबाग – ३.४५ PM

​मुंबई उपनगर:

​PVR ओबेरॉय, गोरेगाव – २.०५ PM

​PVR स्काय मॉल, बोरिवली – २.०५ PM

​ठाणे:

​सिनेपोलिस लेक सिटी मॉल – १२.४५ PM

​मुव्हीमॅक्स इटर्निटी मॉल – ३.३० PM

​आनंद, ठाणे – ११.०० AM

​मिरा-भाईंदर:

​मुव्हीमॅक्स, मिरा रोड – ३.३० PM

​मॅक्सस, भाईंदर – १२.३० PM

​२. कोकण विभाग (Konkan Division)

​रायगड: पीजी सिटी, महाड – १२.०० PM

​रत्नागिरी: सिटी प्राईड – ३.१५ PM

​सिंधुदुर्ग: लक्ष्मी, कणकवली – २.३० PM

​३. पश्चिम महाराष्ट्र (West Maharashtra)

​पुणे: PVR आयकॉन पॅव्हेलियन – ३.०५ PM

​पिंपरी-चिंचवड: आयनॉक्स जय गणेश – २.३५ PM

​सातारा: सेव्हन स्टार – २.०० PM

​सांगली: मुक्ता A2 – २.३० PM

​कोल्हापूर: PVR DYP सिटी – २.३५ PM

​सोलापूर: ई-स्क्वेअर ओएसिस – ११.३० AM

​४. उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra)

​अहिल्यानगर (अहमदनगर): कॉनप्लेक्स – २.०० PM

​धुळे: ज्योती – १२.०० PM

​नंदुरबार: मिराज सिनेमा – ११.०० AM

​जळगाव: PVR मल्टिप्लेक्स – ३.४० PM

​५. विदर्भ (Vidarbha)

​नागपूर: सिनेपोलिस ट्रिनिटी मॉल – १२.४५ PM

​अमरावती: मिराज सिनेमा – ११.०० AM

​अकोला: मिराज सिनेमा – ३.०० PM

​बुलढाणा: एआरडी मल्टिप्लेक्स – ११.३० AM

​वाशिम: H2M मल्टिप्लेक्स – २.५५ PM

​यवतमाळ: एलिमेंट ई स्क्वेअर – १२.०० PM

​वर्धा: युरीच मॉल – १२.३० PM

​भंडारा: एआर सिनेमा – २.४० PM

​गडचिरोली: पिक्चर टाइम – १२.०० PM

​चंद्रपूर: मिराज सिनेमा – ११.०० AM

​गोंदिया: ईओएस मल्टिप्लेक्स – १२.०० PM

​६. मराठवाडा (Marathwada)

​छत्रपती संभाजीनगर: अंजली रत्नदीप थिएटर – १.४५ PM

​धाराशिव: सितारा सिनेप्लेक्स – ३.१५ PM

​लातूर: PVR सिनेमा – २.१० PM

​नांदेड: भारत स्क्वेअर – १२.३० PM

​बीड: तनिष्का थिएटर – २.०० PM

​परभणी: अनुसया स्क्वेअर – ११.३० AM

​हिंगोली: संस्कार थिएटर – ११.०० AM

​जालना: कृष्णा मल्टिप्लेक्स – २.३० PM

​’राजा शिवाजी’ चित्रपट आणि युवासेनेचा पुढाकार

​छत्रपती शिवाजी महाराज यांचा संघर्ष आणि स्वराज्याची गाथा मांडणारा ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १ मे २०२६ रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून जास्तीत जास्त मराठी माणसाने, विशेषतः तरुणांनी हा ऐतिहासिक वारसा जवळून पाहावा, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि युवासेनेच्या नेतृत्वाखाली हे आयोजन करण्यात आले आहे.

​”जय महाराष्ट्र! जय शिवराय!” अशा घोषणा देत युवासेनेने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही यादी जाहीर केली असून, नागरिकांनी आपापल्या जवळील चित्रपटगृहात जाऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महत्वाची बातमी! महाराष्ट्र बोर्ड बारावी परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार; ऑनलाईन कसा चेक कराल?

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) घेतलेल्या बारावीच्या (HSC) परीक्षेचा निकाल उद्या, २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. यासंदर्भात मंडळाने अधिकृत माहिती दिली असून, निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. निकाल जाहीर होण्यापूर्वी उद्या सकाळी ११ वाजता बोर्डाची अधिकृत पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना बोर्डाच्या संकेतस्थळावर स्वतःचा निकाल पाहता येईल.

​विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहण्यासाठी त्यांचा सीट नंबर (Seat Number) आणि आईचे नाव (Mother’s Name) ही माहिती जवळ ठेवणे आवश्यक आहे. निकाल पाहण्यासाठी खालील अधिकृत संकेतस्थळांचा वापर करता येईल:

mahresult.nic.in

mahahsscboard.in

hscresult.mkcl.org

results.digilocker.gov.in

​यावर्षी बारावीची परीक्षा सुमारे १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली होती. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका डाऊनलोड करता येईल, जी पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. तसेच, ज्या विद्यार्थ्यांना आपल्या गुणांची पडताळणी (Verification) करायची आहे किंवा उत्तरपत्रिकेची छायाप्रत हवी आहे, त्यांच्यासाठी रविवार, ३ मे ते १७ मे २०२६ या कालावधीत ऑनलाईन अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन विहित शुल्क भरून अर्ज करावा लागेल.

​महत्वाची टीप: पुनर्मूल्यांकनासाठी (Revaluation) अर्ज करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असल्याचेही बोर्डाने स्पष्ट केले आहे.

विरार-डहाणू मार्गावर पहिली १५ डब्यांची ईएमयू लोकल गाडी धावण्यासाठी सज्ज

   Follow us on        

मुंबई: मुंबईच्या पश्चिम रेल्वे उपनगरीय सेवेत एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक बदल होणार आहे. १ मे २०२६ पासून विरार-डहाणू मार्गावर प्रथमच १५ डब्यांची (१५ कार) ईएमयू लोकल सेवा सुरू होत आहे. आतापर्यंत या मार्गावर केवळ १२ डब्यांच्या गाड्या चालवण्यात येत होत्या, मात्र वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन बदलामुळे चर्चगेट ते डहाणू यादरम्यान एकूण १७ लोकल सेवांचे रूपांतर १२ डब्यांवरून १५ डब्यांमध्ये करण्यात आले आहे. यापैकी ८ सेवा विशेषतः विरार-डहाणू विभागात चालवल्या जातील, तर उर्वरित सेवा चर्चगेट ते विरार दरम्यान धावणार आहेत.

​डब्यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे प्रत्येक गाडीची प्रवासी क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढणार आहे. याचा थेट फायदा वसई, पालघर, डहाणू आणि उत्तर मुंबईतील प्रवाशांना होणार असून, गर्दीच्या वेळी होणारी प्रवाशांची ओढाताण कमी होऊन प्रवास अधिक सुखकर होण्यास मदत होईल. विरार स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे रुंदीकरण आणि नवीन प्लॅटफॉर्मच्या उभारणीचे काम पूर्ण झाल्यामुळेच या १५ डब्यांच्या गाड्या चालवणे शक्य झाले आहे. दरम्यान, या गाड्यांच्या थांब्यांबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली असून, या लोकल ग्रँट रोड, चर्नी रोड आणि मरीन लाईन्स स्थानकांवर थांबणार नाहीत, मात्र दादर स्थानकावर या गाड्या दोनदा थांबतील. रेल्वेच्या या निर्णयामुळे उपनगरीय प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर वीकेंडलाच ब्लॉक; लोकल फेऱ्या रद्द, एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल

   Follow us on        

कल्याण: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागांतर्गत येणाऱ्या कल्याण ते बदलापूर स्थानकांदरम्यान ३ऱ्या आणि ४थ्या रेल्वे लाईनवरील ओव्हरहेड इक्विपमेंट (OHE) दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. १ मे आणि २ मे च्या मध्यरात्री हा ब्लॉक घेण्यात येणार असून, याचा मोठा फटका उपनगरीय लोकल सेवेसह लांब पल्ल्याच्या गाड्यांना बसणार आहे.

​ब्लॉकचे सविस्तर वेळापत्रक:

​मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक दोन टप्प्यांत घेण्यात येईल:

​ब्लॉक ‘A’ (शुक्रवार/शनिवार मध्यरात्र): दि. २ मे २०२६ रोजी पहाटे ०१:४० ते ०३:४० वाजेपर्यंत कल्याण ते अंबरनाथ दरम्यान अप आणि डाऊन दक्षिण-पूर्व मार्गावर काम चालेल.

​ब्लॉक ‘B’ (शनिवार/रविवार मध्यरात्र): दि. ३ मे २०२६ रोजी पहाटे ०१:३० ते ०३:३० वाजेपर्यंत अंबरनाथ ते बदलापूर दरम्यान डाऊन दक्षिण-पूर्व मार्गावर दुरुस्ती केली जाईल.

​लोकल प्रवाशांची गैरसोय; या असतील शेवटच्या गाड्या:

​ब्लॉकच्या कालावधीत कल्याण ते बदलापूर दरम्यान लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. प्रवाशांनी गोंधळ टाळण्यासाठी शेवटच्या आणि पहिल्या लोकलच्या वेळा लक्षात घेणे आवश्यक आहे:

​१ मे (शुक्रवार): CSMT वरून सुटणारी शेवटची बदलापूर लोकल (BL61) रात्री २३:५१ वाजता सुटेल.

​२ मे (शनिवार): CSMT वरून सुटणारी शेवटची कर्जत लोकल (S41) रात्री २३:३० वाजता सुटेल.

​ब्लॉकनंतरची पहिली गाडी: दोन्ही दिवशी कर्जतवरून पहाटे ०३:३५ वाजता सुटणारी (S4) कर्जत-CSMT लोकल ही पहिली गाडी असेल.

​एक्सप्रेस गाड्यांच्या मार्गात बदल:

​ब्लॉकमुळे खालील तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल मार्गे वळवण्यात आल्या आहेत:

१. ११०२० भुवनेश्वर – CSMT कोणार्क एक्सप्रेस

२. १८५१९ विशाखापट्टणम – LTT एक्सप्रेस

३. १२७०२ हैदराबाद – CSMT हुसेनसागर एक्सप्रेस

​विशेष सोय: ज्या गाड्यांचा कल्याण स्थानकावर थांबा होता, त्या आता प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे आणि पनवेल स्थानकांवर थांबतील.

​रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणाऱ्या या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली असून, प्रवाशांनी बदललेले वेळापत्रक तपासूनच बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे.

मदार–तिरुवनंतपुरम स्पेशल ट्रेनला संगमेश्वर रोड स्थानकावर थांबा मंजूर

   Follow us on        

संगमेश्वर | २९ एप्रिल २०२६ कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या मदार (अजमेर) ते तिरुवनंतपुरम सेंट्रल दरम्यानच्या विशेष गाडीला संगमेश्वर रोड स्थानकावर अधिकृत थांबा मंजूर करण्यात आला आहे. यामुळे संगमेश्वर आणि परिसरातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

​सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

​यापूर्वी या गाडीला संगमेश्वर स्थानकावर थांबा नसल्याने स्थानिक प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात ‘निसर्गरम्य चिपळूण आणि संगमेश्वर रेल्वे ग्रुप’ च्या वतीने कोकण रेल्वेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. तसेच, पद्मश्री गजानन माने यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेचे सी.एम.डी. (CMD) संतोष कुमार झा यांच्यासोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा विषय प्रकर्षाने मांडण्यात आला होता. प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करत अखेर या थांब्याचे अधिकृत पत्र प्रसिद्ध केले आहे.

​गाडीचे वेळापत्रक आणि वेळ

​रेल्वे प्रशासनाने जाहीर केल्यानुसार, ०२ मे २०२६ ते ०६ जून २०२६ या कालावधीत ही सेवा उपलब्ध असेल:

​ट्रेन क्र. ०६०१३ (तिरुवनंतपुरम – मदार जं. स्पेशल): ही गाडी दर गुरुवारी सकाळी ०८:१६ वाजता संगमेश्वर स्थानकावर येईल आणि दोन मिनिटांच्या थांब्यानंतर ०८:१८ वाजता मार्गस्थ होईल.

​ट्रेन क्र. ०६०१४ (मदार जं. – तिरुवनंतपुरम स्पेशल): ही गाडी दर रविवारी रात्री २३:१० वाजता संगमेश्वर स्थानकावर पोहोचेल आणि २३:१२ वाजता पुढील प्रवासासाठी रवाना होईल.

​कोकण रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे संगमेश्वर परिसरातील नागरिक आणि पर्यटकांना मोठा फायदा होणार आहे. रेल्वे ग्रुपच्या या यशस्वी पाठपुराव्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search